वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
नावडतीचं मीठ अळणी असं म्हणतात. तसंच मग आणखी कुणाचीशी साखरही निगोड का असू नये? वरवर हा थट्टेचा प्रकार वाटेल. पण खरं पाहता साखरेची गोडी सगळीकडे सारखीच असते असं नाही. अशी ती का बदलते हे समजून घ्यायचं असेल तर आधी साखर म्हणजे काय हेही समजावून घ्यायला हवं.
April 21, 2011
वयाच्या ६० ते ६५ वर्षांपेक्षा मोठ्या व्यक्तींची गणना वृद्ध अशी होते. वृद्ध व्यक्ती सगळ्या सारख्या नसतात. प्रसिद्ध जर्मन पॅथॉलॉजिस्ट व्हर्काव्ह यांनी म्हटलेले आहे, की Man is as old as his arteries. म्हणजे माणसाच्या रक्तवाहिन्या जितक्यास वृद्ध तितका तो वृद्ध असतो. याचा अर्थ प्रत्येक अवयवाला रक्त नेणाऱ्या रोहिण्यांची स्थिती त्या-त्या अवयवाची कार्यक्षमता ठरविते. सगळेच अवयव महत्त्वाचे खरे; पण त्यातल्या माणसाचा मेंदू, त्याचे नेत्रपटल, त्याचे हृदय, मूत्रपिंडे आणि पायांना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या यांच्या स्थितीकडे अधिक कसोशीने पाहिले जाते. वार्धक्याचतील आजारांचे एक वैशिष्ट्य म्हणजे एकाचवेळी अनेक अवयवांत दोष निर्माण होतात. शिवाय आजारांचे स्वरूप तरुण व्यक्तींच्या आजारापेक्षा वेगळे असू शकते. म्हणजे न्यूमोनिया, टॉयफॉइड अशा आजारात लहान वयात ताप येणे हे एक प्रमुख लक्षण असते; तर वृद्ध व्यक्तींना अशा इन्फेक्टि्व्ह आजारांतसुद्धा ताप नसेलही. मात्र विकारसदृश प्रत्येक दोषाचा खोलात जाऊन तपास करणे किंवा त्यावर उपचार करणे आवश्य्क नसते. उदाहरणार्थ एखादा शब्द न आठवणे, व्यक्तीचे, स्थळाचे नाव न आठवणे अशा गोष्टी म्हणजे मेंदूला विस्मृतीचा विकार जडला आहे असा अर्थ नसतो. वार्धक्यात एक महत्त्वाचा भाग ‘दुबळेपणा’चा असतो हे लक्षात घेणे महत्त्वाचे असते. अवयवांच्या कार्यक्षमतेत झालेली घट म्हणजे दुबळेपणा. दीर्घकाळ चालू असणारे दाह, स्नायूंच्या आकारमानात आणि शक्तीत झालेली घट, मज्जासंस्था आणि अंतर्ग्रंथींच्या संस्थेच्या कार्यातील कमजोरी यामुळे शरीराच्या विविध संस्था दुबळ्या व्यक्तींमध्ये तणाव सहन करू शकत नाहीत. अशा दुबळ्या वृद्ध व्यक्तींमध्ये सर्व संस्थांचे कार्य झपाट्याने घटते व मृत्यू ओढवतो. दुबळेपणा मोजता येत नाही; पण चाल संथावते, हाताच्या पकडीतील बळ कमी होते, वजन कमी होते, ऊर्जेचा वापर खालावतो आणि आकलन किंवा समजशक्ती संथावते. असे दुबळेपण दुरुस्त करण्यासाठी निश्चिपत उपाय सापडलेले नाहीत. योग्य प्रमाणात हालचाल करणे आणि थकवा किंवा वेदना टाळणे महत्त्वाचे असते. सकस परंतु पचेल असा आहार आवश्यक असतो. मनाची प्रसन्नता आणि अनुरंजता उपयुक्त ठरते. भविष्याबद्दल आशादायक भावना आणि विचार करता उत्तेजक परिसर असावा. सत्-श्रद्धा जोपासावी. डॉक्टर आणि परिचारिका, शुश्रूषा करणाऱ्या व्यक्तींची वृत्ती सहानुभूतिपूर्वक आश्वासक असावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
February 20, 2017
पुढारलेला असो वा मागास, जगातील प्रत्येक समाजात काही न काही अंधश्रद्धा असतातच! अंधश्रद्धा काही प्रमाणात ‘जगणं’ सुसह्य करतात असंही म्हणता येईल. युरोप-अमेरीकेतील वैज्ञानीक दृष्ट्या पुढारलेला देश असो वा भारतासारखा आध्यात्मीक भगव्या प्रकृतीचा देश असो, अंधश्रद्धा ह्या असायच्याच..!
January 22, 2015
।।वक्रतुण्डाय नम:शमीपत्रं समर्पयामि ।।
पांडवांनी युध्दात आपले शस्त्रसांभार ठेवायला ह्याच वृक्षाचा आसरा घेतला होता.आणी दसऱ्याला त्यांनी ह्या वृक्षाची पुजा करून मग युद्धाला सुरूवात केली होती.
ह्याचा लहान व मध्यम उंचीचे काटेरी वृक्ष असतो.ह्याची त्वचा धुरकट व रूक्ष असते.८-१२ अवृन्त पत्रकांच्या जोड्या असलेली पाने असतात.पानांवर बारीक कण असतात.फुले लहान पिवळसर,५-७ सेंमी लांबीची व मंजीरी स्वरुपाची असतात.फळ १०-१५ सेंमी लांब,लंबगोल १०-१२ बिया असणारी शेंग असते.
ह्याचे उपयुक्तांग आहे त्वचा व फल.
आता ह्याचे गुणधर्म जाणून घेऊयात:
त्वचा: चवीला तुरट,कडू असते व थंड गुणाची असून हल्की व रूक्ष असते.
फल:चवीला गोड,उष्ण,जड व रूक्ष असते.
शमी ही कफपित्तनाशक आहे.
आता ह्याचे औषधी उपयोग पाहुयात:
सालीचा लेप हा विषनाशक आहे.
फळाची राख हि शरीरावरील रोमशातन अर्थात केस काढायला उपयुक्त आहे.मग ह्याचा वापर बायका हेअर रिमुव्हर म्हणून करू शकतील पण योग्य सल्ल्यानेच बरे.
शमी कृमिनाशक असल्याने जंतांमध्ये उपयुक्त आहे.
मुळव्याध,आवपडणे,जुलाब ह्यात देखील हिचा उपयोग होतो.
त्वचा रोगात हिच्या सालीचा लेप उपयोगी आहे.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर,
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
August 3, 2017
पावसाळा … सह्याद्रीच्या ऋतुचक्राचा राजा …. आणि दुर्गराज किल्ले रायगडाच्या हिरकणी बुरुजावरून दिसणारा हा सह्याद्रीच्या दुर्गम … जंगली मुलुखाचा नजारा … घनघोर कोसळणारा पाऊस खऱ्या अर्थाने बघायचा … अनुभवायचा असेल तर सह्याद्रीच्या गाभ्यात वसलेल्या किल्ले रायगडावर जायला हवं …टकमक टोकावरून दिसणारं काळ नदीचं खोरं … कोकणदिवा … लिंगाण्याचे थोरले डोंगर …. कडे … एकीकडे भवानी कडयावरुन दूरवर दिसणारे राजगडाचे डोंगर … तर हिरकणी बुरुजावरून दूरवर असलेल्या जावळीच्या निबिड अरण्याने वेढलेल्या शंभू महादेव डोंगररांगा … त्यावरचा प्रतापगड… रायगडाचा सगळा घेर प्रचंड मोठा …फोटोत त्यातल्या एका बाजूची थोडी कल्पना येईल
August 4, 2019
श्री दामाजी पंत, महान विठ्ठल भक्त
होवून गेला एक संत, मंगळवेढे गावी ।। १।।
जेथे असे प्रभूभक्ति, तेथे वसे दया, क्षमा, शांति
दुरितांसाठी मन कळवळती, त्यांचे हृदयीं ।। २।।
विचार गरीबांचे मनी, सेवा दीनांची करूनी
भाव विठ्ठला चरणी, अर्पिले असे ।। ३।।
नाम घेतां विठ्ठलाचे, काम करीता जनांचे
आनंदी भाव तयांचे, मनीं येई ।। ४।।
दामाजीची कथा ऐकूनी, भान जाई हरपूनी
प्रभू येई सेवक बनूनी, भक्तासाठीं ।।५।।
दामाजीपंत मामलेदार, मोठा त्यांचा अधिकार
म्हणून ते जिम्मेदार सरकारात ।।६।।
धान्याची भरती कोठारे, ठेवूनी त्यावरी पहारे
अधिकार दामाजीस सारे, धान्याच्या वाटपाचे ।।७।।
राज्यात परिस्थिती दुष्काळीं, पडूं लागले भूकबळीं
दु:खी जनता सगळी, हा: हा कार माजला ।।८।।
समोर धान्यांच्या राशी, बाहेर लोक मरती उपाशी
सहन न होई दामाजीसी, बघूनी हे सारे ।।९।।
राजानें हुकूम देऊन, धान्य ठेवले सांठवून
न वापरावे सामान्य जन, त्या धान्यासी ।। १०।।
धान्याचे साठे बहूत, करूनी लोकांसी वंचित
दु:खी त्यासी बघत, हर्ष होई राजासी ।।११।।
लोकांसी बघूनी भूके, दामाजीस होई दु:खे
कसे हे संत देखे, शांत राहूनी ।।१२।।
विठ्ठल नाम मनीं, कोठारे दिली उघडूनी
भूकेल्यास दाना-पाणी, देई दामाजीपंत ।।१३।।
लोकांस आनंदी बघूनी भान जाय हरपूनी
नाचू लागला तल्लीन होऊन, विठ्ठलाचे भजन करीं ।।१४।।
सारे कोठार लुटविले, प्रत्येक जीवा प्रभू संबोधले
त्यांच्या आनंदी एकरूप झाले, दामाजीपंत ।।१५।।
दुसऱ्याच्या आनंदाचे भाव, स्वत:चे मनी घेई ठाव
तेथेची जाणावा देव, हेच असती सत्य ।।१६।।
भुकलेले व्याकूळ जीव, मिळता धान्यराशी ठेव
उचंबळून येती आनंदी भाव, नाचू लागली सारी ।।१७।।
दामाजीस न राही भान, तल्लीन होती नाच नाचून
विठ्ठल नामाचा गजर करून, तादात्म्य झाले प्रभूशी ।।१८।।
बातमी कळली राजाला, क्रोध मनी आला
अटक करण्या हुकूम दिला, दामाजी पंतासी ।।१९।।
प्रभूची लीला न्यारी, ज्याचे तो तारण करी
कुणी न त्यासी मारी, सांभाळ करी भक्ताचा ।।२०।।
काटा रूते भक्तचरणी, येई पाणी प्रभू नयनीं
नाते घ्यावे समजोनी, प्रभू भक्ताचे ।।२१।।
भक्त असता संकटी, धावून येती पाठी
सुटका करती जगत्जेठी, पाठीराखा बनून ।।२२।।
विश्वाचा अधिनायक, भक्तासाठी बने सेवक
हेच भक्तीचे गूढ एक, समजोनी घ्यावे ।।२३।।
समजण्या हे सारे, उघडावी मनाची द्वारे
वाहू द्या भक्तीचे वारे, अंतर्मनी तुमच्या ।।२४।।
सेवक होवूनी जगत्जेठीं, घेवूनी घोंगडी पाठी
हातीं घेती काठी, राज दरबारी आला ।। २५।।
मज म्हणती विठू सेवक, दामाजीचा मी हस्तक
धान्यराशी विकूनी ठीक, आणली असे ती रक्कम ।।२६।।
उलटी करूनी घोंगडी, मोहरांची रास पाडी
थक्क करूनी सोडी, राजाला ।।२७।।
चकीत झाला राजा, विस्मयीत होई प्रजा
कसा देवू मी सजा, दामाजी पंतासी ।।२८।।
दामाजीचा आदर करी, जाणूनी विठ्ठल त्याचे उरी
लोळण घेतले चरणा वरी, दामाजी पंताच्या ।।२९।।
करमणूकीची आहे कथा, समजण्या वाटते कठीणता
पाहीजे मनोभावाची उच्चता, कळण्यास हे तत्त्वज्ञान ।।३०।।
दामाजीची कहाणी, दान धर्माचे प्रतीक म्हणोनी
दुरीतांचे दु:ख, जाणोनी ग्रहण करावी सर्वांनी ।।३१।।
डॉ. भगवान नागापूरकर
१६-१५११८३
January 16, 2018
जगण्याची साधी सोपी सूत्रे - एकशे चौपन्न
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - भाग तेरा
सांगेन गोष्टी हिताच्याच चार - भाग बारा
जगण्याचे साधे सोपे नियम सांगताना ग्रंथकार पुढे म्हणतात,
बुडण्याचा भय असेल, अशा छिद्र असलेल्या किंवा फुटक्या नावेत बसू नये, किंवा जे झाड पडणारे असते, त्यावर चढू नये.
यात आपलेच नुकसान होणार हे नक्की असते.
आजच्या काळानुसार जी बॅक बुडणारी आहे, त्यात पैसे ठेवू नयेत, किंवा कमी काळात दाम दुप्पट वगैरे फसव्या योजनेत पैसे गुंतवू नयेत. मल्टीलिंक मार्केटिंग हा परदेशी फंडा आहे. आपली गुंतवणुक सोडवून घेण्यासाठी दुसऱ्याला आत गुंतवायचे असा सरळ सरळ अर्थ म्हणजे एम एल एम.
कमी पाणी असलेल्या एका विहिरीत पडलेल्या बोकडाला वर येण्यासाठी, एक बोकड धडपडत असतो. पण वर येता येत नाही. "व्वा, पाणी किती गोड आहे, पिऊन तर बघा !" असे आमिष इतरांना दाखवल्यावर, काठावरून जाणाऱ्या दुसऱ्या बोकडाला, पाणी चाखून बघावेसे वाटते. म्हणून दुसरा बोकड इतर कोणताही विचार न करता, आत उडी मारतो. त्याच्या डोक्यावर पाय ठेवून पहिला बोकड केव्हा विहिरीबाहेर पडतो, ते दुसऱ्याला कधी कळतच नाही, मग तीच युक्ती दुसरा बोकड, तिसऱ्या बोकडासाठी वापरतो याला म्हणतात, मल्टी लिंक !
यात प्राॅडक्ट म्हणून काहीही साधन वापरले जाऊ शकते. मग ती बदकाच्या पिसाची गादी असेल, नाहीतर भादरलेल्या बोकडाची दाढी असेल, नाहीतर एखादे लाॅकेट असेल वा लोहचुंबक असेल, खेळण्यातली गोल्डन डाॅल असेल वा एखादे दंतमंजन असेल. झटपट पैसे मिळवण्यासाठी काहीही फंडे वापरले जातात, पश्चात ताप होऊ नये, यासाठी सावध तो सुखी, हे सूत्र लक्षात ठेवावे.
मातीचे ढेकूळ, दगड वा फळ मारून, (आपल्या किंवा इतरांच्या ) झाडावरचे फळ तोडू नये.
हा मारलेला दगड परत आपल्याच डोक्यावर पडण्याचा संभव असतो, वा कुणाचे तरी नुकसान करणारा असतो. कुणा व्यक्तीचे नाही झाले तरी झाडाचे नक्कीच होते. गरज नसताना दुसरे कच्चे फळ पडणे, झाडावरील घरट्यातील पक्ष्यांच्या पिल्लांना धोका पोचणे, किंवा पलीकडील घराची कौले फुटणे यापैकी काहीही होऊ शकते. अगदीच काही नाही झाले तर असा शेजारी किंवा झाड मालक जेव्हा पाठ धरून बोंबलत येतो तेव्हा सैराट होऊन धावताना आपल्याला इजा होऊ शकते.
परवानगी घेऊन अथवा न घेता कोणाच्याही घरात, दाराचा वापर न करता अन्य मार्गाने घुसू नये.
दुसऱ्याच्या घरात आपण एकट्यानेच कोणाला सांगितल्या शिवाय, किंवा कोणी सांगितल्याशिवाय खुर्चीवर वा उच्च आसनावर बसू नये.
नंतर खुर्ची सोडावी लागली तर ते दुसरे दुःख कोणते नसते. विशेषतः व्यासपीठावर बसणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे.
झोपी गेलेल्यास उठवू नये, हे पण ग्रंथकार लिहितात. पण ही सूचना शाळा काॅलेजमधे वर्गात झोपा काढणाऱ्यांसाठी सांगितलेली नसून, अति श्रमाने जो दमलेला आहे, किंवा ज्याला खरोखरच विश्रांतीची गरज आहे, अशा मंडळींकरीता आहे हे सूज्ञांनी लक्षात घ्यावे.
रात्रभर वाॅटसप चालवून दमल्याभागल्यांसाठी हा नियम लागू होत नाही. अशा मंडळीना उठवताना नाकी नऊ येतात. यांना उठवण्यासाठी हळुच यांच्या कानात म्हणावे, "मोबाईलला लाॅक टाकायला विसरला आहेस, की स्वारी टुणकन उठून बसेल बघा !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
१२.०९.२०१७
September 12, 2017
ब्रिटन मधील हरफोर्डशायर येथे 'ऑन वे' या नावाचे गाव असून हे गाव पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाते. त्याच पध्दतीने महाराष्ट्रातही, स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असणारे महाबळेश्वर तालुक्यातील भिलार हे गाव आता ‘पुस्तकाचे गाव’ या रूपाने वाचन संस्कृतीसाठी समृद्ध झाले आहे. देशातील हा पहिला महाराष्ट्र शासनाने राबवला असून या प्रकल्पामुळे महाबळेश्वर तालुक्याचा देशात नावलौकिक उंचावला आहे. या योजनेंतर्गत भिलारमधील नव्या भूखंडावर सुमारे साडेतीन एकरावर हे ‘पुस्तक गाव’ विकसित करण्याची योजना आहे. यामध्ये विविध प्रकारची साहित्य दालने असतील. त्यात शेती, स्पर्धा परीक्षा याचीही माहिती यातून मिळेल. अत्याधुनिक दृकश्राव्य दालनात ई-बुक्स व आॅडिओ बुक्सही उपलब्ध असतील. तसेच या योजनेत निवडलेल्या घरांमध्ये विविध प्रकारची पुस्तके ठेवली गेली असून, त्याद्वारे वाचनसंस्कृती जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. त्या घरांमध्ये तसे पूरक वातावरण तयार केले केले गेले आहे.
‘पुस्तकाचे गाव’ या प्रकल्पाची वैशिष्ट्ये...
साहित्यिकांच्या भेटीद्वारे रसिकांशी सातत्यपूर्ण संवाद लेखन, वाचन, संपादन, मुद्रितशोधन याबाबत प्रशिक्षण कार्यशाळा होतील शैक्षणिक सहलींसाठी अनुकूल वातावरण, साहित्यिकांच्या भेटी ठरवता येतील. गावात कायमस्वरूपी कविकट्टा व अभिवाचन कट्टा असेल गावातील सार्वजनिक जागा ग्रामपंचायत, समाजमंदिर, शाळा येथे वाचनकट्टे तयार करण्यात येणार आहे.
घरांचे वाचनालय.. गावाचे ग्रंथालयात रूपांतर...
महाराष्ट्र शासनाने भिलार या गावाला या पायलट प्रोजेक्टसाठी निवडले असून, यासाठी ग्रंथालय, पुस्तके व यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधांसाठी आर्थिक तरतूद केली आहे. या माध्यमातून भिलारकडे उच्च दर्जाचे क्षेत्र म्हणून पाहिले जाणार आहे. तर रोजगार व आर्थिक स्थैर्य ही लाभणार आहे. त्यामुळे भिलारमधील घरांचे छोट्या वाचनालयात तर गावाचे मोठ्या ग्रथांलयात रूपांतर झाले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
April 19, 2017
September 7, 2018
ही ’इंटरनॅशनल् लेबर ऑर्गनायझेशन्च्या‘ जिनिव्हा (स्वित्झर्लंड) येथील कार्यालयाच्या दर्शनी भागावर लिहिलेली घोषणा, हल्ली मला बकवास वाटू लागलीय. विशेषतः महाराष्ट्राच्या ’कॅनव्हास‘वर तर मराठी कामगार-कर्मचार्र्यांची थडगी बांधण्याची ’कंत्राटी‘ कामे, जागोजागी घाऊक पध्दतीनं चालू असताना… अशासारखं घोषवाक्य आपल्याला वाकुल्या दाखवत अंतःकरणात दूर कुठेतरी कळ उमटवून जातं.
January 2, 2012
Copyright © 2025 | Marathisrushti