वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
शेवटी युग पाठक यांना अटक झाली. त्यांना पश्चाताप होत असावा, असं ते स्वत:हूनच पोलीसांसमोर हजर झाले त्यावरून वाटतं. श्री. युग पाठक यांना फारशी शिक्षा होऊ नये असं मला मनापासून वाटतं. कारण, पश्चाताप होणं हेच सर्वात मोठं प्रायश्चित आहे, असं आपलं अध्यात्मही सांगतं. श्री. युगजी पाठक गेले सततचे ९ दिवस या पश्चातााच्या आगीत होरपळले आहेत, येवढी शिक्षा त्यांना पुरेशी आहे. ‘शरण आलेल्याला मोठ्या मनाने माफ करावं’ हे ही भारतीय तत्वज्ञानाशी सुसंगतच आहे..! ’युग’परिवर्तन म्हणतात, ते बहुदा हेच असावं..!!
January 7, 2018
म्हातारा नुसता वयानं वाढतो. स्वकेंद्री असतो. वृद्ध हा वय, अनुभव आणि ज्ञानानं वाढतो, पण ज्येष्ठ नकाराला सकारात बदलतो. ती ताकद ठेवतो. अशा लोकांची समाजाला गरज आहे.कारण ज्ञान आणि अनुभव त्यांच्याजवळ आहेच. शिवाय निराशा या लोकांना शिवू शकत नाही. म्हणून तर माझी पणजी ठणठणीत आहे. स्मरणशक्ती दांडगी आहे.’
April 19, 2023
बहु हिंडता सौख्य होणार नाही | शिणावे परी नातुडे हीत कांही |
विचारे बरे अंतरा बोधवीजे | मना सज्जना राघवी वस्ति कीजे ||41||
बहूतांपरी हेचि आता धरावे | रघूनायका आपुलेसे करावे |
दिनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे | मना सज्जना राघवी वस्ति कीजे ||42||
मना सज्जना एक जीवी धरावे | जनी आपुले हीत तूवा करावे |
रघूनायकावीण बोलो नको हो | सदा मानसी तो निजध्यास राहो ||43||
मना रे जनी मौनमुदा धरावी | कथा आदरे राघवाची करावी |
नसे राम ते धाम सोडूनि द्यावे | सुखालागि आरण्य सेवीत जावे ||44||
जयाचेनि संगे समाधान भंगे | अहंता अकस्मात येऊनि लागे |
तये संगतीची जनी कोण गोडी | जिये संगतीने मती राम सोडी ||45||
मना जे घडी राघवेंवीण गेली | जनी आपुली ते तुवा हानी केली |
रघूनायकावीण तो शीण आहे | जनी दक्ष तो लक्ष लावूनि पाहे ||46||
मनी लोचनी श्रीहरी तोचि पाहे | जनी जाणता भक्त होऊनि राहे |
गुणी प्रीति राखे क्रमू साधनाचा | जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ||47||
सदा देवकाजी झिजे देह ज्याचा | सदा रामनामे वदे नित्य वाचा |
स्वधर्मेचि चाले सदा उत्तमाचा | जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ||48||
सदा बोलण्यासारिखें चालताहे | अनेकीं सदा एक देवासि पाहे |
सगूणीं भजे लेश नाहीं भ्रमाचा | जगीं धन्य तो दास सर्वेत्तमाचा ||49||
नसे अंतरी काम नाना विकारी | उदासीन जो तापसी ब्रह्मचारी |
निवाला मनी लेश नाही तमाचा | जगी धन्य तो दास सर्वेत्तमाचा ||50||
- श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)
December 29, 2015
आज काल बऱ्याच घरांमध्ये हायपर टेन्शन, हाय किंवा लो ब्लड प्रेशरची समस्या किंवा आजार असतो. रक्तदाब म्हणजेच BP चा त्रास असणाऱ्या व्यक्तीचा वेळोवेळी BP चेक करावा लागतो. व तो आपण BP मशीन द्वारे चेक करू शकतो. तसेच प्रत्येक वेळी डॉक्टरकडे जाणे शक्य होत नाही, त्यासाठी घरात एखादे BP मॉनिटर मशीन असणे सोयीस्कर होते.
September 23, 2023
त्या परमात्म तत्त्वाच्या लोकविलक्षण स्वरूपाचे अधिक विस्तृत वर्णन करताना आचार्य श्री शब्द वापरतात,
October 30, 2020
जिद्द, नियोजन, सर्व पातळ्यांवरची तत्परता, दर्जाबाबत तडजोडीला संपूर्ण फाटा, असा तोल साधत, १८५३ सालात सुरू झालेल्या भारतीय रेल्वेनं पहिल्या, पंचवीस वर्षांत ६,५४१ मैल मार्ग पूर्ण केले. त्यानंतरच्या पंचवीस वर्षांत, म्हणजे रेल्वेबांधणीला पन्नास वर्षं होता होता २३,६२७ मैल रेल्वेमार्ग पूर्ण करत ही संख्या जवळपास चौपटीच्या आसपास आणून ठेवली. रेल्वेला ६० वर्षं होता होता, १९१३ च्या सुमाराला व्हिक्टोरिया टर्मिनस (VT) आणि आताचं छत्रपती शिवाजी टर्मिनस (CST) पासून पेशावर, कलकत्ता, मद्रास, कोचिनपर्यंत गाड्या धावू लागल्या. हिंदूंचं बनारस, मुघलांचं लाहोर, ब्रिटिशांचं बंगलोर, अशा विविध धार्मिक आणि सांस्कृतिक भागांतून ह्या गाड्या जात असत. या सर्व गाड्यांचे प्रवास भारतभर पसरलेल्या ५ लाख खेड्यांजवळून घडत होते आणि भारतीय मनं रेल्वेच्या अस्तित्वामुळे भारावली होती.
आज भारतीय रेल्वे भारतीयांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. केवळ रेल्वेमुळेच इथल्या दऱ्याखोऱ्यांचं, विविधतेनं नटलेल्या सौंदर्याचं दर्शन प्रत्येकाला सुखाचं आणि सुलभ झालं आहे. रेल्वेच्या इतिहासाकडे वळून बघताना, ब्रिटिशांनी सातासमुद्रापार येत भारतामध्ये ज्या प्रकारे रेल्वे बांधली ते सारे व्याप अवाढव्य व विस्मयकारकच आहेत हे जाणवत राहतं. दूरदृष्टीच्या धोरणी ब्रिटिशांनी भारतभर रेल्वेची संपूर्ण बांधणी सफलतेने व्हावी म्हणून अनेक संस्थाशी करार केले. ह्या बांधणीत ब्रिटिश ठेकेदार जास्त प्रमाणात होते, पण जमशेटजी दोराबजी, मोहम्मद सुलतान, असे भारतीयही सहभागी होते. १८५९ ते १९०० या वर्षांमध्ये या बांधणीत सहभागी झालेल्या कामगारांची संख्यादेखील सुमारे १,८०,६०१ ते २,२१,२५३ इतकी अफाट होती. या कामगारांना दिला जाणारा कामाचा मोबदला तुटपुंजा होता, जीवन कष्टमय होतं, भवितव्यात त्यांना बरे दिवस येण्याची सुतराम शक्यताही नव्हती; तरीही, रेल्वेबांधणीचं काम मात्र अहोरात्र सुरूच होतं. संपूर्ण भारतात १८५३ ते १९०० ह्या ४७ वर्षांच्या काळात एकूण ८० लाख लोक रेल्वे बांधणीच्या कामात गुंतले होते. हे खरंच अफाट व विस्मयजनक आहे. रेल्वेबांधणी देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत नेणं हेच ब्रिटिशांचं ध्येय होतं, त्या एकाच विचारानं ते पछाडलेले होते आणि हे अपूर्व उद्दिष्ट त्यांनी अखेर यशस्वीही केलं.
कामाचे काही तक्ते
मद्रास रेल्वे (कोची) : वर्ष १८५७
| सेवेतील कामगार संख्या | एकूण खर्च | माती काम क्युबिक यार्ड | विटांचे काम क्यूबिक यार्ड |
| ६,४७,५९६ | २३,७६,६३१ | ७,५५,३५४ | ९,०,०३९ |
बोर (खंडाळा) व (कसारा) थळ घाट
| इ.स. | अंतर (मैल) | सेवेतील कामगार संख्या |
| १८५६ | १६ मैल | १०,००० |
| १८५६ | १० मैल | ५,००० |
निवडक मोठे पूल
| पूल | नदीचे नाव | बांधणीचा काळ | कामगार संख्या |
| इंप्रेस | सतलज | १८७३-१८७८ | ५००० पेक्षा जास्त |
| डुफरेन | गोमगेस | १८८१-१८८६ | ७००० |
| शेर-शहा | चिनाब | १८८०-१८९० | ५००० |
| बेजवाडा | कृष्णा | १८९०-१८९३6६ | ६००० |
October 19, 2022
लहान मुलांमध्ये जन्मतः असलेल्या हृदयातील दोषावर काम करून ते दूर करण्यासाठी एक प्रणाली विकसित करून अनेकांना जीवनदान देणारे डॉ. आल्फ्रेड ब्लॅलॉक विसाव्या शतकातील अग्रगण्य शल्यविशारद होते. शल्यचिकित्सेतील भरीव कामगिरीसाठी कित्येकवेळा नोबेल पारितोषिकासाठी त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली. १९५० सालापर्यंत ब्लॅलॉकनी जन्मतः असलेला हृदयातील दोष दूर करणार्या एक हजारपेक्षा जास्त शस्त्रक्रिया केल्या.
April 20, 2019
…सरकारी कार्यालयाचे वाॅचमन, कार्यालयातील शिपाई, लिफ्टमन आदींचं समाधान दोन-पाचशे रुपयांच्या वर्गणीवर होतं. कारण त्यांची मजल तेवढीच असते. तेवढ्यावर मिळणारं एखादं गटार त्यांना पुरेसं असतं. खरी गटारी तर त्यांच्या पुढच्या डेसिग्नेशन्सवर असलेल्यांची आणि त्यांची तिथे नेमणूक करणार्या राजकारण्यांची असते. हे गटारी निमित्त वर्गणी वैगेरे काढत नाहात. ते एका दिवसाच्या गटारीवर समाधानीही नसतात. त्यांची गटारी वर्षभर सुरुच असते आणि लोळण्यासाठी गटारं असतात, ती ‘लाचे’ची, कॅश आॅर काईंड आॅर बोथ..! ही गटारं साधी, झोपडपट्टीतल्यासारखी गरजेपोटी निर्माण झालेली नसतात, तर मुद्दामहून तयार केलेले परंतू वरून गुळगुळीत गिलावा केलेले मोठे, गलित्छ नाले असतात…
July 26, 2017
२६ मार्च १९६३ साली आजच्या दिवशी मंदारमाला नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
जय शंकरा गंगाधरा, जयोस्तुते उषा देवते... हरी मेरो जीवन प्राण आधार... अशा "मंदारमाला‘ या नाटकातील गाण्यांनी मराठी रसिकांच्या मनाला भुरळ घातली होती. त्या काळी हे नाटक तुफान गाजले होते. संगीतभूषण रामभाऊ मराठे, प्रसाद रावकर, ज्योत्स्ना मोहिले, विनोदमूर्ती शंकर घाणेकर, पंढरीनाथ बेर्डे अशा दिग्गजांच्या गायन व अभिनयाने हे नाटक गाजले; त्याचे शेकडो प्रयोग झाले. त्या वेळी नाटकाचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध अभिनेत्री सुधा करमरकर यांनी केले होते; तर संगीत दिग्दर्शन रामभाऊ मराठे यांचे होते. "मंदारमाला‘चे १९६३च्या गुढीपाडव्याला मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या ‘भारत नाट्य प्रबोधन संघा’ने हे नाटक परत रंगभूमीवर आणले. दादर येथील रंगमंदिरात नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग झाला. पहिले शंभर प्रयोग ‘रंगमंदिर’तर्फे झाल्यावर नाट्यनिर्माते राजाराम शिंदे यांच्या ‘नाट्यमंदार’ने हे नाटक चालवायला घेतले आणि ४०० प्रयोगांचा पल्ला कधी ओलांडला हे रसिकांनाही समजले नाही. संपूर्ण देशभर प्रयोग झाले. अडीच-अडीच महिने सलग दौरे होत. कधीकधी नाटकाचे दिवसाला तीन-तीन प्रयोग होत. या नाटकाचे असे एकूण १२००हून अधिक हाऊसफुल्ल प्रयोग झाले. या नाटकाद्वारे विद्याधर गोखले यांनी मोठ्या आणि आळवून आळवून म्हणावयाच्या नाट्यपदांच्या परंपरेला छेद दिला. लागोपाठ पदे येणार नाहीत अशी नाटकाची सुरेख मांडणी त्यांनी केली.चटपटीत संवादांदरम्यान ही रसाळ पदे गुंफली होती. पंडित मा.राम मराठे आणि मा.प्रसाद सावकार यांच्यातील ‘बसंत की बहार आयी’ ही अजरामर जुगलबंदी ऐकण्याला प्रेक्षक उत्सुक असत. त्यासाठी नाटक साडेचार तास चालले तरी ते चुळबूळ करीत नसत.
‘संगीत मंदारमाला’चं कथानक सतराव्या-अठराव्या शतकात राजपुतान्यातील असल्याचे गृहीत धरण्यात आलं आहे. आपल्याकडे जे ज्येष्ठ श्रेष्ठ गायक, बंदीशकार, नायक, विद्वान पंडित होऊन गेले त्यांच्यापैकीच काहींच्या जीवनातील मोजक्या प्रसंगांना विद्याधर गोखले कल्पनेची अफलातून जोड दिली आणि ‘मंदार’ या कमालीचा स्त्रीद्वेष असलेल्या, जीवनाला विटलेल्या, मात्र सप्तसुरांच्या नादब्रह्मात कायम रमणार्या आणि संगीत भक्तीच्याच बळावर मनपरिवर्तन झालेल्या अवलिया वनवासी संगीतकाराचा जीवनप्रवास ‘संगीत मंदारमाला’च्या रूपानं रसिकांसमोर आला अन् इतिहास बनून गेला. ‘सोऽहम हर डमरू बाजे’ ही या नाटकातील तोडी रागावर आधारित बंदिश आजही लोकप्रिय आहे. नाटकातील इतर पदांमध्येही पं. राम मराठे यांनी अनेक राग-रागिण्यांचा वापर केला. ज्योतकंस, अहिरभैरव, गौडमल्हार, बसंत बहार, बैरागी भैरव, तोडी, मालकंस, बिहाग, हिंडोल, भैरवी असे अनेक राग रामभाऊंनी चपखलपणे वापरले. ‘बसंत की बहार आयी’ या जुगलबंदीतील ‘चक्रधार’ हा तर त्यांच्या सांगीतिक गणिताचा उत्तम नमुना होता.
सोऽहम हर डमरू बाजे
https://www.youtube.com/watch?v=m8tWvVY6UTk
मंदारमाला नाटकातील इतर गाजलेली पदे
कोण अससि तू न कळे (राग जोगकंस, गायक राम मराठे)
जय शंकरा गंगाधरा (राग अहिर भैरव, गायक राम मराठे)
जयोस्तुते हे उषादेवते (राग देसकार, गायक राम मराठे)
तारिल हा तुज गिरिजाशंकर (राग हिंडोल, गायक राम मराठे)
तारे नहीं ये तो रात को (राग मिश्र खमाज, गायक प्रसाद सावकार)
बसंत की बहार आयी (राग बसंत आणि बहार, गायक राम मराठे आणि प्रसाद सावकार)
बुझावो दीप ए सजनी (राग मिश्र भैरवी, गायक प्रसाद सावकार)
हरी मेरो जीवनप्राण-अधार (राग मिश्र पिलू, गायक राम मराठे)
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
March 27, 2017
‘बघा साहेब! मला पाय नसूनही मी भक्कम पायावर उभा आहे. आणि तुम्ही लोक पाय असूनही पायांचा उपयोग करत नाही. आज जर तुम्ही तुमच्या पायांचा उपयोग केला नसता तर तुम्हाला ही नोकरी मिळाली असती का? लोकांना देवाने पाय दिलेले असुनही लोक त्याचा का वापर करत नाहीत कळत नाही.
March 10, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti