(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • फिरकीच्या तालावर!

    टी ट्वेंटी विश्वचषकाच्या दुसर्या उपांत्य सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा धुव्वा उडवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. मागील टी ट्वेंटी विश्वचषकात टीम इंडीयाला अपशकून करणार्या इंग्लंड संघाचा पुरेपूर बदला घेत टीम इंडियाने विश्वचषकाकडे अंतिम पाऊल टाकले आहे. कर्णधार रोहीतने फलंदाजीत आपली दादागिरी कायम राखत इंग्लंडला आपल्या बॅटचे पाणी पाजले तर गोलंदाजीत अक्षर, कुलदीप द्वयीने अक्षरशः धुमाकूळ घालत इंग्रजांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवले.

      June 28, 2024


  • सांगेन गोष्टी हिताच्याच चार – भाग दहा

    जगण्याची साधी सोपी सूत्रे - एकशे बावन्न
    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - भाग तेरा
    सांगेन गोष्टी हिताच्याच चार - भाग दहा

    आपण पूर्वाभिभाषी असावे, असे वाग्भटजी म्हणतात. म्हणजे स्वतःहून इतरांशी बोलायला जाणे. समोरून ओळखीचा कोणी येताना दिसला की, आपणच त्याला हाय, हॅलो, राम राम नमस्कार, नमस्ते, कसं काय, अशा शब्दांनी बोलायला सुरवात करावी. म्हणजे समोरच्या व्यक्तीला आपण त्याचे वाटू लागतो.

    आपल्याला यापूर्वी मदत केलेली व्यक्ती, ओळख झालेली व्यक्ती, उपयोगी ठरणारी व्यक्ती, डोक्यावरून पाणी नेणारी स्त्री, ज्येष्ठ नागरीक, ओझे घेऊन जाणारा, खूप जोरजोरात चालणारा, किंवा विद्वान व्यक्ती समोर आल्यास त्यांना स्वतः बाजूला होऊन रस्ता मोकळा करून द्यावा.

    आज अॅम्ब्युलन्स, शालेय वाहाने, शववाहिका, पोलिसांच्या गाड्या, यांना रस्ता मोकळा करून द्यावा. त्यांना कोणतीही असुविधा आपल्यामुळे होऊ नये असे पाहावे.

    आपली गाडी एखाद्या ठिकाणी पार्क करत असताना, दुसऱ्याला त्याची गाडी आत बाहेर करायला त्रास होऊ नये, याचा विचार करून आपले वाहन कुलुपबंद करावे, अन्यथा आपल्यामुळे इतरांचा खोळंबा होऊ शकतो, याची जाण ठेवावी. याने वाद वाढून आपल्या सोसायटीमधील माणसे देखील दुरावतात. हे लक्षात घ्यावे.

    माणसं जोडण्याची ही कला आहे. ती जोपासली पाहिजे. कारण ऐनवेळी मोबाईल पेक्षा माणसेच उपयोगी होतात. ती आधी पासूनच जोडून ठेवावीत.

    मी बरा माझे काम बरे, ही वृत्ती आता सोडून दिली पाहिजे. मला काय त्याचे चंद्र सूर्य प्रकाशतात, असे म्हणून चालणार नाही. सतर्कता हवीच. आजूबाजूला काय चाललंय हे समजून घेतलं नाही तर बाजूच्या घराला लागलेली आग आपल्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही.

    मान दिला की मान मिळतो, मान मिळवण्यासाठी मान थोडी खाली झुकवावी लागली तरी चालते. लोकांनी आपल्याला मान दिला पाहिजे, ही अपेक्षा सोडून दिली की लोकमान्य होता येते, असे लोकमान्य टिळकांनी सुद्धा सांगितले आहे.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.
    १०.०९.२०१७

      September 10, 2017


  • राज्य विकायचे आहे!

    लोकशाही व्यवस्थेत सरकारचे काम विश्वस्तांचे असते. राज्याचे खरे मालक राज्याचे नागरिक असतात या नागरिकांच्या वतीने सरकार राज्याचा कारभार पाहत असते. त्यामुळे सरकारची जबाबदारी केवळ संरक्षण आणि संवर्धनापुरतीच मर्यादित आहे; परंतु आपल्या या मर्यादेचा सरकारला विसर पडला की काय, अशी शंका आता येऊ लागली आहे.

      February 5, 2006


  • प्रभात फिल्म कंपनीचा ९३ वा वर्धापनदिन

    पार्वतीबाई दामले ह्यांनी स्थापनेचा मंगल कलश १ जून १९२९ रोजी ठेवला. ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ मध्ये बाबूराव आणि आनंदराव पेंटर ह्यांच्या हाताखाली चित्रपट निर्मितीचे धडे घेणाऱ्या दामलेमामा, एस फत्तेलाल, व्ही शांताराम आणि धायबर यांनी ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ सोडली. स्वत:ची चित्रपटनिर्मिती कंपनी सुरु करण्याचा ध्यास सर्वांना लागून राहिला होता. कोल्हापूरातील सुप्रसिद्ध सराफी पेढीचे सितारामपंत कुलकर्णी ह्यांची दामले मामांशी जुनी मैत्री होती. आणि त्यांचा दामलेमामांवर विश्वास होता. त्याकाळात सितारामपंतानी दामल्यांना भांडवल देऊ केलं. दामले– फत्तेलालांबरोबर शांताराम व धायबरही एकत्रित झाले, आणि ‘प्रभात’ची स्थापना १ जून १९२९ रोजी कोल्हापुरातील मंगळवार पेठेत झाली.

      June 1, 2022


  • कलिंगडाच्या आरोग्यदायक बिया

    आता कडक उन्हाळा सुरू झालाय. जिकडेतिकडे कलिंगडाचे ढीग रचलेले दिसतायत. उन्हामुळे शरीरातील कमी झालेलं पाणी भरुन काढायला कलिंगडाची मदत होते. ऊन्हाळ्यात फ्रूट-प्लेट सगळ्यांच्या आवडीची. त्यात आता कलिंगडाचं प्रमाण जास्तच असणार.

    मात्र, कलिंगड खाताना त्यातील बिया आपण नेहमीच फेकून देतो. पुढच्यावेळी कलिंगड खाताना बिया फेकून देऊ नका. कलिंगडाप्रमाणेच त्याच्या बिया गुणकारी असून आपल्या शरीराला फायद्याच्या असतात.

    कलिंगड बियाइसोबत खाल्ल्याने रक्तदाब कमी करण्यास मदत होते. कलिंगडाच्या बियांमध्ये सिट्रालाइन हे अमायनो अ‍ॅसिड मुबलक प्रमाणात असते. याचा उपयोग रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यास होतो.

    हृदयविकाराचा त्रास कमी करण्यासाठीही कलिंगडाच्या बिया उपयुक्त आहेत. बियांमधील अ‍ॅन्टीऑक्सिडंट हृदयाचे कार्य सुधारण्यास मदत करतात. अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार कलिंगडाच्या बियांमधील फॅटस् घातक कोलेस्ट्रॉलचा धोका कमी करतात.

    किटाणूंच्या संसर्गाचा प्रतिकार करण्यासाठीही कलिंगडाच्या बियांचा उपयोग होऊ शकतो.

      April 1, 2016


  • जीवनसत्त्वे आणि हाडांचे आरोग्य

    आपल्या शरीराला उभे करण्याचे काम हाडे करीत असतात. मानवी पायामध्ये २६ हाडे असतात. मनगटासह मानवी हातामध्ये ५४ हाडांचा समावेश असतो. मांडीचे हाड हे सर्वात लांब आणि मजबूत हाड असते. कानाच्या मधल्या भागात जे हाड असते ते सर्वात लहान आणि पातळ हाड असते. हाताची हाडे ही सर्वाधिक वेळा मोडणारी हाडे आहेत. हाडांविषयीची ही माहिती आणि शरीर उभारणीसाठी असणारे त्यांचे महत्त्व लक्षात घेता हाडांचे आरोग्य सांभाळणे किती आवश्यक आहे हे लक्षात येईल; परंतु आपण त्यांची काळजी न घेता त्यांना गृहित धरत असतो त्यांची काळजी घेऊन ती मजबूत राखली पाहिजेत. आपले वय जसजसे वाढते तसे हाडांची घनता कमी होत जाते ती ठिसूळ होऊ लागतात. घनता कमी झाल्यामुळे ऑस्टोपोरोसीस होण्याची शक्यता वाढते. आपल्या हाडांचे आरोग्य राखण्यासाठी गरजेचे कॅल्शियम आणि जीवनसत्त्वांचा पुरवठा शरीराला होणे गरजेचे आहे. मजबूत हाडांसाठी मुख्यत्वे सहा जीवनसत्त्व मिळण्याची गरज आहे.

    ‘डी’ जीवनसत्त्व आपल्या शरीरातील कॅल्शियम आणि फॉस्फेट यांची निर्धारित पातळी राखण्यासाठी शरीराला ‘डी’ जीवनसत्त्वाचा योग्य प्रमाणात पुरवठा होणे गरजेचे असते. ‘डी’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होतात, पण ‘डी’ जीवनसत्त्व आहे त्या परिस्थितीत शरीरात शोषले जाऊ शकत नाही. त्यामुळे ओमेगा थ्री फॅटी अॅोसिड ‘डी’ जीवनसत्त्व शरीरात शोषून घेण्यासाठी गरजेचे असते. ‘डी’ जीवनसत्व कॅल्शियम शोषून घेत असते. त्यामुळे आपल्या आरोग्यदायी हाडांसाठी शरीरात कॅल्शियम शोषले जाण्यासाठी याच ‘डी’ जीवनसत्त्वाची गरज असते. त्यामुळे कॅल्शियम शोषले जाण्यासाठी आपल्या आहारातून ‘डी’ जीवनसत्त्वाचा योग्य पुरवठा शरीराला होणे गरजेचे असते.

    ‘सी’ जीवनसत्त्व शरीरातील उतींच्या जाळ्यात पांढर्याि रंगाचा प्रथिन घटक असतो. त्यामुळे हाडे तयार होण्याची प्रक्रिया होत असते. शरीराला आवश्यक असणार्या् या प्रथिन घटकाच्या निर्मितीसाठी ‘सी’ जीवनसत्त्वाची आवश्यकता असते. नवीन कठीण हाडांच्या निर्मिती करणार्याळ ऑस्टिओ ब्लास्ट पेशींचे काम नीट सुरू राहण्यासाठीसुद्धा ‘सी’ जीवनसत्त्वाची आवश्यकता असते.

    ‘बी 12’ जीवनसत्त्व हे अतिशय महत्त्वाचे जीवनसत्त्व आहे. ‘बी 12’ या जीवनसत्त्वाची कमतरता असणार्या् व्यक्तींना हाडांशी निगडित आजारांना तोंड द्यावे लागत असल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मजबूत हाडांसाठी ‘बी 12’ जीवनसत्त्वयुक्त असा आहार घ्या.

    ‘ए’ जीवनसत्त्व आपल्या पार्श्वजभागाचे म्हणजेच माकड हाड मोडण्याची शक्यता कमी करण्याचे काम ‘ए’ जीवनसत्त्व करते. आपण जर मल्टि व्हिटामिन आणि मिनरल सप्लीमेंट म्हणजे विविध जीवनसत्त्व आणि पूरक खनिजद्रव्यांचे सेवन करत असाल तर त्यामध्ये ए व्हिटामीनचे प्रतिदिन प्रमाण १०० टक्क्यांपेक्षा अधिक नाही ना याची खात्री करूनच ते घ्या. ज्या जीवनसत्त्वाच्या पूरक औषधांमध्ये बीटा कॅरोटीनच्या रुपात २० टक्के ‘ए’ जीवनसत्त्व किंवा कॅरोटीनचे मिश्रण असणारे जीवनसत्त्वाचा डोस घेत असाल तर फारच उत्तम. आपल्या व्हिटामिनवरील माहितीचा कागद वाचून मगच डोस सुरू करा. आपल्या पूरक आहारामध्ये एकत्रितपणे दिवसभरात १०० टक्क्यांहून अधिक ‘ए’ जीवनसत्त्वाचे प्रमाण नाही ना याकडे आवर्जून लक्ष द्या.

    ‘ई’ जीवनसत्त्व आपल्या हाडांचं संरक्षण करण्याचे काम ‘ई’ जीवनसत्त्व करते. निकोटिनचे सेवन करत असल्यास त्यामुळे होणारे हाडांचे नुकसान भरून निघण्यासाठी ‘ई’ जीवनसत्त्व उपयोगी ठरते. दाह होणार्यात ऑस्टोपोरोसिस या आजारामध्ये ‘ई’ जीवनसत्त्व खूप फायदेशीर असते. स्त्रियांमध्ये मेनापॉजनंतरच्या काळात हाडांमधील खनिजांचे प्रमाण किंवा घनता कमी होते. हाडांतील खनिजांचे प्रमाण ‘ई’ जीवनसत्त्व वाढवू शकते, असे निष्कर्ष काही अभ्यासातून समोर आले आहेत.

    ‘क’ जीवनसत्त्व हाडांमधील खनिजांची घनता किंवा हाडांची घनता वाढवण्यासाठी ‘क’जीवनसत्त्वाचा योग्य पुरवठा होणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे हाडे तुटण्यापासूनही प्रतिबंध होतो. आपल्या रक्तातील कॅल्शियम शोषून घेऊन ते हाडांमध्ये जमा करत असल्याने नवीन हाडे तयार होण्याच्या क्रियेला ‘क’ जीवनसत्त्वाची मदत मिळते.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.डॉ. मनोज शिंगाडे

      January 5, 2017


  • लंडनमध्ये जाम, आला घाम

    गोष्ट आहे ऑक्टोबर १९८६ मधली. फिलीप्समधील कामासंबंधात हॉलंडमधील आईन्धोवेन या गावी दोन आठवड्यांसाठी जाण्याचा योग आला. तेव्हा ‘द नेदरलंड’ असे न म्हणता त्या देशाला हॉलंड असेच संबोधत असू. माझी यूरोपची ही पहिलीच वारी होती. दोन आठवड्यांच्या मुक्कामामुळे मला मधल्या शनिवार रविवारची सुट्टी मिळणार होती. माझा लहान भाऊ डॉक्टर असून आईसलंड या देशाचा रहिवासी आहे. कर्म धर्म संयोगाने, तो नेमका त्याच सुमारास वैद्यकीय परिषदेसाठी लंडनला येणार होता. मनात आले की मधल्या शनिवार रविवारच्या सुट्टीत लन्डनला जाऊन त्याला भेटावे. एक भाऊ पुण्याहून तर एक भाऊ आईसलंडहून एका तिसऱ्याच देशात भेटण्याचा योग आणायचा विचार ठरला. त्याकाळी मी स्वतः स्वखर्चाने परदेशात जाऊन भावाला भेटणे हे कल्पने पलीकडचे होते. त्या काळात परदेश प्रवास तसा दुर्मिळ होता आणि त्यामुळे या भेटीचे जास्त अप्रूप वाटत होते.

      January 25, 2026


  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग अठ्ठेचाळीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 3

    संकल्प केल्याशिवाय कोणत्याही कामाची सिद्धी नाही. आपण अमुक पूजा का करीत आहोत, याचा संकल्प प्रथम करावा लागतो. जसे, श्री सत्यनारायणाची पूजा करताना मी सत्याने वागेन, सत्याचाच स्विकार करेन, सत्याचीच साथ करेन, सत्य कधीही सोडणार नाही, नेहेमीच माझे धोरण, संभाषण सत्याचेच असेल. ( कारण सत्य बोललेले कधीही लक्षात ठेवावे लागत नाही.) पण संकल्प केल्याप्रमाणे आचरण आपण ठेवले नाही. सत्य बाजूलाच जाईल आणि पूजा हे फक्त कर्मकांड होईल. असे होऊ नये. यासाठी संकल्प महत्त्वाचा असतो.

    कोणत्याही पूजेतील संकल्प लक्षात घेतला की, त्यातील स्वार्थ परमार्थ लक्षात येईल.
    "अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां क्षेम स्थैर्यः आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थं, द्विपद चतुष्पद सहितानां शान्त्यर्थं समस्त मंगल अवाप्त्यर्थं समस्त अभ्युदयार्थं च कल्पोक्त फलाप्त्यर्थं अमुक देवताप्रीत्यर्थं यथा मिलितोपचारद्रव्यैः षोडशोपचार पूजां अहं कर्म करिष्ये ।"

    या संकल्पामधे "आयु आणि आरोग्य" असे दोन शब्द दिसताहेत.
    आरोग्य कोणाचे ?
    समस्त कुटुंबाचे, सर्व परिवाराचे, एवढेच नव्हे तर घरातील द्विपद म्हणजे पोपटासारखे पाळीव प्राणी, चतुष्पद म्हणजे चार पायाचे प्राणी, जसे, गाय बैल, म्हैशी, वासरे यांचे क्षेम असावे, या सर्वांचे आयुष्य आणि आरोग्य वृद्धींगत व्हावे, यासाठी मी जे द्रव्य उपलब्ध आहे त्यातून ही सोळा उपचारांची पूजा करीत आहे.

    केवढा विशाल दृष्टीकोन आहे या संकल्पामागे ! आणि मागायचेच आहे तर त्यात कंजुषी कशाला? आणि देणारा समर्थ असेल तर फक्त स्वतःपुरते कशाला मागायचे ? सर्वांसाठी सगळेच मागायचे !

    माऊलींनी पण पसायदानातून मागणे मागताना, विश्वाच्या कल्याणासाठी, जो जे वांछील तो ते लाहो, असंच भरगच्च मागितलं आहे.
    देनेवाला छप्पर फाड के देने के लिए बैठा है तो दुबळी (फाटकी ) माझी झोळी घेऊन का जावे ?

    मागताना लाजू नये, आणि देताना माजू नये असे म्हणतात. एक दिवस देणाऱ्याचे (देते ) हात व्हावे. प्रत्येक वेळी मागतच रहायला हवे असे नाही. कधीतरी "देणारा" देखील व्हावं. त्यातला आनंद आणखीनच वेगळा !

    आनंद मिळण्यासाठी थोडे कष्ट, थोडी कर्मकांडे देखील करावेच लागतात ना !

    अहो, एटीएम मधून आपलीच रक्कम मिळायला सुद्धा थोडा वेळ लागतोच ना, थोडी वाट पहावी लागतेच. जर तुमच्या खात्यात पुरेशी रक्कम असेल तर तुम्हाला तुमचे पैसे मिळणारच ! थोडा इंतजार तो करना पडेगा . काही वेळा पासवर्ड चुकतो, काहीवेळा मशीन बंद असते, काहीवेळा चुकीची रक्कम टाकली जाते, काही वेळा खात्यामधे पुरेशी रक्कम नसते, तर काही वेळा सर्व गणित जुळवून देखील उत्तर चुकीचे येते.

    त्याची कृपा होण्यासाठी थोडा वेळ वाट पहावी लागते. तो कृपाघन कृपा करणारच, असा भाव ठेवला तर अपेक्षित फळ मिळणार हे नक्कीच.

    औषधे देखील पोटात जाऊन, हवा तिथे अपेक्षित गुण दिसायला थोडा वेळ लागतोच ना, तसंच आहे.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    28.05.2017

      May 28, 2017


  • मास्टर-द-ब्लास्टर

    भवानीचे दहा बारा ट्रक त्याची सगळी काळी संपत्ती घेउन बॉर्डर क्रॉस करुन पळत असतात. पण मास्टरला हे कळते आणि तो दोन तीन तासांचा प्रवास पाच मिनीटात तर कव्हर करतोच..पण बरोबर आपल्या मैत्रीणीला घेउन येतो..जी असते तिरंदाजी चँपीयन.

      September 18, 2022


  • नोबेल पारितोषिकं – २०२३

    सन २०२३ची नोबेल पारितोषिकं नुकतीच जाहीर झाली आहेत. यांतील भौतिकशास्त्रातलं पारितोषिक अणूंतील इलेक्ट्रॉनसंबधीचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या, प्रकाशस्पंदांच्या निर्मितीसाठी दिलं जाणार आहे. रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक नॅनोतंत्रज्ञान ज्यावर आधारलेलं आहे, त्या अतिसूक्ष्मकणांच्या निर्मितीवरील संशोधनासाठी देण्यात येणार आहे.

      October 16, 2023