(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • स्कंदमाता – पांचवी माळ

    स्कंदमातेने तिच्या भक्तांना विद्या प्राप्तीचं वरदान दिलेलं आहे. सहा वर्गांच्या कन्येचं स्वरुप मानून अशा कन्येला पूजा करवून गायीच्या तुपाचा नैवेद्य दाखविला जातो. स्कंदमातेने ती शिवस्वरुप असलेने या दिवशी तिला बेलपत्रांची माळ अर्पण केल्यास ती प्रसन्न राहते. तिला कालीमाता म्हणूनही ओळखतात.

  • दुर्गुण

    आपण नेहमीच दुस-या व्‍यक्तीचे दुर्गुण बघतो, त्‍यावर टीका-टिपण्णी करतो, मात्र आपण आपल्‍यातील दुर्गुणांवर दुर्लक्ष करतो. आपल्यामधील दुर्गुणांकडे आपले कधीच लक्ष जात नाही, नव्हे आपण ते पाहण्याचा प्रयत्नदेखील करीत नाही. माणसाचा स्वभावच असा आहे की त्याला दुसऱ्याचा चांगुलपणा एकवेळ दिसणार नाही, परंतु दुसऱ्यातील दुर्गुण लगेच दिसतील. स्वतःमध्ये कितीही दुर्गुण असले तरी त्याला फक्त स्वतःचा चांगुलपणा आणि दुसऱ्यांचे दुर्गुण नेहमीच दिसतात.

  • भोग

    मनुष्याच्या आयुष्यात सुखाचा भोग असो किंवा दुःखाचा भोग ! तो मनुष्याला संचित पाप कर्म व पुण्यकर्म यामुळेच भोगावा लागतो. संतश्रेष्ठ जगतगुरु संत तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात प्रमाण देतात की,

    भोगें घडे त्याग । त्यागें अंगा येती भोग ||
    ऐसें उफराटें वर्म । धर्मा अंगीं च अधर्म ||
    देव अंतरे तें पाप । खोटे उगवा संकल्प ||
    तुका म्हणे भीड खोटी । लाभ विचारावा पोटीं ||

    संतश्रेष्ठ संत शिरोमणी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा हा गाथ्यातील अभंग आहे. संत तुकोबाराय या अभंगात असे सांगत आहेत की, एखादा मनुष्य प्रपंचातील विषय भोग घेत असेल आणि त्याला काही काळानंतर त्याचा त्याग करावा वाटला आणि त्याने त्या विषयांचा त्याग केला कि, त्याला लगेच त्या सर्व संचित पाप आणि पुण्य कर्माचा भोग भोगावा लागतो. म्हणजे एखाद्या वाईट व्यक्तीने वाईट कर्म करीत असताना तो करीत राहिला परंतु त्याने तो वाईट कर्म न करण्याचा संकल्प केला आणि त्याने ते वाईट करने सोडून दिले. परंतु त्याने वाईट कर्म सोडून देताच त्याच्यावर दुःखाचा डोंगर किंवा मोठा संकटांचा डोंगर कोसळतो. याचाच अर्थ असा की, त्याने वाईट कर्माचा त्याग करताच त्याच्या पूर्व कर्माचा भोग समोर उभा राहतो.

    संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकोबाराय असेही सांगतात की, हे असे उफराटे वर्म म्हणजे उलटे वर्म आहे. आणि धर्मा अंगीच अधर्म आहे. ज्या कर्मामुळे देवात आणि भक्तामध्ये अंतर पडते ते कर्म म्हणजे पाप कर्म ! आणि देवाचे कर्म म्हणजेच सत्कर्म ! हे लक्षात घेऊनच भक्ताने नीतीने आणि न्यायाने जगायला शिकले पाहिजे. खोटे व्यर्थ संकल्प चांगल्या व्यक्तीने कायमचे सोडून द्यावे.

    तुकोबाराय शेवटच्या चरणात असे सांगत आहेत की खोटे संकल्प, व्यर्थ संकल्प, खोटी भीड न धरता जिथे आपला लाभ असेल, जिथे आपला परमार्थ असेल तेथे आपण आपला लाभ बघावा. आणि आपण नीती न्यायाने कर्म करीत जगत राहावे.

    *विठोबासी शरण जावे |*
    *निजनिष्ठे नाम घ्यावे ||*

    विठोबाचे शरण जाऊन त्याचे नाम घेत अखंड चिंतन करत राहण्यातच खरा धर्म आहे, खरा स्वार्थ आहे आणि खरा लाभ आहे. कारण विठोबाचे नामस्मरण हे फक्त निमित्तमात्र आहे, परंतु त्यामुळे आपल्या मनात नकारात्मक विचार येत नाहीत. आपण सकात्मक विचाराने पुढील कार्य करायला लागतो, ज्याचे भोग आपणास सकारात्मकच मिळते.

    -- डॉ. शांताराम कारंडे

  • भारतातील आध्यात्मिक गुरू सत्य साईबाबा

    स्वतंत्र भारताच्या इतिहासात आध्यात्मिक क्षेत्रात बहुधा सगळ्यात जास्त प्रसिद्धी मिळालेले आणि प्रभाव गाजविलेले व्यक्तिमत्व सत्यसाईबाबा यांचे पूर्ण नाव सत्यनारायण राजू होते. त्यांचा जन्म २३ नोव्हेंबर १९२६ रोजी झाला. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी, १९४० मध्ये त्यांनी आपण शिर्डीच्या साईबाबांचे अवतार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर ते भारतातील बहुधा सगळ्यात प्रसिद्ध आणि प्रभावशाली आध्यात्मिक गुरु बनले. प्रथम त्यांच्याभोवती हवेतून विभूती अथवा शंकराची पिंड काढून देणारे बाबा म्हणून काहीसे संशयाचे अथवा विस्मयाचे वातावरण होते. परंतु त्यानंतर त्यांनी स्थापन केलेली सेवाकार्ये, शिक्षण, आरोग्य, ग्रामसुधार आदी क्षेत्रांमधील कामांमुळे तसेच मोठमोठय़ा दानांमुळे त्यांचे नाव सर्वत्र झाले. आपण शिर्डीच्या श्रीसाईबाबांचे अवतार आहोत, असे जाहीर केलेल्या सत्यसाईबाबांचे अनुयायी अक्षरश: जगभर पसरले होते.

    भारतातील राजकीय, आर्थिक आणि इतर अनेक क्षेत्रात त्यांचे अनेक उच्चपदस्थ अनुयायी मोठ्या संख्येने होते. राष्ट्रपती, पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, झगमगते सितारे, सेलिब्रेटींचे सेलिब्रेटी मानले गेलेले क्रिकेटचे परमेश्वर अशा असंख्य लोकांचा समावेश सत्यसाईबाबांच्या भक्तगणांत होते. सत्यसाईबाबांची बहुतांश सेवाकार्ये आंध्र प्रदेशात आहेत. आंध्रप्रदेशात पुट्टपर्थी या गावी सत्य साईबाबांचा आश्रम आहे. त्यांची संपत्ती ४० हजार कोटी ते तब्बल १ लाख कोटी रुपयांच्या घरात असल्याचे बोलले जाते. सत्य साईबाबा यांचे निधन २४ एप्रिल २०११ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • गुरु व गुरुमंत्र किंवा गुरुदिक्षा

    गुरुमंत्र म्हणजे एक कमिटमेंट असते, गुरुला दिलेले वचन असते, गुरुप्रति काया, वाचा, मनाने, तनमनधनाने, सर्वार्थाने केलेले निःसंशय समर्पण असते. ‘उतणार नाही मातणार नाही घेतला वसा (मंत्र ) टाकणार नाही’ मग काय वाटेल होवो असा ठाम निश्चय असतो. स्वेच्छेने पण पुर्ण विचारपूर्वक स्वीकारलेले बंधन असते.

  • शिवलीलामृतकार श्रीधर स्वामी

    श्रीधरांचे घराणे आनंद संप्रदायाचे; परंतु संतांना आदर्श मानणाऱ्या श्रीधरांनी वारकरी संप्रदायाची जवळीक साधली आणि आपल्या मनातील भावना, विचार व्यक्त करण्यासाठी संतांची अभंग व ओवी ही अभिव्यक्तीची माध्यमे  वापरले.  त्यांचे ग्रंथ त्या काळात लोकमान्य झाले होतेच. पण आजही ती मनोभावे वाचली जातात..

  • जीवन आणि यश

    मनुष्य स्व इच्छेने जगतो मग इच्छा अनुसार झाले की सुख आणि इच्छा अपूर्ण असल्याचे दुख. फक्त सुख आणि दुख म्हणजे जीवन नव्हे. जीवन म्हणजे जगण्यातील जिवंतपणा आणि तो आज नाहीसा झालेला दिसतो. जे खरे जीवन आहे ते प्रकृतीचे व वास्तवातले आणि खोटे ते कल्पनेतले मग जरा विचार करूया या जीवनामध्ये जगण्या इतके आपले आयुष्य असते तरी किती ? जर साठ वर्ष धरले तर वीस वर्ष झोपण्यात गेले, दहा वर्ष बालपण , दहा वर्ष career साठी, शेवटचे दहा वृद्ध अवस्थेत पश्य ताप करत बसण्यात. राहले दहा, व्यर्थ गोष्टी व मूर्खपणा जाणे केवळ वेळ वाया जातो अशा गोष्टी साठी पाच वर्ष. राहले पाच मग इतकेच असते जे जगायला मिळते हो फक्त इतकेच. मग असे ही एक वेगळं जीवन आहे, ते थोडं भिन्न व नैसर्गिक जे प्रकृती अनुसार असते.

  • तेथे कर माझे जुळती…….

    वळवाचे पाऊस सुरू झाले,पहिल्या पेरण्या झाल्या की वारक-यांना वेध लागतात पंढरपूरच्या विठुरायाच्या भेटीचे. मनामनात गजर सुरू होतो “ विठ्ठल विठ्ठल , जय जय पांडुरंग हरी...” वेध लागतात पंढरपूरच्या वारीचे. मी अगदी लहानपणापासून ज्ञानोबांच्या पालखीचे दर्शन, वारीला जाण्याची गडबड बघत व अनुभवत आलेली आहे. पण ते सर्व पुण्यासारख्या शहरी वातावरणात आलेल्या वारीची. प्रत्यक्ष वारक-यांशी बोलणे किंवा त्यांची पंढरपूरपर्यंत चालत जाण्याचे श्रम करण्यामागची भावना जाणून घेणे कधी जमलेच नव्हते. गतवर्षी योगायोगाने तुकारामांची पालखी जेव्हां बारामतीत पोहोचते तेव्हां आम्ही तिथेच होतो. त्यामुळे आसपासच्या छोट्या गावातून येणारे वारकरी जवळून पहाण्याचा योग आला.

    सकाळपासूनच वेगवेगळ्या खेड्यापाड्यातून छोट्या मोठ्या दिंड्या यायला सुरूवात झाली होती. आम्ही जिथे उतरलो होतो तो रस्ता भर वस्तीतला, गजबजलेला होताच. पण या दिंडीतल्या वारक-यांच्यामुळे आज वेगळाच वाटत होता. उंच काठीवर डौलात फडकत असलेल्या भगव्या पताका एका खांद्यावर मिरवत, दुस-या खांद्याला अडकवलेली पिशवी सावरत, डोक्याला मुंडासे, लांब बाह्यांचा पांढरा सदरा,पांढरे धोतर व पायात चपला अश्या वेशातले वारकरी तोंडाने विठ्ठलाचा गजर करत रस्त्याने लगबग करत चालले होते. त्यांच्या मागोमाग गोल किंवा नऊवारी साडीतल्या नथी घातलेल्या बायका भराभर नामस्मरण करत चालल्या होत्या.काही बायकांच्या काखेत स्वच्छ चकचकीत पाण्याच्या तांब्यापितळेच्या कळशा तर काहींच्या डोक्यावर छान रंगवलेले तुळशी वृंदावन होते. त्यातली तुळस त्यांच्या चालण्याच्या ठेक्याबरोबर डुलत होती.बहुतेक जणांच्या गळ्यात लांबलचक दोरीला बांधलेले टाळ होते.कुणाकुणाच्या खांद्यावर वीणा तर कुणाच्या हाती चिपळ्याही होत्या.एका ठेक्यात येणारा टाळांचा आवाज आसमंत भरून टाकत होता.

    दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणांहून लोक येत होते, तुकारामांची पालखी ज्या भल्यामोठ्या मैदानात उतरते त्याच्या जास्तीत जास्त जवळ आपापली पडशी/पिशवी ठेऊन जागा मिळवून विसावत होते.संध्याकाळच्या सुमारास रस्ता परत एकदम गजबजला. विठ्ठलाचा गजर दुमदुमू लागला, त्याच्या जोडीला “ ज्ञानोबा माऊली तुकराम ” हाही गजर सुरू झाला.या सर्वांच्यावर आवाज काढत टाळ दुमदुमू लागले. रस्त्यात एकच लगबग सुरू झाली. प्रत्येक वारक-याची धावपळ पालखीला सामोरे जाण्यासाठी सुरू झाली. अशातच तुकाराम महाराजांची पालखी गावच्या वेशीवर पोहोचल्याची बातमी आली आणि वारक-यांची उत्सुकता व आनंद त्यांच्या चेह-यावर ओसंडून जायला लागला. हातातल्या टाळांचा आवाज वाढला, तोंडाने होणारा विठ्ठलाचा गजर गगनाला भिडला.वेशीवर योग्य आगत स्वागत होताच पालखी मंडपाच्या दिशेने येऊ लागली. तुतारीचा आवाज पालखी जवळ आल्याची कल्पना देत होता.भालदार चोपदार आपापल्या पारंपारिक वेशभूषेत पालखीवर चवरी ढाळत होते, उत्तम सजवलेला घोडा गर्दीच्या मधोमध शांतपणे पण डौलात चालला होता. ना त्याला माणसांच्या गर्दीची भीती वाटत होती,ना माणसांना तो उधळेल याची ! टाळांच्या, तुतारीच्या, कर्ण्यावरून होणा-या मोठ्या आवाजातल्या सूचनांचा कोणताही विपरित परिणाम त्याच्यावर होत नव्हता. एका ठेक्यात दुडक्या चालीतले, इकडेतिकडे पहात जसे काही तुकाराम महाराज त्याच्यावर स्वार आहेत, त्यांना सांभाळणे आपले कर्तव्य आहे अशा अविर्भावातले घोड्याचे चालणे लक्ष वेधून घेत होते. पालखीला लोटांगण घालणारे, पालखीतल्या पादुकांना हात लाऊन नमस्कार करणारे, पालखी ओढणा-या बैलांच्या पायावर पाणी घालणारे यांची एकच गर्दी झाली. जो तो भक्तीभावात मग्न होता. दोन तगड्या बैलांच्या गाडीवर तुकाराम महाराजांचा फोटो व पादुका असणारी पालखी विसावलेली होती. पालखी उत्तम रंगकाम केलेली फुलांनी सजवलेली होती. दुरूनही पादुकांचे दर्शन घेता येत होते. वारकरी आनंदाने नुसते नाचत होते. मुखाने अखंड विठ्ठलाचे नामस्मरण, तुकारामांचा जयजयकार चालू होता. स्त्रिया,पुरूष,गरीब,श्रीमंत,आबाल वृद्ध यांची सरमिसळ झाली होती. प्रत्येकजण भक्तिरसात मग्न होता.पालखी मंडपात मुक्कामाला पोहोचली आणि रस्त्यात थोडीफार शांतता पसरली.

    रात्री आम्ही मंडपात पादुकांचे दर्शन घेण्यासाठी गेलो,तर तिथले वातावरण वेगळेच होते.मंडपात कीर्तन चालू होते. तबलजी व हार्मोनियम वादक यांच्या मध्ये कपाळावर बुक्का,डोक्यावर पागोटे, पांढरा सदरा, पांढरे धोतर, कमरेला कसलेले लाल मोठ्या काठाचे उपरणे,हातात चिपळ्या, गळ्यात हार अशा पोशाखातले मध्यम वयाचे कीर्तनकार डोळे मिटून कीर्तनाला उभे होते. त्यांच्या मागे २०-२२ टाळकरी दिवसभराच्या चालण्याचे श्रम विसरून हातात टाळ घेऊन गोलाकार उभे होते.कीर्तनकारांनी “पांडुरंग हरी” चा जयजयकार करताच मंडपात एकच शांतता पसरली व कीर्तन रंगू लागले.रात्र चढायला लागली तसा उत्साह वाढायला लागला.कीर्तनकारांच्या इशा-यानुसार मागचा वारक-यांचा गोलाकार एका तालात डोलायला, नाचायला लागला.कीर्तन रंगू लागले,पादुकांच्या दर्शनासाठी म्हणून गेलेले आम्ही सुद्धा बघता बघता त्यात तल्लीन झालो.

    सकाळी जाग आली ती रस्त्यावरच्या गडबडीने. छोटे टेंपो घेऊन माणसे आली होती त्या माणसांनी टेंपोतून येताना मोठमोठ्या पातेल्यातून पोहे, खिचडी, पराठे असे पदार्थ आणले होते. वारक-यांना बोलावून प्रत्येकाच्या हातात यातील काही ना काहीतरी दिले जात होते. पंढरीला जाणा-या सर्वांसाठी हे अन्नदान चालू होते. आपण जाऊ शकत नाही तर निदान जे जाताहेत त्यांच्या रूपाने विठ्ठलाला आपल्यातर्फे नैवेद्य पोहोचावा ही या मागची भावना ! वारकरी याचा आस्वाद घेऊन तृप्त होत होते. आता त्यांची पुढच्या प्रवासाला जाण्याची लगबग चालू झाली होती.पालखी तयार झाली होती. पालखीचा अश्व, भालदार चोपदार सज्ज होते. तुतारीचा इशारा होताच परत भजनाचा दमदार आवाज आसमंत भरून टाकू लागला, टाळ वाजू लागले, नगारे घुमू लागले. आम्हीही पालखीला निरोप देण्यासाठी रस्त्यावर उतरलो. हे सर्व जवळून बघता आले याची धन्यता वाटत होती.हळू हळू पालखी, तिच्या बरोबरचा लवाजमा पुढे पुढे सरकायला लागला. रस्त्यावरची गर्दी पांगू लागली.आता तुरळक तुरळक वारकरी मागे उरले. त्यातच एक म्हातारा वारकरी काठी टेकत टेकत हळू हळू चालत होता. त्याला तेवढ्या श्रमानेही तहान लागली असावी. त्याला पाणी देण्यासाठी मी त्याच्याजवळ गेले. अणि इतके दिवसात न मिळालेली एका सामान्य वारक-याशी बोलण्याची संधी मला मिळाली.

    “बाबा, तुम्ही कुठून आलात?”
    “माउली,आमचं गाव इथून धा मैल तरी दूर असलं!”बाबा घाम पुसत म्हणाले.
    “काल गावापासून चालतच आलात की काय?”
    “तर वो! फाटं फाटं निघालो. मला चालाया येळ लागतोय. म्हनूनशान समदी गाववाली निघायच्या आत म्या रस्ता धरला. काल पालखी अदुगर पोचलो.”
    “मग इथूनच परतणार काय? चालायला त्रास होतोय म्हणून विचारलं.”
    “त्यात काय, माऊली,पाय हाएत तर त्ये दुकणारच की वो ! असं त्याचं कवतूक करून चालतय व्हय! जास्त तरास वाटल तर कलाकभर बसायच आनी फुढ जायाचं!”
    “म्हणजे बाबा, पंढरी पर्यंत जाणार म्हणाकी तुम्ही !त्याच्या पुढं दर्शनासाठी भल्यामोठ्या रांगेत उभ रहायच,त्या गर्दीत दर्शन घ्यायच आणि परत फिरायच. एवढ सगळ झेपेल का तुम्हाला?”
    “इटुराया घेईल की काळजी माजी. म्या कशाला इचार करू? पंढरी पत्तुर जायाच ,कळसाला हात जोडायचे ,रातभर कीर्तन भजन ऎकायच आन परत माघारी फिरायच.दरसाल जातोय म्या. एकडाव बी चुकलो न्हाई.”
    “बाबा, इतक्या दूर जाता तर दर्शन तरी नीटपणे घेता येते का?”
    “माऊली, इटुरायाच्या द्येवळात मुंगीलाबी जागा नसतीया. तिथं कशाला जायाचं?”
    “म्हणजे दर्शन न घेताच तुम्ही परत फिरणार?”माझ्या पांढरपेशी मनाला इतक्या दिवसांची पायपीट ,श्रम करून देवदर्शन न घेताच परतण काही केल्या पटत नव्हत.

    म्हातारा मिशीतल्या मिशीत हसला. म्हणाला “माउली, तू बी एक माउली हायेस,तुजी लेकरं जवा गावावरून येतात तवा तू काय घरात बसून असतेस का? दारात येत न्हाईस? तसाच माजा इटोबापन.आमी त्येची लेकरं त्यो माउली. आमास्नी येताना बगून त्यो काय द्येवळात दडी मारून बसल व्हय? अग, आमी जवा वाखरीला ४ मैलावर येतो ना तवाच त्यो द्येवळाच्या कळसावर चढतो आन आमची वाट बघतो बघ. त्यो आमाला लांबूनच वळकतो. म्हनून्शान त्येला तिथूनच कळसावर बसलेला बगतो, हात जोडतो आनी परतीची वाट धरतॊ.”

    म्हाता-याचे बोलणे ऐकताना मी त्याच्या शब्दातील भक्तीभावाने इतकी भारवून गेले की त्याच्या पुढे मी नतमस्तक झाले. आपोआप माझे हात जुळले, डोळे पाण्याने डबडबले, त्याच्या सामान्य रूपात मला दिव्यत्वाची प्रचीती आली, त्याच्या रूपाने मला पांडुरंगच भेटल्याची जाणीव झाली व मनात शब्द उमटले “दिव्यत्वाची जेथ प्रचिती ,तेथे कर माझे जुळती.”

    “पांडुरंग हरी”.

    -- अनामिका बोरकर
    ए १८, वुडलॅंड्स, गांधी भवन मार्ग,
    कोथरुड, पुणे ४११ ०३८.

    ९८१९८ ६९०९०

  • पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती..!

    ज्ञानेश्वरांनी लिहीलेल्या ९९६ स्फुट रचनां मधली सर्वोत्कृष्ट रचना ही असावी … या गाण्यात विठ्ठलाच्या उत्पतीचा मागोवा घेतलाय ,गाणं तर अर्थपुर्ण सुंदर आहेच पण आशयाच्या दृष्टीने ही बहुअर्थसूचक ,शब्दांच्या पलीकडे जाऊन येणाऱ्या अनुभुती चं आकलन करुन देणारा आहे … ‘कानडाऊ विठ्ठलु कर्नाटकु येणे मज लावियेला वेधु …!’

  • परमेश्वराचे अस्तित्व

    …. तसाच परमार्थाचा मार्ग आहे. जपाचे पाणी घालून, भावाचे खत घाला, भक्तीचा मळा फुलवा, परमेश्वर तुमच्या जवळ आहे, याची अनुभूती येईल प्रचिती येईल.