(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • कवीवर्य सुरेश भट

    १९६१ साली सुरेश २९ वर्षांचा असताना नागपूरच्या नागविदर्भ प्रकाशनाकडून त्याचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. रूपगंधा व त्याला दिलीप चित्रे यांच्यासोबत विभागून राज्यशासनाचे दुसरे पारितोषिक मिळाले आणि पहिलं पारितोषिक कुसुमाग्रजांना. यानंतर मात्र दांभिक नातेवाईक, हिणवणारे समकालीन सुरेशला ओळख देऊ लागले.

      June 8, 2024


  • किचन क्लिनीक – जव

    किचन क्लिनीक – जव

    जव हे धान्य प्रामुख्याने क्षुद्रधान्या मध्ये समाविष्ट होते. तसेच ह्याचा वापर आपल्या दैनंदिन आहारात आपण जास्त करताना आढळत नाही कारण तसे हे धान्य कोकण गोवा प्रांतात फारसे प्रचलित नाही.

    तरी देखील हे अत्यंत पौष्टीक, त्यामानाने स्वस्त असे धान्य असल्याने ह्याचा वापर जर आपण आपल्या आहारा मध्ये केला तर त्याचा फायदा आपल्या आरोग्यास व शरीरास नक्कीच होऊ शकेल ह्यात शंका नाही.

    डायबेटिस असणाऱ्या व्यक्तिंना तर जव हे एक वरदान आहे त्यामुळेच प्रमेही रूग्णाने आपल्या आहारात जवाचा वापर केल्यास त्याचा चांगला फायदा रक्तगक साखर नियंत्रित करायला व प्रमेह आटोक्यात ठेवायला नक्की होऊ शकतो. चला तर मग आपण जवाचे गुणधर्म पाहुयात: जव चवीला गोड, तुरट, थंड, रूक्ष, पचायला हल्के, वातकर, कफ पित्त नाशक असून, मल वाढविणारा, तसेच चरबी कमी करणारा, मेघा, बुद्धी, शरीर बल वाढविणारा आहे.

    आता आपण जवा पासून तयार केलेल्या पदार्थांचे गुणधर्म पाहुया:

    १) मंड:

    हा पचायला हल्का, कफपित्तनाशक, वातुळ, घशाला हितकर, रक्त शुध्दीकर आहे.

    २) मंथ:

    चवीला गोड, थंड, वर्ण सुधारणारा,बलवर्धक, पुष्टीकर, स्थैर्यकर, पित्तनाशक, दाह, तहान, श्रम ह्यांचा नाश करणारा, उल्टी होत असल्यास ती कमी करायला मदत करतो.

    ३) रोटी:

    चवीला गोड, हल्की, वातकर, मल वाढविणारी, कफरोगात उपयुक्त, बलकारक, शुक्रवर्धक आहे.

    जव खायचा अतिरेक केल्यास शरीरात वात वाढून त्याची लक्षणे दिसू लागतील.

    (क्रमश:)

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    आता पर्यंत सुरू असलेले किचन क्लीनीक ह्या सदरातील हा शेवटचा लेख असून हे सदर ह्या शेवटच्या लेखाने पुर्ण होत आहे.मी आशा करते की हे सदर आपल्या सर्वांना नक्कीच उपयुक्त ठरले असेल.लवकरच पुन्हा भेटूया एक नवीन लेखमाला घेऊन.

    तो पर्यंत तात्पुरता निरोप घेते.

    धन्यवाद.

    वैद्य स्वाती अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क: ९९६०६९९७०४

      February 9, 2017


  • सिक्युअर्ड डिजिटल इंडिया’ साकारायाची गरज

    भारतातील डिजिटल उपभोक्ता वाढत असून, भारतीय ग्राहक विविध डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा वापर सक्रियपणे करत आहेत. मात्र, फसवणुकीचा धोकाही त्यामुळे वाढला असून, चारपैकी एक ग्राहक ऑनलाइन फसवणुकीला बळी पडत आहे. एक्स्पिरिअनच्या डिजिटल कंझ्युमर इनसाइट्स १६ जुनच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

      July 25, 2018


  • selfie

    आजचे युग ‘मोबाईल युग आहे. बाल-वृद्ध, गरीब-साहूकार सर्वजण ह्या मोबाईलच्या आकर्षणामध्ये फसले आहेत. रामायणामध्ये जसे सीतेला सोनेरी हरण मोहीत करून गेले तसेच आज सगळ्यावर ह्या मोबाईलची जादू झाली आहे. काही वर्षांपूर्वी एखादा व्यक्ती एकटाच बोलताना दिसला की लोक त्याला वेडा म्हणायची पण आज ९०% लोक ह्या मोबाईल मुळे वेडी झालेली दिसून येतात.

      October 15, 2021


  • श्री शिवापराध क्षमापणस्तोत्रम् – ३

    प्रौढोहं यौवनस्थौ विषयविषधरैः पञ्चभिर्मर्मसन्
    धौ दष्टो नष्टो विवेकः सुतधनयुवतिस्वादुसौख्ये निषण्णः ।
    शैवीचिन्ताविहीनं मम ह्दयमहो मानगर्वाधिरूढं क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥३॥

    मानवी जीवनातील दुःख परंपरेचे वर्णन करतांना आचार्य श्री म्हणतात की काळाच्या ओघात मी मोठा झालो. बालपणीच्या दुःख कारणांना दूर करण्याचे बळ तर अंगी आले पण तरी दुःख कुठे संपले? तारुण्यात वेगळे दुःख सुरू झाले.
    प्रौढोहं यौवनस्थौ - मी थोडा मोठा झाल्यावर यौवन अवस्थेला प्राप्त झालो.
    विषयविषधरैः पञ्चभिर्मर्मसन्धौ
    दष्टो - त्यावेळी शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पाचही विषयरूपी विषधर म्हणजे सापांनी माझ्या मर्म स्थानांना चावा घेतला.
    त्या पाच विषयांचा आस्वाद घेणारी अनुक्रमे कान,त्वचा, डोळे, जीभ आणि नासिका ही पाचही इंद्रिये त्याविषयांच्याच ताब्यात गेली होती. जणु त्यांच्या विषाने बेशुद्ध झाली होती.
    नष्टो विवेकः - त्याचा परिणाम म्हणून माझा विवेक नष्ट झाला. काय करावे? आणि काय करू नये? हेच समजत नव्हते. सुतधनयुवतिस्वादुसौख्ये निषण्णः - मुलगा, पैसा, पत्नी यांच्या गोड गोड वाटणाऱ्या सुखात मी आकंठ बुडून गेलो.
    शैवीचिन्ताविहीनं - भगवान शंकरांचे चिंतन करण्याचे सोडून,
    मम ह्दयमहो मानगर्वाधिरूढं- माझे हृदय मानसन्मान गर्व यांच्या टोकावर आरूढ झाले होते.
    हे सर्व माझे दोष आहेत.
    क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो - हे भगवान महादेवा ! शिवशंकरा! माझ्या या अपराधांना क्षमा करा.
    मला आपले चिंतन करण्याची बुद्धी प्रदान करा.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      July 22, 2020


  • निरंजन – भाग ८ – प्राणभक्ती

    शरिरामध्ये अस्तित्वात असणार्‍या प्राणशक्ति वर केलेली साधना म्हणजे प्राणभक्ती…. प्राणभक्ती ध्यान केल्याने शरिराची रोगप्रतिकार क्षमता वाढते आणि आपल्या शरिराला आजारांपासुन मुक्ती मिळते.

      December 16, 2019


  • आयफेल टॉवरचे उद्घाटन

    आयफेल टॉवरचे उद्घाटन

    दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने फ्रान्सवर कब्जा केला तेव्हा फ्रेंच लोकांनी टॉवरच्या लिफ्टच्या केबल कापून टाकल्या होत्या. हेतू हा की हिटलर येईल तेव्हा त्याला पायऱ्या चढत टॉवरवर जावं लागेल. हिटलर आला, पण तो आयफेल टॉवरवर काही गेला नाही. म्हणून फ्रेंच लोकं गंमतीने म्हणतात की हिटलरने पॅरिस जिंकलं पण त्याला आयफेल टॉवर काही जिंकता आला नाही!

      March 31, 2022


  • भुमिकांची अदलाबदल

    आपलं म्हणणं जर एखाद्या व्यक्तीला पटलं नाही तर आपण किती सहजपणे तो मुर्ख आहे किंवा त्याला काही कळत नाही असं म्हणून मोकळं होतो. पण आपल्या विरूद्ध मतं मांडणाऱ्याची भुमिकाही बरोबर असू शकते हा विचार भले भले करू शकत नाही.

      April 23, 2017


  • चष्मा का लागतो?

    अगदी खरे सांगायचे तर नेत्रतज्ज्ञांनाही हे माहीत नाही. नक्की माहिती असलेले एकच कारण आहे- ते म्हणजे आनुवंशिकता. आई-वडिलांना चष्मा असल्यास मुलांना चष्मा लागण्याची शक्येता खूपच असते. इतर कुठलेही एकच एक कारण अद्याप सिद्ध झालेले नाही. ‘मुले सारखी टीव्ही-कॉम्प्युटरसमोर असतात, त्यामुळे चष्मा लागतो का?’ असे अजून तरी सिद्ध झालेले नाही. ज्यांना चष्म्याचा नंबर असतो, ते जवळ जाऊन टीव्ही बघतात. कारण त्यांना लांबून टीव्ही दिसत नाही. म्हणजे जवळून टीव्ही बघितल्यामुळे चष्मा लागतो, असे म्हणता येत नाही. तर चष्म्याचा नंबर असल्यामुळे टीव्ही जवळून बघितला जातो. एकदा त्यांना चष्मा लावायला दिला, की ते व्यवस्थित अंतरावरून टीव्ही बघतात. सिद्ध झालेले नसले तरी बहुतेक नेत्रतज्ज्ञांच्या मते- आधुनिक बैठी जीवनशैली आणि चष्मा यांचे नाते असू शकेल. सिंगापूर व जपानमध्ये झालेल्या पाहणीत काही वर्षांपूर्वीच्या मानाने तेथील सध्याच्या मुलांमध्ये चष्मा लागण्याचे प्रमाण जवळजवळ दुपटीपेक्षाही जास्त वाढले आहे. त्यांत घरात राहून बैठे खेळ खेळणे, कुठल्यातरी स्क्रीन (टीव्ही-कॉम्प्युटर)समोर नजर सतत खिळवून ठेवणे, या अशा शहरी जीवनशैलीचा परिणाम असण्याची शक्यलता सांगितली आहे. ‘अ’ जीवनसत्त्व डोळ्यांसाठी निश्चि तच चांगले असते; परंतु चष्म्याचा नंबर ‘अ’ जीवनसत्त्वाच्या अभावामुळे येत नाही. ‘अ’ जीवनसत्त्वाच्या अभावामुळे डोळ्यांवर इतर दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे कितीही पालेभाज्या खाल्ल्या, गाजर खाल्ले तरी चष्म्याचा नंबर कमी होत नाही. काही लोकांमध्ये असाही एक गैरसमज असतो, की सारखा चष्मा वापरला, की चष्म्याचा नंबर कमी होतो; परंतु असे काही नसते. चष्मा वापरणे व नंबर कमी अथवा जास्त होणे, या दोन स्वतंत्र बाबी आहेत. त्यांचा एकमेकांशी काही संबंध नाही. चष्मा कायम घातला तरी नंबर जर वाढायचा असेल, तर वाढतोच.

    नंबरांचे वर्गीकरण
    चष्म्याच्या नंबरांच्या प्रकाराचे वर्गीकरण ऱ्हस्वदृष्टिदोष, दीर्घदृष्टिदोष व चाळिशीनंतर लागणारा चष्मा, असे करता येईल.
    ऱ्हस्व दृष्टिदोष - अशा रुग्णांचा डोळा आकाराने मोठा असतो. त्यामुळे ज्या वस्तूकडे बघतो, त्याची प्रतिमा डोळ्याच्या रेटिनाच्या पुढे तयार होते. या रुग्णांना लांबचे दिसत नाही; जवळचे मात्र दिसते. लांबचे न दिसल्यामुळे हे रुग्ण टीव्ही जवळ जाऊन बघणे, पुस्तक डोळ्यांच्या जवळ घेऊन बघणे, असे करतात. ऋण (मायनस) नंबरचा चष्मा अथवा कॉन्टॅक्टय लेन्स वापरून या रुग्णांची नजर सुधारते. सर्वसामान्यपणे लहान वयात ऱ्हस्वदृष्टी चष्मा लागल्यावर शरीराची वाढ होते; त्या प्रमाणात नंबरही वाढत जातो. वाढ पूर्ण झाल्यावर नंबर वाढण्याचे प्रमाणही थांबते; परंतु काही रुग्णांमध्ये त्यानंतरही नंबर वाढू शकतो. त्यांच्या आधीच्या पिढीतील नातेवाइकांचा नंबर कसा व किती आहे, यावर बरेचसे अवलंबून असते.

    काही ऱ्हस्वदृष्टिदोष असलेल्या रुग्णांमध्ये डोळ्यांचा रेटिना नावाचा भाग काही ठिकाणी झिरझिरीत झालेला आढळून येतो. जास्त जाड चष्मा असलेल्या लोकांमध्ये याचे प्रमाण जास्त दिसून येते. झिरझिरीत- पातळ झालेल्या भागात जर भोक पडले, तर त्यातून नेत्रपटल अथवा रेटिना आपल्या जागेवरून सरकण्याची शक्यळता असू शकते. असे झाल्यास एकाएकी दृष्टी एकदम कमी होते किंवा नजरेसमोर पडदा आल्यासारखे वाटून फक्त वरच्या भागातले दिसणे किंवा कुठल्या तरी एकाच भागातले दिसणे, असे होऊ शकते. उदाहरणार्थ- समोर उभ्या असलेल्या व्यक्तीचे फक्त डोके व मान दिसते. खालचा भाग दिसत नाही किंवा फक्त खालचे शरीर दिसते; वरचा भाग दिसत नाही. एखाद्या रुग्णाला कपबशीतील फक्त कप दिसतो; बशी दिसत नाही, असे घडते. नेत्रपटल जागेवरून सरकलेले असल्यास त्यावर शस्त्रक्रिया हाच उपाय आहे. ही शस्त्रक्रिया लवकरात लवकर करणे गरजेचे असते.

    जाड चष्मा असलेल्या सर्व रुग्णांनी आपल्या डोळ्याचा रेटिना वर्षातून एकदा तपासून घ्यावा. त्यात जर काही झिरझिरीत अथवा भोके असलेला भाग दिसला, तर त्यावर लेझर उपचार करून पुढील संभाव्य धोका व त्यावरील मोठी शस्त्रक्रिया टाळता येऊ शकते. ज्यांच्या कुटुंबांमध्ये (आई-वडील-बहीण-भाऊ इत्यादी) असा प्रकार आधी झालेला आहे, त्यांना हा धोका जास्त असतो. असे घडल्यास करावी लागणारी शस्त्रक्रिया ही जवळ जवळ तातडीची शस्त्रक्रियाच समजली जाते; जितक्या् लवकर करू, तेवढी ती यशस्वी होण्याची शक्य्ता वाढते. जाड मायनस नंबरचा चष्मा असलेल्या रुग्णांनी त्यांना जर डोळ्याच्या आत वीज चमकल्यासारखी वाटली, तर डॉक्ट.रना लगेच दाखवावे. रेटीनाला भोक पडले असल्यास, असे होऊ शकते. अशा वेळी आधी सांगितल्याप्रमाणे लेझर उपचार केल्यास पुढचा धोका टाळता येऊ शकतो.

    डोळ्यांच्या उपचारांमध्ये लेझर वेगवेगळ्या कारणांसाठी वापरतात. लेझर म्हणजे फक्त काही विशिष्ट पद्धतीचे लाईटचे किरण डोळ्यातील हव्या त्या भागावर केंद्रित करतात. अगदी पाच ते दहा मिनिटांत हे काम होते. कुठल्याही प्रकारचे इंजेक्शकन, शस्त्रक्रिया यात नसते.

    दीर्घदृष्टिदोष या रुग्णांचा डोळा आकाराने लहान असतो. त्यामुळे ज्या वस्तूकडे बघायचे तिची प्रतिमा रेटिनाच्या मागच्या भागात तयार होते. प्रत्यक्ष रेटिनावर धूसर प्रतिमा दिसते. या रुग्णांना मुख्यत्वे जवळचे बघायला त्रास होतो. लांबचे चष्मा न लावल्यासही दिसते; परंतु जास्त नंबर असल्यास डोके दुखणे - डोळे दुखणे असे होऊ लागते. त्यामुळे लांबचे बघतानासुद्धा चष्मा लावावा. ऱ्हस्वदृष्टिदोषाप्रमाणे दीर्घदृष्टिदोषाच्या रुग्णांमध्ये शरीराच्या वाढीनुसार नंबर वाढत नाही. रेटिनाही बहुतांश रुग्णांत चांगला असतो. त्यामुळे त्यामानाने नेत्रपटल सरकण्याचा प्रकार कमी असतो.

    प्रेसबायोपिया म्हणजेच चाळिशीनंतर येणारा चष्म्याचा नंबर! चाळिशीआधी आपल्या डोळ्याचे स्नायू लवचिक असतात. त्यामुळे डोळ्यापासून जवळच्या अंतरावर, लांब अंतरावर व त्यामधील कुठल्याही अंतरावर आपल्याला नजर केंद्रित करता येते; परंतु चाळिशीनंतर स्नायूंची लवचिकता कमी होते, त्यामुळे लांबची नजर फारशी खराब होत नाही. मात्र जवळचे अंधुक दिसू लागते. पेपर जरा लांब धरल्यावर चांगला दिसतो. वयाप्रमाणे काही प्रमाणात हा नंबर वाढतो. त्यामुळे चाळिशीनंतर बायफोकल अथवा प्रोग्रेसिव्ह चष्मा किंवा लांबचा व जवळचा वेगवेगळा, असे दोन चष्मे करावे लागतात. ज्यांना आधीपासून मायनस नंबरचा चष्मा आहे, त्यांना लांबचा चष्मा काढून जवळचे चांगले वाचता येते; परंतु तरीही जवळचा नंबर वेगळा काढणे व त्यानुसार वेगळा चष्मा करणे चांगले. कॉम्प्युटरवर ज्यांना जास्त वेळ काम करावे लागते, त्यांना कॉम्प्युटरच्या अंतरासाठी वेगळा नंबर वापरल्यास डोळ्यांवर ताण येत नाही.
    सिलिंड्रिकल नंबरचा चष्मा असणे बऱ्याच रुग्णांची सिलिंड्रिकल नंबर आहे म्हटल्यावर ‘काही तरी भयंकर आजार आहे’, अशी भावना होते. खरे असे काहीच नाही. नंबरचा तो एक प्रकार आहे, एवढेच. कॉनियाचा पृष्ठभाग सर्व भागांत सारखाच गोलाकार नसेल, तर सिलिंड्रिकल नंबर लागतो. उदाहरणार्थ- उभा भाग जास्त गोलाकार असणे किंवा तिरपा भाग (१४० अंश-१२० अंश इत्यादी) जास्त गोलाकार असणे, असे. अशावेळी सर्व भागांत सारखाच गोलाकार असणारा नंबर देता येत नाही. सिलिंड्रिकल नंबरची काच हव्या त्या भागात कमी-जास्त गोलाकार करून घेता येते. सिलिंड्रिकल नंबर प्लस किंवा मायनस किंवा दोन्हींचे मिश्रणही असू शकतो. हा फारसा वाढत नाही; मात्र चष्मा न घातल्यास पेशंटना डोळे दुखणे, डोके दुखणे असे त्रास सुरू होतात. कोणता का नंबर असेना, डोळ्यांना त्रास होत असेल तर चष्मा वापरणे हितावह आहेच.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.- संतोष शेणई

      January 8, 2017


  • सांगेन गोष्टी हिताच्याच चार – भाग एक

    आयुर्वेद म्हणजे फक्त आरोग्यच नाही. तर जीवन जगण्याचे शास्त्र आहे. त्यामुळे जगण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते ते सर्व आयुर्वेदात वर्णन केलेले आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय करावे, हे दिनचर्येमधे सांगितले आहे. सकाळी आह्निके आटोपून, शुचिर्भूत होऊन, मग आपला धन मिळवण्यासाठी जो धंदा नोकरीउद्योग आहे तो करावा. कारण दीर्घ आयुष्य असले तरी जवळ धन नसेल तर, असे आयुष्य निंदीत मानले आहे. समर्थ रामदास स्वामी देखील सांगितात, प्रपंची पाहिजे धन !

      September 1, 2017