वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
हिताकारणे बोलणे सत्य आहे | हिताकारणे सर्व शोधूनि पाहे |
हिताकारणे ब्ंाड पाखांड वारी | तुटे वाद संवाद तो हीतकारी ||111||
जनी सांगता ऐकता जन्म गेला | परी वादवेवाद तैसाचि ठेला |
उठे संशयो वाद हा दंभधारी | तुटे वाद संवाद तो हीतकारी ||112||
जनी हीत पंडीत सांडीत गेले | अहंतागुणे ब्रहमराक्षस जाले |
तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे | मना सर्व जाणीव सांडूनि राहे ||113||
फुकाचे मुखी बोलता काय वेचे | दिसेंदीस अभ्यंतरी गर्व सांचे |
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे | विचारे तुझा तूंचि शोधून पाहे ||114||
तुटे वाद संवाद तेथे करावा | विवेके अहंभाव हा पालटावा |
जनी बोलण्यासारिखे आचरावे | क्रियापालटे भक्तीपंथेचि जावे ||115||
बहू श्रापिता कष्टला अंबऋषी | तयाचे स्वये श्रीहरी जन्म सोशी |
दिला क्षीरसिंधू तया ddऊपमानी | नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ||116||
धुरू लेकरू बापुडे दैन्यवाणे | कृपा भाकिता दीधली भेटि जेणे |
चिरंजीव तारांगणी प्रेमखाणी | नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ||117||
गजेंदू महासंकटी वाट पाहे | तयाकारणे श्रीहरी धांवताहे |
उडी घातली जाहला जीवदानी | नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ||118||
अजामेळ पापी तया अंत आला | कृपाळूपणे तो जनी मुक्त केला |
अनाथासि आधार हा चक्रपाणी | नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ||119||
विधीकारणे जाहला मत्स्य वेगी | धरी कूर्मरूपे धरा पृष्ठभागी |
जना रक्षणाकारणे नीच योनी | नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ||120||
- श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)
सागरातून निर्माण झालेला शंख श्रीविष्णूने वध केलेल्या शंखचूड राक्षसाचे प्रतीक असून देवपूजेत याला मानाचे स्थान आहे. शंखाच्या मूलभागात चंद्र, कुक्षामद्ये वरुण, पृष्ठभागी प्रजापती आणि अग्रभागी गंगा व सरस्वती निवास करतात. पंचजन्य नाव असलेल्या शंखाला श्रीविष्णूने आपल्या हाती धरले आहे म्हणून शंखाला अग्रपूजेचा मान मिळाला असून त्याच्यामध्ये स्नान घालताना साठणारे जल सर्व देवांवर शिंपडण्यात येते.
महाभारतातील युध्दप्रसंगी शंखाचा रणवाद्य म्हणून उपयोग केल्याचे आढळून येते तर देवपूजेच्या वेळीही शंखनाद केला जातो, ज्याच्या ध्वनीमुळे आजूबाजूचे वातावरण प्रसन्न होऊन एकाग्रता लाभते. म्हणून देवघरात शंख असणे भाग्याचे लक्षण आहे.
महा भक्त प्रल्हाद हा कष्टवीला | म्हणोनी तयाकारणे सिंह जाला |
न ये ज्वाळ वीशाळ संन्नीध कोणी | नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ||121||
कृपा भाकिता जाहला वज्रपाणी | तयाकारणे वामनु चक्रपाणी |
द्विजाकारणे भार्गवू चापपाणी | नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ||122||
अहिल्ये सतीलागि आरण्यपंथे | कुढावा पुढे देव बंदी तयाते |
बळे सोडिता घाव घाली निशाणी | नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ||123||
तये दोपदीकारणे लागवेगे | त्वरे धांवतो सर्व सांडूनि मागे |
कळीलागी जाला असे बौध्द मौनी | नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ||124||
अनाथा दिनाकारणे जन्मताहे | कलंकी पुढे देव होणार आहे |
जया वर्णिता शीणली वेदवाणी | नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ||125||
जनाकारणें देव लिलावतारी | बहूतांपरी आदरे वेषधारी |
तया नेणती ते जन पापरूपी | दुरात्मा महानष्ट चांडाळ पापी ||126||
जगी धन्य जो रामसूखे निवाला | कथा ऐकतां सर्व तल्लीन जाला |
देहेभावना रामबोधे उडाली | मनोवासना रामरूपी बुडाली ||127||
मना वासना वासुदेवी वसो दो | मना कामना कामसंगी नसो दे |
मना कल्पना वाउगी ते न कीजे | मना सज्जना सज्जनी वस्ति कीजे ||128||
गती कारणे संगती सज्जनाची | मती पालटे सूमती दुर्जनाची |
रतीनायिकेचा पती नष्ट आहे | म्हणोनी मनातीत ह्ऊोनि राहे ||129||
मना अल्प संकल्प तोही नसावा | सदा सत्य संकल्प चिती वसावा |
जनी जल्प विकल्प तोही त्यजावा | रमाकांत एकांतकाळी भजावा ||130||
- श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)
भारतीय संस्कृतीमध्ये मंगलकार्यप्रसंगी कलशाला फार महत्त्व प्राप्त आहे. तांदळाच्या राशीवर ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढून कलशाची स्थापना केली जाते. त्यामध्ये गंगा जल आणि पंचरत्ने घालून पंचपत्रीने तो सुशोभित करतात. त्यावर नारळ ठेवला जातो व मग कलशाची पूजा केली जाते. गंध, अक्षता आणि फुले वाहून देवघरात कलश ठेवला असता सुख, समाधान आणि शांती प्राप्त होते. समुद्र मंथनातून बाहेर आलेले अमृत भरण्यासाठी विश्र्वकर्म्याने सर्व देवांमध्ये असलेल्या कलेचे ग्रहण करुन जे भांडे बनवले ते म्हणजे कलश होय अशी कथा पुराणात सांगितली आहे.
कळशी या भाड्याचा छोटा आकार म्हणजे कलश. कळशाचे भांडे पितळेचे अथवा तांब्याचे असते.
क्षितींद्र, जलसंभव, पवन, अग्नी, कोशसंभव, सोम, आदित्य आणि विजय असे कलशाचे विविध प्रकार आहेत. यापैकी विजय कलश पीठाचे मध्यभागी स्थापन केला जातो. अन्य कलश आठ दिशांना ठेवले जातात. कलशाच्या मुखाच्या ठिकाणी ब्रम्हा, गळ्याच्या ठिकाणी शंकर, मूलगामी विष्णू, मध्यभागी मातृकामण आणि दाही दिशांना वेष्टून दिक्पाल निवास करतात. कलशाचे पोटात सप्तसागर, सप्तव्दीप, ग्रहनक्षत्रे, कुलपर्वत, गंगा आणि चार वेद सामावले आहेत असे शास्त्रकार म्हणतात.
तांब्याच्या कलशात रात्री पाणी भरुन ते सकाळी उठल्यावर अनुशापोटी सेवन केले असता बध्दकोष्ठ नाहीसा होतो. तांब्याच्या कलशातील पाणी प्यायल्याने इतर अनेक विकारही दूर होतात.
भजाया जनी पाहता राम येकु | करी बाण येकु मुखी शब्द येकु |
क्रिया पाहता उेरे सर्व लोकू | धरा जानकीनायकाचा विवेकु ||131||
विचारूनि बोले विवंचूनि चाले | तयाचेनि संतत्प तेही निवाले |
बरे शोधिल्याविण बोलो नको हो | जनी चालणे शुे नेमस्त राहो ||132||
हरीभक्त वीरक्त विज्ञानरासी | जेणे मानसीं स्थापिले निश्चयासीं |
तया दर्शनें स्पर्शनें पुण्य जोडे | तया भाषणें नष्ट संदेह मोडे ||133||
नसे गर्व आंगी सदा वीतरागी | क्षमा शांति भोगी दयादक्ष योगी |
नसे लोभ ना क्षोभ ना दैन्यवाणा | इंही लक्षणी जाणिजे योगिराणा ||134||
धरी रे मना संगती सज्जनाची | जेणे वृति हे पालटे दुर्जनाची |
बळे भाव सद्बुेि सन्मार्ग लागे | महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे ||135||
भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे | भयातीत ते संत आनंत पाहे |
जया पाहता द्वैत कांही दिसेना | भय मानसी सर्वथाही असेना ||136||
जिवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनि गेले | परी जीव अज्ञान तैसेचि ठेले |
देहेबुेिचे कर्म खोटे टळेना | जुने ठेवणे मीपणे आकळेना ||137||
भ्रमे नाडळे वित ते गुफ्त जाले | जिवा जन्मदारिद ठाकूनि आले |
देहेबुेिचा निश्र्चयो ज्या टल्íना | ठ्ठजुने ठेवणे मीपणे आकळेना ||138||
पुढे पाहता सर्वही केंदलेसे | अभाग्यास हे दृश्य पाषाण भासे |
अभावे कदा पुण्य गांठी पडेना | जुने ठेवणे मीपणे आकळेना ||139||
जयाचे तया चूकले प्राफ्त नाही | गुणे गोविले जाहले दुःख देही |
गुणावेगळी वृति तेही वळेना | जुने ठेवणे मीपणे आकळेना ||140||
- श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)
म्हणे दास सायास त्याचे करावे | जनी जाणता पाय त्याचे धरावे |
गुरूअंजनेवीण ते आकळेना | जुने ठेवणे मीपणे ते कळेना ||141||
कळेना कळेना कळेना ढल्íना | ढळे नाढळे संशयोही ढल्íना |
गळेना गळेना अहंता गळेना | बळे आकळेना मिळेना मिळेना ||142||
अविद्यागुणे मानवा ddऊमजेना | भ्रमे चूकले हीत ते आकळेना |
परीक्षेविणे बांधले दृढ नाणे | परी सत्य मिथ्या असे कोण जाणे ||143||
जगीं पाहता साच ते काय आहे | अती आदरे सत्य शोधूनि पाहे |
पुढे पाहतां पाहतां देव जोडे | भ्रम भ्रांतिं अज्ञान हे सर्व मोडे ||144||
सदा विषयो चिंतिता जीव जाला | अहंभाव अज्ञान जन्मासी आला |
विवेके सदा सस्वरूपी भरावे | जिवा उगमी जन्म नाही स्वभावे ||145||
दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी | अकस्मात आकारले काळ मोडी |
पुढे सर्व जाईल कांही न राहे | मना संत आनंत शोधूनि पाहे ||146||
फुटेना तुटेना चळेना ढळेना | सदा संचले मीपणे ते कळेना |
तया एकरूपासि दूजे न साहे | मना संत आनंत शोधूनि पाहे ||147||
निराकार आधार ब्रधदिकांचा | जया सांगता सीणली वेदवाचा |
विवेके तदाकार ह्ऊोनि राहे | मना संत आनंत शोधूनि पाहे ||148||
जगी पाहता चर्मचक्षी न लक्षे | जगी पाहता ज्ञानचक्षी न रक्षे |
जगी पाहता पाहणे जात आहे | मना संत आनंत शोधूनि पाहे ||149||
नसे पीत ना श्र्वेत ना शाम कांही | नसे व्यक्त अव्यक्त ना नीळ नाही |
म्हणे दास विश्वासता मुक्ति लाहे | मना संत आनंत शोधूनि पाहे ||150||
- श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)
खरे शोधिता शोधिता शोधताहे | मना बोधिता बोधिता बोधताहे |
परी सर्वही सज्जनाचेनि योगे | बरा निश्चयो पाविजे सानुरागे ||151||
बहूता परी कूसरी तत्वझाडा | परी पाहिजे अंतरी तो निवाडा |
मना सार साचार तें वेगळे रे | समस्तांमधे येक ते आगळे रे ||152||
नव्हे पिंडज्ञाने नव्हे तत्वज्ञानें | समाधान कांही नव्हे तानमानें |
नव्हे योगयागे नव्हे भोगत्यागें | समाधान ते सज्जनाचेनि योगें ||153||
महावाक्य तत्वादिकें पंचकर्णें| खुणे पाविजे संतसंगें विवर्णें|
द्वितीयासि संकेत दो दाविजेतो| तया सांडुनी चंदःमा भाविजेतो ||154||
दिसेना जनी तेचि शोधूनि पाहे | बरे पाहता गूज तेथेचि आहे |
करी घेउ जाता कदा आढळेना | जनी सर्व कोंदाटले तें कळेना ||155||
म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे | अतर्कासि तर्की असा कोण आहे |
जनी मीपणे पाहता पाहवेना | तया लक्षिता वेगळे राहवेना ||156||
बहू शास्त्र धुंडाळिता वाढ आहे | जया निश्र्चयो येक तोही न साहे |
मती भांडती शास्त्रबोधे विरोधे | गती खुंटती ज्ञानबोधे प्रबोधे ||157||
श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे | स्मृती वेद वेदांतवाक्ये विचित्रे |
स्वये शेष मौनावला स्थिर पाहे | मना सर्व जाणीव सांडून राहे ||158||
जेणे मक्षिका भक्षिली जाणिवेची | तया भोजनाची रूची प्राफ्त कैंची |
अहंभाव ज्या मानसींचा विरेना | तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना ||159||
नको रे मना वाद हा खेदकारी | नको रे मना भेद नाना विकारी |
नको रे मना शिकऊ पूढिलांसी | अहंभाव जो राहिला तूजपासी ||160||
- श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)
अहंतागुणे सर्वही दुःख होते | मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते |
सुखी राहता सर्वही सूख आहे | अहंता तुझी तूचि शोधूनि पाहे ||161||
अहंतागुणे नीति सांडी विवेकी | अनीतीबळे श्र्लाघ्यता सर्व लोकी |
परी अंतरी सर्वही साक्ष येते | पःमाणांतरे बुेि सांडूनि जाते ||162||
देहेबुेिचा निश्र्चयो दृढ झाला | देहातीत ते हीत सांडीत गेला |
देहेबुेि ते आत्मबुेि करावी | सदा संगती सज्जनाची धरावी ||163||
मने कल्पिला वीषयो सोडवावा | मने देव निर्गूण तो वोळखावा |
मने कल्पिता कल्पना ते सरावी | सदा संगती सज्जनाची धरावी ||164||
देहादीक पःपंच हा चिंतियेला | परी अंतरी लोभ निश्र्चीत ठेला |
हरीचिंतने मुक्तिकांता वरावी | सदा संगती सज्जनाची धरावी ||165||
