वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
अलीकडे योग, ध्यान (मेडीटेशन, समाधी हो..!) वैगेरे शब्दांची चलती आहे आणि साहजिकच आहे, आणि ज्याची चालती असते त्याच व्यापारीकरण होतेच. त्यामुळे ध्यान, योगचे (‘’योग’साठी आपण ‘योगा’ हा तद्दन चुकीचा शब्द वापरतो. चुकीच इंग्रजी आत्मविश्वासाने शिकवल्याचा आणि शिकल्याचा हा परिणाम. ‘राम’सारख्या देवाचा ‘रामा’गडी या मुळेच झाला.
May 20, 2017



पृथ्वीच्या एका ‘नव्या’ भावंडाचा अलीकडेच शोध लागला आहे. हे भावंड इमानेइतबारे पृथ्वीबरोबरच सूर्याभोवती प्रदक्षिणा घालीत आहे. ते पृथ्वीच्या मागून चालत आहे. चालताना ते पुढे-मागे जात आहे. पृथ्वीचं हे भावंड म्हणजे एक लघुग्रह आहे. हा लघुग्रह २०२०एक्सएल५ या नावानं आता ओळखला जातो. सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे लघुग्रह हे काही वेळा ग्रहमालेतील इतर ग्रहांच्या सान्निध्यात येतात व त्या ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणात जखडले जातात.
February 24, 2022
भाग – (२) – (अ)
निखिल जोशी यांनी जुन्या (इ.स. १००० पर्यंतच्या) काळापूर्वीच्या परिस्थितीबद्दल प्रश्न उपस्थित केलेला आहे. त्यासंबंधी आपण पाहूं या. अन्य संदर्भांमधून माहिती उपलब्ध असली , तरी आत्तां मी हेतुत: मुख्यत्वें, के. ए. नीलकंठ शास्त्री या दाक्षिणात्य गृहस्थांच्या ‘ The Illustrated History of South India’ या ग्रंथाचा संदर्भ घेऊन माहिती मांडत आहे.
- दाक्षिणात्य परंपरेप्रमाणें, अगस्त्य यांना Father of Tamil मानलें जातें. (आपण याचा अर्थ असा तरी नक्कीच घेऊं शकतो की, अगस्त्य यांनी तमिळच्या बाबतीत कांहींतरी महत्वपूर्ण कार्य केलें आहे. काय, तें आपण पुढे पहाणारच आहोत). ‘मणिमेखलई’ या इ.स. च्या सुरुवातीच्या काळच्या पुरातन ग्रंथाच्या लेखकाला अगस्त्य माहीत आहे.
- तोळकप्पयन यानें इ.स.च्या सुरुवातीच्या काळात तमिळ भाषेच्या व्याकरणावर ग्रंथ लिहिला आहे. तो अगस्त्य यांचा शिष्य होता, अशी मान्यता आहे.
- तमिळ व्याकरणाचा सर्व base म्हणजे ‘ऐन्द्र‘ व्याकरण. ऐंद्र हा शब्द ‘इंद्र’पासून निधालेला आहे, हें स्पष्ट आहे. इंद्र ही वैदिक देवता आहे, हें आपल्याला माहीत आहे. इंद्र नांवाचे एक ऋषिही होते. तैतिरीय संहिता सांगते की, इंद्र ऋषि हे प्रथम वैयाकरण होत.
तमिळमध्ये प्रचलित असलेलें मूळ व्याकरण, ऐन्द्र व्याकरणावरच आधारित आहे, असें म्हणतात. (मूळ ऐन्द्र व्याकरणाचा ग्रंथ आतां उपलब्ध नाहीं, त्यामुळे त्याबद्दल अधिक कांहीं सांगतां येत नाहीं ) .
- अगस्त्य यांच्या ग्रंथाचें नांव आहे ‘अगत्तीयम्’ ( हा ग्रंथ बहुधा आतां उपलब्ध नाहीं). तमिळमधील ‘संगम’ साहित्याच्या व्याकरणाच्या संदर्भात या ग्रंथाचा संबंध येतो, व या ग्रंथाचा उल्लेखही संगम साहित्यात येतो.
- जसा ‘प्रथम-संगम’ साहित्याशी अगत्तीयम् चा संबंध आहे, तसाच ‘द्वितीय-संगम’ च्या संदर्भात तोळकप्पियम चा संबंध येतो. संगम साहित्याचा काळ इ.स. ची पहली तीन-चार शतकें असा आहे.
- संगम साहित्यात संस्कृत शब्द येतात, व त्यांच्यासाठी तमिळमध्ये विशेष अक्षरें आहेत. ती अक्षरें फक्त संस्कृत शब्दांसाठीच वापरली जातात, इतर तमिळ शब्दांसाठी नाहीं.
तें काय असेल तें असो, पण ज्या अर्थी अशा प्रकारची आख्यायिका आहे, त्या अर्थी त्या पुरातन काळींही महाभारत हें, दक्षिण-भारताला चांगलेंच माहीत होतें.
ज्या अर्थीं मथुरा हें नांव दक्षिणेत आलें, त्या अर्थी ‘हरिवंश’ हा संस्कृत ग्रंथ, (जो महाभारताचें ‘खिल’, एक परिशिष्ट, एक additional भाग आहे) , दक्षिणेत चांगलाच माहीत असला पाहिजें.
हा सांस्कृतिक समन्वयच नाहीं काय ?
- भारविचा उल्लेख चालुक्यांच्या inscriptions मध्ये कालिदासाबरोबर येतो. हा उल्लेख इ.स. ६३२ च्या कर्नाटकातील ऐहोळे येथील शिलालेखात आहे. दंडीनेंही भारविचा उल्लेख केला आहे. भारविचें किरीतार्जुनीय , याला आधार महाभारत आहे.
- दंडीचा संबंध पल्लवांशी होता. त्याचें दशकुमारचरित व अन्य ग्रंथ प्रसिद्ध आहेत.
- भास याचा उल्लेख कालिदासानेंही केलेला आहे, यावरून तो कालिदास-पूर्वकालीन आहे. त्याचें सर्व साहित्य दक्षिण भारतात सापडलें आहे, यावरून तो दाक्षिणात्य होता, असें म्हणायला हरकत नाहीं. असें माझ्या वाचनात आलेलें आहे की भास हा केरळ भागातील होता. भासाची रामायण व महाभारत यांवर आधारित नाटकें आहेत.
यावरून आपल्याला संस्कृत व संस्कृती ही वेगवेगळ्या भारतीय भागात, तेथील प्रादेशिक लोकांशी कशी संबंधित होती, कशी मिसळत होती, हें कळेल.
मात्र, वर उल्लेखलेल्या अनेक उदाहरणांवरून, संस्कृत-भाषा व संस्कृती यांचा दक्षिण- भारताशी यांचा स्पष्ट संबंध दिसतो.
- मॅक्सम्युलरला त्याचा रिसर्च करण्यासाठी इंग्लंडमधून ग्रँट मिळाली होती. मॅक्सम्युलरनें त्याच्या पत्नीला लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केलेलें आहे की, त्याला भारतात ख्रिश्चन धर्माचा प्रसार व्हायला हवा होता. तेव्हां, आज मॅक्सम्युलरचचें मत सर्वांनींच तपासून घेतलेलें बरें.
( मात्र, हेंही नमूद करायाल हवें की, त्याची कांहींकांही मतें योग्यही आहेत. )
- हडप्पा व मोहेनजोदारो या स्थळांचें उत्खनन होऊन सिंधु संस्कृतीची माहिती जेव्हां पुढे आली, तेव्हां पाश्चिमात्य विद्वांनांनी ‘आर्य आक्रमणा’चा व ‘आर्य-द्रविड’ हा सिद्धांत पुढे आणला , व त्यामुळे, उत्तर भारतीयांबद्दल (ते ‘आर्य’आहेत असें मानून) दक्षिण-भारतीय, म्हणजे खास करून तमिळभाषियांच्या मनांत दुरावा निर्माण झाला, ही वस्तुस्थिती विसरून चालणार नाहीं. तेव्हां तमिळभाषी विद्वान दुसरें काय सांगणार ? [ आजही, सिंधु-सरस्वती संस्कृतीची भाषा संस्कृत की तमिळ , यावर ( ‘साधार’ decipherment वरून) वाद सुरूं आहे ] .
- पण, आपण वर पाहिलें आहे , त्याप्रमाणें, उत्खननात सापडलेल्या पुरातनकालीन-हाडांच्या जेनेटिकल अभ्यासावरून हें स्पष्ट झालेलें आहे की, भारतात, आर्य किंवा द्रविड असे भिन्न वंश नव्हतेच. आपण हेंही पाहिलें आहे की, दक्षिण भारत, व त्यातील तमिळ प्रदेश , यांचा पुरातन काळीं व मध्य-काळातही संबंध संस्कृत व संस्कृत-संस्कृती यांच्याशी होता.
- पण , अनैतिहासिक ‘आर्य-द्रविड divide’ सिद्धांतामुळे निर्माण झालेले undue biases जायला वेळ लागेलच.
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
(पुढे चालू )
September 16, 2016
खालील तक्त्यात भारतीय व युरोपियन कारागारांची संख्याही दर्शवलेली आहे.
| वर्ष | मार्गबांधणी (मैलांमध्ये) | भारतीय मजुरांची संख्या | युरोपियन कामगारांची संख्या |
| १८६०
१८७९ |
१,६०३ (एक मैल बांधणीला १२६ मजूर लागले.)
१,३८७ |
२,३८,७०२
१,७४,७६२ |
६४१
४६२ |
रेल्वेचं जाळं भारतभर सर्वत्र पसरण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेत, एकूणच रेल्वे बांधणीत 'कामगार' हा अतिशय महत्त्वाचा घटक होता. त्यामुळे कामगारांची भरती करणारे मुख्य ठेकेदार आणि उप-ठेकेदारही महत्त्वाचे ठरत होते. हे ठेकेदार ज्या भारतीय कामगारांची भरती या कामी करत त्यांत पुरुष, स्त्रिया, लहान मुले, मुली सर्वांचाच समावेश असे. कामगार मुख्यतः रेल्वे मार्गाच्या आजूबाजूच्या खेड्यांतील असत. त्यांतील कुशल कामगारांचं प्रमाण १० ते १५ टक्के असे आणि दुर्गम भागांतील आदिवासी अकुशल कामगार-मजूर म्हणून श्रमत असत. बुडर (वडार) जमातीचे लोक माती व दगड उकरण्याचे काम करीत. हे सर्व कामगार रोज ७८०० क्युबिक फीट माती उकरत असत, ज्यामुळे ७८ वाघिणी (वॅगन्स) भरत. उत्तर-पश्चिम भागातील बेलदार जमातीचे अत्यंत गरीब कामगार कामावर असत. मद्रास विभागात या कामावर असलेल्या स्त्रियांचं प्रमाण ४९%, तर मुलांचं प्रमाण १४% इतकं होतं.
बोरघाटात मीनाबाई नावाच्या ठेकेदारणीकडे ३३ अकुशल कामगारांचा जथा असे आणि अशा अनेक जथ्थ्यांवर मीनाबाईंचा वचक असे. सिंधप्रदेशात तर एक ठेकेदार चालू काम सोडून पळूनच गेला. त्या कामावर अफगाण जमातीतले कामगार काम करत होते. ठेकेदाराच्या पलायनानं खूप गोंधळ उडाला, कामगारांनी काम करण्यास नकार दिला आणि अखेर बंडाळी माजल्यामुळे काम ठप्प झालं. कामगार मिळवणं, त्यांच्याकडून काम करून घेणं हे जसं व्यवस्थापनासाठी जिकिरीचं होतं, तसं प्रत्यक्षात रेल्वे बांधणीसाठी काम करणं ही गोष्ट कामगारांसाठीही कष्टमय, यातनादायी होती. खूप कष्टांबरोबर अकुशल कामगारांवर अंगभूत धोकेही टांगते असत. अनेकदा उंचावर काम करणाऱ्या कामगाराच्या हातून, खाली काम करणाऱ्या कामगाराच्या अंगावर हत्यार पडून त्यात त्या कामगाराचं मरण ओढवत असे. असे किती अपघाती मृत्यू झाले याची तर गणतीही राहिली नाही. जीवघेण्या साथीच्या आजारांनी दगावणाऱ्या कामगारांची संख्याही भरपूर होती.
कामगार, कामाचा दर्जा, वेळेचं गणित, अनपेक्षित अपघात, इत्यादी विविध स्तरांवर तोंड देताना ब्रिटिश अधिकाऱ्यांचीही कसरत होत असे. कामगारांच्या कामचुकारपणामुळे काही वेळा सरळ सरळ दंगलीचे प्रसंगही उद्भवत. कित्येकदा अगदी मामुली कारण घडून काम ठप्प होत असे आणि त्याचा विपर्यास होऊन कामावर देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ला होण्याची वेळही येई. काही घटनांचं पर्यवसान ब्रिटिश अधिकाऱ्यांना ठार मारण्यातही होत असे. बोरघाटातल्या कामादरम्यान एक ब्रिटिश अधिकारी १२,००० कामगारांना पगार न देता अचानक इंग्लंडला पळाल्यामुळे ते सारे कामगार एकदम संपावर गेले आणि अनपेक्षितपणे तारांबळ उडाली. नद्या आणि दऱ्यांवरचे पूल बांधल्यावर ते पडणं हीदेखील एक सततची डोकेदुखी ठरलेली होती. पण ब्रिटिश अधिकाऱ्यांनी धैर्यानं साऱ्या अडचणींचा सामना केला, इच्छित यशावरची नजर जराही ढळू दिली नाही. अनुभवांमधून शिकत, काम भराभर होण्याच्या दृष्टीने त्यांनी वेळोवेळी मार्गपद्धतीत आवश्यक ते बदल केले, खर्च कमी करण्याचे मार्गही अवलंबिले. मालाची, पैशांची कमतरता तर नव्हतीच आणि अडचणी असल्या तरी कामगारांची उणीवही भासत नसे. कामगार एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतातही नेले जात. त्यामुळे रेल्वेबांधणीच्या ताळेबंदावर नजर टाकली तर दिसून येतं, की भारतभरच्या सर्व गोष्टी जमेस धरता हजारो मैल रेल्वेमार्ग वाजवी काळात बांधून झाला.
एका बाजूनं भारतीय रेल्वे आकारत होती आणि त्याचवेळी रेल्वेबांधणीत प्रत्यक्ष सहभागी असण्याचा फायदा भारतीय अभियंत्यांनाही मिळत होता. नद्या-दऱ्यांवरील पूल बांधणीसाठी लागणाऱ्या लोखंडी कमानी इंग्लंडमध्ये तयार होऊन भारतात येत असत. कामाच्या जागी ह्या सुट्ट्या भागांची जोडणी होत असे. या कामामुळे एका नव्या तंत्रज्ञानाशी भारतीय अभियंते जोडले गेले. या भारतीय अभियंत्यांना 'मेकॅनो अभियंता' म्हणत असत. नद्यांवर पूल बांधताना पात्रात खोल विहिरी खणाव्या लागत. प्रथम सर्वच्या सर्व ब्रिटिश पाणबुडे खोलवर जाण्याचं काम करीत, पण पुढे १८९० सालापर्यंत ३२ भारतीय पाणबुडे शिक्षण घेऊन हे काम करू लागले.
भारतीयांच्या पिढ्या या बांधकामात तयार होत गेल्या. मोठ्या पुलांचा पाया रचण्याचं काम त्यांनी आत्मसात केलं. त्या अनुभवातून त्यांनी नर्मदा (भडोच), गोदावरी (राजमुन्द्री) सारख्या विशाल नद्यांवरील पूलबांधणी पूर्ण केली. सुरुवातीच्या काळात पूल बांधण्यासाठी पाच वर्षे लागत, पण नंतर तेच काम केवळ तीन वर्षांत पूर्ण होऊ लागलं. या मोठ्या पुलाच्या बांधकामात एक एक तुळई २५७ फुटांची होती. अशा १६ कमानी होत्या, आणि त्या प्रत्येक तुळईचं वजन ४०५ टन होतं. हे काम एवढं अवाढव्य होतं, की कामासाठी लागणाऱ्या सर्विस बोल्ट्सची संख्याच ३०,००० पर्यंत असे. नर्मदेवरील पुलासाठी सुमारे २० ते ४५ लाख विटा लागल्या. ह्या प्रचंड कामासाठी बी.बी.सी.आय. रेल्वेनं दोन एकर जागा विटा पाडण्यासाठी म्हणून रेल्वेमार्गाच्या बाजूला राखून ठेवली होती. २५,००० विटा तयार करण्याचं काम तिथे रोज चालत असे. विशाल नद्यांवरील पुलांसारखी अशी भव्य कामं पेलण्यासाठी भारतीय अभियंते सक्षम झाले होते. स्मारकाच्या इमारती बांधण्यात मोगल काळापासूनच भारतीय तंत्रज्ञ निष्णात होते. त्याच अनुभवाचा फायदा मोठमोठाली रेल्वेस्थानकं बांधताना कामी आला.
रेल्वेरुळांमध्ये बसवलेले तळपाट (स्लीपर्स) हा रेल्वेबांधणीतला आणखी एक महत्त्वाचा भाग होता. हे तळपाट लाकडी असत. प्रथम ते इंग्लंड व ऑस्ट्रेलियातून आयात केले जात असत, पण रेल्वेबांधणीच्या वाढत्या पसाऱ्यात या तळपाटांची मागणी वाढू लागली आणि अखेर ते भारतीय जंगलातल्या लाकडापासून भारतातच तयार होऊ लागले. याशिवाय, इंजिनात आग पेटवण्यासाठी इथल्या लाकडांचा उपयोग करावा लागतच होता.
त्या काळात साधारण अर्धा मैल लांबीचा रुळांचा मार्ग १२ माणसांचा गट बांधीत असे. त्याकरता -
• १७०० स्लीपर्स (तळपाट) • ११५ टन वजनाचे रूळ (१५ ते २० फूट लांबीचा प्रत्येक रूळ) • ३५ टन बोल्ट्स • ५ टन फिश-प्लेटस् आणि • ३ टन अणुकुचीदार खिळे अशी सामग्री त्यांना लागत असे.
हळूहळू भारतीय कामगार रेल्वेमार्गावरील प्लेटस् लेअरिंग (मार्गावर अंथरण्याचे काम) करण्यातही तरबेज झाले, ते इतके तरबेज झाले की त्यांच्या अनुभवकुशलतेमुळे त्यांना सुदान देशात लष्करी कामावरही नेण्यात आलं. ज्या भारतीय कामगारांनी कसब मिळवलं, त्यांना उत्तरेकडून दक्षिणेतल्या पुलांच्या कामावर नेण्यात आलं. चिनाब नदी ते कृष्णा नदीपर्यंत जाऊनही त्यांनी कामं केली. पंजाबचिनाब-शेरशहा ब्रीज, आंध्र-कृष्णा-बेसवाडा ब्रीज बांधले गेले. एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात नेलेल्या कामगारांची काळजीही घेतली जात असे. उत्तरेकडील कामगार दक्षिणेत आल्यावर त्या कामगारांची जेवणाची आबाळ होऊ लागली. अशा वेळी त्यांच्याकरता गव्हाचं पीठ कलकत्त्यातून पुरवण्याची व्यवस्था केली गेली.
दरम्यान, ब्रिटिश अभियंते भारतीय हवामानात रुळत होते. त्यांच्यापैकी काही ब्रिटिश अभियंते भारतीय कामगारांच्या कामाची, त्यांच्या चिकाटीची वाहवा करू लागले होते. त्यांच्या धैर्याबद्दल आणि प्रामाणिकपणाबद्दल त्यांची पाठ थोपटू लागले होते. या अनेक पातळ्यांवरच्या उत्साही प्रगतीमुळेच पुढच्या शंभर वर्षांतल्या भारतीय रेल्वेच्या प्रचंड वेगाचा पाया मजबूतपणे घातला गेला.
-– डॉ. अविनाश वैद्य
October 16, 2022
सारा उंचसखल भाग असल्यामुळे ठिकठिकाणहून वहात येणार्या पाण्याने रस्त्याच्या दोहोबाजूस ओहोळ झालेले असतात. ते पाणी वाहून, बर्याच ठिकाणी रस्त्याची सोबत करत, दोन्ही बाजूंना खोलगट पन्हाळी तयार झालेल्या असतात. पावसात त्यातून डोंगरावरचे तांबडे मातकट पाणी वहात असते. इतर वेळेला पन्हाळीत ओल टिकून रहाते. त्या ओल्या मातीत, गवताच्या साथीनं रामबाण उगवलेले असतात. रंगीबेरंगी फुलं, गवताची डुलणारी पाती, रामबाणाचे जागोजागी उगवलेले पेव आणि त्यांवरची असंख्य फुलपाखरं, किडे, चतुर यांनी, रस्त्याकडेच्या या पन्हाळी नुसत्या गजबजून गेलेल्या असतात.
रस्त्याकडेच्या घरांपुढे लोक आपापल्या बागांमधे काम करताना दिसायला लागतात. विविध प्रकारच्या फुलांचे ताटवे बागांची शोभा वाढवायला लागतात. एप्रिल मे हा tulip फुलांचा सिझन. अनेक घरांपुढे ट्युलीपच्या रंगी बेरंगी फुलांची पखरण झालेली दिसते. Daffodils देखील खूप दिसतात. थंडी कमी झाल्यामुळे लोकं घराबाहेर अधिक पडायला लागतात. चांगलं ऊन पडलं असलं तर जॉगिंग करायला, सायकलिंग करायला बाहेर पडलेले लोक दिसतात. पण इथे सायकलिंग म्हणजे आपल्यासारखं पायजम्यामधेच सायकलवर टांग मारली असा प्रकार नसतो. सायकल चालवणार ते देखील हेल्मेट, टाइट शॉर्टस्, गॉगल्स, पाण्याची बाटली, शूज असा सरंजाम हवाच! संध्याकाळी रस्त्याकडेच्या ग्राउंड्सवर कुठे कुठे गावातल्या मुलांचा बेसबॉलचा खेळ रंगात आलेला असतो. त्यांचे आई, वडील गाड्या, पिकअप ट्रक्स पार्क करून गप्पा मारत उभे असतात.
शेतांत आधीच्या हंगामात कापलेल्या मक्याचे खुंट तसेच राहिलेले असतात. ते हारीने उभे असलेले खुंट, सुकून पिवळे पडलेले असतात. त्या सुकलेल्या खुंटांच्या मधली सगळी जमीन पावसाच्या आगमनासरशी हिरव्या तणांनी, गवताने भरून जाते. मे च्या सुरवातीस नांगरणी सुरू होते. शेतांतून ट्रॅक्टर्स फिरताना दिसायला लागतात. काळीभोर माती पुन्हा नवीन बीज स्वीकारण्यासाठी उतावीळ होऊन जाते. नांगरलेली काळीभोर शेतं आणि चराऊ गवताची हिरवीगार कुरणं असा संमिश्र बाज माळरानांवर पसरतो. कुरणांत गवत पुरेसं वाढलं की गायींना आणि वासरांना बाहेर चरायला सोडलं जातं. टेकड्यांच्या हिरव्यागार उतारांवर काळ्या पांढर्या गायींचे कळप अधाश्यासारखे चरू लागतात.
जूनच्या मध्यापर्यंत पेरणी संपून मक्याच्या रोपांची टोकं मातीतून वर यायला लागलेली असतात. दिवस चांगलाच मोठा झालेला असतो. रात्री ९-९॥ वाजता देखील चांगला प्रकाश असतो. सूर्य मावळून गेला तरी मावळतीचं आकाश चांगलंच प्रकाशमान असतं. सूर्याचा परावर्तित प्रकाश आसमंतात भरून राहिलेला असतो. कधी कधी रात्री लॅबमधून परत येताना पूर्वेकडे चंद्र उगवत असतो आणि मावळतीला बुडालेली सूर्याची किरणं अजून आपला प्रभाव सोडायला तयार नसतात.
सूचिपर्णी वृक्ष जरी वर्षभर हिरवेगार दिसत असले तरी निरखून बघितल्यावर त्यांच्यावर देखील वसंताचा हात फिरल्याचं जाणवतं. ज्युनीपरच्या हिरव्यागार फांद्यांमधून पोपटी रंगाचे नाजुक बड्स उगवलेले दिसतात. सारं झाड या पोपटी बड्सनी भरून जातं आणि एखाद्या ख्रिसमस ट्री वर रंगीत दिव्यांच्या माळा लावाव्यात तसं वाटायला लागतं. झाडाच्या जुन्या सुया गर्द शेवाळी रंगाच्या असतात. या सुयांच्या टोकाला निळसर हिरव्या रंगाच्या नव्या सुया वसंतात येतात त्यामुळे सारं झाड ही दोन रंगांची रंगसंगती अंगावर वागवतं - झाडांच्या बुंध्यांजवळचा फांद्यांचा रंग गर्द शेवाळी तर परीघाजवळ फांद्यांचा रंग निळसर हिरवा!
जुलै ते सप्टेंबर म्हणजे उन्हाळा, मोठे दिवस, बर्यापैकी सूर्यप्रकाश, मधून मधून पडणारा पाऊस, हिरव्या रंगाचं एकछत्री साम्राज्य! पशु, पक्षी, किटक, फुलपाखरं सार्यांची लगबग जाणवण्या इतपत वाढलेली. रान आता सहस्र कंठांनी बोलायला लागलेलं असतं. दिवसा मधमाश्या आणि फुलपाखरं आणि रात्रीच्या वेळी काजवे (fire flies) भरपूर दिसतात.
ओढ्यांच्या काठांवर झाडाझुडपांची गर्दी झालेली असते. झाडांच्या सावल्यांनी पाणी झाकोळून गेलेलं असतं. बालकवी ठोंबरे यांच्या कवितेतल्या औदुंबरासारखी काही झाडं जळात पाय सोडून बसलेली असतात. जुन्या मोडून पडलेल्या फांद्या ओढ्यातल्या दगडांत, चिखलात रुतून बसलेल्या असतात, आणि त्यांची वेडीवाकडी धडं पाण्याबाहेर डोकावत असतात. अशाच एखाद्या ओढ्यात, वरच्या झाडांची सावली शोधून, एखादी बदकीण आपला पोरवडा सांभाळत, किडे शोधत पाण्यात डुबक्या मारत असते.
August 7, 2015
माता सरस्वतीची, आपल्या कुलदेवतेची मनापासून ध्यानधारणा करणाऱ्या एका सुखी दाम्पत्याच्या घरी पुत्रसुख नव्हते. सुखाचा संसार हा सुरूच होता. आणि एके दिवशी मातेच्या ध्यान-आशीर्वादामुळे पती-पत्नी कैलासनाथ आणि उमा यांना कन्यारत्नाचा लाभ झाला. साक्षात देवीचा प्रसाद म्हणुन या कन्येचे खूप लाडामध्ये संगोपन झाले. तिचे नामकरण झाले. नाव ठेवले शिवानी…
May 28, 2021
त्वचेवरील पांढरे चट्टे अर्थात पांढरा कोड हा एक जनुकीय विकृतीतून होणार आजार असून, त्वचेचा रंग तयार करणाऱ्या पेशी नष्ट झाल्याने त्वचेवर पांढरे डाग उत्पन्न होतात. या आजारासंदर्भात असलेले भ्रम हे चुकीचे असून, योग्य उपचार केल्यास या आजारावर मात करता येऊ शकते.
June 29, 2022
पाच हजार वर्षापूर्वी मार्गशीर्ष शुध्द एकादशीला मंगल सुप्रभाती कुरूक्षेत्राच्या रणभूमीवर योगेश्वर श्रीकृष्णाने जीवनाचा दिव्य संदेश, महान विचार दिला.
December 14, 2021
ज्या मित्रांचे/ परिचितांचे जाणे माहित असते अशांना मी आधीच माझ्या मित्रयादीतून वगळतो. पण या “अनोळखी ” दुष्टाव्यांचे काय? एखाद्या मृत व्यक्तीला शुभेच्छा म्हणजे फारच !
December 11, 2021
हेडिंग्लेवर एक चमत्कार. वसिम अक्रमचा चेहरा धूमकेतूच्या शेपटाने माऊन्ट एव्हरेस्टला धडकून जाण्याची घटना नुकतीच पाहिल्यासारखा झाला होता. तब्बल सहा वर्षांच्या अंतरानंतर इंग्लिश कप्तान माईक आथर्टनने कसोटी सामन्यात चेंडू टाकण्यासाठी हात फिरवला होता…
August 11, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti