वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी; अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे आधुनिक सत्पुरुष!
गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. ते त्यांच्या आईच्या माहेरी, मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे, लहानाचे मोठे झाले. त्यांच्या मामाची बरीच मोठी शेतजमीन होती. लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता, विशेषतः गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडे.
१८९२ साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारू व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की, गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे ‘सर्व जनांनी’ एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्या तोंडी गावकर्यांना शिकविला.
दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता,अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले.
समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यानांच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा(प्रामुख्याने वैदर्भीय बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.
त्यांनी नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली.
महाराष्ट्रातील संतपरंपरेबाबत ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ असे म्हटले जाते. संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे - ‘या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी २० व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली’ - असे म्हटले जाते. ‘महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ’, असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहेत. ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या भजनाचा प्रसार करणार्या,कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणार्या या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे आहे.
ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी; अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे आधुनिक सत्पुरुष!
गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. ते त्यांच्या आईच्या माहेरी, मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे, लहानाचे मोठे झाले. त्यांच्या मामाची बरीच मोठी शेतजमीन होती. लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता, विशेषतः गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडे.
१८९२ साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारू व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की, गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे ‘सर्व जनांनी’ एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्या तोंडी गावकर्यांना शिकविला.
दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता,अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले.
समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यानांच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा(प्रामुख्याने वैदर्भीय बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.
त्यांनी नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली.
महाराष्ट्रातील संतपरंपरेबाबत ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ असे म्हटले जाते. संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे - ‘या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी २० व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली’ - असे म्हटले जाते. ‘महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ’, असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहेत. ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या भजनाचा प्रसार करणार्या,कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणार्या या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे आहे.
न पिबेत् पंक शैवालतृणपर्णाविलास्तृतम् ।
सूर्येन्दुपवनादृष्टमभिवृष्टं घनं गुरू ।।
फेनिलं जन्तुमत्तप्तं दन्तग्राह्यतिशैत्यतः ।
वाग्भट सूत्रस्थान 5-5/6
"चिखल, शेवाळ, गवत, व पाने यांनी व्याप्त व गढुळ झालेले, ऊन, चांदणे, व वायु यांचा जेथे कधीही प्रवेश झाला नाही अश्या ठिकाणचे, पावसाचे पाणी, नुकतेच मिळाल्यामुळे राड झालेले, जड, फेस आलेले, कृमीयुक्त, तापलेले, व दातास कळा उत्पन्न करण्यासारखे गार अशा प्रकारचे पाणी कधीही पिऊ नये."
हा झाला ग्रंथातील एक श्लोक आणि त्याचा शब्दशः अर्थ. छापील उत्तरासारखं. आता ग्रंथकारांना नेमकं काय म्हणायचंय ते पाहू.
अशा ठिकाणचे पाणी पिऊ नका, ज्या जलाशयामधे तळात खूप चिखल, गाळ साठलेला आहे. अशा जलाशयातील झरे या चिखलामुळे बंद झालेले असतात. झरे बंद झाल्यामुळे पाण्याचा पाझर आणि पुनर्रभरण नीट होत नाही, पाण्याचा उसपा आणि साठा याचे संतुलन बिघडते. आणि पाणी पचायला जड होते. हा चिखल किंवा गाळ जलाशयाच्या तळामध्ये असतो आणि शेवाळ, पाने पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत असतात. पाण्याचा पृष्ठभाग जर पूर्णपणे झाकला गेला असेल तर सूर्याचे प्रकाशकिरण तळागाळापर्यंत पोचू शकत नाहीत. सूर्याचे औषधी किरण जर पाण्यात पडले नाहीत तर पाण्यातील अशुद्धी दूर होत नाही, म्हणून असे आच्छादन असलेले पाणी देखील पचायला जड होते.
खालून चिखल वरून शेवाळ, पाण्यात पडलेल्या पानासारख्या कचऱ्याचे आच्छादन आणि मधे वाढणाऱ्या काही तृण वनस्पती यामुळे पाणी साठून रहाते. पाण्याचा नैसर्गिक वाहाणे हा गुण कमी होतो. पाणी गरजेपेक्षा जास्ती स्थिर होते. जिथे स्थिरपणा ( स्टॅग्नेशन)येते, जिथे गती कमी होते, तिथे पाण्यातील बुळबुळीतपणा वाढतो. शेवाळ जास्ती वाढते. पाण्यातील हालचाली मंद होतात. पाण्याची गुरूता, घनता हे गुण आणखीनच वाढतात.
गाळातील चिखल आणि वरील आच्छादन यामुळे पाण्याची घनता बदलते. आजच्या वैज्ञानिक भाषेत सांगायचे झाल्यास पाण्याची पीएच बदलते. त्याची अम्लता किंवा क्षारीयता बदलते. असे पाणी पचायला घन आणि गुरू होते. श्लोकातील दुसऱ्या ओळीतील शेवटच्या शब्दांकडे विशेष लक्ष दिले की शास्त्रकारांची सूक्ष्म दृष्टी लक्षात येते.
पाण्यात हा बदल नैसर्गिक स्थितीमुळे झालेला असतो. त्याच्या इच्छेनुसार झालेला असतो.
जरूरी नाही, कि प्रत्येक वेळी मानवाच्या हस्तक्षेपामुळेच प्रदूषण होते. आणि जे जे सर्व नैसर्गिक म्हणजे निसर्गदत्त, निसर्गाने दिलेले आहे, ते सर्व उत्तम गुणाचे आणि मानवाच्या आरोग्याला हितकरच असेल !!??
यासाठी त्याने मानवाला बुद्धी दिली आहे. ही बुद्धी, योग्य ठिकाणी वापरून आपले कल्याण कशामधे आहे, याचा विवेक मानवाने करावा अशी त्याची इच्छा असते. त्याच्या इच्छेनुसार, आपली बुद्धी हवी तिथे वापरता येणे, याला विवेक म्हणतात, सारासार विचार करणे !!!
हे योग्य हे अयोग्य असा विचार करणे ज्याला जमले तो निरोगी राहिलाच म्हणून समजा !
सूत्रस्थान 5-5/6 भाग एक. ( क्रमशः )
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
20.12.2016
लिंबू अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचेच लाडके फळ.ह्या फळाचा आपण खायला तर उपयोग करतोच जसे लिंबू सरबत,लोणचे ते हि वेग वेगळ्या प्रकारची,तसेच कोणत्याही पदार्थांची लज्जत वाढवायला ह्याचा रस आपण हमखास त्या पदार्थावर पिळतो.तसेच हे फळ फक्त खायलाच वापरले जाते असे नाही बरं का ह्या बिचाऱ्याचा उपयोग जारण मारण अर्थात काळ्या विद्येत करतात म्हणे,तसेच दृष्ट बाधा होऊ नये म्हणून आपण लिंबू मिरचीचे तोरण आपल्या घर वाहन ह्याला लावतोच ना! तर मंग असा हा बहुपयोगी लिंबू.ह्या फळाने अगदी आनंद,आजारपण,वाईट काळ ह्या सर्वांत आपली साथ न सोडण्याचा जणू पणच केला आहे.
असा हा बहुपयोगी मित्र लिंबू.
ह्याचे मोठे झुडूप असते.ह्याच्या फांद्यावर काटे असतात.पाने गोल,तेलकट,हिरवी चमकदार व विशिष्ट गंधयुक्त असतात.ह्याचे दोन भेद आहेत गोल,व पातळ पिवळी साल असलेला आणी दुसरा लांबट जाड हिरवी साल असलेला.
मला पिवळे रसरसशीत लिंबू जाम आवडतात बुवा.
लिंबु हा चवीला आंबट,उष्ण व वातनाशक आहे पण हा पित्त व कफ वाढवतो.
चला आता ह्याचे काही घरगुती उपचार पाहूया:
१)संडासमधून आव पडणे किंवा पातळ जुलाब होणे ह्या लिंबू गरम करून त्याचा रस काढावा व त्यात सैंधव व साखर मिसळून थोड्या थोड्या वेळाने १/२ चमचा पित रहावे.
२)अजीर्ण,उल्ट्या,तोंडाला चुळा सुटणे ह्यात लिंबाचा रस १ चमचा+ मध २ चमचे हे मिश्रण चाटावे.
३)अजीर्णा मुळे घशाशी आंबट येत असल्यास २ चमचे लिंबू रस+ १/४ कप गार पाणी+ १ चिमूट खायचा सोडा हे मिश्रण घ्यावे.
४)लघ्वीतून खर पडत असल्यास लिंबाचा रस १ चमचा+कोथिंबीर रस १ चमचा हे मिश्रण कोमट पाण्यातून २-३ वेळा दिवसातून काही दिवस घ्यावे.
५)लिंबूरसात हळकुंड उगाळून त्यात १ चिमूट कापूर घालून हे मिश्रण सर्वांगास चोळावे ह्याने त्वचे खाली असणारी चरबीची फाजील वाढ थांबते.तसेच त्वचा निरोगि व चांगली राहते.
६)एरंडेल लिंबूरसात घालून त्याचे मलम करावे व हे मलम पायांच्या भेगांना,त्वचा मऊ व्हायला व Natural After shave lotion म्हणून आपण वापरू शकता.
लिंबू प्यायचा अतिरेक केल्यास दात आंब्यात व ठिसूळ होतात,तसेच हाडांवर देखील ह्याचा दुष्परिणाम दिसतो,त्यांच प्रमाणे सर्दी होते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
वाग्भटाचार्य म्हणतात, भोजनापूर्वी पाणी पिल्याने, (भूक मेल्याने, जेवण कमी जाते. परिणामी ) शरीर बारीक होते.
जेवणानंतर पाणी पिल्याने जाडी वाढते. जेवण झाल्यामुळे अग्नि मंद झालेला असतो. पोटात आलेले अन्न, घुसळण्याचे काम सुरू होऊन,
पचनाचे काम सुरू झालेले असते. अशा वेळी पाणी पिल्याने, उकळी आलेल्या तयार चहात थंडगार पाणी ओतून सर्व चहा परत गार अवस्थेत नेल्यासारखे होते. पुनः तो गरम होण्यासाठी जास्ती अग्निची आवश्यकता पडते. तसेच, पचन पूर्ण होण्यासाठी अग्नीची आवश्यकता असते. त्यावेळी त्यावर पाणी ओतून चुलीतील पेटलेला अग्नि विझवण्याचे पाप करू नका. असे केल्याने अन्न पोटात तसेच पडून रहाते आणि जाडी वाढते.
आणि जेवता जेवता पाणी पिल्याने शरीर संघटन जसे आहे, तसेच राहाते. मिक्सरमध्ये नारळ वाटता वाटता जर पाणी घातले तर नारळाचा उत्तम रस निघतो. तसे आहे. वाग्भटाचार्यांच्या ग्रंथातील सूत्रस्थान 5-14 या श्लोकामधून ही माहिती मिळते.
पाणी कमी करण्यासाठी, आर्द्रता कमी. होण्यासाठी, अग्निची आवश्यकता असते.
पाणी आणि अग्नि एकमेकाचे पिढीजात शत्रू. जिथे पाणी वापरले जाते, तेथील अग्नि नाहीसा होतो, या व्यावहारिक सत्याला आरसा कशाला हवा ?
एकदा एका लमाणी माणसांच्या तांड्याशी संवाद साधण्याची संधी शोधली. एका सकाळी 9 वाजता घरातील (घर कुठले, तंबूच ) सर्व आवरून, घरातील सर्व माणसासकट, ही मंडळी आमच्याच घराच्या बाजूला एका स्लॅब घालायच्या कामाला आली. पहिलं काम केलं ते डबे खाण्याचं. त्यांच्या डब्यावर माझं लक्ष होतं. जसं शिंप्याचं लक्ष कपड्याच्या डिझाईनवर, बूट पाॅलिश करणाऱ्याचं लक्ष बूटावर, केशकर्तनकाराचं लक्ष केसांच्या स्टाईलवर असतं, तसं माझं लक्ष खाण्याच्या डब्यावर !
डब्यात डाळ भात भाकरी आणि लसणाची सुकी चटणी. कापडात गुंडाळून ठेवलेल्या भाकऱ्यांची चवड. त्याच्यावरच लसणाचा लालभडक गोळा. मी त्यांना विचारलं, एवढ्या भाकऱ्या भाजायला सकाळी कधी वेळ मिळाला ? त्यावर त्या लेकुरवाळ्या माऊलीने उत्तर दिलं. "आज नाही भाजल्या, बुधवारी सुटी असते, तेव्हाच भाजून ठेवल्या." मी उलटे दिवस मोजायला सुरवात केली. तो वार होता सोमवार. म्हणजे बुधवार ते सोमवार तब्बल सहा दिवसापूर्वी भाजलेल्या भाकऱ्या ती आत्ता खात होती. मी भाकरी हातात घेऊन बघीतली. कडकडीत पापडच जसा ! मी विचारले, एवढे दिवस या भाकऱ्या टिकल्या कश्या ? ती आपल्या भाषेत म्हणाली, "ते मला माहिती नाही, पण आमच्या भाकरी खाऊन झाल्या की उरलेल्या भाकऱ्या आम्ही सूर्याला दाखवतो."
कानाखाली झणकन मारल्यासारखे तिचे शब्द कानात घुसले. विज्ञानातले एक व्यावहारिक सत्य त्या अशिक्षित, निरक्षर माऊलीने सहजपणे मला उलगडून दाखवले होते.
भाकरी सूर्याला दाखवतो, सूर्य म्हणजे साक्षात अग्नि. दगडाच्या राशीवर भाकऱ्या पसरून ठेवतो, म्हणजे सूर्य त्यातील पाणी आपल्या उष्णतेने शोषून घेतो आणि त्या टिकवतो. ज्या पदार्थात पाणी कमी तो पदार्थ जास्त दिवस टिकतो, हे व्यावहारिक, त्रिकालाबाधीत, वैश्विक सत्य तिच्याकडून मला शिकायला मिळाले होते.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
19.12.2016
आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो हे गाणे झिम्मा फुगडी खेळताना पुरवापार पासून आवडीने गायले जाते.हो हो आज आपण नव्याने ओळख करून घेणार आहोत फळांचा राजा आंबा ह्याची.
धगधगत्या उन्हाळ्यात मनाला आल्ल्हाद देणारे हे फळ.उन्हाळ्यामध्ये आतुरतेने ह्या फळाच्या आगमनाची वाट पाहिली जाते.असा हा फळांचा राजा.लहान मूलांपासून अगदी वृध्द मंडळीचा देखील हा आवडता आहे.
ह्याच्या जाती तरी किती,लंगडा,केसर,
भिष्म,हापूस,मानकुराद,मुशेराद,तोतापुरी,रायवळ इ अनेक जाती आहेत ह्याच्या आणी प्रत्येकाची चव वेगळी बरं का.
बरं ह्या पासून खायचे प्रकार किती करतात मुरंबा,आमरस,आम्रखंड,आंबा वडी,आंब्याचे साठ,रायते इ हे झाले पिकलेल्या आंब्याचे.तर कारी असताना लोणचे,रायते,पन्हे,चुंदा इ प्रकार फारच सुरेख लागतात.
चला मग आता ह्याची माहिती पाहूयात ना.आंब्याचा ३०-१२० फूट पर्यंत उंच वृक्ष असतो.पाने ४-१२ इंच लांब असतात फुले छोटी असतात व मादक सुगंध येतो त्यांना.फळ हे वेगवेगळ्या आकाराचे असले तरी कच्चे असताना हिरवे व पिकल्यावर पिवळसर लाल असते.
आता प्रथम भागामध्ये आपण कैरीचे उपयोग पाहूयात व गुणधर्म जाणून घेऊया.कैरी जी तुरट असते ती शरीरातील वात दोष वाढविते तर आंबट कैरी हि शरीरातील पित्त दोष वाढविते.कैरी उष्ण असते.
चला मग ह्याचे औषधी उपयोग पाहुया:
१)जुलाब होत असल्यास तुरट चवीच्या कैरीचा रस थोडा थोडा प्यावा.
२)आंबट कैरी पासून तयार केलेले पन्हे हे तहान,अंगाची आग शांत करते व तृप्तीचा अनुभव देते.
3)ज्या व्यक्तिंना कामा अथवा व्यवसाया
निमित्त वारंवार उष्णतेशी संपर्क येतो त्याच्या डोळ्याचा थकवा घालवायला कैरीचा किस डोळ्यावर ठेवावा.
४)उन्हाळ्यात कच्च्या कैरीवर सैंधव मीठ घालून बेताने खाल्ल्यास उन्हाळ्याचा त्रास कमी होतो.
५)आंबट कैरीची साल सुकवून केलेली आंबोशी तोंडाची चव वाढविते तसेच हि चिंचे एवजी आमटी भाजीत वापरली जातात.
कैरी अतिप्रमाणात खाल्ल्यास व अजीर्ण होऊ शकते.
(क्रमश:)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
या छोट्या-छोट्या उपायांमुळे आपले आरोग्य संतुलित राखण्यास मदत होईल, तसेच वजनही आटोक्यात राखता येईल.
आजकाल लहान वयातच केस पांढरे होणे ही साधारण समस्या बनली आहे. या समस्येचे मुख्य कारण व्यस्त जीवनामध्ये केसांची नीट देखभाल न होणे, प्रदूषण हे आहे. यामध्ये लहान वयाचतच झालेले पांढरे केस लपविण्याकरिता हेअर डाय किंवा हेअर कलर हा एकमात्र उपाय नाही. काही घरगुती उपाय केले तर पांढ-या केसांना नैसर्गिकरित्या आपण काळे करू शकता.
दोडक्याचे काप खोबरेल तेलात काळे होईपर्यंत उकळा. यांनतर हे तेल गाळून एका बाटलीमध्ये भरून ठेवा. रोज हे तेल केसांना लावल्यास हळूहळू तुमचे केस नैसर्गिकरित्या काळे होऊ लागतील.
तीळाचे तेल ही गुणकारी असते. बरोबरच याच्या सेवनाने बरेचसे फायदे होतात. जर आपण जेवणात तीळाचा समावेश केला तर दीर्घकाळापर्यंत केस काळे व घनदाट होतील.
केस धुताना शिकेकाई पावडर किंवा माईल्ड शॅम्पू वापरावा.
एक कप पाण्यात चहापत्ती उकळून यामध्ये एक चमचे मीठ टाकावे. हे मिश्रण केस धुण्यापूर्वी एक तास आधी लावून ठेवल्याने केस काळे होतात.
खोबरले तेलात ताज्या आवळ्यांना काळे होईपर्यंत उकळा. या मिश्रणाला थंड करून रात्री झोपण्यापूर्वी केसांना लावा. आणि सकाळी केस धुवा.
आले वाटून त्यामध्ये थोडासा मध घालून पेस्ट तयार करावी आणि ती केसांना लावावी. हा उपाय दररोज केल्याने पांढरे केस काळे व्हायला लागतात.
केसांना दररोज मोहरीचे तेल लावल्याने केस नेहमी काळे राहतात.
खोबरेल तेलात कडिपत्त्याची पाने काळी होईपर्यंत उकळा. या तेलाला केसांच्या मुळाशी लावल्याने केस काळे व घनदाट होतात.
रोज उपाशी पोटी आवळ्याचा रस पिल्याने केस दीर्घकाळापर्यंत काळे राहतात.
सुक्या आवळ्यांना पाण्यात भिजवून त्याची पेस्ट बनवा. या पेस्टमध्ये निलगीरीचे तेल मिसळा. या तेलाला एक रात्र लोखंडी भांड्यात ठेवा. सकाळी यामध्ये दही, लिंबूचा रस व अंडे घालून केसावर लावा. पंधरा दिवस हा उपाय केल्यावर केंसामध्ये एक चमक येऊन पांढरे केस काळे होऊ लागतात.
आवळ्याचा रस, बादाम तेल व लिंबाचा रस एकत्र मिसळून केसांच्या मुळाशी लावल्याने केस पांढरे होणार नाहीत.
कोरफडीचा गर केसांना लावल्याने केस गळायचे थांबतात व पांढरे होत नाहीत.
लहानपणीच केस पांढरे झाल्यास एक ग्रॅम मिरी पावडर दह्यात मिसळून लावल्याने केस काळे होतात.
१ चमचा मेहंदी पावडर, १ चमचा मेथी, ३ चमचे कॉफी, २ चमचे तुळशीची पावडर, ३ चमचे पुदीना पेस्ट एकत्र मिसळून केसांना लावा. ३ तासानंतर केस धुवा. पांढरे केस काळे होऊ लागतील.
मेहंदीला खोबरेल तेलात मिसळून त्याची पेस्ट बनवा. या पेस्टला केसांना लावल्यानंतर केसांचा रंग डार्क ब्राऊन होऊ लागतो.
केस धुण्यासाठी लिंबू रस मिसळलेल्या पाण्याचा उपयोग करावा. केस नैसर्गिकरित्या ब्राऊन होतात.
लिंबाचा रस खोबरेल तेलात मिसळून नियमितपणे लावल्यास केस काळे होऊ लागतात.
आवळा व आंब्याची कोय ही एकत्र वाटून केसांना लावल्यास केस काळे होतात.
केसांना रोज मेरी तेल लावल्यास केस काळे होतात.
कांद्याचा रस काढून केसांच्या मुळाशी हलक्या हाताने लावल्यास केस काळे व घनदाट होऊ लागतील.
आवळा पावडरमध्ये लिंबाचा रस मिसळल्याने किंवा ताज्या आवळ्यांना वाटून त्याची पेस्ट केसांना लावल्यास केस काळे व घनदाट होतात.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
पदार्थामधील पाणी कमी केले की तो टिकाऊ होतो. द्राक्ष आणि मनुका बेदाणे, ओला अंजीर सुका अंजीर, ताजी फळे आणि सर्व ड्राय फ्रूटस, यात टिकाऊ काय ? कोणते पदार्थ ?
जे सुके आहेत ते. ज्यांच्यात पाणी कमी आहेत ते !
साधा रवा आणि भाजून ठेवलेला रवा. साध्या रव्यात कीड पटकन होते. पण भाजून ठेवल्याने त्यातील पाणी कमी केले जाते. जंतुना जगण्यासाठी आवश्यक असलेले पाणी कमी झाल्याने, भाजून ठेवलेल्या रव्यात कीड, टोका पडत नाही. बरोबर ना !
घरात आणलेल्या पालेभाज्यांचं सर्वसाधारण आयुष्य किती ? एक दिवस. जास्ती जास्त दोन दिवस. नंतर त्या चक्क मान टाकतातच ! पाण्याच्या अभावाने त्या मरतात. पालेभाज्या म्हणजे ऐशी नव्वद टक्के पाणीच ना ! पाणी संपले की संपले. हीच पालेभाजी पाणी शिंपडून ओट्यावर ठेवली तर जिथे पाणी साठले आहे, त्या ओट्याला चिकटून राहिलेल्या भागातील भाजी कुसुन लिबलिबीत होते. फुकट जाते.
पाण्याशिवाय जीवन नाही. जंतुचे देखील तसेच आहे. स्थूल आणि सूक्ष्म जीवांना जगण्यासाठी देखील पाणी हवे असते, ते मिळाले नाही तर ते पण मरतात.
झुरळांची पैदास कुठे होते ? बेसिनच्या खाली.
डासांची वाढ कुठे होते ? पाण्यामध्ये.
त्यांचा जन्म, पोषण, वंशवृद्धी पाण्यावर, पाण्याच्या दमटपणावर अवलंबून असते. पाणी नसले की जीवन संपले.
चंद्र मंगळावर जी अंतराळ याने पाठवताहेत, ती कशासाठी? केवळ दगडधोंडे आणि हवामान तपासायला ?
नाही.
त्या दगडातील पाण्याचा अंश शोधायला.
त्या दगडात जरा जरी पाण्याची शक्यता वाटली तर तिथे इतर जीवजंतु नक्कीच असणार. या शक्यतेवरच या मोहिमा चालतात.
म्हणजे जीवांना त्यांचे पोषण करणारे पाणी जिथून मिळेल तिथे हे जीव स्थिरावतात, हा वैश्विक नियम आहे.
याची दुसरी बाजू. जिथे पाणी नाही, तिथे जीव संसर्ग नाही. इन्फेक्शन नाही.
म्हणजेच
शरीरातील पाणी गरजेपेक्षा वाढत गेले तर तिथे जीवांची उत्पत्ती होणारच. आणि अवास्तव पाणी कमी करत गेलो तर जंतुसंसर्गही तेवढाच कमी होत जाणार ! बरोबर ना ?
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
18.12.2016
An Apple A Day Keeps Doctor Away अशी एक इंग्रजी म्हण आहे त्यात कितपत तथ्य आहे हे ती म्हण निर्मात्यालाच ठाऊक असेल कदाचित.सफरचंद तसे प्रत्येकाचे आवडीचे फळ.ह्याचे अॅप्पलपाय,अॅप्पल जॅम,अॅप्पल चटणी,लोणचे,ज्यूस असे अनेक प्रकार खायला व प्यायला मिळतात.आणी ते रूचकर देखील लागतात.
असे हे सफरचंद आपण किरकोळ शारीरिक तक्रारींमध्ये सुद्धा वापरू शकतो.हे थंड प्रदेशात पिकणारे फळ असून ह्याचा वृक्ष असतो व सफरचंद कच्चे असताना हिरवे व पिकल्यावर लालासह गुलाबी होते.
पिकलेले सफरचंद हे गोड थंड पित्त व कफ दोष कमी करणारे व वातकर असते.चला आता ह्याचे उपयोग पाहूयात.
१)पचन शक्ती कमी होऊन भूक मंदावली असल्यास सफरचंद वाफवून त्यावर मिरपुड व सैंधव मीठ लावून खावे.
२)शौचास पातळ होत असेल अथवा आव पडत असेल तर पिकलेले सफरचंद चांगले चावून खावे.
३)सफरचंद गरम पाण्या १० -१५ मिनिटे भिजत ठेऊन त्याची साल काढुन ते बारीक वाटून घ्यावे नंतर त्यात सफरचंदाच्याच वजना इतके मध घालावे व पुन्हा घोटावे मग त्या वेलची,केशर,गुलाबकळी,गुलाबपाणी,जायपत्री,भीमसेनी कापूर घालून ते चांगले घोटावे.ह्याला मधुचंद म्हणतात ह्याचे सेवन अशक्तपणा मध्ये करावे तसेच ह्याने हृदयाला बळ मिळते.मधुचंद सेवन करताना मासे,दही,तळलेले पदार्थ खाऊ नयेत.
४)अति मांसहारी व तिखट पदार्थ खाल्ल्यावर छातीत जळजळ होणे,पित्ताचा त्रास होणे ह्यात सफरचंद खावे.
सफरचंद खायचा अतिरेक केल्यास बद्धकोष्ठाचा त्रास होऊ शकतो.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Copyright © 2025 | Marathisrushti