वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
विज्ञानाच्या सतत झालेल्या प्रगतीमुळे सांधेरोपण शस्त्रक्रिया ही एक अतिशय यशस्वी, प्रभावी व सोपी शस्त्रक्रिया झाली आहे. आजमितीस खुब्याच्या सांध्याच्या अनेक दुखण्याने पूर्वी जे रुग्ण कायमचे अंथरूणाला खिळत असत ते पुन्हा पहिल्यासारखे चालू शकतात. आपले आयुष्य तेवढ्याच ऊर्मीने जगू शकतात. एकेकाळी वयस्क मंडळींना जर फीमरच्या मानेचे फ्रॅक्चर झाले तर एक स्टीलचा गोळा फीमरच्या डोक्याच्या जागी बसवित असत
May 7, 2023
अहंकार हा माणसाचा स्थायी गुणधर्म आहे असे मला वाटते.आपण उपजतच अहंकारी असतो हे सत्य स्वीकारायला हवे.तसाही थोडाफार अहंकार असायलाच हवा.
February 27, 2024
दिवसभर काम करून थकून घरी आल्यानंतर अनेकजणी केसांचा आंबाडा बांधून घरातल्या कामाला लागतात. पण असेच केस बांधून तुम्ही रात्री झोपता का ? केस बांधून झोपल्याने केसगळतीची समस्या वाढते असे काहीजण मानतात तर केस मोकळे ठेवल्यानेही गुंता वाढतो. मग अशावेळी नेमके काय करावे ? हा प्रश्न तुम्हांला पडलाय ?
रात्री झोपताना केस मोकळे ठेवावेत की त्याची वेणी बांधावी हे व्यक्तीपरत्वे बदलते. झोपताना केस मोकळे ठेवणे त्रासदायक नाही मात्र यामूळे केस गुंतण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे सैलसर वेणी किंवा आंबाडा बांधावा. पण तुमच्या केसानुसार ते कसे सांभाळावेत हे सविस्तरपणे वाचण्यासाठी.....
स्ट्रेट केस असल्यास
तुमचे केस मोकळे आणि सरळ असतील तर रात्रीच्या वेळेस तुम्ही सैलसर पोनीटेल बांधून ठेऊ शकता. म्हणजे ते सकाळी फ्रिझी होत नाहीत. सैलसर वेणी बांधून ठेवल्यास केसांमध्ये गुंता होणार नाही. तसेच त्यांना नॅचरल टॅंग्स मिळतील. तुमचे केस लांब असतील ते बांधून ठेवणे सोयीस्कर ठरते. पण खूप वेळ आणि घट्ट बांधून ठेऊ नका. यामुळे केस तुटण्याची शक्यता अधिक आहे.
केस कुरळे असल्यास
तुमचे केस कुरळे असतील तर डोक्यावर त्याचा आंबाडा बांधा किंवा एका बाजूला बांधून ठेवा. यामुळे तुमची झोपमोड होणार नाही याची काळजी घ्या. पण तो खूप घट्ट बांधू नका.
केस ओले असताना ते मूळीच बांधून ठेऊ नका. परंतू केसांमधील गुंतागुंत कमी करण्यासाठी तुम्हांला ते बांधून ठेवणे गरजेचे वाटत असेल तर ते 80 % सुकल्यानंतरच बांधा. यामुळे ते तुटण्यापासून बचावतील. हाच नियम ब्लो ड्रायसाठीदेखील लागू होतो. शक्य असेल तर नैसर्गिकरित्याच सुकवण्याचा प्रयत्न करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- मेकअप आर्टीस्ट पायल बालसे
November 21, 2016
भाद्रपद शुक्ल नवमीला अदुःख नवमी म्हणतात. हे एक व्रत आहे. या व्रताची देवता गौरी आहे. एक कलशावर पूर्णपात्रात गौरीची स्थापना करतात.
September 24, 2023
निर्मला सितारामन यांचा जन्म 18 अगस्त 1959 रोजी झाला एक भारतीय अर्थशास्त्री, राजकीयज्ञ आणि भारतीय जनता पार्टी (भाजपा) च्या वरिष्ठ नेत्या आहेत ,ज्या 2019 पासून भारत सरकारच्या वित्त मंत्री आणि कॉर्पोरेट प्रकरणे मंत्री म्हणून कार्यरत आहेत.
September 9, 2025
जानेवारी २०२१ मध्ये माझे हे पुस्तक प्रकाशित झाले. गुलज़ारच्या १६ चित्रपटांवर मी २०१८ साली चेहेरे-पुस्तिकेवर लिहिलेल्या पोस्ट्स चा हा संग्रह आहे.
June 21, 2021
अणुभट्टीत निर्माण होणाऱ्या किरणोत्सारी पदार्थांचे बहुविध उपयोग आहेत. यात काही वेळा किरणोत्सारी पदार्थांचा प्रत्यक्ष वापर होतो, तर काही वेळा किरणोत्सर्गी पदार्थांपासून उत्सर्जित होणाऱ्या किरणांचाच फक्त वापर केला जातो.
August 15, 2023
लॉकडाऊनच्या काळातील एका भाषणात आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सध्याच्या बदललेल्या परिस्थितीत लोकल म्हणजेच ‘स्वदेशी’ व आत्मनिर्भरता म्हणजे ‘स्वावलंबन’ याविषयी मार्गदर्शन केले ते अत्यंत योग्य होते. भारतीय समाजव्यवस्था व अर्थव्यवस्था सुस्थितीत आणण्यासाठी उचललेले ते योग्य पाऊल आहे असे मी समजतो.
June 27, 2022
एकतर इथली सगळी स्टोअर्स प्रचंड मोठाली. त्यात नवखा माणूस हरवला तर शोधायला मुश्कील अशी परिस्थिती. आतातर सेलफोनशिवाय एकाच दुकानात एकमेकांना शोधणं अवघड वाटतं. आठ नऊ वर्षांपूर्वी, सेलफोन्सशिवाय, आम्ही सात आठ जण इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या दुकानांतून फिरून, एवढया धुमश्चक्रीमधे आमचा एकही मेंबर कसा हरवला नाही, याचंच आश्चर्य वाटतं. अर्थात दळणवळणाची साधनं नसतानाही, आपल्या सेनेच्या सार्या तुकड्यांना नियंत्रणात ठेवण्यात, अनुपमाने एखाद्या कसलेल्या सेनापतीसारखे नैपुण्य दाखवले, हे मान्य करायलाच हवे.
सोबत भली मोठी शॉपिंग लिस्ट घेऊन जायची आणि केवळ काही तासांमधे अगदी यादी बरहुकूम खरेदी करून सार्या वस्तू आणायच्या, हे काही येर्यागबाळ्याचे काम नाही. एकतर यादीतल्या सार्या वस्तू मिळवण्यासाठी जबरदस्त प्लॅनिंग, चपळाई आणि स्मार्टनेस असावा लागतो. दुसरं म्हणजे, आजूबाजूला पसरलेल्या या सेलच्या अफाट समुद्रातल्या, इतर असंख्य आकर्षक गोष्टींकडॆ काणाडोळा करायचा कठोर मनोनिश्चय देखील लागतो. हे म्हणजे, अलीबाबाच्या गुहेत जाऊन, मोजून चार माणकं, पंधरा पाचू, एकवीस मोती आणि एक नीलमणी हुडकून काढायचा आणि बाकीच्या खजिन्याकडे निर्धाराने न बघता गुहेच्या बाहेर यायचं असा प्रकार झाला. आमच्याकडे आणि देशमुख कुटुंबाकडे ना हव्या असलेल्या वस्तू मिळवायची चतुराई होती, ना नको असलेल्या वस्तूंच्या मोहात न पडण्याएवढा मनोनिग्रह! त्यामुळे हव्या असलेल्या वस्तूंपेक्षा ऐनवेळी दुसर्याच वस्तू आवडणं, ऐन समरप्रसंगी, घेण्याच्या आणि न घेण्याच्या वस्तूंमधे चित्त भरकटून दोलायमान होणं, नको त्या वस्तू धुंडाळण्यात वेळ घालवल्यामुळे, नेमक्या हव्या त्या वस्तूंपर्यंत पोहोचण्यास उशीर होणे, वगैरे छोटे मोठे प्रमाद आमच्या हातून घडलेच.
शेवटी एकदाचं शॉपिंग आटोपलं. सकाळचे जेमतेम साडे दहा वाजले होते. पुन्हा एकदा सारे गुर्जरांच्या घरी येऊन पोहोचलो. श्रीयुत गुर्जर व आमचा मुलगा सिद्धार्थ आरामात उठून ब्रेकफास्ट करून प्रसन्न चित्ताने टी.व्ही. बघत बसले होते. पुढचे दोन तीन तास, खरेदी केलेल्या वस्तूंची, शिवाजी महाराजांनी लुटलेल्या सुरतेच्या खजिन्याच्या थाटात छाननी झाली. काही कपडे दुकानातून घरी आणताना अचानक आकुंचित झाले होते, तर काही प्रसरण पावल्यासारखे वाटत होते. काही वस्तू दुकानात जेवढया आकर्षक वाटल्या तेवढया आता वाटत नव्हत्या. माधवरावांनी थोडी अधिक चपळाई, धूर्तपणा आणि थोडं कमी स्त्रीदाक्षिण्य दाखवलं असतं, तर हाता तोंडाशी आलेल्या दोन तीन वस्तू गमवाव्या लागल्या नसत्या असं नलिनीबाईंनी पुन्हा पुन्हा बोलून दाखवलं. परंतु एकंदर मोहीम फत्ते झाली, असे सर्वांचेच मत पडले.
त्यानंतर आठ नऊ थॅंक्सगिव्हींग आले आणि गेले. आता त्या थॅंक्सगिव्हींग च्या सेलचं काही मोठंसं अप्रूप देखील राहिलं नाही. किंबहुना त्या २००२ सालच्या थॅंक्सगिव्हींग सेलनंतर, पुन्हा कधी आम्ही त्या सेलला जाण्याचं धाडस देखील केलं नाही. त्यावेळी तर आम्ही खरेदी केलेल्या वस्तू नंतर कशा का वाटेना, त्या आपल्या गळ्यात पडल्यासारख्या वापरत राहिलो. अशा खरेदी करून आणलेल्या किंवा कुणाकडून भेट म्हणून मिळालेल्या परंतु पसंत न पडलेल्या वस्तू, न वापरता त्याच दुकानात पावतीसकट परत करता येतात, याचा देखील आम्हाला पत्ता नव्हता. बर्याच वर्षांनी समजलं की थॅंक्सगिव्हींगच्या सेलच्या दुसर्या दिवशी त्याच स्टोअर्समधे दोन दोन तास रांगांमधे उभे राहून लोक न पसंत पडलेल्या वस्तू परत करत असतात.
अजूनही थॅंक्सगिव्हींगचा सेल येतो. ऑफिसमधले, आसपासचे, ओळखीचे कोणी कोणी सेलमधे काय काय घ्यायचं याच्या याद्या आणि strategy planning करत असतात. आम्ही आपले बर्याच वर्षांपूर्वी, श्रीयुत गुर्जरांनी दाखवलेल्या व्यवहारीपणाला दाद देत, स्वत:ला उबदार पांघरूणात गुरफटून घेऊन झोपी जाणं पसंत करतो.
– डॉ. संजीव चौबळ
April 2, 2016
अमेरिकन शेतीच्या प्रगतितील ठळक टप्पे
१९ व्या शतकातील प्रगती – मनुष्यबळ ते अश्वशक्ती – शेती हा नेहमीच एक कष्टाचा उद्योग राहिला आहे. जमिनीची मशागत, पेरणी, तण काढणे, पिकाला पाणी देणे, पिकाचे रक्षण करणे, तयार झालेले पीक काढणे, धान्य साठवणॆ किंवा धान्य बाजारात नेण्यासाठी तजवीज करणे, एक ना दोन, हजार गोष्टी. १९ व्या शतकातलं अमेरिकेतलं महत्वाचं पीक म्हणजे गहू. अमेरिकन शेतकरी जुनीपानी लाकडी अवजारं वापरून मातीतली ढेकळं फोडण्यापासून सारी कामं हाताने करायचा. अगदी पार कापणी, मळणी आणि गव्हाची साठवणी करण्यापर्यंत सारी कामं हातानेच व्हायची.
१९ व्या शतकात, जसजशी तंत्रज्ञानात सुधारणा होत गेली, तसतसं कमी कष्टात अधिक धान्योत्पादन शक्य होत गेलं. शेतं मोठी मोठी होत गेली. वेगवेगळ्या तांत्रिक अवजारांच्या कंपन्यांनी, पेरणीची वेगवेगळी यंत्रं तयार केली. १८३० च्या दशकात, शेतातलं तयार पीक कापण्यासाठी देखील यंत्रांचा वापर सुरू झाला. घोडयांच्या जोडीमागे असं कापणीचं यंत्र लावल्यावर कापणी अधिकच सुलभ होऊ लागली. कापणीच्या यंत्रामागे फिरत शेतकरी कापलेल्या ओंब्या गोळा करून, त्यांच्या राशी बनवून शेतात सुकण्यासाठी ठेवू लागले. पुढे तंत्रज्ञानात आणखी सुधारणा झाली आणि कापलेल्या गव्हाच्या ओंब्या नीट गोळा करून त्यांच्या राशी बनवण्याचं काम देखील यंत्रच करू लागली. गव्हाची मळणी करण्यासाठी सुरवातीला बैल किंवा घोडे, खळ्यात कापलेल्या पिकावर चालून धान्य सुटं करायचे. १८४० च्या सुमारास धान्य मळणीसाठी देखील यंत्र निर्माण होऊ लागली. १८५० च्या सुमारास वाफेच्या शक्तीचा उपयोग करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. सुरवातीला ही वाफेवर चालणारी यंत्रे एका जागी स्थिर (Stationary) असायची. नवीन शतकाचा उदय होण्याच्या सुमारास, ही वाफेवर चालणारी यंत्रे फिरती झाली होती. मळणीची कामे करण्यासाठी ठिकठिकाणी गिरण्यांची व्यवस्था होऊ लागली होती आणि त्यामुळे शेतकरी आपापल्या खळ्यात मळणी करण्या ऐवजी अशा गिरण्यांमधे आपलं धान्य पाठवायला लागले होते.
सुरवातीला शेतीच्या कामात बैलांचा वापर सर्रास व्हायचा. १८७० सालापर्यंत बैलांऐवजी सर्वत्र घोडयांचा वापर होऊ लागला होता. सन १८०० च्या सुमारास शेतकर्याला जे काम करायला ३॥ -४ तास लागायचे, तेच काम सन १८८० च्या सुमारास केवळ १० मिनीटांमधे होऊ लागले. १८९० साली पेट्रोलवर चालणारे इंजीन शेतीच्या वापरात आले आणि शेतीच्या यांत्रिकीकरणात एका नव्या इंधनाची भर पडली.
२० व्या शतकातील प्रगती – १९ व्या शतकातील प्रगतीमुळे, अंगमेहनतीची जी कामे त्यांचे आजोबा किंवा पणजोबा कष्टाने करत होते, तीच कामं आताची नवी शेतकरी पिढी घोडयांनी ओढण्याच्या यंत्रांत बसून करत होती.
