(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • रैना

    बिती ना बिताई या गाण्याचं नि माझं नातं

  • शुभ सकाळ.. उगाच एक morning dose

    काही महिन्यांपूर्वी एका भावाशी चॅट करत होते. थोडा disturbed होता तो. त्यामुळे सांगत होता, की “ताई, तुझ्याशी बोलून नेहमी खूप positive वाटतं. तू प्लीज माझ्यासाठी रोज एक good morning मेसेज टाकशील? खूप मदत होईल त्याची मला..”

  • हरलाय महाराष्ट्र… आणि हरलाय मराठी माणूस…

    कोणी म्हणतोय भाजप जिंकला,
    कोणी म्हणतोय शिवसेना हरली,
    कोणी म्हणतोय राष्ट्रवादी पुढे तर,
    कोणी म्हणतोय कॉंग्रस मागे,
    कोणी म्हणतोय मनसेची वाट लावली...

    पण लक्षात ठेवा इथे फक्त "जिंकलाय" आणि पुढे गेलाय तो...

    गुजराथी,
    मारवाडी,
    भैया,
    मद्रासी,
    सिंधी,
    पंजाबी,
    आणि

    हरलाय आणि तो फक्त माझा "महाराष्ट्र"... आणि माझ्या महाराष्ट्रातील "मराठी माणूस"...

    आपण कोणत्याही पक्षाचे असाल आपल्याला हे मान्य करावंच लागेल ...

    महाराष्ट्रात राहून जर परप्रांतीय समाज एकत्र होऊ शकतो तर आपण का नाही ?

    मुंबईची आणि पुण्याची स्थिति...

    हिरा मार्केट - गुजराती‬

    कपडा मार्केट - ‪मारवाडी‬ आणि गुजराती

    लकडा मार्केट - मुस्लिम‬

    शेयर मार्केट - गुजराती, मारवाडी

    स्टील मार्केट - मारवाडी आणि गुजराती

    हाॅटेल लाईन - ‪‎शेट्टी‬, आणि पय्याडे

    वाईन मार्केट - शेट्टी, ‪‎पंजाबी‬

    मच्छी मार्केट - मुस्लिम, उत्तर भारतीय ..
    ‪‎मराठी‬ माणुस.... आहे कुठे ?

    वडापावच्या गाडीवर.. !!
    हसण्यावर घेऊ नका‪. 'लाज‬'' वाटण्यासारखी गोष्ट आहे.

    रिकाम्या बाटल्या विकत घेणारांनी बंगले बांधले ...

    तर बाटल्या रिकाम्या करणारांनी जमिनी विकल्या ......!!!

  • जाहीरात

    बंगलोरच्या ज्या जर्मन मल्टिनॅशनल कंपनीत मी काम करत होतो त्या कंपनीला कधी वर्तमानपत्रांत जाहीराती देण्याची पाळी आली नव्हती. त्याला कारणही तसेच होते. भारतातील ‘ऍटो ऍन्सिलरी सेक्टर’ मधील ही सर्वात मोठी आणि दिग्गज कंपनी होती. डीझेल आणि पेट्रोल इंजीनसाठी लागणारे महत्वाचे भाग बनवणारी ही कंपनी होती. या कंपनीची उत्पादने वापरल्याशिवाय डिझेल आणि पेट्रोल इंजिनांचे प्रॉडक्शन करणे शक्यच नव्हते. त्यामूळे भारतातले सगळे इंजीन मॅन्युफॅक्चरर्स या कंपनीचे ओ.इ. कस्टमर होते. या मध्ये ऍटोमोबाईल सेक्टरमधील कंपन्या मोठ्या प्रमाणावर होत्या. या प्रकारची उत्पादने बनवणारी ही भारतातील एकमेव कंपनी असल्यामूळे या कंपनीची जवळ जवळ मोनॉपली होती. या कंपनीला स्पर्धक होते. नाही असे नाही. पण ते फारच किरकोळ स्वरुपातले होते. कंपनीचे बंगलोर आणि नाशीक या दोन ठिकाणी कारखाने होते. दोन्ही कारखाने अत्याधुनीक होते. कंपनीची प्रॉडक्ट्स नुसतीच हाय टेक नव्हती तर हाय प्रिसिजन पण होती. कंपनीची जी उत्पादने इंजीनवर बसवण्यात येत त्यांना पण सर्वीस लागे. या साठी कंनीनीने भारतात 100 डिलर्स आणि सर्वीस स्टेशन्सचे जाळे उभे केले होते. तसेच या प्रकारची सर्वीस देणारी अनेक खासगी सर्वीस स्टेशन्स पण होती. यांना कंनीचे स्पेअर पार्ट मोठ्या प्रमाणावर लागत. त्यामूळे कंपनीचा स्पेअर पार्टचा धंदा पण मोठ्या प्रमाणावर होता. जसजसे इंजिनांचे आणि वाहनांचे उत्पादन वाढत होते तसतसे कंपनीच्या उत्पादनांची मागणी वाढतच चालली होती. अनेक वेळेला कंपनीच्या मालाचे शॉर्टेज असायचे. थोडक्यात कंपनी जे बनवत होती ते आपोआप विकले जात होते. ते सुद्धा कंपनीला हव्या असलेल्या किंमतीमध्ये विकले जात होते. कंपनिची 4 झोनल आणि 8 एरिया ऑफिसेस होती. यांच्यातर्फे कंपनीचे व्यवहार उत्तम चालू होते. अशी ही परिस्थिती अनेक वर्षे होती. मग कंपनीला जाहीरातबाजी करण्याची गरजच काय?

    पण 1980 च्या सुमारास परिस्थिती बदलली! कंपनीच्या बंगलोरच्या कारखान्यात कामगारांचा संप झाला. हा संप दिर्घकाळ, म्हणजे जवळ जवळ 2 महीने टिकला. या संपामूळे कंपनीचे प्रॉडक्शन बोंबलले. याचा मोठा फटका कंपनीच्या ग्राहकांना बसू लागला. ऍटोमोबाईल सेक्टरला याचा सर्वात मोठा फटका बसला. ट्रक, बसेच, कार्स आणि टू व्हिलर गाड्यांच्या उत्पादनावर याचा मोठा परिणाम झाला आणि गाड्यांचे उत्पादन गडगडले. त्याचप्रमाणे ज्या गाड्या रस्त्यावर धावत होत्या त्यांच्या सर्व्हिसींगला कंपनीचे पार्ट मिळेनासे झाल्याने या गाड्या पण बंद पडू लागल्या. याचा मोठा फटका रोड ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रीला बसला. थोडक्यात देशाच्या इकॉनॉमिलाच याचा मोठा फटका बसु लागला. अगदी लोकभेमध्ये चर्चा होण्यापर्यंत हे प्रकरण ताणले गेले. संप मिटवण्याचे कंपनीचे हर तर्हेलचे प्रयत्न चालूच होते पण त्याला म्हणावे तसे यश येत नव्हते. संपाच्या या काळात कंनीचे जे ओ. ई. कस्टमर्स होते त्यांचा कंपनीवरचा विश्वास कमी होऊ लागला आणि त्यांनी पर्यायी व्यवस्था शोधायचा मार्ग स्विकारायला सुरवात केली. काही जणांनी ही उत्पादने आयात करायला सुरवात केली. कंपनीचे जे किरकोळ स्पर्धक होते त्यांचे चांगलेच फावले आणि त्यांच्या उत्पादनांची हातोहात विक्री होऊ लागली. कंपनीचे नकली किंवा डुप्लिकेट पार्ट बनवणार्यांानी वाहत्या गंगेत हात धुऊन घ्यायला सुरवात केली. असे अनेक नकली मालाचे उत्पादक दिल्लीला होते. पण याहीपेक्षा अजून एक मोठा ‘थ्रेट’ कंपनीसाठी निर्माण झाला. भारतातील एका प्रसिद्ध उद्योग समुहाने यात उडी घेतली. या कंपनीसारखीच उत्पादने बनवणारा कारखाना सुरू केला. जोरदार मार्केटिंगच्या जोरावर कंपनीचे अनेक ग्राहक आपल्याकडे खेचून घेतले आणि कंपनीपुढे मोठे आव्हान उभे केले. कंपनीच्या मार्केट शेअरवर याचा परिणाम होऊन कंपनीचा मार्केट शेअर हळू हळू घसरू लागला.

    दोन महिन्यांच्या अथक परिश्रामाने हा संप एकदाचा मिटला आणि कंपनीचे उत्पादन परत पूर्वीसारखे सुरु झाले. या काळात कंपनीचे जे आर्थिक नुकसान झाले होते त्या पलीकडे जाऊन कंपनीसाठी तीन आव्हाने निर्माण झाली होती. पहीले आव्हान म्हणजे कंपनीच्या कामगारांच्या मनात कंपनी विषयी जिव्हाळा निर्माण करणे, दुसरे आव्हान कंपनीच्या ओ. ई. कस्टमर्सच्या मनात कंपनीविषयीचा विश्वास परत जागृत करणे आणि तिसरे आव्हान म्हणजे बाजारातील कंपनीची घसरलेली पत आणि प्रतिष्ठा परत मिळवणे.

    मी स्पेअर पार्ट मार्केटिंगमध्ये काम करत असल्यामूळे माझा संबंध तिसर्यार आव्हानाशी आला. मार्केटमधील घसरलेली कंपनीची पत आणि प्रतिष्ठा परत कशी मिळवायची या वर चर्चा सुरू झाली. अनेक उपायांचा विचार करण्यात आला. कंपनीचा नवीन आलेला कॉम्पिटिटर दिवसेंदीवस शिरजोर बनत चालला होता. त्याला आवर घालण्यासाठी मार्केटमधील कंपनीची इमेज शक्य तेवढ्या लवकर सुधारणे आवश्यक होते. अनेक उपायांचा विचार केल्यावर कंपनीने वर्तमानपत्रांतील जाहीरातींच्या माध्यमातून कंपनीची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करायचे ठरवले. जाहीराती मुख्यतः दोन प्रकारच्या असाता. एक जाहीरात ही उत्पादनांविषयी किंवा वस्तुंविषयी असते. त्याला ‘प्रॉडक्ट ऍड’ म्हणतात. तर दुसरी जाहीरात ही कंपनीविषयी असते. त्याला ‘कॉर्पोरेट ऍड’ असे म्हणतात. कंपनीने प्रॉडक्ट ऍड आणि कॉर्पोरेट ऍड यांचे मिश्रण करून जाहीराती टाकायचे ठरवले. अशा प्रकारच्या जाहीराती त्या वेळी कोणी टाकत नव्हते, त्या मूळे हा एक नवीन प्रयोगच होता.

    अशा प्रकारच्या ‘ऍड कॅम्पेन’ साठी सक्षम ऍड एजन्सी असावी असे कंपनीला वाटले. त्यासाठी कंपनीने भारतातील त्या वेळच्या चार प्रमुख ऍड एजन्सिजना प्रेझेन्टेशनसाठी बोलावले. ऍड एजन्सीचे प्रेझेन्टेशन हा काय प्रकार असतो याचा मला अनुभव घ्यायची संधी मिळाली. या प्रेझेन्टेशन मधून भारातततील एक प्रसिद्ध आणि आघाडीची ऍड एजन्सी निवडली गेली. यामूळे ऍड एजेन्सीबरोबर काम करण्याचा भरपूर अनुभव मला मिळणार होता.

    त्यानंतर मग प्रत्यक्ष जाहीरातीवर काम सुरू झाले. आधी जाहीरातीचा आकार काय असावा यावर चर्चा सुरू झाली. कंपनीच्या दृष्टीने या जाहीराती महत्वाच्या असल्यामूळे लोकांचे लक्ष लगेच त्याकडे जावे यासाठी काय काय करता येईल यावर विचार विनिमय सुरू झाला. जाहीरातींचा आकार हा ‘कॉलम सेंटिमीटर’ तसेच ‘फुल पेज, हाफ पेज, क्वार्टर पेज’ या भाषेत ठरतो. क्वार्टर पेज (म्हणजे वर्तमानपत्राचे एक चतुर्थौंश पान) हा जाहीरतीचा आकार ठरला. क्वार्टर पेज आकाराचीच पण दोन कॉलम रुंदी असलेली उंच कॉलमसारखी जाहीरात अधीक आकर्षक होईल असे ऍड एजन्सीचे म्हणणे पडले म्हणून तो साईज फायनलाइज करण्यात आला. वर्तमानपत्राच्या कुठल्या पानावर जाहीरात टाकल्याने ती लोकांचे लक्ष वेधून घेते यावर पण बरीच चर्चा झाली. वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावरची जाहीरात सर्वात महाग असते, जस जसे आतल्या पानांकडे जाल तस तसे जाहीरातींचे दर कमी कमी होत जातात असे कळले. दुसर्याआ किंवा तिसर्यात पानावर टाकलेली जाहीरात लवकर लक्ष वेधुन घेते असे एका सर्व्हेमधील पाहणीत आढळून आल्याचे सांगण्यात आले. त्यामूळे वर्तमान पत्राच्या दुसर्याम पानावर जाहीराती टाकायचे ठरले. एकुण तीन जाहीराती टाकायच्या, त्यातील दोन जाहीराती प्रॉडक्ट संबंधी (एक डिझेल इंजिन वाल्यांसाठी तर एक पेट्रोल इंजिन वाल्यांसाठी) तर एक जाहीरात कॉर्पोरेट प्रकारची टाकायचे ठरले.

    जाहीरातीचा साइझ ठरला. कुठल्या पानावर जाहीरात टाकायची हे ठरले. आता महत्वाचा भाग होता तो म्हणजे जाहीरातीचा मजकुर ठरवणे, याला कॉपी असे म्हणतात. कारण जाहीरातीमध्ये ‘कॉपी’ ला फार महत्व असते. आपल्याला नेमके काय सांगायचे आहे हे आधी ठरवावे लागते मगच कॉपी तयार होते. यावर बरीच चर्चा चर्विटचरण झाले. ऍड एजन्सीने कॉपीची एकुण 32 सॅम्पल्स सादर केली. अर्थातच मूळ कॉपी इंग्लीशमध्ये होती. यावर बरीच चर्चा चर्वीटचरण होऊन तीन कॉपीज फायनलाइज करण्यात आल्या. आधी फक्त इंग्रजी भाषेत आणि भारतातील प्रमुख इंग्रजी वर्तमान पत्रातून जाहीराती देण्याचे ठरले. मग हिन्दी आणि महत्वाच्या प्रादेशीक भाषांमधुन पण जाहीराती देणे आवश्यक आहे असे ठरले. त्यामूळे इंग्रजीबरोबर हिन्दी, तामीळ, तेलगु, मल्याळम, कानडी, मराठी, गुजराती, गुरुमुखी, बंगाली, ओरीया आणि आसामी भाषांमधून पण जाहीराती टाकायचे ठरले. यात पुढे उर्दु भाषा पण ऍड झाली. ज्या इंग्लीश कॉपी अप्रुव्ह केल्या होत्या त्याचीच निरनिराळ्या भाषांमध्ये भाषांतर करण्याचे ठरले. यासाठी ऍड एजन्सीने मुंबईतील एका प्रसिद्ध लॅन्वेज ब्युरोची नेमणूक केली. भाषांतरे योग्य झाली आहेत की नाही हे तपासण्यासाठी कंपनीने वेगळा मार्ग निवडला. कंपनीतील ज्या कर्मचार्यां ची मात्तृभाषा कानडी किंवा बंगाली आहे त्यांचेकडे ती भाषांतरे तपासण्यासाठी देण्यात आली. त्यावेळी बंगलोरला मराठी आणि हिन्दी भाषा येणारा मी एकमेव माणुस होतो. त्यामूळे हिन्दी आणि मराठी भाषांतरे माझ्याकडे आली. मराठी भाषांतराची तर बोंबच होती. त्यात बर्यारच सुधारणा कराव्या लागल्या. हिन्दी भाषांतर मात्र अप्रतीम झाले होते. नंतर मला कळले की हे भाषांतर गुलशन नंदा या हिन्दीमधील ज्येष्ट कादंबरीकाराने केले होते. गुलशन नंदा यांच्या हिन्दी कादंबर्याध त्या वेळी फार लोकप्रिय होत्या. त्यांच्या अनेक कादंबर्यांतवर चित्रपट पण निघाले. त्यावेळी त्यांच्या कादंबरीवर आधारलेला राजेश खन्ना आणि आशा पारेख यांचा ‘कटी पतंग’ हा सिनेमा तुफान गाजला होता. यासाठी गुलशनबाबूंनी भरपूर फी उकळली पण भाषांतर मात्र अप्रतीम करून दिले. उर्दु भाषांतर सुद्धा हिंन्दी सिनेजगततील एका प्रसिद्ध कवीने करुन दिले होते.

    कॉपी ठरल्यानंतर महत्वाचा भाग असतो तो म्हणजे लेआऊट. थोडक्यात जाहीरात कशी दिसेल याची मांडणी. आधी जाहीरातीमध्ये कंपनीची प्रॉडक्ट दाखवायची नाहीत, फक्त लोगो दाखवायचा असे ठरले. पण मग नंतर कंपनीच्या प्रॉडक्ट ऍडमध्ये डिझेल इंजीन आणि पेट्रोल इंजीनसाठी लागणारी प्रॉडक्स दाखवावी असे ठरले. आधी जाहीरातीमध्ये माणसाचे चित्र नव्हते. पण जाहीरातीला काहीतरी मानवी चेहेरा असावा असे ठरले. यासाठी आधी काही मॉडेल्स आणि चित्रपट तारकांचा विचार झाला. पण मग कंपनीतीलच एखादा कर्मचारी असावा असे ठरले. उत्तम पर्सनॅलिटी असलेला एक कर्मचारी कंपनीच्या मुंबई ऑफीसमध्ये होताच. त्याची मॉडेल म्हणून निवड झाली. लेआउटची आर्ट वर्क येउ लागली आणि लेआउट पण फायनलाइज होऊ लागले.

    कोणत्या वर्तमानपत्रात जाहीराती टाकायच्या आणि त्यांचे टाईमटेबल काय असावे यावर चर्चा सुरू झाली. रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी जाहीरातींचे दर जास्त असतात. त्यामूळे रविवारच्या सुट्टीच्या अलिकडचा दिवस म्हणजे शनिवार, नंतरचा दिवस म्हणजे सोमवार आणि आठवड्याचा मधला दिवस म्हणून गुरुवार हे दिवस ठरले. दोन जाहीरातींमध्ये 15 दिवसांचे अंतर असावे असे ठरले. टाईम्स ऑफ इंडीया, इंडियन एक्सप्रेस, इकॉनॉमिक टाईम्स, हिन्दू, अमृत बझार पत्रीका या इंग्रजीमधील आघाडीच्या वृत्तपत्रांसह एकूण 54 वर्तमानपत्रे निवडण्यात आली. यांमध्ये मराठीतील सकाळ, लोकसत्ता, तरुण भारत आणि पुढारी ही प्रमुख वर्तमानपत्रे होती. (त्या वेळी महाराष्ट्र टाईम्स बहुतकरून नसावा) या वर्तमानपत्रात जाहीराती कोणकोणत्या तरखांना प्रसिद्ध होणार हे वेळापत्रक त्याचप्रमाणे जाहीरात प्रसिद्ध झाल्यावर त्या वर्तमानप्तराचे तीन अंक बंगलोरला पाठवायचे ऍड एजेन्सीने मान्य केले.

    अशा रितीने ऍड कॅम्पेन दणक्यात सुरू झाले. ठरल्याप्रमाणे कंपनीच्या जाहीराती छापून येऊ लागल्या. जाहीराती छापून आलेल्या अंकांचे गठ्ठे च्या गठ्ठे बंगलोरला येऊ लागले. पेपर मध्ये छापून आलेल्या जाहीराती बघून सगळ्यांचे डोळे सुखावू लागले. फिल्डमधून पण जाहिरातींना उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. ऍड कॅम्पेन सक्सेसफुल झाला आहे असा फिडबॅक येऊ लागला. कंपनीने जाहीरातींसाठी जी मेहेनत घेतली होती आणि भरपूर पैसे खर्च केले होते (त्या वेळी या सर्व कँमेनचा खर्च 17 लाख रुपयांच्या घरात गेला होता. त्यावेळचे 17 लाख म्हणजे आत्ताचे 2 कोटी 93 लाख) ते सत्कारणी लागले असे वाटत होते.

    या जाहीरातबाजीच्या काळात एक गंमतीदार घटना घडली. मी विमानाने बंगलोरहून दिल्लीला निघालो होतो. मला विमानात त्या दिवसाचा टाईम्स ऑफ इंडियाचा अंक मिळाला होता. तो अंक चाळत असताना त्या अंकाच्या दुसर्यां पानावर छापून आलेल्या आमच्या कंपनीच्या जाहीरातीकडे माझे लक्ष गेले. थोड्याच वेळात सुटा बुटातले एक गृहस्थ माझ्या शेजारी येऊन बसले. त्यांनी पण टाईम्सचा अंक चाळायला सुरवात केली. माझ्या कंपनीच्या जाहीरातीवरून त्यांनी दोन तीन वेळा तरी नजर फिरवली असेल. थोड्या वेळाने मला त्यांनी त्यांचा परीचय करू दिला. भारतातील एका प्रसिद्ध वाहन निर्मिती करणार्या् कंपनीचे ते उच्च अधीकारी असल्याचे मला कळले. त्यांनी मला त्यांचे कार्ड पण दिले ते मी शर्टाच्या खिशात ठेवले. मी मग माझा परिचय करून दिला. माझ्या कंपनीचे नाव ऐकताच ते लगेच म्हणाले, ‘तुमच्या कंपनीबद्धल मी नुकतेच काहीतरी वाचले आहे!’
    ‘काय वाचलेत?’ मी कुतुहलाने विचारले.
    ‘नक्की आठवत नाही पण काहीतरी वाचले एवढे मात्र खरे. कदाचीत एखादी बातमी असेल’ ते म्हणाले.
    ‘साधारणपणे केव्हा वाचलेत?’ मी विचारले.
    ‘नक्की आठवत नाही! झाले असतील दोन तीन दिवस!’ ते म्हणाले.
    मला जरा आश्चर्यच वाटले. मी त्यांचे व्हिजिटिंग कार्ड नीट बघीतले आणि उडालोच. ते त्यांच्या कंपनीचे मार्केटिंग डायरेक्टर होते आणि त्यांना काही वेळापूर्वी बघीतलेली आमच्या कंपनीची जाहीरात आठवत नव्हती. तर इतरांची काय कथा?
    मी त्यांना जेव्हा सांगीतले की त्यांनी आमच्या कंपनीविषयी थोड्या वेळापूर्वी या विमानातच वाचले आहे आणि जेव्हा मी त्यांना टाईम्समधली ऍड दाखवली तेव्हा ते जोरात हसले आणि म्हणाले, ‘ आम्ही सुद्धा पूर्वी अशा जाहीराती देत होतो. पण त्याचा काही फारसा उपयोग होत नाही असे लक्षात आल्यावर जाहीराती देणे बंद केले.’ मला काही त्यांचे म्हणणे फारसे पटले नाही तेव्हा त्यांनी मला विचारले, ‘टाईम्समध्ये तुमच्या कंपनीव्यतिरिक्त इतर अनेक जाहीराती आहेत. यातील किती जाहीराती तुमच्या लक्षात आहेत?’ खरोखरच एकही जाहिरात माझ्या लक्षात नव्हती. ‘आपण आपल्या मनाच्या समाधानासाठी जाहीराती टाकत असतो आणि ऍड एजन्सीजना धनवान करत असतो. कारण कुठलिही ऍड एजन्सी घ्या. ती न्युज पेपर ऍड कॅम्पेनच सजेस्ट करत असते. कारण यातच त्यांचा फायदा असतो.’ ते म्हणाले.
    ‘म्हणजे तुम्ही ऍड टाकत नाही?’ मी वाचारले.
    ‘आम्ही आता पॅटर्न बदलला आहे. आम्ही लोकल डिलरला ऍड टाकायला सांगतो आणि त्याचा खर्च आम्ही उचलतो. यामूळे एकतर ऍड परिणामकारक होतात आणि खर्च पण वाचतो!’ ते म्हणाले.

    बंगलोरच्या आमच्या मिटींगमध्ये मी हा किस्सा सांगीतला. पुढे कंपनीने पण तो ऍड कॉम्पेन आवरता घेतला. त्यानंतर या कंपनीने कधी पेपरमध्ये ऍड टाकल्याचे मी तरी पाहीले नाही.

    एकुण जाहीरातबाजी करण्यासाठी किती मेहेनत घ्यावी लागते याची थोडी तरी कल्पना यावी यासाठी मी हा प्रपंच मांडला. तसेच हे एक खर्चीक माध्यम आहे. असे असुनही आज वर्तमानपत्रे, मासीके, टी.व्ही., रेडियो यांच्या माध्यमातून आपल्यावर जाहीरातींचा पाऊस पडत असतो. काही वर्तमानपत्रे तर केवळ जाहीरातींवरच चालतात असे मला आढळून आले आहे. पुण्याचा ‘सकाळ’ हे याचे उत्तम उदाहरण आहे. मी हल्ली पुण्याच्या सकाळचा उल्लेख ‘सकाळ म्हणजे जाहीरतींचा सुकाळ’ असाच करत असतो. अनेक टीव्ही चॅनल तर निव्वळ जाहीरातीवर चालतात. अनेक कंपन्या या जाहीरातींसाठी कोट्यावधी रुपये खर्च करत असतात पण याचा किती उपयोग होतो? एकतर पेपरमध्ये छापून आलेल्या जाहीराती लक्षात रहात नाहीत. टी.व्ही. वरच्या जाहीरातीच्यावेळी अनेक जण टी.व्ही. म्युट करतात. तीच गोष्ट रेडियोवरच्या जाहीरातींची आहे. आता तर जाहीरातींचे तंत्र बदलत चालले आहे. इंटरनेट जाहीरातींचे युग सुरू झाले आहे. यांमध्ये केवळ जाहीरात पाहिल्याबद्दल पैसे मिळण्याची सोय आहे. अमेरिकेतील वर्तमान पत्रांमध्ये तसेच टी. व्ही. वर जाहीराती फार कमी असतात. तेथील वर्तमानपत्रे जाहीरातींची वेगळी सप्लिमेन्ट काढतात जे लोक जपून ठेवतात. टी. व्ही. वर सुद्धा जाहीरातींचा म्हणून वेगळा प्रोग्रॅम असतो. आपल्याकडे अजून हा प्रकार सुरू झाला नाही. काही दिवसांनी या पेपर आणि टी. व्ही. वाल्यांना जाहीराती मिळणे बंद होईल. मग हे लोक काय करतील?

    असो! जाहीरातींना किती महत्व द्यायचे. जाहीरातींच्या या जंगलात स्वतःला किती बुडवायचे आणि आपले आयुष्य किती जाहीरातमय करून टाकायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे.

    तुम्हाला काय वाटते?
    उल्हास हरी जोशी
    मोः-9226846631

    28 May 2017

  • तीर्थशिरोमणी तीर्थराज अक्कलकोट !

    सज्जनहो, आपल्याला प्रश्न पडला असेल की, अक्कलकोटचे महत्व आणि माहात्म्य सर्वांना माहित असताना प्रस्तुत लेखकाने या विषयावर एवढे लिखाण का केले असावे ? तर याचे कारण म्हणजे अक्कलकोटचे महत्व जगात प्रसिध्द आहे, हे जरी त्रिवार सत्य असले तरी, या अक्कलकोटात नेमके काय महत्वाचं आहे ? येथे आल्यावर आपण नेमके काय केले पाहिजे ? याची माहिती व्हावी आणि त्यानुसार आपण अक्कलकोटी आल्यावर वर्तन करावे. या शुध्द हेतूसाठी हे लिखाण केले आहे.

  • देशाचे चित्र बदलत आहे त्याचे कमीतकमी साक्षीदार तरी व्हा

    आठ दिवस घरात असलेली रक्कम खात्यावर भरण्यासाठी थांबलो होतो. नोटा बदलून घेण्याची गरज भासली नाही. बँक खाते आहे. त्या खात्यावर रक्कम भरली आणि लगेच बेअरर चेक नि थोडी रक्कम काढून घेतली. बँकेचे कर्मचारी कल्पना करवणार नाही इतके चांगले वागत होते. सगळ्या खाजगी बँकेत हाच अनुभव येतोय असे लोक बोलतात.
    मध्यम वर्गीय आनंदित !!!!

    या सर्व ५०० आणि १००० च्या नोटा रद्द करण्याच्या देश व्यापी मोहिमेत सर्वात अधिक आनंदित झाला असेल तर तो , नवं श्रीमंत लोकांचे उन्माद पाहून हतबल झालेला सुशिक्षित ,पापभिरू पांढरपेशा वर्ग.ज्यांची दरवाजावर उभी राहण्याची लायकी नाही अशा लोकांकडे प्रचलित राजकारणाच्या मुळे आलेली सुबत्ता पाहून हा सुशिक्षित माणूस पुरता वैफल्य ग्रस्त झाला होता.या देशात प्रामाणिक कामाला किंमत नाही हेच ठाम मत या लोकांचे झाले होते .हे चित्र कुणी बदलू शकेल यावरील विश्वास उडाला होता. राजकारण हे फक्त सामान्य लोकांच्या डोळ्यात धूळ फेक करण्यासाठी असते हेच मत समाजातील मध्यम वर्गाचे झाले होते.

    हा मध्यम वर्गीय पापभिरू माणूस कधीतरी चांगले दिवस येतील आणि आपण नाडले जाणार नाही या भाबड्या आशेवर जगत आला आहे.काही मध्यम वर्गीय ज्यांच्या घरात आजारपण ,लग्नकार्य इत्यादी आहे ते जरा या नोटा बदलण्याच्या प्रक्रियेने नाराज झालेले वाटतात .पण हे एक त्यांचे वयक्तिक कारण सोडले तर हि नाराजी फार काळ टिकणारी नाही.कारण हा धक्का तात्कालीन आहे. साधारण दोन आठवड्यात परिस्थिती सुरळीत होणार आहे. त्यानंतर त्या निर्णयाचे सरकारला अपेक्षित असलेले परिणाम दिसू लागले, तर आजची नाराजी उद्या पाठींब्यातही बदलू शकते.
    गोरे गेले पण काळे प्रचंड लबाड निघाले.!!!

    होऊ घातलेल्या मतदानात व निवडणूकीत काळ्यापैशाचा वापर घटणार याविषयी मतभेद होण्याचे कारण नाही. खरेच तसे घडले, तर गावागावातल्या सामान्य माणसाला त्याची पहिली प्रचिती येऊ शकेल. कारण तिथले गुंड वा खंडणीखोर काळापैसा बाळगणारे, लोकांना परिचीत असतात. त्यांची पैशाअभावी होऊ शकणारी तारांबळ लपून रहाणारी नाही. पैशाच्या बळावर गुंडगिरी करून निवडणूका जिंकणार्‍यांना पायबंद घातला गेला, तरी लोक खुश होऊ शकतात.

    दुसरी बाब आहे, पैशाच्या बाजारातील मूल्यवृद्धीची! मोठ्या प्रमाणात लपवलेल्या बेहिशोबी नोटा व खोटे चलन व्यवहारातून बाद झाले, तरी त्याचा खर्‍या हिशोबी व्यवहाराला लाभ मिळू शकतो. त्याचा अर्थ साठेबाजी वा काळाबाजारी करण्याला आळा बसु शकतो. त्याचा प्राथमिक लाभार्थी सामान्य जनताच असते.

    सामान्य जनता जेव्हा पाठिंबा देते तेव्हाच कुठलीही आंदोलने यशस्वी होतात ॰ सरकारी निर्णया बाबत सुद्धा हेच तत्व लागू आहे.

    देश सुधारण्याची प्रक्रिया ही सततची असली पाहिजे॰ निवडणुकी पूर्वी घेतलेले निर्णय कधी कधी औट घटकेचे ठरतात.या निर्णयाचे असे होऊ नये हीच पंतप्रधानांकडून अपेक्षा ---

    -- चिंतामणी कारखानीस

  • निसर्गकन्या – बहिणाबाई चौधरी – जन्मदिनी मानाचा मुजरा

    लेखिका – उषा शशीकांत जोशी – बहिणाबाई किंवा बहिणाबाईंची गाणी ही मराठी भाषेतील अपूर्व निर्मिती आहे. लौकिक अर्थाने त्‍या अडाणी (अनपढ) निरक्षर होत्या. लेखन, वाचनाच्‍या संस्‍कारांची सुतराम ही शक्यताही नव्हती. त्‍यामुळेच त्यांच्या निसर्गदत्त प्रतिमेबद्दल आश्चर्य वाटावं इतकी त्‍यांची कविता, शब्द, वाक्य, ध्वनी, छंद, यमक, अनुप्रास अशा भाषेच्या नियमांमध्ये पूर्णपणे बसणारी आहे. खरोखर अलौकिक प्रतिमेचं देणं म्हणजे काय याचं प्रत्‍यक्ष उदाहरण म्हणजे बहिणाबाईंची कविता होय.

  • शेतकरी आणि राजा

    गार्डियन वृत्तपत्रात आलेल्या Andrew Brown यांच्या लेखाचा हा अनुवाद. यात गॉर्डन यांनी गुगलमुळे वृत्तपत्रांवर होणाऱ्या परिणामांची चर्चा केली आहे.

  • हवामान बदलाचे गहिरे संकट!

    दुष्काळ, अतिवृष्टी, पूर, गारपीट आदी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीला अवकळा आली आहे. त्यामुळे बदलत्या पर्जन्यमानाचे स्वरूप लक्षात घेऊन शेती पद्धतीतही बदल करण्याची गरज आहे? नैसर्गिक बदलाचे संकेत समजावून घेऊन त्यावर वेळीच उपाय योजल्या गेले नाहीत तर परिणाम अजून दाहक होण्याची भीती आहे. 

  • अ’ ची चौदाखडी 

    अ पासून अ: पर्यंतचे बारा स्वर आणि क पासून क: पर्यंतचा बारा व्यंजनांचा संच असतो म्हणून देवनागरी वर्णमालेत बाराखडी आहे असं समजतात. अिंग्रजीच्या आक्रमणानंतर, अॅ आणिऑ या स्वरांची तसंच कॅ अणि कॉ वगैरे व्यंजनांची सोय करणं आवश्यक होतं. या दोन अक्षरचिन्हांचा समावेश केला की देवनागरीची चौदाखडी होते.

    स्वातंत्र्यवीर सावरकरांनी, १९२४ च्या सुमारास भाषाशुद्धीची चळवळ सुरू केली. त्यात थोडी लिपीशुद्धीही होती. त्यांची तर्कशुध्द विचारसरणी म्हणजे....क ला वेलांटी लावली तर ‘की’ होते आणि ते आपण स्वीकारलं आहे तर अ ला वेलांटी लावून ‘अि’ का स्वीकारू नये? त्यानुसार इ, ई, उ, ऊ, ए, ऐ या चिन्हांबद्दल (अक्षरांबद्दल..स्वरांबद्दल..) अि, अी, अु, अू, अे अै ही स्वरचिन्हं स्वीकारावी.

    आ, ओ, औ, अं आणि अ: ही स्वरचिन्हं आपण आधीच स्वीकारली आहेत. अशारितीनं अ ची बाराखडी जर आपण स्वीकारली तर, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ या स्वरचिन्हांची आवश्यकता राहणार नाही.

    हाच विचार मी पुढे नेला आहे. क ला काना लावला तर ‘का’ होतो तसाच अ ला काना लावून ‘आ’ होतो आणि तो आपण स्वीकारला आहे.

    क ला ओकार लावला तर ‘को’ होतो, तसाच अ ला ओकार लावला तर ‘ओ’ होतो. हा ही आपण स्वीकारला आहे.

    क ला औकार लावला तर ‘कौ’ होतो, तसाच अ ला औकार लावला तर ‘औ’ होतो...तोही आपण स्वीकारला आहे.

    क वर अनुस्वार दिला तर ‘कं’ होतो, तसाच अ वर अनुस्वार दिला तर ‘अं’ होतो, तो ही आपण स्वीकारलाच आहे.

    क ला विसर्ग चिन्ह लावलं तर ‘क:’ होतो, तसाच अ ला विसर्ग चिन्ह लावलं तर ‘अ:’ होतो..तोही आपण स्वीकारला आहे.

    जर, आ, ओ, औ, अं आणि अ: ही स्वरचिन्हं आपण आधीच स्वीकारली आहेत. तर मग....अि अी अु अू अे अै लाच का स्वीकारू नये?

    खरं म्हणजे अै आणि हे मिश्र किंवा जोड स्वर आहेत. अै म्हणजे (अ अि) आणि म्हणजे (अ अु)

    आद्य लिपीकारांना हेच विचार सुचले असते तर ही अक्षरचिन्हं घडविण्याची गरजच नव्हती.

    अिंग्रजीच्या आक्रमणानंतर, अॅ आणि ऑ या स्वरांची सोय करणं आवश्यक होतं. ऑगस्ट, ऑक्टोबर, डॉक्टर, बँक, बॅरिस्टर, अॅक्ट,अॅडव्होकेट वगैरे शब्द मराठीत लिहीतांना अर्धचंद्राच्या सहाय्यानं हे अुच्चार लिहिले यातच मराठी लिपीकारांची प्रतिभा दिसून येते. कौतुकास्पद आहे. नाहीतर हे शब्द आगस्ट, आक्टोबर डाक्टर, आडव्होकेट ब्यांक, ब्यारिस्टर, असे लिहावे लागले असते. पूर्वी ते तसे लिहिलेही गेले आहेत.

    हिंदीत हेच शब्द बैंक,अैक्ट असे लिहीतात. गुजराथी बांधव ऑ चा अुच्चार ओ असा करतात. ते बॉम्ब ला बोम्ब आणि हॉलला होल म्हणतात. अेकदा, बँकेत, अेक अिसम, लोकर पाहिजे … असं म्हणत होता. बँकेत पैसे असतात, याला लोकर कशी मिळणार? नंतर लक्षात आलं. त्याला बँकेचा लॉकर हवा होता.

    पारंपारिक स्वरमालेत ऋ (र्‍हस्व आणि दीर्घ) आणि लृ (र्‍हस्व आणि दीर्घ) हे स्वर समजले आहेत. पण ते स्वरांची व्याख्या पूर्ण करू शकत नाहीत. स्वराचा अुच्चार करतांना, ओठ. दात, टाळू आणि जीभ यांचा अेकमेकांशी स्पर्श व्हावयास नको. नाद केवळ घशातूनच यावयास हवा. स्वरांचा दीर्घ अुच्चार करीत राहता येतो. अऽऽऽऽऽऽ किंवा आऽऽऽऽऽऽ. अीऽऽऽऽऽऽऽ अूऽऽऽऽऽऽऽ.

    अै आणि हे शुध्द स्वर नाहीत, मिश्र किंवा जोड स्वर आहेत. अै म्हणजे (अ अि) आणि म्हणजे (अ अु). अैऽऽऽऽऽऽ आणि औऽऽऽऽऽऽऽऽ.

    अॅऽऽऽऽऽऽ आणि ऑऽऽऽऽऽऽऽ. म्हणूनच अॅ आणि ऑ हे स्वर समजले जातात.

    तसं व्यंजनांच्या बाबतीत होत नाही. कऽऽऽऽऽ.

    ऋ आणि लृ अुच्चारतांनाही तसं होत नाही. यास्तव ही अक्षरचिन्हं, स्वर नाहीत म्हणून त्यांचा स्वरमालेत समावेश करता येत नाही. ऋऽऽऽऽऽऽऽ. लृऽऽऽऽऽऽऽऽ

    वरील विवेचनानुसार अ ची चौदाखडी येणेप्रमाणे स्वीकारावी ::

    अॅ अि अी अु अू अे अै अं :

    महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागानं, ६ नोव्हेंबर २००९ रोजी अेका अध्यादेशानं, मराठीचे स्वर आणि व्यंजनं स्वीकारली. त्यात पारंपारिक स्वरांबरोबरच अॅ आणि ऑ हे स्वर स्वीकारले पण अ ची बाराखडी मात्र स्वीकारली नाही, ती आता स्वीकारावी असं वाटतं.

    पण जनताजनार्दनानं हे स्वर कित्येक वर्ष आधीच स्वीकारले आहेत. १९७६ साली प्रकाशित झालेल्या प्रा. देशपांडे यांच्या अिंग्रजी-मराठी शब्दकोशात, ऑगस्ट, ऑक्टोबर, बँक,बॅरिस्टर हे शब्द असेच छापले आहेत.

    स्वातंत्र्यवीर सावरकरांनी, १९३० ते १९३७ या कालखंडात १७ विज्ञाननिष्ठ निबंध आणि २ काव्यं लिहीली आणि हे सर्व साहित्य किर्लोस्कर मासिकानं प्रसिध्द केलं. या सर्व साहित्यात अ ची बाराखडीच वापरली आहे. मीही ही बाराखडीगेल्या ४०-५० वर्षांपासून माझ्या सर्व लिखाणात वापरतो आहे. सावरकरांची ही दोन्ही पुस्तकं माझ्याजवळ आहेत...त्यांचा संदर्भ, मी नेहमी घेतो. ही पुस्तकं, दादरच्या शिवाजी अुद्यानाजवळ असलेल्या सावरकर स्मारकात विक्रीस ठेवलीआहेत.

    मराठी विज्ञान परिषद, मुंबअी आणि विज्ञान प्रसार, दिल्ली यांच्या सहकार्यानं, अेप्रिल २०११ मध्ये, मराठीतील विज्ञान विषयक लेखन....कालखंड १८३० ते १९५० हा ग्रंथ, दोन खंडात प्रसिध्द केला. या कालखंडात, मराठीतून प्रसिध्द झालेले ९८१ लेख, खूप परिश्रमानं संकलीत करण्यात आले होते. आर्थिक मर्यादा असल्यामुळं, फक्त २० टक्केच लेख निवडावे असं ठरलं. यापैकी वैचारिक लेखांची निवड करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली होती. तेव्हा माझ्याअसं लक्षात आलं की, सुमारे १९३० ते १९४० या कालखंडात, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आणि काही अितरही नामवंत लेखकांनी अ ची बाराखडी वापरली आहे. त्या काळी संगणक नव्हते. परंतू त्यांनी सुचविलेली ही बाराखडी आजच्या संगणकयुगात फार अुपयोगी आहे असं वाटतं. पण आता ती कुणीच वापरतांना आढळत नाही. असं का व्हावं कळत नाही.

    आता ही अ ची चौदाखडी सर्व मराठी प्रेमीजनांनी हट्टानं वापरावी अशी माझी नम्र सूचना आहे. महाराष्ट्र शासन, वृत्तपत्रं, मासिकं, मराठी जाहिरातदार, मराठी शाळा वगैरेंनी ही चौदाखडी वापरावी. असं करण्यानं होणार आहे... मराठी लिपीसमृध्दी.

    डोळ्यांना आणि मेंदूला, या बाराखडीची सवय, लवकरच होते. आपणही हीच अक्षरचिन्हं वापरावीत.

    ही अक्षरचिन्हं वापरून तयार झालेले काही शब्द ......

    अिंद्र, अिन्द्र, अिंदिरा, अिन्दिरा, अितक्यात, अितीहास, अिच्छा ....अिंडिया.

    मुंबअी, आअी, अीश्वर, अीशस्तवन, अीशान्य, अीर्षा, अीशान, अीशा ....

    अुत्तर, अुपकार, अुपवन, अुकळणं, अुचापत्या, अुंच, अुंट, ....

    अून, अूब, अूर, अूस ....

    अेक, अेकवीस, अेकाअेकी, अेकादशी, अेकूण, अेकवीरा .....

    अैरावत, अैतिहासिक, अैवज, अैवजी, अैहिक ....

    हे शब्द वाचतांना काही अडचण आली? लिहीतांनाही कठीण वाटणार नाही.

    -- गजानन वामनाचार्य