वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
ध्यान म्हणजे काय?
ध्यान म्हणजे सतत बडबड करणार्या अस्वस्थ मनाला शांत करणे !
त्यासाठी आपण श्वासापासून सुरूवात करतो !
ध्यानाची पध्दत अगदी सोपी आहे.
डोळे बंद करा व आपल्या नैसर्गिक श्वासाबरोबर रहा. ध्यान मनातील अस्वस्थ कंपने शांत करते, त्यामुळे त्यातून आत्मशक्ति, ऊर्जा जपली जाते, जी चांगले आरोग्य,मनःशांती व जीवनाच्या विवेक-ज्ञानाकडे नेते.
ध्यानाचे फायदे
आध्यात्मिक स्वास्थ्य हे मुळ आहे आणि शारीरीक आरोग्य हे फळ आहे.
ध्यान हे आपल्या स्वत:च्या प्रयत्नांनी आपल्या जीवनाला दिलेले सर्वात मोठे बक्षिस आहे ! आपण आपल्या स्वत:ला खूप काही देऊ शकतो !
ताबडतोब बरे होणे
सर्व शारीरिक पिडा या मानसिक काळज्यांमुळे होतात. सर्व मानसिक काळज्या बौध्दिक अपरिपक्वपणामुळे निर्माण होतात. बौध्दिक परिपक्वता ही आध्यात्मिक उर्जा कमी पडल्याने आणि आध्यात्मिक विवेकज्ञान कमी असल्याकारणाने येते. ध्यान करून आपल्याला भरपूर आध्यात्मिक उर्जा व आध्यात्मिक विवेकज्ञान मिळते, तेव्हा बुध्दीमत्ता पूर्ण विकसित होते, लवकरच सर्व मानसिक चिंता संपतात. परिणामस्वरूप सर्व शारीरिक आजार नाहीसे होतात. सर्व आजार बरे करण्याचा ध्यान हाच एक मार्ग आहे. पूर्वी केलेल्या वाईट कर्मांमुळे रोग होत असतात. दुष्कृत्यांचे निराकारण झाल्याविना रोग नाहिसे होणार नाहीत. दुष्कृत्यांचे परिमार्जन होण्यासाठी कोणत्याही औषधांचा उपयोग होणार नाही.
स्मरणशक्ती वाढते
ध्यानातून मिळविलेली भरपूर आध्यात्मिक उर्जा मेंदूला उत्तम प्रकारे व जास्तीत जास्त क्षमतेने कार्य करण्यास मदत करते. ध्यानाने स्मरणशक्ति जबरदस्त वाढते म्हणून सर्व विद्यार्थ्यांसाठी ध्यान नितांत आवश्यक आहे. शाळा आणि विद्यापीठ या दोन्ही पातळ्यांवर...........
वाईट सवयी नष्ट होतात
खूप खाणे, जास्त झोपणे, खूप बोलणे, अती विचार करणे, अती मद्यपान करणे, तंबाखू खाणे, इ. अनेक वाईट सवयी असतात. ध्यान करून मिळवलेले भरपूर विवेकज्ञान आणि आध्यात्मि्क ऊर्जा यामुळे सर्व वाईट सवयी आपोआप सुटतात.
मन आनंदी होते
कोणत्याही व्यक्तीसाठी आयुष्य हे पराभव, अपमान आणि वेदना यांनी पूर्ण भरलेले असते. तथापि आध्यात्मिक ज्ञान नि आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त केलेल्या व्यक्तींचे जीवन सर्व पराभव, अपमान आणि वेदना असूनही नेहमी शांत व आनंदी असते.
कार्यक्षमता वाढते
भरपूर आध्यात्मिक उर्जा आणि आध्यात्मिक विवेकज्ञान यांच्या अस्तित्वाने सर्व कामे, मग ती शारीरिक असोत वा मानसिक, अधिक कार्यक्षमतेने केली जातात. थोड्या वेळात जास्त कामे पूर्ण होतात. किमान साधने वापरून कौतुकास्पद कामे केली जातात.
झोपेचे तास कमी होतात
ध्यानात मुबलक आध्यात्मिक उर्जा मिळविली जाते. त्यामानाने झोपेत फक्त काही अंश-फार कमी ऊर्जा मिळते. शरीराला मिळणारी विश्रांती आणि मनाला मिळणारी ऊर्जा यांचा विचार करता अर्ध्या तासाचे सखोल ध्यान हे सहा तासांच्या झोपेबरोबरचे असते.
दर्जेदार नातेसंबंध
आध्यात्मिक विवेक, ज्ञानाची कमतरता हेच परस्पर संबंध इतके समाधानकारक व दर्जेदार नसल्याचे एकमेव कारण आहे. आध्यात्मिक विवेकज्ञान प्राप्त झाल्याने परस्पर नातेसंबंध अतिशय दर्जेदार व पूर्ण समाधानकारक होतात.
विचारशक्ती वाढते
आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी विचारांमध्ये शक्तींची गरज असते. मनाच्या अस्वस्थ अवस्थेत निर्माण होणारे विचार किमान शक्तीचे असतात. त्यामुळे ते आपापल्या लक्ष्यापर्यंत पोहोचत नाहीत. तथापि मन शांत असलेल्या स्थितीत विचार मोठी शक्ति मिळवितात आणि सर्व इच्छा नाटयपूर्ण रितीने प्रत्यक्षात येतात.
जीवनाचा उद्देश
आपण सर्व जन्म घेतो तो विशिष्ट हेतू ठेऊन, विशेष कामाकरीता, विशिष्ट रचना व विशिष्ट योजनेसह. हे फक्त आध्यात्मिकतेने परिपक्व झालेले लोकच समजू शकतात व त्यांच्या जीवनाचा विशिष्ट हेतू, विशेष कार्य, रचना आणि योजना जाणून घेऊ शकतात.
ध्यान का करावे?
ध्यानामध्ये काय ताकद आहे?
सामुहिक ध्यान साधनेचे महत्व काय आहे?
जेव्हां १०० लोक एकत्रितपणे साधना करतात तेंव्हा त्यांच्या लहरी जवळजवळ ५ कि.मी. पर्यंत पसरतात आणि नकारात्मकता नष्ट करून सकारात्मकता निर्माण करतात.
आइन्स्टाईनने शास्त्रीय दृष्टिकोनातुन सांगितले आहे की एका अणुचे विघटन केल्यास तो त्याच्या शेजारील अनेक अणूंचे विघटन करतो. त्यालाच आपण अणुविस्फ़ोट म्हणतो.
हीच गोष्ट आपल्या ऋषी-मुनीनी आपल्याला हजारो वर्षांपूर्वी सांगितली आहे की पृथ्वीवरील केवळ ४% लोकच ध्यान करतात, त्याचा फायदा उर्वरीत ९६% लोकांना होतो. आपणसुद्धा जर ९० दिवस सलग ध्यान केले तर आपल्या कुटुंबातील इतर व्यक्तींवरील सकारात्मक परिणाम आपल्यास दिसून येईल.
जर पृथ्वीवरील केवळ १०% लोक ध्यान करतील तर पृथ्वीवरील सर्व समस्या नष्ट करण्याची ताकद ध्यानामध्ये आहे.
महर्षी महेश योगी यांनी १९९३ मध्ये शास्त्रज्ञांपुढे हे सिद्ध केले आहे. त्यांनी ४००० शिक्षकांना वॉशिंग्टन डी सी मध्ये बोलावून त्यांना एक महिना ध्यानाभ्यास करावयास सांगितले. त्यामुळे त्या शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण ५०टक्क्यांनी कमी झाले. शास्त्रज्ञाना याचे कारण कळले नाही म्हणुन त्यांनी याला "महर्षी इफेक्ट" असे नाव दिले. ध्यानामधील ही ताकद आहे.
आपण आपली भौतिक तसेच अध्यात्मिक प्रगती ध्यानामुळे कमी श्रमात साधु शकतो. गरज आहे ती फक्त ध्यानातून स्वत:चा शोध घेण्याची.
व्हॉटसअॅप वरुन
को जागरति?---- a scientific approach about कोजागिरी पौर्णिमा
आपल्याकडे साजरा होणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी ह्या स्वास्थ्याशी निगडीत असतात. गुढीपाडव्याला कडूनिंबाची पाने खाणे असो किंवा दिवाळीचे अभ्यंग स्नान असो,प्रत्येकात स्वास्थ्य जपणे उद्देश सापडतोच!
शरद ऋतूत येणारी “शारदीय पौर्णिमा” अथवा “कोजागिरी पौर्णिमा” साजरा करण्यामागे देखील स्वास्थ्याशी निगडीत हेतू सापडतो. कोजागिरी म्हंटले कि डोळ्यसमोर येते ते “मसाला दुध”! चंद्राच्या चांदण्यात वेलची पूड,बदाम वगैरे टाकून थोडेसे आटवलेले दुध गार करायचे आणि रात्री सेवन करायचे!!!
दुध गार करून पिणे एव्हढाच हेतू अपेक्षित नाहीये तर चंद्राच्या प्रकाशात ते गार करणे अपेक्षित आहे.
शरद ऋतू हा पित्ताच्या प्रकोपाचा काळ असतो. पित्ताची उष्णता वाढल्यामुळे शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. स्वस्थ राहण्यासाठी ऋतू प्रमाणे आचरण करणे गरजेचे असते. रात्र आणि दुध दोन्ही गोष्टी स्वभावत: शीत म्हणजेच थंड गुणधर्माचे असतात. पौर्णिमेचा चंद्र आणि त्याचे चांदणे तर शीतलता देण्यास अधिक उपयुक्त असतात. स्वभावत: शीत गुणाचे दुध जर अशा शीतल चंद्रप्रकाशात ठेवले तर या “संस्कारांमुळे” त्याची गुणवृद्धीच होते आणि असे दुध शरीरास शीतलता देऊन पित्ताची उष्णता कमी करण्यास मदत करते.
या रात्रीस पूर्ण चंद्राचे चांदणे अनुभवण्यासाठी जागणे अनिवार्य असते.असे म्हणतात कि देवी रात्री संचार करत विचारत असते “ को जागरति? कोण जागे आहे??” जो जागा असेल त्याला समृद्धी देणार! या अख्यायीकेमागे देखील लोकांनी जागे राहून चंद्र चांदण्यांनी सिद्ध दुध घ्यावे असाच प्रांजळ हेतू सापडतो. देवादिकांच्या आशीर्वादाचे आमिष अथवा कोपाचे भय हे चातुर्मासाप्रमाणे इथेही लागू पडते!
आता हा हेतू च माहिती नसल्यामुळे त्याचे
“ we must meet and celebrate!!!!” होते आणि त्यात भेळ, पावभाजी अथवा इतर yummy पदार्थांसोबत “मसाला दुध” अशी theme असते. याने होते एकच की “वैद्याकडे रुग्ण वाढतात”!
जिथे चंद्राचा थंडावा अपेक्षित आहे तिथे रक्त बिघडवणारे भेळ ,पावभाजी इत्यादी पदार्थ मनसोक्त खायचे आणि मग रिवाज म्हणून त्यावर मसाला दुध प्यायचे हे सगळेच विपरीत आहे!
म्हणूनच खऱ्या अर्थाने “शारदीय कोजागिरी पौर्णिमा” साजरी करायची असेल तर काय केले पाहिजे हे वेगळे सांगायला नको, नाही का???
वैद्य ज्योत्स्ना पेठकर
परिवर्तन आयुर्वेद
नारियल का तेल ला आता आंतरराष्ट्रीय महत्त्व येत आहे.
तुम्हाला माहिती असेल की, साप चावला की त्याच्या दोन दातांचे निशान दिसतात. दोन दातांनी तो विश मनुष्याच्या शरिरात सोडतो. ते विश रक्तात सोडल्यानंतर ते हृदयापर्यंत जातं त्यानंतर पूर्ण शरिरात पोहचतं. साप शरिरावर कुठेही चावला तरी ते विश आधी हृदयापर्यंत जातं नंतर पूर्ण शरिरात पसरतं. हे विश पूर्ण शरिरात पोहचण्यासाठी साधारण तीन तास लागतात असे मानले जाते.(अंतु)
म्हणजे ज्या व्यक्तीला साप चावलाय तो ३ तास तरी मरणार नाही. जेव्हा मेंदूसह शरिराती सर्वच अंगांमध्ये विश पोहचलं तरंच तो व्यक्ती मरण पावतो. त्यामुळे तुमच्याकडे त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी तीन तास आहेत. या तीन तासात तुम्ही काही करू शकाल तर चांगलंच आहे.
तुम्ही काय करू शकता?
एक मेडिसीन तुम्ही तुमच्या घरात नेहमी ठेवू शकता. ही मेडिसीन होमिओपॅथी असून स्वस्त आहे. त्याचं नाव आहे NAJA २०० (N A J A ) हे औषध कोणत्याही होमिओपॅथी मेडिसीन शॉपमध्ये तुम्हाला मिळेल. या औषधाने तुम्ही तब्बल १०० लोकांचा जीव वाचवू शकता. आणि याची किंमत केवळ पाच रूपये इतकी आहे.
NAJA हे औषध जगातील सर्वात खतरनाक मानल्या जाणा-या सापाचं विश आहे. त्या सापाचं नाव आहे क्रॅक. या सापाचं विश सर्वात घातक मानलं जातं. हे विश दुस-या सापाचं विश उतरवण्यासाठी कामात येतं. या औषधाचा एक थेंब जीभेवर ठेवा आणि १० मिनिटानंतर पुन्हा एक थेंब ठेवा आणि पुन्हा एकदा १० मिनिटांनी एक थेंब. तीनदा थेंब टाकून सोडून द्यावे.
बस इतके करून त्या व्यक्तीचा जीव वाचवला जाऊ शकतो.
मित्रांनो नक्की शेअर करा
शास्त्रात संध्या करताना सूर्यास अर्घ्य देण्याचे महत्त्व विशद केले आहे. हाताच्या ओंजळीत पाणी (जल) घेऊन सूर्यासमोर तोंड करून सूर्यास जल समर्पित केले जाते. त्यालाच 'अर्घ्य' म्हटले जाते. वेदांमध्ये सूर्यास डोळ्याची उपमा दिली गेली आहे.
सूर्यात सप्तरंगी किरणे असतात. या सप्तरंगी किरणांचे प्रतिबिंब ज्या रंगात पडते तेथून ती किरणे परत येतात. केवळ काळा रंगच असा रंग आहे की ज्यातून सूर्य किरणे परत येत नाहीत.
आपल्या शरीरात विविध रंगांची विद्युत किरणे असतात. यामुळे ज्या रंगाची कमतरता आपल्या शरीरात असते त्या रंगाची किरणे सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर आपणास मिळतात. डोळ्यांचे बुबळे काळी असतात. तेथून सूर्यकिरण परत जात नाही. यामुळे आवश्यक असणार्या रंगांच्या किरणांची कमतरता दूर होते.
सूर्यप्रकाशाचा संबंध केवळ ऊष्णतेशी नाही. त्याचा मानवाच्या आहाराशीसुध्दा आहे. वनस्पतींची पाने सूर्यकिरणांच्या माध्यमातून क्लोरोफिल नावाचा घटक निर्माण करतात.
वैज्ञानिकांनी हे सिध्द केले आहे की सूर्य किरणांचा प्रभाव पाण्यावर लवकर पडतो. यामुळे सूर्यास पाण्याचे अर्घ्य दिले जाते. सूर्य म्हणजे आकाशात बसलेला डॉक्टर आहे. सूर्याच्या सप्तरंगी किरणांमध्ये अदभूत रोगनाशक शक्ती आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंतच्या सूर्य किरणांमध्ये औषधी गुणधर्म भरपूर आहेत. सूर्यकिरण अनेक रोग उत्पादक विषाणूंचा नाश करतो. टिबीचे विषाणू उकळणार्या पाण्यात मरत नाहीत. पण सूर्यकिरणांनी त्वरीत नष्ट होतात. यावरूनच सूर्य किरणांमुळे कोणतेही विषाणू नष्ट होण्याबाबत शंकाच असू नये.
मानवाला निरोगी राहण्यासाठी जितकी शुध्द हवा आवश्यक आहे, तितकाच सूर्यप्रकाशही आवश्यक आहे. या प्रकाशाने मानवाच्या शरीरातील कमजोर असलेले अंग पुन्हा सशक्त आणि सक्रीय होते.
सूर्य किरणात प्रसन्नता-अप्रसन्नतेचे अणूही असतात. त्रिकाल संध्येचा संबंध सूर्याशी आहे. मुख्य संध्या म्हणजे सावित्री जप आहे. सावित्री सविताच्या अर्थात सूर्याच्या ऋचांचे नाव आहे. यामुळे संध्योपासना करताना सविताचे ध्यान केले जाते त्यावेळी अर्घ्य सूर्यास दिले जाते.
सूर्य आत्मा जगतस्तस्थुषश्च (यजुर्वेद 7/42)। या मंत्राला सूर्याच्या स्थावर-जंगम पदार्थांचा आत्मा समजले जाते. जीवेत शरदः शतम् (यजुर्वेद 36/24) पासून शंभर वर्ष जगण्याची, शंभर वर्ष बोलण्याची आणि ऐकण्याची प्रार्थना सुध्दा सूर्यालाच केली जाते.
एका अमेरिकी शास्त्रज्ञाने म्हटले आहे, की जर सूर्यापासून मिळणारा उब आमच्यात सुरक्षित रहात असेल तर आम्ही चारशे वर्षापर्यंत जिवंत राहू शकतो. ही उब आपणास सूर्याकडून प्राप्त होते. सूर्य नसताना सर्व जीवसृष्टी नष्ट होते. सूर्यप्रकाशाचा संबंध केवळ ऊष्णतेशी नाही. त्याचा मानवाच्या आहाराशीसुध्दा आहे. वनस्पतींची पाने सूर्यकिरणांच्या माध्यमातून क्लोरोफिल नावाचा घटक निर्माण करतात. या घटकाविना पानात नैसर्गिक हिरवेपणा राहू शकत नाही. आपण दैनंदिन आहारात नेहमी हिरव्या भाज्यांचा समावेश करतो. या भाज्यांमध्येच मानवाच्या शरीरास आवश्यक पोषक घटक असतात. यामुळेच सूर्यप्रकाश मानवी जीवनासाठी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रुपाने आवश्यक आहे.
संग्रह - महेश भालेराव
आरोग्यदूत या व्हॉटसऍप ग्रुपच्या सौजन्याने
एखादी न मानवणारी गोष्ट आपल्या शरीराच्या संपर्कात आली तर शरीराची प्रतिकारशक्ती त्या वस्तूला बाहेर काढण्यासाठी म्हणून जे काही प्रयत्न करते, त्याचं निदर्शक म्हणजे अॅीलर्जी. सूर्य आणि सूर्याच्या खाली धूळ, धूर, धुकं, धुरकं यांसारखे जेवढे काही पदार्थ आहेत त्या सर्व गोष्टींनी अॅ लर्जी होते.
अॅलर्जीचे प्रकार
ज्या ज्या अवयवांवर अॅेलर्जीचा प्रादुर्भाव झालेला आहे त्याप्रमाणे अॅरलर्जी होते. नाकाला अॅ लर्जीचा प्रादुर्भाव झाला तर नाक गळतं. सर्दी होते. फुफ्फुसं आणि श्वासनलिकेला अॅॅलर्जीची लागणं झाली तर श्वास घेताना त्रास होतो. दम्यासारख्या व्याधी जडतात. त्वचेवर अॅालर्जी आली तर तिच्यावर मोठमोठया प्रकारचे चट्टे येतात. पुरळ येते. चट्टे येतात. खाज सुटते. काही वेळा इसब येतो. त्वचा जाड होते. कधी कधी पांढरे, काळे तसंचलाल रंगाचे डागही येतात.
अॅलर्जीची कारणं :
अनुवंशिकता, सूर्यप्रकाश, सेंट, परफ्युर्मस, पावडर, मेकअपची उत्पादनं. प्लास्टिक, चामडी, रबरी पादत्राणं, फुलं, परागकण, लोकरीचे नाहीतर सिंथेटिक किंवा पॉलिएस्टर या कापड प्रकारात मोडणारे कपडे. दही, ताक, इडली डोसा, बंगाली मिठाई, माव्याचे पदार्थ, दुधासारखे पदार्थ, शेंगदाणे, चीज पनीर यांसारखे प्रथिनयुक्त पदार्थ, सॅनिटरी पॅड्स, नॅपकिन, डायपर्स, यांच्यामुळेही अॅसलर्जी होऊ शकतात,धातूच्या वस्तू,चायनीज तसंच लोकरीची खेळणी, रंग, इंग्रजी पद्धतीचे बाथरूम्स, कमोड्स. अतिस्वच्छता हेही अॅ्लर्जीचं कारण असू शकतं. कारण त्यामुळे शरीरातील उपकारक जिवाणूंची संख्या कमी होते .
कोणाला कशाची अॅलर्जी होऊ शकेल?
लहान मुलं: डायपर्सची, चायनीज खेळणी, लोकरी वस्त तसंच खेळणी,शाळेत जाणारी मुलं: खडू, मैदानातील माती, चप्पला. नोकरदार मंडळी : धातू, रबर, परफ्युम्स, सौंदर्यप्रसाधनं.गृहिणी: धूर, धुळ, धातू तसंच कांदा, लसूण आणि टोमॅटो यांसारख्या खाण्याच्या वस्तू. कष्टकरी वर्गातील मंडळी : सिमेंट, विटा, माती, रबर.वृद्धमंडळी: लोखंडी काठया, रबर, फुलं, देवपूजेचं साहित्य, मफलर, स्वेटर. याशिवाय या सर्वाना खाद्यपदार्थातूनही अॅउलर्जी होऊ शकते.
कोणत्या ऋतूमध्ये अॅयलर्जी वाढतं?
अॅलर्जीचं प्रमाण पावसाळयापेक्षा उष्ण, कोरडय़ा तसंच दमट हवामानात वाढतं. थंडीत आणि उन्हाळयातही वाढतं.
अॅलर्जी टाळण्यासाठी आपल्या आपल्याला कुठल्या पदार्थाची अॅालर्जी आहे याचं बाराकाईने निरीक्षण करावं. त्या पदार्थाचा संपर्क टाळावा. योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
संजीव वेलणकर पुणे.
9422301733
संदर्भ:- प्रहार
सर्वसामान्य जनतेत "थकवा‘ ही तक्रार वारंवार आढळते. डॉक्टारां‘कडे येणाऱ्या रुग्णांपैकी दहा टक्के लोकांची ""थकवा जाणवतो आहे‘‘ ही तक्रार असते. सर्व रुग्णांत एकवीस टक्के थकवा जाणवतो. थोड्या काळापुरता आणि नव्याने जाणवला जाणारा थकवा ही अनेक रुग्णांची तक्रार असते. दीर्घकाळ रेंगाळणारा थकवा हा विकार त्यामानाने क्वचितच आढळणारा आजार असतो. पौगंडावस्थेत जाणवणारा थकवा हा बऱ्याच वेळा खिन्नतेचे (डिप्रेशनचे) लक्षण असते. अशा व्यक्ती एका टोकाला आपले आयुष्य आळसात आणि निष्क्रियतेत घालवीत असतात, तर दुसऱ्या टोकाला अतिरेकी धडपड आणि प्रमाणाबाहेर हालचाल करीत असतात. ६५ वर्षांवरच्या स्त्रियांना थकवा जास्त प्रमाणात जाणवताना आढळतो. स्त्री-पुरुषांत या वयात मधुमेह, रक्तक्षय (ऍनिमिया) आणि आर्थिक ताण ही कारणे असू शकतात. कौटुंबिक कलह हेदेखील एक महत्त्वाचे कारण असू शकते. विविध जंतू-संसर्गदेखील या वयात होतात. शारीरिक हालचाल कमी असणे, झोप पुरेशी न मिळणे आणि मानसिक तणाव यामुळे थकवा रेंगाळतो. याचा अर्थ नियमाने व्यायाम करणे, पुरेशी झोप घेणे आणि मानसिक प्रकृती नीट राखणे याबाबत दक्ष राहणे प्रत्येक व्यक्तीला आवश्यरक आहे.
थकवा आलेल्या व्यक्तीला ""बरे वाटत नसल्याची‘‘ तक्रार असते. कोठे ना कोठे शरीरात अस्वास्थ्य जाणवत राहते. दैनंदिन व्यवहारदेखील नकोशी वाटतात. व्यायाम आणि आंघोळ करणे टाळले जाते. तात्पुरता थकवा तापासारख्या आजाराने किंवा अतिश्रमाने येतो. थोड्या दिवसांच्या विश्रांतीने किंवा "हवा पालटा‘ने तो जातोही. दीर्घकाळ टिकणारा थकवा एका महिन्यापेक्षा जास्त काळ टिकतो आणि क्रॉनिक फटीग सिंड्रोम सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ रेंगाळतो.
""अशक्तपणा,‘‘ ""निरुत्साह‘‘ आणि ""थकवा‘‘ हे तीन शब्द वेगवेगळ्या स्थितींचे निदर्शक आहेत. "अशक्तपणा‘ म्हणजे शक्ती कमी झाल्याचे जाणवणे. वजन उचलणे किंवा पायी चालणे अशा क्रियांना शक्ती लागते. जी व्यक्ती वीस पौंड वजन उचलू शकत होती, ती आता तेवढे वजन उचलू शकत नाही. किंवा जी व्यक्ती एका तासात तीन किलोमीटर्स अंतर पायी चालू शकत होती, ती आता तेव्हढे चालू शकत नाही, तर शक्ती कमी झाली आहे, "अशक्तपणा‘ आला आहे, अशी स्थिती शारीरिक आजारामुळे येते. "निरुत्साह‘ म्हणजे काम करण्याची इच्छा नसणे. अशी स्थिती शारीरिक किंवा मानसिक समस्यांचा परिणाम असू शकते. उदाहरणार्थ, हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीला चालल्यानंतर धाप लागणे किंवा छाती भरून येऊन छातीत, गळ्यात किंवा पाठीत दुखण्याचा अनुभव येत असला तर हे श्रम करू नयेत असे वाटते. या तक्रारीला "अर्गो - फोबिया‘ म्हणतात. "ग्रीक शब्द‘ "अर्गॉन‘ म्हणजे काम किंवा श्रम, आणि दुसरा ग्रीक शब्द "फोबॉस‘ म्हणजे भय, भीती,आपल्या शरीरातील शक्ती वापरण्यात व्यत्यय येणे आणि विश्रांती किंवा झोप घेण्याची प्रबळ इच्छा होणे या स्थितीला "थकवा‘ म्हटले जाते. थकवा येण्यामागे दोन महत्त्वाच्या प्रतिसादांचा भाग असतो. पहिला म्हणजे ""युद्ध अथवा पलायनाचा‘‘ प्रतिसाद - आणि दुसरा म्हणजे ""संरक्षण - माघार‘‘ प्रतिसाद. युद्ध अथवा पलायनाचा प्रतिसाद प्राणिमात्रांना संकटांना तोंड देण्यास, प्रसंगी आक्रमक होण्याची व स्वतःला इजा झाल्यास त्याच्या तयारीची तरतूद करतो. या करता विविध मज्जा केंद्रे, अनैच्छिक मज्जासंस्था व विविध संप्रेरके (हॉर्मोन्स) कार्यान्वित केली जातात. यश मिळाल्यावर किंवा जीव वाचण्याची खात्री झाल्यावर हा प्रतिसाद शमतो. ""संरक्षण-माघार‘‘ प्रतिसादीत आगामी शक्तीच्या निचऱ्याची सूचना मिळताच सर्व हालचाल थांबवून सर्व संवेदना अधिक तीव्रतेने जाणविल्या जाण्याची स्थिती निर्माण केली जाते. हा प्रतिसाद विश्रांती किंवा झोपेनंतर शमतो. या संरक्षण - माघार प्रतिसादामुळे ऊर्जा वाचवली जाते. "युद्ध अथवा पलायन‘ या प्रतिसादामुळे ऊर्जा खर्च करण्याची तयारी होते व प्रत्यक्षात ऊर्जा खर्चही होते. युद्ध अथवा - पलायनाचा प्रतिसाद शमल्यावर संरक्षण आणि माघार हा प्रतिसाद सुरू करता येतो. म्हणजे, खर्च झालेली ऊर्जा आता भरून काढता येते.
"युद्ध अथवा पलायन,‘ "संरक्षण आणि आधार‘ किंवा "उपस्थित राहून मैत्री वाढविणे‘ यापैकी कोणती स्थिती आपण जोपावयाची हे ज्याचे त्याने ठरवावे. अर्थात् त्या करता आत्मपरीक्षणाने आपल्या मनाचे व्यवहार जाणणे ही पहिली पायरी आहे. ऊर्जा खर्च करणे अथवा ती आपल्या दैनंदिन कामकाजात उपलब्ध नसणे म्हणजेच थकव्याला निमंत्रित करणे होय, हे स्पष्टच आहे. आपल्या उपरनिर्दिष्ट सर्व भावनांचे मूळ आपल्या अहंकारात आहे हे समजणे ही दुसरी पायरी होय. अहंकार समजणे म्हणजेच "अहम्‘ला जाणणे. आत्मज्ञान होणे. खरोखरी आत्मज्ञानी व्यक्ती थोड्याच असतील. आपले ऋषी, संत आणि महात्मे यांना तसे झालेले होते. सर्वसामान्यांना तशी स्थिती येणे सोपे नाही. ज्यांना थकवा जाणवतो, त्यांनी सुरवात आपल्या शारीरिक प्रकृती तपासण्यापासून सुरवात करणे इष्ट आहे. रक्तक्षय, मधुमेह, क्षयरोगासारखा संसर्ग, चुकीची जीवनशैली इकडे लक्ष पुरवून ते आधी दुरुस्त करावे. थॉयरॉईड ग्रंथीचे विकार ओळखणे व त्यावर योग्य उपचार करणे हे आता सोपे झालेले आहे. कोणताही शारीरिक विकार नसल्यास चिंतातुरता किंवा खिन्नता हे मानसिक विकार नाहीत ना, याची खात्री तज्ज्ञ आणि अनुभवी मानसोपचार तज्ज्ञांकडूनच करून घ्यावी. याच्या जोडीला स्वतः आपल्या मनाचे व्यवहार पहावेत. सुप्त मनात डोकावण्याचा प्रयत्न करावा, येथे एखाद्या समुपदेशकाची मदत निश्चिचत उपयोगी पडेल. थकवा माणसाच्या इतर अनेक गुणांना झाकतो आणि आयुष्यात यशस्वी होऊ देत नाही. थकवा जाणलाच पाहिजे आणि योग्य उपचारांनी थकवा या स्थितीवर मात केलीच पाहिजे.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ:- डॉ. ह. वि. सरदेसाई /सकाळ
काहीजणांचे उत्तर असेल पोट भरेपर्यंत; तर काहीजण म्हणतील मन भरेपर्यंत!! कदाचित काही स्वतंत्र बुद्धिवादींना असंही वाटेल की आता आम्ही किती खायचं हेदेखील आयुर्वेद ठरवणार का? ;)
ज्याला निरोगी राहायचं आहे अशी व्यक्ती मात्र या प्रश्नांचा गांभीर्याने विचार करेल.
आयुर्वेदाने जठराचे काल्पनिक भाग करून स्थूल-द्रव आहाराची मात्रा सांगितली आहेच. मात्र असा अंदाज घेणे हे प्रत्येकाला सर्वस्वी शक्य नसल्याने तुलनेत सोपा मार्ग निवडुया. एखादा पदार्थ किती प्रमाणात खाल्ल्यावर आपले पोट भरते याचा प्रत्येकाला निश्चित अंदाज असतो. यालाच 'तृप्ती' ही संज्ञा आयुर्वेद वापरतो. आयुर्वेद सांगतो पचायला जड असलेले पदार्थ या तृप्तीच्या निम्म्या मात्रेतच घ्यावेत. उदाहरणार्थ; दोन वाट्या श्रीखंड खाऊन पोट भरत असल्यास एकाच वाटीवर समाधान मानावे. आवडतं म्हणून ओरपत बसलं तर पुढे सुस्ती, अपचन, पोट बिघडणे आणि सर्दीसारख्या तक्रारी सुरु झाल्याच म्हणून समजा. बहुतांशी गोड पदार्थ, मांसाहार, आंबवलेले पदार्थ हे पचायला जड असल्याने त्यांना हा नियम लागू होतो.
पचायला हलके असलेले पदार्थ मात्र पोट भरल्यासारखे वाटेल इतकेच खावेत; त्याहून अधिक मात्रेत खाऊ नयेत. लाह्या, घावने, कढण, पेज यांसारखे पदार्थ पचायला हलके आहेत. या पदार्थांच्या बाबतीत हा नियम लागू होतो. या नियमांनुसार जेवण केल्यास नियमितपणे व्यायाम न करणाऱ्या व्यक्तीदेखील अपचन आणि तत्सम समस्यांपासून दूर राहू शकतील असा यामागील विचार आहे. थोडक्यात काय? तर 'चार घास कमी' जेवणे हे आरोग्यदायी आहे. या साधा नियम पाळला म्हणजे 'टमी भी खूष और मम्मी भी खूष'.
वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।।
डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
गरीबाचा / मुंबईकरांचा चा नाश्ता म्हणजे वडापाव .
पण गरमागरम वडा,भजी बाधून दिला जातो वर्तमान पत्राच्या कागदात.
किवा वडे,भजी तळणारा कामगार ते तळून अतिरिक्त तेल शोषण साठी त्याच्या भांड्यात वर्तमान पत्रच ठेवलेले असते.
एव्हडेच कशाला आपल्या घरात सुद्धा तळण करताना सुद्धा आपणसुद्धा वर्तमान पत्रच वापरतो. दिवाळीचे प्रमुख आकर्षण असते तो म्हणजे दिवाळीचा फराळ. घरात-घरात लाडू, चिवडा, चकली, करंजी, शंकरपाळ्या, अनारसे असे अनेक पदार्थ केले जातात. अनेक पदार्थ तळणीचे असल्याने आणि मोठ्या प्रमाणात केले जात असल्याने तेलातून काढल्यानंतर थेट वर्तमानपत्रावर पसरले जातात. टिश्यू पेपर किंवा किचन रोल्सच्या तुलनेत वर्तमानपत्र स्वस्त असल्याने हा पर्याय वापरला जातो.
मात्र असे करणे आरोग्यासाठी घातक आहे. यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो.
मासिकं किंवा वर्तमानपत्रामधील शाई तेलकट पदार्थांमध्ये सहज शोषली जाते. त्यामधील ग्राफाईट हा घटक घातक असल्याने यामुळे कॅन्सरचा धोकाही बळावतो. शरीरातील विषारी घटक मूत्रविसर्जनातून किंवा शौचातून बाहेर पडतात परंतू ग्राफाईट शरीरात साचून राहतो. त्याचा परिणाम किडनी आणि फुफ्फुसांवर होतो. वर्तमानपत्राच्या कागदामधील, शाईतील सॉल्वंट्स पचनक्रियेत बिघाड करण्यास तसेच हार्मोन्सच्या पातळीमध्ये असंतुलन निर्माण करण्यास कारणीभूत ठरातात. परिणामी कॅन्सरचा धोका वाढतो. म्हणूनच तळलेले पदार्थ वर्तमानपत्रावर निथळत ठेवणे किंवा पदार्थ वर्तमानपत्रात गुंडाळून ( पुडी) करून नंतरआहारात वापरणे आरोग्यास खूप धोकादायक आहे.
वर्तमानपत्राच्या शाईमध्ये पेट्रोलियम बेस्ड मिनरल ऑईलचा वापर करून ती अधिक पातळ केली जाते. तर ती सुकवण्यासाठी कोबाल्ट बेस्ड घटकाचा वापर केला जातो. हे दोन्ही घटक आरोग्याला त्रासदायक असतात. वर्तमानपत्रापेक्षा मासिकाचा कागद तुम्हांला अधिक चांगला वाटत असल्यास हा तुमचा गैरसमज आहे. कागद अधिक ग्लॉसी बनवण्यासाठी तसेच शाई स्प्रेड होऊ नये म्हणून वापरले जाणारे घटक अधिक धोकादायक असतात. म्हणूनच पदार्थांमधील अतिरिक्त तेल शोषून घेण्यासाठी टीश्यू पेपर किंवा पेपर टॉवेलचा वापर करा.
टिश्यू पेपर किंवा टॉवेल घाऊक घेतल्यास फार महाग पडत नाहीत. मात्र तुम्हांला कागदाचाच वापर करायचा असल्यास किमान छपाई न केलेला कागद वापरा. पण वर्तमानपत्र वापरणे कटाक्षाने टाळा.
आरोग्यदूत या WhatsApp ग्रुपवरील लेख
Copyright © 2025 | Marathisrushti