(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • अमेरिकेतील वन्यप्राणी जीवन – भाग ६

    अमेरिकेतल्या मध्यवर्ती प्रदेशाच्या अफाट गवताळ कुरणांवर एकेकाळी ज्यांचं अक्षरश: साम्राज्य होतं ते म्हणजे बायसन. खांद्यापाशी ६-६॥ फूट उंचीची आणि जवळ जवळ १ टन (१००० किलो) वजनाची ही प्रचंड धुडं, लाखोंच्या संख्येने कळपा कळपाने फिरायची. यांचं डोकं आणि खांदे खूपच अवाढव्य असतात तर त्यामानाने पुठ्ठ्याचा भाग साधारण असतो. नर आणि मादी दोघांनाही आखूड वळलेली शिंग असतात. ऑगस्ट सप्टेंबरमधे यांचा माजावर येण्याचा काळ असतो. स्प्रिंग सीझनमधे वासरांचा जन्म होतो. वासरं वर्षभर आईचं दूध पितात आणि तीन वर्षांची झाली की वयात येतात. यांचे मुख्य भक्षक म्हणजे लांडगे. स्प्रिंग-समर सीझनमधे माद्यांबरोबर छोटी बछडी असताना, त्यांच्यावर लांडग्यांचे हल्ले होतात. कधी कधी ग्रीझली अस्वलं देखील बछड्यांवर हल्ले करून त्यांना मारून खातात.

    एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीला सुमारे ६०० लाख (60 millions) बायसन्स अमेरिकेच्या प्रेअरी व ग्रेट प्लेन्सवर चरत असावेत असा अंदाज आहे. या प्रदेशातल्या निरनिराळ्या रेड इंडियन लोकांच्या जमाती, बायसनच्या कळपांच्या, ऋतुमानानुसार होणार्‍या स्थलांतरा (migration) प्रमाणे, त्यांच्या मागोमाग रानोमाळ भटकत गुजराण करायच्या. बायसनच्या कळपांना घेराव करून, एखाद्या विशिष्ट दिशेने हाकारा करीत न्यायचं आणि मग सार्‍या कळपाला एखाद्या डोंगरकड्याच्या टोकापर्यंत नेऊन, शेवटी त्या झुंडीला कडेलोट करायला लावून त्यांची शिकार करायची, ही रेड इंडियन लोकांची खास पद्धत. परंतु केवळ जरूरी पुरतीच बायसनची शिकार करून या टोळ्यांचं उदरभरण चालायचं. बायसन म्हणजे या रेड इंडियन जमातींसाठी सर्वस्व होतं, कारण त्यांचं मांस, त्यांच्या जाड केसाळ कातड्याचे कपडे, तंबू, आतड्यांपासून बनवलेल्या धनुष्यांच्या बारीक दोर्‍या असं सारं काही पुरवणारी, बायसन ही जणू त्यांची कामधेनूच होती. मग स्पॅनिश लोकांबरोबर घोडे आले आणि रातोरात या कुरणांचं आयुष्य बदलून गेलं. वाफेच्या शक्तीने आणि विद्युत शक्तीने शहरवासीयांच्या जीवनात जेवढी क्रांती झाली नसेल, तेवढी उलथापालथ घोड्यांच्या आगमनाने या कुरणांवर झाली.

    १८३०-४० च्या सुमारास अमेरिकेचा पश्चिमेकडे विस्तार होऊ लागला होता. मिसुरी राज्यातल्या सेंट लुईस या गावापासून पश्चिम किनार्‍यावरील कॅलिफोर्निया किंवा ओरेगॉन राज्यापर्यंत सुमारे २००० मैलांचा प्रवास लोक बैलगाड्या किंवा घोडागाड्यांमधून करायचे. हा प्रवास अफाट माळरानांवरून, रखरखत्या वाळवंटांतून, उंचच उंच पर्वत राजींतून, नद्या नाले पार करून असा व्हायचा. रोग राई, स्थानिक रेड इंडियन टोळ्यांचे हल्ले, हिवाळ्यातील हाडं फोडणारी थंडी, उन्हाळ्यातला वाळवंटातला शरीराची लाही लाही करणारा उष्मा, या सार्‍या दिव्यांना तोंड देता देता हजारो लोक वाटेतच मृत्यूमुखी पडायचे. त्यातच १८४८ साली कॅलिफोर्नियामधे सोन्याचा शोध लागला आणि हा जीवघेणा प्रवास करायला अधिकाधिक लोकांच्या झुंडी उद्युक्त होऊ लागल्या. १८६० च्या दशकात रेल्वे मार्ग पश्चिम किनार्‍यापर्यंत नेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. युनियन पॅसिफिक रेल्वे कंपनीने नेब्रास्का राज्यातल्या ओमाहा गावापासून पश्चिमेकडे आणि सेंट्रल पॅसिफिक कंपनीने कॅलिफोर्निया राज्यातल्या सॅक्रेमॉंटो गावापासून पूर्वेकडे, असा एकाचवेळी रेल्वे मार्ग बांधण्याचा प्रकल्प हाती घेतला. १७७६ मैल लांबीचा हा रेल्वे मार्ग या दोन कंपन्यांनी बुलडोझर्स, अवजड यंत्र सामग्री, कंप्युटर्स वगैरे कशाच्याही मदती शिवाय निव्वळ मनुष्यबळावर पूर्ण केला. १० मे १८६९ या दिवशी, एका ठरलेल्या ठिकाणी, दोन्ही कंपन्यांनी दोन दिशांनी बांधत आणलेले रेल्वे मार्ग एकमेकांना जोडले गेले आणि अटलांटिक महासागरापासून ते पॅसिफिक महासागरापर्यंतचा हा खंडप्राय देश प्रवासाच्या दृष्टीने एकदम कवेत आल्यासारखा वाटू लागला.

    हे रेल्वे मार्ग बांधत असताना बायसनच्या अफाट कळपांचा फारच उपद्रव होऊ लागला. ही प्रचंड धुडं येऊन इंजीनाला धडक द्यायची किंवा हजारो लाखोंच्या संख्येत असलेले हे कळप रेल्वेमार्गावर येऊन गाड्यांचा दिवसेंदिवस खोळंबा करायचे. त्यामुळे पुढे पुढे त्यांची अगदी व्यावसायिक पद्धतीने प्रचंड मोठ्या प्रमाणावर सामूहिक हत्या करण्यात येऊ लागली. यातच पुढे बायसन्सची पद्धतशीर हत्या करण्याची एक योजनाच आकाराला येऊ लागली. पद्धतशीर शिकारीच्या या टोळ्यांमधे एक दोन व्यावसायिक शिकारी आणि त्यांचा लवाजमा असायचा. त्यात कातडं सोलणारे कामगार, बंदुका साफ करणारे, बंदुकांत बार भरून देणारे, स्वयंपाकी, लोहार, बरेचसे घोडे आणि वॅगन्स असायच्या. सकाळी लवकर उठून माग काढणारे लोक बायसनच्या कळपांचा ठावठिकाणा धुंडाळून यायचे. मग व्यावसायिक शिकारी एखाद्या मोक्याच्या ठिकाणी आपलं बस्तान मांडून बसायचा आणि हाका करणारे लोक बायसनच्या या कळपाला शिकार्‍याच्या पुढ्यातून पळायला लावायचे. बायसनच्या मोठाल्या कवट्या छेदून गोळ्या जाऊ शकायच्या नाहीत त्यामुळे समोरून गोळ्या मारण्या ऐवजी डोक्यावर बाजूने गोळ्या मारल्या जायच्या. अशा प्रकारे मोठाले कळप शिकार्‍याच्या पुढ्यातून जातांना, कैक बायसन गोळ्या लागून गतप्राण व्हायचे. उरलेला कळप जीव घेऊन पळून जायचा. त्यानंतर चामडी सोलणारे मजूर पुढे सरसावायचे. मरून पडलेल्या बायसनच्या नाकातून हातोड्याने ठोकून एक खुंटी जमिनीत मारली जायची. मग त्याची चामडी थोडीशी कापून, त्याची टोकं दोरखंडांनी घोड्यांना बांधून, घोडे विरुद्ध दिशांना धावडवून, बायसनची चामडी सोलून काढली जायची. अशा सोलून वाळवलेल्या कातड्यांचे ढीग लादून वॅगन्स परत फिरायच्या. या कातड्यांपासून फॅक्टर्‍यांमधे तयार होणार्‍या चामडी बेल्ट्स, कोट, ब्लॅंकेट्सना युरोपात मोठीच मागणी होती.

    १८७३ पासून पुढचं दशकभर शेकड्यांनी, (काहींच्या मते हजारभर), अशा व्यावसायिक शिकारी तुकड्या अमेरिकेच्या या विस्तीर्ण गवताळ प्रदेशात बायसन्सचं शिरकाण करत फिरत होत्या. सीझनप्रमाणे रोज सुमारे २००० ते १०,००० बायसन्स मारले जायचे. १८७४-७५ मधे तर अमेरिकन कॉंग्रेसपुढे बायसन पूर्णपणे नामशेष करण्याचा प्रस्ताव मांडला गेला, कारण काय तर त्यांच्यावर अवलंबून असलेल्या स्थानिक रेड इंडियन लोकांच्या जीवन पद्धतीचा कणाच मोडला जावा. या कोत्या मनोवृत्तीपायी गोर्‍या माणसाच्या आणि रेड इंडियन टोळ्यांच्या संघर्षामधे बायसनचा बळी देण्यात आला. १८८४ पर्यंत लाखोंच्या संख्येने मारले गेल्यामुळे बायसन नामशेष होण्याच्या पंथाला लागले. यानंतर काही लोकांनी या शिरकाणातून बचावलेल्या थोड्या बहुत बायसनचे छोटे छोटे कळप करून त्यांचे पुन:संर्वर्धन करायला सुरुवात केली. हळू हळू त्यांची संख्या वाढू लागली आणि आज साधारणपणे १५०,००० बायसन्स पुनश्च अमेरिकेत फिरू लागले आहेत. त्यांची संख्या आता सुदृढ झाल्यामुळे काही राज्यांमधे चक्क त्यांच्या शिकारीला देखील परवानगी मिळू लागली आहे.

    क्रमशः ....

    -- डॉ. संजीव चौबळ

  • पोटाचा घेर कमी करण्यासाठी

    जगातील प्रत्येक व्यक्ती आपले आरोग्य उत्तम असावे अशीच इच्छा मनोमन बाळगून असते.

    जगातील प्रत्येक व्यक्ती आपले आरोग्य उत्तम असावे अशीच इच्छा मनोमन बाळगून असते. चांगल्या आरोग्यासाठी शरीरातील मेदाचे म्हणजेच चरबीचे प्रमाण आटोक्यात असणे आवश्यक आहे. व्यक्तीच्या सर्व रोगांचे मूळ अनावश्यक चरबीत आहे, हे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. मधुमेह, रक्तदाब, पक्षाघात, कॅन्सर यांची सुरुवात चरबी जास्त असण्यातून होणे शक्य असते. महिलांमध्ये पी.सी.ओ.डी. (पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसिझ), वंध्यत्व, पाळीचे त्रास, गर्भाशयात गाठी यांचीही सुरुवात मेदाचे प्रमाण जास्त असल्यामुळेच होते असे सप्रमाण सिद्ध झाले आहे. ज्यांचे चरबीचे, मेदाचे प्रमाण पोटाच्या व ओटीपोटाच्या भागात जास्त असते त्यांना जास्त धोका असतो.

    पोटाचा घेर किती असावा?
    यासाठी थोडी गमतीशीर वाटलीय तरी ही सोपी चाचणी करून पाहा- ‘भिंतीकडे तोंड करून उभे राहा आणि भिंतीला सावकाश धडका! आपला कुठला अवयव पहिल्यांदा भिंतीला लागतो? कपाळ, नाक की ढेरी? जर आपली ढेरी पहिल्यांदा भिंतीला लागत असेल, तर सावधान! खूप काळजी करू नका पण काळजी घ्या!’ ही झाली पोटाच्या घेराची सोपी व्याख्या!

    आता शास्त्रीयदृष्टय़ा मान्य असलेले निकष काय आहेत ते पाहू या. पुरुषांमध्ये पोटाचा घेर ९० सेंमी. (३६ इंच) व महिलांमध्ये ८० सेंमी. (३२ इंच) किंवा त्यापेक्षा जास्त असणे धोकादायक आहे.

    पोटाच्या घेरासाठीचे हे प्रमाण सरकारने स्थापन केलेल्या अभ्यासगटाने भारतीयांसाठी ठरवून दिले आहे. शहरी भागांत किती व्यक्ती या धोकादायक पातळीच्या खाली असतील? फारच कमी! खूप जण पोटाचा घेर कमी करण्यासाठी धडपडत असतात पण त्यामध्ये यश मिळत नसल्याची त्यांची तक्रार असते.

    पोटाचा घेर कमी करावयाचा म्हणजे ‘गुलाबजामच्या थोबडीत मारणार आणि जिलेबी कधीच खाणार नाही!’, अशी दिशा बरेच जण निवडतात. यात ९९ टक्के भर काय खायचे व काय खायचे नाही यावर असतो. ही दिशाच मुळी चुकीची आहे. दिशाच चुकीची असेल तर उद्दिष्ट गाठणे कसे शक्य होणार? त्यामुळे ९९ टक्के भर केव्हा, काय, कसे व किती यावर हवा!
    या व्यक्तींकडे वेळेचा अभाव असतो. व्यायाम करायला वेळ मिळत नाही ही सर्वाचीच बोंब! पूर्वी ज्याला व्यायामाला वेळ नाही त्याची ‘वेळ’ जवळ आली आहे’, असे म्हणत असत! आता मात्र या वाक्याचाही काही उपयोग नसल्याचे दिसते.

    खरी भूक लागल्यावर हवे ते-
    (याला काही पदार्थ नक्कीच अपवाद आहेत.) प्रसन्न चित्ताने, सावकाश खावे!..आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पोट भरावयाच्या आधी थांबावे!

    यात वयाच्या पस्तिशीपर्यंत आपण कधीच आणि काहीच व्यायाम केला नसल्यास वैद्यकीय सल्ल्यानुसार व्यायामास सुरुवात करणे इष्ट. व्यायामात १२ सूर्यनमस्कारांचा समावेश करा. याची सुरुवात दोन सूर्यनमस्कार घालून केलीत तरी चालेल. त्याचप्रमाणे संपूर्ण दिवसभर हालचाल करीत राहा. बसून राहण्याऐवजी उभे राहा, उभे राहण्याऐवजी चालणे शक्य असेल तेव्हा तेव्हा चाला. नेहमीची, जवळच्या अंतरावरची कामे करण्यासाठी चालत जा, सायकल असेल तर ती वापरायला काढा. या हालचालींमुळे आपोआप व्यायाम होत राहील. जितकी शारीरिक हालचाल जास्त तेवढे चांगले. पोटावर झोपून करावयाची आसने शिकून घेऊन ती जरूर करा.

    खरी भूक लागल्याशिवाय खाऊ नका. भूक खरी आहे का हे पाहण्यासाठी एक ग्लास पाणी सावकाश पिऊन १० मिनिटे थांबा! जर भूक तशीच राहिली तर जरूर खा! खरी भूक मारू नका. ‘हवे ते खा’ म्हणजे नेमके काय?

    शिजवलेले अन्न (रोजचे जेवण) दिवसांतून दोन वेळा. एरवी दोन जेवणांच्या मध्ये फक्त आणि भरपूर मोड आलेली कडधान्ये, कच्च्या पालेभाज्या व फळभाज्या आणि फळे खाणे योग्य. मुद्दाम पोट कमी करण्यासाठी म्हणून कुठलाही पदार्थ वज्र्य नाही. फक्त जे खायचे असेल ते जेवताना आणि योग्य प्रमाणात खा. हातसडीचा तांदूळ वापरणे फारच चांगले. घरात वापरल्या जाणाऱ्या तेलाचे ऑडिट करा. (पूर्ण दिवसात माणशी २० मिली तेलाचा वापर योग्य.) जे काही खाल ते प्रसन्न चित्ताने आणि सावकाश खा. काहीही खाताना, पिताना आधी व्यवस्थित खाली बसा, शांतपणे, प्रसन्न मनाने, सावकाश, पंचेद्रियांनी अन्नाचा आस्वाद घेत खा. जेवणासाठी २०-३० मिनिटे वेळ ठेवा. घाई गडबड टाळा.
    एखादा आवडता पदार्थ जेवणात असला, तर पोटात अजून थोडी जागा असतानाच जेवणाला पूर्णविराम देणे जड जाईल. पण हळूहळू हे नक्की जमेल. शक्यतो परत वाढून घेऊ नका म्हणजे याची सवय होत जाईल. पोट भरण्याचा सिग्नल मिळण्यास थोडा वेळ लागतो, हे ध्यानात ठेवा.

    ठरवल्या तर वरील सर्व गोष्टी सहजपणे करता येतात. वर्षभरात व्यक्तीला साधारणपणे ४ ते ५ इंच पोटाचा घेर कमी करता येऊ शकतो. स्वत:वर विश्वास ठेवा! पोटाचा घेर नक्की कमी होऊन आपले आरोग्य नक्की सुधारण्यास मदत होईल.

    संजीव वेलणकर पुणे.
    9422301733
    संदर्भ.डॉ. शिरिष पटवर्धन

  • हार्मोन्स म्हणजे काय?

    मानवी शरीर हे अनेक संस्थांनी बनलेले आहे. या विविध शरीर संस्थांचे नियंत्रण दोन संस्था करत असतात. एक म्हणजे मज्जासंस्था (मेंदू, मज्जारज्जू इ.) आणि दुसरी म्हणजे अंतस्त्रावी ग्रंथी संस्था म्हणजेच एंडोक्राईन सिस्टीम या ग्रंथीमधील स्त्रावांचे स्त्रवण सरळ रक्‍तामध्ये होत असल्याने या ग्रंथींना अंतस्त्रावी ग्रंधी म्हटले जाते.

    अशा अंत:स्त्रावी ग्रंथीच्या स्त्रावामधील जे रासायनिक पदार्थ रक्‍तामध्ये संपूर्ण शरीरात फिरत असताना शरीरातील दुसऱ्या अवयवावर परिणाम करून अनेक गोष्टींचे नियंत्रण करीत असतात अशा पदार्थांना हार्मोन्स असे म्हटले जाते.

    शरीरातील विविध पेशींची व संस्थांची वाढ, पुनरुपत्ती चयापचय क्रिया, यांना मार्गदर्शन आणि त्यांचे नियंत्रण करून त्यांच्या परिस्पर क्रियात संतुलन ठेवण्याचे काम हार्मोन्स करत असतात. शरीरातील विविध द्रवस्वरूप पदार्थांच्या घटकांच्या नियमनाचे कामही हार्मोन्स करत असतात.

    थोडक्‍यात अंतस्त्रावी ग्रंथीमध्ये तयार होणारे रक्‍तातील जे पदार्थ शरीरातील विशेषत: हळूहळू चालणाऱ्या अथवा टप्प्याने चालणाऱ्या क्रिया नियंत्रण करत असतात त्यांना हार्मोन्स म्हणतात.

    हार्मोन्सची वैशिष्ट्ये
    हार्मोन्स हे व्हिटॅमिन्स प्रमाणेच अत्यंत सूक्ष्म प्रमाणात भरपूर काय करीत असतात. हार्मोन्स जेथे तयार होतात, त्या ग्रंधी व्यतिरिक्‍त ते साठून रहात नाहीत. ते रक्‍तात वहन होताना त्यांचे कार्य झाल्यावर त्यांचा त्वरित नाश होतो. काही हार्मोन्स (उदा. ऍड्रीनॅलिन), अतिजलद कार्य करतात. तर काही हार्मोन्स (उदा. थायरीक्‍झिन) तुलनेने हळूहळू कार्य करतात. एक अंतस्त्रावी ग्रंथी अनेक प्रकारचे हार्मोन्स देखील तयार करत असते. शरीरातीलर काही क्रियांवर एकावेळी दोन हार्मोन्सचा देखील परिणाम होत असतो. हार्मोन्सचे कार्य हे इतर हार्मोन्सवर अवलंबून असते. तसेच हार्मोन्स ज्या पेशींवर अथवा संस्थेवर कार्य करीत असतात त्यांच्या क्रियेवर पुन्हा नियंत्रितही होत असतात.

    हार्मोन्सचे कार्य हे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या व्हिटॅमिन्सशी देखील संबंधित असते. उदा. इ. व्हीटॅमिन्सचा प्रजनन संस्थेतील अवयवांच्या स्त्रावावर परिणाम होत असतो. त्याविषयी सर्वांना माहिती असणे आवश्‍यक आणि अनिवार्य आहे.

    हार्मोन्समध्ये बिघाड कसे उत्पन्न होतात?
    हार्मोन्स ज्या ग्रंथी मधून तयार होतात त्या ग्रंथीने हा स्त्राव कमी करणे अथवा प्रमाणापेक्षा अधिक करणे यामुळे हार्मोन्सच्या प्रमाणात असंतुलन उत्पन्न होते. अंतस्त्रावी ग्रंथीत बिघाड होणे, किंवा काही वेळा इतर हार्मोन्सचे कार्य बिघडणे किंवा संबंधित इतर दुसऱ्या अंतस्त्रावी ग्रंथीच्या बिघाडाच्या दुष्परिणामी हे घडत असते.

    *अंतस्त्रावी ग्रंथीलाच विकार होणे उदा. सूज येणे, कॅन्सरचा प्रादुर्भाव इ.
    *हार्मोन्स तयार करण्यासाठी लागणाऱ्या आवश्‍यक घटकांची कमतरता उदा. आयोडीन कमी पडल्यामुळे होणारा गॉयटर.

    *अंत:स्त्रावी ग्रंथी नियंत्रित करणाऱ्या दुसऱ्या ग्रंथीमध्ये दोन उत्पन्न होणे. उदा. पिच्युटरी या ग्रंथीचे कार्य वाढल्याने त्याच्या परिणामी हायपर थायरॉईडीझम होतो.

    *अंतस्त्रावी ग्रंथीला प्रमाणापेक्षा जास्त काम पडल्यामुळे उदा. अति गोड पदार्थ खाल्ल्याने साखरेचे नियंत्रण करणाऱ्या स्वादुपिंडावर ताण येऊन डायबेटीस म्हणजेच मधुमेह होतो.
    *कोणत्याही कारणाने उदा. मानसिक तणाव, चिंता काळजी, अति शारीरिक ताण. इ. मुळे मज्जासंस्थेत बिघाड झाल्याने हार्मोन्सचे कार्य बिघडते.

    *जन्मत: दोष असणेमुळेही काही वेळा अंत:स्त्रावी ग्रंथीत बिघाड उत्पन्न होत असतो. उदा. अनुवंशीकतेने होणारा डायबेटीस अथवा हायपोथायरॉईडीझमचे काही प्रकार.

    हार्मोन्स कोणती कार्य करतात?
    शरीरातील अनेक क्रियांशी हार्मोन्सचा संबंध असतो. मुख्यत: विचार केल्यास शरीराची योग्य वाढ करणे, हाडांची वाढ करणे, उंची वाढण्याची प्रक्रिया, शरीरातील विविध चयापचय क्रिया नियंत्रित करणे, स्त्री पुरुषातील जननेंद्रियांची वाढ, लैंगिक अवयवांची योग्य वाढ करणे, स्त्री बीज उत्पत्ती क्रिया, शुक्रजंतूची उत्पत्ती वयात येताना होणाऱ्या बदलांचे नियंत्रण, स्तनांची वाढ, स्त्रीयांमध्ये मासिक पाळींची नियमितता, गर्भधारणा, गर्भाची वाढ, स्तनामधील दुधाची निर्मिती, या गोष्टींचे नियंत्रण, रक्‍तदाबाचे नियंत्रण करणे, शरीरातील जादा चरबीचे नियमन करणे, हृदयक्रिया श्‍वासोच्छवासाचे नियंत्रण, किडनीचे कार्य, यांचेही नियंत्रण हार्मोन्स करता.

    थायरॉईड ग्रंथीच्या हार्मोन्समुळे ऊर्जानिर्मिती, कोलेस्टोरेलचे नियंत्रण, किडनीचे लघवी उत्पन्न करण्याचे कार्य वाढवणे, स्नायूंची कार्यक्षमता, उत्साह, चपळपणा, शरीरराची वाढ ही कार्ये होत असतात.

    स्वादुपिंडामधील इन्श्‍युलीन हार्मोनमुळे रक्‍तातील साखरेचे नियंत्रण होत असते. पॅराथायराईड हार्मोन मुख्यत: कॅल्शियमचे नियंत्रण करतो. भुकेची निर्मिती, पचनक्रिया, आतड्यांची हालचाल मलमूत्रांचे उत्सर्जन, हृदयाची गती, रक्‍तभिसरण, प्रोस्टेट ग्रंथी वाढ अशा अनेक क्रिया सुरळीत होण्यासाठी अथवा नियंत्रणासाठी हार्मोन्सचे संतुलीन कार्याची आवश्‍यकता असते.

    संजीव वेलणकर पुणे
    9422301733
    संदर्भ.इंटरनेट

  • किचन क्लिनीक – फणस

    किचन क्लिनीक – फणस

    फणसा सारखा बाहेरून कडक आणी आतून अगदी नरम अशी म्हण प्रचलित आहे.असा हा सर्वांचा आवडता फणस ज्याला कोकणचा मेवा देखील म्हणतात.

    ह्याचे कापा,बरंका किंवा रसाळ आणी भाजीचा असे तीन प्रकार असतात.साधारण पणे उन्हाळ्यात पिकणारे हे फळ तसे सर्वांच्याच आवडीचे नाही का?

    फणसपोळी,फणसाचे चिप्स,गुळ खोबरे तांदूळ व गरे घालून केली जाणारी गोड सांजण,गोव्यात मिळणारा कच्चा फणस ज्याला कुवला म्हणतात त्याचे केले जाणारे चटणी वजा भाजी ज्याला आम्ही सपशेल म्हणतो,किंवा मग नुसतेच गरे काढुन खा ना त्यात हि एक आगळी वेगळी मजा आहे.

    ह्याचा ५०-१०० फूट उंच वृक्ष असतो व ह्याच्या खोडालाच हे फणस लागतात जे १-३ फूट लांब व ५-२५ किलो वजन भरणारे देखील असतात.फणस बाहेरून हिरवा बारीक उंचवटे युक्त व आत पिवळ्या रंगाचे मऊ गरे व त्यात आठळया असलेला असतो.

    कच्चा फणस हा तुरट गोड,थंड व कफवातवर्धक व पित्तनाशक असतो.तर पिकलेला फणस हा चवीला गोड,थंड व कफकर व वातपित्तनाशक असतो.

    चला आता ह्याचे घरगुती उपयोग पाहू:

    १)फणसाचे दुध हे गाठी व सूज कमी करते व जखम भरायला मदत करते.

    २)अशक्तपणा,वजन कमी होणे अशा तक्रारींवर २ फणसाचे गरे,१/४ चमचा मिरीपूड ,१/४ चमचा सैंधव हे मिश्रण जेवणानंतर खावे.पण भुक लागत नसल्यास हा प्रयोग करू नये.

    ३)तोंड कडू होणे,कोरडे पडणे,पोटात गरम वाटणे,अशा तक्रारींवर फणसाचे १-२ गरे भरल्या पोटावर खावे.

    ४)बरंका अर्थात रसाळ फणसाचे गरे वाटून गरम करून हे मिश्रण पिकत येणाऱ्या गळूवर बांधावे म्हणजे गळू पिकून फुटेल.

    ५)शरीरावर झालेली जखम भरून येण्यासाठी रसाळ फणसाचा गर वाटून जखमेवर बांधावा म्हणजे रक्तस्राव थांबतो व जखम देखील लवकर भरते.

    फणस खायचा अतिरेक केल्यास जुलाब,सर्दी,कृमी,खोकला होतो.

    फणसाच्या अतिखाल्ल्याने होणाऱ्या अजीर्णावर खोबरे खावे.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • अमेरिकेतील वन्यप्राणी जीवन – भाग ५

    शिकारीचा सीझन आला की शिकार्‍यांच्या अंगात संचारतं. जवळ जवळ प्रत्येक घरी बंदुक ही असायचीच. मग तिची घासून पुसून साफसफाई करणं, काडतुसांची जमवाजमव करणं, शिकारीचं लायसन्स नव्याने करून घेणं, वगैरे गोष्टींची नुसती धांदल उडते. इथे बंदुका तर काय वॉलमार्टमधे देखील मिळतात. त्यामुळे कोणत्या प्रकारची बंदुक, कोणती काडतुसं, त्यांचा पल्ला, वगैरे गोष्टींची चर्चा कानावर यायला लागते. काही ठिकाणी तर हरणांच्या शिकारीच्या सीझनच्या पहिल्या दिवशी सुट्टी असते. लोक आपल्या मित्र मंडळींबरोबर एखादी मॅच खेळायला जावं, तशा उत्साहाने आपापल्या पिक-अप ट्रकमधे बसून शिकारीला निघतात. जंगलाच्या रंगसंगतीशी मिळत्या जुळत्या (camouflage) कपड्यांबरोबरच, शेंदरी रंगाची टोपी, गळ्यातला रुमाल किंवा जॅकेट घालणे बंधनकारक असते. कारण हा रंग चटकन नजरेत भरणारा. त्यामुळे करड्या, मातकट रंगाच्या रानाच्या पार्श्वभूमीवर, त्याच रंगाचे कपडे घालून शिकार करणारे ५०-१०० शिकारी आसमंतात फिरत असले, तर इतर शिकारी चटकन नजरेत भरावेत म्हणून ही काळजी. तरी देखील काही लोकं शिकारीच्या अपघातात जखमी होणं किंवा मृत्युमुखी पडणं ही दर वर्षी घडणारी गोष्ट. हरणांच्या शिकारीचा सीझन ऐन हिवाळ्यातला. गरम कपड्यात स्वत:ला लपेटून घेऊन, हाडं गोठवणार्‍या थंडीमधे, सुकलेल्या वाळलेल्या गवतातून आणि निष्पर्ण झाडांच्या जंगलातून हरणांचा माग काढत फिरण्याचा या लोकांचा उत्साह बघण्यासारखा असतो. त्यातून बर्फ पडलेलं असलं तर अधिक चांगलं, कारण बर्फावर उमटलेल्या हरणांच्या पाऊल खुणांवरून त्यांचा माग काढणं सोपं जातं.

    आमच्या ऑफिसमधले बरेचजणं वेगवेगळ्या प्राण्यांच्या शिकारीचे शौकीन. त्यातही डॉक्टर पॉल म्हणजे खाण्यातलादेखिल दर्दी माणूस. दर सीझनमधे हरणांची शिकार करून, मारलेल्या हरणांना घरी घेऊन यायचं, गराजच्या दारामध्ये मोठा लोखंडी हुक लावून, त्याला एकेक हरिणाचं धूड टांगून ते सोलायचं, मांसाचे तुकडे करुन ते वाळवायचे वगैरे कामं तो मोठया आवडीने करतो. हरणांच्या वाळवलेल्या व खारवलेल्या मांसाच्या छोट्या छोट्या तुकड्यांनी भरलेल्या प्लॅस्टीकच्या बॅगा तो आपल्या घरच्या फ्रीझर मध्ये ठेवून देतो. इथे मिळणार्‍या beef jerkey सारखी ही deer jerkey. त्यामुळे, त्याच्याबरोबर, ऑफिसच्या कामानिमीत्ताने field wokला जायचे झाले की तो ही deer jerkey घेऊन येणारच आणि गाडीतल्या सगळ्यांना खायला घालणार.

    एल्क म्हणजे हरणांची एक मोठी जात. नर खांद्यापाशी दीड मिटर उंच तर लांबीला अडीच मिटर लांब व साधारणपणे ३०० किलो वजनाचे असतात. माद्या आकाराने थोड्या लहान आणि वजनाला साधारण २२५ किलो भरतात. फक्त नरांनाच शिंग असतात आणि ती चांगली ४ फूट लांब आणि वजनाला १८ किलो एवढी जड असतात. दर वर्षी स्प्रिंग सीझनमधे नरांना नवीन शिंग फुटायला लागतात. फॉल सीझन संपता संपता यांची माजावर येण्याची वेळ येते. त्यावेळेस या मोठ्या ऐटदार शिंगांचा उपयोग इतर नरांना आव्हान देण्यासाठी तसेच झुंजीसाठी होतो. ब्रीडींग सीझन संपला की नरांची शिंगे गळून पडतात आणि ते पुनश्च एकेकटे फिरू लागतात तर माद्या कळप करून रहातात. माद्यांच्या या कळपात साधारणपणे ५० पर्यंत माद्या असतात. लांडगे आणि कायोटीचे कळप किंवा एकांडा माउंटन लायन हे यांचे प्रमुख शत्रू. कधी कधी काळी अस्वलं देखील एल्कच्या पिल्लांना मारून टाकतात. माद्यांचे कळप आपल्या कळपातल्या वासरांचं संरक्षण करण्यासाठी जिवाचा आटापिटा करतात. एल्क हे सर्वसाधारणपणे जंगलात किंवा जंगलाच्या कडेवर गवत झाडपाला, झाडांच्या बुंध्यांच्या साली वगैरे खाऊन रहातात. आज एल्कची संख्या १० लाखांच्या आसपास आहे.

    हरणाच्या जातीचा आणखी एक मोठा प्राणी म्हणजे मूस. हे कॅनडा, अलास्का, न्यू इंग्लंड, अपस्टेट न्यूयॉर्क, मिनेसोटा, मिशीगनच्या उत्तरेकडचा भाग, रॉकी पर्वतराजीच्या उत्तरेकडच्या राज्यांमधला भाग, अशा उत्तरेकडच्या थंड प्रदेशात आढळतात. नर जवळ जवळ ६ फूट उंच आणि ४०० ते ५०० किलो वजनाचे असतात. तर माद्या साधारणपणे ३००-३५० किलो वजनाच्या असतात. मूसची शिंगं पंजासारखी पसरट असतात. सप्टेंबर ऑक्टोबरमधे यांचा माजावर येण्याचा काळ असतो. या काळात मुस आक्रमक बनतात आणि माणसांवर देखील हल्ले चढवतात. ब्रीडींग सीझन संपल्यावर नरांची शिंग गळून पडतात आणि स्प्रिंग सीझन सुरू झाला की पुन्हा उगवायला लागतात. शिंगांची वाढ फार झपाट्याने होते आणि तीन चार महिन्यातच शिंगे चांगली ४-५ फूट येवढी पसरतात. मूस सहसा एकटेच असतात. बछड्याचा जन्म झाला की ते मादी समवेत असते. पुढच्या बछड्याच्या जन्मापर्यंत मादी आपल्या आधीच्या बछड्याची काळजी घेत असते. उत्तरेकडच्या या राज्यांमधे, आपलं मोठ्ठं बेंगरुळ शरीर, लांबोडक्या काटकुळ्या पायांवर सांभाळत, रस्ते ओलांडण्याचा प्रयत्न करणार्‍या मूस मुळे गाड्यांचे होणारे अपघात, ही एक मोठीच डोकेदुखी आहे.

    क्रमशः ....

    -- डॉ. संजीव चौबळ

  • नोटा – बदली’ नंतरचे ‘राज’ बदल ?

    ८ नोव्हेंबर २०१६ च्या नोटा - बदलिच्या निर्णयाने मोदी सरकार ने धमाका उडवून दिला. कोणी त्याचे समर्थन करो , कोणी विरोध करो ; पण कोणीही दुर्लक्ष करूच शकणार नाही . " अशाच स्वरूपाचा तो निर्णय आहे . या निर्णयांच्या अंमलबजावणीमुळे अक्षरशः सर्वांनाच या ना त्या प्रकारे स्वतःच्या आर्थिक व्यवहारांचा पुनर्विचार करावा लागत आहे . एक प्रकारे या निर्णयांचा पाठपुरावा हा प्रतिष्ठेचा प्रश्न बनत आहे . . . . सरकारच्या समर्थकांसाठी आणि विरोधकांसाठीही .

    तेंव्हापासून माझ्या मनात असे येत आहे कि ही कदाचित केवळ सुरुवात आहे. अगदी आर्थिक क्षेत्रापुरता विचार करायचा झाला तर वस्तू आणि सेवाकर ( GST ) ची अंमलबजावणी उशिरात उशीरा ऑगस्ट - सप्टेंबर २०१७ च्या सुमारास होणे, आर्थिक वर्ष सध्याच्या एप्रिल ते मार्चच्या ऐवजीजानेवारी ते डिसेंबर करण्याची घोषणा होणे , वैयक्तिक आणि संस्थात्मक आयकरात दर आणि करपात्र उत्पनाच्या पातळ्यांमधे बदल होणे , जास्तीतजास्त आर्थिक व्यवहार बन्कान्मार्फतच करण्याची सक्ती होणे , बन्कान्मार्फत होणारे व्यवहार हा काही प्रमाणात तरी कर - रचनेचा पाया होणे आणियावर्षी अर्थसंकल्प जरी १ फेब्रुवारी २०१७ ला सादर होणार असलातरी नंतरच्या काळात तो नोव्हेंबर - डिसेंबर मधेच सादर होणे असे बदल होण्याचीशक्यता जरासुद्धा नाकारता येत नाही .

    अर्थातच असे बदल फक्त आर्थिक क्षेत्रातच होतील असे मला आधीही वाटत नव्हते . आणि भारतीय लष्कराच्या सर - सेनापतीची नेमणूक करताना दोनआधिकार्यान्ची वरिष्ठता डावलली गेली हे पाहिल्यावर तर जास्तच तसे वाटू लागले आहे . पण त्याचवेळी हेही लक्षात घेतले पाहीजे कि त्याच आठवड्यातसर्वोच्च न्यायालयाच्या सर - न्यायाधीशान्ची निवड करताना अशी वरिष्ठता डावलली गेलेली नाही . त्यात संबंधित न्यायाधीशनी काही अवघड निर्णयघेतले असले तरी सुद्धा !

    त्यातच या दोन ( सरसेनापती आणि सरन्यायाधीश ) नेमणुका होत असतानाच त्याच काळात भारतीय युवा मोर्चाच्या अध्यक्ष - पदी खासदारपूनमताई महाजन यांची नेमणूक , निवड होणे हे मोठे सूचक आहे . राजकीय क्षेत्रातही उलथापालथ होणार अशा अर्थाने ही नेमणूक सूचक आहे . महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास मंत्री नामदार पंकजाताई मुनढे यांचे पंख येणाऱ्या काळात छाटले जातील असा तर या नेमणुकीतुन दिला जाणारा संकेततर नाही ना हे बघणे महत्वाचे ठरू शकेल . तसे नंतर करायचे असेल तर मुनढे - महाजन गटाच्या मंडळी कडून होऊ शकणार्या संभाव्य विरोधाची धारकमी करण्यासाठी मदत म्हणून तर ही नेमणूक आधीच केली गेली नाहीये ना हे तर येणारा काळच ठरवेल .

    राजकीय क्षेत्रात होऊ शकणारा एक संभाव्य बदल म्हणजे २०१७ - १८ सालासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत संमत झाल्यानंतर केंद्रीय मंत्री -मंडळात होऊ शकणारे बदल . असे बदल होतील असे जर ग्रुहित धरले तर त्यापैकी एक बदल असा असू शकतो कि विद्यमान केंद्रीय अर्थमंत्री मा . श्री. अरुण जेटली यांची अर्थखात्यातून बदली . अशी बदली जर झालीच तर जेटली ग्रुह , संरक्षण किंवा परराष्ट्र - व्यवहार यांपैकी कोणत्या खात्याचे तेमंत्री बनतील हे बघणे उदबोधक ठरेल .

    कारण अरुण जेटली हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत विश्वासातले मंत्री आहेत . २०१४ च्या मोदी लाटेत अम्रुतसर सारख्या लोकसभा मतदार -संघातून निवडणूक हरूनही ते अर्थसारख्या महत्वाच्या खात्याचे मंत्री आहेत . सुरवातीस तर अर्थखात्याबरोबरच संरक्षण खात्यासारख्या दुसऱ्याअतिशय महत्वाच्या खात्याचा कार्यभार त्यांच्याकडे होता .

    त्यामुळे अरुण जेटली यांची अर्थखात्यातून बदली झालीच तरी ती परराष्ट्र - व्यवहार , संरक्षण किंवा ग्रुह अशा अतिशय मान्यवर आणि महत्वाच्या खात्यातच होण्याची शक्यता आहे . विद्यमान परराष्ट्रमंत्री मा . सुषमाजी स्वराज यांची नुकतीच एक मोठी सर्जरी झाली आहे . त्यामुळ मा . श्री . अरुण जेटली हे जर अशा संभाव्य फेरबदलात परराष्ट्रमंत्री झालेच तर सुषमाजी लोकसभा सभापती होण्याची शक्यता आहे . भाजपाचे ज्येष्ठ नेते मा . श्री .लालकृष्ण अडवाणीजी यानी अलीकडेच संसद न चालल्याबद्दल केलेल्या निषेधाची दखल घेतल्याचा संकेत त्यातून दिला जाऊ शकतो . सुषमाजी तशाही अडवाणी गटाच्या मानकरी असल्याची चर्चा माध्यमात होत असते हे लक्षात घेता तोही भाग असेल . निदान असू शकतो . तसे झाल्यास लोकसभेच्या सध्याच्या सभापती मा . सुमित्राताई महाजन यांचा समावेश एकतर केंद्रीय मंत्रीमंडळात होऊ शकतो ( अटलजीन्च्या मंत्रीमंडळात त्यामंत्री होत्याच . ) किंवा एखाद्या मोठ्या राज्याच्या राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ति होऊ शकते .

    अशा संभाव्य फेरबदलात जेटली साहेब परराष्ट्रमंत्री होण्यास एकच अडचण वाटते आणि ती म्हणजे स्वतः पंतप्रधान मा . श्री . नरेंद्र मोदी यांचे स्वतचेया खात्यात इतके सातत्यपूर्न लक्ष असते कि जेटली साहेबांसारखा त्यांचा अत्यंत विश्वासू मंत्री ते या खात्यास देतील का ? मात्र खरंच तसेच झाल्यास सध्या एम. जे . अकबर आणि व्ही . के . सिंग असे दोन मातब्बर राज्यमंत्री परराष्ट्र खात्यात आहेत . त्यातल्या अगदीच दोघांचीही या खात्यातून जरीबदली झाली नाही तरी निदान एकाची तरी होईल अशी शक्यता आहे .

    जर अशा संभाव्य फेरबदलात जेटली साहेब परराष्ट्रमंत्री झाले नाहीत तर दुसरी शक्यता म्हणजे ते केंद्रीय ग्रुहमन्त्रि होतील . मात्र ते उत्तर प्रदेशच्याविधान - सभा निवडणुकात काय निकाल लागतो यांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असेल . उत्तर प्रदेशात भाजपाचे राज्य त्या निवडणुकात आल्यासमा . श्री . राजनाथसिंगजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यास ही शक्यता जास्त आहे .

    मा . श्री . अरुण जेटली अशा संभाव्य फेरबदलात जर ग्रुह किंवा परराष्ट्रमंत्री न झाल्यास संरक्षणमंत्री होण्याचीही शक्यता आहे . सध्याचे संरक्षणमंत्री मा. श्री . मनोहर पर्रिकर यांची कार्यक्षमता , निस्प्रुहता , निरलसता , बुद्धीमत्ता या कशाचाच प्रश्ण नाही . पण एका विशिष्ट वयाननन्तर सार्वजनिक पदीन राहण्याचा त्यांचा स्वतचाच स्वयंघोषीत निर्णय आणि काही कालापूर्वीच्या त्यांच्या एका मुलाखतीत त्यांनी " संरक्षण खात्यात स्थिरावलो आहे , पणदिल्लीत नाही " हे उत्तर यावरून ही शक्यता वाटते .

    मा . सुषमाजी स्वराज यांच्या बाबत वाटणारी अजून एक शक्यता म्हणजे विद्यमान राष्ट्रपति मा .श्री . प्रणबकुमार मुखर्जी यांची राष्ट्रपतिपदाचा कार्यकालसंपल्यावर त्या पदासाठी होणाऱ्या निवडणुकीत सुषमाजी भाजपाच्या उमेदवार असू शकतात . ज्येष्ठतेच्या निकषांवर मा . श्री . लालकृष्ण अडवाणी हेत्यासाठीचे उमेदवार असायला हवे . पण सद्यस्थितीत ती शक्यता कमी वाटते . याची खात्री पटल्यामुळे तर खासदारकी सोडण्यास असल्याची चिडचिडत्यांच्याकडून व्यक्त झाली असेल का ? मा . श्री . शरद पवार हे राष्ट्रपति पदाचे उमेदवार असण्याची शक्यता त्यांच्या समर्थकांना वाटत असली ,मोदीसाहेब अधूनमधून पवार साहेबान्बद्दल कौतुकास्पद उदगार काढत असले , महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा . श्री . देवेंद्र फडणवीस यांनी जरी आत्ताच्यास्थानिक संस्थाच्या निवडणुकात नाव घेऊन टीका केली नसली तरी शरद पवार साहेबांच्या राष्ट्रपति पदासाठीच्या उमेदवारीला मोदी साहेबांचा भाजपपाठिंबा देण्याची शक्यता आजमितिला तरी फार कमी वाटते . पण भाजपाने पुरस्कृत केले नाही तरी जर पवार साहेब राष्ट्रपति पदासाठी उभे राहिले तरशिवसेना काय भूमिका त्यावेळी घेते हे बघणे महत्वाचे ठरेल . मा . प्रतिभाताई पाटील यांना मराठी महिला या मुद्द्यावर दिलेल्या पाठिंब्याच्या जरपुनरावृत्ति झाली तर त्यावेळी भाजप - शिवसेना यांचे परस्पर - संबध हा विषय त्यावेळी पुन्हा एकदा ऐरणीवर येऊ शकतो .

    अरुण जेटली साहेब यांची जर अर्थखात्यातून बदली झालीच तर नवीन अर्थमंत्री कोण असेल ? राज्यसभा tv ला त्यांनी नोटाबंदीच्या संदर्भात दिलेल्यामुलाखतीनंतर डॉ . नरेंद्र जाधव यांच्या नावाची त्या पदासाठी काहीजण चर्चा करत आहेत . पण पंतप्रधानांची कार्यपद्धती लक्षात घेता ती शक्यता फारकमी वाटते . मा . श्री . पीयूष गोयल भाजपाचे राष्ट्रीय खजिनदार असूनही , मोदी साहेबांचे जुने निकटवर्ती असूनही पीयूष गोयल एकदम पूर्ण कॅबिनेटमंत्री झाले नव्हते हे इथे आवर्जून लक्षात घ्यावे लागेल . सध्याचे रेलवे मंत्री सुरेश प्रभू यांची शक्यता तुलनेने जास्त वाटते . पण माझा अंदाज असाआहे कि जर खरोखरच नवीन व्यक्ति केंद्रीय अर्थमंत्री बनन्याची संधी असेलच तर ती व्यक्ति पीयूष गोयल असेल . त्यांची मोदी सरकार मधलीआजपर्यंतची कामगिरी , त्यांची शैक्षणिक पात्रता , नोबेल पारितोषिक विजेत्या अर्थतज्ज्ञला खडे बोल सुनावन्याचे त्यांनी दाखवलेले धाडस या गोष्टीइतकेच याबाबत महत्वाचे ठरू शकेल असा घटक म्हणजे मा . नरेंद्र मोदी यांची त्यांनी गेली अनेक वर्ष केलेली पाठराखण . याबाबत मा . अरुणजेटली आणि पीयूष गोयल यांच्यत असणारे साम्य म्हणजे नरेंद्र मोदी हे अश्वमेध विजेते योद्धे आहेत हे त्यांनी फार पहिल्यापासूनच ओळखले . गोवाअधिवेशनात मोदिन्च्या नावाची अधिक्रुत घोषणा ही फार फार नंतरची बाब आहे . जेटली - गोयल यांनी त्याच्या कितीतरी आधीपासून मोदी साहेबांनासक्रिय पाठिंबा दिला आहे . याबाबत मा . निर्मलाजी सीतारामन आणि मा . श्री . जयंत सिन्हा यांची नावेही चर्चेत येऊ शकतात . पण या सगळ्यांतमा . श्री . पीयूष गोयल यांचे पारडे अरुण जेटली साहेबांची जागा घेण्यास मला जड वाटते .

    जर कदाचित खरोखरच श्री . पीयूष गोयल हे केंद्रीय अर्थमंत्री झालेच तर आजमितिला त्यांच्याकडे असणारा " एकत्रित " उर्जा खात्याचा कारभार मा .श्री . जयंत सिन्हा यांच्याकडे जाऊ शकतो . श्री . जयंत सिन्हा यांची अर्थखात्याचे राज्यमंत्री म्हणून असणारी अत्यंत वाखाणणयाजोगी असणारीकामगिरी आणि आजपर्यंत नोटा - बदलीच्या निर्णयाबाबत केंद्र सरकारची बाजू जर सर्वात जास्त प्रभावीपणे जर कोणी मांडली असेल तर ती श्री जयंतसिन्हा यांनी हे दोन घटक याबाबत नक्कीच त्यांच्या बाजूने उभे राहतील . पण जर यदाकदाचित या खात्याचे मंत्री म्हणून जर जयंत सिन्हा यांना संधीमिळाली नाही तर ती संधी मा . निर्मलाजी सीतारामन यांना मिळेल असा माझा अंदाज आहे .

    अजून एक ओझरता , पुसटसा विचार किंवा शक्यता . . . अगदीच लगेचच होईलच असेही नाही . . . पण मला वाटणारी शक्यता म्हणजे आपल्यामहाराष्ट्राचे आपले मुख्यमंत्री मा . श्री . देवेंद्र फडणवीस यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश . शब्द समावेश असा आहे . वर्णी असा नाही . त्यामुळेजेंव्हा केंव्हा असा बदल होईल तेंव्हा मा . श्री . देवेंद्रजी फडणवीस यांना केंद्रात चांगलेच खाते मिळेल . आणि जर खरोखरच देवेन्द्रजी केंद्रीय मंत्री झालेतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद मा . श्री . प्रकाशजी जावडेकर किंवा मा . श्री . चंद्रकांतदादा पाटील यांना मिळू शकेल .

    अर्थातच हे सगळे अंदाज आहेत . पंतप्रधान मा . श्री . नरेंद्र मोदी यांची खासियतच मुळी सर्वांचे अंदाज ( चांगल्या अर्थाने )'चुकवन्याची आहे .

    (ही माझी वैयक्तिक मते आहेत . )

    -- चंद्रशेखर टिळक
    C - 402 . राज पार्क
    मढवि बंगल्या जवळ .
    राजाजी पथ .
    डोम्बिवलि ( पूर्व ) .
    पिन . . . ४२१२०१ .
    मोबाईल . . . . ९८२०२९२३७६ .
    E-Mail : tilakc@nsdl.co.in

  • याला जीवन ऐसे नाव भाग १४

    न पिबेत् पंक शैवालतृणपर्णाविलास्तृतम् ।
    सूर्येन्दुपवनादृष्टमभिवृष्टं घनं गुरू ।।
    फेनिलं जन्तुमत्तप्तं दन्तग्राह्यतिशैत्यतः ।

    वाग्भट सूत्रस्थान 5-5/6 भाग दोन

    सूर्य, इंदु म्हणजे चंद्र आणि पवन म्हणजे वारा यांची दृष्टी न पडलेल्या पाण्याची घनता वाढल्यामुळे असे पाणी पचायला जड होते. तसेच अशा पाण्यामध्ये, दुसऱ्या पदार्थात चिकटपणा निर्माण करण्याची क्षमता अधिक वाढते.

    शास्त्रकारांनी मूळ सिद्धांत त्या काळी सांगून ठेवला. तोच सिद्धांत आजच्या काळात वापरायचा झाल्यास प्रत्येक शब्दाची उकल करणे आवश्यक आहे.

    पावसाची वृष्टी होत असताना, अंतरीक्षातून जमिनीवर येणाऱ्या पाण्याला, जलाशयात पोहोचेपर्यंत, सूर्याचे किरण स्पर्श करीत नाहीत, अथवा त्या पाण्याला चंद्रप्रकाश लागत नाही, किंवा या पाण्यावरून वारा कधी वाहिलेला नाही. अश्या घनदाट, निबिड काळोख्या जंगलाच्या ठिकाणी असलेले पाणी अस्वस्थ करणारे असते.

    साहित्यिक भाषेत सांगायचे झाल्यास , असे घनदाट जंगल, ज्यात सूर्य म्हणजे काय हे फक्त वरच्या कोवळ्या पालवीलाच माहिती असते. अशा तेजस्वी सूर्याचे वर्णन जेव्हा खालील फांद्यांना समजते तेव्हा, त्या देखील सूर्याचे दर्शन घ्यायला वरवर येऊ लागतात, पण त्यांना वर यायला जागाच नसल्याने जमिनीवर मात्र किरणाचा एखादा कवडसाही पडत नाही. सुर्याला जर खाली पोचता येत नसेल तर, चंद्राची काय बात ? ती सतत चंद्र सूर्यासाठी आसूसलेलीच रहाते.
    चंद्रमा म्हणतो, हे सूर्या, तू नसण्यामुळे रात्र तर माझीच असते, पण दिवसाही तुझे अस्तित्वच न कळल्यामुळे, जमिनीवर फक्त काळोखाचेच साम्राज्य असते. त्या बिचाऱ्या जमिनीला तर दिवस म्हणजे काय हे सुद्धा माहित नाही.

    ती जमिन म्हणते, माझी मीच सतत एकटी असते. मग दिवस काय आणि रात्र काय मला सगळं सारखंच ! तुम्हीच काय, वारादेखील माझ्याबरोबर येत नाही. ......
    मै और मेरी तनहाई, दुसरा और कोई नही ।
    किती अस्वस्थता ही !
    एखाद्या विरहणीची ही आर्तताच, शास्त्रकारानी जणुकाही जलबद्ध केली आहे.

    असो !

    आजच्या भाषेत, सूर्य, चंद्र आणि वारा यांनी न बघितलेलं पाणी म्हणजे एअरटाईट विदाऊट सनलाईट इन कोल्ड प्लेस

    हीच जंगली अवस्था आजच्या काळात, आपल्या घरातील फ्रिजमध्ये असते काहो, उद्यापर्यत विचार करा !

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    21.12.2016

  • किचन क्लिनीक – अननस

    किचन क्लिनीक – अननस

    अननस हे फळ आपल्या सर्वांच्याच आवडीचे.हे एवढे रूचकर लागते कि खायचा मोह आवरत नाही. ह्या पासून आपण सरबत,मुरंबा,जॅम,पाक,रायते,ज्युस आणी गोव्यात प्रत्येक मेजवानीत हल्ली हमखास अननसाचे सासव केलेच जाते.आणी हे सगळेच पदार्थ भयकंर चविष्ट लागतात ह्यात वादच नाही.

    ह्या अननसाचे रोप जमीनी लगत वाढते व ह्याच्या भक्कम बुंध्यास काटेरी पाने फुटतात आणी त्याच्या मधोमध हे फळ उगवते.लहान व कच्चे असताना हे फळ लालसर असते तर पिकल्यावर ते पिवळे होते.फळाच्या डोक्यावर मुकुट शोभावा अशी पाने असतात.

    हे पिकलेले असताना गोड व कच्चे असताना आंबट असते.हे थंड असल्याने वात व पित्त शामक आहे.

    आता आपण ह्याचे घरगुती उपचार पाहूयात:

    १)ज्या स्त्रियांना मासिक पाळी नियमीत येत नाही त्यांनी कच्च्या अननसाचा रस मासिक पाळी येण्याच्या तारखे पुर्वी १/२-१ कप रोज प्यावा.

    २)१ ग्लास अननसाचा रस+१चमचा साखर हे मिश्रण जेवणापुर्वी घ्यावे लघ्वीची जळजळ,लघ्वी कमी होणे,लघ्वीला उग्रवास येणे कमी होते.

    ३)अजीर्ण,उल्ट्या,जुलाब ह्यात उपवास करावा व अननसाचा रस+काळी मिरी+साखर हे मिश्रण थोडे थोडे प्यावे.

    ४)गजकर्ण,खरूज,ह्यात येणारी खाज कमी करायला अननसाचा रस लावावा.

    ५)पोटफुगणे,भुकमंदावणे,नियमीत संडासला न होणे ह्यात जेवणासह अननसांची फोड चावून खावी.

    अननस खायचा अतिरेक केल्यास अम्लपित्त व जुलाब होतात.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • सामाजिक अर्थकारण आणि आर्थिक समाजकारण

    सुरवातीलाच मला काही गोष्टी स्पष्ट करू देत . त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे या लेखात व्यक्त झालेली सर्वच मते ही माझी वैयक्तिक मते आहेत.

    दूसरी गोष्ट म्हणजे मी भारतीय जनता पक्षाचा मतदार होतो , मतदार आहे आणि मरेपर्यन्त मी त्या आणि फक्त त्याच पक्षाचा मतदार राहीन.
    कारण तुमच्या - माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस निवडणुकीत मतदान करताना प्रश्न निवडत नसतो तर आपल्या वतीने तत्कालीन प्रश्नांवर उत्तरे कोण शोधेल हे निवडत असतो . ( कारण परिस्थितिने आपल्यावर प्रश्न लादलेलेच असतात . ते निवडण्याची आपल्याला मुभाच नसते . )

    तिसरी गोष्ट म्हणजे आणि तरीही या विषयाकडे आपण सगळ्यांनीच आपली स्वतःची राजकीय रंगसंगती आणि सामाजिक बांधिलकी सोडून पाहाणयाची नितांत आवश्यकता आहे . केवळ हाच नव्हे तर एकंदरीतच सर्वच आर्थिक विषय तसेच बघण्याजोगे असतात . कारण जेंव्हा आपण आपल्या दैनंदिन जीवनात बाजारात कोणतीही वस्तू विकत आणायला जातो , तेंव्हा त्या वस्तूचा विक्रेता सर्वात आधी आपण कोणत्या पक्षाचे मतदार आहोत हे विचारत नाही . तसेच एकाच वेळेला एकाच वस्तूचे वेगवेगळ्या पक्षाच्या मतदारांना वेगवेगळे भाव सांगत नाही . निदान अजून तरी तसे जाहीरपणे तरी आपल्या देशात होत नाही . याचाच अर्थ असा की अजूनतरी अर्थकारण हे राजकारणाच्या " पल्याड " शिल्लक आहे .

    हो . मी " निश्चलिकरण " ( आपल्या सोप्या मराठी मधे सांगायचे तर DEMONITISATION ) या सध्याच्या बहुचर्चित विषया बाबत लिहीत आहे . ८ नोव्हेंबर २०१६ च्या रात्री हा निर्णय जाहीर झाल्यापासून या विषयाची चर्चा जोरात सुरू आहे . आणि तशी ती होणे साहजिकच आहे . कारण आपल्या देशातील यच्ययावत एकूण एक नागरिकांवर त्याचा परिणाम झाला आहे . समर्थकांचा आभिनिवेश आणि विरोधकांचा प्रति - आभिनिवेश यात हा मूळ विषयच वाहून जात आहे . संसदेचे हिवाळी अधिवेशन वाहून गेले तसे . आणि म्हणून जरा सगळेच राजकारण बाजूस ठेवण्याची मी आपणां सर्वांना विनंती केली .

    DEMONETISATION चा असा विचार करत असताना मुळात ही संकल्पना नीट समजून घेणे आवश्यक आहे . कारण ही " नोटाबंदी " नाही . ही " नोटाकोंडी " नाही . हा " आर्थिक सर्जिकल स्ट्राइक " नाहीँ . असलीच तर , ही फार फार तर " नोटाबदली " आहे . याचा विचार करत असताना मला एक गन्मतीचा विचार सुचत आहे . अलीकडेच करण जौहरचा " ऐ दिल है मुश्किल " हा सिनेमा प्रदर्शित झाला . ( बरोब्बर . . तोच सिनेमा . . जो पाकिस्तानी कलाकारांच्या सहभागामुळे वादग्रस्त झाला होता ). त्यात सिनेमाचा नायक रणबीर कपूर ची पहिली मैत्रीण अनुश्का शर्मा असते . ती त्याला सोडून गेल्यावर सिनेमात रणबीर ची ऐश्वर्या राय मैत्रीण होते . काही कारणाने ऐश्वर्या ही रणबीर ला सोडून जाते . ऐश्वर्याने रणबीरला सोडल्यावर अनुश्का शर्मा पुन्हा रणबीरची मैत्रीण होते असे त्या सिनेमात दाखवले आहे . त्या सिनेमाच्या कथानुकानुसार कालांतराने CANCER च्या दुखण्यात अनुश्का दगावते . आणि रणबीर जवळ कोणीच उरत नाही . पण आधी अनुश्का असते तेंव्हा ऐश्वर्या नसते . जेंव्हा ऐश्वर्या असते तेंव्हा अनुश्का नसते . जेंव्हा नंतर पुन्हा अनुश्का असते तेंव्हा ऐश्वर्या नसते . अगदी हेच म्हणजे DEMONOTISATION . ८ नोव्हेंबर २०१६ च्या रात्री पर्यंत आपल्या देशाच्या अर्थकारणात ५०० आणि १००० रुपयांच्या ज्या नोटा चलनात होत्या , त्यांची कायदेशीर मान्यता ८ नोव्हेंबर च्या मध्यरात्री पासून काढून घेण्यात आली . नंतर २००० रुपयांच्या नवीन नोटा चलनात आल्या . ('कोणाच्या हातात आल्या हा मुद्दा वेगळा ). त्यानंतर ५०० रुपयांच्या नवीन नोटा हळूहळू चलनात आणण्यात आल्या . यथावकाश त्याही सर्वसामान्य जनतेला मिळतील . कारण आता ५०० रुपयांच्या नोटांच्या छपाई कडे जास्तीत जास्त लक्ष पुरवण्यात येत असल्याचे वरिष्ठ सरकारी आधिकार्यानी अलीकडेच जाहीर केले आहे . ( म्हणजे आधी लक्ष कुठं होते असे माझ्यासारखे पामर कसे विचारणार ? ). १००० रुपयांच्या नवीन नोटा अजूनतरी चलनात आलेल्या नाहीत . त्या येणार का आणि आल्यातर केंव्हा येणार हे काही आजमितिलातरी ( हा लेख लिहीत असेपर्यंत तरी जाहीर झालेले नाही . ) पण अलीकडेच चलनात आणलेल्या २००० रुपयांच्या नोटा रद्द होणार अशी चर्चा SOCIAL MEDIA मधे सुरू झाली आहे . त्या व्रुत्ताचा ना स्वीकार सरकारी सुत्रानी आजपर्यंत केला आहे ; ना त्याचे खंडन त्यांनी आजपर्यंत केले आहे . पण २००० रुपयांच्या नोटा नजीकच्या भविष्यात तरी लगेचच रद्द होण्याची शक्यता बेताचीच वाटते . आता यातली कोणती नोट म्हणजे अनुश्का , कोणती नोट म्हणजे ऐश्वर्या आणि आपण नागरिक म्हणजे या सिनेमातील रणबीर की अजूनच कोणीतरी हे ज्याचे त्यानेच ठरवलेलं बरं ! हे सारे काही म्हणजे DEMONITISATION .

    या विषयाची चर्चा करताना अनेकजण ( मुद्दामून की नकळत कोण जाणे )'DEMONITISATION आणि DEVALUATION यांची सांगड घालत आहेत . या दोन शब्दांच्या स्पेलिंगची पहिली दोन आद्याक्षरे एक आहेत हे त्यातले पहिले साम्य .

    या दोन्ही गोष्टीचा संबंध देशाच्या चलनाशी असतो हे या दोन गोष्टीतले दुसरे साम्य .

    याबाबतचा निर्णय त्या त्या देशाचे सरकार जाणीवपूर्वक , काही विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून घेतात , घेत असतात हे या दोन गोष्टीतले तिसरे साम्य .

    या दोन्ही गोष्टींचा अल्पकालीन - मध्यमकालीन - दीर्घकालीन असा परिणाम असतो आणि अनेकदा तो वेगवेगळा किंवा परस्पर - विरोधी असू शकतो हे या दोन गोष्टीतले चौथे साम्य .

    DEMONITISATION आणि DEVALUATION या दोन्ही गोष्टींचे परिणाम आर्थिक - सामाजिक - राजकीय असले तरी हा निर्णय प्रामुख्याने राजकीय स्वरूपाचा असतो हे या दोन गोष्टीतले पाचवे साम्य .त्यामुळे १९७१ सालीच वानछू समितीने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी सरकारला असा सल्ला दिला होता , किंवा अर्थक्रान्ती चळवळ चालवणारया मंडळीनी त्यावेळी पंतप्रधान असणाऱ्या डॉ . मनमोहनसिंग यांना हाच सल्ला दिला होता ; पण त्या दोन्ही सरकारनी तो त्या - त्या वेळी अंमलात आणला नाही ; आता मात्र नरेंद्र मोदी सरकारने तो अंमलात आणला अशा मुद्द्यावर याबाबतची चर्चा रंगतदार झाली तरी त्याला फारसा काही अर्थ नसतो . कारण जे व्हायचे होंते ते तेंव्हाच होऊन गेले . आता त्याला फारसा अर्थ उरला नाही . कारण हा निर्णय त्या त्या नेत्याच्या त्या त्या वेळेच्या परिस्थितीचे मुल्यमापन काय आणि कसे आहे यावर जास्त अवलंबून असते . त्यात राजकीय वाचनाच्या किंवा राजकीय समजाँचा जास्त भाग आहे . त्याला राजकीय क्षमता किंवा राजकीय इच्छा - शक्तिच्या मोजपत्तीवर तपासून पाहाने फारसे योग्य ठरत नाही .
    अशी अनेक साम्यस्थळ जरी या दोन गोष्टीत असली तरी या DEMONITISATION आणि DEVALUATION या दोन गोष्टीत काही महत्वाचे फरकही आहेत . त्यामुळे यांची सांगड घालणे राजकीय द्रुष्टीने सोयीचे वाटले तरी या विषयावर ते अन्यायकारक ठरेल .

    या दोन गोष्टीतला सगळ्यात महत्वाचा फरक म्हणजे DEVALUATION हे आपल्या देशाच्या चलनाचे दुसऱ्या देशाच्या चलनाच्या तुलनेत काय असावे याबाबतचे मुल्यमापन आणि त्यानुसारचा निर्णय असतो . आपल्या देशाचे जागतिक व्यापारातील स्थान , आयात - निर्यातीचे स्वरूप आणि प्रमाण , आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि दबाव , परकीय चलनाचा उपलब्ध साठा , परकीय कर्ज आणि त्यावरील व्याजाचे प्रमाण अशा घटकांवर चलनाच्या अवमूल्यनाचा निर्णय अवलंबून असतो .

    निशच्लिकरण ( DEMONITISATION )"हा निर्णय मात्र प्रामुख्याने देशांतर्गत आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असतो . कारण अवमूल्यन हा निर्णय दोन वेगवेगळ्या देशांच्या दोन वेगवेगळ्या चलनान्च्या आप - आपसातील परिवर्तनिय दराशी संबंधित आहे ; तर निश्चलीकरण हे पूर्णपणे आणि फक्त त्या त्या देशाच्या चलनापुरेसे मर्यादित असते . त्याचा भर जागतिक व्यापारापेक्शा देशांतर्गत व्यवहारांवर जास्त असतो . आणि त्यामुळेच या निर्णयांची शहानिशा ताबडतोब सुरु होते . जशी आत्ता होत आहे .

    अशा पार्श्वभूमीवर ८ नोव्हेंबर २०१६ रोजी करण्यात आलेली घोषणा आणि त्याचे आजपर्यंत जाणवलेले परिणाम असा विचार करत असताना असे वाटते कि हा निर्णय अतिशय योग्य आहे . तो आणि तसा निर्णय घेण्याची वेळ ही अतिशय योग्यच आहे . मात्र या निर्णयांची अंमलबजावणी चिंताजनक आहे . झाले त्यापेक्षा कितीतरी चांगल्या प्रकारे याची अंमलबजावणी करता येणे नक्कीच शक्य होते . त्यातून मोदी सरकार निर्णय घेण्यास सक्षम आहे ; पण अंमलबजावणीत गडबड होते असा संकेत ( सिग्नल अशा अर्थाने ) गेल्यास " म्हातारी मेल्याचे दुःख नाही , पण काळ सोकावतो आहे " अशी गत होणे आपल्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेस परवडणारे नाही . अंमलबजावणीतील त्रुटीना आपण सारेच सामोरे गेलो आहोत आणि त्यामुळे त्याबाबत अजून काही लिहून जखमान्वरची नुकतीच धरू लागलेली खपली पुन्हा काढत नाही . त्याऐवजी या निर्णयांची योग्यता आणि त्याची वेळ याची चर्चा केली तर !

    देशांतर्गत अर्थव्यवस्थेत वाढणारी महागाई हे या निर्णयामागचे एक कारण आहे . गेल्या ५ वर्षात आपली राष्ट्रीय अर्थव्यवस्था ज्या वेगाने वाढली त्यापेक्षा कितीतरी जास्त वेगाने अर्थव्यवस्थेत चलनाचे प्रमाण वाढले . त्यातून Too much money chasing too little goods अशी परिस्थिती निर्माण झाली . या निर्णयाने त्याला आळा बसेल अशी अपेक्षा आहे . अर्थातच त्यासाठी कराव्या लागणाऱ्या अनेकविध उपाय - योजनातील ही एक आहे . एकमेव नाही . आणि " पी हळद , हो गोरी " अशी तर नाहीच ना

    महागाईचा दर आणि चलनाचे मूल्य या दोन गोष्टींचे परिणाम नेहमीच सामाजिक आणि आर्थिक असतात . त्यांची कारणे मात्र अनेकदा राजकीय असतात . त्यामुळे त्याबाबतची उपाययोजना ही बहुतेकदा राजकीयच असावी लागते . या मालिकेतील अस्खलित उदाहरण म्हणजे ८ नोव्हेंबर २०१६ च्या मध्यरात्री पासून ५०० आणि १००० रुपयांच्यातेंव्हा अस्तित्वात असलेल्या चलनी नोटा रद्द करण्याचा आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेला निर्णय .

    अशा पध्दतीने एखाद्या मूल्याच्या चलनी नोटा रद्द करण्याचा हा प्रसंग स्वतंत्र भारताच्या आर्थिक इतिहासात पहिल्यांदा घडत नाहीये . एकदा रद्द केलेल्या मूल्याच्या चलनी नोटा पुन्हा चलनात आणण्याचाही प्रकार याआधी घडला आहे . पण त्याबाबत माहिती पंतप्रधानानी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणातून देण्याचा प्रकार मात्र अनोखा आहे . प्रामुख्याने आर्थिक असणाऱ्या या निर्णयांची सांगड एकीकडे राष्ट्रप्रेम आणि दुसरीकडे दहशतवाद याच्याशी घालणे आणि या राष्ट्र - कार्यात तुमच्या - माझ्यासारखे सर्वसामान्य भारतीय नागरिक असा हातभार लावू शकतात असा भावनिक स्पर्श त्या रुक्ष आर्थिक आणि कर्तव्य - कठोर संरक्षणत्मक निर्णयाला देणे हे तर अफलातूनच . " सबका साथ , सबका विकास " चे अजूनही एक वेगळे स्वरूप म्हणा ना !

    आज हा निर्णय का घ्यावा लागला याचे स्पष्टीकरण केंद्रीय अर्थखाते आणि आपल्या देशाची मध्यवर्ती बँक " भारतीय रिझर्व बँक " ( RBI ) यांनी दिले आहे . त्यानुसार २०११ ते २०१६ या पाच वर्षांच्या काळात आपली राष्ट्रीय अर्थव्यवस्था ३० टक्के विस्तारली ; मात्र याच काळात चलनी नोटांच्या प्रमाणात मात्र ४० टक्के वाढ झाली . त्यापैकी ५०० रुपयांच्या नोटांच्या संख्येत ७६ टक्के तर १००० रुपयांच्या नोटांमधे १०९ टक्के वाढ झाली . आजमितिला सर्वसामान्य नागरिकांकडे असणाऱ्या चलनी नोटांच्या रकमेचे प्रमाण सुमारे १६ , ९८ , ५४० कोटी रुपये आहे आणि त्यापैकी अंदाजे ८८ टक्के भाग ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांमधे आहे . साधारणतः पाव भाग ( सुमारे २५ टक्के ) अर्थकारण काळया स्वरूपाचे असते असे मानले तरी अंदाज येऊ शकतो . तसेच नवीन नोटा निर्माण करण्याच्या सरकारी प्रक्रियेत , रिझर्व बँकेच्या नोटा - निर्मितीत कोणतीही संरक्षणात्मक गडबड झाली नसली तरी दहशतवादाला पाठबळ पुरवण्यात सहभागी असलेले बनावट नोटा आणि इतर गैरमार्ग अवलंबत असतील तर त्याला आळा घालणे हाही उद्देश या निर्णयामधे आहेच .

    या निर्णयाने काळा पैसा उजेडात येईल आणि नव्याने काळा पैसा निर्माण होण्यास काही प्रमाणात तरी पायबन्द बसेल असे सांगण्यात येत आहे . एक तत्व म्हणून ते बरोबरच आहे . पण गेल्या ६० - ७० वर्षांत काळया पैशाबाबत ज्या काही उपाय - योजना आपल्या देशात राबवल्या गेल्या , त्यांचा अनुभव फारसा सुखद नाही . अगदी याआधीच्या demonetisation निर्णयानीही अपेक्षित प्रमाणात परिणाम दिलेले नाहीत . याचे महत्वाचे कारण म्हणजे काळा पैसा एका रात्रीत जन्माला येत नाही . तसेच तो अनेकविध क्षेत्रात अनेकविध कारणांनी निर्माण होतो , होत राहतो . शिक्षण , जमीन - जुमला , ग्रुहनिर्माण , सोने आणि गुंतवणूक , राजकारण अशी अनेक क्षेत्रे त्याची कारण ही आहेत आणि परिणामही .

    हे लक्षात घेत याबाबतचे सुटे धागे , सुटी टोके विद्यमान सरकारने कशी बांधत नेली हे बघणे नक्कीच उदबोधक ठरेल . त्याद्रुश्तिने या सरकारच्या गेल्या तीन अर्थसन्कल्पान्चा नीट विचार व्हावा . ( याचा उहापोह मी माझ्या भाषणात गेल्या तीन वर्षांत वारंवार केला आहे . ) . काळा पैसा हा भाजपा च्या लोकसभा निवडणुका जाहिरनाम्यात एक मुद्दा होता . देशाबाहेरचे काळे धन हा मोठा मुद्दा . आधी जन - धन योजनेतून अनेकांना बेंकिंग जाळ्यात आणले गेले . या खात्यांची सांगड आधारशी घालून ओळख परेड झाली . आयकर विवरण पत्रात ( Income Tax Returns ) आधार कार्ड नम्बर , प्रॉपर्टी , वाहने असे तपशील सुरु केले गेले . क्रेडिट व डेबिट कार्डचा वाढता वापर आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे सर्वच आर्थिक माहितीचा यथायोग्य सक्रिय वापर अशी ही श्रुन्खला आहे . त्याचबरोबर काळा पैसा जाहीर करण्याबाबत वेळोवेळी केली गेलेली आवाहने ही विसरून चालणार नाही . तसेच २६ मे २०१४ रोजी सत्तारुढ झाल्यावर विविध देशांशी असणारे राजनैतिक संबंध वाढवण्यात देण्यात आलेला भरा आता देशाबाहेर असणारी माहिती आणि पैसा हुडकण्याचा मार्ग सोपा करेल.

    ५०० आणि १००० रुपयांच्या आधी अस्तित्वात असलेल्या नोटा रद्द करण्याचा निर्णय ज्या पध्दतीने घेतला गेला , जाहीर केला गेला आणि अंमलात आणला गेला हे पाहिले तर एक मजेदार विचार सहजच मनात आला की दरवर्षी जर उत्तर प्रदेश , गुजराथ सारख्या महत्वाच्या राज्यांच्या विधान - सभांच्या निवडणुका होत राहिल्या तर किती क्रांतिकारी , धाडसी , महत्वाकांक्षी आर्थिक निर्णय किती सातत्याने घेतले जातील ! . गन्मतीचा भाग सोडून देऊ . कारण तसे पाहिले तर आपल्या देशात दरवर्षी कोणत्या ना कोणत्या राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका होतंच असतात .

    पण या निर्णयाबाबतची स्थिति लक्षात घेता आर्थिक क्षेत्रात येणाऱ्या काळात , निदान नजीकच्या भविष्यात काय आणि कसे महत्वपूर्ण बदल होतील हे बघणे उपयोगाचे ठरेल . असा विचार करत असताना मला वाटणारे काही मुद्दे खालीलप्रमाणे :

    १ . सेवा आणि वस्तू कर ( GST ) ची अंमलबजावणी १जुलाइ किंवा सप्टेंबर पासून सुरु होईल .
    २ . सरकारी आर्थिक वर्ष सध्याच्या एप्रिल ते मार्च ऐवजी जानेवारी ते डिसेंबर असे होईल .
    ३ . वरील दोन्ही गोष्टी किंवा प्रामुख्याने दुसरी गोष्ट झाली तर नंतरच्या काळात वार्षिक केंद्रीय अर्थसंकल्प दरवर्षी ऑक्टोबर अखेरीस किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या पन्धरवद्यात सादर होईल .
    ४ . बँकामधील वाढते व्यवहार प्रमाण वाढत राहिले तर बँक खात्यातील व्यवहार हा कर - आकारणीचा , निदान काही प्रमाणात तरी , पाया बनेल .

    माननीय पंतप्रधानाना एक नम्र विनंती . . . आम्ही सर्वसामान्य नागरिक आमच एकमेव घरकुल घेताना मेटाकुटीला येतो . त्यासाठी द्यावे लागणार काळे धन द्यायच म्हणजे आमच पांढर् धन काळे म्हणून देतो . त्यामुळे तुमच्या आवाहनाला प्रतिसाद देत आमच्या कष्टातून , आधीच कर कापून , हाती आलेल्या पैशातून , घरखर्चासाथि बाजूस ठेवलेला पैसा ३१ डिसेम्बर २०१६ पर्यंत बँकेत जमा करण्यासाठी रांगेत उभे असताना यातली काही गुन्हेगार धेन्डे तुरुंगात गेलेली आणि त्यांची मालमत्ता जप्त झालेली पाहायला मिळाली तर नक्कीच आमचाही हुरुप वाढेल .

    -- चंद्रशेखर टिळक

    C - 402 . राज पार्क
    मढवि बंगल्या जवळ .
    राजाजी पथ .
    डोम्बिवलि ( पूर्व ) .
    पिन . . . ४२१२०१ .
    मोबाईल . . . . ९८२०२९२३७६ .
    एमेल . . . tilakc@nsdl.co.in

    १७ डिसेंबर २०१६

  • किचन क्लिनीक – शिंगाडा – (कमलकंद)

    किचन क्लिनीक – शिंगाडा – (कमलकंद)

    उपावासा साठी प्रसिध्द असा हा पदार्थ.काही जण हा कंद नुसता उकडून देखील आवडीने खातात किंवा मग ह्याच्या पिठाचा वापर वेगवेगळे उपवासाचे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो.

    हा काळा जाडसर साल असणारा कंद अातून मात्र पांढरा शुभ्र असतो.जसा ह्याचा उपयोग स्वयंपाकात केला जातो तसाच ह्याचा घरगुती उपचारात देखील वापर केला जातो.

    शिंगाडा चवीला गोड तुरट असतो व थंड असतो त्यामुळे तो शरीरातील वात व कफ दोष वाढवितो तर पित्त दोष कमी करतो.

    चला मग ह्याचे घरगुती उपचार पहायचे ना:

    १)अम्लपित्तामध्ये १ टेबल संपून शिंगाडा पीठ + १ कप दूध+ १ कप पाणी घालून खीर करावी व त्यात खडीसाखर घालून रोज ४ तासांनी एकदा हि खीर थंड करून खावी.

    २)पित्तामुळे अतिभूक लागून काही व्यक्ती खुप खातात त्यांना शिंगाड्याच्या पिठाचा तुपावर परतून केलेला शिरा खायला द्यावा.

    ३)शरीरात रक्त कमी असल्यास १ मोठा चमचा शिंगाडा पीठ व १ काळा खजूर तुपावर परतून गोळा बनवावा व असा गोळा रोज सकाळी उपाशी पोटी खावा व मग त्यावर तासभर काही ही खाऊ नये.

    ४)डोळ्याची आग होणे,डोळे लाल होणे ह्या तक्रारींवर शिंगाडा पीठ तूपावर परतून रात्री चघळून खावे हा प्रयोग २ महीने करावा.

    ५)आतड्यातून अन्न लवकर पुढे सरकल्यास संडासला साफ न होणे,वारंवार दुर्गंध युक्त संडास होणे,पातळ भसर संडासला होणे ह्या तक्रारी सुरू होतात.त्यावेळी शिंगाडा पीठाची भाकरी मसूरच्या कढणासह खावी ह्याने आतड्याची गती नियंत्रणात रहायला मदत होते.

    शिंगाडा पीठ अतिमात्रेत खाल्ल्यास संडासला घट्ट होऊ शकते.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४