वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
ही समस्या बहुधा सर्वांनांच कधी ना कधी जाणवते. घरात एखादी जड वस्तू उचलल्यामुळे किंवा चुकीच्या पद्धतीने उभे राहिल्यास, कमरेस हिसका बसल्यास कमरेवर ताण पडून लचक भरण्याची शक्यता असते. यामध्ये कंबरेमध्ये प्रचंड वेदना होतात. कंबर लचकणे हे दोन-तीन वेगळ्या प्रकारचे असू शकते. काही वेळा कंबरेभोवतीचे स्नायू थोडेसे फाकतात किंवा लिगामेंट दुखावून फाटू शकतात. तर काही वेळा कंबरेच्या चकतीची हालचाल होऊन तिला सूज येण्याची शक्यता असते. यामुळे होणार्यान वेदना हे व्यक्तीचे वय, तिचे वजन, तिने कोणत्या प्रकारचे वजन उचलले आहे, त्या व्यक्तीला आधीपासूनच काही कंबरेचा त्रास आहे का इत्यादी गोष्टींवर अवलंबून असतात. कुठल्याही प्रकारे कंबरेमध्ये लचक भरल्यास सर्वप्रथम झोपावे आणि मांडीखाली उशी घ्यावी. यामुळे थोडासा आराम मिळतो. तसेच मज्जारज्जूवरील ताण कमी होतो. कुशीवर झोपायचे असल्यास दोन्ही गुडघ्यांमध्ये उशी ठेवावी. त्यामुळेसुद्धा मज्जारज्जूंवरील ताण कमी होतो. आपल्याला चालते आणि सहज मिळते, असे एखादे वेदनाशामक औषध घ्यावे. अर्थात औषध अधिक प्रमाणात घेऊ नये. कंबर लचकल्यानंतर पायात मुंग्या येत असतील तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणे केव्हाही योग्य ठरते. या मुंग्या पायाच्या पुढच्या आणि बाहेरच्या बाजूस पावलांपर्यंत येत असतील किंवा पायातील ताकद कमी झाल्यासारखे वाटत असेल, पायाचा अंगठा उचलता येत नसेल तर मात्र तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. डॉ. संजय गायकवाड
गवती चहास कोठें कोठें हिरवा किंवा ओला चहा म्हणतात. बंगालीत या चहास बंधबेन व हिंदुस्तानींत गंधतृण म्हणतात. संस्कृतांत यास भूस्तृण असें नांव आहे. इंग्लिश मध्ये lemon grass असे म्हणतात. हे एक बारमाही प्रकारातील सुवासिक गवत आहे. हें गवत हिरवेंगार असून खरबरीत असतें. पूर्वेकडील आर्चिपिलेगोंतल्य पुष्कळ बेटांत, सिलोनांत व हिंदुस्थानांत गवती चहा मुद्दाम बागांत लावितात. हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळात मुबलक उगवते. या गवतास क्वचित फूल येतें. गवती चहा हे बहुवार्षिक गवत असून, ते दोन मीटरपर्यंत उंच वाढते. त्याला भरपूर फुटवे येतात. पाने केसाळ असून ८० ते १२५ सें.मी. लांब असतात. पानांना लिंबासारखा वास येतो. सिंगापूर व सिलोन येथें सुवासिक तेल काढण्याकरितां गवती चहा पुष्कळ लावितात. अनेकांच्या दिवसाची सुरूवात चहानेच होते. मग त्यात गवती चहाच्या काही पाती मिसळा. चहाला चव येण्यासाठी थंडीच्या काळात याच्या लांब पानाचे बारीक तुकडे करून चहाबरोबर किंवा चहाशिवाय उकळतात. हा चहा चवीला उत्तम आणि आरोग्याला हितकारी आहे. यामुळे शरीर स्वच्छ होते, अवयवांचे कार्य सुधारते. मात्र लहान मुलांना गवती चहा देण्यापूर्वी अवश्य सल्ला घ्यावा. या गवताचा सुवासिक तेल काढण्याकडेच विशेष उपयोग होतो. 'कोलन वॉटर' तयार करण्यांत या तेलाचा फार खप होतो. तापांत घाम येण्यासाठीं गवती चहाचा काढा करून पाजतात. ऊर्ध्वपातन पद्धतीने पानांतील तेल काढले जाते. या तेलात सिट्रल, सिट्रोनेलॉल, मिरसीन आणि निरोल हे घटक आहेत. तेल सारक, उत्तेजक, शामक असल्यामुळे जंतनाशक, रेचक, उपदंश, त्वचाविकार, कुष्ठरोग, अपस्मार, पोटातील वात वगैरे विकारांवर उपयुक्त आहे. तेल काढलेल्या पानांच्या चोथ्यापासून लिहिण्याचा किंवा छपाईचा कागद बनू शकतो. कफ आणि वात विकारांवर या वनस्पतीचा उपयोग होतो.पानांचा काढा घाम आणणारा व ज्वरनाशक आहे. सुगंधी तेलाचा उपयोग सौंदर्य़प्रसाधनांत, तसेच अत्तर म्हणून होतो. साठवण्याच्या धान्यांमध्ये आणि कीटकनाशक म्हणून पानांचा वापर करतात. कपभर गवती चहा घेतल्याने किंवा त्याची वाफ घेतल्याने चोंदलेले नाक व छाती मोकळी होण्यास मदत होते. त्यातील अॅंन्टीबॅक्टेरियल घटक संसर्गजन्य आजारांपासून आपला बचाव करते. गवती चहाचे तेल डोकेदुखीची समस्या कमी करते. किडनी आणि यकृताचे कार्य सुधारते. गवती चहामुळे शरीर स्वच्छ राहण्यास मदत होते. तसेच सतत मुत्र विसर्जन झाल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते व पचनही सुधारते. गवती चहातील 'अॅतन्टीमायक्रोबाईल' घटक पचनसंस्थेचा मार्ग सुधारण्यास मदत करतो. त्यातील अॅसन्टीसेप्टीक घटक बॅक्टेरियांचा नाश करून बद्धकोष्ठता, छातीत होणारी जळजळ कमी करण्यास मदत करते. वाताचा त्रास असलेल्या रुग़्णांनी गवती चहाचे तेल लावणे हितदायी आहे. त्यातील दाहशामक घटक सांधेदुखी कमी करतात. यासाठी गवती चहाचे तेल खोबरेल तेलात मिसळून गुडघ्यांवर लावावे. तसेच गवती चहा पिणेदेखील संधीवाताच्या रुग्णांसाठी हितावह आहे. गवती चहामुळे कर्करोगापासून बचाव होतो. त्वचेचा तसेच स्तनांच्या कर्करोगापासून बचावण्यासाठी गवती चहा फायदेशीर आहे. गवती चहा मधील व्हिटामिन ए त्वचेच्या समस्या कमी करण्यास मदत करतात. त्यातील अॅसन्टीसेप्टिक घटक आणि अॅलस्ट्रिंजंट घटक पिंपल्स कमी करण्यास मदत करतात. गवती चहा प्यायल्याने त्वचा आणि शरीर दोन्ही स्वच्छ राहण्यास मदत होते. गवती चहाचे तेल नेहमीच्या तेलात मिसळून लावल्यास शरीराची दुर्गंधी कमी होण्यास मदत होते. खरा `ग्रीन टी' प्यायचा असल्यास, `गवती चहा' (चहा पत्ती) आणि `पुदिना' ची जुडी विकत आणा, पुदिना कमी टाका (अगदी नावाला), त्यात थोडे आले टाका आणि साखर टाका, आणि मस्त उकळून प्या. या गवती चहा पासून पाण्याच्या वाफेच्या साह्याने उर्ध्वपातन (डिस्टिलेशन) करून तेल काढण्यात येते. तेल हलके असल्यामुळे पाण्यावर तरंगते. तेलात ७० ते ८५ टक्के सिट्रॉल असते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
गोड , खारट , तुरट , कडू आणि तिखट या पाच चवींनी युक्त लसणाचे वैशिष्ट्य हे आहे कि खारट रस नैसर्गिकरित्या असणारा एकमेव कंद आहे … खरं पाहायला गेलं तर लसूण खरोखरच अमृत असावा ....
संस्कृत मध्ये याला रसोन म्हणतात. रस + ऊन म्हणजे एक रस उणे असणारा …
लसूण हे कांद्याच्या परिवारातील एक कंदमूळ आहे. एलियम सॅटायव्हम या वनस्पतीच्या कंदाच्या पाकळ्या म्हणजे लसूण होय. जगातील अर्जेटिना, बल्गेरिया, चीन, भारत, इटली, मेक्सिको, रशिया, अमेरिका आदी देशांत याची लागवड केली जाते. परंतु उत्पादनात चीनचा पहिला तर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. कांद्याप्रमाणे कच्च्या लसणाचा स्वाद आणि चव उग्र असते. परंतु शिजवला असता त्याची चव गोडसर होते. भारतीय मसाल्यांमध्ये, सॉस, चटण्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर वापर केला जातो. अशा या लसणाचे जीवाणूविरोधी, अँटिबायोटिक, अँटिसेप्टिक असे कितीतरी गुणधर्म आहेत. लसणात ऍलिसीन (dllicin) नावाचे सल्फर कंपाउंड आहे. या ऍलिसीनमुळे लसणात ऍण्टीबायोटिक व बुरशीजन्य आजारांना प्रतिबंध करण्याचा गुण दिसून येतो; परंतु या उडणशील द्रव्याचा फायदा मिळविण्यासाठी लसूण चिरणे किंवा चावून खाणे गरजेचे आहे. लसणाची पाकळी तशीच गिळल्यास औषधी गुणांचा फायदा मिळत नाही.
भारतीय जवळजवळ प्रत्येक घरात भाज्यांत लसूण वापरली जाते. पदार्थाची चव वाढविण्यासाठी लसूण हिचा गुणधर्म आहे. बहुतेक लोक फक्त अन्न शिजविण्यासाठी मसाले वापरत असले तरी लसूण वापरतात. लसूण ही औषध म्हणून फायदेशीर आहे. लसूण अनेक रोगांवर फायदेशीर ठरली आहे.
लसूण शरीराची प्रतिकार शक्ती वाढते. कर्करोग सारख्या गंभीर रोग लढण्यासाठी मदत करते. वैद्यकीयदृष्ट्या कोलोस्ट्रोल कमी करण्यास मदत करते. स्तनाचा आणि कर्करोग कमी करण्यासाठी लसूणीच्या कच्च्या पाकळ्या खाणे केव्हाही चांगल्या. शरीरातील टी-सेल्स, फॅगोसाईट्स, लिंफोसाई्टस आदी प्रतिरोधक तत्व वाढणिवण्यास लसूण मदत करते. प्रतिरोधक घटक आरोहित आणि शरीराची प्रतिकार वाढविण्यासाठी लसूण महत्वाची भूमिका बजावते. वाढता रक्तदाब नियंत्रणात आणण्यात लसूण उपयोगी ठरते.
लसूण खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. आपले हृदय नेहमी तंदुरुस्त ठेवण्यास लसूण मदत करते. शरीरात वाढणार कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल पातळी दूर करणे सोपे आहे. उच्च रक्तदाब आणि रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी लसणाच्या दोन कच्या पाकळ्या खाणे आवश्यक आहे.
आपल्या वायू पोटात तयार होतो किंवा आपण बद्धकोष्ठता समस्येने अस्वस्थ आहेत तर लसूण आपल्यासाठी खूप फायदेशीर असेल. काही काळ नियमितपणे लसूण खाण्यात समाविष्ट केले तर त्याचा लाभ चांगला होतो. लसूण बारीक करुन गरम दूध आणि गरम पिण्यातून पिणे चांगले. सांधे दुखी किंवा कमर दुखीवर हे पाणी अधिक गुणकारी आहे.
आपली श्रवण क्षमता वाढविण्यासाठी लसूण चांगली. तिळाच्या तेल्यात लसूण बारीक करुन ते गरम करायचे. थंड झाल्यावर ते तेलाचे काही थेंब कानात टाकल्यास कान दुखणे थांबतो. हे जर तुम्ही नियमित केल्यास तुमची ऐकण्याची क्षमता वाढते. कान दुखण्यावर आराम मिळतो. लसूण अनेक रोगांवर रामबाण उपाय आहे.
लसणाचे उपयोग :
१. कफाशी संबंधित आजार झाल्यास लहान मुलांची गळ्यात लसणीच्या कांड्याची माळ गळ्यात घालतात .
२. लसणाची पेस्ट करून त्याचा लेप आमवातासारख्या सूज असणाऱ्या व्याधीत करतात .
३. बरगडीत वेदना होत असतील लसणाचा रस चोळावा.
४. गजकर्णासारखा खाज असलेला त्वचारोग लसणाचा रस नियमित चोळला असता बरा होतो .
५. किडा चावल्याने वेदना आणि खाज येत असेल तर लसणाचा रस चोळावा .
६. कानात वेदना होत असेल तर कानात लसूण रस घालून आटवलेले गोडेतेल सोडावे . हेच तेलं छातीवर चोळले तर कफ असूनही कोरडा वाटणारा खोकला बरा होतो .
७. भूक न लागणे , तोंडाला चव नसणे, अजीर्ण, पोटात वेदना, जंत, अशा आजारात लसणाचे नित्य सेवन करावे .
८. भात खाल्ल्याने पोट फुगत असेल तर लसूण घालून शिजवलेला भात खायला द्यावा .
९. हृदयाची अतिउत्तेजना कमी करून हृदयाला आलेली सूज लसूण कमी करतो .
१०. ३० मि.ली. दुधामध्ये लसणाच्या पाच पाकळ्या घालून दूध चांगलं गरम करावं. दररोज असं दूध प्यायल्याने जुनाट खोकला, दमा, क्षयरोग यांचा नाश होतो .
११. लसूण मनाची मरगळ घालवतो .
१२. हाड मोडले असता लसूण घालून उकळलेले दुध दिले असता हाड लवकर सांधले जाते .
१३ . लसणामध्ये नैसर्गिक रित्या गंधक असते . कच्चा लसूण खाल्ला तर त्यातल्या गंधकाचे उत्सर्जन त्वचेतून घामावाटे होते . कुजणाऱ्या/ सडणार्या कुष्ठरोगात याचा विशेष फायदा होतो .
१४. तापावर औषध म्हणून लसूण वापरता येतो . जुनाट तापावर , किंवा थंडी वाजून येणाऱ्या तापावर लसूण चांगला आराम देतो ….
१५. लसूण कीटकनाशक असून दररोज लसूण खाल्याने टीबीचे विषाणू मरण पावतात.
१६. अँटिबायोटिक औषधांना लसूण हा एक उत्तम पर्याय आहे. लसणाच्या एका कांडीचे चार भाग करून दोन्ही वेळच्या जेवणानंतर अध्र्या तासाने त्यातील दोन तुकडे ठेवून चघळावे नंतर पाणी प्यावे.
१७. डोकेदुखीवरही लसूण हा रामबाण उपाय आहे. लसणाच्या चार पाकळ्या ३० ग्रॅम मोहरीच्या तेलात घालून ते तेल कोमट करून डोक्याला लावल्याने डोकेदुखी थांबते. कान दुखत असल्यास हेच तेल कानात घालावे. त्वरीत आराम पडतो.
१८. ज्वरनाशक असून हाडांतला तापही यामुळे बरा होतो.
१९. शरीरास हानिकारक असलेल्या रक्तातील कोलेस्ट्रॉलला नियंत्रित ठेवण्याचे काम लसूण करते. म्हणूनच दैनंदिन आहारात दोन ते तीन लसूण पाकळ्यांचा जरूर वापर करावा.
२०. संधिवात व आपवाताचा त्रास असणाऱ्यांनी त्यांच्या रोजच्या आहारात लसणाचा समावेश केल्यास “शूल’ कमी होण्यास मदत होते. लसूण खाल्ल्याने काही लोकांना ऍसिडिटी होते. अशांनी लसूण 2-3 तास दुधात भिजवून मग खावा व भरपूर पाणी प्यावे.
२१. लसूण हा कर्करोग प्रतिबंधकदेखील आहे. लसूण नियमित खाण्यात असल्यामुळे जठर व आतड्याच्या कॅन्सरचा धोका कमी होतो, असे एका शास्त्रीय पाहणीत आढळून आले आहे. प्राण्यांवर केलेल्या एका संशोधनात लसणामुळे ट्यूमर कमी झालेला आढळून आला.
काळजी :
लसूण तीक्ष्ण, उष्ण असल्याने पित्त प्रकृतीच्या व्यक्ती, गर्भिणी यांना तो वर्ज्य आहे …..
जास्त लसूण खाल्ल्याने त्रास झाला तर माठातील थंडगार पाण्यात धने पावडर भिजवून ते पाणी गाळून थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने पाजावे …
गृहिणींनी भाजी, वरण आमटी व चटणीत लसणाचा सढळ हाताने वापर करावा. त्यामुळे कुटुंबातील सर्वांचे आरोग्य उत्तम राहू शकेल.
आरोग्यदूत WhatsApp ग्रुपवरुन
अपुरी झोप, तणावग्रस्त जीवनशैली , अरबट-चरबट फास्ट फूड खाणे अशा एक ना अनेक कारणांनी शरीरात पित्ताचे दोष निर्माण होतात . तीव्र डोकेदुखी , छातीत जळजळ ,उलट्या होणे ,अस्वस्थ वाटणे अशी पित्ताची लक्षणे दिसून येतात . मग पित्तावर उपाय म्हणून बाजारात उपलब्ध असलेली विविध रूपातील ‘एन्टासिड्स’(आम्लता नष्ट करणारा अल्कलाइन पदार्थ) ही निष्फळ ठरतात , तेव्हा आजीच्या बटव्यातील हे .......
1) आरामदायी केळं :
केळ्यातून शरीराला उच्च प्रतीच्या पोटॅशियमचा पुरवठा होतो त्यामुळे पोटात आम्ल (acid ) निर्मितीची प्रक्रिया मंदावते . तसेच ‘फायबर’ शरीराची पचनक्रिया सुलभ करते. फळांमधील काही विशिष्ट घटकांमुळे अम्लांच्या विघातक परिणामांपासून आपले रक्षण होते.
- पित्त झाल्यास पिकलेले केळ खाल्याने आराम मिळतो. केळ्यातील पोटॅशियम विषहारक द्रव्य म्हणून काम करते व पित्ताचा त्रास कमी होतो.
2) फायदेशीर तुळस :
तुळशीमधील एन्टी अल्सर घटक पोटातील / जठरातील अम्लातून तयार होणाऱ्या विषारी घटकांपासून बचाव करते.
– तुम्हाला पित्ताचा त्रास जाणवत असल्यास किंवा अस्वस्थ वाटत असेल तर ४-५ तुळशीची पाने चावून खा .
3) अमृतरुपी दुध :
दुधातील कॅल्शियमच्या घटकांमुळे पोटात तयार होणारी विघातक आम्ल निर्मिती थांबते व अतिरक्त आम्ल दुध खेचून त्याचे अस्तित्व संपवते . थंड दुध प्याल्याने पित्तामुळे होणारी पोटातील व छातीतील जळजळ कमी होते.
– दुध हे पित्तशामक असून ते थंड तसेच त्यात साखर वा इतर पदार्थ न मिसळता प्यावे . मात्र त्यात चमचा भर साजूक तूप घातल्यास ते हितावह होते.
4) बहुगुणी बडीशेप:
बडीशेपमधील एन्टी अल्सर घटक पचन सुधारते व बद्धकोष्ठता दूर करते . बडीशेपमुळे पोटात थंडावा तयार होऊन जळजळ कमी होते.
– बडीशेपाचे काही दाणे केवळ चघळल्याने देखील पित्ताची लक्षणे कमी होण्यास मदत होते. तसेच पित्तामुळे अस्वस्थ वाटत असल्यास , बडीशेपाचे दाणे पाण्यात उकळून ते रात्रभर थंड करून ठेवलेले पाणी प्यायल्याने आराम मिळतो.
5) पाचक जिरं :
जिऱ्याच्या सेवनामुळे शरीरात काही लाळ निर्माण होते , ज्यामुळे पचन सुधारते , मेटाबॉलीझम सुधारते आणि शरीरातील वायू व गॅसचे विकार दूर होतात .
– जिऱ्याचे काही दाणे केवळ चघळल्यानेदेखील आराम मिळतो . किंवा तुम्ही जिऱ्याचे दाणे पाण्यात उकळून ते पाणी थंड करून प्या.
6) स्वादिष्ट आणि गुणकारी लवंग :
लवंग चवीला तिखट असली तरीही लवंग अतिरिक्त लाळ खेचून घेते , पचन सुधारते आणि पित्ताची लक्षणं दूर करते . लवंगामुळे पोटफुगी व गॅसचे विकार दूर होतात.
- जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर लवंग दाताखाली पकडून ठेवा , त्यातून येणारा रस काहीकाळ तोंडात राहू द्या . यारसामुळेच पित्ताची तीव्रता कमी होते. लवंगेमुळे घश्यातील खवखवही कमी होते.
7) औषधी वेलची:
आयुर्वेदानुसार वेलची शरीरातील वात, कफ व पित्त यांमध्ये समतोल राखण्याचे काम करते . स्वादाला सुगंधी व औषधी गुणांनी परिपूर्ण वेलचीच्या सेवनाने पचन सुधारते. पित्ताचा त्रास कमी होतो.
- पित्तापासून आराम मिळवण्यासाठी वेलचीचे दोन दाणे ठेचून (सालीसकट / सालीशिवाय ) ती पाण्यात टाकून उकळा , हे पाणी थंड झाल्यावर प्यायल्याने पित्तापासून तात्काळ आराम मिळेल .
8) वातहारक पुदिना :
पुदिना पोटातील आम्लाची तीव्रता कमी करतो . पुदिन्यातील वायूहारक गुणधर्मामुळे पचनक्रिया सुधारते. पुदिन्यातील थंडाव्यामुळे पोटदुखी व जळजळ थांबते .
- पित्ताचा त्रास होतअसल्यास काही पुदिन्याची पाने कापा व पाण्यासोबत उकळा . थंड झाल्यावर हे पाणी प्या. अपचनावरदेखील पुदिना गुणकारक आहे. पुदिन्यातील ‘मेन्थॉल’ पचण्यास जड पदार्थ खाल्ल्याने होणारा त्रास , डोकेदुखी तसेच सर्दी दूर करण्यास मदत करतो.
9) आल्हाददायक आलं :
आलं या औषधी मुळाचा भारतीय स्वयंपाकघरात प्रामुख्याने वापर केला जातो . आल्याच्या सेवनाने पचन सुधारते . तसेच पोटातील अल्सरशी सामना करण्यास आल्याचा फायदा होतो . आल्यातील तिखट व पाचकरसांमुळे आम्लपित्त कमी होते.
- पित्तापासून आराम मिळवण्यासाठी आल्याचा एक लहान तुकडा चघळत रहा. तुम्हाला जर आलं तिखट लागत असेल तर ते पाण्यात टाकून उकळून ते पाणी प्या . किंवा तुम्ही आल्याचा तुकडा ठेचून त्यावरथोडा गुळ टाकून चुपत रहा.
10) पित्तशामक आवळा :
तुरट , आंबट चवीचा आवाळा कफ आणि पित्तनाशक असून त्यातील ‘व्हिटामिन सी’ , अन्ननलिका व पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते .
-रोज चमचाभर आवळ्याची पावडर / चूर्ण घेतल्यास पित्ताचा त्रास होत नाही .
- कच्चा आवळा मिठासोबत खाल्ल्यास शरीरास सर्व रस (षड्रस) मिळतात.
मी एक गोष्ट ऐकली ती अशी,एक फॉरेस्ट ऑफिसर नवीन लग्न झालेला जंगलातील कॉर्टर मध्ये राहत होता. त्याच्या बायकोला ब्लीडींगचा त्रास झाला, रक्त थांबत नव्हते, डॉक्टरांनी सांगितले आठ दिवसांची सोबतीण आहे. काय तिच्या इच्छा असतील त्या पूर्ण करा. तो हताश झाला होता. एक पागोटेवाला म्हातारा आला, त्याला म्हणाला तुझी बायको आजारी आहे ना? मी सांगतो ते कर ऑफिसर ने विचार केला ऐवी तेवी बायको मरनार, चला करून पाहू. म्हाताऱ्याने केळी आनन्यास सांगितले. त्यांनी केळी आणली. एक केळ सोलून फाकवुन त्यात पिंजर (हळदीचे कुंकू ) घातले. आणि ते केळ त्याच्या बायकोला खाण्यास दिले. असे २-३ वेळा दिले. ब्लीडींग थांबले आणि दोन दिवसात ती बायको घरात काम करू लागली.
गोष्ट ऐकल्यावर माझ्या मनात विचार सुरू झाले, पूर्वी लहानपणापासून मुलींना कुंकू लावायची आपल्याकडे पद्धत होती. कपाळावर कुंकू लावतात तेथे अक्युप्रेशर पिच्युटरी ग्लॅन्ड चा पॉईंट आहे तसेच तिथे आज्ञा चक्रही येते. तिथे हळदीचे कुंकू लावले की कुंकवातील द्रव्य तिथे अबसॉरब होऊन पिच्युटरी ग्लॅन्ड ऍक्टिव्ह होते. त्यामुळे हार्मोन सिक्रीशन नीट होते. त्यामुळे पूर्वी बायकांना पाळीचे त्रास कमी होते.
मी हळदीचे कुंकवाचे टिंक्चर करून ते होमीओपॅथी पद्धतीने सूक्ष्म करून साखर केली व पाळीचा त्रास असलेल्या स्त्रियांना दिले. त्यांची ३-६ महिन्यात पाळी नॉर्मल होऊ लागली. कुंकवाच्या गोळ्या करून दिल्या, ४ दिवसानंतर होणारे ब्लीडींग थांबले.
आमच्या पूर्वजांनी बायकांनी कुंकू लावायचे ही प्रथा पडून बायकांचे आरोग्य सांभाळले, धंदा केला नाही.
कुंकू हे हळदीपासून तयार केलेले असावे. टिकली लावून उपयोग होत नाही. ज्या शिकलेल्या, फॉर्वर्ड बायकांना कुंकू लावण्याची लाज वाटते किंवा कमीपणाचे वाटते. त्यांनी रात्री झोपताना कुंकू पाण्यात कालवून औषध म्हणून लावावे.
शुद्ध कुंकू कसे ओळखावे - १] कुंकवाला हळदीचा वास येतो. २] थोडे कुंकू हातावर घेऊन त्यावर ओला चुना चोळला तर काळे होते. त्यात रंगाची भेसळ असेल तर रंग लाल राहतो.
अरविंद जोशी
९४२१९४८८९४
खाली दिलेले सोपे नियम पाळल्यास तुमच्या पासून आजारपण आणि म्हातारपण दोन्ही लांब राहील.... स्लिम अँड फिट राहाल....
कायम तारुण्याचा अनुभव......
1. रात्री जास्तीजास्त उशीर म्हणजे 10.00 ला झोपणे.
2. सकाळी 5.00 -5.30 किंवा त्याचा आत उठणे.
3. ब्रश करायच्या आधी एक गलास गरम पाणी लिम्बु पिळून हळू हळू एकेक घोट करून पिणे.
4. 10 मिनिटे वज्रासनात बसणे.
5. कमीत कमी फक्त 10 सूर्यनमस्कार जास्तीत जास्त 25 हळुवार पणे घालणे.
5. फक्त 10 मिनिटे प्राणायाम कमीतकमी.
6. रोज न चुकता एक आवळा किंवा अवळ्याचा रस.
7. 8.30-9.00 वाजता भरपूर नाष्टा (या वेळेत जेवण केल्यास उत्तम)
8. 12.30 ला थोडे हलके जेवण.
9. ऑफिस मधेच दर 1 तासानी खुर्चीवरच हात पाय स्ट्रेचिंग करणे.
10. संध्याकाळी 7 - 7.30 ला एकदम कमी जेवण.
11. कंपल्सरी 15 मिनिटे तरी वज्रासन मध्ये बसणे.
12. 10.00 वाजता 1 ग्लास गरम पाणी पिणे आणि 10.00 ला झोप.
या खबरदारी घ्या...
*रात्रीच्या जेवणानन्तर चालायला जाणे टाळावे, किंवा थोडेच चालावे, याला शतपावली म्हणतात.... म्हणजे शंभर पावले चालणे....
लोकं 5-5 किलोमिटर घाम गाळत चालून येतात रात्री....
* जेवणाच्या अगोदर अर्धा तास आणि जेवण नंतर एक तासाने पाणी पिणे, पचन शक्ती चांगली ठेवायची असल्यास जेवताना अजिबात पाणी पिऊ नये.
* रोज कमीत कमी 3 लिटर पाणी प्यावे.
* फक्त सिजनल फळेच खावी
* सर्वाना हात जोडून विंनती अशी कि कोल्डड्रिंक पिणे टाळावे, खूप वाईट आहे.
* डाव्याकुशीवर झोपावे.
* सकाळी 5 मिनिटे तरी उन्हात उभे राहावे.
* एक लक्षात घ्या, आपले पोटाचे कार्य चांगले चालू असल्यास कुठलाही आजारपण येत नाही,
आणि
वर दिलेले सर्व च्या सर्व उपाय पोटाचे कार्य उत्तम चालण्यां साठीच आहेत.
संकलन व् प्रसारण
।।क्रीडाभारती पुणे।।
आरोग्यदूत WhatsApp ग्रुपवरुन
ह्या दिवसात फेब्रुवारी मार्च महिन्यात काटेसावर हा वृक्ष फुलांनी बहरतो. पेपरमधे फोटोपण येतात. ह्याच्या फुलांचा माझा अभ्यास होण्याचा योग आला.
1995चे डिसेंबर मधे, वयाच्या 49 वर्षी, माझे हातापायाचे स्नायूतील घट्टपणा जाऊन लूज पडले अगदी 80 वयाचे वृध्दासारखे. ह्या आधी मी एक गोष्ट ऐकली होती.
-- एका ट्रक ड्रायव्हरला अपघात होतो म्हणून लोकं त्याला बडवतात आणि तो दुसरे दिवशी मित्रांच्यात येतो, मित्र विचारतात अरे काल तुला एवढा मार बसला आणि तू इथे कसा? त्रास होत नाही का? तो सांगतो कांटेसावरीचे फुल खाल्ले. त्यामुळे त्रास गेला.--
ही 1992 साली ऐकलेली गोष्ट एकदम आठवली. विचार केला मार बसून त्रास होतो तो स्नायुना. म्हणजे हे फुल स्नायुवर काम करते. दैवयोगाने फेब्रूवारी 96 ला आमचे जवळ असणारे काटेसावर फुलले असल्याचे लक्षात आले. मी एक फुल खाल्ले. अतिशय गिळगीळीत लागले तरीपण खाल्ले. रोज एक फुल खात होतो. आठ दिवसांत माझे स्नायुत जोर येऊन पूर्ववत झाले.
ह्यानंतर मी ही फुले सुकवून पावडर करून गोळ्या केल्या. ह्या गोळ्या प्रथम ट्रायल म्हणून श्री आगाशे (वय 82) यांना दिल्या. दुसर्याच दिवशी त्यांचा मला फोन आला. "तुम्ही कसल्या गोळ्या केल्यात ताबडतोब या." मी घाबरलो व सगळी कामे सोडून त्यांच्याकडे गेलो.एवढे तातडीने बोलावले काय त्रास झाला असे विचारले. त्यांनी मला खुर्चीत बसायला लावले. आणि स्वतः उठून चालायला लागले व म्हणाले, "तुमच्या गोळ्यां घेतल्यावर अर्ध्या तासांतच माझी चाल सुधारली आहे बघा." त्याच्या चालीत बरीच सुधारणा होती. ते भरभर चालत होते.
ह्या गोळ्यांचा उपयोग चांगला झाला व होत आहे. ह्या गोळ्यांमुळे स्नायुना फायदा होतो, एनर्जी येते, आजारपणा नंतरचा थकवा जातो, असा माझा व माझेकडील पेशंटचा अनुभव आहे. (पेशंट बघितल्या शिवाय मी औषधे देत नाही) साठ वयाच्या पुढील लोकांना खुप उपयोग होतो. व्हायटल एनर्जी वाढते असा अनुभव आहे.
सध्या ह्या फुलांचा सिझन आहे. शहरात ही झाडे लावली जात नाहीत ( आहेत ती तोडली जातात). ही फुले गोळा करून, सुकवून, मिक्सरमधे पावडर करून ठेवून वापरावी. घरच्यासाठी गोळ्या करणे गरजेचे नाही. ही पावडर पाण्या बरोबर वा मधा बरोबर आवश्यकतेनुसार घ्यावी. फुलांचा गुलकंद पण करता येतो व तो पण उपयोगी पडतो.
फोटो बघण्यासाठी लिंकवर क्लीक करा
http://www.google.co.in/search?site=webhp&tbm=isch&oq=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%87&aqs=mobile-gws-lite.3.0l5&q=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0#imgrc=7vljf1cdu05g1M:
अरविंद जोशी (बी.एस्सी.)
9421948894
आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं जीभ हे महत्वाचं इंद्रिय आहे. चुकून कधी आजारी पडलात आणि डॉक्टरकडे गेलात, तर डॉक्टर म्हणतो जीभ बघू अशी ह्या जीभेची महती आहे. त्या तुमच्या जीभेवर जास्त प्रमाणात पांढरट थर साचलाय का? असं असेल तर ती निश्चीतच चिंतेची बाब असू शकते.
दातांसाठी ब्रश करणं जितकं महत्वाचं आहे. तितकंच जीभेची स्वछता राखण पण गरजेचं आहे. तोंड धुताना डॉक्टरांच्यामते जीभ टंग क्लिनरनं स्वच्छ करावी. टंग क्लिनरनं जीभ स्वच्छ करताना जीभेवर जास्त दबाव टाकू नये. दोन-तीन वेळा हलक्या हतांनी टंग क्लिनरचा उपयोग करावा. आपल्या तोंडामध्ये हानिकारक जीवाणूंना जराही थारा देवू नका.
तोंडाच्या आजारांशी संबंधीत विशेषज्ज्ञ सोनाली बस्सींच्या मते गडद रंगाचे खाद्य पदार्थ खाल्यामुळं जीभेचा रंग बदलतो. परंतु ते एवढे हानीकारक नसते आणि ते टंग क्लिनरच्या साहाय्यानं स्वच्छ करता येवू शकतात. त्यासाठी प्लास्टिकचा किंवा धातुचा टंग क्लिनर वापरता येतो. काही कंपन्याच्या ब्रशच्या मागं जीभ स्वच्छ करण्यासाठीची सोय केलेली असते. ज्यामुळं आपण दातही घासू शकतो. आणि जीभही साफ करू शकतो.
जीभ स्वच्छ करण्याचा आणखी एक पर्याय म्हणजे माउथवॉशचा वापर करणे. अर्ध्या ग्लास पाण्यात अर्धा चमचा मीठ टाकून पाच-सहा वेळा गुळण्या करण्यानं सुध्दा जीभ स्वच्छ करता येते. जीभेवर घाण असल्यास ते डिहॉयड्रेशनचं कारण ठरु शकतं. त्यामुळं आपल्या जीभेची काळजी घ्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
निद्रानाश असल्यास पेरू, सफरचंद़ आणि गाजर किंवा बटाट्याचा रस पालक रसाबरोबर सायंकाळच्या पूर्वी घ्यावा.
झोपण्या पूर्वी सोसवेल ईतक्या गरम पाण्यात १०/१५ मिनिटे पाय बुडवून ठेवावेत.
रोज डोक्यास व तळपायास सावकाशपणे एरंडेल तेल चोळून जिरवावे. तळहातावरही ते लावून जिरवावे. तळपाय काशाच्या वाटीने घासावेत, गुण खात्रीने येतो. मात्र या गोष्टीत सातत्य आवश्यक आहे.
गरम दुधात दोन चमचे मध घेऊन झोपावे
गाईचे तूप व जायफळाची पावडर हातापायांना व कपाळावर घासल्याने उष्णता कमी होऊन शांत झोप लागते.
डोके व पाय यांना खोबरेल तेल किंवा गाईचे तूप काशाच्या वाटीने घासावे.
रोज रात्री खुरासनी ओव्याची पावडर चिमुटभर तोंडात टाकून त्यावर भांडेभर पाणी प्यावे त्यामुळे झोप चांगली येते. खुरासनी ओवा काष्टौपधीच्या दुकानात मिळतो. या उपायाने मानेतील आखडलेल्या शिराही मोकळ्या होतात.
शुद्ध माक्याचे ब्राह्मी तेल झोपण्यापूर्वी डोक्याला मालिश करावे
साजूक लोणकडे तूप चमच्यात घेऊन गरम करून झोपताना ३/४ थेंब प्रत्येक नाकपुडीत सोडावे.
नैवेद्याच्या अर्धी वाटी दुधात जेष्टमध उगाळून गंधासारखे दाट करावे व त्यात तितकेच खोबरेल तेल घालून हे तयार केलेले तेल झोपण्यापूर्वी डोक्यास लावावे.
दुधी भोपळ्याचा रस तीळाच्या तेलात मिसळून डोक्यास मसाज करावा.
सॅलड पत्यांचा रस गुलाब तेलात म्सळून कपाळावर चोळल्यास शांत व चांगली झोप येते.
भरपूर दही खावे व डोक्यात चोळावे. ......रात्री मात्र दही खाऊ नये.
दिर्घ श्वसन करावे त्यामुळे देखिल झोप शांत लागते.
वरील सर्व कारणांमुळे झोप लागेल अर्थात वरील सर्व उपाय सर्व प्रकारच्या तब्बेतीच्या लोकांना उपयोगी पडतीलच असे नाही. कारण प्रत्येक औषधाचे परिणाम प्रकृति-प्रकृतीनुसार बदलत असतात. अर्थात वरील पैकी कोणत्यातरी एकाद् दोन उपायांनी गुण निश्चित येईल.
झोप न येणे हे जसे शरीर स्वास्थ्याच्या दृष्टीने अपायकारक आहे तसेच झोप जास्त येणे हे देखिल अपायकारक आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मधुमेह आपल्या देशाची वाढती समस्या आहे. या जगात मधुमेहींच्या गणनेमध्ये आपला दुसरा नंबर येतो. प्रत्येक पाचव्या भारतीय नागरिकाला मधुमेह असून ही फार काळजीची बाब आहे. मधुमेहाची सर्वात मोठी समस्या म्हणजे त्याची काही लक्षणे नसतात. उदा. जेव्हा आपल्याला संसर्ग झाला की ताप येतो, पोट बिघडले की मग पोट दुखते- पण मधुमेहात मात्र असे काहीही होत नाही. मधुमेहाची जी लक्षणे आहेत- खूप भूक लागणे, खूप तहान लागणे, खूप लघवी होणे, ही रक्तातील साखर फार जास्त प्रमाणात वाढल्यावरची लक्षणे आहेत. पण रक्तातील साखर हळूहळू जास्त होते.
सर्वसाधारण प्रमाणापेक्षा थोडी जास्त साखर रक्तात असताना जर कळली तर त्यावर त्वरित इलाज-पथ्य करून ती आटोक्यात आणता येते. परिणामी मधुमेहामुळे शरीरात होणारी गुंतागुंत टाळता येते. पण ही थोडी वाढलेली साखर रक्ताचा तपास केल्यावरच कळते. त्यामुळे रक्ताचा तपास करणे आवश्यक आहे. जर आपल्या आई-वडील किंवा बहीण-भावाला मधुमेह असेल तर मधुमेहाची चाचणी नियमित रूपाने करणे आवश्यक आहे. मधुमेह झाल्यावर त्याचे पथ्यपाणी व इलाज करण्यापेक्षा तो टाळता यावा यावर भर दिला पाहिजे. ‘Prevention is better than cure’ अशी म्हणच आहे. मधुमेह टाळण्याकरता वजन आटोक्यात ठेवणे आवश्यक आहे. खूप गोड खाल्ले की मधुमेह होतो हा चुकीचा समज आहे. गोड खाऊन मधुमेह होत नाही- पण खूप गोड पदार्थ खाल्ले की वजन वाढते, पोटावरची चरबी (abdominal fat) वाढते व त्यामुळे मधुमेह होण्याची शक्यता वाढते.
मधुमेह टाळण्याचा सोपा उपाय आहे की ‘पोटभर खाऊ नका व पोट रिकामे ठेवू नका’! पोट रिकामे ठेवले- खूप भूक लागली की मग आपण विचार न करता खातो, गरजेपेक्षा जास्त खातो व वजन वाढते व अती खाण्यामुळे रक्तातील साखर वर-खाली होऊ शकते. आपण खाताना, आपल्याला किती अन्नाची गरज आहे हे जाणून व समजून घेणे आवश्यक आहे. जर आपल्या रोजच्या जेवणानेही आपले वजन सतत वाढत आहे, असे कळले की हे अन्न आपल्या गरजेपेक्षा जास्त आहे हे आपणास समजले पाहिजे. कोणी आपल्याहून जास्त खाते यावर लक्ष न देता- आपल्याला अन्नाची किती गरज आहे, हे समजले पाहिजे. जर वजन वाढत असेल तर अन्नाचे प्रमाण कमी केले पाहिजे.
अन्नाची निवडही बरोबर केली पाहिजे. उदा. भात खाऊन वजन वाढते, मधुमेह असेल तर रक्तातील साखर वाढते, म्हणून बरेच लोक साखरेचे प्रमाण वाढले किंवा वजन कमी करायचे असेल तर भात सोडतात. पण मग कमी खाऊन पोट भरत नाही म्हणून पोळीचे प्रमाण वाढवतात. पण असे करताना पोळी व भात खाऊन साखर वाढते, वजन वाढते. त्यामुळे पोळी जास्त घेण्यापेक्षा सॅलड, भाजी, आमटी यांचे प्रमाण वाढवावे. किंवा दही, उसळ यांचे प्रमाण वाढवायला पाहिजे. त्याचबरोबर आहाराबद्दलचे गैरसमजही समजून घेतले पाहिजेत. उदा. मधुमेहींना साखर चालत नाही, पण गूळ नैसर्गिक असल्यामुळे चालतो किंवा मधसुद्धा चालतो. हा फार मोठा गैरसमज आहे. असे केल्यामुळे मधुमेह आटोक्यात ठेवणे कठीण होते. शरीरात साखर, गूळ व मध हे सर्व एकाच प्रकारे काम करतात व समप्रमाणात साखर वाढवतात. त्यामुळे हे तीनही पदार्थ टाळावेत.
साखर मधुमेहींना वज्र्य आहे हे ज्ञान सर्वाना असते, पण स्निग्ध पदार्थही मधुमेहींना तेवढेच हानीकारक आहेत. हे फार कमी लोकांना कळते. एक विशिष्ट प्रकारचा स्निग्ध पदार्थ – ‘Trans fats’ हा सर्वात हानीकारकआहे. ट्रान्सफॅट हा डालडा, मार्गरीन इत्यादी पदाथार्ंत आढळतो. या प्रकारचे स्निग्ध पदार्थ वापरूनच फराळाचे पदार्थ, मिठाया इत्यादी तयार होतात. त्यामुळे असे पदार्थ टाळावेत. त्याचप्रमाणे इतर स्निग्ध पदार्थसुद्धा कमीतकमी प्रमाणात वापरावेत. तेल अती उकळले / तापविले की त्यात ‘Trans fats’ तयार होतात. हे तेल परत वापरले तर हे ‘Trans fats’ तयार केलेल्या पदार्थात येतात व त्यामुळे मधुमेहीला त्रास होऊ शकतो. स्निग्ध पदार्थात ऊर्जा इतर अन्नपदार्थापेक्षा जास्त असते व त्यामुळे त्याच्या सेवनाने वजन लगेचच वाढते. त्यामुळे स्वयंपाक करताना कमीतकमी प्रमाणात तेल, तूप, लोणी, ओले-सुके खोबरे, दाण्याचे कूट वापरावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti