(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • श्रीमद्भगवद्गीता मराठीत श्लोकबध्द – अध्याय सत्रावा – श्रध्दात्रयविभागयोग

    इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी श्रध्दात्रयविभागयोग नावाचा सत्रावा अध्याय.

  • स्वाध्याय

    उपनिषदातील अनुशासनात ज्या अनेक आज्ञा केल्या आहेत त्यातील एक आहे ‘स्वाध्यायान्मा प्रमदः म्हणजे स्वाध्यायात प्रमाद ‘होऊ नये. यथास्थित स्वाध्याय घडावा यासाठी काही व्रतांचे आचरणही त्यात आलेले आहे. ऋत स्वाध्याय प्रवचने, सत्यं स्वाध्याय प्रवचने – इत्यादी, थोडक्यात सदाचरण, सत्यनिष्ठा, संयमित जीवन इत्यादींनी स्वाध्याय संपन्न असावा.

  • पेटीमास्तर धर्मबुवा तळपे

    धर्माबुवा तळपे म्हणजे जुन्या काळातील भजनसम्राट. जबरदस्त दैवी आवाज व तितकेच हार्मोनिअमची मधुर सुरावट.धर्माबुवांना ओळखत नाही असा माणूस शोधूनही सापडणार नाही.. आंबेगाव, खेड व मावळ तालुक्यात जुने लोक त्याना पेटीमास्तर या नावानेच ओळखतात. अजूनही त्यांच्या भजनाचा विषय निघाला की लोक भरभरून बोलतात. त्यांचे कौतुक करतात. असा पेटीमास्तर पुन्हा होणार नाही असे बोलतात.

  • रथसप्तमी

    माघ शुक्ल सप्तमीला रथसप्तमी असे म्हणतात. या सप्तमीला अचला सप्तमी, जयंती सप्तमी, भास्कर सप्तमी अशी अन्य नांवे सुद्धा आहेत.

  • राममंदिर उभे रहातेय

    1990 साली दादरहून ज्या महिला स्वयंसेवक अयोध्येसाठी रवाना झाल्या त्यातील या एक शालिनी डबीर .या महिलांना अयोध्येपासून साधारण 50-60 किलोमीटरवर एका शाळेत बंदिस्त करण्यात आले होते. काही कारसेविका तिथून पळून गेल्या व पायी चालत हे अंतर कापत अयोध्येत दाखल झाल्या. पोलिसांनी चालवलेल्या गोळ्या, अश्रूधूर व लाठीचार्ज याचा सामना केला खरा पण बाबरी वर भगवा ध्वज फडकताना पाहिला.

  • इच्छाशक्ती

    एक प्रसंग आठवतो. पंडित जसराज यांची मैफल ऐकण्याकरिता नामवंत रसिक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जमलेले. पंडितजींची मैफल रंगली. भैरवीला त्यांनी विठ्ठलाचे भजन गाऊन ‘विठ्ठला विठ्ठला’ असा आर्त स्वर लावला. डोळे मिटून गात होते. एकरूप झाले होते

  • भाऊबीज

    कार्तिक शुक्ल द्वितीयेला भाऊबीज किंवा यम द्वितीया असे म्हणतात. या दिवशी यमराज आपली बहिण यमुना हिचे घरी भोजनाला गेला. यास्तव या दिवसाला यम द्वितीया हे नांव पडले. या दिवशी कोणत्याही पुरुषाने घरी पत्नीच्या हातचे भोजन घेऊ नये.

  • भीमाष्टमी

    माघ शुक्ल अष्टमीला भीमाष्टमी असे म्हणतात. या दिवशी भीष्माचार्यांनी प्राणत्याग केला असे सांगतात. भीष्माचार्य हे ब्रह्मचारी असल्याने त्यांचे तर्पण, श्राद्ध करण्यास कोणी नाही म्हणून सर्वांनी त्यांना आपले मानून तर्पण करावे ते या दिवशी.

  • साने गुरुजींचा पंढरपूर मंदिर प्रवेश लढा

    समाजातील जातीभेद,  अस्पृश्यता  यासारख्या  अनिष्ट  रूढी  आणि परंपरांना  साने गुरुजींनी नेहमी विरोध केला. त्यांनी दिलेल्या अनेक  लढ्यांपैकी एक महत्त्वाचा लढा  म्हणजेच “पंढरपूरच्या मंदिर प्रवेशाचा लढा“

  • विपरीत ज्ञान

    ऐक्याचं मुद्दल जर मोडत नसेल आणि भक्तीचा विलास जर करता येत असेल, ऐक्याच्या मुद्दलाला धक्का न लागता म्हणजे अद्वैत अवस्थेला धक्का न लागता जर भक्ती होत असेल तर का न करावी? सागराला बाधा न येता जर त्याच्या वरची लाट त्याच्या वरचा तरंग होऊन मजा जर भोगता येत असेल तर का न भोगावी?