वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
श्रावण कृष्ण अष्टमीला विष्णूंचा आठवा अवतार भगवान कृष्णांचा जन्म झाला. यांचा जन्म मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर, बुधवारी मथुरेत बंदीशाळेत (कारागृहात) झाला. या निमित्ताने हे व्रत करण्याची प्रथा आहे.
सप्तमीचे दिवशी एकभुक्त राहून, अष्टमीला व्रताचा संकल्प करून, पूजेच्या जागेवर फुले, पाने, वेली यांनी वातावरण सुशोभित करतात. तेथेच सूतिका गृह तयार करतात. पूजेच्या चौरंगावर देवकी, श्रीकृष्ण यांची स्थापना करतात. दुसऱ्या बाजूला यशोदा, तिची कन्या, वसुदेव, नंद यांच्या मूर्तीची स्थापना करून मध्यरात्री शूचिर्भूत होऊन पूजा करतात.
नवमीचे दिवशी पंचोपचारांनी उत्तरपूजा करतात. व मातीच्या मूर्तीचे जलाशयात विसर्जन करतात.
हा सण उत्सव संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. गोकुळ, मथुरा, वृंदावन इत्यादी क्षेत्रात विशेष थाटाने हा उत्सव साजरा होतो.
-श्री करंदीकर गुरुजी
कार्तिक शुक्ल नवमीचे कुष्मांड नवमी नांव आहे. कुष्मांड म्हणजे कोहळा. भगवंतांनी कूष्मांड नावाच्या राक्षसाला याच दिवशी मारले.
माघ कृष्ण नवमी रोजी समर्थ रामदास स्वामींनी आपला अवतार संपविला. तेव्हापासून या नवमीला रामदास नवमी असे म्हणतात.
इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी मोक्षसंन्यासयोग नावाचा अठरावा अध्याय…
श्रीस्वामी समर्थ महाराजांनी स्वत:स्थापिलेल्या या श्री नृसिंहभान देवस्थानातच भकतश्रेष्ठ चोळप्पांच्या इच्छेनुसार त्यांची समाधी झाली. आज हे स्थान समाधी मठ म्हणून ओळखल जाते. “आमचे नाव सुद्धा नरसिंहभान आहे बरे!” असे श्रीमहाराज एकास म्हणाले होते त्यामुळे पूर्वी नरसिंहभान देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या या स्थानाला आज जर श्रीस्वामी समर्थ समाधी मठ म्हटले जाते, यात काही नवल नाही. धन्य ते चोळप्पा ज्यांच्या घरालगतच पूर्णसनातन परब्रह्म सगुणी विसावला.
हा सण बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रावण महिन्यातील अमावस्येला केला जातो. यालाच बेंदूर असेही नांव आहे. देशपरत्वे काही ठिकाणी आषाढ, भाद्रपद अमावस्येला हा सण केला जातो. पेरण्या संपलेल्या असतात, शेतीच्या कामातून बैल रिकामे झालेले असतात. अशा वेळी बैलांना न्हाऊ- माखू घालतात. आरती ओवाळतात. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करतात. दुपारी त्यांना सजवून गावातून वाजत-गाजत मिरवणूक काढतात. यात बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त होते.
-श्री करंदीकर गुरुजी
कार्तिक शुक्ल द्वादशीला चातुर्मासाची समाप्ती होते. चातुर्मासांत केलेल्या व्रतांची सांगता करावयाची असते.
माघ कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्र असे म्हणतात. हे एक व्रत आहे. हे व्रत नित्य आणि काम्य दोन्ही आहे. नित्य म्हणजे प्रतिवर्षी करणे आणि काम्य म्हणजे इच्छित मनोरथ पूर्तीसाठी करणे. महाशिवरात्रीला चार याम पूजा मुख्य आहेत. याम म्हणजे प्रहर, एक प्रहर म्हणजे अंदाजे तीन तास.
आपला 14 वर्षांचा वनवास संपवून प्रभू रामचंद्र अयोध्येला परत आले, तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदा. वनवासाला गेलेला राजा राम परत आला तो प्रभू रामचंद्र म्हणून. यामागे तपश्चर्या होती. त्याग होता. समर्पण होते. सर्वांना हृदयात सामावून घेण्याचे लोकोत्तर गुण होते.
भाद्रपद शुद्ध चतुर्थी रोजी गणेश चतुर्थी व्रत केले जाते. हे व्रत, उत्सव जवळपास संपूर्ण भारतात करतात. याला वरद चतुर्थी असेही नांव आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti