(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • निगोड साखर ?

    नावडतीचं मीठ अळणी असं म्हणतात. तसंच मग आणखी कुणाचीशी साखरही निगोड का असू नये? वरवर हा थट्टेचा प्रकार वाटेल. पण खरं पाहता साखरेची गोडी सगळीकडे सारखीच असते असं नाही. अशी ती का बदलते हे समजून घ्यायचं असेल तर आधी साखर म्हणजे काय हेही समजावून घ्यायला हवं.

      April 21, 2011


  • वार्धक्यातील काळजी

    वयाच्या ६० ते ६५ वर्षांपेक्षा मोठ्या व्यक्तींची गणना वृद्ध अशी होते. वृद्ध व्यक्ती सगळ्या सारख्या नसतात. प्रसिद्ध जर्मन पॅथॉलॉजिस्ट व्हर्काव्ह यांनी म्हटलेले आहे, की Man is as old as his arteries. म्हणजे माणसाच्या रक्तवाहिन्या जितक्यास वृद्ध तितका तो वृद्ध असतो. याचा अर्थ प्रत्येक अवयवाला रक्त नेणाऱ्या रोहिण्यांची स्थिती त्या-त्या अवयवाची कार्यक्षमता ठरविते. सगळेच अवयव महत्त्वाचे खरे; पण त्यातल्या माणसाचा मेंदू, त्याचे नेत्रपटल, त्याचे हृदय, मूत्रपिंडे आणि पायांना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या यांच्या स्थितीकडे अधिक कसोशीने पाहिले जाते. वार्धक्याचतील आजारांचे एक वैशिष्ट्य म्हणजे एकाचवेळी अनेक अवयवांत दोष निर्माण होतात. शिवाय आजारांचे स्वरूप तरुण व्यक्तींच्या आजारापेक्षा वेगळे असू शकते. म्हणजे न्यूमोनिया, टॉयफॉइड अशा आजारात लहान वयात ताप येणे हे एक प्रमुख लक्षण असते; तर वृद्ध व्यक्तींना अशा इन्फेक्टि्व्ह आजारांतसुद्धा ताप नसेलही. मात्र विकारसदृश प्रत्येक दोषाचा खोलात जाऊन तपास करणे किंवा त्यावर उपचार करणे आवश्य्क नसते. उदाहरणार्थ एखादा शब्द न आठवणे, व्यक्तीचे, स्थळाचे नाव न आठवणे अशा गोष्टी म्हणजे मेंदूला विस्मृतीचा विकार जडला आहे असा अर्थ नसतो. वार्धक्यात एक महत्त्वाचा भाग ‘दुबळेपणा’चा असतो हे लक्षात घेणे महत्त्वाचे असते. अवयवांच्या कार्यक्षमतेत झालेली घट म्हणजे दुबळेपणा. दीर्घकाळ चालू असणारे दाह, स्नायूंच्या आकारमानात आणि शक्तीत झालेली घट, मज्जासंस्था आणि अंतर्ग्रंथींच्या संस्थेच्या कार्यातील कमजोरी यामुळे शरीराच्या विविध संस्था दुबळ्या व्यक्तींमध्ये तणाव सहन करू शकत नाहीत. अशा दुबळ्या वृद्ध व्यक्तींमध्ये सर्व संस्थांचे कार्य झपाट्याने घटते व मृत्यू ओढवतो. दुबळेपणा मोजता येत नाही; पण चाल संथावते, हाताच्या पकडीतील बळ कमी होते, वजन कमी होते, ऊर्जेचा वापर खालावतो आणि आकलन किंवा समजशक्ती संथावते. असे दुबळेपण दुरुस्त करण्यासाठी निश्चिपत उपाय सापडलेले नाहीत. योग्य प्रमाणात हालचाल करणे आणि थकवा किंवा वेदना टाळणे महत्त्वाचे असते. सकस परंतु पचेल असा आहार आवश्यक असतो. मनाची प्रसन्नता आणि अनुरंजता उपयुक्त ठरते. भविष्याबद्दल आशादायक भावना आणि विचार करता उत्तेजक परिसर असावा. सत्‌-श्रद्धा जोपासावी. डॉक्टर आणि परिचारिका, शुश्रूषा करणाऱ्या व्यक्तींची वृत्ती सहानुभूतिपूर्वक आश्वासक असावी.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

      February 20, 2017


  • १३ ही संख्या अशुभ का मानतात..? ती खरोखरच अशुभ आहे का?

    पुढारलेला असो वा मागास, जगातील प्रत्येक समाजात काही न काही अंधश्रद्धा असतातच! अंधश्रद्धा काही प्रमाणात ‘जगणं’ सुसह्य करतात असंही म्हणता येईल. युरोप-अमेरीकेतील वैज्ञानीक दृष्ट्या पुढारलेला देश असो वा भारतासारखा आध्यात्मीक भगव्या प्रकृतीचा देश असो, अंधश्रद्धा ह्या असायच्याच..!

      January 22, 2015


  • शमी

    ।।वक्रतुण्डाय नम:शमीपत्रं समर्पयामि ।।

    पांडवांनी युध्दात आपले शस्त्रसांभार ठेवायला ह्याच वृक्षाचा आसरा घेतला होता.आणी दसऱ्याला त्यांनी ह्या वृक्षाची पुजा करून मग युद्धाला सुरूवात केली होती.

    ह्याचा लहान व मध्यम उंचीचे काटेरी वृक्ष असतो.ह्याची त्वचा धुरकट व रूक्ष असते.८-१२ अवृन्त पत्रकांच्या जोड्या असलेली पाने असतात.पानांवर बारीक कण असतात.फुले लहान पिवळसर,५-७ सेंमी लांबीची व मंजीरी स्वरुपाची असतात.फळ १०-१५ सेंमी लांब,लंबगोल १०-१२ बिया असणारी शेंग असते.

    ह्याचे उपयुक्तांग आहे त्वचा व फल.
    आता ह्याचे गुणधर्म जाणून घेऊयात:

    त्वचा: चवीला तुरट,कडू असते व थंड गुणाची असून हल्की व रूक्ष असते.
    फल:चवीला गोड,उष्ण,जड व रूक्ष असते.
    शमी ही कफपित्तनाशक आहे.

    आता ह्याचे औषधी उपयोग पाहुयात:

    सालीचा लेप हा विषनाशक आहे.

    फळाची राख हि शरीरावरील रोमशातन अर्थात केस काढायला उपयुक्त आहे.मग ह्याचा वापर बायका हेअर रिमुव्हर म्हणून करू शकतील पण योग्य सल्ल्यानेच बरे.

    शमी कृमिनाशक असल्याने जंतांमध्ये उपयुक्त आहे.

    मुळव्याध,आवपडणे,जुलाब ह्यात देखील हिचा उपयोग होतो.

    त्वचा रोगात हिच्या सालीचा लेप उपयोगी आहे.

    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर,
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      August 3, 2017


  • सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्या …. गूढरम्य डोंगररांगा …

    पावसाळा … सह्याद्रीच्या ऋतुचक्राचा राजा …. आणि दुर्गराज किल्ले रायगडाच्या हिरकणी बुरुजावरून दिसणारा हा सह्याद्रीच्या दुर्गम … जंगली मुलुखाचा नजारा … घनघोर कोसळणारा पाऊस खऱ्या अर्थाने बघायचा … अनुभवायचा असेल तर सह्याद्रीच्या गाभ्यात वसलेल्या किल्ले रायगडावर जायला हवं …टकमक टोकावरून दिसणारं काळ नदीचं खोरं … कोकणदिवा … लिंगाण्याचे थोरले डोंगर …. कडे … एकीकडे भवानी कडयावरुन दूरवर दिसणारे राजगडाचे डोंगर … तर हिरकणी बुरुजावरून दूरवर असलेल्या जावळीच्या निबिड अरण्याने वेढलेल्या शंभू महादेव डोंगररांगा … त्यावरचा प्रतापगड… रायगडाचा सगळा घेर प्रचंड मोठा …फोटोत त्यातल्या एका बाजूची थोडी कल्पना येईल

      August 4, 2019


  • श्री संत  दामाजीपंत

    श्री दामाजी पंत, महान विठ्ठल भक्त
    होवून गेला एक संत, मंगळवेढे गावी ।। १।।

    जेथे असे प्रभूभक्ति, तेथे वसे दया, क्षमा, शांति
    दुरितांसाठी मन कळवळती, त्यांचे हृदयीं ।। २।।

    विचार गरीबांचे मनी, सेवा दीनांची करूनी
    भाव विठ्ठला चरणी, अर्पिले असे ।। ३।।

    नाम घेतां विठ्ठलाचे, काम करीता जनांचे
    आनंदी भाव तयांचे, मनीं येई ।। ४।।

    दामाजीची कथा ऐकूनी, भान जाई हरपूनी
    प्रभू येई सेवक बनूनी, भक्तासाठीं ।।५।।

    दामाजीपंत मामलेदार, मोठा त्यांचा अधिकार
    म्हणून ते जिम्मेदार सरकारात ।।६।।

    धान्याची भरती कोठारे, ठेवूनी त्यावरी पहारे
    अधिकार दामाजीस सारे, धान्याच्या वाटपाचे ।।७।।

    राज्यात परिस्थिती दुष्काळीं, पडूं लागले भूकबळीं
    दु:खी जनता सगळी, हा: हा कार माजला ।।८।।

    समोर धान्यांच्या राशी, बाहेर लोक मरती उपाशी
    सहन न होई दामाजीसी, बघूनी हे सारे ।।९।।

    राजानें हुकूम देऊन, धान्य ठेवले सांठवून
    न वापरावे सामान्य जन, त्या धान्यासी ।। १०।।

    धान्याचे साठे बहूत, करूनी लोकांसी वंचित
    दु:खी त्यासी बघत, हर्ष होई राजासी ।।११।।

    लोकांसी बघूनी भूके, दामाजीस होई दु:खे
    कसे हे संत देखे, शांत राहूनी ।।१२।।

    विठ्ठल नाम मनीं, कोठारे दिली उघडूनी
    भूकेल्यास दाना-पाणी, देई दामाजीपंत ।।१३।।

    लोकांस आनंदी बघूनी भान जाय हरपूनी
    नाचू लागला तल्लीन होऊन, विठ्ठलाचे भजन करीं ।।१४।।

    सारे कोठार लुटविले, प्रत्येक जीवा प्रभू संबोधले
    त्यांच्या आनंदी एकरूप झाले, दामाजीपंत ।।१५।।

    दुसऱ्याच्या आनंदाचे भाव, स्वत:चे मनी घेई ठाव
    तेथेची जाणावा देव, हेच असती सत्य ।।१६।।

    भुकलेले व्याकूळ जीव, मिळता धान्यराशी ठेव
    उचंबळून येती आनंदी भाव, नाचू लागली सारी ।।१७।।

    दामाजीस न राही भान, तल्लीन होती नाच नाचून
    विठ्ठल नामाचा गजर करून, तादात्म्य झाले प्रभूशी ।।१८।।

    बातमी कळली राजाला, क्रोध मनी आला
    अटक करण्या हुकूम दिला, दामाजी पंतासी ।।१९।।

    प्रभूची लीला न्यारी, ज्याचे तो तारण करी
    कुणी न त्यासी मारी, सांभाळ करी भक्ताचा ।।२०।।

    काटा रूते भक्तचरणी, येई पाणी प्रभू नयनीं
    नाते घ्यावे समजोनी, प्रभू भक्ताचे ।।२१।।

    भक्त असता संकटी, धावून येती पाठी
    सुटका करती जगत्‍जेठी, पाठीराखा बनून ।।२२।।

    विश्वाचा अधिनायक, भक्तासाठी बने सेवक
    हेच भक्तीचे गूढ एक, समजोनी घ्यावे ।।२३।।

    समजण्या हे सारे, उघडावी मनाची द्वारे
    वाहू द्या भक्तीचे वारे, अंतर्मनी तुमच्या ।।२४।।

    सेवक होवूनी जगत्‍जेठीं, घेवूनी घोंगडी पाठी
    हातीं घेती काठी, राज दरबारी आला ।। २५।।

    मज म्हणती विठू सेवक, दामाजीचा मी हस्तक
    धान्यराशी विकूनी ठीक, आणली असे ती रक्कम ।।२६।।

    उलटी करूनी घोंगडी, मोहरांची रास पाडी
    थक्क करूनी सोडी, राजाला ।।२७।।

    चकीत झाला राजा, विस्मयीत होई प्रजा
    कसा देवू मी सजा, दामाजी पंतासी ।।२८।।

    दामाजीचा आदर करी, जाणूनी विठ्ठल त्याचे उरी
    लोळण घेतले चरणा वरी, दामाजी पंताच्या ।।२९।।

    करमणूकीची आहे कथा, समजण्या वाटते कठीणता
    पाहीजे मनोभावाची उच्चता, कळण्यास हे तत्त्वज्ञान ।।३०।।

    दामाजीची कहाणी, दान धर्माचे प्रतीक म्हणोनी
    दुरीतांचे दु:ख, जाणोनी ग्रहण करावी सर्वांनी ।।३१।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    १६-१५११८३

      January 16, 2018


  • सांगेन गोष्टी हिताच्याच चार – भाग बारा

    जगण्याची साधी सोपी सूत्रे - एकशे चौपन्न
    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - भाग तेरा
    सांगेन गोष्टी हिताच्याच चार - भाग बारा

    जगण्याचे साधे सोपे नियम सांगताना ग्रंथकार पुढे म्हणतात,
    बुडण्याचा भय असेल, अशा छिद्र असलेल्या किंवा फुटक्या नावेत बसू नये, किंवा जे झाड पडणारे असते, त्यावर चढू नये.
    यात आपलेच नुकसान होणार हे नक्की असते.

    आजच्या काळानुसार जी बॅक बुडणारी आहे, त्यात पैसे ठेवू नयेत, किंवा कमी काळात दाम दुप्पट वगैरे फसव्या योजनेत पैसे गुंतवू नयेत. मल्टीलिंक मार्केटिंग हा परदेशी फंडा आहे. आपली गुंतवणुक सोडवून घेण्यासाठी दुसऱ्याला आत गुंतवायचे असा सरळ सरळ अर्थ म्हणजे एम एल एम.

    कमी पाणी असलेल्या एका विहिरीत पडलेल्या बोकडाला वर येण्यासाठी, एक बोकड धडपडत असतो. पण वर येता येत नाही. "व्वा, पाणी किती गोड आहे, पिऊन तर बघा !" असे आमिष इतरांना दाखवल्यावर, काठावरून जाणाऱ्या दुसऱ्या बोकडाला, पाणी चाखून बघावेसे वाटते. म्हणून दुसरा बोकड इतर कोणताही विचार न करता, आत उडी मारतो. त्याच्या डोक्यावर पाय ठेवून पहिला बोकड केव्हा विहिरीबाहेर पडतो, ते दुसऱ्याला कधी कळतच नाही, मग तीच युक्ती दुसरा बोकड, तिसऱ्या बोकडासाठी वापरतो याला म्हणतात, मल्टी लिंक !
    यात प्राॅडक्ट म्हणून काहीही साधन वापरले जाऊ शकते. मग ती बदकाच्या पिसाची गादी असेल, नाहीतर भादरलेल्या बोकडाची दाढी असेल, नाहीतर एखादे लाॅकेट असेल वा लोहचुंबक असेल, खेळण्यातली गोल्डन डाॅल असेल वा एखादे दंतमंजन असेल. झटपट पैसे मिळवण्यासाठी काहीही फंडे वापरले जातात, पश्चात ताप होऊ नये, यासाठी सावध तो सुखी, हे सूत्र लक्षात ठेवावे.

    मातीचे ढेकूळ, दगड वा फळ मारून, (आपल्या किंवा इतरांच्या ) झाडावरचे फळ तोडू नये.
    हा मारलेला दगड परत आपल्याच डोक्यावर पडण्याचा संभव असतो, वा कुणाचे तरी नुकसान करणारा असतो. कुणा व्यक्तीचे नाही झाले तरी झाडाचे नक्कीच होते. गरज नसताना दुसरे कच्चे फळ पडणे, झाडावरील घरट्यातील पक्ष्यांच्या पिल्लांना धोका पोचणे, किंवा पलीकडील घराची कौले फुटणे यापैकी काहीही होऊ शकते. अगदीच काही नाही झाले तर असा शेजारी किंवा झाड मालक जेव्हा पाठ धरून बोंबलत येतो तेव्हा सैराट होऊन धावताना आपल्याला इजा होऊ शकते.

    परवानगी घेऊन अथवा न घेता कोणाच्याही घरात, दाराचा वापर न करता अन्य मार्गाने घुसू नये.

    दुसऱ्याच्या घरात आपण एकट्यानेच कोणाला सांगितल्या शिवाय, किंवा कोणी सांगितल्याशिवाय खुर्चीवर वा उच्च आसनावर बसू नये.

    नंतर खुर्ची सोडावी लागली तर ते दुसरे दुःख कोणते नसते. विशेषतः व्यासपीठावर बसणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे.

    झोपी गेलेल्यास उठवू नये, हे पण ग्रंथकार लिहितात. पण ही सूचना शाळा काॅलेजमधे वर्गात झोपा काढणाऱ्यांसाठी सांगितलेली नसून, अति श्रमाने जो दमलेला आहे, किंवा ज्याला खरोखरच विश्रांतीची गरज आहे, अशा मंडळींकरीता आहे हे सूज्ञांनी लक्षात घ्यावे.

    रात्रभर वाॅटसप चालवून दमल्याभागल्यांसाठी हा नियम लागू होत नाही. अशा मंडळीना उठवताना नाकी नऊ येतात. यांना उठवण्यासाठी हळुच यांच्या कानात म्हणावे, "मोबाईलला लाॅक टाकायला विसरला आहेस, की स्वारी टुणकन उठून बसेल बघा !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.
    १२.०९.२०१७

      September 12, 2017


  • साडेतीन एकरावर ‘पुस्तकाचे गाव’

    ब्रिटन मधील हरफोर्डशायर येथे 'ऑन वे' या नावाचे गाव असून हे गाव पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाते. त्याच पध्दतीने महाराष्ट्रातही, स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असणारे महाबळेश्वर तालुक्यातील भिलार हे गाव आता ‘पुस्तकाचे गाव’ या रूपाने वाचन संस्कृतीसाठी समृद्ध झाले आहे. देशातील हा पहिला महाराष्ट्र शासनाने राबवला असून या प्रकल्पामुळे महाबळेश्वर तालुक्याचा देशात नावलौकिक उंचावला आहे. या योजनेंतर्गत भिलारमधील नव्या भूखंडावर सुमारे साडेतीन एकरावर हे ‘पुस्तक गाव’ विकसित करण्याची योजना आहे. यामध्ये विविध प्रकारची साहित्य दालने असतील. त्यात शेती, स्पर्धा परीक्षा याचीही माहिती यातून मिळेल. अत्याधुनिक दृकश्राव्य दालनात ई-बुक्स व आॅडिओ बुक्सही उपलब्ध असतील. तसेच या योजनेत निवडलेल्या घरांमध्ये विविध प्रकारची पुस्तके ठेवली गेली असून, त्याद्वारे वाचनसंस्कृती जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. त्या घरांमध्ये तसे पूरक वातावरण तयार केले केले गेले आहे.

    ‘पुस्तकाचे गाव’ या प्रकल्पाची वैशिष्ट्ये...
    साहित्यिकांच्या भेटीद्वारे रसिकांशी सातत्यपूर्ण संवाद लेखन, वाचन, संपादन, मुद्रितशोधन याबाबत प्रशिक्षण कार्यशाळा होतील शैक्षणिक सहलींसाठी अनुकूल वातावरण, साहित्यिकांच्या भेटी ठरवता येतील. गावात कायमस्वरूपी कविकट्टा व अभिवाचन कट्टा असेल गावातील सार्वजनिक जागा ग्रामपंचायत, समाजमंदिर, शाळा येथे वाचनकट्टे तयार करण्यात येणार आहे.

    घरांचे वाचनालय.. गावाचे ग्रंथालयात रूपांतर...
    महाराष्ट्र शासनाने भिलार या गावाला या पायलट प्रोजेक्टसाठी निवडले असून, यासाठी ग्रंथालय, पुस्तके व यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधांसाठी आर्थिक तरतूद केली आहे. या माध्यमातून भिलारकडे उच्च दर्जाचे क्षेत्र म्हणून पाहिले जाणार आहे. तर रोजगार व आर्थिक स्थैर्य ही लाभणार आहे. त्यामुळे भिलारमधील घरांचे छोट्या वाचनालयात तर गावाचे मोठ्या ग्रथांलयात रूपांतर झाले आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      April 19, 2017


  • अनोखा भीमपलासी

    आपल्या रागदारी संगीतात काही राग असे आहेत, की त्यांना "अचाट" असेच विशेषण लावावे लागेल. अशा रागांच्या यादीत, भीमपलासी रागाचे नाव अवश्य घ्यावे लागेल. भीमपलासी रागाचे वर्णन करणे फार अवघड आहे. अनेक कलाकार या रागाच्या विविध छटांचे असे काही अकल्पित दर्शन घडवतात की, त्या क्षणापुरते तरी, ते दर्शन, हीच या रागाची ओळख मनात ठसते. भीमपलासी रागाबाबत असे विचार वारंवार मनात येतात - या रागाची नेमकी ओळख काय? एका दृष्टीने बघायला गेल्यास, आपल्या संस्कृत ग्रंथात प्रत्येक रागाचे आणि पर्यायाने स्वरांचे वेगवेगळ्या पद्धतीने वर्णन केल्याचे वाचायला मिळते परंतु त्याला शास्त्राधार फारसा मिळत नाही. अर्थात, परंपरेने निर्माण केलेले संकेत, संस्कार याचा जबरदस्त पगडा आपल्या मनावर होत असतो आणि आपल्या विचारांची ठेवण देखील याच अनुषंगाने होत असते. रागाचा समय, ही संकल्पना देखील याच दृष्टीकोनातून तपासून घेणे, गरजेचे आहे. असो, हा भाग सगळा "वैय्याकरण" या विषयाच्या अधिपत्याखाली येतो.
    भीमपलास रागाचा विचार करता, याचे "औडव-संपूर्ण" स्वरूप तर लगेच ध्यानात येते. आरोहात, "रिषभ" आणि "धैवत" स्वर वर्ज आहेत तर अवरोही सप्तकात, सगळे स्वर लागतात. अर्थात, "कोमल निषाद" आणि "कोमल गंधार" हे स्वर या रागाची खरी ओळख ठरवतात. अर्थात' "मध्यम" स्वराचा "ठेहराव" हे सौंदर्यलक्षण आहे. भीमपलास म्हटला की एक किस्सा वारंवार वाचायला मिळतो - बालगंधर्वांचा "स्वकुल तारक सुता" या गाण्यात आरोही स्वरातील "धैवत" स्वराचा वापर. भारतीय संगीत एका बाजूने शास्त्राला प्रमाणभूत मानणारे आहे पण तरीही कलाकार तितकाच तोलामोलाचा असेल तर "वर्जित" स्वराचा वापर करून, त्याच रागाची नवीन "ओळख" करून दिली जाते. हेच गाणे जरा विस्ताराने विचारात घेतले तर आपल्याला भीमपलास राग समजतो.
    बालगंधर्व "लयकारी" गायक होते, हे फार ढोबळ वर्णन झाले. केवळ ताल आणि त्याची पातळी लक्षात घेतली तरी तालातील कुठलाही "कालबिंदू" चिमटीत पकडावा तसे ते नेमका पकडीत असत, तसेच मात्रांच्या सूक्ष्म कणांशी क्रीडा करणे, हे त्याचे खास वैशिष्ट्य मानावे लागेल. सुरावटींचा पुनरावतार असावा पण पुनरावृत्ती टाळावी, हे ध्यानात येते. एका मागोमाग एक आणि एका वेळेस एक स्वर घेणे, हे बहुतेक गायकांच्या बाबतीत संभवते परंतु एकाच वेळेस एका स्वराबरोबर इतर स्वरांच्या सान्निध्यात वावरणे, हे फार अवघड असते. वास्तविक हा भाग "श्रुती" या संकल्पनेत येतो. आवाज फार बारीक नव्हता पण लगाव नाजूक होता पण अस्थिरता नव्हती.
    "स्वकुलतारक सुता" या गाण्यात बालगंधर्व नेमके याच पद्धतीने गायले आहेत. गाण्याच्या अगदी पहिल्या सुरांपासून नखशिखांत भीमपलास राग. या गायनातील "ताना","हरकती" इत्यादी अलंकार ऐकायला घेतले तर, मी जे वर मांडले आहे, त्याचीच सुयोग्य प्रचीती येऊ शकते. गायनात, तालाच्या प्रत्येक मात्रेबरोबर बालगंधर्व खेळ खेळत आहेत पण असा खेळ खेळताना, शब्दोच्चाराकडे चुकूनही दुर्लक्ष होत नाही आणि गायनाच्या क्रीडेत या गोष्टीला फार महत्व आहे. बरेचवेळा, बहुतेक गायक, गायनाच्या आहारी जाताना शब्दांकडे अक्षम्य दुर्लक्ष करतात पण असे बालगंधर्वांच्या बाबतीत अपवादात्मकरीत्या घडते.
    आता आपण पंडित कुमार गंधर्व यांचा भीमपलासी विचारात घेऊया. " ये ना, आज तू जानु रे" या रचनेत देखील आपल्याला, "ध, नि सा" अशी अफलातून स्वरसंगती ऐकायला मिळते. एकूणच कुमार गंधर्वांचे गायन म्हणजे रागाच्या व्याकरणावर किंवा क्रमवारतेकडे लक्ष न वेधता, रागाच्या भावस्थितीवर ध्यान केंद्रित करण्याचा नेहमी प्रयत्न असायचा. मघाशी मी म्हटले तसे, "वर्जित" स्वरांशी सलगी करून त्यांना, त्यांचा रागांत प्रवेश करवून, त्या रागाचे सौंदर्य आणखी वेगळ्या दृष्टीने वाढवायचे, असा गायनाचा बराचसा कल होता. रागाचे आलाप, बोल-आलाप, बोलतान आणि तान असा प्रवास त्यांना फारसा मान्य नव्हता. आवाज पातळ, टोकदार होता आणि लयीचे बारकावे टिपू शकणारा होता. तसे बघितले तर गायनात बरेचवेळा, "ग्वाल्हेर","जयपुर","किराणा" इत्यादी घराण्यांची गायकी दिसते आणि तरी देखील "भावगर्भता" आढळते. बरेचवेळा असे जाणवते, यांच्या गायकीवर "टप्पा" पद्धतीचा प्रभाव आहे. टप्पा चमकदार असतो, क्रमाक्रमाने सावकाश पुढे जाणे यापेक्षा मधले स्वरपुंज अल्प विस्तारासाठी घेऊन मग पुन्हा चपलगतीने पुढे झेपावणे आहे, हीच त्यांच्या गायकीचे खरी ओळख वाटते आणि हे सगळे या रचनेत आपल्याला अनुभवता येईल.
    "है चांद सितारो में चमका तेरा बदन की
    हर फुल से आती है मेहेक तेरा बदन की
    "है चांद सितारो मे चमका" ही थोडी अनवट, अप्रसिद्ध गझल मी इथे घेतली आहे. "अहमद हुसेन","मुहमद हुसेन" या जोडीने ही गझल गायली आहे. हल्ली गझल गायन म्हणजे "गायकी" असा एक प्रघात बनला आहे. सगळ्यांनाच तसे गायन करणे जमत नाही आणि बरेच वेळा तशा प्रकारचे गायन फार "वरवरचे" होते. गझल भावगीताच्या अंगाने देखील गायली जाऊ शकते - तलत मेहमूद याचे उत्तम उदाहरण. इथे देखील त्याच अंगाने गझल गायली गेली आहे.
    अर्थात जरी भावगीताच्या अंगाने गझल गायली तरी, लयीचे वेगवेगळे बंध, वाद्यमेळातून चालीची खुमारी वाढवायची तसेच निरनिराळ्या हरकतीमधून "अवघड" गायकीचा प्रत्यय देता येतो. मोजकीच वाद्ये असल्याने, रचनेचा "कविता" म्हणून आस्वाद घेता येतो आणि रचना आपल्याला अधिक समृद्ध करून जाते.
    आता लताबाईंचे एक अतिशय गाजलेले आणि तरीही दर्जाच्या दृष्टीने अतुलनीय असे गाणे आपण ऐकायला घेऊया. भीमपलासी रागाची ओळख या गाण्यातून फार जवळून घेता येते.
    "नैनोंमे बदरा छाये, बिजली सी चमके हाये
    ऐसे में बलम मोहे गारवा लगा ले".
    सतारीच्या पहिल्याच सुरांतून आपण या रागाची ओळख करून घेऊ शकतो. गाण्याची चाल तर श्रवणीय नक्कीच आहे पण, गाण्यात अनेक "जागा" अशा आहेत, तिथे गायला केवळ हाच "गळा" हवा, याची खात्री पटते. "नैनो मे बदरा छाये" हेच ते गाणे. संगीतकार मदन मोहन आणि लताबाई यांनी अनेक अजरामर गाणी दिली आहेत तरी या गाण्याची "लज्जत" काही और आहे.
    गाणे जरा बारकाईने ऐकणे जरुरीचे आहे कारण, इथे प्रत्येक शब्दामागे किंवा ओळ संपताना अतिशय नाजूक, बारीक हरकती आहेत, ज्या केवळ चालीचे सौंदर्य वाढवीत नसून, कवितेतील आशय अधिक समृद्ध करीत आहेत. राजा मेहदी अली या शायराची कविता आहे आणि कविता म्हणून देखील अतिशय वाचनीय आहे. वास्तविक,मदन मोहन म्हणजे चित्रपटातील गझलेचा "बादशाह" अशी प्रसिद्धी आहे आणि तशी ती गैरलागू नाही पण तरीही प्रस्तुत गाणे त्या पठडीत बसणारे नाही आणि तसे नसून देखील अतिशय श्रवणीय आहे. या गाण्यावर खरे तर विस्ताराने लिहावे, अशा योग्यतेचे गाणे आहे.
    मराठी गाण्यात एकूणच सोज्वळता अधिक आढळते आणि तसे ते संस्कृतीला धरून आहे परंतु काही गाण्यांत विरोधाभासातून उत्तम निर्मिती झाल्याचे दिसून येते. माडगूळकरांचे शब्द आणि बाबूजींची चाल, याचा या गाण्यात अतिशय सुंदर मिलाफ झालेला दिसतो.
    "धुंद येथ मी स्वैर झोकितो" हेच गाणे मी इथे विचारात घेतले आहे. दोन अत्यंत विरुद्ध टोकाच्या भावनांची सुरेख चित्रे कवितेत वाचायला मिळतात. भीमपलासी रागाची अत्यंत समर्थ तसेच वेगळ्याच अर्थाचे अनुभूती हे गाणे देते.
    "कनकांगीच्या मत्त चुंबने जाग मला आली;
    विरहाश्रू तव असेल झरला सुकलेल्या गाली".
    मघाशी मी "विरुद्ध टोकाच्या भावना" असे जे म्हटले ते याच ओळीच्या संदर्भात. माडगूळकरांच्या रचनेत, बरेचवेळा संस्कृतप्रचुर शब्द येतात जसे इथे "कनकांगी" हा आहे आणि काही वेळा, त्यांच्यातील न्यूनत्व दाखवण्याच्या मिषाने पण, असे शब्द वापरणारे, माडगुळकर एकमेव कवी नव्हेत. एक मात्र नक्की मान्यच करावे लागेल, भावगीतासाठी लागणारी शब्दरचना जर का "गेयतापूर्ण" असेल तर चाल बांधायला हुरूप येतो. अर्थात, कवितेची चिकित्सा करणे, या लेखात अभिप्रेत नसल्याने, इथेच पुरे.
    मराठीतील अप्रतिम भजन रचनांमध्ये "इंद्रायणी काठी" हे गाणे फार वरच्या क्रमांकावर घ्यावे लागेल. या गाण्याची लोकप्रियता, इतकी वर्षे झाली तरी तसूभर देखील कमी नाही. किंबहुना, ही शब्दकळा माडगूळकरांची आहे की कुण्या संतांची आहे, इतका संभ्रम पडावा, इतकी गेयतापूर्ण आहे आणि कवी म्हणून हे माडगूळकरांचे निश्चित श्रेष्ठत्व म्हणावे लागेल.
    "इंद्रायणी काठी, देवाची आळंदी,
    लागली समाधी, ज्ञानेशाची"
    अभंग वृत्तात नेमकी चपखल बसणारी रचना, संगीतकार पु.ल.देशपांडे यांच्या हातात आली आणि त्यांनी, चाल बांधताना, भीमपलास रागाचा "अर्क" म्हणावा, अशी सुरावट शोधून काढली आणि पंडित भीमसेन जोशी यांच्या हाती दिली. आज या रचनेला जवळपास ५० वर्षे होऊन गेली तरी देखील चालीचा गोडवा जरा देखील कमी होत नाही. गाण्याला चिरंजीवित्व मिळते, ते असे. गाण्याच्या सुरवातीपासून या रागाची आठवण येते पण तरीही शास्त्रोक्त बाजू पडताळली तर रागापासून किंचित फटकून अशी या गाण्याची चाल आहे.
    अशाच प्रकारचे एक सुंदर गाणे "नौबहार" चित्रपटात आहे. गाण्याची चाल भीमपलास रागावर निश्चित आहे तरीही गाणे म्हणून स्वत:ची स्वतंत्र ओळख आहे.
    "एरी मैं तो प्रेम दिवानी, मेरा दर्द ना जाने कोई"
    अतिशय शांत चाल आहे. संगीतकार रोशन यांची चाल आहे आणि चाल बांधताना, शब्दांचे औचित्य सांभाळण्याची कसरत अप्रतिमरीत्या संगीतकाराने केली आहे. ही बाब वाटते तितकी सहजशक्य नसते. लताबाईंचा कोवळा,नाजूक आवाज या गाण्याला कमालीचा खुलवतो. भीमपलास रागाची हीच कमाल आहे. एकाबाजूने प्रणयी भावनेचा अत्युत्तम आविष्कार घडवतो तर दुसऱ्या बाजूने विरही भावनेची व्याकुळता देखील तितक्याच तरलतेने आविष्कृत करतो. भारतीय रागसंगीत फारच श्रीमंत होते, ते अशा वैविध्याने.
    - अनिल गोविलकर

      September 7, 2018


  • “औद्योगिक-शांतता की,स्मशान-शांतता? मजूर-कंत्राटदारी की,औद्योगिक-अस्पृश्यता?”

    ही ’इंटरनॅशनल् लेबर ऑर्गनायझेशन्च्या‘ जिनिव्हा (स्वित्झर्लंड) येथील कार्यालयाच्या दर्शनी भागावर लिहिलेली घोषणा, हल्ली मला बकवास वाटू लागलीय. विशेषतः महाराष्ट्राच्या ’कॅनव्हास‘वर तर मराठी कामगार-कर्मचार्‍र्यांची थडगी बांधण्याची ’कंत्राटी‘ कामे, जागोजागी घाऊक पध्दतीनं चालू असताना… अशासारखं घोषवाक्य आपल्याला वाकुल्या दाखवत अंतःकरणात दूर कुठेतरी कळ उमटवून जातं.

      January 2, 2012