(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • अष्टभुजा नारायणी

    अष्टभुजा नारायणी' या अवस्थेचा अनुभव जर आपल्याला रोज सकाळी घेता आला तर खरंच किती बरं होईल!धावणारं घड्याळ आणि रेंगाळणारे घरातले यांचा तोल साधायला जरा तरी मदत होईल.अष्टावधानी या शाळेत वाचलेल्या शब्दाचा अर्थ आपण दिवसाच्या पहिल्याच प्रहरात घेत असतो.साफसफाई,स्वयंपाक, आवराआवरी,दिवसभराचे कामांचे नियोजन अश्या एकाच वेळी अनेक आघाड्यांवर आपण लढत असतो.हात, पाय,मेंदू, तोंड आणि हो आपलं मनसुद्धा या वेळी प्रचंड व्यस्त असतं.पहाटे पाच वाजेच्या आसपास सुरु झालेलं हे शरीराचं यंत्र रात्री बारा वाजेपर्यंत आई,बायको,सून,मुलगी,बहीण, भावजय याच जोडीला जवाबदार कर्मचारी अश्या आखलेल्या परिघात वेगवेगळ्या अपेक्षांच्या ओझ्याचा पिंगा घालत नाचत असतं.

    ...........आणि अचानक महिला दिन किंवा women's day येतो आणि सगळ्यांना या गोष्टीचा साक्षात्कार होतो.या दिवसापुरते स्त्रीच्या समर्पणाचे, त्यागाचे गोडवे गायले जातात.स्त्रीच्या कष्टांची,तिच्या परिश्रमाची,तिच्या संघर्षाची,तिच्या जिद्दीची जाणीव सगळ्यांना होते.

    पण वर्षानुवर्षे या चक्रातून जाणाऱ्या तिच्या शरीराला मात्र ही जाणीव हळूहळू रोज व्हायला लागलेली असते.वाढत जाणारे वजन,दुखणारे गुडघे,पित्ताचा त्रास,कंबरदुखी,पाळीचा त्रास,कमी हिमोग्लोबिन,दम लागणे,टाचा प्रचंड दुखणे,रात्री झोप न येणे,अनामिक दडपण जाणवणे,केस गळणे,भेगा पडणे,त्वचा कोरडी कोरडी होत जाणे अश्या असंख्य तक्रारी शरीरात मुक्कामी येऊ लागतात.
    या तक्रारींपासून लांब जाण्याची इच्छा सगळ्यांनाच असते पण खरचं यासाठी वेळ कुठून आणायचा हाच यक्षप्रश्न सुटत नसतो.

    या सगळ्या fire fighting lifestyle मध्ये जर आपलं निरोगीपण टिकलं तर आणि तरच या अष्टभुजा नारायणीचा वरदहस्त मिळून Super woman होता येईल!

    Energy boosting:

    पाव किलो खारीक पावडर,पन्नास ग्रॅम खायचा डिंक एकत्र करून हे mixture 2 चमचे दुधात mix करून आपल्यासाठी रोज सकाळी खाण्यासाठी cerelac तयार करता येईल.
    दोन वेळा शतावरी कल्प दुधातून घेऊन ही energy level maintain ठेवता येईल.

    बस्स पांच मिनीटवाला नाश्ता with देशी अंदाज:

    नाश्ता compulsary प्रकारात घेऊन त्यासाठी मेतकूट भात,तुपसाखर पोळी,लोणीसाखर पोळी,राजगिरा लाही व दुध,लाह्यांचे पीठ व ताक,नाचणी पेज किंवा खीर,भाकरी भाजी,पुलाव,थालीपीठ,उपमा,शेवई उपमा यासारखा अस्सल देशी menu नक्की करायचा.
    ओट्स, कॉर्नफ्लेक्स,packed juices, बेकरी पदार्थ,शिळे पदार्थ,मॅगी यांना ठामपणे NO म्हणायचे.

    किचन क्लिनिक:

    फोडणी करतांना हिंग,मेथी दाणे,हळद,कडीपत्ता पानांची पावडर भरपूर वापरून हाडांचे विकार आणि पाळीचा त्रास दूर सरतील.
    एक वेळेच्या जेवणात वरण,भात, तूप,लिंबू हे combination आणि लोखंडी कढईत भाजी म्हणजे anaemia ला bye bye
    ज्वारीची भाकरी व फळभाजी नक्की केली की पचनाच्या तक्रारी चक्क गायब.
    कणकेत चिमूटभर चुना add करून,कडीपत्ता चटणी,जवस चटणी,तीळ चटणी,शेवगा भरपूर वापरून हाडांना strong ठेवता येईल.

    Fitness मन्त्र:

    सकाळी थोडासा वेळ दिर्घश्वसनासाठीदेऊन फुफ्फुस पोटांच्या स्नायूंचा व्यायाम सहजच होईल
    सकाळी उठल्यानन्तर किंवा संध्याकाळी जेवणाआधी 2 तास
    दिवसभर वापरायची चप्पल ही चामड्याची घेऊन रोज त्यावर एरंड तेलाचा कापसाचा बोळा फिरवून ती चप्पल दिवसभर वापरून टाचदुखी ला कायमचा निरोप देऊयात

    सगळ्यांना आपण आनंदी ठेवतोच पण स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी मनमोकळ्या गप्पा मारणाऱ्या मैत्रिणी शोधून खूप हसूयात

    आपल्यात लपलेल्या सुप्त गुणांना,मनाच्या खॊल कप्प्यात दडलेल्या आवडीला या निमित्ताने वर काढूयात,स्वतःची ओळख घडवून आणत,महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर निरामयतेच्या वाटेने जाता जाता फिरुनी नवे जन्मेन मी हे promise स्वतःशीच करूयात.

    वैद्य सौ दिप्ती धर्माधिकारी
    ९३७०७२०५०२
    diptisdharmadhikari@yahoo.com


    -- संकलन : अशोक साने
    फेसबुक, WhatsApp यासारख्या माध्यमातून दररोज येणारे चांगले लेख तुमच्यासाठी शेअर करतो..

  • कीर्तनाची प्लास्टिक सर्जरी

    शेगड्या, चुली जाऊन गॅस आला. बैलगाडी, घोडागाडी जाऊन बस रेल्वे विमानं आली. वायरचा फोन जाऊन मोबाईल आले, कॅसेट जाऊन CD आणि आता क्लाउड वरून डाउनलोड करणे सुरू झाले. इतके सारे बदल जवळजवळ दोन पिढ्यात आत्मसात झाले. मग असं असेल तर कीर्तन प्रवाचनांची आधुनिक काळाप्रमाणे प्लास्टिक सर्जरी करून आणि त्या नवीन रुपाला लोकमान्य करून सिनिअर सिटीझन क्लब मध्ये हळू हळू तरुण चेहरे दिसायला लागले तर ते भारतीय संस्कृतीसंवर्धनाच्या दृष्टीने चांगल ठरणार नाही का?

  • प्रमुख देवस्थानांची संपत्ती

    एखाद्या पत्रकार अथवा सच्च्या समाजकारण्याने जर या सगळ्या मंदिरांचा आतापर्यंत फुकट मिळालेला पैसा अन गुंतवणूक बाहेर काढायचं ठरवलं तर जो आकडा समोर येईल तो Digest करायची आपल्या कोणात ताकद आहे का?

  • ब्लादिमीर लेनिन आणि नाशिक ते मंत्रालय !

    आज आपण कामगारविषयक जो कायदा वाचत आहोत त्या कायद्याचा प्रणेता लेनिन होता हे सध्या किती कर्मचा-यांना माहित आहे? सेवानिवृत्ती नंतर मिळणारे फायदे , ज्यात प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युईटी याचा समावेश होतो आणि त्यावर करही लागत नाही हे पण कामगार संघटना आणि त्यांच्या मागण्यांवर तत्कालीन सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने झालेले आहे. या कामगार संघटना जगभर लेनिन आणि त्याच्या कॉम्रेड्सच्या प्रेरणेतून उभ्या राहिल्या आहेत.

  • रेझोनांस’ म्हणजे काय ….?

    “रेझोनांस” म्हणजे काय ....? आणि त्याची शक्ती काय आहे

    मित्रानो

    सोशल मिडीयावर एप्रील मे मध्ये एक मेसेज खुप व्हायरल झाला होता

    सर्वानी एक प्रार्थना करा किंवा आशी चर्चा करा यांदा खुप पाऊस पडनार आहे व त्या पद्धतीचे मेसेज फाँरवर्ड करा

    त्या मागचा वैदिक विचार एव्हढाच होता की पोझिटिव्ह एनर्जी तयार होऊन पावसासाठी पोझिटिव्ह वातावरण तयार होईल

    आणी तसेच होऊन आज चोहीकडे छान पाऊस पडतोय

    पूरातण वैदीक पद्धती या विज्ञानावरच आधारीत आसुन या मध्ये पोझिटिव्ह लहरी निर्मान होऊन मनुष्य जिवनाला त्याचा फायदाच होतो

    आपण जेव्हा एकट्याने प्रार्थना करत असतो, उपासना करत असतो तेव्हा त्या उपासनेला व्यष्टी अथवा व्यक्तिगत केलेली उपासना म्हणतात. ही उपासना नित्य म्हणजे प्रतिदिन [ अरबी फारसी शब्द “रोज” ] केली जाणारी प्रार्थना, नैमित्तिक म्हणजे विशिष्ट कार्यासाठी केली जाणारी उपासना हे यातले मुख्य दोन प्रकार आहेत. हेच दोन्ही प्रकार समष्टी म्हणजे सामुहिक प्रार्थनेला सुद्धा लागू होतात. पण सध्या हिंदू बांधव सामुहिक प्रार्थना करणे विसरले आहेत. आणि कधी केलीच तर ती आरतीच्या स्वरूपात. आणि तीही आरडा ओरडा करत, चुकीच्या पद्धतीने आणि चुकीचे शब्द म्हणत. हिंदू प्रार्थनेला एकत्र येत नाहीत ही अत्यंत वाईट आणि घातक गोष्ट आहे.

    सर्वप्रथम आपण रेझोनांस म्हणजे काय ते पाहू. रेझोनांस....अर्थात एका वस्तूचे, अणूचे किंवा कोणत्याही एका गोष्टीचे स्पंदन दुसऱ्या एखाद्या गोष्टीशी जुळणे याला रेझोनांस असे म्हणतात.

    १] मायक्रोवेव्ह च्या फ्रिक्वेन्सी बरोबर अन्नातील पाण्याची फ्रिक्वेन्सी जुळवली जाते आणि रेझोनांस उत्पन्न होऊन उष्णतेची निर्मिती होते आणि अन्न शिजते.

    २] रेझोनांसचे हेच तंत्र संगीतातही वापरले जाते. ज्या वेळेस दोन तारांच्या कंपन पावणाऱ्या Frequency किंवा वारंवारीता जुळते त्या वेळेस दुसरीही तार आपोआप कंप पावू लागते.

    ३] MRI अर्थात Magnetic Resonance Imaging या तंत्रज्ञानातही रेझोनांसचाच वापर केला जातो. पेशंटला ज्या Scanner खाली झोपवतात तो Scanner पृथ्वीच्या Magnetic Field ८००० पट जास्त शक्तीचे Magnetic Field उत्पन्न करतो. पेशंटच्या शरीरातील हायड्रोजनचे अणूतील Protons या MF बरोबर अलाईन होतात म्हणजे MF च्या प्रमाणे जुळवून घेतले जातात. नंतर जेव्हा Redio -Frequency त्यांच्यावर सोडली जाते त्यावेळेस हे Protons MF च्या उभ्या दिशेत फिरायला लागतात. आणि Protons ची ही सगळी माहिती Redio -Frequency च्या Coil कडे पाठवली जाते. ह्या Protons चे वेगवेगळ्या प्रकारच्या पेशीतील वर्तन हे वेगवेगळे असते. हे Protons पाण्यात मेद किंवा चरबीपेक्षा कमी वेगाने शांत होतात. ही माहिती साठवली जाते, ताडून पाहिली जाते आणि मग पेशंटला काय विकार असेल त्याचे निदान केले जाते.

    आता आपण धर्मातील रेसोनांस कडे वळू.

    जेव्हा भजन, प्रार्थना, उपासना यासाठी एका विशिष्ट देवाच्या मंदिरात, विशिष्ट गुरुंच्या दरबारात एका भावनेने जमलेले लोक प्रार्थना करतात तेव्हा तेथे जितके लोक असतील त्यांची शक्ती कमी न होता ती भूमिती श्रेणीने एकमेकांना मिळते. अर्थात ती १+१= २ अशी वाढत न जाता तेथे चार जण प्रार्थना करत असतील तर ४*४=१६ म्हणजे चार चोक सोळा पटीत वाढत जाते. याचा एकत्रित प्रार्थना करणारयांना इतक्या प्रचंड प्रमाणात लाभ होतो. याच तत्वाचा काही धर्मांमध्ये फार सुंदर उपयोग करून घेतला आहे. हिंदू धर्मातील आरतीमध्ये हेच अपेक्षित आहे. परंतु त्यात भक्तीपेक्षा गोंधळ आणि चुकीच्या आरत्या म्हणणे यामुळे फायदा होताना दिसून येत नाही. ओम सहनाववतु .....या प्रार्थनेत एकत्र येऊन कार्य करण्याविषयीच सांगितले गेले आहे. त्यात ऋषी म्हणतात की आपण एकत्र येऊन प्रार्थना करू, एकत्र भोजन करू, एकत्र कार्य करू आणि एका विद्वेषरहित समाजाची निर्मिती करून खूप मोठी कार्ये पार पाडू. पराक्रम करू. ही शिकवण आज आपण विसरलो आहोत. रस्त्यावरून जाता जाता एका हातानेच देवाला नमस्कार करून आपण आपले "कर्तव्य" पार पाडायला लागलो आहोत.

    मन:शक्तीच्या परमपूज्य श्री विज्ञानानंदांनी [ पूर्वाश्रमीचे श्री. भिडे ] रेझोनांसचे फार छान उदाहरण दिले आहे. एकदा अमेरिकेतील एका शहरात लष्कराचे संचलन चालू असते. आणि हे संचलन करता करता हे जवान एका लष्करी पुलावरून जावू लागतात. आणि हा शक्तिशाली पूल जो प्रचंड मोठ्या, अवजड लष्करी वाहनांनी आणि रणगाड्यांनीही पडला नाही तो या एका सुरात, एका तालात, एका ध्येयाने प्रेरित झालेल्या सैनिकांच्या संचलनाने पडला. यातही कारणीभूत आहे हा रेझोनांसच .......
    मला असे नेहमी वाटते की ज्ञानेश्वरांनी जेव्हा त्यांना कोणीच मडके दिले नाही तेव्हा स्वत:च्या पाठीवर मांडे भाजले होते तेव्हा हे रेझोनांसचे तत्व किंवा शरीरातील स्थिर विद्युत यापैकी कशाचा तरी वापर केलेला असावा. स्थिर विद्युत निर्माण होताना त्या विद्युत निर्माण करणारया वस्तुत उष्णता निर्माण न होता ती जी वस्तू जवळ आहेत त्यात होत असते. श्री ज्ञानेश्वर हे एक महान योगी होते. त्यांना हे अशक्य नक्कीच नव्हते. आपल्याला त्याचे कारण न कळल्याने तो चमत्कार वाटतो. तसेच ज्ञानेश्वरांचे स्वत:चे लग्न अर्थात विवाह झालेला नसूनही त्यांनी स्त्री, पुरुष, प्रणय, फुले, भुंगे अशा अनेक उपमा दिल्या आहेत. प्रेम प्रसंग आणि अशाच अनेक गोष्टींचे वर्णन केले आहे. फुलांच्या मनातले सांगितले आहे. ते त्यांना या सर्वांशी समस्पंद गती अर्थात रेझोनांस करता येत असल्यामुळेच होय. म्हणजेच ते इतर व्यक्ती आणि वस्तू यांच्याशी त्यांची स्वत:ची स्पंदगती जुळवू शकत होते.

