(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • मनाचे श्लोक – १६१ ते १७०

    अहंतागुणे सर्वही दुःख होते | मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते |
    सुखी राहता सर्वही सूख आहे | अहंता तुझी तूचि शोधूनि पाहे ||161||

    अहंतागुणे नीति सांडी विवेकी | अनीतीबळे श्र्लाघ्यता सर्व लोकी |
    परी अंतरी सर्वही साक्ष येते | पःमाणांतरे बुेि सांडूनि जाते ||162||

    देहेबुेिचा निश्र्चयो दृढ झाला | देहातीत ते हीत सांडीत गेला |
    देहेबुेि ते आत्मबुेि करावी | सदा संगती सज्जनाची धरावी ||163||

    मने कल्पिला वीषयो सोडवावा | मने देव निर्गूण तो वोळखावा |
    मने कल्पिता कल्पना ते सरावी | सदा संगती सज्जनाची धरावी ||164||

    देहादीक पःपंच हा चिंतियेला | परी अंतरी लोभ निश्र्चीत ठेला |
    हरीचिंतने मुक्तिकांता वरावी | सदा संगती सज्जनाची धरावी ||165||

    अहंकार विस्तारला या देहाचा | स्त्रियापुत्रमित्रादिके मोह त्यांचा |
    बळे भ्रांति हे जन्मचिंता हरावी | सदा संगती सज्जनाची धरावी ||166||

    बरा निश्र्चयो शाश्र्वताचा करावा | म्हणे दास संदेह तो विसरावा |
    घडीने घडी सार्थकाची करावी | सदा संगती सज्ज्नाची धरावी ||167||

    करी वृत्ति जो संत तो संत तो संत जाणा | दुराशागुणे जो नव्हे दैन्यवाणा |
    उपाधी देहेबुेिते वाढवीते | परी सज्जना केवि बाधू शके ते ||168||

    नसे अंत आनंत संता पुसावा | अहंकार विस्तार हा नीरसावा |
    गुणेविण निर्गूण तो आठवावा | देहेबुेिचा आठवो नाठवावा ||169||

    देहेबुेि हे ज्ञानबोधे त्यजावी | विवेके तये वस्तुची भेट घ्यावी |
    तदाकार हे वृत्ति नाही स्वभावें | म्हणोनी सदा तेचि शोधीत जावे ||170||

    - श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)

  • देवपूजेतील साधन – शंख

    सागरातून निर्माण झालेला शंख श्रीविष्णूने वध केलेल्या शंखचूड राक्षसाचे प्रतीक असून देवपूजेत याला मानाचे स्थान आहे. शंखाच्या मूलभागात चंद्र, कुक्षामद्ये वरुण, पृष्ठभागी प्रजापती आणि अग्रभागी गंगा व सरस्वती निवास करतात. पंचजन्य नाव असलेल्या शंखाला श्रीविष्णूने आपल्या हाती धरले आहे म्हणून शंखाला अग्रपूजेचा मान मिळाला असून त्याच्यामध्ये स्नान घालताना साठणारे जल सर्व देवांवर शिंपडण्यात येते.

    महाभारतातील युध्दप्रसंगी शंखाचा रणवाद्य म्हणून उपयोग केल्याचे आढळून येते तर देवपूजेच्या वेळीही शंखनाद केला जातो, ज्याच्या ध्वनीमुळे आजूबाजूचे वातावरण प्रसन्न होऊन एकाग्रता लाभते. म्हणून देवघरात शंख असणे भाग्याचे लक्षण आहे.

  • मनाचे श्लोक – १७१ ते १८०

    असे सार साचार ते चोरलेसे | इही लोचनी पाहता दृश्य भासे |
    निराभास निर्गूण ते आकळेना | अहंतागुणे कल्पिताही कळेना ||171||

    स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या | स्फुरे ब्रध् रे जाण माया सुविद्या |
    मुळी कल्पना दो रूपे तेचि जाली | विवेके तरी सस्वरूपी मिळाली ||172||

    स्वरूपी उदेला अहंकार राहो | तेणे सर्व आच्छादिले व्योम पाहो |
    दिशा पाहता ते निशा वाढताहे | विवेके विचारे विवंचूनि पाहे ||173||

    जया चक्षुने लक्षिता लक्षवेना | भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना |
    क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो | दयादक्ष तो सक्षिने पक्ष घेतो ||174||

    विधी निर्मिता लीहितो सर्व भाळी | परी लीहिता कोण त्याचे कपाळी |
    हरू जाळितो लोक संहारकाळी | परी शेवटी शंकरा कोण जाळी ||175||

    जगी द्वादशादित्य ते रूद अकःा| असंख्यात संख्या करी कोण शकःा |
    जगी देव धुंडाळिता आढळेना | जनी मख्य तो कोण कैसा कळेना ||176||

    तुटेना फुटेना कदा देवराणा | चळेना ढळेना कदा दैन्यवाणा |
    कळेना कळेंना कदा लोचनासी | वसेना दिसेना तो जनी मीपणाशी ||177||

    जया मानला देव तो पूजिताहे | परा देव शोधूनि कोणी न पाहे |
    जगी पाहता देव कोटयानकोटी | जया मानली भक्ती जे तेचि मोठी ||178||

    तिन्ही लोक जेथून निर्माण जाले | तया देवरायासि कोणी न बोले |
    जगी थोरला देव तो चोरलासे | सदगुरूवीण तो सर्वथाही न दीसे ||179||

    गुरू पाहतां पाहतां लक्ष कोटी | बहूसाल मंत्रावळी शक्ति मोंठी |
    मनी कामना चेटके घातमाता | जनी व्यर्थ रे तो नव्हे मुक्तिदाता ||180||

    - श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)

  • देवपूजेतील साधन – कलश

    भारतीय संस्कृतीमध्ये मंगलकार्यप्रसंगी कलशाला फार महत्त्व प्राप्त आहे. तांदळाच्या राशीवर ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढून कलशाची स्थापना केली जाते. त्यामध्ये गंगा जल आणि पंचरत्ने घालून पंचपत्रीने तो सुशोभित करतात. त्यावर नारळ ठेवला जातो व मग कलशाची पूजा केली जाते. गंध, अक्षता आणि फुले वाहून देवघरात कलश ठेवला असता सुख, समाधान आणि शांती प्राप्त होते. समुद्र मंथनातून बाहेर आलेले अमृत भरण्यासाठी विश्र्वकर्म्याने सर्व देवांमध्ये असलेल्या कलेचे ग्रहण करुन जे भांडे बनवले ते म्हणजे कलश होय अशी कथा पुराणात सांगितली आहे.

    कळशी या भाड्याचा छोटा आकार म्हणजे कलश. कळशाचे भांडे पितळेचे अथवा तांब्याचे असते.

    क्षितींद्र, जलसंभव, पवन, अग्नी, कोशसंभव, सोम, आदित्य आणि विजय असे कलशाचे विविध प्रकार आहेत. यापैकी विजय कलश पीठाचे मध्यभागी स्थापन केला जातो. अन्य कलश आठ दिशांना ठेवले जातात. कलशाच्या मुखाच्या ठिकाणी ब्रम्हा, गळ्याच्या ठिकाणी शंकर, मूलगामी विष्णू, मध्यभागी मातृकामण आणि दाही दिशांना वेष्टून दिक्पाल निवास करतात. कलशाचे पोटात सप्तसागर, सप्तव्दीप, ग्रहनक्षत्रे, कुलपर्वत, गंगा आणि चार वेद सामावले आहेत असे शास्त्रकार म्हणतात.

    तांब्याच्या कलशात रात्री पाणी भरुन ते सकाळी उठल्यावर अनुशापोटी सेवन केले असता बध्दकोष्ठ नाहीसा होतो. तांब्याच्या कलशातील पाणी प्यायल्याने इतर अनेक विकारही दूर होतात.

  • मनाचे श्लोक – १८१ ते १९०

    नव्हे चेटकी चाळकू दःव्यभोंदू | नव्हे निंदकू मत्सरू भक्तीमंदू |
    नव्हे उन्मतू वेसनी संगबाधू | जनी ज्ञानिया तोचि साधू अगाधू ||181||

    नव्हे वाउगी चाऊटी काम पोटी | किःयेवीण वाचाळता तेचि मोठी |
    मुखी बोलिल्यासारिखे चालताहे | मना सदगुरू तोचि शोधूनि पाहे ||182||

    जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी | कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी |
    प्रभू दक्ष व्युत्पन्न चातुर्य जाणे | तयाचेन योगे समाधान बाणे ||183||

    नव्हे तेचि जाले नसे तेचि आले | कळो लागले सज्जनाचेनि बोले |
    अनिर्वाच्य ते वाच्य वाचे वदावे | मना संत आनंत शोधीत जावे ||184||

    लपावे अती आदरे रामरूपी | भयातीत निश्र्चीत ये सस्वरूपी |
    कदा तो जनी पाहताही दिसेना | सदा ऐक्य तो भिन्नभावे वसेना ||185||

    सदा सर्वदा राम सन्नीध आहे | मना सज्जना सत्य शोधून पाहे |
    अखंडीत भेटी रघूराजयोगू | मना सांडि रे मीपणाचा वियोगु ||186||

    भुते पिंड ब्रम्हांड हे ऐक्य आहे | परी सर्वही सस्वरूपी न साहे |
    मना भासले सर्व कांही पहावे | परी संग सोडूनि सूखी राहावे ||187||

    देहेभान हे ज्ञानशास्त्रे खुडावे | विदेहीपणे भक्तीमार्गेचि जावे |
    विरक्तीबळे निंध सर्वे त्यजावे | परी संग सोडूनि सूखे रहावे ||188||

    मही निर्मिली देव तो ओळखावा | जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा |
    तया निर्गुणालागि गूणी पहावे | परी संग सोडूनि सूखे रहावे ||189||

    नव्हे कार्यकर्ता नव्हे सृष्टिभर्ता | परेहूनि पर्ता न लिंपे विवर्ता |
    तया निर्विकल्पासि कल्पीत जावे | परी संग सोडूनि सूखे राहावे ||190||

    - श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)

  • देवपूजेतील साधन – निरांजन

    निर म्हणजे नाही व अंजन म्हणजे मळ किंवा काजळी. निरांजनातील तुपाच्या ज्योतीवर काजळी किंवा धूर दिसत नाही. म्हणूनच त्याला निरंजन म्हणतात.

    निरंजन याचा अर्थ ओवाळणे असाही आहे. देवाच्या पूजेची सांगता आरतीने होते. या आरतीमध्ये प्रज्वलित निरंजनाने देवाला ओवाळणे हा एक प्रमुख उपचार आहे.

    निरंजनाने देवाला ओवाळतात तेव्हा त्यात तुपात भिजवलेली वात असते तर स्त्री पुरुषाला ओवाळताना तेल वात असते तिला कुरवंडी असे म्हणतात. हा प्रकार म्हणजे औक्षण होय. औक्षण म्हणजे उत्तम क्षणांनी आयुष्याची वाढ व्हावी असा आशीर्वाद यात अभिप्रत असतो.

    सर्वसाधारणपणे निरंजनाला पाच पाळी असतात यात प्रामुख्याने कापसाच्या वातीने प्रज्वलित झालेल्या पंचारतीच्या निरंजनातील पाच ज्योती म्हणजे मानवी शरीरातील प्राण, अपान, व्यान, उदान, समान या पंचप्राणाची प्रतीके आहेत. देवाची आरती म्हणजे गायनातून केलेली देवाची स्तुती असल्यामुळे देवाची आपल्यावर कृपा होते.

  • देवपूजेतील साधन – तोरण

    देवपूजेतील साधन – तोरण

    घरामध्ये लग्न,मुंज असो किंवा वास्तुशांत वा धार्मिक कार्य असो. घराच्या दरवाज्याला तोरण बांधण्याचा कुळाचार पूर्वीपासून चालत आला आहे.

    एका सुतळीला सोनेरी नक्षीचे पताका सारखे कागद लावून त्याच्या मध्यभागी सोनेरी कागद चिटकवलेला नारळ असतो यालाच तोरण असे म्हणतात. आंब्याच्या डहाळ्यांचे किंवा पानाफुलांचेही तोरण शुभ म्हणून समजले जाते.

    दरवाज्याला तोरण बांधल्याने दृष्ट प्रवृत्तीचा वावर घरात होऊ शकत नाही. उलटपक्षी धार्मिक कार्ये यशस्विरीत्या पार पाडली जातात.

    आजकाल गणपतीच्या मंदीरात नारळाचे तोरण बांधल्यास गणपती नवसाला पावतो अशी श्रध्दा रुढ झाली आहे. नवर्‍यामुलाला व मुलीला त्यांच्या विवाह प्रसंगी बाशिंग बांधले जाते हे सुध्दा एक प्रकारचे तोरण असून त्यामुळे त्या दोघांना कुणाचीही दृष्ट लागत नाही अथवा बाधा येत नाही.

    तारण या शब्दाचा अपभ्रंश तोरण झाला असून तारण म्हणजे संकटापासून तारणे असा अर्थ गृहीत धरला जातो.

  • मनाचे श्लोक – १९१ ते २०५

    देहेबुेिचा निश्र्चयो ज्या टळेना | तया ज्ञान कल्पांतकाळी कळेना |
    पर ब्रध् ते मीपणे आकळेना | मनी शून्य अज्ञान हे मावळेना ||191||

    मना ना कळे ना ढळे रूप ज्याचे | दुजेवीण ते ध्यान सर्वोत्तमाचे |
    तया खूण ते हीन दृष्टांत पाहे | तेथे संग निसंग दोनी न साहे ||192||

    नव्हे जाणता नेणता देवराणा | न ये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा |
    नव्हे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा | श्रुती नेणती नेणती अंत त्याचा ||193||

    वसे थ्दयी देव तो कोण कैसा | पुसे आदरे साधकूः प्रश्र्न ऐसा |
    देहे टाकिता देव कोठे रहातो | परी मागुता ठाव कोठे पहातो ||194||

    वसे थ्दयी देव तो जाण ऐसा | नभाचेपरी व्यापकू जाण तैसा |
    सदा संचला येत ना जात कांही | तयावीण कोठे रिता ठाव नाही ||195||

    नभी वावरे जो अणूरेणू कांही | रिता ठाव या राघवेवीण नाही |
    तया पाहता पाहता तेचि जाले | तेथे लक्ष आलक्ष सर्वै बुडाले ||196||

    नभासारिखे रूप या राघवाचे | मनी चिंतिता मूळ तूटे भवाचे |
    तया पाहता देहबुेाऩ उरेना | सदा सर्वदा आर्त पोटी पुरेना ||197||

    नभे व्यापिले सर्व सृष्टी आहे | रघूनायका ऊपमा ते न साहे |
    दुजेवीण जो तोचि तो हा स्वभावे | तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे ||198||

    अती जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे | तेथे तर्कसंपर्क तोही न साहे |
    अती गूढ ते दृढ तत्काळ सोपे | दुजेवीण जें खूण स्वामीप्रतापे ||199||

    कळे आकळे रूप ते ज्ञान होता | तेथे आटली सर्वसाक्षी अवस्था |
    मना उन्मनी शब्द कुंठीत राहे | तो गे तोचि तो राम सर्वत्र पाहे ||200||

    कदा ओळखीमाजि दूजे दिसेना | मनी मानसी द्वैत कांही वसेना |
    बहुता दिसा आपुली भेटि झाली | विदेहीपणे सर्व काया निवाला ||201||

    मना गूज रे तूज हे प्राफ्त जाला | परी अंतरी पाहिजे यत्न केले |
    सदा श्रवणे पाविजे निश्र्चयासी | धरी सज्जन संगती धन्य होसी ||202||

    मना सर्वही संग सोडून द्यावा | अती आदरे सज्जनाचा धरावा |
    जयाचेनि संगे महादुःख भंगे | जनी साधनेवीण सन्मार्ग लागे ||203||

    मना संग हा सर्व संगास तोडी | मना संग हा मोक्ष तत्काळ जोडी |
    मना संग हा साधका शीघ्र सोडी | मना संग हा ेमत निशेष मोडी ||204||

    मनाची शते एकता दोष जाती | मतीमंद ते साधना योग्य होती |
    चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी | म्हणे दास विश्र्वासता मुक्ति भोगी ||205||

    - श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)

  • श्री म्हाळसाकांताची आरती

    अनेक कायस्थ कुटुंबात अतिशय भक्तीभावानी गायली जाणारी हि श्री म्हाळसाकांताची आरती आपल्या सर्वांच्या माहितीसाठी .... !!!!

    पिवळे निशाण तुमचे पिवळे शिखर ..पिवळे शिखर !
    पिवळा कांचन पर्वत , पिवळा कांचन पर्वत ...पिवळे नगर
    पिवळी तुमची काया पिवळा शृंगार ....पिवळा शृंगार !
    पिवळे राजे तुम्ही ...पिवळे राजे तुम्ही राणी सुकुमार !
    जयदेव जयदेव जयशिव मैराळा जयशिव मैराळा
    विशाल शंकर ढवळा... विशाल शंकर ढवळा ,त्याहुनी तू पिवळा //१//
    पिवळी बाणा बाई धनगरीण बाळ, धनगरीण बाळ
    पिवळ्या घोड्यावरी बससी मैराळ !
    चारी वाद्ये वाजती देवांच्या सकळा देवांच्या सकळा
    दासी झाल्या मुरळ्या ..दासी झाल्या मुरळ्या
    भोगिसी त्या सकळा !
    जयदेव जयदेव जयशिव मैराळा जयशिव मैराळा ....
    विशाळ शंकर ढवळा , विशाळ शंकर ढवळा , त्याहुनी तू पिवळा //२//
    चंपाषष्ठी चा कुळधर्म केला ...कुळधर्म केला
    पिवळ्या पुरणाची ..पिवळ्या पुरणाची आरती देवाला
    रोग्याने सेवा केली त्यावरी सकळा ...त्यावरी सकळा ,
    त्यावरी कृपा केली... त्यावरी कृपा केली ...पिवळ्या मैराळा
    जयदेव जयदेव ..जयशिव मैराळा ,जयशिव मैराळा
    विशाळ शंकर ढवळा , विशाळ शंकर ढवळा ...त्याहुनी तू पिवळा //४//
    सदानंदाचा येळकोट !!!
    येळकोट येळकोट ...जय मल्हार !!!

    -- चिंतामणी कारखानीस

  • देवपूजेतील साधन – अक्षता

    देवपूजेतील साधन – अक्षता

    सर्व धान्यामध्ये तांदुळाला महत्त्वाचे स्थान असून तांदुळापासून केलेला भात हे उदर भरणाचे साधन आहे.

    क्षत म्हणजे भोक पडणे. ज्या धान्याला भोक पडत नाही ते धान्य म्हणजे तांदूळ असून त्याला अक्षता म्हटले जाते. पूजेच्यावेळी देवांवर आणि लग्नप्रसंगी वधूवरांवर कुंकूमिश्रित अक्षता टाकल्या जातात. याचे कारण असे की देवाने आपल्यावर कृपा करावी व वधूवरांचे जीवन सुखी व्हावे हा त्यामागील हेतू असतो.

    मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी मूर्तीच्या खाली अक्षता ठेवूनच मूर्तीची स्थापना केली जाते. कारण मूर्तीचा क्षय होऊ नये.

    झोपताना उशीच्या खाली चारसहा अक्षता पुडीत बांधून ठेवल्यास झोप शांत लागते. अणि चित्त, मन व बुध्दी स्थिर राहुन त्याला बाधा येत नाही.

    ओंकाराच्या आज्ञेनुसार ब्रम्हदेवाने अक्षतांची निर्मिती केली त्यामुळे प्रसन्न होऊन सर्व मंगलकार्यात अक्षतांना प्राधान्य दिले जाईल असा वर ओंकाराने ब्रम्हाला दिला अशी कथा पुराणात असल्यामुळे अक्षतांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

    स्त्री-पुरुषांचे भाळी कुंकूम तिलकावरही अक्षता लावल्या जातात ज्यायोगे त्यांना प्रत्येक कार्यात यश प्राप्त व्हावे.