वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
हे जंगली फळ असल्याने ह्याला जंगलची काळी मैना म्हणतात.घनदाट काळ्या झुडपात हि पिकतात साधारणपणे डोंगराळ भागात.करवंदांची फळांच्या पुड्या घेऊन लोक हायवेच्या कडेला किंवा बाजारात बसतात.
करवंदे कच्ची असताना टणक,हिरवी,आंबट तुरट चवीची व उष्ण आणी पित्तकर व वातनाशक असतात.तर पिकलेली करवंदे जांभळी चवीला आंबट गोड व थंड आणी कफपित्त नाशक असतात.कच्ची करवंदे लोणचे करायला वापरतात.
आता आपण ह्याचे घरगुती उपचार पाहूयात:
१)कच्च्या करवंदांचे लोणचे भुक वाढविते,खाल्लेल्या अन्नात पाचक स्त्राव मिसळून त्याचे चांगले पचन करविते.
२)पोटात पित्त वाढून आग होत असल्यास पिकलेली गोड करवंदे खावीत आराम पडतो.
३)गांधीलमाशी किंवा विषारी किडा चावल्यास करवंदे कुचकरून त्याची चटणी दंश झालेल्या भागी चोळावी.
४)पोपटामध्ये वात धरून पोट फुगले व दुंखु लागल्यास मुगाचे कढण करावे व त्यात ५ कच्ची करवंदे व १ मोठा चमचा दही घालून प्यावे फायदा होतो.
५)तोंडास रूची नसणे,तोंड बेचव होणे ह्यात ८-१० करवंदे चावून तोंडात येणारी लाळ थुंकून टाकावा तोंडाची चव सुधारते.
कच्ची करवंदे जास्त खाल्ल्यास पोटात आग होते तर पिकलेली करवंदे जास्त खाल्ल्यास पोट बिघडते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
अंजीर हे फळ ओले अथवा सुक्यामेव्यात जगभर प्रसिध्द आहे.तसेच बऱ्याच लोकांचे हे आवडते फळ आहे.ह्याचे काळे व लाल असे दोन प्रकार आहेत.आता तर ड्रायफ्रूट मिठाई मध्ये अंजीर हमखास वापरतात,तसेच सुक्या अंजिराचे शेक देखील केले जाते.
अंजिराचे १२-१५ फुट झाड असते व त्याला वसंत ऋतुमध्ये फळे लागतात व ग्रीष्म ऋतुमध्ये ती पिकतात.ह्याची पाने आकाराने मोठी व काळपट हिरवी असतात.
अंजीर चवीला गोड,थंड व वात पित्तनाशक आहे व थोड्या प्रमाणात कफ वाढवितो.
आता आपण त्याचे घरगुती उपयोग पाहूयात:
१)तोंडातील जीभ,दात,हिरड्या ह्यांचे आरोग्य टिकवायला अंजीर चावून खावे.
२)लघ्वीची जळजळ,उग्रवास,खरपडणे ह्यात अंजीर खावा फायदा होतो.
३)लहान मुलांचे पोट फुगून संडासला खडा होतो कारण पोटात मळ सुकतो अशा वेळेस सुका अंजीर पाण्यात कोळून ते पाणी त्याला पाजावे.
४)अशक्तपणा,वजन कमी होणे,सुका खोकला,संध्याकाळी बारीक ताप येणे,ह्यात २ अंजीर +१ चमचा ज्येष्ठमध चुर्ण हे मिश्रण सकाळी उपाशी पोटी त्या व्यक्तीला द्यावे व नंतर २ तास काही खायला व प्यायला देऊ नये.असे ३ आठवडे करावे.
५)बऱ्याच लहान मुलांना जेवणामध्ये काही तरी गोड लागते अशा वेळी त्यांना जेवणात अंजीराचा पाक करून द्यावा ह्याने त्यांचे पोषण देखील होते.
अंजीर खायचा अतिरेक केल्यास भुकमंदावणे,जुलाब होणे अशा तक्रारी उद्भवतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
शबरीने श्रीरामांना स्वत: चाखून अर्पण केलेली ही बोरे श्रीरामांनी अगदी आवडीने खाल्ली होती.
खरोखरच हि बोरे फारच रूचकर लागतात व विशेष करून उन्हाळयात मिळणारे हे रान फळ आहे.
ह्याचा मध्यम आकाराचा वृक्ष असतो जो काटेरी असतो व त्याला छोटी छोटी काटेरी पाने असतात.
कच्ची बोरे हि चवीला तुरट आंबट उष्ण असून ती शरीरात कफ पित्त दोष वाढवितात.तर पिकलेले बोर हे उष्ण असून वात पित्त दोष वाढवितात.
आता हि बोरे फक्त काहीच ऋतू मध्ये उपलब्ध असल्याने ती सुकवून ठेवतात व वापरतात.
ह्यांच देखील उपयोग घरगुती उपचारात केला जातो.कसा ते पाहुया:
१)अंगावर पित्त उठत असल्यास व खाज येत असल्यास बोराचा रस किंवा गराची चटणी अंगावर लावावी.
२)वारंवार तहान लागणे,घसा कोरडा पडणे,जीभ सुकणे ह्यावर पिकलेली गोड बोरे खावीत.
३)उमासे,कोरड्या उल्ट्या येत असल्यास बोरे खावीत.
४)जुलाब होणे,भुक न लागणे ह्यावर सुक्या बोराचे कढण डाळींबाचे दाणे,काळी मिरी,सैंधव घालून खावे.
५)वारंवार उचकी लागत असल्यास आंबट गोड बोरे खावी तसेच बोराच्या बीचे वरचे आवरण फोडून त्यातील गर उगाळून त्यात २ चमचे तुप+ १ चमचा मध घालून चाटण करून चाटावे.
बोरे खायचा अतिरेक केल्यास पित्ताचा त्रास होतो.कच्ची बोरे तर कधीच खाऊ नये.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
हे फळ जरी भारतीय नसले तरी त्याने आपल्या स्वयंपाक घरात एक महत्त्वाचे स्थान त्याने प्राप्त केले.असा कुठलाही पदार्थ नाही ज्या मध्ये आपण ह्याचा वापर करत नाही भाजी असो,आमटी असो,उसळ असो किंवा भाजी असो टाॅमेटो घातला की त्या पदार्थांची चव भलताच वाढते.
तसेच आता टाॅमेटो चटणी,सलाड,साॅस,केचअप तसेच बरेच चाटचे पदार्थ ह्यात हा हमखास वापरला जातो.तर असे लाल बुंद टोमॅटो सुप करायला देखील वापरतात.
खरोखरच ही भाजी दिसायला फारच आकर्षक असते.तो कच्चा खायला देखील छान लागतो.आणी मुख्य म्हणजे आपण ह्याची लागवड आपल्या बागेत करू शकतो.कारण ह्याचे झुडूप असते व त्याला हि फळे लागतात.
कच्चा टोमॅटो हिरव्या रंगांचा असतो चवीला आंबट असून थंड गुणाचा व तिन्ही दोष दुषित करणारा असतो.तर पिकलेला टोमॅटो हा लाल रंगांचा व थंड गुणाचा असून वातपित्तनाशक व कफकर असतो.
चला आता ह्याचे औषधी गुणधर्म पाहूयात:
१)मांसाहार केल्यावर त्या सोबत पिकलेला टोमॅटो खावा म्हणजे छातीत होणारी जळजळ,तहान लागणे,पोटातील जड पणा कमी होतो.
२)नीट पथ्य पाळून ज्या व्यक्तीला शरीरातील अनावश्यक चरबी कमी करायची असेल त्यांनी रोज पिकलेला टोमॅटो १००-२०० ग्राम खावा.
३)कोरडा खोकला,दम,थकवा,छातीत दुखणे ह्यात १ कप टोमॅटोचा रस+१ चमचा हळद पुड+ २ चमचे खडीसाखर हे मिश्रण रोज सकाळी प्यावे.
४)अजीर्ण,पोटफुगणे,चिकट पातळ संडास होणे,भुक न लागणे ह्यात १ कप टोमॅटो रस+१/४ चमचा मिरपुड+४ चिमूट हिंग+१/४ चमचा काळे मीठ हे मिश्रण रोज सकाळी रिकाम्या पोटी घ्यावे व दुपारी हलके जेवावे व रात्री उपवास करावा.असे १-३ आठवडे करावे फायदा होतो.
५)मन व शरीराचा थकवा,झोप शांत न येणे,तोंड कडू होणे,उल्टी होईल असे वाटणे ह्यात १ ग्लास टोमॅटो रस त्यात २ चमचे खडी साखर घालून रोज संध्याकाळी ४-५ च्या दरम्यान प्यावा ह्याने शरीर व मन ताजे तवाने व्हायला मदत होते.
६)गर्भवती स्त्रीने रोज खडीसाखर घालून टोमॅटोचा रस प्यावा त्यामुळे पोट साफ रहाते,थकवा कमी होतो व बाळंतपणा नंतर दुध चांगले सुटते.
कच्चा टोमॅटो कधीच खाऊ नये तसेच टोमॅटो वापरावा पण बिया काढुन.कारण जर तुम्हाला मुतखड्याचा त्रास असेल तर तो टोमॅटोच्या बियांनी वाढतो.
अतिमात्रेत टोमॅटो खाल्ल्याने पोट बिघडते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
हे लोकप्रिय फळ असून सर्वांनाच आवडते त्याला आपला पोपट तरी कसा अपवाद असेल.आपल्या सर्वांना ती बाल कविता आठवत असेलच "पोपट पोपट बोलतोस गोड खाना जराशी पेरूची फोड".
ह्याचा आता जाम,आयस्क्रीम,सरबत अस,वड्या असे बरेच रूचकर पदार्थ बाजारात उपलब्ध आहेत.
पेरूचे सदाहरित झाड असते,पाने जाड,गोलसर,कडक,व सुगंधी असतात.कच्चा पेरू हिरवा तर पिकल्यावर पिवळा व आतील गर पांढरा व भरपुर बियांनी भरलेला असतो.
हा कच्चा असताना तुरट लागतो व पिकल्यावर गोड.कच्चा पेरू खाऊ नये.खायला व औषधासाठी पिकलेला पेरू बियाकाढून त्याचा गर वापरावा.
पिकलेला पेरू गोड,थंड,पित्त व वात दोष कमी करणारा व कफ दोष वाढविणारा असतो.
आता आपण ह्याचे औषधी उपयोग पाहूयात:
१)पोटात जळजळ,घसा कोरडा पडणे,हात,पाय,डोळे ह्याची आग ह्यात जेवणानंतर १ तासाने पिकलेला पेरू खावा.
२)चालल्यावर थकवा येणे,पोटऱ्या दुखणे,घसा कोरडा पडणे ह्यावर सकाळी रिकामी पोटी १ पेरूचा गर+२ चमचे मध+१ चिमूट सैंधव हे मिश्रण घ्यावे.
३)संडासला साफ होत नसल्यास महिनाभर रोज रात्री एका पेरूचा गर खावा.
४)मोठ्या सर्जरी नंतर थकवा कमी करायला व जखम लवकर भरून यायला रोज १ पेरू+१ चमचा मध+१/२ चमचा साजुक तूप खावे.
५)लहान मुलांना पौष्टिक म्हणून खायला १ पेरूचा गर+ मध द्यावा.
पेरू खायचा अतिरेक केल्यास सर्दी,पडसे होऊ शकते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
हे फळ सगळ्यांना आवडते.दिसायला आणी खायला देखील सुरेख.साधारण अक्टोबर महिन्यात सुरूवातीला हि फळे बाजारात येतात.ह्याचे १०-१२ फुट उंच झाड असते व फळ ४-५ इंच व्यासाचे असते.बाहेर काळपट हिरवी साल असते व आत पांढरा सुगंधी गर व काळी बी असते.
हे चवीला गोड थंड व पित्तनाशक असून वात व कफ दोष वाढविते.
आता ह्याचे घरगुती उपचार पाहूयात:
१)व्यवसाया निमित्त उष्णतेशी संपर्क येत असणाऱ्या व्यक्ती ज्यांना घसा कोरडा होणे,वारंवार तहान लागणे ह्या तक्रारी असतात त्यांनी सीताफळ अवश्य खावे.
२)मुलास दुध पाजत असणाऱ्या स्त्रीने सीताफळ खावे भरपूर दुध येते व थकवा देखील कमी होतो.
३)तळपाया व हात ह्यांची आग होत असल्यास सीताफळ खावे व साल तळव्यांना बांधावी.
४)गळवे पिकायला कच्च्या सीतांफळाचे पोटीस त्या गळूवर बांधावे.
५)सीतांफळाचे बियांचे चुर्ण हे केस धुवायला वापरल्यास कोंडा कमी होतो व केसांचे आरोग्य सुधारते.
सीताफळ खायचा अतिरेक केल्यास सर्दी खोकला होऊ शकतो.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
पिकलेली पपई हि चवीला गोड,थंड असून पित्तनाशक असते.
आता पिकलेल्या पपईचे घरगुती उपचार पाहूयात:
१)जेवणानंतर काही वेळाने पिकलेल्या पपईच्या १-२ फोडी खाल्ल्याने अन्न पचन सुलभ होते.
२)बाळंतीण बाईला जेवणानंतर पपई खायला दिल्यास तिला भरपूर दुध येते.
३)ज्या स्त्रीयांना मासिक पाळीच्या वेळी स्त्राव कमी होतो त्यांनी पपई खावी व ओटी पोटाला एरंडेल तेलाने मालीश करावे.
४)पपईच्या बियांचे चुर्ण १-२ चमचे गरम पाण्यासह दीर्घ काळ सेवन केल्याने कृमिंचा प्रादुर्भाव कमी होतो.
५)प्रसुतीनंतर गर्भाशय संकुचित होऊन रक्तस्राव थांबावा म्हणून पपईच्या बियांचा रस काढुन प्यावा व ओटीपोटाला देखील हा रस + एरंडेल तेल हे मिश्रण चोळावे.
पपई हि गरोदर स्त्रीने खाऊ नये कारण पपई मध्ये गर्भाशय संकोच करण्याचा गुण असल्याने त्यामुळे गर्भपात होऊ शकतो.
तसेच पपईचे अतिसेवन केल्यास बायकांना मासिक पाळीच्या वेळेस अतिरक्तस्त्राव होऊ शकतो.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
पपई हे फळ अत्यंत रूचकर व पौष्टिक असते.तसेच हे सगळ्यांना आवडणारे व बारा माही उपलब्ध असे फळ.ह्याचा आपण वेगवेगळ्या तऱ्हेने उपयोग करू शकतो मग शेक असो वा फ्रूट सलाड सगळ्याच हि पपई रूचकर लागते.
तसे काही आपण ह्यातून फारसे पक्वान्न बनवत नाही कारण हे फळ कच्चे असताना भाजी व पिकल्यावर नुसतेच खायला छान लागते.
ह्याचे १०-१२ फूट उंच वृक्ष असतो व ह्या झाडाला फांद्या नसतात.पाने ताडाच्या पानांप्रमाणे छत्राकार,विस्तृत व विभक्त खणांची असतात.फुले हिरवी,पांढरी व एकलिंगी असतात.फळ एक कोष्ट,लंबगोल,कच्चे असताना हिरवे व पिकल्यावर पिवळसर असते त्याच्या आत बिया असतात ज्या चाॅकलेटी रंगाच्या व पाणीदार अशा पिकलेल्या फळात तर कच्च्या फळात पांढऱ्या असतात.
कच्चे फळ हे चवीला तिखट,कडवट असते ते उष्ण असते व कफ वात शामक असून पित्तकर असते.
तर आता आपण प्रथम कच्च्या पपईचे घरगुती उपचार पाहूयात:
१)कच्च्या पपईचा चीक गजकर्णावर लावावा फायदा होतो.
२)मुळव्याधीवर पपईच्या कच्च्या फळाचा चीक लावल्यास ३ दिवसांनी मोड कमी होतो.
३)कच्ची पपई वाटून हातपायांवर बांधून झोपल्यास हातपायांची आग व भेगा कमी होतात.
४)कच्च्या पपईचे तुकडे मांस शिजवताना त्यात धालावे म्हटजे मांस लवकर शिजते व सुपाच्य होते.
५)कृमींवर मोठ्या माणसांना १ चमचा पपईचा चीक+साखर हे मिश्रण घ्यावे व लहान मुलांना हा चीक १-२ थेंब साखरे सह द्यावा.
(क्रमश:)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
आसमान से टपके खजुर में अटके हि म्हण सर्वांनाच माहित असणार.तर हा खजुर आपल्या सर्वांचाच आवडता पण ह्याचे खरे राष्ट्रीयत्व अरब देश आहे बरं का.म्हणजेच काय तर हा परदशी पाहुणा आपल्या देशात आला आणी आपलाच बनून गेला.
अत्यंत रूचकर फळ आपण सुक्यामेव्यात पण ह्याचा चांगलाच फडशा पाडतो नाही का.अत्यंत पौष्टिक देखील आहे हा.खजुराची चटणी अगदी कशावर ही छान लागते,खजुर बर्फि,खजुर घातलेली शेवयांची खीर,किंवा पक्वान्नांमध्येच कशाला नुसता देखील हा सुरेख लागतो.
ह्याचा सुपारीच्या झाडा सारखे दिसणारे झाड असते.ते बरेच उंच असते आणी त्याला हे खजुर लागतात. खजुर चवीला गोड असतात,थंड असतात व हे शरीरातील वात व पित्त दोष कमी करतात.
चला आता ह्याचे घरगुती उपाय पाहूयात:
१)संडासला साफ होत नसल्यास २-३ खजुर रात्री पाण्यात भिजत घालावेत व सकाळी ते पाण्यात कुचकरून ते पाणी प्यावे.
२)जुनी जखम बरी होत नसेल कर त्यावर खजुराचे पोटीस बांधावे व खजुर तुपासह खावा.मात्र हि जखम मधुमेहामुळे झाली नसावी.
३)४ खजुर+ १ चमचा शिंगाडा पीठ तुपावर परतावे व खाऊन त्यावर दुध प्यावे.ह्याने रक्त कणांची वाढ होते.
४)लहान मुलांना दात येत असताना होणाऱ्या जुलाबात मधासह खारीक उगाळून द्यावी.
५)डोके दुखत असल्यास खारकेचे बी उगाळून कपाळास लावावे.
६)घामोळ्यांवर खजुराचे बी उगाळून लावावे.
७)खजुराचे बी कुटून रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावे व ते पाणी पिण्यासाठी वापरावे ह्याने अंगातील उष्णता कमी होते व वारंवार लागणारी तहान देखील.
८)खजुराच्या बिचा लेप उगाळून तो पापण्यांवर लावल्याने डोळे लाल होणे,डोळ्यांची आग होणे कमी होते.
खजुर अतिखाल्ल्यास भुक मंदावणे,अजीर्ण व जुलाब होतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
तसा कोहळा पौष्टिक असला तरी काही श्रध्दा अंधश्रद्धा ह्या फळाशी जोडल्या गेल्या आहेत जसे ह्याचा वेल बहरला आणी भरपूर फळे लागली कि ते अपशकुन मानला जातो,बऱ्याच घरात हा आणणे शिजविणे निषिद्ध असते.तसेच दृष्टबाधा होऊ नये म्हणून ह्याचे फळ धरा बाहेर बांधतात.
एवढे चांगले फळ पण किती शापित बिच्चारे नाही का हो!बरे ह्याचा उपयोग खायला देखील केला जातो बरं का.आग्रा फेमस पेठा कोहळ्यापासून बनवितात,आपण उन्हाळयात करतो त्या वड्या कोळ्याच्याच,खीर देखील करतात,काहीजण ह्याचा खवा देखील करतात.आणी हे सगळे पदार्थ पौष्टिक असतात बरं का.
कोहळ्याचा वर्षायू वेल असतो.ह्याची पाने ४-६ इंच लांब व हृदयाकृती असतात,पाने पिवळी २ इंच व्यासाची असतात.फळ अंडाकृती १-११/२ फूट लांब व वर सफेद पावडरचे आवरण असणारे असते.
हा चवीला गोड,थंड व वात पित्त दोष कमी करणारा व कफ दोष वाढविणारा असतो.
चला आता ह्याचे औषधी व घरगुती उपचारात महत्त्व पाहूया:
१)अंगाची आग होत असल्यास फळाच्या गराचा लेप करावा.
२)अम्लपित्तामध्ये कोहळ्याच्या रसात साखर घालून प्यावे.
३)बुद्धि व धारणाशक्ती वाढवायला पिकलेल्या कोहळ्याच्या १/४ कप रसात १/२ चमचा ज्येष्टमध उगाळून घालावे व हे मिश्रण रोज सकांळी अनशापोटी प्यावे.
४)४ चमचे कोहळ्याचा रस+ ४ चमचे आवळा रस रोजसकाळीघ्यावाह्यानेथुंकी ,नाक,लघ्वी,
मुळव्याध ह्यातून होणारा रक्त स्त्राव कमी होतो.
५)डोळ्यांची आग होत असल्यास व डोळे लाल होत असल्यास कोहळ्याच्या रसांच्या घड्या डोळ्यावर ठेवाव्यात.
६)वजन वाढवायला ४ चमचे कोहळ्याचा रस +गव्हाचे सत्व १/२ चमचा+ खडी साखर १ चमचा रोज सकाळी अनशापोटी घ्यावे व वर १२ सुर्यनमस्कार घालावेत.
कोहळा अति खाल्ल्यास शरीर स्थूल होऊ शकते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Copyright © 2025 | Marathisrushti