    मित्रांनो अशी ही शक्ती आपण चांगल्या कामासाठी उपयोगात आणणार आहोत का? मित्रांनो आपण भीमरुपी, रामरक्षा, तुळशीदासांचे बजरंग बाण, हनुमान चालीसा,, सप्तशती मधील काही मंत्र, गायत्री मंत्र मृतसंजीवनी मंत्र अशा अति शक्तिशाली मंत्रांचे एकत्रित पठण केले तर फार मोठी शक्ती निर्माण करू शकतो. नुसत्या चुकीच्या आरत्या ओवाळण्यापेक्षा असे काही केले तर फार चांगले होईल. एक शक्ती संपन्न समाज निर्माण होईल.

    Always B ++

    जय हिन्द

  • सिद्धिविनायकचरणी २ कोटींचे हारतुरे..

    निदान सिद्धिविनायक ट्रस्टने अशा प्रकारच्या उधळपट्टीला थारा देऊ नये. “मन्नत” वाल्याला तेच पैसे ट्रस्टच्या माध्यमातून एखाद्या चांगल्या कार्यासाठी देण्याची विनंती करावी. एवढीच गणेशभक्तांची अपेक्षा असणार. किमान तेवढी अपेक्षा ट्रस्टने पुरवावी. अर्थात ट्रस्टने पुरवली नाही तरी बाप्पा ही अपेक्षा नक्कीच पुरवेल.

  • अहंकार – अर्थात Ego…….

    सहजच म्हंटल जातं. “आमक्या कडे इतकं असून सुद्धा त्याला अजिबात Ego नाही”(पैसा, बुद्धी, सौदर्य, कला किंवा काहीही) म्हणजे इतरांपेक्षा कुणा कडे काही जास्त असेल तरच त्याला Ego ची मुभा असते का ?

  • ती’ अजूनही आहे …. !!

    आजकाल बाळं जेंव्हा ढुंगणाशी बांधलेल्या टोपली सकट जेंव्हा बसतात तेंव्हा त्या बिचार्‍यांना नीट बसताही येत नाही …त्या बाळाला अगदी नैसर्गीकपणे धावतांना पाहिले आणि माझे कुतूहल जागे झाले त्याची आई बाजूला कुठे दिसते का ते पाहू लागलो आणि लक्षात यायला वेळ लागला नाही .. एक साधारणपणे तिशीतील तरुणी त्या बाळाकडे लक्ष ठेऊन होती … त्या आईला मी मुलाच्या नैसर्गिक धावण्याबद्दल आणि बसण्याबद्दल कॉम्प्लिमेंट्स दिल्या …

  • रैना

    बिती ना बिताई या गाण्याचं नि माझं नातं

  • शुभ सकाळ.. उगाच एक morning dose

    काही महिन्यांपूर्वी एका भावाशी चॅट करत होते. थोडा disturbed होता तो. त्यामुळे सांगत होता, की “ताई, तुझ्याशी बोलून नेहमी खूप positive वाटतं. तू प्लीज माझ्यासाठी रोज एक good morning मेसेज टाकशील? खूप मदत होईल त्याची मला..”