वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी सायंकाळी त्रिपुर पाजळवितात. त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा भगवान शिवानी वध केला तो दिवस म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा होय.
फाल्गुन कृष्ण प्रतिपदेपासून वसंतोत्सवारंभ होतो. चैत्र-वैशाख या चांद्रमासांमध्ये वसंत ऋतू असतो. पूर्वी उत्सव वसंत पंचमी पासून करीत असत.
संपूर्ण जगात सर्व गुण संपन्न,सर्व श्रेष्ठ पुरुष श्रीरामचंद्र होऊन गेलेतं. रामांनी आपल्या सद्विचार, सद्वर्तन, सदाचार, सद्- व्यवहाराने पूज्य स्थान प्राप्त केले आहे. राम उत्तम पुत्र, उत्तम बंधू, उत्तम मित्र, उत्तम राजा, उत्तम पति, मातृभक्त, पितृभक्त, कर्तव्यकठोर, सत्यप्रतिज्ञ पुरुष होते. एक बाणी, एक वाणी, एकवचनी, एक पत्नी व्रताचे रामांनी आजीवन पालन केले. आदिकवी वाल्मिकींनी राम जसा थोर, आदर्श आहे लिहिले तसाच तो एक मानवही आहे.
भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरितालिका व्रत केले जाते. या व्रतामध्ये शिवपार्वतीचे पूजन केले जाते.
कार्तिक कृष्ण अष्टमीला कालभैरवाचा जन्म झाला. म्हणून या दिवशी कालभैरव जयंती साजरी केली जाते. भैरव म्हणजे शैव परिवारातील एक देवता. या कालभैरवाला किंवा भैरवांना शिवांचे अवतार मानले आहे. शैव आगमनात यांचे चौसष्ट प्रकार सांगितले आहेत.
फाल्गुन कृष्ण द्वितीयेला संत तुकाराम महाराजांनी जगाचा निरोप घेतला.
कौल रघुनाथाचा हे 27 ओळींचे अत्यंत मौलिक असे वेणास्वामीने रामरायाला मागितलेले पसायदान आहे. कौल म्हणजे आधार, आश्वासन, संमती. या कौल रघुनाथामध्ये वेणास्वामींनी आपल्या कल्पनेने रामरायाच्या राज्याभिषेकाचे वर्णन फार सुंदर शब्दात केले आहे.
भाद्रपद शुद्ध पंचमीचे दिवशी स्त्रियांनी करावयाचे व्रत. यात सप्तऋषिंची व अरुंधतीची पूजा करण्यास सांगितले आहे.
मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेपासून षष्ठीपर्यंत मार्तंडभैरव (खंडोबा, मल्हारी) याचा उत्सव असतो. या उत्सवाला खंडोबाची नवरात्र असेही म्हणतात.
रंगपंचमी हा सण फाल्गुन पंचमीला साजरा करतात. या दिवशी (सध्याच्या काळात) रंग (कोणताही) अंगावर उडवितात. पिचकाऱ्या भरुन मुले रंग उडवितात.
Copyright © 2025 | Marathisrushti