वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
हिंदू परंपरेत, केवळ गंमत किंवा मजा (एन्जॉयमेंट) म्हणून सण साजरे करण्याची पद्धत नाही. त्यापाठीमागे व्यक्ती आणि समष्टी यांच्या हिताचा विचार हमखास दडलेला असतो.
October 28, 2016
साउथ आफ्रिका हा देश, तसे पहिले गेल्यास, आफ्रिका खंडातील युरोप!! हवा बरीचशी युरोपप्रमाणे थंडगार असते. अगदी, उन्हाळी दिवस(सध्या इथे उन्हाळा सुरु आहे!!) आले तरी देखील, मुंबईप्रमाणे, घामाने अंग उकडून गेले आहे, असा प्रकार फारसा किंवा अजिबात होत नाही.
September 3, 2018
विव्ह रिचर्ड्स यांनी २७ एप्रिल १९७४ मध्ये पहिला बेन्सन अँड हेजेस मधील सामना खेळले. त्यावेळी त्यांना मॅन ऑफ द मँच देण्यात आले.
September 9, 2021
भारतात चिंच सर्व लोकांना माहीत असते पण ते भारतात कुठून व कसे आले, हे समजणे कठीणच. साधारणपणे चिंच दक्षिण आशियात झाला असावा. चिंचेचे झाड अगदी शोभिवंत तसेच डेरेदारपण असते. हे साधारण ८० फुटाचे आसपासच असते. मात्र यांच्या फांद्या वाकड्या तिकड्या वाढत असतात.
January 7, 2024
भगवान शंकरांच्या या बारा दिव्य ज्योतिर्लिंगांपैकी पाच वैभवशाली स्थाने महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यापैकी बालाघाटच्या पर्वतरांगांमध्ये निसर्गरम्य परिसरात विराजमान असणारे वैशिष्ट्यपूर्ण स्थान म्हणजे श्रीक्षेत्र औंढा नागनाथ.
September 9, 2020
समर्थ रामदास स्वामी म्हणतात,
देहे दुःख ते सुख मानीत जावे....
सुखाच्या आमच्या कल्पना एवढ्या बदलून गेल्या आहेत की खरं आणि शाश्वत सुख कुठे मिळेल असा विचार करायला सुद्धा वेळ नाही कोणाकडे !
प.पू. गोंदवलेकर महाराज आपल्या प्रवचनामधे म्हणतात,
सुखापेक्षा समाधान महत्वाचे.
सुख हे न संपणारे असते. एक सुख भोगून झाले की, दुसरे हवेसे वाटते. जिथे सुख संपते तिथे समाधान सुरू होते. किती अर्थपूर्ण वाक्य आहे ना हे. एका गोष्टी मधे संतुष्टी होतच नाही. एकावर एक फ्रीचा जमाना आहे. तिथे सुख कुठे संपते हे कसं कळणार ?
प्रमेहाच्या सूत्रामधे या सुखासनाचा सर्वात प्रथम उल्लेख करावासा वाटला. आळशी बनत जाणे, वृत्तीने, कर्माने, तनाने आणि मनाने सुद्धा!
आजची तरूण पिढी. दोष देत नाही, पण नाक्यावरून दळण आणायचं झालं तरी बाईकचं बटन स्टार्ट केल्याशिवाय दळण सुद्धा आणले जात नाही. छोटी छोटी काम करायचा आळस हा पुढे मधुमेहासारख्या आजाराला जन्म देतो, हे लिहून ठेवणारे दूरदृष्टीचे ऋषी, भारतात होऊन गेले याचा अभिमान बाळगायलाच हवा. पण पाश्चात्यांच्या आपण एवढे आहारी गेलो आहोत की, आमच्या ऋषींचे कौतुक सोडाच, पण भारतीयांनाच मागासलेपणाचा शिक्का मारून आपण मोकळे होतो.
घरातील छोट्या छोट्या गोष्टी करायला लाज कशाला बाळगायची ? ही कामे करताना आरोग्याचे पण रक्षण होतेच आहे, असा सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा.
किती सोप्पं आणि सुखासिन झालं आहे जगणं.
चुल फुंकावी लागत नाही, की जमिन सारवावी लागत नाही,
पाणी ओढायला लागत नाही, किंवा शेंदावे लागत नाही, नळ सोडला किंवा बटन दाबले की पाणी किचनमधे !
ठिबक सिंचनमुळे पाणी झाडांना सुद्धा द्यावे लागत नाही.
ट्रॅक्टरमुळे नांगर हातात धरावा लागत नाही,
मिक्सर आल्यामुळे पाटा वरवंटाही गेला. टेबलखुर्ची आली नि खाली बसून जेवणारी पंगत संपली,
एवढंच काय वारा घेण्यासाठी सुद्धा हात हलवावा लागत नाही.
हळदीकुंकु असेल तर निमंत्रणे देण्यासाठी फिरावे लागत होते, वाॅटसपमुळे तेही नाही.
शाॅपिंगही ऑनलाईन. पैसे मोजायचे पण श्रम नाहीत, करा स्वाईप !
पाश्चात्य देशात काम करायला माणसं मिळत नाहीत म्हणून मशीनची निर्मिती करणे ही त्यांची गरज होती, पण माणसांची मुबलकता असलेल्या प्रिय भारत देशात, पाश्चात्यांनी बनवलेली मशिन्स घरात आणून, माणसे मुबलक मिळतात म्हणून मशिन चालवायला पुनः बाई किंवा बाबाला ठेवायला लागले. ही सुखासिनता नव्हे काय ?
नंतर आजारपण आल्यावर दिवसाला सोळा सोळा प्रकारची औषधे खात बसून आरोग्य विकत घ्यायचे ? याला काय म्हणावे ?
मध्यंतरी एक जपानी व्हिडिओ बघीतला होता, माणसाला बेड वरून हलवून उठवायला घड्याळ. त्याचा बेड आणि त्याला उभा करायला मशिनची प्रगत टेक्नाॅलाॅजी. त्याचे गाल बाजुला करून तोंडात टूथब्रश ढकलून त्याचे दात घासले गेले, नंतर चुळ भरायला पाणी तोंडात सोडले गेले, चुळ भरायला छोटे बेसिन, आपल्या पिकदाणी सारखे तोंडासमोर हजर.
रोबोच्या दुसऱ्या हातानी ओले झालेले तोंड पुसायचे. वगैरे वगैरे टेक्नाॅलाॅजीची कमाल दाखवली जात होती. हा सुखाचा अतिरेक नव्हे काय ?
अतिशयोक्तीचा दोष सोडून देऊ....
पण निदान...
आपली ताट वाटी आपली आपण उचलून ठेवावी, जमलं तर घासावी.
आपले कपडे आपण बुचकळून काढावेत.
आपली गाडी आपण धुवावी. पुसावी तरी.
आपले अंथरूण पांघरूण आपणच घालावे, आपणच आवरावे.
आणि
आपल्या देवघरात एकदा तरी त्याच्यासमोर ओणवे रहावे.
देहे दुःख ते सुख मानीत जावे......
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02.02.2017
February 2, 2017
आयुष्याच्या सायंकाळी सूर मनांतच सनईचे
दूर दिगंती मृदू रंगांचे मनमोहन घन मलईचे
कोण वागलें काय वाउगें त्याचा आतां विसर पडे
भलें पुटा जें आलें त्याचे सडेच मागें आणि पुढें
July 31, 2019
अन्न शिजवण्यासाठी आपण अजूनही गॅस किंवा रॉकेल अशा इंधनांचा वापर करतो. गरीब लोक तर अजूनही सरपण गोळा करून त्यावर स्वयंपाक करतात. जीवाश्म इंधने महाग असतात तसेच यातील काही इंधनांमुळे प्रदूषण होते. त्यावर उपाय म्हणून सोलर कुकर हा पर्याय पुढे आला आहे.
February 2, 2023
ही जुळी मुलं एकाचवेळी दुपटीने सगळं देतात… मग तो आनंद असो, प्रेम असो, त्यांचं आजारपण, दुखणं, खर्च असो, त्यांची भांडणं, हट्ट, दंगा, अपघात, जिव्हाळा, आणि (मोठेपणी पालकांपासून) एकदम दुरावणं..! हे सगळं दुपटीने पालकांना अटॅक करतं! यातल्या काही गोष्टी नैसर्गिकरित्या दोघांना एकाच वेळेला होत असतात, तर काही एकमेकांमुळे.
December 30, 2021
मी शाळेत असताना परभणीत ८०%प्रतिशत मध्यमवर्गीयांकडे दळणवळणासाठी सायकल हेच एकमेव वाहन वापरले जात होते. परभणीत त्यावेळी रस्त्यावर प्रदुषण नव्हते मोकळा श्वास घेता येत असे.
June 6, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti