(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • याला जीवन ऐसे नाव भाग १०

    ज्या पदार्थात पाणी जास्त तो टाकावू. आणि ज्या पदार्थात पाणी कमी तो टिकाऊ असे लक्षात येते.

    चार पदार्थ घरात बनवले आहेत.
    आमटी भात चपाती आणि भाकरी.
    हे पदार्थ व्यवस्थित झाकून ठेवले आहेत. सर्वात पहिला फुकट जाणारा पदार्थ आहे आमटी. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत आमटीला आंबूस वास येऊ लागतो. दुसऱ्या दिवशी रात्री भात फुकट जातो. तिसऱ्या दिवशी रात्री चपातीला वास येतो. चौथ्या दिवशी तर बुरशी येते. पण भाकरी मात्र पाचव्या दिवशीपर्यत तश्शीच असते.

    असं का झालं ?

    त्याचं उत्तर त्या पदार्थातील पाण्यात आहे. ज्या पदार्थात पाणी जास्त तो टाकावू.

    ज्या पदार्थामधे पाणी जास्ती तिथे जंतुसंसर्ग जास्त. आजच्या भाषेत इन्फेक्शन ! या सूक्ष्म जंतुना देखील जगायला पाणी लागतेच ना.

    या चार पदार्थांमधे नेमकं काय झालं असेल ?

    आमटीमधे पाणी जास्त असल्यामुळे जंतुसंसर्ग पटकन होतो. म्हणून ती लवकर नासली. भातामधे त्यामानाने पाणी कमी. म्हणून जंतुसंसर्ग जरा उशीराने झाला. म्हणून आमटीनंतर फुकट गेला.

    आता राहिली चपाती आणि भाकरी.

    चपाती फक्त एक वेळा तव्यावर भाजली जाते, तर भाकरी दोन वेळा. भाकरीपेक्षा चपाती कमी वेळ भाजली जाते म्हणून लवकर फुकट जाते.

    भाकरी एवढे दिवस का टिकली ?
    खमंग भाजल्यामुळे !
    भाकरी एकदा तव्यावर आणि परत अग्निवर थेट भाजली जाते.

    जेवढे जास्त भाजले जाते, ज्यावर अग्निसंस्कार जास्ती, तेवढे त्यातील पाणी कमी होत जाते. पाणी कमी तेवढे टिकाऊ.

    भाकरी जास्त दिवस टिकली कारण पाणी एकदम कमी केले गेले. भाकरी दोन वेळा भाजली जाते, शिवाय भाकरीत तेलही घातले नाही, त्यामुळे ती आणखीनच सुकी, खडखडीत होते. टिकते.

    म्हणून आपला वैश्विक सिद्धांत परत सिद्ध होतो, ज्या पदार्थात पाणी जास्ती तो टाकावू. आणि ज्या पदार्थात पाणी कमी तो टिकावू.

    शरीराचे देखील तसेच आहे. गरजेपेक्षा पाणी जास्ती झाले तर जंतुसंसर्ग होणारच ! आधीच शरीरात पाणी जास्ती असते, त्यात गरज नसताना आणखी घेतले तर होईल ना लोच्या !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    17.12.2016

      December 17, 2016


  • थुंकण्याच्या प्रवृत्तीमुळे जंतुसंसर्ग !

    रस्त्यावर थुंकणे, कचरा टाकणे, लघुशंका/प्रातर्विधी करणे, आपला परीसर स्वच्छ न ठेवणे, सर्वच प्रकारचे प्रदूषण निर्माण करण्यास मदत करणे हे सगळे काश्याचे द्योतक आहे? तर अज्ञान, अंधश्रद्धा, आळस, शिस्त आणि संस्कारांचा अभाव, आपण राहतो त्या शहराप्रती आणि आपल्या देशाबांधवांप्रती कमी होत चाललेलं प्रेम, माया, आदरभाव म्हणावा लागेल.

      February 28, 2015


  • हेमंत कुमार

    अनेक संगीत-संबद्ध क्षेत्रात सहज विहार करणारा आणखी एक बंगाली संगीतकार म्हणून अभिमानाने उदाहरण देण्यासारख्या कलांकारात हेमंतकुमार यांचा नक्कीच समावेश करावा लागेल. इथे आपण गायक आणि संगीतकार, या दोन्ही पातळ्यांवर वावरताना दाखवलेली सर्जनशीलता आणि प्रयोगशीलता, यांचे विश्लेषण करणार आहोत.

      August 25, 2018


  • झेंडूची फुले

    माझे फुले आणि आरोग्य हे पुस्तक २००७ साली प्रकाशीत झालेले आहे. या पुस्तकातील माहीती व लोकांनी सांगितलेले अनुभव देत आहे.

      September 4, 2017


  • नागेश मोरवेकर – एक प्रतिभावान लोककलाकार

    डोळे मिटून भूतकाळाच्या विश्वात शिरलं , की अनेक गोष्टी, आठवणी, व्यक्ती, प्रसंग डोळ्यांसमोर लख्ख उभे रहातात. त्यासोबत जोडलेल्या अनेक गोष्टी फेर धरून नाचू लागतात. आनंद, दुःख, समाधान, अशा संमिश्र भावभावनांना स्पर्श करत एक छानसा फेरा पूर्ण होतो आणि पुन्हा एकदा मी वर्तमानकाळात अवतरतो.

      February 1, 2022


  • अभिनेता सिद्धार्थ जाधव याची स्वाक्षरी

    माणसाच्या दिसण्यापेक्षा त्याचे खरे असणे किती म्हणवाचे असते हे सिद्धार्थच्या यशावरून आणि त्याच्या माणूसपणावरून दिसून येते. सिदार्थ जाधव याला खरा हात दिला तो केदार शिंदे यांच्या ‘ लोच्या झाला रे ‘ या नाटकाने. अभिनेते संजय नार्वेकर यांना सिद्धार्थ खूप मानतो. केदार शिंदे यांच्या ‘ लोच्या झाला रे …’ या नाटकांनंतर खऱ्या अर्थाने त्याला ब्रेक मिळाला असे म्हणता येईल

      October 23, 2019


  • बँक ऑफ महाराष्ट्रचा स्थापना दिन

    मराठी लोकांची आणि या लोकांच्या घराघरात पोचलेली एक राष्ट्रीयीकृत बॅंक म्हणून बॅंक ऑफ महाराष्ट्रची एक वेगळी ओळख आहे. तिचे मुख्यालयही पुण्यासारख्या शहरात दिमाखदारपणे उभे आहे.

      September 16, 2021


  • श्री ललितापंचरत्न स्तोत्रम् – ४

    प्रातः स्तुवे परशिवां ललितां भवानीं त्रय्यन्तवेद्यविभवां करुणानवद्याम्‌।विश्वस्य सृष्टि-विलय-स्थितिहेतुभूतां
    विद्येश्वरीं निगमवाङ्गमनसाविदूराम्‌॥४॥

    प्रातः स्तुवे - प्रातःकाळी अर्थात सूर्योदयाच्या देखील पूर्वी, डोळे देखील उघडण्याच्या आधी, मी स्तुती करतो.

    परशिवां- पर म्हणजे अत्यंत श्रेष्ठ. शिव म्हणजे अत्यंत पवित्र. अत्यंत श्रेष्ठ आणि पवित्र असणारी.

    ललितां- अत्यंत लालित्यपूर्ण असणारी.

    भवानीं- भव म्हणजे भगवान शंकर. त्यांची चैतन्यशक्ती ती भवानी.

    त्रय्यन्त- कोणत्याही वेदांचे संहिता, आरण्यक, ब्राह्मण आणि उपनिषद असे चार भाग असतात. उपनिषद हा चौथा भाग असल्याने त्याला, तीनच्या नंतर असणारा म्हणून त्रय्यन्त म्हटले. अर्थात त्रय्यन्त म्हणजे उपनिषद ,वेदान्त.

    वेद्यविभवां- वेद्य म्हणजे स्पष्ट करण्याचे, जाणवून देण्याचे. तर विभव म्हणजे वैभव . अर्थात वेदांत तत्वज्ञानी जिचे वैभव स्पष्ट करते अशी. त्याद्वारे जिला जाणता येते अशी.

    करुणानवद्याम्‌- करुणा अर्थात दया. अनवद्या अर्थात निर्दोष. सामान्य व्यवहारात दये मध्ये समोरच्याला आपल्यापेक्षा हीन समजणे आणि त्याच्यावर उपकार करणे. हा भाव असतो. तो दोष नसलेली दया म्हणजे वात्सल्याने आई परिपूर्ण आहे.

    विश्वस्य - विश्वाच्या. सृष्टि-निर्मिती.

    विलय- प्रलय, विनाश.

    स्थिति- संचालन.

    हेतुभूतां - या सगळ्याचे मूळ कारण असणारी.

    विद्येश्वरीं- सर्व प्रकारच्या विद्या अर्थात ज्ञानाचे अधिष्ठान असणारी. निगम- वेदादि शास्त्रे, वाङ्गमनसा- वाणी आणि मनाने

    विदूराम्‌- प्राप्त होणे असंभव असलेली.

    अशा आई ललितांबेचे मी स्तवन करतो.

    -- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड

      March 31, 2020


  • प्रेमगंध..

    “प्रेम” या शब्दाचा इतका गैरवापर केला गेला आहे की प्रत्येक चरणावर या प्रश्नांबद्दल प्रश्न उठविले जातात. प्रेमाची तुलना वारंवार वासनाशी केली जाते. प्रेमाची तुलना मैत्री म्हणजे पक्की मैत्रीशी ही केली जाते. जर हे खरे प्रेम असेल तर ते कसे असेल..?

      August 19, 2019


  • पेनिसिलीनचा शोध लावणारे सर अलेक्झांडर फ्लेमिंग

    सर अलेक्झांडर फ्लेमिंग हे ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ, औषधतज्ञ. त्यांनी केलेल्या पेनिसिलीनच्या संशोधनाबद्दल व त्याचा प्रतिजैविक म्हणून वापराच्या शोधाबद्दल त्यांना १९४५ मध्ये नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.

      March 11, 2013