(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • श्रीमद्भगवद्गीता – अध्याय पहिला – अर्जुनविषादयोग

    इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी अर्जुनविषादयोग नावाचा पहिला अध्याय

  • गुरुपौर्णिमा

    अलौकिक बुद्धीमत्ता, विद्वत्ता असलेली व्यक्ती जागतिक वाड्.मयातही सापडणं दुर्मिळच आहे. अशा ह्या श्रीव्यासांचे पुण्यस्मरण या गुरूपौर्णिमेच्या निमित्तानं करणं औचित्यपूर्ण आहेच, ते भारतीय समाजाचं कर्तव्य आहे.

  • बुद्धीदेवता श्री गणेश – वागीश्वरीश

    देवी वागीश्वरी म्हणजे अभिव्यक्त होणारी बुद्धी ज्यांच्या चैतन्य शक्तीच्या आधारे प्रगट होते त्या आत्मरूप भगवान श्रीगणेशांना, त्या वागीश्वरी चे संचालक या अर्थाने वागीश्वरीश असे म्हणतात.

  • स्वामी विवेकानंद जयंती

    स्वामी विवेकानंद म्हणजे साक्षात घनिभूत देशभक्ती.त्यांचा युवा पिढीवर प्रगाढ विश्वा्स होता.भारताच्या पुनरुत्थानच्या कार्यासाठी युवकच पुढे येतील,असा त्यांना विश्वासस होता.देशभक्तीचे मूर्तीमंत प्रतीक असणारे स्वामी विवेकानंद केवळ भारतासाठीच प्रेरक आहेत असे मात्र बिलकुल नाही.

  • विज्ञानयुगातील अध्यात्म-वेदान्त

    विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी इत्यादी या सत्तेतच काम करतात. नियमबद्धतेमुळे व्यावहारिक जगतात नवीन निर्मिती शक्य होते वस्तुस्थिती हे व्यावहारिक सत्तेचे मुख्य लक्षण आहे. भौतिक वास्तवात आज आहे त्यावरून पुढे काय होईल ते आपण सांगू शकतो व जे इष्ट वाटेल ते घडवून आणू शकतो. भौतिकीचे सर्व नियम व संशोधन हे या व्यावहारिक स्तरावरच घडत असते. अगदी आईन्स्टाईनचा सापेक्षता सिद्धांतदेखील वास्तविक काय आहे ते सांगतो.

  • शांतिपाठ – आ नो भद्राः क्रतवो – मराठी अर्थासह

    ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलातील एकोणनव्वदावे हे सूक्त शांतिपाठ म्हणून ओळखले जाते. यातील ‘ भद्रं कर्णेभिः ’ व ‘ स्वस्ति न इन्द्रो ’ या दोन ऋचा विशेषत्वाने सर्वसामान्यांना परिचित आहेत. या सूक्ताचे रचयिता गौतम राहूगण ऋषी असून देवता विश्वेदेव आहे. परंतु पूषन व मरुत गण यांनाही आवाहन केलेले असून दहाव्या ऋचेत अदिती देवता सर्वव्यापी असल्याचे म्हटले आहे. हे सूक्त जगती, विराटस्थाना व त्रिष्टुभ अशा तीन छंदात रचलेले आहे. ऋचांमधील अक्षरांची संख्याही वेगवेगळी दिसते. ऋग्वेदाखेरीज इतरही धर्मग्रंथांमध्ये हे सूक्त समाविष्ट आहे.

  • बुद्धीदेवता श्री गणेश – महाविद्याधीश

    व्यवहारातील ज्ञानाला विद्या संबोधिले तर या ब्रह्मविद्येला, अध्यात्मविद्येला महाविद्या असे म्हणतात. या महाविद्येच्या द्वारे ज्या ब्रह्माचे निदर्शन केले जाते अर्थात ज्याच्या स्वरूपाचे गुणगाण केले जाते त्या परब्रह्म परमात्मस्वरूप असणाऱ्या भगवान श्रीगणेशांना या महाविद्येचे स्वामी या अर्थाने महाविद्याधीश असे म्हणतात.

  • सिद्धेश्वरयात्रा म्हणजेच गड्डायात्रा

    सोलापूरात श्री शिवयोगी सिध्दरामेश्वर हे मंदिर प्रसिद्ध आहे.दरवर्षी १२ जानेवारी रोजी मल्लिकार्जुन मंदिरापासून यात्रेस सुरुवात होते.श्री सिध्दरामेश्वराच्या योग दंडाचे प्रतिक म्हणून नंदीध्वज उभारले जातात. चार दिवस चालणाऱ्या या यात्रेस महाराष्ट्रसह कर्नाटक,आंध्रप्रदेश येथून लोक येतात. यात्रेत सहभागी होणारे भक्त हे पांढरे वस्त्र परीधन केलेले असतात, यास बाराबंदी असे म्हटले जाते.

    १२ जानेवारीला सिध्दरामेश्वरानी स्थापन केलेल्या ६८ लिंगांना तेलाभिशेक केला जातो.१३ जानेवारीला अक्षता सोहळा पार पडला जातो आणि नंतर पुन्हा ६८ लिंगांना प्रदक्षिणा घातले जाते. १४ जानेवारी रोजी रात्री होम मैदानवरील होमकट्टा येते होमविधी सोहळा संपन्न केला जातो.१५ जानेवारी रोजी किंक्रांत असून या दिवशी रात्री शोभेच्या दारूकामाची आतषबाजी होते. १६ जानेवारी रोजी रात्री मालीकार्जुन मंदिरात नंदीध्वजाच्या वस्त्रविसर्जनाने (कप्पडकाळी) यात्रेतील धार्मिक कार्यक्रमाची सांगता होते.

    सिध्दरामेश्वर हे १२व्या शतकातले एक युग पुरुष होते.एके दिवशी कुंभार कन्येने सिध्दरामेश्वर यांना तिचा मानस सांगीतला कि ती सिध्दरामेश्वर याबरोबर विवाह करू इच्छिते, सिद्धरामेश्वर यांनी तिला सागितले कि मी ब्रम्हचारी आहे , माझे विवाह महादेवाशी झाले आहे.तरीही ती कुंभार कन्या ऐकली नाही,त्यावर सिद्धरामेश्वर तिला बोले की तू या माझ्या योगदांडा सोबत विवाह कर पण तुला विवाहाच्या दुसऱ्या दिवशी तुझा देह त्याग करावा लागेल.१३ जानेवारीला विवाह झाला आणि १४ जानेवारीला कुंभार कन्याने तिचा देह त्याग केला.

    यंदा करोना मुळे सोलापुरातील सिद्धेश्वर यात्रेतील नंदीध्वज मिरवणूक रद्द करण्यात आली असून यात्राकाळात भाविकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

    संकलन: संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

  • विचारांचा उपवास

    प्रत्येक जण स्वतः ला सर्वोपरी भरपूर होण्याची इच्छा बाळगतो, ह्या इच्छांचा कुठे ही अंत नाही. एकाची पूर्ती झाली की लगेच दुसरी इच्छा जन्म गेले. कधी-कधी खूप कष्ट करून इच्छा पूर्ण केल्या जातात तर काही ईश्वराच्या दारी पूर्ण व्हाव्या अशी इच्छा असते. ईश्वराने त्या पूर्ण कराव्या ह्या अट्टाहासापोटी आपण उपवास करत राहतो .

  • बुद्धीदेवता श्री गणेश – शारदानाथ

    देवी शारदेचे भगवान श्री गणेशांसह मीलन होते अक्षय तृतीयेला. त्या दिवसाला गाणपत्य संप्रदायात शारदेशमंगल असे म्हणतात. जिच्या उपासनेने भगवान गणेशांची अक्षय्य कृपा प्राप्त होते त्या शारदेच्या प्रियतम असणाऱ्या भगवान गणेशांना तिच्याच नावाने श्री शारदानाथ असे म्हणतात.