वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आपण सध्या unsafe mode मध्ये व्यवहार करीत आहोत.तुमचे लोकेशन, डेबिट कार्ड ,क्रेडीट कार्ड ,online खरेदी ,whats app ,फेसबुक या सर्व नव्या गोष्टींचे अप्रूप असल्याने आपण त्या सर्वांच्या आहारी गेलो आहोत .तुम्ही फेसबुक वरून सुद्धा लॉग इन करून खरेदी करू शकता. तुमचे लोकेशन ,तुम्ही वापरत असलेला मोबाईल नंबर ,सर्व काही सार्वजनिक झाले आहे.
हा नाथपंथी डवरी गोसावी समाज अतिशय मवाळ आहे.. गावोगावी फिरून भिक्षुकी करून पोटाची खळगी भरणे एवढाच उद्योग त्यांना ठाऊक.. शिक्षणाच्या बाबतीतहि मागास असलेला हा समाज आधुनिकतेच्या मुख्य प्रवाहापासुन बरेच अंतर लांब आहे.. त्यामुळे या समाजाचे एकिकरन तर लांबच परंतु या समाजाचा कधिहि आपल्या मागण्यांसाठी कुठला मोर्चा अथवा समाजास हानी पोहचेल असे कार्य घडत नाहि..
अक्कलकोटी येणारा प्रत्येक जीव हा लक्ष 84 योनींचा फेरा चुकवून अमरधामाला प्राप्त होतो. एवढे श्रेष्ठत्व या गांवाला स्वामी सत्तेने प्राप्त झालेले आहे. तेव्हा आपण आपला उध्दार करण्यासाठी तात्काळ अक्कलकोट जवळ करावे, असा संदेश स्वामीसुत देतात.
आपल्याकडे प्रत्येक प्रथेमागे, सणामागे काही ना काही सामाजिक आणि शास्त्रीय कारणे ही आहेतच. दीप अमावास्येच्या दुसऱ्या दिवशीपासून महाराष्ट्रात श्रावण सुरु होतो. ऊन-पावसाचा खेळ. अंधार देखील लवकर पडू लागतो. कदाचित म्हणूनच पूर्वी दीप अमावास्येच्या निमित्ताने घरातील सर्व दिवे बाहेर काढून त्या योगे त्यांची स्वच्छता व्हावी असे अध्यारूत असावे.
मागील काही दिवसापासुन म्हणजे 8/11/16 तारखेपासून काळा पैसा कसा तयार होतो, कोण साठवतो यावर बरीच चर्चा टीव्ही, फेसबुक, व्हाट्सअँप वर दिसून आली, मीही त्यातलाच एक म्हणून जमेल तसे दोन लेख लिहिले.
विरोधी पक्षनेते, तसेच NDA मधील काही विरोधी नेते प्रत्येक भाषणाच्या सुरवातीलाच सांगतात, आम्ही काळ्या पैशाविरुद्ध आहोत, परंतु ज्या तर्हेने हे सर्व हाताळले जातंय ते बरोबर नाही, कारण आम्हाला विश्वासात न घेता हि कारवाई केली गेली. अश्या कारवाया सांगून करायच्याच नसतात. अतिशहाण्यांनो, तुम्हाला विश्वासात घेऊन हि कारवाई कधीच यशस्वी झाली नसती, हि गोष्ट माझ्यासारख्या अतिसामान्य बौद्धिक क्षमता असलेला माणूस सुद्धा सांगू शकेल. असो,
स्वातंत्र मिळाल्या पासून 70 वर्षात काळात, 60 वर्षे काँग्रेस पक्षातील गांधी घराण्याने एकहाती सत्ता उपभोगली, याच पक्षाचे नेते आज टीव्हीवर मोठया तोंडाने सांगतात आम्ही काळ्यापैशाच्या विरुद्ध आहोत, हि लाजिरवाणी गोष्ट नाही का वाटत?
राहुल गांधी आजही प्रत्येक भाषणात सांगतात, आम्ही गरिबांच्यासाठी आहोत. अहो, तुम्ही गरिबांच्यासाठी असणारच, कारण देशातील जितकी जास्त जनता गरीब राहणार, तितकी तुमची सत्ता अभादित राहणार, हि युक्ती साठ वर्षे तुमचे पणजोबा, आजी, वडील, आई व आता तुम्ही वापरली, व आज ह्या देशातील 55 टक्के जनता दारिद्ररेषेखाली ठेवण्यासाठी आपणच कारणीभूत ठरला आहात, याचा अर्थ असा निघतो, "तुम्ही गरीब हटावसाठी नसून गरिबी टिकावसाठी आहात." गरिबी हि तुमच्यासाठी शेती आहे, गरीब माणसे हे पीक आहे, आणि हे पीक जास्तीतजास्त फोफावेल यासाठी तुम्ही व तुमचे शिलेदार कळ्यापैशाच्या रुपात भरपूर खत घालून, शेतीचे मताच्या रुपात उत्पन्न काढत होते. आज हेच लोक गरिबांवर अन्याय होतो आहे म्हणत सगळीकडे छाती बडवून दाखवत आहेत.
गरिबी, काळा पैसा या विरुद्ध रडणे हे मगरीचे अश्रू आहेत हे आता अशिक्षिताला सुद्धा समजले आहे, म्हणून तुम्ही लोकसभेत 425 वरून तुम्ही 44 वर घसरला. 15 ऑगस्ट 1947 ला भारतासोबत दक्षिण कोरिया या देशाला सुद्धा स्वातंत्र मिळाले, आज कोरिया एक प्रगत राष्ट्र म्हणून जगात उदयास आले आहे, आणि भारत आजही काँग्रेसच्या कृपेने हागणदारी मुक्त होण्यासाठी झगडत आहे.
सत्तर वर्षात, या देशात नाव घेण्यासारखे रस्ते झाले नाहीत, सरकारी दवाखाने म्हणजे नरक बरा, एकही उच्च शैक्षणिक विद्यापीठ जगात पहिल्या 25 मध्ये सुद्धा नाही, प्रार्थमिक शिक्षण आळ्या, व खडे मिश्रित खिचडी खाण्यापुरते शिल्लक आहे.
28 ला भारत बंद का करायचा, याचे ठोस स्पष्टीकरण यातील एकही नेता देऊ शकत नाही. वास्तविक, नोटा बंदीमुळे मोदी सरकारने धाडसी पाऊल उचलून देशाची अर्थकरणाची दिशा बदलून टाकली आहे, हे यश विरोधकांना पचनी पडणे महाकठीण झाले आहे, हेच सर्व विरोधाचे मूळ कारण आहे.
-- विजय लिमये
9326040204
प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी कृष्ण हवाच, या आशयाच्या पोस्ट या आधी वाचल्या सुद्धा असतील, जो मदत करतो, हात देतो, धीर देतो, अब्रू वाचवतो, शिष्टाई करतो, रण सोडून पळून जातो, रणांगणात हत्यार उचलत नाही, सारथी बनतो, सखी बनून खेळतो, खेळवतो…..
मी “बाबासाहेबांवर” काही लिहिले.. लाेकांनी मला फोन करून विचारले “तुम्ही बौध्द किंवा दलित आहात का…?” मी आपल्या ” शिवछत्रपतींवर”काही लिहिले.. लाेकांनी मला फोन करून विचारले “तुम्ही मराठा आहात का…?”
आज नवीन पिढी मराठी वापर कमी करीत आहे, त्यांचा मराठी शब्दसंग्रह कमी होत आहे…मराठी भाषेत चांगले साहित्य फार कमी प्रमाणात निर्माण होत आहे.. आणि मला हा सर्व एखादया कारस्थानाचा भाग वाटतो आहे.. मी कितीही बुद्धिवादी असलो तरी मी मराठी भाषा, मराठी संस्कृती, आणि मराठी समाज यांच्या ऱ्हासाचा विचार सुद्धा करू शकत नाही… तो भाग माझ्या भावनेचा आहे आणि तिथे माझा बुद्धिवाद तोकडा पडतो हे मला मान्य आहे.
काळा पैसा निर्माण करण्यात सामान्य माणसाचा प्रमुख सहभाग आहे.
केदार दिवेकर यांच्या फेसबुकवरून साभार
Copyright © 2025 | Marathisrushti