२० व्या शतकातील शेतीच्या दृष्टीने कदाचित सर्वाधिक महत्वाची प्रगती म्हणजे ट्रॅक्टर. सुरवातीचे ट्रॅक्टर्स खूपच अवाढव्य आणि बोजड असे होते. २० व्या शतकाच्या सुरवातीच्या काही वर्षांतच ट्रॅक्टर अधिक लहान आणि सुटसुटीत होत गेले आणि त्यांचा वापर शेतीच्या बहुतेक कामांसाठी होऊ लागला.
अमेरिकन यादवी युद्धानंतर जशी परिस्थिती उद्भवली होती तशीच परिस्थिती दुसर्या जागतिक युद्धानंतर (१९३९-१९४५) पुन्हा उद्भवली. एक संपूर्ण तरूण पिढी मोठया प्रमाणात युद्धात कामी आली होती अथवा जायबंदी झाली होती. अमेरिकन शेतांमधे काम करणार्या कष्टकर्यांची कमतरता भासायला लागली होती. त्यामुळे ट्रॅक्टर्स आणि इतर तंत्रज्ञानाची कास पकडण्याशिवाय शेतकरी वर्गापुढे दुसरा पर्याय उरला नव्हता. तंत्रज्ञानाच्या प्रगती मधला, Combine Harvestor हा आणखी पुढचा टप्पा. या मशीन्समुळे पिकाची कापणी आणि मळणी एकाच वेळी करता येऊ लागली आणि शेतातलं उभं पीक सरळ निवडलेल्या धान्याच्या स्वरुपात शेतकर्याच्या हातात येऊ लागलं.
२० व्या शतकातील शास्त्रीय संशोधनाने शेतकर्याचे जीवन चांगलेच बदलून टाकले. रासायनीक खते वापरून जमिनीचा कस वाढवणे, पिकांच्या नवीन नवीन जाती वापरून धान्योत्पादन वाढवणे, नवनवीन औषधांचा वापर करून पिकांवरील रोगांचा सामना करणे, वगैरे गोष्टी शक्य होऊ लागल्या. Hybrid crops नी आणखी पुढचे पाऊल टाकले. त्याही पुढे जाऊन दुष्काळाला तोंड देऊ शकतील, रोगांचा प्रतिकार करू शकतील, लवकर तयार होऊ शकतील अशी विविध प्रकारची पिकं, ह्या प्रगतीच्या वाटेवरच्या आणखी पुढच्या पायर्या ठरल्या. या सर्व आधुनिक साधनांमुळे, शेतकर्याला निसर्गावर अधिक नियंत्रण ठेवता येणे शक्य होऊ लागले.
आता तर उपग्रहांच्या मदतीने शेतकर्यांना हवामानाचा अंदाज अधिक लवकर व अचूक स्वरूपात मिळू लागला आहे. याचा फायदा म्हणजे शेतीची कामे करण्यासाठी, हवामानाच्या लहरीवर न अवलंबून रहाता शेतकरी आपल्या सोयीनुसार त्यांचे वेळापत्रक आखू शकतो आहे. इंटरनेट देखील शेतकर्याच्या दैनंदिन कामाचं एक महत्वाचं अंग बनलं आहे. सारे जग ही एक मोठी बाजारपेठ बनत चालल्यामुळे, जागतिक घडामोडींचा अभ्यास करून शेतकरी आपल्या शेतात त्या अनुषंगाने फेरफार करू शकतो आहे.
अर्थात सर्वसाधारण अमेरिकन शेतकर्याची आणि सर्वसामान्य भारतीय शेतकर्याची जीवन पद्धत आणि कामाचं स्वरूप यांची सांगड कितपत घालता येईल हा मोठाच प्रश्न आहे.
August 24, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti