(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • माझा एक अनुभव विठ्ठलाच्या वारीतला

    बघा जरा विचार करुन…का जातात लाखों च्या संख्येने लोकं दिंडी मध्ये त्या विठ्ठलाच्या नामघोषात पंढरीला? का घराची पर्वा असूनही सोडतात ते आपले घर? त्यांना ऊन पावसाची चिंता का नाही? असे अनेक प्रश्न मनात विचारांचे डोंगर उभे रहातात…!

  • लेकुरवाळा

    हि सारी संत मंडळी म्हणजे विठुरायाची लेकरे… म्हणूनच विठ्ठलाला ‘लेकुरवाळा ‘ म्हंटले असावे… जणू या सर्व संतांचे लाड कौतुक करण्यासाठी विठ्ठलाने हा अवतार घेतला असावा.

  • वारी पंढरपुरी

    विठ्ठल विठ्ठल । भक्तांची माऊली ।माय ती साऊली । पांडुरंग ।।१।। पांडुरंगा भेटी । भक्त करी वारी ।हाती झेंडा धरी । विठ्ठलाचा ।।२।।

  • पंढरपूर वारी : इतिहास, परंपरा आणि प्रवास

    पंढरपूरच्या वारीची परंपरा ही सुमारे एक हजार वर्षांपूर्वीची, पण संत ज्ञानेश्वरांनी वारीला एक धार्मिक, नैतिक आणि अध्यात्मिक अधिष्ठान दिलं आणि गुरु हैबतबाबांनी (१८३२) वारीला एक नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध रूप दिलं.आतां आपण संतांचे सर्वसाधारण काळ पाहूं :

  • पुण्यनगरी काशी – भाग १

    बनारस, वाराणसी, काशी अशा तीन नावांनी सुप्रसिध्द असलेल्या या शहराची गणना जगातील अथेन्स, जेरूसेलेम, पेकींग अशा नामवंत शहरांच्या मालिकेत इतिहासकारांनी केली आहे. अडीच ते तीन हजार वर्षांच्या इतिहासाच्या आठवणी येथे आजही ताज्या आहेत.यवनांची शेकडोंनी आक्रमणे पचवीत बनारसने आपली हिंदु अस्मिता अबाधित राखली आहे. शंकराचार्य, तुलसीदास, ज्ञानेश्वर, एकनाथ यांच्या बरोबरीने बुध्द, महावीर अशा विविध धर्मांच्या संतांचे हे माहेरघर आहे.

    जीवनात केलेली कितीही पापे वाराणसीत धुतली जातात या श्रध्देपोटी रोज 30 ते 40 हजार यात्री वाराणसी नगरीला भेट देतात. काशी म्हणजे प्रकाशाची नगरी. त्याची स्थापना काश्य राजाने केली म्हणून काशी हे नाव पडले. अनेक स्वाऱ्या झाल्याने काशी नामशेष होऊ लागले म्हणून जवळच गंगेच्या दोन उपनद्या वरूणा व आसी यांच्या संगमावर नवीन गाव उभारले ते वाराणसी.

    आर्य कालापासून वाराणसीचा उल्लेख आहे. उपनिषदात वारायते अथवा वारणा म्हणजे जी नदी पापे वाहून नेते ती वाराणसी.पालीमध्ये वाराणसीचा उच्चार बराणसी होता म्हणून पुढे त्याचे नाव होत गेले बनारस. या नदीच्या काठी शंकर पार्वतीचे वास्तव्य होते. शंकर म्हणजे सृष्टीचा नाश करणारा म्हणजे रूद्र. त्याचे निवासस्थान असते महास्मशान. अर्थात प्रेते झोपण्याची जागा. येथील दोन प्रसिध्द घाट मनकर्णिका व हरिश्चंद. सतत 2500 वर्षे जळणारे स्मशानघाट म्हणून हे जगात प्रसिध्द आहेत.

    पुर्वीच्या काळी काशीला पोहोचणे महादिव्यच होते म्हणून त्याला काशी यात्रा म्हणत. आज मात्र भारतीय रेल्वेच्या उत्तम जाळयामुळे भारताच्या कुठल्याही भागातून थेट वाराणसीस पोहोचता येते. मुंबईहून 27 तासाच्या प्रवास करून वाराणसी गाठले.स्टेशन अतिशय भव्य. एखाद्या देवळासारखे डोळयात भरते. गाडीतून उतरलो आणि बनारसी ठगांनी बडगा दाखविला. रिक्षातून नेतो असे सांगून चक्क एका टॅक्सीत टाकले व परत आम्हालाच खोटे पाडले की आम्हीच टॅक्सी मागितली होती. बोला! आता पैशावरून भांडाभांडी. पोलीसही त्यांना सामील. शेवटी आम्हीच नांगी टाकली आणि हॉटेलमध्ये डेरेदाखल झालो.

    अनेक च्रित्रकारांनी तसेच अनेक फोटोंमध्ये उतरवलेले काशीचे घाट डोळयासमोर येत होते. नदीकाठी बांधलेले घाट, गंगेत स्नान करणारे हजारो भाविक, घाटावर उभारलेल्या छञ्या, आकाशाला भिडलेले मंदिराचे कळस, संथ गंगेच्या प्रवाहात दाटीदाटीने डोलणाऱ्या नावा हे सर्व डोळयासमोर उभे होते पण प्रत्यक्ष अनुभवण्याकरता घाटापर्यंत पोहचणे हेच एक दिव्य होते.

    संध्याकाळचे 6 वाजलेले. वाराणसीतले रस्ते माणसांच्या लोंढ्यांनी तुडुंब वाहात होते. बरोबर सायकली, सायकलरिक्षा व ऑटो रिक्षा, मोटारी व रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दुकानांची व फेरीवाल्यांची रांगच रांग. हॉर्नचा कान किटणारा आवाज.रस्त्याच्या मध्यातून शांतपणे चालणारे गाई, बैल आणि त्यांचा मान राखत जोरात मार्ग आक्रमणारी आमची दिव्य सायकल रिक्षा एका अरूंद बोळात घुसली. चक्क रिक्षा एकमेकंाना घासत अगदी धक्काबुक्की करावी तशा पुढे जात होत्या. शेवटी नाइलाजास्तव उतरून चालण्यास सुरवात केली. प्रचंड गर्दीतून मार्ग कसा बसा काढत होतो आणि त्यात गाइडचा आपापले पैशाचे पाकीट जपा असा सतत ढोशा चालू होता. बोळांमागून बोळ आणि माणसांचे लोंढे कापत जात होतो. नदीचा वा घाटाचा मागमुसही नव्हता. एक अरूंद बोळ ओलांडला आणि नाटकाचा पडदा एकदम बाजूला व्हावा तसा समोर रंगीबेरंगी विजेच्या रोषणाईत नाहून गेलेला भव्य घाट व समोर संथ वाहाणारे गंगेचे पात्र. अखेर मनाला शांती देणारी जागा मिळाल्याने धन्य झालो.

    काशीचा धनुष्याकृती घाट 9 ते 10 किमी.लांबीचा असून त्यावर जवळजवळ 70 ते 80 पक्के बांधलेले घाट आहेत. जवळजवळ सर्वच घाट नावानिशी प्रसिध्द आहेत. गंगेच्या काठापासून वरपर्यंत जाण्यास शेकडोंनी पायऱ्या, चौथरे व वर मंदिरे आहेत. हे सर्व घाट पश्चिम तीरावरच आहेत. पूर्व तीरावरच्या प्रदेशाला मघर म्हणतात. तो तीर पूर्वापार पापी समजला जात असल्याने सर्व जागा ओसाड आहे. ऋषिकेश पासूनची उफाळत येणारी गंगा या जागी संथ, शांत, मनाला प्रफुल्लीत करणारी. ती रामनगर गावापर्यंत उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहात येते. तिथे थबकते व चक्क उलट पावली ती उत्तरेकडे वळते. त्यामुळे वारााणसीला खळखळाट पूर्ण थांबतो व त्यामुळे पूर येत नाही.

    दशास्वमेध हा मुख्य घाट मध्यात विराजमान झालेला आहे. ब्रम्हदेवाने आपले 10 दास म्हणजे अश्व येथे अर्पित केले असे म्हणतात. हा घाट सर्वात पुण्यवान त्यामुळे अखंड गजबजलेला. अनेक पडाव, मोटर लाँचेस नदीतील सफरीकरता सज्ज असतात.

    आमचा गाईड आम्हाला एखादा शिक्षक या नात्याने सर्व माहिती रंगवून सांगत होता. मधेच थांबून तो विचारे 'आप समझ रहे है ना' त्यामुळे शब्दन् शब्द एैकणे भाग होते नाहीतर आम्हाला त्याने नापासच केले असते. घाटावर अतिशय शिस्तीत आरती चालू होती. झांजांबरोबर अनेक वाद्ये, पद्यरचना सुगम, अतिशय सुरेल गाणारे कलाकार, व उत्कृष्ट प्रकाश योजना. समोरच गंगेच्या प्रवाहात सोडलेल्या पणत्या. सगळे वातावरण आल्हादायक होते. नाव एकएका घाटासमोरून संथपणे जात होती. काळोखात प्रकाशनगरी काशी चमचमत होती.

    डॉ. अविनाश वैद्य

  • गणेशोत्सवाचे बदलते स्वरूप – मनोज इंगळे

    गणपती बाप्पा मोरया… म्हटले की एका आनंद जो अखंड दहा दिवस आपल्या मध्ये एक झरा होऊन ओसंडून वाहत असतो.

  • मोरया माझा – १ : पार्वतीच्या अंगावर पुतळा बनण्याइतका मळ कसा असेल?

    श्री गणेशांबद्दल आपल्या मनात जे प्रश्न येतात त्यापैकी हा एक महत्त्वाचा प्रश्न. खरेच आहे एखाद्या महानगरातल्या सगळ्या माता- भगिनींच्या अंगावर मिळून सुद्धा इतका मळ असूच शकत नाही. मग जगज्जननी त्रिपुरसुंदरी पार्वती इतकी अस्वच्छ कशी असेल?

  • श्रीमुद्गलपुराण – १

    या पुराणाचा विषय आहेत भगवान श्री गणेश. पर्यायाने अंतिम सत्य काय तर श्री गणेश. सर्वोच्च सत्ता कोणती तर भगवान श्री गणेश.अनादी,अनंत, निर्गुण, निराकार, परब्रह्म काय तर भगवान श्री गणेश. त्या भगवान श्रीगणेशांना जाणून घेण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे श्रीमुद्गलपुराण.

  • श्रीगणेश अवतारलीला १ – श्रीमयुरेश्वर अवतार

    श्रावण शुद्ध चतुर्थी ते भाद्रपद शुद्ध चतुर्थी असा एक महिना तिने पार्थिव गणेश पूजन केले. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला मध्याह्न समयी या पार्थिव गणेशमूर्ती तूनच प्रकटलेला भगवान गणेशांचा अवतार म्हणजे श्रीमयुरेश्वर. या अवतारात भगवान सहा हातांचे होते. मोरावर बसलेले असल्याने त्यांना मयुरेश्वर असे म्हणतात.

  • श्रीमुद्गलपुराण – २

    परब्रह्म परमात्मा भगवान श्री गणेशांच्या निर्गुण निराकार स्वरूपाचे विविध अंगाने स्पष्टीकरण करणाऱ्या श्रीमुद्गलपुराणाच्या निर्मितीचा इतिहासही मोठा अलौकिक आहे.