वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आदी मानवाच्या गरजांची व त्यांच्या आपुर्तीचा इतिहास थोडक्यात बघु या, कारण तो फारच मनोरंजक आहे. पुर्वी मनुष्य ‘आज मिळाले ते आपले’ व ‘उद्याचे उद्या बघु’ अशा अवस्थेत होता. नंतर आपल्याजवळ जास्त असलेले दुसर्याला देऊ करुन त्याच्या बदल्यात त्याचे जवळचे आवश्यक ते आपण घ्यावे, नंतर वस्तुंची अनेकांशी अदलाबदली मग हळुहळु तराजु आला व अशा स्वरुपात पण मर्यादीत व्यवसाय सुरु झाला. विचारांचे आदान-प्रदान ,संवाद व दळणवळण सुकर झाल्यावर देवाण-घेवाणीसाठीचे माध्यम अशा स्वरूपात सर्वमान्य चलन (पैसे) आले व व्यापाराला सुरवात झाली.
March 12, 2021
ग्रेगरी कॅलेंडरनुसार, पतेती किंवा नवरोज वसंत ऋतूमध्ये साजरा केला जातो. पारशी समाज मूळचा इराण या देशातील. या देशाचे पूर्वीचे नाव म्हणजे पर्शिया, पारशी लोकांचे वास्तव्य असलेला देश. पण चौदाव्या शतकात इराणमध्ये धर्म परिवर्तनाचे वारे सुरु झाले आणि पारशी लोकांवर अत्याचार करण्यात येऊ लागला. त्यामुळे पारशी समुदायाने तो देश सोडला. यापैकी मोठा समुदाय हा भारतात आला आणि मुंबईत वास्तव्य करु लागला.
March 21, 2022
अस्थमा (दमा) हा मध्यम व लहान श्वासनलिकांच्या अरुंदीकरणामुळे निर्माण झालेला दीर्घकाळ टीकणारा विकार आहे. दमा का होतो? कोणाला होतो? तो एवढा दीर्घकाळ पाठपुरावा का करतो? तो फक्त वृद्धांनाच होतो, की लहान मुलेही त्याचे शिकार होतात? दम्यावर गुणकारी उपचार आहेत का? असे अनेक प्रश्न दमेकरी व त्यांचे नातलग नेहमी विचारतात.
May 3, 2023
ज्या प्रमाणे एखादं चक्रीवादळ किंवा त्सुनामी आपल्या बरोबर सगळ्यांना विनाशाकडे घेऊन जाते;तद्वतच आजची पिढी व्यसन नावाच्या चक्रीवादळात पार गुरफटलेली दिसून येते.आजची युवा पिढी स्वत:च स्वत:ला मृत्यूच्या दाढेत ढकलतांना दिसत आहे.
December 5, 2019
दहीहंडी उत्सवा संदर्भात मुख्य न्यायालयाच्या दडपणाखाली शासन दरबारी महत्वाचे निर्णय घेतले गेले आहेत. या निर्णयांना दहीहंडी आयोजक, कि ज्यामध्ये प्रतिष्ठित राजकारणी व्यक्ती आहेत, त्यांनी विरोध केलाच आहे,परंतु दहीहंडीत सहभागी होणारे गोविंदा मंडळे पण नाराज झाली. शासनाने दहीहंडी हा साहसी खेळ म्हणून जाहीर करून झालेल्या कोंडीतून स्वत:ची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला असला तरी शासनाच्या नेहमीच्या संदीग्ध धोरणामुळे हा गोंधळ अधिकच वाढला आहे. दहीहंडी साहसी खेळ जाहीर झाला म्हणून आजच्या दहीहंडी उत्सवात त्यामुळे काय फरक पडणार आहे हे अजून स्पष्ट झाले नाही. हा खेळ रस्त्यावरून मैदानात अथवा बंदिस्त क्रीडांगण खेळला जाणार आहे का? हा प्रश्न सामान्य जनतेच्या मनात अजूनही आहे. त्या बाबतीतल्या असणाऱ्या नियमावली अगदी ढोबळ सूचना जाहीर केल्या आहेत. दहीहंडी उत्सवाची साहसी खेळात गणना करणे किती योग्य आहे याची कारण मिमांसा करणे आवश्यक आहे.
August 20, 2026
रंग चिकित्सा’ किंवा ‘रंगोपचार’ हा उपचार इतका आश्वासक आहे की संबंधिताला अनुभव हा येतोच येतो. रंगज्ञान हे प्रत्येक जीवात्म्याला असतेच. रंगज्ञानाची प्रक्रिया पाहिली तर आपल्या डोळ्यांच्या रचनेत, रेटिनाच्या आतल्या बाजूस असंख्य कोन्स आणि रॉडस असतात. दंडगोल आणि शंकूच्या आकारामधील या घटकांना विशिष्ट रंगाचे ज्ञान असते. उदाहरणार्थ लाल रंग हा ठराविक कोन्स वा रॉडस ना असतो. प्रत्येक रंग दिसणे या क्रियेसाठी ते ते स्वतंत्र कोन वा रॉडस असतात.
August 20, 2018
येथे दर पाच वर्षांनी सत्तानारायणाची पूजा होते. सत्तानारायण प्रसन्न झाला तर पूजा करणारा नगरसेवक होतो, आमदार होतो, खासदार होतो, पाच वर्षात त्याची भरभराट होते. प्रत्येक वर्षाला त्याच्या एका पिढीची ददात मिटते. पाच वर्षात पाच पिढ्यांची भरभराट होईल इतकी माया जमते. एका बंगल्याचे पाच बंगले होतात, पाच वर्षात पाच पंचतारांकित हॉटेले बांधता येतात, पेट्रोल पंप विकत घेता येतात….
August 22, 2014
दोन दिवस अबमदाबादेत जाऊन आलो. माझ्या मुलीला तिच्या नोकरीचं पहीलं पोस्टींग अमदाबादेत मिळालं, तिला सोडायला गेलो होतो.. तिला कंपनीतर्फे रुमशेअरींग पद्धतीने क्वार्टर मिळाली होती, ती ताब्यात घ्यायची होती.
September 27, 2016
सोशल माध्यमातील जग खोटं असतं असं म्हणतात. पण मला वाटतं सोशल मिडीयावर आपण कसं वागतो, त्याप्रमाणे आपल्याला तेथील जग भेटतं. आज भेटलेलो आम्ही सोशल मिडीयावर भेटलो. एकमेकांच्या कामाची, तळमळीची खुण आम्हाला सोशल मिडीयावरच पटली. नाहीतरी प्रत्यऱ्क्षात भेटणारी माणसं का कमी खोटं वागतात..? पण हेतू आणि नियत शुद्ध असेल तर मग या जगात खोटं, आभासी असं काहीच नसतं असं मी समजतो. हेतू-नियत साफ असेल तर जे खोटं आहे, ते ही शुद्ध-पवित्र होऊनच समोर येतं..मनाच्या शुद्ध असण्यात प्रचंड ताकद असते, हे मी आज अनुभवलं..
February 18, 2018
लहान मुलांमधे उपजतच कुतूहल आणि जिज्ञासा असते. जसजशी मुले मोठी होऊ लागतात तसतशी त्यांची जिज्ञासाही वाढते.आणि त्यातूनच नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी ही मुले प्रेरित होत असतात.
मुलांच्या जिज्ञासेला,कुतुहलाला खतपाणी घालणं हे तर पालकांचं प्रथम काम आहे. किंबहुना मुलांची जिज्ञासा चेतवणं हे सुजाण पालकत्वाचं व आदर्श शिक्षकाचं पहिलं लक्षण आहे.
अनेक पालकांना मुलांच्या जिज्ञासेचा मनोमन धसकाच असतो. प्रश्न विचारणाऱ्या,काहीतरी प्रयोग करु पाहणाऱ्या मुलांपेक्षा एका जागी गप्प बसणारं मूल अधिक समजदार असतं, असं ही काही पालकांना वाटतं. पण हे काही योग्य नाही.
मुलाची जिज्ञासा खच्ची व्हावी यासाठी पालक किंवा शिक्षक प्रयत्नशील असतात,असं नव्हे.
तर एका दोन अक्षरी शब्दामुळे हा सगळा घोटाळा होतो.
आपण बोलताना जर तो दोन अक्षरी शब्द जाणीवपूर्वक टाळला तर सगळे प्रश्न सोपे होतील.
तो महान दोन अक्षरी शब्द आहे 'नको किंवा नाही.'
किंबहुना या शब्दामुळेच अनेक लहान मोठे अपघात होण्याचा पण संभव असतो. अशावेळी पालकांच्या 'अशा बोलण्यामुळेच' नंतर मुलांना पालकांची बोलणी खावी लागतात.
बहुतेककरुन सर्वच घरात घडणारा हा एक छोटासा प्रसंग पाहू.
आई,बाबा किंवा दादा ताई कपड्यांना इस्त्री करत असतात तेव्हा घरातलं लहान मूल त्याकडे अत्यंत कुतूहलाने पाहात असतं. त्यालाही इस्त्री करायची असते. चुरगळलेला कपडा इस्त्री फिरवून सरळ-ताठ करायचा असतो. इस्त्री गरम होते,म्हणजे नेमकं काय होतं? त्यातलं काय गरम होतं? हे त्याला जाणून घ्यायचं असतं. तो तशी इच्छा ही प्रदर्शीत करतो. प्रश्न विचारतो.
त्याबरोबर घरातली मोठी माणसे सावध होतात. त्या जिज्ञासू मुलाला बरोबर खिंडीत पकडून, चारही बाजूने त्याच्यावर 'नाही,नको,मूर्ख,वेडपट' अशा धारदार क्षेपणास्त्रांचा हल्लाच चढवतात.
उदा.
1. इस्त्रीला अजिबात हात लावायचा नाही. हात भाजेल.
2. मूर्खासारखे प्रश्न विचारू नकोस. मला उशीर होतोय.
3. हे काय तुझं इस्त्री करायचं वय आहे का? गप्प बैस.
4. आला मोठा शहाणा! म्हणे मला इस्त्री करायची आहे. अजून स्वत:ला एकट्याने आंघोळ नाही करता येत...
असली उत्तरं ऐकल्यावर मुले त्याक्षणी जायबंदी होतात. ती घरातल्या मोठ्या माणसांना हुशार व प्रेमळ समजत असतात. पण ती तशी नाहीत हे कळल्यावर त्यांना मानसिक धक्का बसतो. त्यावेळी मुले आपल्या मानशी ठरवतात की,'आता आपले प्रश्न आपणच सोडविले पाहिजेत. उगाच या मोठ्या माणसांच्या नादाला लागण्यात अर्थ नाही.' या भावनेतूनच मग ही मुले पालकांच्या नकळत, पालकांनी 'नको' सांगितलेली गोष्ट आवर्जून करतात. इस्त्रीला हात लावतात. मग पुढे काय होतं हे सांगण्याची गरजच नाही.
आपण या प्रसंगाकडे जरा दुसऱ्या बाजूने पाहूया.
वरील चार उत्तरं ही वानगी दाखल आहेत.
पण अशी उत्तरं ऐकल्यावर मुलांच्या मनात काय विचार येत असतील ,याचा कधी विचार केलाय? याबाबत मी मुलांशी बोललो आहे.
त्यांना पहिला प्रश्न असा पडतो की,फक्त लहान मुलांनीच इस्त्रीला हात लावला तर हात भाजतो पण मग मोठ्या माणसांचा का नाही भाजत? मोठ्या माणसांना उशीर होत असताना जर प्रश्न विचारले तर ते मूर्खा सारखे का असतात? आणि मला एकट्याने आंघोळ करायचा जाम कंटाळा येतो. कारण आई मला छान घासून आंघोळ घालते. पण आंघोळ आणि इस्त्रीचा काय संबंध?
प्रिय पालकांनो,तुमच्या लक्षात येतंय का? 'मुलांना काही समजतच नाही. ती वेडपटचआहेत. असं समजून त्यांना काही सांगू नका.' कारण अशाप्रकारे सांगितल्यास 'आपल्या पालकांना काही कळत नाही' हे मुलांना लगेचच समजतं.
केवळ तुमच्या भीतीपोटी ते तसं बोलत नाहीत एव्हढंच!
मुलांशी बोलताना 'त्याला समजेल.त्याला समजू शकतं' असा विश्वास मनात ठेवूनच बोला. आणि बोलताना नेमकं,थेट बोला.
आपल्या बोलण्यातला 'नको' हा शब्द काढून टाकला तर हा प्रश्न सहजी सुटू शकेल.
कारण 'नको' म्हंटलं की ती गोष्ट करण्याची अनिवार इच्छा मनात निर्माण होते. 'नको' या शब्दाभोवती कुतूहलाचं प्रचंड वेटोळं आहे. म्हणूनच 'इस्त्रीला हात लावू नकोस' असं सांगण्यापेक्षा,
'इस्त्रीचं हॅण्डल गरम होत नाही. त्याला हात लाव पाहू. इस्त्रीचा तळ गरम होतो. त्याला हात लावला तर हात भाजेल. म्हणून मी इथे हात लावत नाही आणि तू पण लावू नकोस!!' फक्त सकारात्मक पाच वाक्य!!
या सकारात्मक वाक्यंामुळे इस्त्री कितीही तापली तरी घर शांत राहू शकतं याची गॅरंटी!
दिवसभरात आपण किती सकारात्मक आणि किती वेळा 'नाही,नको' बोलतो याचा एकदा शोध घ्याच.
आणि या शोधाची सुरुवात म्हणजेच सकारात्मक गोष्टींना प्रतिसाद.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
पालकांसाठी गृहपाठ : मुलांना एखादी गोष्ट (समजावून) सांगताना 'हे त्यांना कितपत कळेल?' अश मनात शंकासुध्दा आणू नका.
त्यापेक्षा 'हे त्याला कसं समजेल' याचा ध्यास घ्या.
त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दोघांनी मिळून शोधण्याचा प्रयत्न करा.
मुलांसोबत शिकण्याचा,त्यांच्या सोबत फुलण्याचा अनुभव घ्या.
'जो नाही ला म्हणतो नाही,तोच उद्याची स्वप्नं पाही' हि चिनी म्हण लक्षात ठेवा.
---------------------------------------------------------------------------------------------------------------
-- राजीव तांबे
February 12, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti