(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सुगीचे दिवस

    नवरात्रामध्ये भातशेती फुलो-यात असते.त्यानंतर शिवारातुन बांधावरून सकाळी किंवा दुपारनंतर फेरफटका मारताना एक वेगळीच मजा असते.वारा भणभणत असतो.त्या वा-याबरोबर भाताचा सुंदर सुवास दरवळत रहातो.शिवारामध्ये अनेक जातीचे भातपीक लावलेले असते.परंतू प्रत्येक खाचराच्या बांधावरून चालताना वा-याबरोबर सुंदर असा सुगंध येत रहातो.जणू त्या खाचरातील भात पीक आपल्या अस्तीत्वाची जाणीव करून देत असते.

      May 11, 2024


  • भगवत् नामातून – मुक्तीकडे

    ईश्वराचे नामस्मरण हे मनुष्याने अंगिकारलेले सर्वात प्रभावी माध्यम आहे. नाम घेण्याची परंपरा व ईतिहास फार मोठा आहे. जेव्हा मानव संवाद साधायला शिकला तेव्हापासूनच तो ईश्वर नामात भवतल्लीन होत गेला.  या नामानेच मुक्तीपर्यत पोहचलेले अनेक जण आपल्याला दिसतील.

      August 12, 2018


  • आहारातील बदल-शाकाहारच ! – भाग ४

    पाला तो पालाच. फक्त एक दिवस जिवंत राहू शकतो. त्यामुळे रोज खावा लागतो. आणि जो स्वतः जिवंत राहू शकत नाही, तो माणसाचे आयुष्य शंभर वर्षे कसे वाढवणार ?

    पालेभाज्या या चोथा जास्त, पचायला जड, पोषणमूल्य कमी आणि जवळपास ऐशी नव्वद टक्के पाणीच अश्या (अव)गुणाच्या आहेत.

    जे काही दहा वीस टक्के चांगले गुण दिसतात, तेही काही कामाचे नाहीत.

    मुंबई सारख्या शहरात पालेभाज्या रेल्वे लाईनच्या बाजुला कसल्या पाण्यावर पिकवतात ते सर्वजण बघतात.

    पालेभाज्या जमिनीलगत वाढतात, म्हणून त्या नीट धुवूनच घ्याव्या लागतात. शहरात तर चक्क गटाराच्या पाण्यात धुवुन मार्केटमधे आणतात. अश्या धुण्याने किती जंतुसंसर्ग वाढेल?
    कधी विचार केलाय याचा ?

    बरं या पालेभाज्या अधिक हिरव्यागार दिसण्यासाठी, अधिक टवटवीत दिसण्यासाठी, अधिक लवकर तयार होण्यासाठी त्यावर रासायनिक खतांचा बेसुमार वापर केला जातोय. एका सर्वेक्षणात तर असे आढळले आहे की जंतुनाश होण्यासाठी जे प्रमाण वापरले जायला हवे त्यापेक्षा किमान पाचशेपट अधिक जहाल रसायन या पालेभाज्यांवर फवारले जातेय. ही माहिती खते आणि फवारणीची रसायने विकणाऱ्या एका होलसेल विक्रेत्यानेच एका व्हिडिओ द्वारे सांगितली आहे. तो म्हणतो, "इसी से हमारे मार्केट मे माल जल्दी खतम हो रहा है, हमारा धंदा बढ रहा है ।"

    स्वतःचा व्यवसाय तो वाढवून घेतोच, पण व्यवहारात तो डाॅक्टर मंडळींचा व्यवसाय देखील काही हजार पटीने वाढवित असतो. ते तर पुरस्कार करणारच. त्यांच्या टेक्समधे जे आहे, ते करायलाच हवे ना.

    शुद्ध स्वच्छ निर्जंतुक हे शब्द केवळ पुस्तकात वाचण्यासाठीच शिल्लक राहिले आहेत की काय असे वाटते.

    प्रत्येक जण आपला व्यवसाय कसा वाढेल हेच बघतोय.

    इथे, कुणी कुणाचे नाही राऽजा,
    कुणी कुणाचे नाऽही

    मग काय करायचं ?

    पालेभाज्या खायच्याच असतील तर त्या अगदी खात्रीच्या माणसाकडून विकत घ्याव्यात, ज्याने त्या चांगल्या पाण्यावर वाढवलेल्या आहेत. त्याच्या मुळात कोणतेही रासायनिक खत वापरलेले नाही आणि वरून फवारणीसाठी कोणतेही जहाल विष फवारलेले नाही.

    दुर्दैवाने असा माणूस नाहीच मिळाला तर मार्केटमधील पालेभाज्या नीट पहाव्यात.
    ज्या आकाराने लहान, ज्यांची पाने किडींनी कातरलेली आणि खाल्लेली असतील, ज्यांच्या पानावर भोके पडलेली दिसतील, त्या भाज्या जगायला योग्य वाटल्यामुळे त्या किडींनी खाल्लेली असतात, असा उदात्त विचार करून घरी आणावीत........

    पालेभाज्याविषयी यापूर्वी तीन चार टीपांमधून बराच उहापोह झाला आहे. तरी पण नवीन सदस्यांना हा महत्वाचा विषय कळणे आवश्यक वाटते, म्हणून अजून एखादा भाग पालेभाज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ.......

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    19.10.2016

      October 19, 2016


  • कीर्ती श्रेष्ठ की मूल्य?

    मूल्यं पुस्तकातच असतात असे नाही, वर्तनातही असतात. मूल्यं रुजली तरच ती वर्तनात येतात. शाळेत मूल्यं शिकवली जातात. रुजणं आणि रुजवणं हा ज्याचा त्याचा प्रांत. वैज्ञानिक दृष्टिकोन हे मूल्य शिकवलं जातं, पण एखादाच नरेंद्र दाभोलकर व त्यांच्यासारखे ते प्रत्यक्ष जीवनात अंमलात आणतात.

      June 5, 2026


  • सिनेमा बनताना – दो बिघा जमीन

    सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रिमिअरला राजकपूर व कृष्णाकपूर आले होते. चित्रपट पाहिल्यावर राजकपूर एकदम गप्प झाला. काही बोलेना. घरी आल्यावर कृष्णाकपूरने गप्प राहण्याचे कारण विचारले तेव्हा तो म्हणाला “हाच तो चित्रपट आहे जो मला बनवायचा आहे” म्हणजे आवाराच्या  देश विदेशातील तुफान यशानंतरही त्याला या चित्रपटाबद्दल इतका आदर होता.

      September 3, 2022


  • दिवाळी आठवणीतली!

    नवरात्र संपून दसरा उजाडायचा ,
    आणि वेध लागायचे दिवाळीचे.
    मधला काळ पंधरा दिवसांचा ,
    पटकन संपून जावा वाटायचे.
    चिवडा , लाडू , चकली ,शेव
    सारेच तेव्हा घरी बनायचे.
    विकतच्या घरगुती फराळाचे पेव ,
    तेव्हा बाकी होते फुटायचे.
    अप्रूप होतं नवीन कपड्यांचं ,
    नवीन शर्ट आणि नवीन पॅंटचं .
    आम्हाला मनासारखं सगळं मिळायचं ,
    तुमच्यासाठी काय घेतलं विचारायचं -
    आनंदात नेहमीच राहून जायचं.
    फटाक्यांची भावंडात विभागणी व्हायची ,
    मिळाले ना सारखे ? नजर असायची.
    हवेत मस्त थंडी फुलायची ,
    भल्या पहाटे जाग फटाक्यांनी यायची.
    गोधडीत गुडुप्प झोपावं वाटायचं ,
    कशाला इतक्या लवकर उठायचं ?
    अचानक यायचा उटण्याचा सुवास ,
    बंबात टाकलेल्या जळणाचा वास.
    डोळ्यावरून झोप अलवार उडायची ,
    झिरमिळ्या कांदिलाकडे सहज नजर जायची.
    सुंदर रांगोळी काढलेली पाटाभोवती ,
    पाटासमोर तेल उटण्याची वाटी.
    आईचा हात उटण्याचा घमघमाट ,
    मोरीत जाऊन उभं राहायचं ,
    कडकडीत पाणी अंगावर घ्यायचं .
    थंडी पळून कुठच्या कुठे जायची -
    नजर नव्या कपड्यांकडे असायची.
    गोविंदा गोविंदा !म्हणून कारीट फोडायचं ,
    कडूढाण बोट जिभेला लावायचं.
    धूम पळायचं फटाके वाजवायला ,
    अनार , लवंगी , भुईचक्र लावायला.
    भूक वाढलेली असायची पोटात ,
    फराळाची चित्र तरळायची डोळ्यात.
    पाटावर रांगेत सारी बसायची ,
    ओवाळणी अन्नपूर्णेच्या हातून व्हायची.
    पोहे ,फराळ हाणायचे मस्त ,
    तुडुंब तृप्तीने पोट व्हायचे सुस्त .
    सारेच एकत्र देवळात जायचे ,
    जिथे पहावं तिथे प्रसन्न वाटायचे.
    शेवटचा दिवस भाऊबीज यायची ,
    दिवाळी संपल्याची जाणीव व्हायची.
    आणि आठवायचा अभ्यास सुट्टीतला ,
    दिवाळीच्या आनंदात विस्मृतीत गेलेला.
    आता हे काहीच होत नाही ,
    पहाटेचं अभ्यंगस्नान दिसतच नाही.
    फराळ कंदील सारे विकतचे ,
    साच्यातून काढलेले एकाच चवीचे.
    व्हॉट्सॲप वर हॅपी दिवाळी म्हणतात ,
    मेसेज फॉरवर्ड करत रहातात.
    असो ! जीवनाच्या वाटेवर चालायलाच हवं ,
    बदलत्या वातावरणाबरोबर बदलायला हवं.
    तरी त्या दिवाळीची मित्रानो , आठवण होते अनावर ,
    का हो ! काहीच उपाय नाही का यावर ?????
    ही दिवाळी आठवते का ? नक्की कळवा !
    प्रासादिक म्हणे
    -- प्रसाद कुळकर्णी.

      December 17, 2021


  • इंटरनॅशनल माउंटन डे

    संयुक्त राष्ट्र महासभाने २००२ साली संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय पर्वतीय वर्ष म्हणून घोषित केले आणि ११ डिसेंबर २००३ पासुन ‘इंटरनॅशनल माउंटन डे हा साजरा करण्यात येतो. दरवर्षी तो एका खास थीमसह साजरा केला जातो.

      December 11, 2021


  • निळू भाऊ – उत्तर द्याल !

    आमच्या प्राचार्यांना (जोगळेकरांना ) वाटले -निळूभाऊंना महाविद्यालयात बोलवावे. त्यांनी सुचविले -एखादा कार्यक्रम ठेवा. नुक्तेच महाविद्यालयात एक रक्तदान शिबीर झाले होते. त्याच्या प्रमाणपत्रांचे वितरण निळूभाऊंच्या हस्ते रक्तदात्यांना करावे अशी रूपरेषा ठरली.

      December 20, 2021


  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग चौदा

    पचनासाठी कफ, पित्त वात तीनही दोषांची आवश्यकता असते.या दोषांच्या गुणांचा विचार केला तर कफ आणि पित्त यांना स्वतःची गती नाही, हे दोन्ही दोष स्वतःचे काम करण्यासाठी, हालचाली करण्यासाठी, वातावर अवलंबून असतात.

    ग्रंथकार एक उत्तम उदाहरण देतात. जसे आकाशातले काळे पांढरे ढग स्वतः काहीच करू शकत नाहीत, जेव्हा वारा येतो, तेव्हाच हे ढग हालचाली करू शकतात. आणि वारा जिकडे नेईल तिकडे पळतात. तसेच शरीरात कफ आणि पित्त स्वतः अपंग असतात. वात दोष जसे हलवेल तसे त्यांना आपले काम दाखवता येते.

    जेवणानंतर लगेचच कफ दोष वृद्धींगत होतो. (दोष म्हणजे 'फाॅल्ट' नव्हे) हा कालावधी साधारणपणे दीड ते दोन तासांचा असतो. त्यानंतर पित्ताचे काम अधिक जोमाने सुरू होते. आणि नंतर वाताचे कार्य अधिक जोरात सुरू होते.

    आपल्या नकळत चाललेलं हे पचन पूर्ण होईपर्यंत पोटाकडे जरा जास्ती रक्तपुरवठा होत असतो. वात दोष पोटात फिरल्यामुळे बाकी बाहेरील शरीराच्या ठिकाणी वाताचे कार्य मंदावते.

    त्याचा परिणाम म्हणून इतर अवयवांना रक्त थोडे कमी पडते. मेंदू, इंद्रिये यांना सुस्ती येते, आळस भरतो, काम न करता पडून रहावेसे वाटते, झोप आल्यासारखी वाटते. ती येतेच.

    आयुर्वेदात काही गृहीतके आहेत, काही संकल्पना आहेत, काही धारणा आहेत, काही प्रत्यक्ष प्रमाण आहेत, या अमूर्तांचे गुण वर्णन केलेले आहे, या गुणांचा तरतम भावाने विचार केला तरी यांचे गुण केव्हाही बदलत नाहीत, हाच खरा अभ्यास, हे खरे शास्त्र, त्रिकालाबाधीत सत्य. आजही वात पित्त कफाला समजून घ्यायचे असेल तर त्याच्या त्याच गुणांचा अभ्यास करावा लागतो. आणि त्यांचे गुण अंशानेही बदललेले नाहीत. हे आयुर्वेदाचे अविनाशित्व !

    हीच पचन प्रक्रिया प्रत्यक्षरीत्या समजून घ्यायची झाल्यास रसायन शास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, फिजीऑलाॅजी, पॅथाॅलाजी, इ. अनेक पद्धतींनी समजून घेता येईल. त्यासाठी अन्नातील घटकद्रव्यांचा स्वतंत्र विचार, एकमेकांत होणाऱ्या जीवरासायनिक प्रक्रिया, इ. सर्व समजून घेण्यासाठी, त्या त्या शास्त्रांचा परत स्वतंत्र अभ्यास करावा लागेल, तरच ते नीट समजून घेता येईल. यापेक्षा आयुर्वेदात काय सांगितलेले आहे ते समजून घेणे हे अगदी सोपे आहे, असे वाटते.

    मायक्रोलेव्हलला आतमधे काय चाललेले आहे हे प्रत्यक्षात पहाण्यापेक्षा, वात पित्त कफाच्या, गुरू मंद आदि वीस गुणांचा अभ्यास करून, अनुमान प्रमाण वापरून, आतील सूक्ष्मातील कार्य समजून घेणे, हे समजायला सोपे नाही का ?
    जे सोपे आहे ते अधिक सोप्पे करून सांगितलं तर समजण्याचं काम सोप्पं होतं ना !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    29.03.2017

      March 29, 2017


  • स्वामी समर्थ आणि इतर अवतारी पुरुषांचा मूक संदेश

    अक्कलकोटचे स्वामी समर्थ, शिर्डीचे साईबाबा, शेगावचे गजानन महाराज, कणकवलीचे भालचंद्र महाराज किंवा नागडेबाबा इत्यादी कोणत्याही अवतारांबाबत माझा सखोल असा अभ्यास नसला, तरी एक निरीक्षण आहे आणि ते माझ्यापुरतं खरं आहे हे मला पटलेलं आहे. अर्थात, माझं मत आपल्याला मान्य असायलाच हवं, असा काही माझा आग्रह नाही. मला या अवतारी पुरुषांबद्दल काय वाटतं ते मी या लेखात मांडायचा प्रत्न केला आहे. या लेखातून कोणाच्या भावना दुखावाव्यात असा माझा हेतू नाही.

      March 24, 2018