अहंकार विस्तारला या देहाचा | स्त्रियापुत्रमित्रादिके मोह त्यांचा |
बळे भ्रांति हे जन्मचिंता हरावी | सदा संगती सज्जनाची धरावी ||166||
बरा निश्र्चयो शाश्र्वताचा करावा | म्हणे दास संदेह तो विसरावा |
घडीने घडी सार्थकाची करावी | सदा संगती सज्ज्नाची धरावी ||167||
करी वृत्ति जो संत तो संत तो संत जाणा | दुराशागुणे जो नव्हे दैन्यवाणा |
उपाधी देहेबुेिते वाढवीते | परी सज्जना केवि बाधू शके ते ||168||
नसे अंत आनंत संता पुसावा | अहंकार विस्तार हा नीरसावा |
गुणेविण निर्गूण तो आठवावा | देहेबुेिचा आठवो नाठवावा ||169||
देहेबुेि हे ज्ञानबोधे त्यजावी | विवेके तये वस्तुची भेट घ्यावी |
तदाकार हे वृत्ति नाही स्वभावें | म्हणोनी सदा तेचि शोधीत जावे ||170||
- श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)
सागरातून निर्माण झालेला शंख श्रीविष्णूने वध केलेल्या शंखचूड राक्षसाचे प्रतीक असून देवपूजेत याला मानाचे स्थान आहे. शंखाच्या मूलभागात चंद्र, कुक्षामद्ये वरुण, पृष्ठभागी प्रजापती आणि अग्रभागी गंगा व सरस्वती निवास करतात. पंचजन्य नाव असलेल्या शंखाला श्रीविष्णूने आपल्या हाती धरले आहे म्हणून शंखाला अग्रपूजेचा मान मिळाला असून त्याच्यामध्ये स्नान घालताना साठणारे जल सर्व देवांवर शिंपडण्यात येते.
महाभारतातील युध्दप्रसंगी शंखाचा रणवाद्य म्हणून उपयोग केल्याचे आढळून येते तर देवपूजेच्या वेळीही शंखनाद केला जातो, ज्याच्या ध्वनीमुळे आजूबाजूचे वातावरण प्रसन्न होऊन एकाग्रता लाभते. म्हणून देवघरात शंख असणे भाग्याचे लक्षण आहे.
असे सार साचार ते चोरलेसे | इही लोचनी पाहता दृश्य भासे |
निराभास निर्गूण ते आकळेना | अहंतागुणे कल्पिताही कळेना ||171||
स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या | स्फुरे ब्रध् रे जाण माया सुविद्या |
मुळी कल्पना दो रूपे तेचि जाली | विवेके तरी सस्वरूपी मिळाली ||172||
स्वरूपी उदेला अहंकार राहो | तेणे सर्व आच्छादिले व्योम पाहो |
दिशा पाहता ते निशा वाढताहे | विवेके विचारे विवंचूनि पाहे ||173||
जया चक्षुने लक्षिता लक्षवेना | भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना |
क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो | दयादक्ष तो सक्षिने पक्ष घेतो ||174||
विधी निर्मिता लीहितो सर्व भाळी | परी लीहिता कोण त्याचे कपाळी |
हरू जाळितो लोक संहारकाळी | परी शेवटी शंकरा कोण जाळी ||175||
जगी द्वादशादित्य ते रूद अकःा| असंख्यात संख्या करी कोण शकःा |
जगी देव धुंडाळिता आढळेना | जनी मख्य तो कोण कैसा कळेना ||176||
तुटेना फुटेना कदा देवराणा | चळेना ढळेना कदा दैन्यवाणा |
कळेना कळेंना कदा लोचनासी | वसेना दिसेना तो जनी मीपणाशी ||177||
जया मानला देव तो पूजिताहे | परा देव शोधूनि कोणी न पाहे |
जगी पाहता देव कोटयानकोटी | जया मानली भक्ती जे तेचि मोठी ||178||
तिन्ही लोक जेथून निर्माण जाले | तया देवरायासि कोणी न बोले |
जगी थोरला देव तो चोरलासे | सदगुरूवीण तो सर्वथाही न दीसे ||179||
गुरू पाहतां पाहतां लक्ष कोटी | बहूसाल मंत्रावळी शक्ति मोंठी |
मनी कामना चेटके घातमाता | जनी व्यर्थ रे तो नव्हे मुक्तिदाता ||180||
- श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)
Copyright © 2025 | Marathisrushti