वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
विविध आजारांवर रामबाण औषध असलेले आळींबी (मशरूम) हे बुरशीजन्य पिक आहे. महाराष्ट्राच्या वैदर्भीय जंगलांमध्ये नैसर्गिकरीत्या उगवणारी आळींबी (मशरूम)अत्यंत चवदार असते. शेतातील टाकाऊ संसाधनांचा वापर करून निर्यातक्षम आळींबी (मशरूम)चे उत्पादन करणे शक्य आहे.
आपणास माहिती आहेच ना कोणत्याही स्पर्धात्मक खेळात जय व पराजय ह्यातील अंतर अगदीच नगण्य असते. ....छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास महत्वाच्या मुख्य गोष्टींमधे फरक जाणवतो. ....आहाराच्या शास्त्राकडे लक्क्ष्य देणे कोणत्याही खेळात निर्णायक ठरू शकते. ....तुमच्या कामगिरीत स्पर्धात्मक आव्हाने झेलण्यास आहार शास्त्र महत्वाची भूमिका बजावते
दर वर्षी 5 मे हा जागतिक धावपटू (Athletic) दिन म्हणून साजरा केला जातो. आव्हान टिकवून धरण्यासाठी फिटनेस, स्टॅमिना आणि चांगले प्रशिक्षण धावपटूंसाठी अत्यंत महत्वाचे आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी तुमची कामगिरी खालावू शकतात. पण तुम्ही खाण्या पिण्याच्या सवयीची योग्य ती काळजी घेतल्यास तुमची कामगिरी उंचावण्यासाठी ते मोलाची मदत करतात
प्रत्येक खेळात आहाराचे/खाण्याचं एक वेगळेच तंत्र आहे आणि हे खाण्या चे तंत्र तुम्हीं व्यायाम किती काळ करता ह्या वर अवलंबून असते. जर व्यायाम हा 45 मिनीटांपेक्षा जास्त असल्यास तुम्हाला तुमच्या खाण्या पिण्याकडे लक्ष्य देणे गरजेचे असते. खेळामुळे येणारा थकवा कमी करण्यासाठी आहार आणि पाणी महत्वाची भूमिका बजावतात. जितका खुराक योग्य व चांगला तितका तुमचा परफॉर्मन्स चांगला तसेच तुमचा फिटनेस आणि skills जास्तीतजास्त उंची वर नेऊन ठेवण्यात ते मोलाची मदत करतात पण खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी तुमचा खेळ तर बिघडतोच पण तुमचा शारिरीक दुखापतीचा संभवही वाढतो, वजनावरही त्याचा परिणाम होतो. एवढेच नव्हे तर खेळामुळे गेलेली एनर्जी परत मिळवण्यातही कमतरता येते.
खेळाडूना अन्नघटकांची आणि द्रवपदार्थांची गरज ही त्याच वयाच्या इतर व्यक्तींपेक्षा जास्त असते. योग्य वेळी योग्य अन्नघटक घेणे (nutrient timing) हे अत्यंत महत्वाचे आहे ज्याचा असर तुमच्या परफॉर्मन्स वर होतो. खेळापुर्वी खेळामध्ये आणि खेळानंतर योग्य अन्नघटकांचे सेवन केल्यास तुमच्या परफॉर्मन्स ची पातळी उंचावण्यासाठी ते मोलाची मदत करतात
धावपटूंसाठी कोणकोणते अन्नघटक महत्वाचे
Fluid (द्रवपदार्थ) - शरीरातील फक्त 2% पाण्याची पातळी खालावली तर तुमचा परफॉर्मन्स 15 ते 30% पर्यंत कमी होऊ शकतो म्हणून fluids वर लक्ष द्या
एनर्जी - तुमचं वजन योग्य राखण्य एवढेच एनर्जी चे सेवन करावे. 45 मिनीटांपेक्षा व्यायाम जास्त असल्यास तुम्हाला एनर्जी व इलेकट्रोलाईट घेणे आवश्यक असते
कारबोहैड्रेट - carbohydrate = sports performance. कोणत्या प्रकारचे कारबोहैड्रेट किती प्रमाणात घ्यावयाचे हे तुमच्या व्यायामाच्या प्रकारावर, व्यायाम करण्याची वेळ, तुमचे सध्या चे वजन, आणि ते तुम्ही कोणत्या वेळी घेता ह्या वर अवलंबून असते.
फॅट - व्यायाम करताना किंवा खेळामध्ये तळकट आणि अति तेलाच्या पदार्थांचे सेवन त्रासदायक ठरू शकते ज्यामुळे तुमचा परफॉर्मन्स कमी होऊ शकतो. पण हीच फॅट तुम्ही योग्य प्रकारची, योग्य वेळी योग्य प्रमाणात घेतली तर तुमची कामगिरी उंचावण्यासाठी ते मदतीचा हात देऊ शकतात तसेच तुमचे आरोग्य ही सुधारण्यास ही ते उपयोगी पडतील.
कॅल्शियम - मुली, तरूण स्त्री धावपटूंसाठी जास्तीच्या ट्रेनिंगमुळे मासिकपाळीसाठी आवश्यक असणाऱ्या हार्मोन्स तयार होण्याचे प्रमाण कमी होते ज्यामुळे त्याचा मासिकपाळी वर परिणाम होतो, तसेच वेळेच्या आधी irreversible osteoporosis होऊ शकतो. तर पुरुष धावपटूंमध्ये testosterone ची कमतरता झाल्यामुळे osteoporosis होऊ शकतो.
लोह (iron) - अती शारीरिक व्यायामामुळे लोह ह्या खनिजाची कमतरता होऊ शकते आणि कमतकमतरतेमुळे रक्तक्षय (अनिमीया)चा धोका निर्माण होऊ शकतो
मॅग्नेशियम - मॅग्नेशियमच्या तातपुरत्या कमतरतेमुळे थकायला लवकर होण, मळमळणे, तसेच muscle cramps चा धोका वाढू शकतो तर क्राॅनीक कमतरतेमुळे रक्तक्षय आणि ओस्टीओपोरोसिसचा धोका वाढतो.
पोटॅशियम - थकवा, muscle cramps कमी करण्यासाठी मदत करतात
Selenium - रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि फ्री रेडिकल चा धोका कमी करण्यास मदत करतात
सोडियम - घामाद्वारे शरीरातील सोडियम चे प्रमाण कमी होते. रक्तातील सोडियम चे प्रमाण कमी होते ज्यामुळे muscle cramps चा धोका वाढतो. 5 तासापेक्षा जास्त व्यायाम केल्यास आणि तो उष्ण हवामानात केल्यास रक्तातील सोडियम ची पातळी खूप कमी होऊ शकते जी जीवनाला घातक ठरू शकते
Zinc - स्नायूंच्या नुतनिकरणासाठी आणि अन्नातील उर्जेचा शरीराला आवश्यक असणाऱ्या उर्जेत रुपांतरीत करण्यासाठी आवश्यक आणि कमतरतेमुळे रोग प्रतिकारक शक्ती कमी होते ज्यामुळे छोटे मोठे आजार होऊ शकतात
भारतीय संस्कृतीत बेल किंवा बिल्ववृक्षाला फार महत्व आहे. प्रत्येक शुभकार्याच्या प्रसंगी पूजनात बिल्व पत्रांचा उपयोग केला जातो. वैज्ञानिक दृष्टीकोन लक्षात घेऊनच ही परंपरा सुरु करण्यात आली.
भावप्रकाश, सुश्रुत साहिंता, भैषज्य रत्नावली आदी आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये बेलाच्या उपयोगाबाबत खूप लिहून ठेवलेले आहे. उष्णताहरक, वात कफ शामक, रेचक, दीपनकारी, हृदयास उपकारक, स्तन्भक, शरीरातील मुत्र व शर्करा कमी करणारा आदी महत्वपूर्ण गुणधर्म असलेला बेल आयुर्वेदाचा महत्वपूर्ण झाड आहे.
दातांची काळजी कशी घ्यावी आणि मौखिक आरोग्य कसे जपावे याचे मार्गदर्शन डॉ. उल्हास वाघ यांनी केले. महान्यूजच्या सौजन्याने ही प्रश्नोत्तरे खास मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी………
माणसाची रोगप्रतिकारक्षमता ही त्याला मिळणारा आहार, प्राणवायू, त्याची झोप आणि व्यायाम यावर अवलंबून असते. पैकी प्राणवायूचा पुरवठा शरीराला जितका अधिक प्रमाणात होईल, तितक्या शरीरातल्या सर्व पेशी ताज्यातवान्या व सुदृढ राहतील.
आपल्या रोजच्या आहारात ब्रेकफास्ट घेणे आवश्यक आहे. प्रयोग ही असेच दाखवतात कि सकाळचा नाश्ता (ब्रेकफास्ट) न घेतल्यास लठ्ठपणा, ह्रदय रोग वाढतोय पण डायबेटिक व्यक्तीच्या आरोग्यावर ही त्याचा परिणाम होऊ शकतो असे ही दिसत आहे. त्यामुळेच ह्यावरच संशोधन होणे गरजेचे आहे. ह्या विषयावर संशोधन करण्यासाठी डॉक्टर Daniela Jakubowwicz आणि त्यांच्या सहकारयांनी "Substantial Impact of Skipping Breakfast on Type 2 diabetics" (नाश्ता न केल्यास टाईप 2 डायबेटीस असलेल्या व्यक्तींच्या आरोग्यावर काय परिणाम होतो) ह्या विषयी अध्यापन केले. ह्या अध्यापनाचे निकष डायबेटिस केअर ह्या नियतकालिके मध्ये प्रसिद्ध केले आहेत. तसेच बोस्टन येथे 2015 मध्ये झालेल्या अमेरिकन डायबेटिस असोसिएशनच्या परिषदेतही ह्याचे सादरीकरण केले होते.
ह्या अध्यापनासाठी टाईप2 डायबेटिस असलेल्या 22 व्यक्तींची निवड करण्यात आली. त्यांचे सरासरी वय 56.9 वर्षे होते आणि बॉडी मास इंडेक्स 28.2 kg/m2 होता. ह्या सहभागी व्यक्तींना 2 दिवससाठी तंतोतंत जुळतील अशाच कॅलरीजचा पण समतोल आहार खाण्यास दिला. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात त्यांना - दूध, ट्यूना नावाचा मासा, पाव (ब्रेड) आणि चाॅकलेट ब्रेकफास्ट बार खाण्यास दिले. दोन्ही दिवसात फक्त एकच फरक केला होता की एक दिवस ह्या व्यक्तींना ब्रेकफास्ट खायला दिला होता आणि दुसर्या दिवशी त्यांना ब्रेकफास्ट खायला दिला नव्हता.
ह्या अध्यापनातून असे आढळले की सहभागी व्यक्ती ज्यांनी ब्रेकफास्ट घेतला नाही त्यांच्या साखरेमध्ये जास्तच वाढ झालेली आढळली. त्यांच्या दोन्ही दिवसाचं साखरेचे प्रमाण खालील प्रमाणे होते.
ह्या वरून असे निदर्शनास येते आहे की जर डायबेटीक व्यक्तींनी ब्रेकफास्ट घेतला नाही तर त्यांच्या पूर्ण दिवसाच्या साखरे वर नियंत्रण राखण्यात ते अपयशी ठरतात. जर डायबेटीक व्यक्तींनी ब्ब्रेकफास्ट न घेतल्यास जेवणात किती स्टार्च घेतला किंवा किती साखर घेतली ह्या गोष्टीचा त्यांचा साखरेच्या नियंत्रणावर काही परिणाम होत असावा असे दिसत नाही असे शास्त्रज्ञांचे मत आहे.
ज्या वेळेस तुम्ही ब्रेकफास्ट करत नाही त्यावेळेस रात्रीचे जेवण आणि दुपारच्या जेवणात बराच मोठा कालावधी गेला असल्याने पॅनक्रीयाटीक बीटा सेल जे इनसुलीन तयार करते त्यांची स्मृती कमी होत असावी असा शास्त्रज्ञांचा कयास आहे आणि त्यामुळेच थोडा कमी आणि जरा उशीराच इनसुलीनचा प्रतिसाद मिळत असावा असे ही शास्त्रज्ञांना वाटते. ह्याचा परिणाम म्हणून दिवसभरातील साखरेवरील नियंत्रण बिघडत असावे.
साखर बिघडण्याचे दुसर कारण म्हणजे दुपारच्या जेवणा पर्यंत उपाशी राहिल्याने रक्तातील फॅटी अॅसिड चे प्रमाण वाढते त्यामुळे रक्तातील साखर कमी करण्यास इनसुलीन कुचकामी ठरते आणि त्यामुळे पण रक्तातील साखर वाढलेली राहाते.
ह्या प्रयोगावरून असंच सिद्ध होते आहे की टाईप 2 डायबेटिस असलेल्या व्यक्तींच्या रक्तातील साखरेवरील नियंत्रण चांगले राहण्यास त्यांनी ब्रेकफास्ट न टाळता दररोज घेणे जरुरीचे आहे.
स्विमिंगसारखा दुसरा व्यायाम नाही. व्यायाम केल्याने शरीर फिट राहते. थकवा दूर झाल्यानंतर आपल्याला ताजेतवाने वाटते. स्विमिंग करताना आपला संपूर्ण शरीराचा व्यायाम होत असतो. त्यामुळे स्विमिंग करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
नायटे निरनिराळ्या प्रकारचे असतात. नेहमी दिसणारा प्रकार म्हणजे अंगावर, जांघेत, कमरेवर दगडफूलासारखा दिसणारा व पसरणारा नायटा. यात त्वचा काळवंडते आणि खूप खाज सुटते. हा आजार बुरशीमुळे होतो. याची मुख्य करणे अस्वच्छता, दमटपणा, पाण्याची टंचाई, एकमेकांचे कपडे वापरणे इ. अनेक घरांमध्ये आंघोळीसाठी आडोसा पुरेसा नसतो. यामुळे कंबरेच्या कपड्याखाली नीट स्वच्छता राहत नाही. याठिकाणी खरुज, नायटा वाढतात. कडा असलेल्या गोलाकार स्वरुपात त्वचेवर उठणारा नायटा हा एक प्रकारच्या बुरशी, आळब्यासारख्या सुक्ष्म शेवाळामुळे होणारा रोग आहे. चामडीच्या कोणत्याही भागावर गोलाकार चट्टे उठतात. पण विशेषतः काखा, जांघा, बोटांच्या मधील भाग इ. नेहमी ओलसर राहणाऱ्या जागांमध्ये याचे प्रमाण जास्त असते.
आपल्याकडे डोक्यामध्ये होणाऱ्या नायटाचे प्रमाण त्यामानाने कमीच आहे. कंबर व जननेन्द्रियाजवळील भागाला सुद्धा नायटा होतो. हे चट्टे गोलाकार असल्यामुळे त्यांना रिंग वर्म म्हणतात. त्यांना कमालीची खाज सुटते. जर हा चट्टा केसात झाला तर केस जावून तेवढया ठिकाणी टक्कल पडते आणि नखांवर झाला ते नखे वर उचलली जाऊन खरखरीत व वाकडी होता.
हा आजार कंबर, पोट, मांड्या, जांघा इ. भागात जास्त करून होतात. खूप खाज सुटते व नायटाची वाढ वेगाने होते. पण कातडीवर बधीरता मात्र नसते. नखे कापावीत.
नायटा झालेला भाग साबण व स्वच्छ पाण्याने रोज धुतला तर हा रोग बरा होतो.
हेक्झाक्लेरोफिन असलेल्या साबणाचा जास्त उपयोग होतो. घामाने भिजलेले सगळे कपडे नेहमी बदलावेत व स्वच्छ धुवून कोरडे असतांना वापरावे. नायटा झालेली जागा नेहमी स्वच्छ ठेवून ती सुर्यप्रकाशात राहील असा प्रयत्न करावा. १ भाग सल्फर व १० भाग तेल यांचे मिश्रण करून नायटा झालेल्या जागी लावावे. बाजारात मिळणारी नायटा, गजकर्ण विरोधी मलमे आणि औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.
डोक्यात खवडे झाले असल्यास बाजारात मिळणारी मलमे आणि औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरावीत. डोक्यातील नायटा पाण्याचा शेक देऊन तेथील केस उपटून वरील औषधांचा उपयोग करावा. नायटा व त्यासारखे चामडीचे बुरशीजन्य इतर विकार सांसर्गिक असल्यामुळे एकाकडून दुसऱ्याला चटकन होतात, ते टाळण्यासाठी पुढील गोष्टी कराव्यात.
नायटा झालेल्या रुग्णाला वेगळे झोपवावे.
एकच फणी व एकमेकांचे कपडे ( स्वच्छ धुऊन वाळविल्याशिवाय) वापरू नयेत.
नायटा झालेल्या रुग्णांवर डॉक्टरांच्या सल्ल्याने लवकरात लवकर उपचार करावेत.
बाह्य उपचारांबरोबरच पोट सुद्धा साफ असणे गरजेचे आहे. त्वचा नेहमी कोरडी राहील याची काळजी घेणे आवश्यक आहे.
- - व्हॉटसऍप वरुन
तूप खाल्ले की जाडी वाढते असा एक समज आपल्याकडे आहे. अतिशय योग्य आहे मात्र कोणते तूप? साजूक तूप कि वनस्पती तूप? दोन्ही तुपातील नेमका फरक समजून घेऊ.
१) वनस्पती तूप: हे तूप कसे तयार करतात याची माहिती अनेकांना नाही. वनस्पती तूप म्हणजे hydrogenated vegetable oil हे कसे तयार करतात? निकेल अथवा प्लँटीनम धातूच्या संपर्कातून हायड्रोजन वायू खाद्य तेलात मिसळतात. (याचा शोध युरोपात लागला आहे हा प्रकार भारतीय नाही.) हे केल्यावर तेल घट्ट होते आणि तुपासारखे दिसते म्हणून त्याला आपण वनस्पती तूप म्हणतो.
२) साजूक तूप गायीच्या अथवा म्हशीच्या दुधापासून दही ताक लोणी तयार करून ते कढवून साजूक तूप तयार केले जाते. बाजारात मिळणारे साजूक तूप हे दुधातून क्रीम वेगळे करून कढवून म्हणजेच त्यातील पाण्याचा अंश काढून टाकून तयार केलेले असते.
जेव्हा आपण वनस्पती तूप खातो तेव्हा प्रत्यक्षात आपण तेल खात असतो. त्यामुळे फ्याट/जाडी वाढते हे नक्की. मात्र जेव्हा साजूक तूप खातो तेव्हा जाडी मुळीच वाढत नाही उलट साजूक तुपामुळे आतड्यांना आवश्यक मऊ पणा येतो. चयापचय क्रिया सुधारते.
एक गोष्ट लक्षात घ्या साजूक तूपाचा शोध आपल्या पूर्वजांनी लावला आहे युरोपियन लोकांनी नाही.
साजूक तुपाचे उपयोग:
१) सर्दी झाली कि नाकात तूप सोडतात. याने नाक मोकळे होते. नाकातील हाड वाढले तर तूप जरूर सोडावे नक्की फायदा होतो.
२) साजूक तूप खाल्ल्याने पोटातील व्रण (अल्सर) बरे होतात.
३) गायीच्या तुपाने पोटातील कॅन्सर बरा व्हायला मदत होते.
४) पोटात आग होत असल्यास साजूक तुपाचा फायदा होतो.
५) सुंठ साखर आणि साजूक तूप खाल्ल्याने जुलाब थांबतात.
६) एक चमचा तूप व दोन चमचे मध अथवा दोन चमचे तूप आणि एक चमचा मध (व्यस्त प्रमाण महत्वाचे) हे अतिशय उत्तम टॉनिक आहे.
७) साजूक तुपाने उष्णतेचे विकार बरे होतात.
८) आतड्यांना वंगण होते. त्यामुळे पोट साफ होते व पाचक रसांची निर्मिती चांगली होते.
९) साजूक तुप खाल्याने नजर सुधारायला उपयोग होतो.
प्रयोग : एक चमचा साजूक तूप व एक चमचा साखर एकत्र करून खावे आणि वरून कपभर कोमट पाणी प्यावे. असे रोज सकाळी शक्यतो अनाशा पोटी व रात्री झोपण्यापूर्वी करावे. हा प्रयोग सलग ७ दिवस करून वजनातील फरक जरूर बघावा.
मधुमेही लोकांनी साजूक तूप नुसते खावे आणि वरून कोमट पाणी प्यावे. मात्र पाण्यात तूप घालून खाण्यापेक्षा वरून कोमट पाणी प्यावे हे उत्तम.
अनुभव:
१) १९६५ साली मला पोटात खूप दुखत होते. अल्सर होता. आईने मला एका वैद्यांकडे नेले. त्यांनी मला दररोज ४ टेबल स्पून साजूक तूप खाण्यास सांगितले. मी १५ दिवस केल्यावर चांगला फरक जाणवला. तेव्हा पासून आजपर्यंत मी रोज ४ टेबल स्पून साजूक तूप नियमितपणे खातो. त्या नंतर मला पोटाचा त्रास कधीही झाला नाही. माझे वजन एकदम नॉर्मल आहे आणि जाडीही वाढली नाही.
२) एक पेशंट माझ्याकडे आल्या. २५ वर्षे अँसिडीटीचा त्रास आहे असे सांगितले त्यांना तूप साखरेचा प्रयोग सांगितला दुसऱ्याच दिवशी त्यांनी चांगला फरक पडल्याचे सांगितले.
३) माझ्या एका मद्रासी मित्राच्या बहिणीला तूप साखरेचा प्रयोग सांगितला. तिला संडासला साफ होत नव्हते. काहीही खाल्ले तरी उलटी व्हायची. अन्नावरची इच्छा उडाली होती. एक महिन्याने तिने मित्राला फोन करून सांगितले कि साजूक तूप हे अमृत आहे. त्याने मला खूप फायदा झाला आता मी सगळे काही खाते.
४) माझ्या मुलाला रात्री अँसिडीटीमुळे झोप येत नसेल तर दोन चमचे नुसतेच साजूक तूप खातो त्यामुळे त्याला शांत झोप लागते.
५) हा प्रयोग आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी केला आहे त्या सर्वांनाच फायदा झाला आहे. कोणाचेही वजन वाढले नाही.
आपल्याला काहीही शंका असल्यास मला जरूर विचाराव्यात.
डॉ.अरविंद जोशी
९४२१९४८८९४
(आरोग्यदूत या WhatsApp ग्रुपमधून साभार)
आयुर्वेदातील ‘सुवर्णप्राशन संस्कार’ हा हिंदुस्थानच्या ‘राष्ट्रीय लसीकरण’ मोहिमेचा भाग व्हायला हवा. आयुर्वेद हे या राष्ट्राचे पर्यायी नव्हे तर प्रमुख वैद्यकशास्त्र आहे. उत्तम रोगप्रतिकारक्षमता निर्माण करण्यासाठी आपल्याला आयुर्वेदाचाच आधार घ्यावा लागेल.
Copyright © 2025 | Marathisrushti