वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
सचिन तेंडुलकरच्या २१ वर्षांच्या सोनेरी कारकिर्दीचा मागोवा घेणारे जागत्या स्वप्नाचा प्रवास हे पुस्तक पूजा प्रकाशनने प्रकाशित केले आहे. खर्या अर्थाने हा सचिन-कोश आहे. मूळ ७०० रुपये किमतीचं हे पुस्तक केवळ ३५० रुपयात उपलब्ध करुन दिलंय मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी.
January 4, 2011
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर हे एक निसर्गसमृद्ध व टुमदार गाव. हे गाव प्रसिद्ध आहे ते येथील विस्तीर्ण, स्वच्छ व सुंदर समुद्रकिनाऱ्यामुळे! याच दिवेआगरची एक वेगळी ओळख निर्माण झाली ती येथील सुवर्ण गणेश मंदिरामुळे! नोव्हेंबर १९९७ मध्ये येथे सुमारे १३२० ग्रॅम वजनाचा गणेशाचा सोन्याचा मुखवटा आणि २८० ग्रॅम वजनाचे गणेशाचे दागिने जमिनीत खोदकाम करताना सापडले आणि दिवेआगर संपूर्ण राज्यात प्रसिद्धीच्या झोतात आले.
September 28, 2025
चांगल्या असो की...
वाईट असो..
घडणाऱ्या गोष्टी घडत असतात ...!!
लहान मुले मोठी होतांना...
पडत पडत घडत असतात...!!
डोक्याला जास्त
ताण करून घ्यायचा नाही...
आणि
सारखा सारखा बी.पी.
वाढवुन घ्यायचा नाही ...!!
मुलं अभ्यास करत नाहीत
आपण समजून सांगावं.......!!
घरातलं काम करत नाहीत
त्यांना पुन्हा पुन्हा सांगावं......!!
भविष्यात त्याचं कसं होईल...?
याची जास्त काळजी
करायची नाही....!!
सारखा सारखा आपण आपला
बी.पी. वाढवून घ्यायचा नाही....!!
तुम्हाला वाटतं पोरींन ....
स्वयंपाकात लक्ष घालावं
भाजी नाहीतर नाही ....
पिठलं तरी हालवावं ....!!
लाडक्या चिरंजीवाने
मोबाईलशी कमी खेळावं .....
आल्या गेल्या पाहुण्यांशी
दोन शब्द तरी बोलावं ...!!
पोरगं मात्र अजिबात
थोबाड वर करत नाही...
तरी सुद्धा आपण आपली
शुगर लेव्हल मुळीच वाढू
द्यायची नाही...!!
ऑफिस असो घर असो
कुणीच कुणाचं ऐकत नसतं...
ज्याला जसं वाटेल तसं
प्रत्येकजण वागत असतो...!!
आपण मात्र उगीचच
फुकटचे सल्ले देत असतो
समोरच्या माणसावर त्याचा काहीच
परिणाम होत नसतो.
छातीवर हात ठेऊन सांगा
तुम्ही काळजी केली म्हणून
कोणते कोणते प्रश्न सुटले..?
नाहीतरी तुमची मुलं तुम्हाला
विचारणारच आहे...
तुम्ही आमच्यासाठी काय केले ?
सरते शेवटी कोणतीच गोष्ट
मनाला लावून घ्यायची नाही
बी.पी. आणि शुगर सुद्धा
अजिबात वाढू द्यायची नाही
मरण यायच्या आधी मात्र थोडं
स्वतःसाठी जगून जायचे ...
सगळ्या सोबत असूनही
थोडं बाजूला होऊन जायचे...!!
आपलं कोणी ऐकत नसतं
त्यावेळी जास्त बोलू नये ...
त्यांचं ते बघून घेतील
जास्त ओझ ं उचलू नये ....!!
बी.पी. आणि शुगर सुद्धा
Tension मुळे होत असतात...
गोळ्या, औषधं घेतले की
बिचारे गुपचप बसत असतात....!!
काहींच्या बाबतीत ती
वडिलोपार्जित प्रॉपर्टी असते...
रजिस्ट्री नाही केली तरी
तिकडून इकडे येत असते....!!
चालत जावं , फिरत जावं ..
डॉक्टर सांगतील ते ऐकत जावं...!!
योग, प्राणायाम करत करत
आनंदाने लढत राहावं...!!
आपल्या हार्टच्या ECG ला
आपण बिघडू द्यायचं नाही...
" बी.पी." आणि " शुगर " ला
जास्त वाढू द्यायचं नाही ......!!!
-- डॉ. गौरी पाटील
निसर्गोपचार तज्ज्ञ
9820584716
May 16, 2017
नवव्या शतकापर्यंत श्री गणेशाची जपानला माहिती नव्हती. परंतू भारतीय तत्त्वज्ञानाबाबत त्यांना उत्सुकता होती. चीनी विचारवंतांकडून दिशा घेऊन भारतीय पध्दतीचा त्यांनी अभ्यास केला. कोबा डाइती याने प्रथम श्री गणेशाची स्थापना जपानमध्ये केली.
July 10, 2012
आपण बर्याचदा बाहेर तरुणांना हातगाडीवर चायनिज पदार्थ खाताना बघतो. स्वस्त असात म्हणून दुनिया त्यांच्या मागे लागली आहे. पण जरा त्यामागचं वास्तव वाचा….
September 15, 2017
भाद्रपद शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आवाहित केल्या जाणाऱ्या देवतेस जेष्ठागौरी असे संबोधले जाते. या देवतेचे आवाहन अनुराधा नक्षत्रावर आणि पूजन जेष्ठा नक्षत्रावर तसेच विसर्जन मूळ नक्षत्रावर होते. पुराणात थोडेफार उल्लेख आणि मौखिक परंपरेने चालत आलेली कहाणी इतकीच माहिती जेष्ठागौरीविषयी उपलब्ध आहे.
जेष्ठा नक्षत्रावर ही देवी येत असल्याचे तिला जेष्ठागौरी म्हटले जाते. तसेच लक्ष्मीची जेष्ठा भगिनी अलक्ष्मी हिची पूजा या दिवशी केली जाते. जगात सर्वत्र प्रत्येक गोष्टींना चांगली- वाईट, डावी-उजवी अशा दोन विरोधी बाजू असतात. त्यातल्या डाव्या गोष्टीचा त्याग केल्यास अनवस्था निर्माण होते असे मानतात.
वेद वाड्मयत सुद्धा ‘नमो जेष्ठाच च कनिष्ठाय च’ ‘स्तेतानां पतये नमः’ अशी वचने आहेत. यावरून अनिष्ट गोष्टीबद्दल सुद्धा पूज्यभाव मनात बाळगणे, हे मानवाच्या आध्यात्मिक उन्नतीचे द्योतक असल्याचे दिसते.
समुद्र मंथनातून श्रीमहालक्ष्मी आणि त्याची बहीण श्रीअलक्ष्मीचा जन्म झाला. श्रीमहालक्ष्मी म्हणजे(येणारे धन म्हणजे श्री महालक्ष्मी) आणि श्रीअलक्ष्मी (म्हणजे येणारे धन जो खर्च होतो त्या खर्चाला श्रीअलक्ष्मी) असे म्हणतात.
याप्रमाणे लक्ष्मीची थोरली बहिण ‘अलक्ष्मी’ ही देखील पूजनीय आहे. या संदर्भातील प्राचीन आरण्यका अशी आहे. समुद्र मंथनातून अनेक रत्नांबरोबर लक्ष्मी हे रत्न निघाले. साक्षात विष्णूने लक्ष्मीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चय केला. त्यावेळी आपल्या जेष्ठा भगिनीचा विवाह झाल्याशिवाय आपण विवाह करणार नाही, असे श्रीलक्ष्मीने सांगितल्यावर विष्णूने तिचा विवाह एका तपस्वीशी लावून दिला. पण श्रीअल्क्ष्मीचे उपद्रवी अवगुणामुळे तो तपस्वी वनात पळून गेला. तेव्हा श्रीअलक्ष्मी अश्र्वत्थवृक्षा खाली रडत बसली.
एकदा विष्णू तिथून जात असता त्यांनी तिला रडताना पाहिले. तिची हकिकत ऐकून त्यांनी तिचे सांत्वन केले व तिला तीन वरही दिले. पहिला वर, जिथे भक्तीचा अभाव, आळस, व्यसनाधीनता, नास्तिकता, अधर्म असेल तिथे तिने वास्तव्य करावे. दुसरा वर, शनिवारी अश्र्वत्थास प्रदक्षिणा घालणाऱ्यास तिने पिडा देऊ नये. तिसरा वर, दरवर्षी भाद्रपद महिन्यात जेष्ठा नक्षत्रावर तिची पूजा केली जाईल, असा होता. तेव्हापासून जेष्ठा गौरीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी व अलक्ष्मी या दोघी बहिणींची पूजा केली जाते. ही गौर वाहत्या पाण्यातून आणण्याची प्रथा आहे. तिचे विसर्जनही वाहत्या पाण्यातच केले जाते. कारण श्रीअलक्ष्मी ही जलदेवता असल्याने तिचे वास्तव्य वाहत्या पाण्यात असते.
या दोन गौरीमधील एक गौर म्हणजे लक्ष्मी घरातच असते. दुसरी बाहेरून आणतात तीच जेष्ठा गौर घरात आणताना तिचाही उल्लेख लक्ष्मी असाच केला जातो. यावेळी जमिनीवर रांगोळीने आठ पावले काढली जातात. प्रत्येक पावलावर थोडे थांबून लक्ष्मीच्या विविध रूपांचा उल्लेख केला जातो. यामध्ये अष्टलक्ष्मी चा समावेश असतो. गौरीचे आवाहन करण्याच्या अनेक पद्धती निरनिराळ्या प्रांतांनुसार प्रचलित आहेत. काही घरात चांदीच्या किंवा पितळ्याच्या किंवा मातीच्या मुखवट्यावर तर काही जणी सुघट (संक्रांत, घट, मातीचे भांडे), काही घरात वाहत्या पाण्याजवळच्या खड्यांवर तर काही जणी मूर्तीवर गौरीचेआवाहन करतात. काही प्रांतात गौरी म्हणजेच शंकराची पत्नी मानून पूजा करण्यात येते. तर काही ठिकाणी गौरीच्या वनस्पतीची रोपटी पूजेसाठी वापरतात. जेष्ठा गौरी म्हणजे माहेरी आलेली माहेरवाशीणच. या दिवशी सासूरवाशिणींना आपल्या माहेरी विशेष मान असतो. गौरी दिवशी घरी विशिष्ट प्रकारचे अन्न शिजवण्याची प्रथा आहे. त्यात प्रामुख्याने भाजी-भाकरीचा, ज्वारीच्या कण्याचा समावेश होतो. संध्याकाळी हळदीकुंकवाचा कार्यक्रम करून रात्री झिम्माफुगड्या, घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरण केले जाते.
अष्टमीच्या दिवशी गौरीपूजन करून पुरणाचा नैवेद्य दाखविला जातो. जेष्ठा गौरी हे पार्वतीचेच विशिष्ट रूप मानले जाते. तिला वैराग्यलक्ष्मीच म्हणतात. लक्ष्मी प्राप्तीनंतर जो मद मस्त, जो अहंकार जोपासला जातो त्या सर्वांवरील उतारा म्हणजे ‘जेष्ठा गौरी व्रत’ असे मानतात.
गौरी पूजना इतकेच महत्व तिच्या विसर्जनाला आहे. जेष्ठा गौरीचे विसर्जन मूळ नक्षत्रावर होणे आवश्यक आहे. कारण कोणत्याही गोष्टीचा त्याग मूळ नक्षत्रावर केल्यास त्या गोष्टी पुन्हा वाढीस लागत नाहीत, असे मानतात. विसर्जनाच्यावेळी दहीभाताचा नैवैद्य केला जातो. यावेळी या देवतेवर अक्षता वाहून तिला निरोप दिला जातो..
गौरीलाच महालक्ष्मी म्हणतात आणि जेव्हा ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा होते म्हणून ज्येष्ठा गौरी असेही म्हणतात.
प्रथेचा प्रारंभ आणि इतिहास
गौरी हे शिवाच्या शक्तीचे रूप मानले गेले आहे. अपराजितपृच्छा या ग्रंथामध्ये द्वादशगौरींचा उल्लेख येतो. अग्निपुराणामध्ये गौरी मूर्तीचे सामूहिक पूजन केले जाते असे सांगितले आहे.
पुजन माहिती....
श्रीमहालक्ष्मीचे आवाहन
गौरीचे मुखवटे त्यांच्या मुलांसह सर्वप्रथम अंगणातील तुळशी वृंदावनाजवळ ठेवले जातात. तिथून त्यांना वाजतगाजत घरात आणलं जातं.
देवघरात देवापुढे ठेवून त्यांना नैवेद्य दाखविला जातो. त्यानंतर त्यांना स्टँडवर किंवा मडक्यांची उतरंड रचून उभं केलं जातं. गौरींचे मुखवटे हे प्रामुख्याने प्लॉस्टर ऑफ पॅरीसचे पाहायला मिळतात. त्याचबरोबर काही ठिकाणी ते पितळेचे असतात तर काही ठिकाणी ते कणकेचेदेखील बनविलेले असतात. गौरींना साडी नेसविली जाते. त्याचबरोबर त्यांना दागदागिने चढविले जातात.
गौरी ज्या मखरात उभ्या केल्या जातात तो सजवून गौरींच्यापुढे त्यांचा संसार मांडला जातो. शिवाय त्यांच्यापुढे अनेक धान्याच्या राशी मांडलेल्या असतात.
दुसर्या दिवशी आपल्या घराण्याच्या प्रथेनुसार कोणा कडे सकाळी, दुपारी, किवा संध्याकाळी किवा रात्री महापुजन करतात यात पाना-फुलांची आरास करतात, शेवंतीची वेणी माळतात, हार, चाफ्याचे फूल, केवड्याचे पान वाहतात तर नैवेद्याला १६ भाज्या, १६ कोशिंबीरी, १६ चटण्या, १६ पक्वान्ने तसेच फराळाचे पदार्थ करतात. पुरणाची १६ दिव्यांनी आरती करतात. संध्याकाळी हळदी-कुंकवाचा मोठा समारंभ केला जातो.
तिसर्या दिवशी तिला खीर-कानवल्याचा( करंजीचा प्रकार मुरड घालुन करतात, गौर मुरडून परत यावी म्हणून) नैवेद्य दाखवुन तिची पाठवणी (विसर्जन) करतात.
अश्याप्रकारे ही माहेरवाशीण येते, राहाते, आणि डोळ्यात पाणी आठवण म्हणून ठेवते पणं परत येण्याचे वचन मात्र देऊन जाते.
September 8, 2016
१९४७ मध्ये बडोदा येथे झालेल्या रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये बडोद्याविरुद्ध बडोद्यासह सर्वाधिक ५७७ धावा. हा विक्रम अनेक वर्षांपासून अबाधित होता .
September 10, 2021
शहरात राहणार्यांनी सोयाबिन हे नाव ऐकल आहे का?
नाही..
बरं सोया हे तेलाचे नाव ऐकल का? आता उत्तर हो येईल.
मी एक पोलीस आहे आज घरून नीघालो एक फोन आला खामगाव Market जवळ खुप गाड्यांची गर्दी जमा झाली असुन संपुर्ण रस्ता बंद झाला आहे .मी आणी माझे सहकारी पोचलो तर 300/400 छोट्या मोठ्या गाड्या market समोर रांगा लावलेल्या दीसल्या सहज वीचारल तर प्रतेक गाडीत सोयाबीन. शेतकरी बांधावानी वीकायला आनलेले. भाव वीचारला 2200 /2500 असा.(हाच भाव पाच वर्षे आगोदर पन होता.पन त्यावेळी सोया तेलाचा भाव 40/45 रूपैय होता.पन सोयाबीनचा पाच वर्षा आगोदरचा भाव आज शेतकरी भावाला मीळतोय. पन तेलाचे भाव आज 70ते75रूपय हा विरोधाभास नाही का?
कच्चा माल आतीश्य स्वस्त आणि त्या पासुन बननारा माल पाच पट माहाग कारन कच्चा माल गरीब,असंघटीत अश्या शेतकरी वर्गाचा ) गाड्यावाल्याना वीचारले कोठुन आलात बरेच सांगत होते की मेहकर, जानेफळ, बुलडाणा,शेगाव,नांदुरा, मलकापुर आणी इतर बर्याच गावावरून. आलेला माल माती मोल कीमतीत वीकल्या जात होता तरी शेतकरी रांगा लाऊन उभा.
काय करनार वीदर्भ मराठवाडा गेल्या चार ते पाच वर्षा पासुन दुष्काळात होर पाळतोय. या वर्षी पाऊस बरा झाला सोयाबीन एक मात्र नगदी पीक.त्याच्या भरोश्यावर दीवाळी, उसनवारी, कर्ज, मुलांचे ,शिक्षण आणी बर्याच गोष्टी .गाडीत माल भरला खामगावला चांगला भाव मीळतो म्हणुन आनलेला. बाजारात भाव नाही वापस नेता येत नाही. आगोदर खर्च खुप झालेला. व्यापारी जो भाव देइल तो भाव घेतल्याशिवाय पर्याय नाही. शेतकरी बांधावाच्या जीवावर मोठी झालेली संघटना मुंग गीळून चुप का? निवडनुकी च्या अगोदर ईव करेगे टीव करेगे म्हननारे आता कुठ आहेत .
आपण जगतो आहोत ते शतकर्य च्या भोरोश्यावर. शेतकरी पीकवतो तेंव्हा आपल्या ताटात असत. शेतकरी जगला पाहीजे. लाखांचा पोशींदा जगला पाहिजे. सरकारला म्हना पेट्रोल शंभर रूपय करा.दारू ,सिगार,बुट इतर चैनीच्या वस्तू चे भाव दीडपट करा नोकरदार वर्गाला एका महीन्याचा पगार कमी द्या. शेतकरी बांधवाच्या सोयाबीनला भाव द्या .......
मित्रांनो आपण चिनचे सामन न घेन्याची चळवळ ऊभी केली त्याची दखल चीनला घ्यावी लागली...तसी ताकत आपल्याला सोशल मीडीयावर शेतकरी बांधवासाठी ऊभी करावी लागे मी छोटासा प्रयत्न सूरूकेला आहे .आप नाहाक चुटकुले पाठवतो आज शेतकरी भावाची व्यथा पाठवा....
कारन हे सरकार ..... what's up, Facebook च सरकार आहे.याला या मार्फत माहीती लवकर समजते...
-- तुकाराम लांडे
November 3, 2016
आई जगदंबेच्या अपर्णा नावाचा विचार करीत आचार्यश्रींनी इथे एका वेगळ्याच पद्धतीने आईचा गौरव केला आहे.
February 11, 2020
बाळासाहेबांनी कळाले की हे शीर्षकाची आधीच नोंद झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे राहणाऱ्या वसंत कानडे यांनी १९७५ साली हे शीर्षक नोंदवून ते स्वतः प्रकाशन चालवत होते. बाळासाहेबांना हेच शीर्षक आपल्या मुखपत्रास असावे अशी मनापासून होती आणि कानडे यांनी त्यांना मदत करावी अशी त्यांची मनोभावना होती.
January 23, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti