(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • जरा हसून पाहा !

    आपण पाहातो, अनुभवतो की मानसिक ताणतणावामुळे प्रथम मनाचं आणि नंतर शरीराचं आरोग्य धोक्यात येतं. कारण ताणतणाव हे मानसिक अनारोग्याचं लक्षण आहे. एकदा अंतरंगातच बिघाड झाला तर त्याचे विपरीत परिणाम शरीरावर दिसायला कितीसा वेळ लागणार?

    मग या ताणतणावाच्या अगदी विरुद्ध क्रिया केली तर? आपलंच शरीर आणि मन. त्यात दोन वेगवेगळ्या भावनांच्या प्रभावाने जर दोन वेगळे परिणाम मिळणार असतील तर?

    आपणच आपले डॉक्टर व्हायला काय हरकत आहे?

    ताणतणावामुळे जर सगळंच बिघडत असेल तर जरा हसून पाहा काय होतं ते !

  • नखांची स्वच्छता

    निरोगी आरोग्यासाठी शरीराच्या स्वच्छतेसोबत हातांची आणि हातासोबत नखांची विशेष स्वच्छता करणे गरजेचे आहे. नखांमध्ये साचणार्‍या घाणीमुळे अनेक आजार होऊ शकतात. नखातील मळ अन्नपदार्थाच्याद्वारे आपल्या शरीरात जाऊन त्याचे आपल्याला अपाय होतात. यासाठी नखे नियमित स्वच्छ करावीत. नखांची अवाजवी वाढ ही आज-काल फॅशन मानली जात असली तरी ती आरोग्यासाठी धोकादायक आहे. यासाठी वाढलेली नखे लगेचच काढावीत. हात धुताना नखांची चांगली स्वच्छता करावी. जेवण्यापूर्वी किंवा कोणताही खाद्यपदार्थ हातात घेण्यापूर्वी हात नखांपासून स्वच्छ धुवावेत. नखंवर कोणतेही पॉलिशिंग रंग, चकमक आदी आर्टिफिशल्स शक्यतो वापरू नयेत. पोटाचे व आतड्याचे आजार इन्फेक्शन आदींपासून बचाव होतो.

  • मक्याच्या कणसाचे औषधी उपयोग

    १. मक्याचं कणीस खाल्यामुळे दात मजबूत होतात. त्यामुळे लहान मुलांना देखील मका खाऊ घाला.

    २. मक्याचे दाणे पूर्ण खाऊन झाल्यानंतर ते टाकून देऊ नका. मक्याच्या कणसाचे दोन तुकडे करा आणि मधल्या भागाचा नाकाद्वारे सुंगध घ्या. यामुळे सर्दी कमी होते.

    ३. मक्याचं कणीस खाऊन झाल्यानंतर त्याला वाळवून ठेवा आणि त्यानंतर त्याला जाळून त्याची राख गरम पाण्यात टाकून वाफ घेतल्याने कफचा त्रास कमी होऊ शकतो.

    ४. आयुर्वेदात मक्याचं कणीस तृप्तीदायक, वातकारक, कफ, पित्तनाशक, मधूर असल्याचं म्हटलं आहे. भाजलेले कणीस हे कॅरोटीनायड विटामिन-एचं एक उत्तम स्रोत आहे.

    ५. भाजलेल्या कणीसपासून 50 टक्के अँटी-ऑक्सीडेंट्स वाढतं. कँसरवर देखील हे लाभदायक आहे.

  • त्वचेची स्वच्छता

    आपली त्वचा ही अत्यंत नाजूक असते. त्यामुळे त्वचेची निगा राखण्याची नितांत गरज आहे. केवळ त्वचा स्वच्छ राखण्यामुळेही आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. सध्या अनेक कारणांमुळे त्वचारोगांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.

    बाहेरून आल्यावर लगेचच हात-पाय, चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावे. शक्य असल्यास साबणही वापरावा.

    त्वचेसाठी साबण निवडताना विशेष काळजी घ्यावी. आज-काल बाजारात साबणाचे शेकडो नमुने मिळतात. पण चांगल्या दर्जाचा साबण न वापरल्यास त्वचेचे आजार होऊ शकतात. यासाठी मान्यताप्राप्त, सौम्य आणि त्वचेचे रक्षण करणारा साबणच वापरावा. आयुर्वेदिक किंवा षर्बलच्या नावाखाली आजकाल काहीही विकले जाते. त्यांच्या मागे लागू नये. बाजारात दर महिन्याला नवे-नवे साबण येत असतात. गरज नसल्यास आपला साबण बदलू नये. आपल्या त्वचेला मानवणाराच साबण वापरावा.

    त्वचा स्वच्छ व कोरड्या कपड्याने हळूवार पुसून कोरडी करावी. यामुळे पुळ्या, पुरळ, घामोळे, खाज येणे आदी त्वचेच्या आजारांपासून आपली त्वचा सुरक्षित राहू शकते.

    सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण जो टॉवेल वापरतो तो शक्यतो इतरांबरोबर शेअर करु नये. आपला टॉवेल आपल्यासाठीच ठेवावा. घरातील प्रत्येक माणसासाठी दोन टॉवेल असल्यास उत्तम. पाहुणे मंडळींसाठीही वेगळे टॉवेल ठेवावेत.

    स्त्रियांनी कपडे-भांडी धुण्यासाठी वापरायचे साबण शक्यतो चांगल्या प्रतीचेच घ्यावेत. जास्त सोडा असलेला कमी प्रतीचा साबण त्वचेला घातक.

    -- पूजा प्रधान

  • पिताम / दादड येणे

    अंगावर गांधी (दादड) उठून, अत्यंत त्रास देणाऱ्या अश्या “पिताम” बद्दल आज पाहुया. ह्या पिताम/दादड सोबत खाज येत असेल तर त्याला उदर्द, कोठ असे म्हणतात तर वेदना जास्त असल्यास आयुर्वेदात शीतपित्त असे नाव आहे. आधुनिक शास्त्रानुसार त्यास Urticaria म्हणतात.

    लहानांपासून थोरांपर्यंत सर्वास हा रोग जडू शकतो, ह्या रोगात अंगावर अचानक गांधी (दादड) उठतात व अंगास खाज सुटते. खाजवून रुग्ण अगदी हैराण होऊन जातो. दादड आलेल्या ठिकाणची त्वचा लालसर होते व स्पर्शास उष्ण भासते. काही वेळानंतर आपोआप लक्षणे कमी होतात.

    कारणे

    अति आंबट, तिखट पदार्थ, तळलेले पदार्थांनी शीतपित्त होऊ शकते. दर रविवारी मजा म्हणून १-२ प्लेट पाणीपुरी, व दररोज नाश्त्याला मिरची-वडे खाणार्यांनी हे लक्षात ठेवावे. शेगदाणे, मश्रूम खाल्ल्यानेसुद्धा काही व्यक्तींना वरील लक्षणे दिसतात. ऋतुमानाप्रमाणे विचार करता हा त्रास पावसाळ्यात व पावसाळ्याअंती जास्त उद्भवतो.

    दुचाकीने जास्त प्रवास करणारे, सतत थंड हवेशी संपर्क येणाऱ्या व्यक्तीला सुद्धा हा त्रास होऊ शकतो. लहान मुलांमध्ये कृमी झाल्यास पिताम येऊ शकते.
    आपले शरीर हे एवढे हुशार असते कि कोणताही अनावश्यक / विषारी घटक पोटात गेला असता किंवा तयार झाला असता तो उल्टीमार्गे बाहेर फेकण्याचा प्रयत्न करते. आपण मात्र उल्टी आल्यास लगेच घाबरून उल्टी थांबविणारी औषधे घेतो. पण असे केल्याने विषारी घटक शरीरातच राहून पिताम उत्पन्न करू शकतात.

    उपद्रव
    पिताम व ताप येणे असे काही रुग्णामध्ये दिसते. आधी ताप यावा व ताप जाताच पर्ण अंगावर पिताम यावी, असे आलटून पालटून होत राहते.

    उपचार
    शीतपित्त होताच त्यावर थंड पाणी लावणे, बर्फ लावणे असे उपचार केले जातात. याने तात्पुरते बरे वाटले तरी अश्या शीत उपचारांनी त्रास वाढतो.. पिताम आलेल्या जागी मोहरीचे तेल लावून त्यावर गरम पाणी ओतल्यास लगेच आराम मिळतो. (भर दुपारी, उन्हाळ्यात, मासिक पाळी चालू असताना वलहानमुलांवर हा प्रयोग करू नये ). खाण्याचा सोडा व पाणी मिसळून त्याचे द्रावण तयार करून ते लावल्यास दादड बसून लगेच खाज कमी होते. झेंडूच्या पानाचा रस, आमसुलाचे पाणी अंगास चोळल्याने त्रास कमी होतो. पिताम येण्याची सवय असलेल्यांनी अडूळश्याची पाने टाकून पाणी उकळावे व त्याने आंघोळ करावी.
    आहारात एखादा कडू पदार्थ.असावा . जेवणानंतर सोलकढी प्यावी किंवा आमसूल चघळून खावे. दही, चिंच, टोमेटो, उडीदाचे पदार्थ, मैद्याचे पदार्थ, ब्रेड टाळावे. दुधासोबत खरी बिस्कीट, चपाती, फळे अजिबात घेऊ नयेत. मिल्क शेक/ फ्रुट सलाड ह्यांपासून लांबच राहावे. हा रोग साधा दिसत असला तरी अत्यंत चिवट असतो. आहारातील किंवा हवामानातील पोषक कारण मिळाल्यास लगेच डोके वर काढतो. आयुर्वेदातील औषधी व योग्य आहार ह्या चिवट रोगावर उत्तम प्रभाव दाखवितात, यासोबतच रुग्णाची प्रकृती,वय पाहून पंचकर्मातील वमन, विरेचन, रक्तमोक्षण करून घेतल्यास हा रोग पुन्हा पुन्हा होत नाही.

    #रहस्यस्वास्थ्याचे

    -- वैद्य आदित्य मो. बर्वे
    BAMS, DpK , PGDHHM, B.A(संस्कृत)
    8888597293

    (आरोग्यदूत या WhatsApp ग्रुपमधून साभार)

  • अद्यावत तंत्रज्ञानाचे विनाशकारी दुष्परिणाम

    एटीएम मधून डेंग्यू आणि मलेरियाचे लार्व्हा नोटांसोबत बाहेर येत असल्याचे, भारताच्या राजधानी दिल्ली व परिसरातील झालेल्या सर्वेक्षणात सिध्द झाले आहे.दिल्ली व परिसरात “राष्ट्रीय संक्रामक रोग नियंत्रण विभागाने” ५०० एटीएम यंत्रांचे सर्व्हेक्षण केल्यानंतर हे धक्कादायक सत्य उघडकीस आले.

  • श्रावणमास आणि उपवास

    श्रावणात जलधारा बरसत असताना सूर्य नारायण मात्र ढगांच्या आड रुसून बसतो. बाहेर ही अवस्था तर शरीरातील सूर्य नारायण म्हणजेच उदरस्थ पाचकाग्नी ही थोडा मंदच असतो, तो जड पदार्थ पचवण्यास समर्थ नसतो आणि तरीही असा आहार घडलाच तर मात्र अजीर्ण,अतिसार,ताप याला पर्याय नाही. जवळपास सर्वच जण याचा अनुभव घेतात.(म्हणूनच वैद्य वर्गात या महिन्यास सिझन असं म्हणतात. ) या मुळेच एका दगडात दोन पक्षी मारावेत तसे आध्यात्म व आरोग्य दोन्ही सांभाळायला उपवासाची परंपरा वर्षांनुवर्षे चालत आली आहे.

    या काळात पाचकाग्नी ला विश्रांती ची गरज असते,पण आपण खरंच ती अपेक्षित विश्रांती देतो का? की कामात बदल म्हणजे विश्रांती तसं खाण्यात बदल म्हणजे उपवास असं करतो? त्या दिवशीची खिचडी,साबुदाण्याचे वडे असे पदार्थ आठवले की याचे उत्तर मिळेल. मग अशा पदार्था ऐवजी गरम पाणी, एखादे फळ खाऊन केलेला उपवास निश्चितच लाभदायक.

    दिवसभराच्या उपवासाचं जाऊदे पण उपवास सोडताना तर श्रीखंड, पुरी,जिलेबी सारखे पदार्थ तर आपण घेतोच आणि ते सुद्धा दिवसभराचा उपवास भरून निघेल असं भरपेट. हे म्हणजे 2-3 महिने विश्रांती घेतलेल्या खेळाडूस थेट ऑलिंपिक च्या मैदानावर उतरवल्या सारखे. ज्याप्रमाणे असा खेळाडू मोठे आव्हान पेलू शकत नाही तसाच दिवसभर विश्रांतीने थोडा मंदावलेला अग्नी ही पंच- पक्वान्नानी सजलेला जड आहार पचवू शकत नाही. याबद्दल चुलीचं उदाहरण बघू. चुलीमधे बराचवेळ काही सरपण घातलं नाही तर आग विझते, मग पुन्हा पेटवताना आपण कागदाचे कपटे, काटक्या वगैरे टाकून आग पेटवतो व मग मोठ-मोठी लाकडे टाकली तरी ती सहज स्वाहा होतात. तसचं उपवास सोडतानाही मंदाग्नीचा विचार करून हलके, ताजे जेवण (उदा. गरम भात, तूप, वरण ) असा आहार घेतल्यास आहार पचतो, पाचकाग्नी वाढतो व आपण दुसर्‍या दिवसांपासून जो काही आहार घेऊ तो पचवण्यास सक्षम ही होतो.जर उपवासा मागची ही आयुर्वेदिक अग्नी संकल्पना समजून घेऊन उपवास केला तर आध्यात्म व आरोग्य दोन्ही ही हेतू साध्य होतील व आनंदाने म्हणता येईल

    - "श्रावणमासी हर्ष मानसी,
    हिरवळ दाटे चोहिकडे॥
    क्षणात येई सरसर शिरवे,
    क्षणात फिरूनी उन पडे ॥

    -- वैद्य प्रसाद सणगर,
    कोल्हापूर

    (आरोग्यदूत या WhatsApp ग्रुपमधून साभार)

  • कॅन्सर न्यूज – कॅन्सर व कॅनबीज् : मराठी-१६०८१३

    बातमी : कॅनबीज् (Cannabies)
    संदर्भ : CNN, USA वरील १२ ऑगस्ट २०१६ ची बातमी.

    • बातमी अशी आहे –
    ‘Canada allows patients to grow own canabies’.
    • तुम्ही स्वत: कॅन्सर पेशंट अथवा केअर-गिव्हर असल्याशिवाय, आणि त्याचबरोबर तुम्हाला Alternate medicine बद्दल कांहीं माहिती असल्याशिवाय, या बातमीचें महत्व ध्यानात येणार नाहीं.
    • ( आणखीही कांहीं व्याधींसाठी कॅनबीज् चा उपयोग होतो. तें आपण पुढे पाहूं ).
    • कॅन्सरसाठी केमोथेरापी, रेसिएशन थेरापी यांचें नांव आपण ऐकलेलें असतें, पण आल्टनेटिव्ह थेरापीज् बद्दल आपल्याला फार माहिती नसते. Allopathy च्या व्यतिरिक्त ज्या ज्या अन्य थेरापीज् आहेत, त्या AlternateTherapies म्हटल्या जातात. या Head खाली बर्‍याच वेगवेगळ्या थेरापीज् येतात.
    • आज आपण allopathy साठी मुख्यत्वें अमेरिकेकडे (USA) पाहतो. पण, दुर्दैवानें अमेरिकेत alterantive therapies ना quakary असें म्हणण्याची पद्धत गेली बरीच दशकें रूढ झालेली आहे. ( त्यापूर्वी तसें नव्हतें). हल्ली हल्ली तिथेंही आतां alternative therapy साठी अधिकृत संस्था निर्माण होऊं लागल्या आहेत. पण, they have a far way to go.
    • अशा बर्‍याच alternative therapies आहेत, पण त्यांचे प्रॅक्टिशनर्स अमेरिकेत hound केले गेले, व त्यांनी मेक्सिको, बहामाज् असा देशांमधे आपली क्लिनिक्स् सुरूं केली.
    • हा विषय फार मोठा आहे. त्याबद्दल नंतर केव्हांतरी.
    • कॅनबीज् चा वापर हा असाच alternate therapy चा प्रकार आहे. cannabies चा संबंध आहे marujuana शी. तें तर एक नारकॉटिक ड्रग आहे. त्यामुळे, कॅनबीज् म्हटलें की लोक घाबरतात. मात्र, कॅनबीज् जर अल्प प्रमाणात, व expertct च्या मार्गदर्शनाप्रमाणें सेवन केल्या, तर त्यांचा कॅनरसाठी उपयोग होऊं शकतो, असें म्हणतात.
    • पार्किन्सन्स साठी सुद्धा कॅनबीज् उपयुक्त आहेत, असें म्हणतात.
    • USA मधील कांहीं स्टेटस् मधें (जसें की, कोलोराडो) कॅनबीज् कांहीं-अल्प प्रमाणात medicinal use साठी मिळतात.
    • अणि, आतां कॅनडानें तर अशा वापरासाठी कॅनबीज् घरीं उगवायची परवानगी दिलेली आहे. Alternative therapy द्वारें असाध्य रोग बरा करण्यात, या सुधारणेचा नक्कीच उपतोग होईल.
    • भारतात, आपण allopathgy व्यतिरिक्त बर्‍याच थेरापी वापरतो, जसें की आयुर्वेद, होमियोपॅथी, यूनानी, तिबेटियन (जें आयुर्वेद व चिनी मेडेसिनचें मिश्रण आहे), नेचरोपॅथी,
    न्यूट्रिशन, सिद्ध-मेडिसिन. योगाचाही उपयोग आपण कांहीं व्याधींच्या निवारणार्थ करतो .
    आतां तर भारतानें ‘आयुष’ मंत्रालय स्थापून या थेरापीज् ना चालना दिलेली आहे.
    • पण, अजूनही, कॅनबीज् सारख्या गोष्टी इथें सहजासहजी मिळत नाहीत.
    • मी माझ्या पत्नीच्या कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी कॅनबीज् च्या शोधात होतो. (केमोथेरापी व रेडिएशन थेरापीची उपयुक्तता संपलेली होती, व एका अन्य थेरापीसाठी पेशंटच्या अंगात पुरेसी शक्ती नसल्यानें ती सुरूं करतां आली नाहीं ).
    • बराच शोध घेतल्यावर मी कॅनबीज् च्या सोर्सबद्दल माहिती मिळवूं शकलो. पण, त्यांचा ‘डोस’ सुरूं करण्यापूर्वीच पेशंटचें निधन झाले. मात्र त्यावेळी माझ्या एका फॅमिली-मेंबरची एका तरुण कॅन्सर पेशंटशी भेट झाली, जिला breast-cancer झालेला होया व जी कॅनबीज् चा डोस घेत होती. तिच्या म्हणण्याप्रमानें, तिची तोपर्यंत ६०% improvement झालेली होती.
    • या पार्श्वभूमीवर, कॅनडामधे कां होईना, पण पेशंटला घरीं कॅनबीज् उगवायची परवानगी मिळालेली आहे, ही चांगली गोष्ट आहे. पुढेमागे भारतातही असा कांहीं, पेशंटस् च्या फायद्याचा कायदा येईल अशी आशा करायला हरकत नाहीं.
    • मात्र, कुणा पेशंटला कॅनबीज् चा वापर करून पहायाचा असल्यास, त्यानें / तिनें ( व / किंवा केअरगिव्हरनें ) स्वत: या विषयाचा अभ्यास करून मगच त्याबद्दल निर्णय घ्याचा, असें माझें सांगणें आहे.
    -- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
    सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
    Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
    eMail : vistainfin@yahoo.co.in
    Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

    ---------------------------------------------------------------------------
    Disclaimer
    Regarding Cancer- & Health-related News presented by Subhash S. Naik

    Mr. Subhash S. Naik is not a physician. He has been a caregiver to his wife who was a cancer-patient, and who expired some time ago. Subhash S. Naik is merely collecting News & Information about Cancer-related & other relevant health-related matters from Print sources and /or electronic and / or other sources , and he is presenting it to the reader(s) with a belief that this collected information does not bear anybody’s copyright. In presenting this information, Subhash S. Naik is not expressing any personal opinion towards it. The readers should evaluate all the information themselves, and consult a physician &/ or any other expert as they deem necessary , and at their own responsibility, before putting this information to use.
    -----------------------------------------------------------------------------

  • देशी गायीवर अर्थव्यवस्था असणारे गाव

    देशी गाई भरपूर होत्या, त्या वेळी गोमूत्र व शेणाचे महत्त्व कोणाला नव्हते; पण आता गाई कमी झाल्या आणि गोमूत्राचे महत्त्व कळले. त्यामुळे चक्क देशी गाईंच्या गोमुत्राची डेअरी सुरू करावी लागली आहे. किटलीतून डेअरीत दूध घालायला यावे, तशा पद्धतीने किटलीतूनच गोमूत्र दररोज जमा केले जात आहे.

    रामणवाडी (ता. राधानगरी, जिल्हा कोल्हापूर) या गावात ८० देशी गाई आहेत. त्या गावाने डेअरी सुरू केली आहे. आठ रुपये प्रतिलिटर दराने गोमुत्राची खरेदी केली जात आहे. या गोमुत्राचा औषधी अर्क व आयुर्वेद साबणांसाठी वापर होत आहे.

    गोमुत्रातील औषधी ताकद आता वैज्ञानिक पातळींवरही स्पष्ट झाल्याने गोमुत्राचा औषधी कारणासाठी वापर वाढला आहे. रोगांचे मुळातूनच उच्चाटन करण्याची ताकद गोमुत्रात असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जाते. त्याचा प्रत्ययही आल्याने गोमुत्राला "डिमांड‘ आहे.

    आयुर्वेदिक साबण व इतर औषधे तयार करण्यासाठी कोल्हापुरातून हरिद्वारला गोमूत्र पाठविले जाते.

    येथील वेणुमाधुरी ट्रस्टने गाईंच्या संवर्धनासाठी प्रयोग सुरू केले आहेत. प्रायोगिक तत्त्वावर गाईंच्या पालनाची सामुदायिक ताकद दिसावी, यासाठी रामणवाडी गावात सत्तर ते ऐशी गाई गावकऱ्यांच्या साहाय्याने पाळल्या.
    गाईंचे दूध हे उत्पन्नाचे साधन झालेच; शिवाय या गाईंपासून झालेल्या पाड्याची वाढ करून त्याच्या ताकदीवर त्यांनी गावात तेलघाणा सुरू केला. बैलांनी ओढलेल्या घाण्यातील तेल वापरणारी काही कुटुंबे आहेत.

    यंत्राच्या माध्यमातून तयार झालेल्या तेलातील घटकात व बैलाच्या घाण्यातील तेलाच्या घटकात फरक असल्याने या तेलालाही मागणी आहे.

    गोमूत्र पूर्वीपासून औषधी सामर्थ्य असलेला घटक आहे; *पण त्याचे महत्त्व फार कोणी जाणून घेत नव्हते.

    देश- विदेशातील शोधप्रबंध, इंटरनेटवरील माहिती चर्चेत येऊ लागली; तेव्हा गोमुत्राचे महत्त्व अधिक ठळकपणे जाणवू लागले. तोपर्यंत गाईंची संख्या कमी होत गेली. *गाय म्हणजे दूध आणि दूध द्यायची बंद झाली, की तिची रवानगी कत्तलखान्याकडे, हे ठरून गेले होते. आता मात्र *रामणवाडी गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने गाई पाळून त्यांचे विविध अंगांनी असलेले महत्त्व ठळकपणे सर्वांसमोर आणले आहे.

    सकाळी पहिल्या धारेचे गोमूत्र गावकरी धरतात. एका घरात असलेल्या डेअरीत आठ रुपये लिटर दराने घालतात. रोज एक गाय साधारण गोमुत्राच्या माध्यमातून ११ ते १२ रुपये मिळवून देते. मात्र या गोमुत्रातून पुढे अमूल्य असे औषध तयार होते.

    देशी गाईचे वाळलेले शेण रानगोवरी या नावाने सहा रुपये किलो दराने विकत घेतले जाते. अनेक धार्मिक विधी व जंतुनाशक धुरासाठी दोन रुपयाला एक छोटा तुकडा, या दराने ही रानगोवरी विकली जाते. गाईच्या वाळलेल्या शेणाच्या तुकड्यावर एक चमचा गाईचे तूप, तांदळाचे काही दाणे टाकून ते पेटवल्यास होणाऱ्या धुरातून अनेक हानिकारक जंतू नाहीसे होतात, असा दावा केला जातो. (हीच पद्धति 'अग्निहोत्रात वापरली जाते).

    या पार्श्‍वभूमीवर गोमुत्राची डेअरी उपक्रम पहिल्या टप्प्यात चांगलाच यशस्वी झाला आहे.

    वेणुमाधुरी ट्रस्टचे राहुल देशपांडे व रामणवाडी येथील युवराज पाटील, मारुती पाटील, दत्ता पाटील यांनी यात पुढाकार घेतला आहे. एका नव्या प्रयोगाची ही सुरवात आहे. ज्यांच्याकडे गाय आहे, त्यांनी गोमूत्र विकायचे राहू दे; पण वैयक्तिक जीवनात गोमुत्राचा वेगवेगळ्या अंगांनी वापर केला, तरी ते खूप मोलाचे ठरणार आहे, असा वेणुमाधुरीचा दावा आहे.

    गोमूत्र, गाईचे शेण याची वैज्ञानिक आधारावर संपूर्ण माहिती राहुल देशपांडे (9372208108) यांच्याकडे मोफत उपलब्ध आहे.

    वाढती मागणी

    सध्या 'गोधन' या गाईच्या विविध घटकांवर आधारित औषध दुकानातून ...

    एक लिटर अर्क केलेले गोमूत्र १२५ रुपयांना,
    २०० मिली गोमूत्र ३५ रुपयांना व
    पूजा विधीसाठी छोट्या बाटलीतून १० मिली गोमूत्र १० रुपयांना विकले जाते.

    पिकावरील कीड घालवण्यासाठी गोमुत्राला मागणी वाढली आहे.

    देशी गाईच्या गोमुत्राचे औषधी उपयोग खूप मोठे आहेत.

    गाय, दुधाला कमी झाल्यावर, मारून टाकण्या पेक्षा गोमुत्र आणि तिच्या शेणापासून मौल्यवान शेणखत, तसेच त्यातून मिथेन हा gas तयार करण्याचे यंत्र सुद्धा तयार झाले आहे. शेतकऱ्यांनी चांगल्या गोष्टी शिकून गोमुत्राचा अधिकाधिक वापर करणे अत्यंत आवश्यक आहे.

    आज मनुष्य अनैतिक कामात नको तिथे तोंड घालतो, काहीही घाण खातो. पण आज त्याला गोमूत्र पिण्याची लाज वाटते.

    देशी गायीच्या गोमुत्राने कैंसर बरा होतो. गाईचा स्पर्श नकोसा वाटतो. ज्या लोकाना रक्तदाबाचा त्रास आहे.त्यानी देशी गायीच्या पाठीवर व शिंडापासुन शेपटापर्यंत पाच मिनिट हात फिरविल्यास रक्तदाबाचा त्रास दुर होतो. गाईचे शेणही औषधी आहे.देशी गायीचे शेण विषशोषक आहे. शेण रेडिएशन शोषते.

