वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
रेल्वेसेवा व्यवस्थित सुरू राहण्यासाठी तिची देखभाल ही अत्यंत महत्त्वाची ठरते. त्यासाठी विशेष प्रकारची यंत्रे वापरावी लागतात. तसेच, अपघातासारख्या संकटकालीन परिस्थितीतसुद्धा विशेष प्रकारच्या सामग्रीचा वापर करावा लागतो. देखभालीसाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत वापरल्या जाणाऱ्या यंत्रसामग्रीची ही ओळख…
February 25, 2024
भगवान श्री गणेशांच्या दोन बाजूला दोन शक्ती उभ्या असतात. एकीचे नाव देवी सिद्धी असते. तर दुसरीचे नाव देवी बुद्धी असते. पण यातील नेमकी सिद्धी कोणती? आणि बुद्धी कोणती? बुचकळ्यात पडलात ना? आपण कधी याचा विचारही करीत नाही. पण शास्त्रकारांनी सर्व गोष्टींचा विचारही केला आहे आणि कारणेही दिलेली आहेत.
September 11, 2019
आजही मरीन इंजिनियरिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (MERI) म्हणजेच आमच्या मेरी मुंबई येथील प्री सी ट्रेनिंगचा पहिला दिवस आठवतोय. पहिल्याच दिवशी पहिल्याच लेक्चर मध्ये भारतीय नौदलातील रिटायर्ड झालेले एक अधिकारी इंस्ट्रक्टर म्हणून आमच्या वर्गावर आले होते. त्यांनी मग सगळ्यांना विचारले की तुम्हाला माहिती आहे का आर्मी, एअरफोर्स आणि नौसेना या तिन्ही दलांमध्ये सॅल्युट करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत.
October 17, 2019
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 31
नैवेद्यम् समर्पयामी-भाग पाच
गणेशजी आपल्याकडे येतात. काही जणांकडे दीड दिवस, काही जणांकडे पाच, सात, अकरा, एकवीस दिवस मुक्कामी असतात. जणुकाही घरातलाच एक घटक होऊन जातात. विसर्जनाची वेळ येते तेव्हा सगळ्यांचेच डोळे पाणावतात. ते (तेज) घरातून जाऊ नयेत, असे लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वानाच वाटत असते.
गणेशजी आपल्या घरातील एक ज्येष्ठ आदरणीय व्यक्तीच बनून गेलेले असतात. सर्वगुणसंपन्न असलेली ही सगुण देवता आपल्या अवतीभवती आहे, याचा विलक्षण आनंद यावेळी आपल्या मनात असतो. केवळ एका ज्ञातीचे हे दैवत नसून समस्त समाजाला देशभक्तीच्या एका सूत्रात बांधून ठेवणारे हे सामाजिक आणि राष्ट्रीय स्तरावरील दैवत. जेव्हा गणेशजी येतात, मनातली सर्व सुख दुःख प्रत्येक जण त्यांना सांगत असतात. कोणावर जबरदस्ती नाही, कडक सोवळे ओवळे नाही. घरातली सर्वजण अगदी मनोभावे यथासांग, यथा मिलितोपचार द्रव्यांनी षोडशोपचार पूजा करत असतात.
या निमित्ताने नवीन खरेदी, बाजारात खरेदीला गर्दी, एका घरातील पैसा बाहेर येतो, दुसऱ्याच्या घरात जातो. चलन हलते फिरते राहाते, पैसा फिरला तर देशाचा आर्थिक विकास होतो, हा अर्थशास्त्रातला नियम. सणांच्या माध्यमातून भारतात हा नियम केवळ पुस्तकात राहिलेला नाही तर व्यवहारात उतरवला गेलाय. त्याचा परिणाम म्हणून भारतात इंग्रज येऊन गेल्यानंतर परिस्थिती दुष्काळी असली तरी आर्थिक मंदीची लाट तशी कधी जाणवली नाही, ती या अशा सणांमुळे आणि त्यातल्या कर्मकांडामुळे !
पाच फळं, पाच भाज्या, पाच पक्वान्न, सणाच्या निमित्ताने का होईना, खरेदी होते, सण म्हणून वेगवेगळे पदार्थ. एकत्रित भोजन, एकत्रित भजन, एकमेकांच्या सहवासात येत असतो. घराला जणुकाही देवालय बनवून टाकलेलं असतं. घराघरातील गणेशतत्व जरी एकच असले तरी प्रत्येकाच्या घरी जावून, प्रत्येक घरातील प्रत्येक गणेशाचे दर्शन होते. एक निमित्त असते, लोकसंग्रह वाढवायचे ! नातेसंबंध वाढवायचे, पौष्टिक खायचे, आरोग्य सुधारायचे !
सकाळी लवकर उठून गणपतीची मनोभावे केलेली पूजा, आरती, शंख, घंटा यातून निर्माण होणारे ध्वनी, झांज, टाळ, तबला, पेटी, पखवाज, घुमट इ. अनेक वाद्यांचे गजर, शब्दलहरी, मंत्रलहरी, त्यांचे नाद, सूर, ताल, लय यांनी घरातील वायुमहाभूताची, आकाश महाभूताची शुद्धी होत असते.
काही आठवतंय पहा,
प्रत्येक कार्याच्या प्रारंभी गणेशजीना पहिला नमस्कार.
आपण जेवायला बसलो की गणेशजीना नैवेद्याचे पान पहिल्यांदा. "तुमच्यामुळे आम्हाला मोदक मिळती खायाला, गणपती बाप्पा मोरया" असं म्हणत गणपतीसाठी केलेले सर्व मोदक आपणच खाऊन टाकायचे....
हे पंचपक्वान्नाचे ताट नैवेद्य म्हणून दाखवून परत सगळ्यांनी समान वाटून घ्यायचे. कोणताही भेदाभेद नाही. कोणाशीही भेदभाव नाही.
पण....
हा असा भरलेल्या ताटाचा नैवेद्य फक्त दुपारी दाखवला जातो.( नाव गणेशाचे खातो आपणच ! )
आणि रात्रीची पेटपूजा ?
?????
नैवेद्याला काय असते ?
आठवावं लागतंय ना !
जशी षोडशोपचार पूजा सकाळी केली जाते, तशी सायंपूजा केली जात नाही. सायंकाळी केली जाते, त्या पूजेला सायंपूजा असे म्हणतात.
सायंकाळी फक्त पंचोपचार आणि आरती ! आणि नैवेद्याला काय असतं ?
फक्त एखादा लाडू, किंवा लाह्यांचं गुळखोबरं घातलेलं पंचखाद्य, किंवा एखादा मोदक किंवा एखादी करंजी किंवा नेव्हरी. ( गोवा, कोकण भागात करंजीला नेवरी म्हणतात.)
बास्स बास्स बास् !
संध्याकाळी झालेल्या या पूजेनंतर गणेशजींचा हा जो नैवेद्य असतो, इथे आरोग्य दडलेलं आहे.
जे जे देवासाठी ते ते देहासाठी. या न्यायानुसार आपणही तेवढे आणि तसेच अन्न खायचे असते.
सकाळ दुपार भरपूर जेवायचे आणि सायंकाळी कमी, रात्रीचे तर नाहीच, हा नियम पुनः एकदा सिद्ध होतो.
सकाळी झालेल्या पूजेनंतर पंचपक्वान्न खाल्ली तरी चालतात. आणि सायंकाळी मात्र एखादाच लाडू किंवा लाह्या सदृश्य काही तरी भाजलेलं, फुलवलेलं, पचायला एकदम हलकं असंच अन्न घ्यावं हा त्यामागील आरोग्य संकेत . समजून घेणाऱ्या समंजसांना हा समज समजतो. बाकी सगळे बुद्धीवादी, भक्ती सोडून ज्ञानाची सालपटं काढत रहातात, आणि आपण मात्र लंबोदर होतात.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
24.06.2017
June 24, 2017
प्रचंड चंडाबाई सप्तश्रृंग निवासिनी हो ।
ओवाळू आरती आदिशत्त*ी अंबाबाई हो । प्रचंड चंडाबाई ।।धृ।।
कडकत धडकत त्रिशूळ कोधे फिरविशी दिगमंडळी हो।
गडगड गर्जती मृदूंग तो मर फिरविशी तनूजा वरि हो ।
भडभड शोणित वाट तटतट मूंडे उडविशी नभी हो ।
खदखत हासती भूते घटघट करिती शोणित पान हो ।।1।।
प्रचंड चंडाबाई ।।धृ।।
अष्टदश भुजदंड माथा बरग्या पिगट जटा हो।
रत्त*ांबर परिधान शोभे कासोटा तटतटीत हो।
चंदन चर्चित अंगी भाळी मृगनाभीचा टिळा हो।
तकाकी शोणित राहे तेज फाकितसे अंबरी हो ।।धृ।।
प्रचंड चंडाबाई ।।धृ।।
सिहारूढ होऊन रूप धरिले महाचंड हो ।
पसरूनी वितंड दाढा वदनी केले अग्नीकुंड हो।
घोर गर्जना केली कंपित झाले हे ब्रम्हांड हो ।
थरथर कापती असुरे पळती अपूरे हे ब्रम्हांड हो ।।धृ।।
प्रचंड चंडाबाई ।।धृ।।
भृकूटी व्यंकट केल्या नेत्री अग्नीचे स्फूलींग हो।
थयथय टाकीसी ज्वाला करिसी असूराचा मुळभंग हो ।
खणखण वाजती खडगे, सणसण सोडिसी कैसे शर हो ।
घणघण घंटा नादे दूमदूले अवती अंग हो ।।धृ।।
प्रचंड चंडाबाई ।।धृ।।
ऐसी ही अदिशत्त*ी हिचा न कळे कोणा पार हो
स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही लोकी जयजयकार हो ।
विनवी गिरजा नंदन अंबे चरणी नमस्कार हो
ऐसी ही जगदंबा भत्त*ा नेईल अक्षय पार हो ।।धृ।।
प्रचंड चंडाबाई ।।धृ।।
गायक - श्री.विनोद पंदीरकर.
October 15, 2015
अन्न सुरक्षा ही एक सामायिक जबाबदारी आहे. सुरक्षित, पौष्टिक आणि पुरेसे अन्न चांगल्या आरोग्यास प्रोत्साहित करतं. त्याचबरोबर उपासमारीची समस्या दूर करतं.
भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (Food Safety and Standards Authority of India-FSSAI) ने राज्यांद्वारे सुरक्षित अन्न पुरवठा करण्यासाठी प्रयत्नासाठीच्या संदर्भात पहिले राज्य अन्न सुरक्षा इंडेक्स (State Food Safety Index-SFSI) विकसित केले आहेत.
June 7, 2022
खरं आहे हे ! आज जी विकतची काही मऊ मऊ पांघरुणे मिळतात, त्यात कृत्रिमरीत्या तयार केलेली फर वापरली जाते. त्यात जे रंग डाय करण्यासाठी वापरले जातात, ते पण अॅलर्जी वाढवतात, असे लक्षात येत आहे. सहज हातात धरून झटकली तरी ही फर वाऱ्यावर उडताना नुसत्या उघड्या डोळ्यांना दिसते.
February 8, 2018
वाल्मिकींचा रामकथा लिहिण्याच्या उद्देश्य काय होता, हे कळले तर आपण सत्य शोधू शकतो. आज काही तथाकथित बुद्धिमान रामायण, महाभारतातील गोष्टींना विकृत स्वरूपात प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करतात. कथेतील मूळ सत्य लोकांसमोर प्रस्तुत करण्याचा प्रयत्न मी आपल्या बुद्धीने करण्याचा प्रयत्न केला आहे- त्यासाठी आपल्या कल्पनेचा ही वापर केला आहे
April 8, 2015
लेखिका – उषा शशीकांत जोशी – बहिणाबाई किंवा बहिणाबाईंची गाणी ही मराठी भाषेतील अपूर्व निर्मिती आहे. लौकिक अर्थाने त्या अडाणी (अनपढ) निरक्षर होत्या. लेखन, वाचनाच्या संस्कारांची सुतराम ही शक्यताही नव्हती. त्यामुळेच त्यांच्या निसर्गदत्त प्रतिमेबद्दल आश्चर्य वाटावं इतकी त्यांची कविता, शब्द, वाक्य, ध्वनी, छंद, यमक, अनुप्रास अशा भाषेच्या नियमांमध्ये पूर्णपणे बसणारी आहे. खरोखर अलौकिक प्रतिमेचं देणं म्हणजे काय याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे बहिणाबाईंची कविता होय.
August 27, 2019
श्रीसूक्त हे ऋग्वेदात समाविष्ट असले तरी ते ‘खिलसूक्त’ या प्रकारात मोडते. एखाद्या प्रकरणाला अथवा मुख्य साहित्य प्रकाराला परिशिष्ट म्हणून जोडलेल्या साहित्याला खिल असे म्हणतात. वेदव्यासांनी संपादित केलेल्या ऋग्वेदाच्या मूळ संहितेत नसलेली परंतु नंतर त्यात समाविष्ट केली गेलेली अशी ही सूक्ते ‘खिलसूक्त, परिशिष्टसूक्त वा पदशिष्टसूक्त’ या नावांनीही ओळखली जातात.
September 30, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti