(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • हेलन… नृत्य हेच तिचे व्यक्तीमत्व

    ओ हसिना जुल्फोवाली जाने जहा… शम्मी कपूर संगीतकार राहुल देव बर्मनच्या युथफुल ट्यूनवर मोहम्मद रफीच्या आवाजाला नेमके पकडत अंगाला जमतील तितके आळोखे पिळोखे देत बेभान नाचतोय (त्याची ती स्टाईलच आहे) आणि अशातच… ओ अंजाना धुंडती वो परवाना धूंडती हू असे आशा भोसले यांच्या मादक आवाजाचा नेमका सूर पकडून हेलन गाण्यात एन्ट्री करते आणि संपूर्ण पडदाभर नृत्याचा वेगळा आविष्कार दिसतो. हा जणू एक प्रकारचा नृत्याचा सामना.

      January 28, 2024


  • छत्रपती शिवाजी महाराज

    आदरणीय गुरुजन वर्ग आणि विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो , आज मी जगाचा इतिहास बदलवणा-या श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी माझे विचार मांडणार आहे.

    १९ फेब्रुवारी १६३० रोजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला आणि ३ एप्रिल १६८० रोजी त्यांचा मृत्यू रायगडावर झाला. आजवर अनेक राजे होऊन गेले परंतु पन्नास वर्षांचे आयुष्य लाभलेला हा राजा इतिहासात अमर झाला. शहाजीराजे आणि जिजबाइन्च्या या पुत्राने चालणे पिचलेल्या महाराष्ट्राला स्वत:चे राज्स्वराज्य दिले. याच मराठी राज्याने पुढे १८१८ पर्यंत जवळजवळ पुर्ण भारतावर अंमल चालवला.

    लहानग्या निजामाला मांडीवर घेऊन शहाजीराजांनी अहमदनगरच्या निजामशाहीचा कारभार पहिला. अल्पकालाच्या या अनुभावाने त्यांनी स्वराज्याचे स्वप्न पहिले. हे स्वप्ना पूर्ण केले ते शिवरायांनी. लहान असताना महाराजांनी जिजाऊ मासाहेबांच्या तोंडून रामायण- महाभारतातील अनेक कथा ऐकल्या. त्यांच्यावर संस्कार झाले ते शूर, निधड्या, कर्तव्यदक्ष राजांचे. यातून घडलेल्या महाराजांनी मग रांगड्या मावळ्यांचे सैन्य बांधून आधी आदिलशाही, मग मोगल सत्तेचा पराभव केला व साकार झाले स्वराज्य.

    अफजलखानाचा प्रतापगडाच्या पायथ्याशी केलेला वध, सिद्दी जौहरच्या पन्हाळा किल्ल्याच्या वेढ्यातून सुटका, साहिहीस्तेखानाची लाल महालात छाटलेली बोटे, आग्र्याहून सुटका, सुरतेची लुट किती तरी घटना महाराजांच्या कुशल युद्धानितीची साक्ष आहेत.

    महाराजांनी कुणावरही अन्याय होऊ दिला नाही. त्यांनी दिलेल्या आज्ञापत्रातील सुचना आजही पाळल्या पाहिजेत. यात त्यांनी प्रजेवर अन्याय करण्यास, झाडे तोडण्यास ,मनाई केली आहे.

    महाराजांनी बांधलेले स्वराज्य इतके मजबूत होते कि त्यांच्या मृत्युनंतरही मराठे सत्तावीस वर्षे मोगलांशी लढतच राहिले. महाराजांनी घडवलेले हे सैन्य भारतभर दिग्विजय करत फिरले. इंग्रज, पोर्तुगीज, हब्शी यांना समुद्रावरच रोखून धरण्याकारीता महाराजांनी आरमार उभे केले. असे सर्व बाजूंनी संरक्षित केलेले मराठी स्वराज्य मग खूप मोठे झाले. महाराजांच्या त्या प्रेरणादायी आठवणींनी आजही महाराष्ट्राला स्फूर्ती मिळते.

    धन्यवाद.

    जय शिवाजी जय भवानी.

    ---------------------------------------------------------------------------------------------------

    देवव्रत राजेंद्र चौरे, ५वी अ १, महात्मा स्कूल ऑफ अकॅडेमिक्स अंड स्पोर्ट्स, न्यू पनवेल.

      February 19, 2015


  • स्तनपान – भाग २

    नवजात बालकाला पहिल्या १/२ ते १ तासांत स्तनपान करावे. पहिल्या ७२ तासांत येणारे दूध-चीक (कोलोस्ट्रम) हे घट्ट, चिकट व पिवळसर असते. सुरुवातीचे ३० ते ९० मि.मि. दूध नवजात बाळाला पुरेसे असते. यामध्ये प्रथिने आणि ‘अ’ व ‘के’ जीवनसत्त्व अधिक प्रमाणात असतात. जन्मतःच कमी प्रतिकारशक्ती असलेल्या बालकाला यातून प्रतिकारशक्ती मिळते. त्यातील ‘इम्युन्योग्लोबिन्स’ बाळाच्या आतड्याच्या अंतःत्वचेवर पसरतात. त्यामुळे स्वतःची प्रतिकारशक्ती निर्माण होईपर्यंत बाळाचे रोगांपासून संरक्षण होते.

      April 19, 2023


  • सामाजिक शिष्टाचार – फोनवर बोलण्याचे शिष्टाचार

    फोन आणि मोबाईल यांचा वापर कार्यालयात किंवा सार्वजनिक ठिकाणी करतानाही काही भान बाळगायला पाहिजे. कसे ते बघूया…

      October 20, 2018


  • इतिहासातील भविष्यवाटा

    लेखिका इतिहासाच्या शिक्षिका असून शिवकालीन इतिहासाच्या अभ्यासक, गडदुर्गांच्या मार्गदर्शक आणि व्याख्यात्या आहेत.

      June 23, 2022


  • मनाचे श्लोक – १०१ ते ११०

    जया नावडे नाम त्या येम जाची | विकल्पे उठे तर्क त्या नर्क ची ची |
    म्हणोनि अती आदरे नाम घ्यावे | मुखे बोलता दोष जाती स्वभावे ||101||

    अती लीनता सर्वभावे स्वभावे | जना सज्जनालागि संतोषवावे |
    देहे कारणी सर्व लावीत जावे | सगूणी अती आदरेसी भजावे ||102||

    हरीकीर्तने प्रीति रामी धरावी | देहेबुध्दि नीरूपणी वीसरावी |
    परदव्य आणीक कांता परावी | यदर्थी मना सांडि जीवी करावी ||103||

    क्रियेवीण नानापरी बोलिजेते | परी चित दुश्र्चित ते लाजवीते |
    मना कल्पना धीट सैराट धांवे | तया मानवा देव कैसेनि पावे ||104||

    विवेके क्रिया आपुली पालटावी | अती आदरे शुध्द क्रिया धरावी |
    जनीं बोलण्यासारिखे चाल बापा | मना कल्पना सोडि संसारतापा ||105||

    बरी स्नानसंध्या करी एकनिष्ठा | विवेके मना आवरी स्थानभ्रष्टा |
    दया सर्व भूती जया मानवाला | सदा प्रेमळू भक्तीभावे निवाला ||106||

    मना कोप आरोपणा ते नसावी | मना बुध्दि हे साधुसंगी वसावी |
    मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी | मना होइ रे मोक्षभागी विभागी ||107||

    सदा सर्वदा सज्जनाचेनि योगे | क्रिया पालटे भक्तीभावर्थ लागे |
    क्रियेवीण वाचाळता ते निवारी | तुटे वाद संवाद तो हीतकारी ||108||

    जनी वादवेवाद सोडूनि द्यावा | जनी सूखसंवाद सूखे करावा |
    जगी तोचि तो शोकसंतापहारी | तुटे वाद संवाद तो हीतकारी ||109||

    तुटे वाद संवाद त्याते म्हणावे | विवेके अहंभाव याते जिणावे |
    अहंतागुणे वाद नानाविकारी | तुटे वाद संवाद तो हीतकारी ||110||

    - श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)

      January 10, 2016


  • डिसेंबर ०५ : कसोटी पदार्पणात पहिल्याच चेंडूवर बळी

    पदार्पणाच्या कसोटीतील पहिल्याच चेंडूवर बळी मिळविणार्‍या गोलंदाजांची यादी :

      December 6, 2010


  • देव-बीव सगळं झूट आहे

    देव-बीव सगळं झूट आहे..थोतांड आहे..'मेडिकल सायन्स' हाच खरा परमेश्वर आहे..गेल्या ५० वर्षांत मेडिकल सायन्स मुळे जेवढे प्राण वाचले असतील,तेवढे देवाने लाखो वर्षात कुणाचे वाचवले नाहीत..मला कीव करावीशी वाटते त्या लोकांची जे 'ऑपरेशन थेटर ' च्या बाहेरही देवाची प्रार्थना आणि स्तोत्र म्हणत बसतात.."-डॉकटर कामेरकरांच्या ह्या वाक्यावर, सभागृहात एकंच हशा उठला..डॉक्टर कामेरकर एका 'मेडिकल कॉन्फरन्स' मध्ये बोलत होते..डॉक्टर कामेरकर शहरातले निष्णात डॉक्टर..त्यांना भेटायला पेशंट्सच्या रांगाच्या रांगा लागत असत..

    कॉन्फरन्स संपली आणि डॉक्टर घरी आले..वाटेतच त्यांच्या 'मिसेस' चा मेसेज होता कि "मी आज किटी-पार्टीला जात्ये..मुलं सुद्धा बाहेर गेली आहेत..जेवण डायनिंग टेबलवर काढून ठेवलंय..घरी गेलात कि जेवा"...डॉक्टर घरी आले..हात-पाय तोंड धुवून जेवायला बसले..जेवण आटोपल्यावर लक्षात आलं,कि बरंचसं जेवण उरलंय..आता जेवण फुकट घालवण्यापेक्षा कुणाला तरी दिलेलं बरं..म्हणून उरलं-सुरलेलं सगळं जेवण डॉक्टरांनी एका पिशवीत बांधलं आणि कुणातरी भुकेल्याला ते द्यावं म्हणून आपल्या बिल्डिंगच्या खाली उतरले..लिफ्ट मध्ये असताना, त्यांचंच भाषण त्यांच्या कानात घुमत होतं.."देव-बिव सगळं झूट आहे" -हे वाक्य त्यांच्याच भाषणातलं सगळ्यात आवडतं वाक्य होतं..डॉक्टर कामेरकर हे पक्के नास्तिक..देव अशी कुठलीही गोष्ट,व्यक्ती,शक्ती जगात नाही ह्यावर ठाम..जगात एकंच सत्य..'मेडिकल सायन्स'..बाकी सब झूट है'..

    डॉक्टर स्वतःच्याच विचारात बिल्डिंगच्या खाली आले..जरा इकडे-तिकडे बघितल्यावर रस्त्यात थोड्याच अंतरावर कुणीतरी बसलेलं दिसलं..ते त्या दिशेने चालू लागले..जवळ आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं कि एक मध्यम वयाची बाई,आपल्या एका १०-१२ वर्षांच्या मुलाला कवटाळून बसली आहे.
    ते पोर त्याच्या आईच्या कुशीत पडून होतं..ती बाई देखील रोगट आणि कित्येक दिवसांची उपाशी वाटत होती..डॉक्टरांनी ती जेवणाची पिशवी, त्या बाईच्या हातात टेकवली..आणि तिथून निघणार, इतक्यात ती बाई,तिच्या मुलाला म्हणाली "बघ बाळा..तुला सांगितलं होतं ना..आज आपल्याला जेवाया मिळेल..देवावर विश्वास ठेव..हे बघ..देव-बाप्पाने आपल्यासाठी जेवण धाडलंय"......हे ऐकल्यावर डॉक्टरांच्या तळ-पायाची आग मस्तकात गेली..ते त्या बाईवर कडाडले, "ओह शट-अप..देव वगैरे सगळं खोटं आहे..हे जेवण तुझ्यासाठी मी घेऊन आलोय..देव नाही..हे जेवण मी फेकूनही देऊ शकलो असतो..पण मी ते खाली उतरून घेऊन आलोय..काय देव देव लावलंयस..नॉन-सेन्स.."

    "साहेब..हे जेवण तुम्ही माझ्यासाठी आणलंत ह्यासाठी मी तुमची आभारी आहे..पण साहेब..देव हा माणसातच असतो ना ? आपणच त्याला उगीच चार हात आणि मुकुट चढवून त्याला फोटोत बसवतो..माझ्यासाठी तर प्रत्येक चांगलं कर्म करणारा माणूस,हा देवच आहे..आपण त्याला फक्त चुकीच्या ठिकाणी आणि चुकीच्या पद्धतीने शोधाया जातो एवढंच..माझ्यासाठी तुम्ही 'देव'च आहात साहेब..आज माझ्या लेकराचं तुम्ही पोट भरलंत..तुमचं सगळं चांगलं होईल...हा एका आईचा आशिर्वाद आहे तुम्हाला.."

    डॉक्टर कामेरकर, त्या बाईचं बोलणं ऐकून सुन्न झाले..एक रोगट-भुकेलेली बाई त्यांना केवढं मोठं तत्वज्ञान शिकवून गेली होती..आणि ते ह्याच विचारात डांग झाले कि ही गोष्ट आपल्या कधीच डोक्यात कशी काय आली नाही ? चांगली कर्म करणारा प्रत्येक माणूस हा देवच असतो...चांगल्या कर्मातच परमेश्वर आहे..चांगल्या माणसात देव आहे..प्रत्येक 'सत्कृत्यात' देव आहे हे आपल्या कधीच का लक्षात आलं नाही ? आपण 'देवावर विश्वास' ठेवा म्हणतो म्हणजे नक्की काय ? तर आपल्याला चांगली माणसं भेटतील,चांगली परिस्थिती निर्माण होईल ह्यावरच तो विश्वास असतो..डॉक्टरांनी एकदाच त्या बाईकडे वळून बघितलं..आपल्या भुकेल्या लेकराला ती माउली भरवत होती..त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून डॉक्टरांच्या डोळ्यांत पाणी आलं होतं..एक कणखर डॉक्टर त्या दोन अश्रूंत विरघळला होता...डोळे मिटून,ओघळत्या अश्रूंनी,डॉक्टरांचे हात नकळत जोडले गेले होते..

    -- स्वरूप पुरुषोत्तम काळे

    -- संकलन : अशोक साने
    फेसबुक, WhatsApp यासारख्या माध्यमातून दररोज येणारे चांगले लेख तुमच्यासाठी शेअर करतो.. लेखकाचे नाव माहित नाही.

      June 12, 2017


  • असंच असतं ना आयुष्य ?

    आयुष्य तर किती एकसारख्या अशा हुलकावण्या आपल्याला देत असतं ना! अगदी आता-आता आपलं सारं सुख, आपला आनंद, किंवा आयुष्याचं मर्म आपल्या जवळ दिसू लागलंय, म्हणेपर्यंत निसर्गाने कूस बदलून घ्यावी, साऱ्या दिशाच विस्कटून, टाकाव्यात, असे काहीसे खेळ चालू असतात त्याचे!

      September 14, 2019


  • श्री आनंद लहरी – भाग १५

    आई जगदंबेच्या संसारातील प्रत्येकच गोष्ट अद्वितीय आहे. आईच्या या लोकोत्तर संसाराचे अधिक वर्णन करताना आचार्य म्हणतात….

      February 19, 2020