    पण आज आपला दरिद्रीपणा असा कि आपल्या देशी गाई कत्तलखान्यात कापल्या जात आहेत. तिच्या मांसावर आपण पैशासारखी क्षुल्लक गोष्ट मिळवत आहोत.

    जसे आपण आपल्या पोराबाळांचा सांभाळ करतो तसेच गाईंचा सांभाळ करावे.

    पैशाने श्रीमंत होण्यापेक्षा देशी गाईचे दुध पिउन अतिबुद्धिमान, बलवान, चपळ आणि प्रेमळ व्हावे.

  • सनसेट अपियरन्स

    डॉक्टर जेनर जोसेफ हे प्रसिद्ध बालरोग तज्ञ व शास्त्रज्ञ होते. निसर्ग प्रेमी होते. त्यांनी आपले घर समुद्र किनाऱ्यावर बांधले होते. रोज सूर्यास्त समयी ग्यालरीत बसून समुद्राच्या पैलतीरी आकाशातून मावळनाऱ्या सूर्याला बघताना त्यांना खूप आनंद वाटत असे.
    एकदा त्यांच्या क्लिनिकमध्ये दोन तीन महिन्याच्या बालकाला आणले गेले. मुलाचे डोके खुपच मोठे होते. कपाळ भव्य, परंतु नाक तोंड डोळे त्यामानाने लहान होते. जन्मत: हा दोष त्या मुलामध्ये असल्याचे त्यांना कळले. त्यांचे ज्ञान व शोधक बुद्धी त्यांना शांत बसू देईना. त्याकाळी वैद्यकीय शास्त्र फार प्रगत नव्हते. आधुनिक उपकरणे, यंत्रे उपलब्ध नव्हती. विचार आणि तर्क ह्यावर जास्त भरवसा होता. ते त्या बालकावर त्याच्या रोगाची काय कारणे असतील, ह्यावर प्रत्येक अंगाने टिपणी करू लागले. आपला बराचसा वेळ ते त्या बालक व त्याच्या रोगावर केंद्रित करू लागले.

    त्या बालकाच्या मेंदू व मेंदूच्या सभोवताली असलेल्या द्रवाचे ( cerebro spinal fluid ) प्रमाण त्या रोगांत बरेच वाढलेले त्यांच्या लक्षात आले. त्याचबरोबर त्या द्रवाने मेंदूवर व इतर अवयवावर एक दाब निर्माण केलेला त्यांना कळले. त्यांनी त्या विकाराचे नांव Hydro Cephalus असे ठेवले. अशाच केसेसवर ते लक्ष केंद्रित करू लागले. त्यावरचे आजही मान्यता पावलेले उपचार त्यांनी सुचविले होते.

    ह्याच Hydro -Cephalus विषयांत एक गमतीदार निरीक्षण त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्या बालकाच्या डोळ्याचे खूप बारकाईने पाहणी केली. जेंव्हा कोणतेही मूल आपले डोळे पूर्ण उघडते, म्हणजे डोळ्याच्या पापण्या उघडलेल्या असतात, डोळ्याचा मध्य काळा भाग, ज्याला Cornia म्हणतात व सभोवताली पांढरा भाग ज्याला Sclera म्हणतात तो दिसतो. काळा भाग गोलाकार असून मध्यभागी असतो व इतर भाग पांढरा असतो. ह्या विकारांत मधला भाग काळा असलेला अर्ध गोलाकार असा दिसतो. ह्याचे कारण मेंदूतील वाढलेल्या द्रवाचा दाब हा डोळ्याच्या बुबुळावर पडून ती पुढे सरकतात. फिरली जातात. आणि ती काळी टिकी Cornia अर्ध गोलाकार बनत तशी दिसू लागते. त्यांनी त्यांच्या निरीक्षणाला मावळत्या सूर्याची उपमा दिली. The Cornia and slera around look like Sun -Set Appearance असे त्यांनी त्याचे प्रथम वर्णन नोंदविले.

    तेंव्हा पासूनच अशा विकारामधली डोळ्यामध्ये होणाऱ्या बदलला कायमचे Sun -Set Appearence हेच नांव पडले.

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com