वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
जलाचे दोन प्रकार आकाशातून खाली येणारे आणि जमिनीतून वर येणारे.
त्यातील आकाशातून खाली येणारे पाणी हे जास्त श्रेष्ठ सांगितले आहे.
पावसाचे पाणी जमिनीवर पडण्यापूर्वी स्वच्छ भांड्यात धरणे आवश्यक आहे. जमिनीला स्पर्श झाला की, त्यातील अशुद्धी पाण्यात मिसळायला सुरवात होते.
पाण्याची वाफ होते, त्याचे ढग बनतात ही पाण्याची पहिली शुद्धी आणि ढगाला थंड हवा लागली की त्याची दुसरी शुद्धी. परत पाणी बनते, आकाशातून खाली येते. स्वच्छ आणि शुद्ध असते. परत खाली येताना वायु प्रदूषणामुळे वातावरणातील काही अशुद्धी त्यात मिसळल्या जातात, म्हणून हे पाणी आता शुद्ध करून घ्यावे लागेल. अन्यथा हे पाणी जर प्रदूषण रहित भागातील असेल तर या आकाशीय जलावर कोणत्याही शुद्धी संस्कारांची गरज नाही. देवलोकातील लोकांना जसे अमृत तसे हे अव्यक्तरस आकाशजल मनुष्यांसाठी जीवन आहे, असे ग्रंथकार म्हणतात.
जसे प्रत्येक ठिकाणी उगवणारा सूर्य तोच असतो, पण प्रत्येक गावातील सूर्योदयाची वेळ गावानुसार वेगवेगळी असते. तसेच आकाशातून पडणारे जल तेच असते, पण ते जेव्हा खाली येत असते, तेव्हा ते स्थानिक दोषांनी युक्त होते. शहरी भागात ही अशुद्धी जास्ती असते. पण ग्रामीण भागात ही अशुद्धी कमी आढळते.
जमिनीवर पडले की ते मातीत मुरते. मातीतले गुण त्या पाण्यात येतात. या नियमानुसार कोकणात समुद्र काठाला रहाणाऱ्या लोकांना समुद्रातील पाण्यात असलेल्या अतिरिक्त क्षारांचा सामना करावा लागतो. तर हिमालय कि गोद मे आयोडीनची कमतरता जाणवते. कारण तेथील पाण्यात नैसर्गिक अनुपलब्धतेमुळे आयोडीन मिळतच नाही.
जंगल असलेल्या ठिकाणी पाणी पडले तर ते पचायला हलके होते, तर चिखलमय, दलदल असलेल्या प्रदेशातील पाणी रोग निर्माण करणारे होते. विहिरीतील पाणी हितकर असते. पण तलाव नदी, सरोवर यातील पाणी अहितकर असते.
जसे जमिनी बद्दल सांगितले आहे तसे ऋतुबद्दल पण सांगितले आहे. ग्रीष्म आणि शरद या ऋतुमध्ये पडलेले आकाशीय जल हितकर असते. इतर ऋतुमधे पडलेले जल रोग वाढवणारे असते.
दिवसा नभातून पडलेले जल जास्त चांगले असते, तर रात्री पडणारे जल त्यामानाने वाईट असते.
जेवताना मधे मधे प्यायलेले पाणी पथ्यकर म्हणजेच सर्वांना हितकर असते. पण जेवणाच्या सुरवातीला आणि शेवट घेतलेले पाणी अहितकारक असते, असे शास्त्रकार सांगतात.
पाणी हे शेवटी पाणी असते. ते कुठे पडते यावर त्याचे अस्तित्व अवलंबून असते.
पाण्याचा थेंब मातीवर पडला तर भूमीत विरून जातो, पण तोच एक थेंब विशिष्ट शिंपल्यात पडला तर त्याचाच मोती बनून जातो.
शेवटी पात्र महत्वाचे !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
25.12.2016
जगभरात नेहमी आढळणारी व सर्व वयोगटातील लोकांची तक्रार म्हणजे घसा दुखणे. या दुखण्यामागची कारणे पण अनेक आहेत. सर्दीसायनसपासून कॅन्सरपर्यंत अनेक प्रकारच्या आजारात घसा दुखू शकतो. या बाबतीत योग्य निदान, वेळ न दवडता होणे महत्त्वाचे असते व त्याबरोबरच डॉक्टुरांकडून रुग्णाची काळजीपूर्वक तपासणी होणेदेखील महत्त्वाचे असते. घशात खूप वेदना जाणवणे, घसा कोरडा पडणेखवखवणेखाज सुटणे ही वरवर दिसणारी लक्षण आहेत. या आजारात काही रुग्णांचा कानही दुखू शकतो. अनेक लोकांना तोंड उघडे ठेवण्याची सवय असते. त्यामुळे श्वा सामुळे घसा कोरडा पडू शकतो. जिवाणू किंवा जिवाणूजन्य दाह, ऍलर्जी, अति प्रदूषण, अति धूळ किंवा घरात कचरा सांडणे, सिगारेटचा धूर, उदबत्तीचा उग्र वास किंवा उदबत्तीचा धूर, अति मोठ्याने बोलणे, घट्ट कॉलरचा शर्ट किंवा घट्ट टाय वापरणे, घशाला इजा होणे, घशाचा कॅन्सर, शरीरातील बिघाड किंवा काही प्रकारचे आजार; तसेच काही शस्त्रक्रिया किंवा तपासण्यांनंतर घसा दुखू शकतो. अतिरेकी मद्यपान, धूम्रपान, नाकाघशातून धूर जाणे, ऍसबेस्टॉस किंवा रासायनिक कारखान्यांमध्ये किंवा भट्टीजवळ काम करणे यामुळेसुद्धा घशाचे आजार संभवतात.
घसा दुखण्याचे एक नेहमीचे कारण म्हणजे ऍलर्जीक ऱ्हायनायटिस.
अनेकांना ऋतू बदलल्यावर किंवा विशिष्ट ऋतुमानात किंवा वर्षभरही त्रास होऊ शकतो.
जे धूम्रपान करीत नाहीत, (passive smoking) त्यांनाही त्रास होऊ शकतो.
डोळे, नाक व घशात खाज सुटू शकते, डोळे लाल होतात, पापण्यादेखील सुजतात.
काही औषधांमध्ये उदा सर्दीवरील गोळीमध्ये स्यूडो इफिड्रिन नावाचा एक घटक असतो. त्यामुळे रक्तदाब वाढू शकतो, मधुमेह वाढू शकतो, हृदयविकाराला आमंत्रण होऊ शकते. डॉक्टारांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे घेऊ नका.
योगशास्त्रामध्ये प्राणायाम, भास्त्रिका, काही ठराविक योगासने व जलनेती हे अत्यंत प्रभावी उपचार आहेत. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानेच ते करावेत.
काही रुग्णांना घशात गाठ असण्याची भावना होऊ शकते. आवाज बसतो, स्वरयंत्रणेचा दाह होतो, स्वरयंत्रणेच्या कूर्चा सूजतात.
अगदी घरगुती उपचारांमध्ये वाफारा घेणे, ज्येष्ठमधाची काडी चघळणे, कोमट पाणी पिणे, मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे असे करता येते.
विश्रांती, सकस आहार व योग्य औषधोपचार घेतल्यास आजाराची लक्षणे कमी होऊन पुढील कॉम्प्लिकेशन्स टाळता येतात.
मानेत गाठी येणे, ताप न जाणे, गिळताना किंवा जांभई देताना त्रास होणे, प्लिहा सूजणे, अति लाळ गळणे असा त्रास होत असल्यास लगेच वैद्यकीय सल्ला घेणे हितकारक असते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
आता आपण ओल्या नारळाचे घरगुती उपयोग पाहुयात:
१)कृमी मध्ये नारळाचे दुध १/२ कप सकाळी अनशापोटी प्यावे व नंतर तासाभराने एरंडेल तेल प्यावे.
२)हाता पायांना पडलेल्या भेगांवर चुन्याची निवळी+ एरंड तेल+ नारळाचे दुध हे मिश्रण घोटून मलम करावे व लावावे.
३)नारळाच्या खोबऱ्याच्या वड्या केशर,वेलची,जायफळ घालून कराव्या ह्या फुफ्फुसे बळकट करतात.
४)गोवा कोकण भागामध्ये नारळाचे दुध काढुन त्यात कोकम,मिरची,लसूण,मीठ घालून सोलकढी करतात जेवणानंतर शेवटी भातात मिसळून खाता ही पाचक असते.
५)ओले खोबरे व गुळ हे मिश्रण बल व बुद्धीवर्धक आहे.
६)किसलेले खोबरे व खोबरेल तेल एकत्र शिजवून त्याचा पोटीस हा सुज व मार लागलेल्या जागी बांधला असता वेदना कमी होतात.
७)ओल्या नारळाचा रस व शहाळ्याचे पाणी हे मिश्रण लघ्वी कमी होत असल्यास प्यावे ह्याने लघ्वी सुटायला मदत होते.
८)नारळाचे पाणी १ लिटर भर घ्यावे व काकवी सारखे होई पर्यंत आटवावे मग त्यात जायफळ,सुंठ,मिरी,वेलची,जायपत्री ह्यांची पुड घालून बाटलीत भरून ठेवावे हे मिश्रण पोटदुखी किंवा पोटात आग होत असल्यास १० मिली दिवसातून २ वेळेस सकाळ संध्याकाळी २ आठवडे घ्यावे.
(क्रमश:)
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती.)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजं जी!हे गाणे प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात घर करून बसलेले.तसेच उन्हाळ्याच्या दिवसात मिळणारी हि रसरशीत जांभळे देखील आपल्या प्रत्येकाच्याच मनात घरकरून आहेत.मीठ लावून हि जांभळे उन्हाळ्यात चोखून लाळ घोटत खाणे म्हणजे एका अभूतपूर्व सुखांची अनुभूतीच जणू.
ह्याचा १०० फूट उंच वृक्ष असतो.ह्याची पाने ३-६ इंच लांब भालाकार,स्निग्ध,चमकदार असतात.फुले हिरवी सफेद सुगंधित असतात.फळ १/२-११/२ इंच लांब ,अंडाकार असते.हे कच्चे असताना हिरवे व पिकल्यावर जांभळे होते त्याच्या आत मोठी टणक बी असते.
जांभुळ हे चवीला तुरट,गोड,आंबट असते व थंड गुणाचे असते.त्यामुळे ते शरीरातील कफ व पित्त हे दोष कमी करते व वात दोष वाढविते.
जशी हि जांभळे खायला छान लागतात तसेच ह्यांचे बरेच औषधी उपयोग देखील आहेत ते आपण पाहूयात.
१)अंगाची आग होत असल्यास जांभळाचा शिरका (अर्थात जांभळाचा आंबवलेला रस) तीळ तेलात मिसळून अंगाला लावावा.
२)डायबेटिस मध्ये रक्त व लघवीतील साखर नियंत्रणात ठेवायला जांभळाच्या बियांचे चुर्ण सकाळी व रात्री १-१ चमचा रिकामी पोटी घ्यावे.
३)जाभळाच्या कच्च्या फळाच्या रसात मीठ घालून गुळण्या केल्यास दातहलणे,हिरड्या सैल होणे,तोंड येणे,तोंडातून रक्त स्त्राव होणे ह्या तक्रारी कमी होतात.
४)जुलाब होत असल्यास अथवा संडास मधून आव पडत असल्यास जांभळाच्या कच्च्या फळाचा रस १/२ कप + १ ग्लास ताक हे मिश्रण थोडे थोडे दिवसातून ३-४ वेळा प्यावे.
५)भुक न लागणे,तोंडाला चव नसणे,ह्यात पिकलेल्या जांभळाचा रस १ कप+ १ मोठा चमचा आल्याचा रस +१/४ चमचा काळी मिरीपूड हे मिश्रण २१ दिवस जेवणापुर्वी घ्यावे.
जांभळे खाण्याचा अतिरेक केल्यास बध्दकोष्ठाचा त्रास होऊ शकतो.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
काल प्रख्यात टीव्ही चॅनलचे आमंत्रण आले म्हणून कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सभागृहात गेलो. विषय नागपूरमध्ये होणाऱ्या नगरपालिका निवडणुका होता. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, स्वतंत्र विदर्भ, व बसपा यांचे मातब्बर नेते आपली बाजू मांडत होते, तसेच दुसऱ्या पक्षाने या शहराची कशी वाट लावली, हे सांगण्याचा त्यांचा प्रत्येक वाक्यात भर होता.
भाजप आम्ही मेट्रो या शहरात आणली, तसेच आता इथेनॉल वर चालणाऱ्या 50 बसेस आणणार आहोत, असे सांगत होते. त्याला उत्तर देताना काँग्रेस नेते म्हणाले आम्ही आमच्या सत्तेच्या काळात 300 बसेस या शहराला दिल्या, सरासरी या बसेसचे आयुष्य 15 वर्षे असायला पाहिजे, परंतु 8-9 वर्षांतच त्यातील जवळपास 200 बसेस मोडकळीस आल्या, आणि फक्त 95-100 चालू स्थितीत आहेत, याला सत्ताधारी पक्ष जबाबदार आहे.
गोष्ट अगदी बरोबर आहे, जवळपास 200 बसेस मोडकळीस आलेल्या अवस्थेत आहेत हे मान्य करावेच लागेल. त्या का नादुरुस्त अवस्थेत आहेत याची करणे दिल्यास, हे सर्वाना लक्षात येईल कि, सामान्य जनता या सुविधा देण्याच्या लायकीचीच नाही, हे शब्द जरी कठोर असतील, पण हे सत्य आहे, कि या लोकांना कोणतीही चांगली वस्तू द्या त्याची वाट लावण्यातच या लोकांना आनंद मिळतो.
नागपूरमध्ये सिटीबस ला स्टारबस या नावाने ओळखले जाते, यातील ज्या गाड्या नादुरुस्त आहेत त्याच्यावर नजर फिरवलीतर लक्षात येईल, कि बहुतेक गाड्यांच्या काचा फुटलेल्या आहेत, हे कृत्य नतद्रष्ट लोकांनी दगडफेकीत केलेले आहे, तसेच सर्व गाड्यांच्या सीट्सचे फोम फाडून त्यातील स्पंज प्रवासी लोकांनी गायब केलेला आहे, तसेच सीट च्या फ्रेम वाकवलेल्या आहेत. काही बसेस जळलेल्या आहेत, ह्या कुणी जाळल्या, हे पहिले तर लक्ष्यात येईल, कि झोपडपट्टीतील, किव्वा शहरातील काही भाग जिथे असामाजिक माणसे जगतात, त्या भागात दंगल अथवा खून झाला कि, त्याचा राग सरकारी वहानांच्यावर निघतो, आणि ती जाळण्यात येतात. आजपर्यंत ज्या लोकांनी हि कृत्ये केली त्यातील एकही तुरुंगात खडी फोडण्यास गेला नाही, कारण यांना वरील उपस्थित कोणत्या ना कोणत्या पक्षाचे पाठबळ मिळालेले असते, आणि म्हणूनच हे मग्रूर लोक असे कृत्य करून ताठ मानेने समाजात फिरत आहेत. काही वर्षातच सुरु होणाऱ्या मेट्रोच्या डब्यात लोक खर्रा खाऊन, थुंकून कोपरे लाल करतील, सीट फाडतील, तसेच काचा फोडतील असे झाल्यास नवल वाटायला नको.
स्वच्छ नागपूर या विषयावर चर्चा करताना पक्ष कार्यकर्त्यांनी सभागृहाचे भान न ठेवता बाचाबाची, सुरु केली, आणि कार्यक्रम जवळजवळ बंदच करण्याची वेळ आली. स्वच्छ भारत अंतर्गत पंतप्रधानांनी मागेल त्याला संडास देण्याचे कबूल केले, आणि तसे देण्यास सुरवातही केली, यासाठी मी कार्यक्रमात शासनाला मदत करण्याचा प्रयत्न केला, यात जी वस्तुस्थिती माझ्या समोर आली, त्याची कथा वाचल्यास सुजाण नागरिकांच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही.
जनधन योजनेअंतर्गत प्रत्येक दारिद्र्य रेषेखालील लोकांचे शून्य पैसे भरून खाते उघडण्यात आले, या खात्यात, ज्यांना संडास हवे असतील त्यांच्याकडून आधार कार्ड, पासबुक यांची प्रत मागवून त्यात सरकारने रु 8000, पहिला हप्ता म्हणून भरले, अट हि कि, त्यांनी संडास बांधावेत, व संडास पूर्ण बांधून झाल्यावर उरलेले 8000 दुसऱ्या हप्त्यात जमा होणार. 85 टक्के लोकांनी हलकट वृत्ती दाखवत, पहिल्या हप्त्याचे जनधन खात्यात भरलेले रु 8000 खाऊन टाकले, वरती सरकारी अधिकाऱ्यांना तोंड वर करून सांगत होते कि, आम्हाला माहीतच न्हवते संडास बांधण्यासाठीचे हे पैसे आहेत. याना हे सर्व शिकवणारे अर्थात बोलावते धनी वेगळेच होते हे सांगायची गरज नाहीच.
नागपूर महानगरपालिकेने मग निर्णय बदलून, स्वतःच संडास बांधून देण्याचे ठरवले, त्या प्रमाणे फायबर (FRP) चे बनवलेले संडास लाऊन देण्याचे ठरले, व टेंडर पद्धतीने असे संडास लावण्याच्या निविदा काढल्या. हे संडास लागले, परंतु पुढच्या दोन दिवसात सर्व शौचगृहांचे दरवाजे रात्रीत तोडून गायब करण्यात आले, संडासच्या छिद्रात दगडे, विटा टाकण्यात आल्या. किती नतद्रष्टेपणा या लोकांच्यात ठासून भरलेला आहे याची हि उदाहरणे आहेत, आज परत ही सर्व मंडळी लोटा घेऊन रस्त्याकडेला, किव्वा रानात जातात. सर्वात प्रथम हंटरने याना फोडून काढले पाहिजे, हेच लोक समाजातील मुख्यप्रवाहात सामील होण्यास तयार नाहीत, असे लोक आर्थिक मागासलेले नाहीत, कारण बहुतेकांच्या घरात टीव्ही आहे, डिश अँटेना अनेक घराच्या छतावर दिसतात, मोटरसायकल आहे, तर मानसिक दिवाळखोरीत जगत आहेत, त्यांना तसेच राहण्यातच समाधान आहे. नागपूर हे एक उदाहरण आहे, अश्या घाणेरड्या वृत्तीची लोक भारताच्या प्रत्येक शहरात ठासून भरलेले आहेत, त्यामुळे सगळीकडची परिस्थिती कमीअधिक प्रमाणात सारखीच असणार आहे.
मुळात आपल्या देशात सुजाण, सुसंकृत, पिढी तयार करण्यासाठी प्रयत्नच होत नाहीत, हेच खरे दुर्दैव आहे. या देशात जवळ जवळ सर्व जातीचे लोक, आम्ही कसे मागास, उपेक्षित, गरीब, दुबळे आहोत, हे सांगण्यात एकमेकांवर कुरघोडी करताना दिसतात, असा देश प्रगत होण्याची चिन्हे येणाऱ्या पन्नास वर्षातही दिसणार नाहित.
सकाळी लोट्या सोबत स्मार्ट फोन घेऊन लोक वावरात जातील, यालाच स्मार्ट सिटी/शहर, म्हणायचे का?
-- विजय लिमये
देहिनः अस्मिन्यथा देहे कौमारं यौवनं जरा |
तथा देहांतर प्राप्तिः धीरः तत्र न मुह्यति ||२:१३||
देहिन:: देहधारि आत्म्याला, अस्मिन् :: यात, देहे :: शरीरामध्ये, कौमारम् :: बालपण, यौवनं :: तारुण्य, जरा :: म्हातारपण, देहान्तर :: देहाचे स्थित्यंतर, धीर: :: धैयवान पुरूष, न मुह्यति :: मोहित होत नाही.
येथे धैर्यवान माणूस म्हणजे, विवेकी, ज्ञानी माणूस असा घ्यावयाचा आहे.
श्री भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांचं विवेचन :: ज्या प्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात, बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यातून म्हातारपणात जात असतो, त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसर्या देहात प्रवेश करतो. अशा स्थित्यंतरामुळे धैर्यवान माणूस गोंधळून जात नाही. थोडक्यात म्हणजे, जन्मानंतर बालपण, नंतर तरूणपण, नंतर म्हातारपण अशा तीनही अवस्थात तोच आत्मा राहतो. मृत्यूनंतर तो दुसर्या शरीरात प्रवेश करून नवीन शरीर धारण करतो.
श्रीस्वामी रामसुखदासजी यांचं विवेचन : ‘शरीर धारण करणार्याच्या शरीरामध्ये’ असं म्हणण्यानं सिध्द होतं की शरीर वेगळं आहे आणि शरीरी (शरीर धारण करणारा...आत्मा, जीव, जीवात्मा) वेगळा आहे. शरीरी द्रष्टा आहे आणि शरीर दृष्य आहे. म्हणून बाल्यावस्था, तारुण्य आणि म्हातारपण हे शरीराला आहे, शरीरीला (आत्म्याला) नाही. शरीराच्या अवस्थातील बदलाविषयी कुणी शोक करीत नाही तर मग शरीराच्या मृत्यूनंतर, आत्मा अेका शरीरातून दुसर्या शरीरात जातो त्यासाठी शोक का करावा? ज्ञानी व्यक्तीला सत् आणि असत् याचं पूर्ण ज्ञान असल्यामुळे, आत्म्याच्या स्थानांतराच्या विषयानं तो मोहित होत नाही किंवा त्याला कोणताही संदेह रहात नाही.
श्रीसंत ज्ञानेश्वरांनी दिलेला ओवीबध्द अर्थ : आइके शरीर तरी एक । परी वयसाभेदे (वयपरत्वे) अनेक ।। हे प्रत्यक्षचि देख । प्रमाण तू ।। एथ कौमारत्व दिसे । मग तारुण्यी ते भ्रंशे ।। परी देहचि हा न नाशे । एकेकासवे ।। तैसी चैतन्याच्या ठायी । इये शरीरांतरे होती जाती पाही ।। ऐसे जाणे तया नाही । व्यामोहदु:ख ।।
लोकमान्य टिळकांनी, गीता रहस्यात केलेलं भाष्य :: देह धारण करणार्यास, या देहात ज्याप्रमाणे बालपण, तरूणपण आणि म्हातारपण (प्राप्त होतं) त्या प्रमाणेच (पुढे) दुसरा देह प्राप्त होत असतो. (म्हणून) या बाबतीत ज्ञानी पुरूष मोह पावत नाहीत.
आचार्य विनोबा भावे, गीताअीत सांगतात :: या देही बाल्य तारुण्य जरा वा लाभते जशी । तसा लाभे नवा देह न डगे धीर तो तिथे ।।
विज्ञानीय दृष्टीकोनातून अन्वयार्थ :: विज्ञानीय दृष्टीकोनातून विचार केल्यास असं अनुमान निघतं की, सजीवाच्या तीन नव्हे तर चार अवस्था आहेत.
१. गर्भावस्था २. बाल्यावस्था ३. तारुण्यावस्था आणि ४. वृध्दावस्था
आनुवंशिक तत्व म्हणजे सृजनशील तत्व (जेनेटिक मटेरियल) असल्याशिवाय सजीवांचं शरीर निर्माण होअू शकत नाही. सजीवाच्या जिवंत पेशीत असलेल्या केंद्रकात हे आनुवंशिक तत्व असतं. या अनुवंशिक तत्वाचा संच, गर्भधारणा झाल्यापासून मरेपर्यंत तोच असतो. हाच आत्मा.
गर्भधारणा होते, तीच वेळ अपत्याची जन्मवेळ असते. जन्मापासून मरेपर्यंत, सजीवाच्या अब्जअब्जावधी पेशी मरतात आणि तितक्याच निर्माणही होतात. गर्भावस्थेत आणि बाल्यावस्थेत, मरणार्या पेशींच्या संख्ये पेक्षा निर्माण होणार्या पेशींची संख्या जास्त असते. म्हणून शरीराची वाढ झालेली असते. तारुण्यावस्थेत, ही संख्या सारखीच असते म्हणून शरीराची वाढ स्थिर असते तर वृध्दावस्थेत, मरणार्या पेशींची संख्या, निर्माण होणार्या पेशींच्या संख्येपेक्षा जास्त होअू लागते म्हणून शरीर थकतं. ही संख्या खूपच वाढली तर शरीराचे अवयव काम करीनासे होतात आणि शरीर अचेतन होतं..मरतं.
पूर्वी असा समज होता की, गर्भ, आअीच्या शरीराबाहेर आला आणि नाळ कापली गेली म्हणजे अपत्याचा जन्म झाला. म्हणून गीतेच्या या श्लोकात गर्भावस्थेला स्थान दिलं गेलं नाही. पण आअीच्या गर्भाशयात असतांना देखील, त्याचं नाळेद्वारा, आअीनं घेतलेल्या आहारामुळे, त्याचं पोषण होत असतं याची पुरेपूर कल्पना आपल्या पूर्वज विचारवंतांना होती
शुक्राणू (पित्याकडील आनुवंशिक तत्वाचा अर्धा संच २३ गुणसूत्रं) आणि बीजांडात (मातेकडील आनुवंशिक तत्वाचा अर्धा संच २३ गुणसूत्रं) अशारितीने पित्याच्या पूर्वजांच्या अनेक पिढ्यातील तसेच मातेच्याही पूर्वजांच्या अनेक पिढ्यातील आनुवंशिक तत्व असते. गर्भधारणा झालेल्या गर्भपिंडाच्या आनुवंशिक तत्वात, ४६ गुणसूत्रं, आणि सुमारे ३० हजार जनुकं (पूर्ण संच) असतात आणि तेच,
सजीवांचे आनुवंशिक गुणावगुण पुढच्या पिढीत संक्रमित करतात. मूळ गर्भपेशीचं विभाजन होअून दोन पेशी होतात नंतर दोनाच्या चार, चाराच्या आठ अशा रीतीनं वाढ होअून ३८ आठवड्यात, पूर्ण वाढ झालेलं. सर्व अवयवं आणि इंद्रियं असलेलं मानवाचं बालक जन्माला येतं. त्याची वाढ होत असतांना कुमारावस्था असते,
अपत्य प्रजननक्षम झालं म्हणजे तारुण्यावस्था प्राप्त होते, शरीराची प्रजननक्षमता नाहीशी झाली म्हणजे वृद्धावस्था आली असं मानलं जातं. ही माहिती, शास्त्रज्ञांच्या संशोधनातून, निर्विवादपणं सिध्द झालेली आहे. विज्ञानाची पुस्तकं आणि संगणकीय महाजालावर ती अुपलब्ध आहे, अवश्य वाचावी.
1. गर्भावस्था : म्हणजे लौकिकार्थाने जन्म होण्यापूर्वीची अवस्था. गर्भधारणा होते त्याच क्षणी, शुक्राणू आणि बीजांडाच्या स्वरूपात, गर्भपिंडात आनुवंशिक तत्व म्हणजे चैतन्य...आत्मा आलेला असतो. या अवस्थेत मेंदूत, पंचेन्द्रियांची केन्द्रं तयार झालेली असली तरी त्यात कोणतीही माहिती साठविलेली नसते. पाट्या कोर्याच असतात. स्मृतीकेन्द्रात कोणतीच स्मृती साठविलेली नसल्यामुळे या अवस्थेतला काळ आपल्याला मुळीच आठवत नाही. म्हणूनच कदाचित या अवस्थेची दखल, या श्लोकात घेतली नसावी. तरी तो ’मी’ च होतो याची जाणीव असते. या अवस्थेत, गर्भाचं पोषण, दुसर्या शरीरानं, म्हणजे मातेच्या शरीरानं घेतलेल्या अन्नावर होत असते. तोंड असलं तरी त्यातून अन्न घेतलं न जाता ते नाळेतूनच घेतलं जाअून पोषण होतं. आअी हा वृक्ष, गर्भ हे फळ आणि बेंबी हा देठ अशी स्थिती असते.
या अवस्थेत, आअीवडिलाकडे (जनक पिढी) असलेले आनुवंशिक तत्व अपत्य पिढीत संक्रमित झालेलं असतं. हाच, आअीवडिलात असलेल्या आनुवंशिक तत्वाचा पुनर्जन्म.
2. बाल्यावस्था : गर्भाशयाबाहेर नाळेशिवाय जगण्याची अवस्था. निसर्गातून मिळणारा आहार घेअून शरीराची वाढ होत असते. ही प्रजननक्षमतेपूर्वीची अवस्था आहे. या अवस्थेत जननेन्द्रियं विकसित झालेली नसल्यामुळे, निसर्गाचा मूळ हेतू...प्रजनन…सृजन साध्य होअू शकत नाही.
3. तारुण्यावस्था : म्हणजे प्रजननक्षम असतांनाची अवस्था. ही अवस्था, नैसर्गिक दृष्ट्या अतिशय महत्वाची आहे. कारण या अवस्थेत, पुरूषात शुक्राणू आणि स्त्रीत बीजांडं तयार झालेली असतात. म्हणजेच, आनुवंशिक तत्व, जनक पिढीकडून अपत्यपिढीत संक्रमित होण्याचा निसर्गाचा हेतू साध्य होण्यासारखा असतो.. अपत्य प्रजननक्षम झाले म्हणजे विवाह होतो आणि पुढची पिढी जन्म घेते. प्रजननक्षमता असेपर्यंत त्या जोडप्याला मुलं होत राहतात. अशा रीतीनं दोन जिवंत शरीरातील आनुवंशिक तत्व तिसर्या जिवंत शरीरात प्रवेश करतं. ही क्रिया जिवंतपणीच होते, मेल्यानंतर नाही.
4. वृध्दावस्था : म्हणजे प्रजननक्षमता नाहीशी झालेली अवस्था.
सजीवाचं शरीर अचेतन झालं म्हणजे ... त्याचा मृत्यू झाला म्हणजे, त्यात असलेल्या आनुवंशिक तत्वासकट सगळं शरीर पर्यावरणात विलीन होतं. त्यातलं काहीही दुसर्या कोणत्याही शरीरात प्रवेश करीत नाही की जन्म घेत नाही. वैज्ञानिकांना हे सत्य चांगले माहित असल्यामुळे ते गोंधळून जात नाहीत.
सजीवाच्या या चारही अवस्थात, आनुवंशिक तत्वाचा तोच संच कायम असतो…. तोच या श्लोकात सांगितलेला....आत्मा.
-- गजानन वामनाचार्य
शनिवारचा सत्संग :: ५
शनिवार २४ डिसेंबर २०१६
सजीवांच्या शरीरातील आनुवंशिक तत्व
आत्म्याचा आनुवंशिक तत्व सिध्दांत
विज्ञानीय दृष्टीकोनातून भगवद् गीता : अध्याय २ : श्लोक १३
देहिनः अस्मिन्यथा देहे कौमारं यौवनं जरा |
तथा देहांतर प्राप्तिः धीरः तत्र न मुह्यति ||२:१३||
देहिन:: देहधारि आत्म्याला, अस्मिन् :: यात, देहे :: शरीरामध्ये, कौमारम् :: बालपण, यौवनं :: तारुण्य, जरा :: म्हातारपण, देहान्तर :: देहाचे स्थित्यंतर, धीर: :: धैयवान पुरूष, न मुह्यति :: मोहित होत नाही.
येथे धैर्यवान माणूस म्हणजे, विवेकी, ज्ञानी माणूस असा घ्यावयाचा आहे.
श्री भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांचं विवेचन :: ज्या प्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात, बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यातून म्हातारपणात जात असतो, त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसर्या देहात प्रवेश करतो. अशा स्थित्यंतरामुळे धैर्यवान माणूस गोंधळून जात नाही. थोडक्यात म्हणजे, जन्मानंतर बालपण, नंतर तरूणपण, नंतर म्हातारपण अशा तीनही अवस्थात तोच आत्मा राहतो. मृत्यूनंतर तो दुसर्या शरीरात प्रवेश करून नवीन शरीर धारण करतो.
श्रीस्वामी रामसुखदासजी यांचं विवेचन : ‘शरीर धारण करणार्याच्या शरीरामध्ये’ असं म्हणण्यानं सिध्द होतं की शरीर वेगळं आहे आणि शरीरी (शरीर धारण करणारा...आत्मा, जीव, जीवात्मा) वेगळा आहे. शरीरी द्रष्टा आहे आणि शरीर दृष्य आहे. म्हणून बाल्यावस्था, तारुण्य आणि म्हातारपण हे शरीराला आहे, शरीरीला (आत्म्याला) नाही. शरीराच्या अवस्थातील बदलाविषयी कुणी शोक करीत नाही तर मग शरीराच्या मृत्यूनंतर, आत्मा अेका शरीरातून दुसर्या शरीरात जातो त्यासाठी शोक का करावा? ज्ञानी व्यक्तीला सत् आणि असत् याचं पूर्ण ज्ञान असल्यामुळे, आत्म्याच्या स्थानांतराच्या विषयानं तो मोहित होत नाही किंवा त्याला कोणताही संदेह रहात नाही.
श्रीसंत ज्ञानेश्वरांनी दिलेला ओवीबध्द अर्थ : आइके शरीर तरी एक । परी वयसाभेदे (वयपरत्वे) अनेक ।। हे प्रत्यक्षचि देख । प्रमाण तू ।। एथ कौमारत्व दिसे । मग तारुण्यी ते भ्रंशे ।। परी देहचि हा न नाशे । एकेकासवे ।। तैसी चैतन्याच्या ठायी । इये शरीरांतरे होती जाती पाही ।। ऐसे जाणे तया नाही । व्यामोहदु:ख ।।
लोकमान्य टिळकांनी, गीता रहस्यात केलेलं भाष्य :: देह धारण करणार्यास, या देहात ज्याप्रमाणे बालपण, तरूणपण आणि म्हातारपण (प्राप्त होतं) त्या प्रमाणेच (पुढे) दुसरा देह प्राप्त होत असतो. (म्हणून) या बाबतीत ज्ञानी पुरूष मोह पावत नाहीत.
आचार्य विनोबा भावे, गीताअीत सांगतात :: या देही बाल्य तारुण्य जरा वा लाभते जशी । तसा लाभे नवा देह न डगे धीर तो तिथे ।।
विज्ञानीय दृष्टीकोनातून अन्वयार्थ :: विज्ञानीय दृष्टीकोनातून विचार केल्यास असं अनुमान निघतं की, सजीवाच्या तीन नव्हे तर चार अवस्था आहेत.
१. गर्भावस्था २. बाल्यावस्था ३. तारुण्यावस्था आणि ४. वृध्दावस्था
आनुवंशिक तत्व म्हणजे सृजनशील तत्व (जेनेटिक मटेरियल) असल्याशिवाय सजीवांचं शरीर निर्माण होअू शकत नाही. सजीवाच्या जिवंत पेशीत असलेल्या केंद्रकात हे आनुवंशिक तत्व असतं. या अनुवंशिक तत्वाचा संच, गर्भधारणा झाल्यापासून मरेपर्यंत तोच असतो. हाच आत्मा.
गर्भधारणा होते, तीच वेळ अपत्याची जन्मवेळ असते. जन्मापासून मरेपर्यंत, सजीवाच्या अब्जअब्जावधी पेशी मरतात आणि तितक्याच निर्माणही होतात. गर्भावस्थेत आणि बाल्यावस्थेत, मरणार्या पेशींच्या संख्ये पेक्षा निर्माण होणार्या पेशींची संख्या जास्त असते. म्हणून शरीराची वाढ झालेली असते. तारुण्यावस्थेत, ही संख्या सारखीच असते म्हणून शरीराची वाढ स्थिर असते तर वृध्दावस्थेत, मरणार्या पेशींची संख्या, निर्माण होणार्या पेशींच्या संख्येपेक्षा जास्त होअू लागते म्हणून शरीर थकतं. ही संख्या खूपच वाढली तर शरीराचे अवयव काम करीनासे होतात आणि शरीर अचेतन होतं..मरतं.
पूर्वी असा समज होता की, गर्भ, आअीच्या शरीराबाहेर आला आणि नाळ कापली गेली म्हणजे अपत्याचा जन्म झाला. म्हणून गीतेच्या या श्लोकात गर्भावस्थेला स्थान दिलं गेलं नाही. पण आअीच्या गर्भाशयात असतांना देखील, त्याचं नाळेद्वारा, आअीनं घेतलेल्या आहारामुळे, त्याचं पोषण होत असतं याची पुरेपूर कल्पना आपल्या पूर्वज विचारवंतांना होती
शुक्राणू (पित्याकडील आनुवंशिक तत्वाचा अर्धा संच २३ गुणसूत्रं) आणि बीजांडात (मातेकडील आनुवंशिक तत्वाचा अर्धा संच २३ गुणसूत्रं) अशारितीने पित्याच्या पूर्वजांच्या अनेक पिढ्यातील तसेच मातेच्याही पूर्वजांच्या अनेक पिढ्यातील आनुवंशिक तत्व असते. गर्भधारणा झालेल्या गर्भपिंडाच्या आनुवंशिक तत्वात, ४६ गुणसूत्रं, आणि सुमारे ३० हजार जनुकं (पूर्ण संच) असतात आणि तेच,
सजीवांचे आनुवंशिक गुणावगुण पुढच्या पिढीत संक्रमित करतात. मूळ गर्भपेशीचं विभाजन होअून दोन पेशी होतात नंतर दोनाच्या चार, चाराच्या आठ अशा रीतीनं वाढ होअून ३८ आठवड्यात, पूर्ण वाढ झालेलं. सर्व अवयवं आणि इंद्रियं असलेलं मानवाचं बालक जन्माला येतं. त्याची वाढ होत असतांना कुमारावस्था असते,
अपत्य प्रजननक्षम झालं म्हणजे तारुण्यावस्था प्राप्त होते, शरीराची प्रजननक्षमता नाहीशी झाली म्हणजे वृद्धावस्था आली असं मानलं जातं. ही माहिती, शास्त्रज्ञांच्या संशोधनातून, निर्विवादपणं सिध्द झालेली आहे. विज्ञानाची पुस्तकं आणि संगणकीय महाजालावर ती अुपलब्ध आहे, अवश्य वाचावी.
1. गर्भावस्था : म्हणजे लौकिकार्थाने जन्म होण्यापूर्वीची अवस्था. गर्भधारणा होते त्याच क्षणी, शुक्राणू आणि बीजांडाच्या स्वरूपात, गर्भपिंडात आनुवंशिक तत्व म्हणजे चैतन्य...आत्मा आलेला असतो. या अवस्थेत मेंदूत, पंचेन्द्रियांची केन्द्रं तयार झालेली असली तरी त्यात कोणतीही माहिती साठविलेली नसते. पाट्या कोर्याच असतात. स्मृतीकेन्द्रात कोणतीच स्मृती साठविलेली नसल्यामुळे या अवस्थेतला काळ आपल्याला मुळीच आठवत नाही. म्हणूनच कदाचित या अवस्थेची दखल, या श्लोकात घेतली नसावी. तरी तो ’मी’ च होतो याची जाणीव असते. या अवस्थेत, गर्भाचं पोषण, दुसर्या शरीरानं, म्हणजे मातेच्या शरीरानं घेतलेल्या अन्नावर होत असते. तोंड असलं तरी त्यातून अन्न घेतलं न जाता ते नाळेतूनच घेतलं जाअून पोषण होतं. आअी हा वृक्ष, गर्भ हे फळ आणि बेंबी हा देठ अशी स्थिती असते.
या अवस्थेत, आअीवडिलाकडे (जनक पिढी) असलेले आनुवंशिक तत्व अपत्य पिढीत संक्रमित झालेलं असतं. हाच, आअीवडिलात असलेल्या आनुवंशिक तत्वाचा पुनर्जन्म.
2. बाल्यावस्था : गर्भाशयाबाहेर नाळेशिवाय जगण्याची अवस्था. निसर्गातून मिळणारा आहार घेअून शरीराची वाढ होत असते. ही प्रजननक्षमतेपूर्वीची अवस्था आहे. या अवस्थेत जननेन्द्रियं विकसित झालेली नसल्यामुळे, निसर्गाचा मूळ हेतू...प्रजनन…सृजन साध्य होअू शकत नाही.
3. तारुण्यावस्था : म्हणजे प्रजननक्षम असतांनाची अवस्था. ही अवस्था, नैसर्गिक दृष्ट्या अतिशय महत्वाची आहे. कारण या अवस्थेत, पुरूषात शुक्राणू आणि स्त्रीत बीजांडं तयार झालेली असतात. म्हणजेच, आनुवंशिक तत्व, जनक पिढीकडून अपत्यपिढीत संक्रमित होण्याचा निसर्गाचा हेतू साध्य होण्यासारखा असतो.. अपत्य प्रजननक्षम झाले म्हणजे विवाह होतो आणि पुढची पिढी जन्म घेते. प्रजननक्षमता असेपर्यंत त्या जोडप्याला मुलं होत राहतात. अशा रीतीनं दोन जिवंत शरीरातील आनुवंशिक तत्व तिसर्या जिवंत शरीरात प्रवेश करतं. ही क्रिया जिवंतपणीच होते, मेल्यानंतर नाही.
4. वृध्दावस्था : म्हणजे प्रजननक्षमता नाहीशी झालेली अवस्था.
सजीवाचं शरीर अचेतन झालं म्हणजे ... त्याचा मृत्यू झाला म्हणजे, त्यात असलेल्या आनुवंशिक तत्वासकट सगळं शरीर पर्यावरणात विलीन होतं. त्यातलं काहीही दुसर्या कोणत्याही शरीरात प्रवेश करीत नाही की जन्म घेत नाही. वैज्ञानिकांना हे सत्य चांगले माहित असल्यामुळे ते गोंधळून जात नाहीत.
सजीवाच्या या चारही अवस्थात, आनुवंशिक तत्वाचा तोच संच कायम असतो…. तोच या श्लोकात सांगितलेला....आत्मा.
-- गजानन वामनाचार्य
शनिवारचा सत्संग :: ५
शनिवार २४ डिसेंबर २०१६
सजीवांच्या शरीरातील आनुवंशिक तत्व
आत्म्याचा आनुवंशिक तत्व सिध्दांत
विज्ञानीय दृष्टीकोनातून भगवद् गीता : अध्याय २ : श्लोक १३
कधी कधी मधुमेहात काही लोकांचे स्नायू दुखतात, खांद्यांचा त्रास होतो
स्नायू असोत की हाडं, दुखण्याची संवेदना मज्जातंतूंमार्फत होते आणि मधुमेहात मज्जातंतूंना इजा होते हे सर्वश्रुत आहे. पण मधुमेहात स्नायू दुखण्यामागे केवळ हेच कारण नसते. रक्तातली ग्लुकोज वाढल्यावरही थकल्यासारखं, स्नायू अवघडल्यासारखं वाटतं.
स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या चोंदल्या तर त्यांचा रक्तपुरवठा बंद पडतो आणि स्नायूंचा अल्पसा भाग मृत होतो. याला मस्क्युलर इन्फाक्र्शन म्हणतात. स्नायूंच्या आकुंचन-प्रसरणात अडथळा व्हायला लागला की स्नायू दुखतात. याशिवाय ‘ड’ जीवनसत्त्व कमी झाल्यावर तसंच कोलेस्टेरॉलसाठी दिल्या जाणाऱ्या विशिष्ट औषधांनी अंग दुखतं.
खांद्याच्या सांध्यात मधुमेहामुळे जे बदल होतात त्याने खांद्यांचा त्रास होतो. यात हात वर उचलणं कठीण होतं. उचलताना चांगलंच दुखतं. आम्ही याला फ्रोझन शोल्डर म्हणतो. एकदा सुरू झाला की भरपूर त्रास देतो. दंडाच्या स्नायूमधलं दुखणं आणि फ्रोझन शोल्डर यात फरक करणं जरुरीचं असतं. खांद्याच्या सांध्यात हात वर-खाली करताना दुखतं तर स्नायूत त्या कुशीवर झोपल्यावर दुखतं. दोहोंचे उपचार पूर्णत: भिन्न आहेत. फ्रोझन शोल्डरमध्ये व्यायामावर भर असतो तर दुखरा स्नायू औषधांमुळे बरा करता येतो.
स्नायूंचे किंवा हाडांचे इतर काही प्रश्न मधुमेहात संभवतात का?
मधुमेहाचा हल्ला शरीरात अनेक ठिकाणी होत असल्याने वेगवेगळे स्नायू तसेच सांधे किंवा हाडं त्रास देऊ शकतात. एकतर मधुमेहात हाडं ठिसूळ होतात. त्यांच्यामधलं कॅल्शियम कमी होतं, ‘ड’ जीवनसत्त्वही कमी पडतं. त्याचा परिणाम हाडं कमजोर होण्यावर होतो. अशी ठिसूळ हाडं पटकन मोडतात. शिवाय अनेकांना पायोग्लिटाझोन नावाचं औषध चालू असतं. त्या औषधाने हाडांच्या मजबुतीवर विपरीत परिणाम होतो. म्हणूनच मधुमेहात हाड तुटण्याचा प्रकार लवकर व अधिक प्रमाणात होतो.
सांध्यांची हालचाल करणाऱ्या स्नायूंना मधुमेहाचा फटका बसला की सांधे आपलं काम नीट करू शकत नाहीत. नमस्कारासाठी हात जोडताना दोन्ही हातांचे तळवे एकमेकांशी व्यवस्थित न जुळणं, मनगट नीट न वळवता येणं, मूठ उघडताना हाताची बोटं पटकन सरळ न होणं (ट्रिगर फिगर), पावलाच्या एकंदर जडणघडण बदलणं अशा बऱ्याच समस्यांना मधुमेहींना तोंड द्यावं लागतं. पावलांची जडणघडण बदलल्यावर पुढे मोठे प्रश्न उभे राहू शकतात. पावलांच्या कमकुवत भागांवर अख्ख्या शरीराचं वजन पडलं तर पायाला जखम होते आणि प्रसंगी पाय कापण्यापर्यंत पाळी जाऊ शकते.
असे पाय कापले जाऊ नयेत म्हणून काय केलं पाहिजे?
मधुमेहात बहुधा पाय कापले जातात ते त्यांचा रक्तपुरवठा कमी झाल्यावर. परंतु पायाला होणाऱ्या जखमा होतात मज्जातंतूंना इजा झाल्यामुळे. अर्थात अशी इजा होण्यात पावलाच्या एकंदर घडणीचा महत्त्वाचा वाटा असतो. आपलं सगळं वजन तोलणारा पावलाचा भाग बहुधा दुर्लक्षित राहतो. किमान जितके आपण आपले हात निरखून पाहतो तितकं पायाकडे लक्ष देत नाही. मधुमेही मंडळीनी हे निश्चितपणे टाळायला हवं. पावलाच्या आकारात पडणारा फरक जेवढय़ा लवकर तुम्ही डॉक्टरांच्या नजरेस आणून द्याल तितकं बरं. कारण पावलाच्या अयोग्य जागी वजन पडायला लागलं की पुढच्या प्रश्नांची मालिका सुरू होते. वैद्यकीय भाषेत याला चेंजिंग प्रेशर पॉइंट असं म्हणतात. हे व्हायला देता नये. दुर्दैवानं तसं झालंच तर त्वरित आपल्या गरजेनुसार बूट बनवून घेऊन पुढचा अनर्थ टाळता येऊ शकतो. इथं गरजेनुसार हा शब्द खूपच महत्त्वाचा आहे. बाजारात मधुमेहासाठी म्हणून विकले जाणारे बूट सरसकट सगळ्यांनाच उपयोगी पडत नाहीत हे लक्षात यावं यासाठी हे सांगणं.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. डॉ. सतीश नाईक
आपण सेवन करत असलेल्या त्रिफळा चुर्णामध्ये देखील हरडा व बेहड्या सोबत आवळा असतो.
आवळ्याचे २०-२५ फूट उंच वृक्ष असतो.ह्याची पाने चिंचेच्या पानांप्रमाणे असतात व ह्याला पिवळी फुले गुच्छ स्वरूपात येतात.फळे गोलाकार,मांसल पिवळसर हिरवी व आत टणक बी असणारी असतात.
ह्याच्यात खारट सोडुन बाकी पाच ही चवी असतात व त्यात आंबट चव प्रमुख असते.हा थंड गुणाचा असून तो तिन्ही दोषांचे शमन करतो.
आता आवळ्याचे घरगुती उपयोग पाहूया:
१)ज्या बायकांना अंगावर पांढरे जाते त्यांनी आवळ्याच्या बिया पाण्यात वाटून त्यात साखर व मध घालून सलग तीन दिवस घ्याव्या.
२)खरूज झाल्यास आवळ्याचे चुर्ण जाळून त्याची राख करावी व ती तीळ अथवा निंब तेलामध्ये कालवून लावावी.
३)घसा बसला असल्यास गाईच्या दुंधात आवळ्याचे चुर्ण मिसळून द्यावे.
४)अम्लपित्तामध्ये आवळ्याचे चुर्ण केळीच्या कांद्याच्या रसामध्ये मिसळून द्यावे.
५)नाकाचा घोळणा फुटून रक्तस्राव होत असल्यास व डोके वारंवार दुखत असल्यास आवळ्याचे चुर्ण तुप व साखर घालून खावे.
६)पित्याच्या विकारामध्ये आवळ्याचे ५ ग्राम चुर्ण कल्हई केलेल्या भांड्यात रात्रभर भिजत ठेवावे व सकाळी हे त्यात ५० मिली गाईचे दुध मिसळून ते प्यावे.
७)१ चमचा आवळा रस+ २ चमचे ओल्या हळदीचा रस सकाळी उपाशी पोटी घेतल्यास मधुमेहामध्ये फायदा होतो.
८)१ चमचा आवळा रस+ ४मोठे चमचे नारळाचे दुध रोज दुपारी जेवणापुर्वी घेतल्यास कृमिंचा त्रास कमी होतो.
९)१ चमचा आवळा रस+२ चमचे केळफूलाचा रस रोज २ महीने घेतल्यास बायकांचे अंगावर पांढरे जाणे,मासिक पाळीच्या वेळी अतिरक्तस्त्राव होणे ह्या तक्रारी कमी होतात.
१०)१ चमचा आवळा चुर्ण १ कप ताज्या ताकामध्ये मिसळून रोज जेवणानंतर घेतल्यास हाता पायाची आग होणे,संडासच्या जागी होणारी आग ह्या तक्रारी कमी होतात.
आवळा किती ही चांगला असला तरी तो अति खाल्ल्यास जुलाब होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
हॉटेलमध्ये गेल्यावर आपण बऱ्याचदा पनीर असलेल्या पदार्थांची ऑर्डर देतो. कारण पनीरचे सर्वच पदार्थ खूप चविष्ट असतात. मांस न खाणाऱ्या अनेक लोकांची पहिली पसंती पनीरच असते. पनीर प्रोटिनयुक्त असल्याने ते आरोग्यदायी आहे. पनीर हा चव आणि आरोग्य यांचा अप्रतिम संगम आहे.
प्रोटिनचा सर्वोत्तम स्रोत
काही शाकाहारी लोक मांस खात नाहीत, त्यामुळे त्यांच्यासाठी पनीर हा प्रोटिन्स मिळवण्याचा चांगला स्रोत आहे. 100 ग्रॅम पनीरमधून 18 ग्रॅम प्रोटिन्स मिळतात. यामुळे स्नायू बळकट होतात आणि वजन कमी होण्यासही मदत होते.
भुकेवर नियंत्रण राहते
पनीरमध्ये प्रोटिन्स असल्याने ऊर्जा हळूहळू वापरली जाते. यामुळे रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रित राहते. तसेच ती झटकन वाढून कमी देखील होत नाही. त्यामुळे पनीर असलेले पदार्थ खाल्याने बराच वेळ भुकेवर नियंत्रण राहते.
दात मजबूत होतात
पनीरमध्ये प्रोटिनबरोबरच कॅल्शियमही असते. यामुळे दात व हाडे मजबूत होण्यास मदत होते. हा दुग्धजन्य पदार्थ असला तरी पनीरमध्ये दुधापेक्षा जास्त पोषक घटक असतात. परंतु पनीर असलेले पदार्थ खाताना थोडा विचार करावा कारण त्यात कॅलरी जास्त असतात.
फॅट्स बर्न होण्यास मदत होते
प्रोटिन आणि कॅल्शियमबरोबरच पनीरमध्ये कॉन्ज्युगेट लिनोलीक अॅसिड नामक फॅटी अॅसिड असते. यामुळे शरीरातील फॅट्स कमी होऊन वजन घटण्यास मदत होते. वजन कमी करायचे असल्यास आहारात पनीर असलेल्या पदार्थांचा समावेश करावा.
घातक आजारांपासून लांब ठेवते
कॅन्सर, हृदय विकार यांसारख्या गंभीर आजारांपासूनही पनीरमुळे संरक्षण होते. पनीर असलेले पदार्थ खाल्याने शरीरातील कॅन्सरच्या पेशींची वाढ खुंटते. याचबरोबर रक्तवाहिन्यांमध्ये फॅट्स जमा होण्याचे प्रमाणही कमी होते. यामुळे हृदय विकाराचा धोका कमी होतो.
पनीर शरीरासाठी पोषक असले तरी त्याच्या आरोग्यदायी गुणधर्मांबाबत काही मतभेद आहेत. काही लोकांच्या मते, पनीरमुळे वजन वाढत असल्याने ते खाऊ नये. 100 ग्रॅम पनीरमधून 292 ग्रॅम कॅलरी मिळतात हे खरे असले, तरी कष्टाची कामे करणाऱ्या लोकांनी पनीर खाल्ल्यास त्यातील कॅलरी सहज बर्न होऊन त्यांना पोषक घटक मिळू शकतात. म्हणून पनीर प्रमाणात खावे, अतिजास्त खाऊ नये किंवा खाणे टाळूही नये.
कच्चे पनीरही चवीला स्वादिष्ट असते. त्यावर काळी मिरी आणि मीठ भुरभुरून खाल्यास चव चांगली येते. मात्र तुम्हांला पनीर मसाला किंवा पनीरचा कोणताही पदार्थ करायचा असेल तर त्यासाठी पनीर तळून घेऊ नका.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Copyright © 2025 | Marathisrushti