(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • बाप रगत ओकतो, दुष्काळा पोटात घेतो…

    पोटाचे प्रश्न माणसाला अस्वस्थ करतात.शांत झोपू देत नाहीत. प्रत्येक जीवाला जसे जगण्यासाठी अन्न लागते तद्वतच मानवासही ते लागते.समाज पोटाचे प्रश्न सोडविण्यासाठी व्यवस्था निर्माण करतो. त्या व्यवस्थेप्रमाणे कार्यकर्तृत्व करण्याचा माणूस प्रयत्न करतो. कमीअधिक प्रमाणात पोटाचे प्रश्न सुटतातही . तसे भाकरीच्या प्रश्नावर अनेकदा राजकारण होते. चळवळी उभ्या राहतात. समाजकारण होते.क्रांती होते. परिवर्तन होते.' भाकरी मिळत नसेल तर केक खा' असे ऐतिहासिक वाक्य प्रसिद्ध आहे. अन्न , वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा पुर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतात. या कष्टाचे प्रमाण सर्वांसाठी सारखेच नसते.काहींना कितीही कष्ट केले तरी उपजिवीका भागविणे कठिण जाते तर काहींना कमी कष्टात सहजसाध्य असे अमाप मिळते.यामुळे असमानता निर्माण होते.

    शेतकरी वर्ग हा वर्षानुवर्षे याच गर्तेत अडकून पडलेला. निसर्गाच्या लहरीपणावर त्याची मदार असते. जमिनीत बियाणं रूजविण्यापासून सुरू होणारा, पीक आडतीवर नेईपर्यंतचा प्रवास अनाकलनिय असतो.जमिन तयार करणे. महागडी बियाणे खरेदी करणे, रासायनिक खत खरेदी करणे. पिकांना पाणी देणे, निगा राखणे . ते आडतीवर जाते तेव्हा पडलेले भाव . या सर्व व्यवस्थेचे प्रश्न गहन तर आहेत. त्याचबरोबर ते पिढी बरोबर आलेले आहेत . कृषक समाजाच्या व्यथा आजच्या काळात तीव्र बनल्या आहेत. आधुनिकीकरणांमुळे ग्रामजीवन उध्वस्तेकडे वाटचाल तर करत नाही ना ? याचा विचार करण्याची गरज आहे. जमिनीचे झालेले तुकडे .नापिकी होत असल्याने आलेले नैराश्य. त्यातून होणारी आत्महत्या . निर्माण झालेले गुंतागुंतीचे प्रश्न. उध्वस्त झालेले कुटूंब. कष्टाच्या मोबदल्यात न मिळणारी मिळकत . आरोग्य आणि शिक्षणाचे निर्माण झालेले प्रश्न.याचा विचार होणार की नाही? सारं रान पडिक आणि बांध कोरण्याची प्रवृती कधी नष्ट होईल? अंतर्गत मतभेदामुळे उत्पन्न झालेले मनभेद. भावाभावात , गावागावात आणि जावाजावातील वाद कधी संपणार ? जातीभेदातून आणि मातीभेदातून निर्माण झालेले वाद. सुरक्षा व्यवस्थेकडून होणारी पिळवणूक . प्रशासन व्यवस्थेची सापत्न वागणूक . समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन . या बाबी चिंतनीय आहेत. वरिष्ठ नोकरी , मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती. असे काहिसे बदललेले चित्र पहावयास मिळते. सणउत्सवाच्या परंपरा असतील किंवा लग्न विधींसारखे प्रसंग असतील.आत्मप्रौढीतून भरमसाठ होणारा खर्च .यातून बहुजनांचे अहितच साधले जाते.प्रत्येक हुशार, चाणाक्ष घटकांकडून शेतकरी वर्गाची अडवणूक, पिळवणूक आणि छळवणूकच होते. तद्वतच साहित्य , लेखन यांमध्येसुद्धा कृषक समाजाचे दुःख वेदना मांडले जात नाही. वेदनांचे प्रतिबिंब आवश्यक त्या प्रमाणात दिसत नाही. जिथे मांडले जाते. त्याची दखल घेतली जात नाही.शेती आणि शेतजीवन आज अस्थिरतेच्या उंबरठ्यावर आहे. मुलांचे शिक्षण, धान्यादी मालाचे भाव, रोजगार , उत्पन्न यांची सांगड घालणे कठिण आहे.भोंदूबाबा, कैवारी भेटतात ते फक्त मतदान रूपाने. पाच वर्षाच्या पारायणासाठी ! तेही लूप्त - अलूप्त स्थितीत.भावना आणि घोषणा यांच्या भोवती फिरत असलेली सल घेऊन. मग प्रश्न उभा राहतो की सालाबादप्रमाणे हेही वर्ष असेच ! असे वर्षानुवर्षे चालत आलेले रहाटगाडगे , दुःखाची धग, प्रश्नाची सल लेखनात उतरली पाहिजे. त्या लेखनाची दखल घेतली जावी. समाजमन तसे घडावे. शेतकरी शोषणाचा आलेख लेखकांनी मांडावा ते गरजेचेही आहे. ते बोलीतही आले पाहिजे . कृतीतून आचरणात आले पाहिजे. आमच्या एका कवितेतून तो आशय आला आहे.

    बाप रगत ओकतो,दुष्काळा पोटात घेतो
    कणगीला आभावल्ली,धान्य बरकत्ता मागतो
    बाप रगत ओकतो, हुकलेली सालचंदी
    कापूनशी कणसांचा, मळा वाटे चोरामंदी
    बाप रगत ओकतो, बरडाच्या गराड्यात
    म्हशी कळप वळीतो,खाट्या भाकड काळात
    बाप रगत ओकतो, जगण्याच्या आशेपोटी
    लेकराच्या तोंडावरी, मूठभर मासासाठी
    बाप रगत ओकतो, भेगा भूईच्या सांधतो
    खरबड्या हातातली, माया गाली फिरवितो
    बाप रगत ओकतो, धोतराच्या तडूपाला
    उमेदीने जगण्याच्या, नवा आशावाद दिला
    बाप रगत ओकतो, काटी शेताला लावतो
    मात्रे खळ्याचे स्वतःस, रास जगाला चारतो

    जगाच्या पाठीवर शेतकरी असा वर्ग आहे की जो जगाचे हीतच साधतो. पण त्या बदल्यात त्यास अपेक्षित फलश्रुती मिळत नाही . हे दुर्दैव म्हणावे लागेल.जगाचा पोशिंदा माझा बाप खडकावर राबताना आसवं तरळतात . त्या आसवांची किंमत पृथ्वीवरील इतर कोणत्याही तत्वज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे. सतत इतरांचा विचार करणारा शेतकरी बाप खंगलेला, भंगलेला आणि दुष्काळास पोटात सामावून नव्या आशावादी उमेदीने जगणारा आहे.तो जगला तर देश जगेल. तो उभा राहण्यासाठी पाठबळाची गरज आहे.

    -- विठ्ठल जाधव
    शिरूरकासार जि.बीड
    मो.9421442995

  • मुळाक्षरे आणि आरोग्य

    आपल्या शरीरात सात चक्रे आहेत. त्या चक्रांना वेगवेगळ्या संख्येच्या पाकळ्या आहेत. त्या पाकळ्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना जोडलेल्या आहेत. प्रत्येक पाकळीला एक एक बीजाक्षर आहे. बीजाक्षरे म्हणजे मराठीतील एक एक मुळाक्षर आहे. ही अक्षरे एक एक अक्षर अनुस्वार देऊन बरेच वेळा म्हटल्यास त्या उच्चाराच्या कंपनाने (व्हयब्रेशनने) तो अवयव नीट काम करू लागतो आणि आपले आरोग्य सुधारते.

    षट्चक्रांची बीजाक्षरे या विषयाचा अभ्यास सुरु केला तेव्हाची गोष्ट. माझ्या पत्नीला दोन दिवस शौचास झाली नव्हती. रंगकिरण चिकित्सा, चुंबक चिकित्सा करूनसुद्धा फायदा झाला नव्हता. मी तिला २५-२५ वेळा वं शं षं सं बं भं मं यं रं लं ही अक्षरे अनुस्वार देऊन म्हणायला सांगितली. तिने तसे केल्यावर तिच्या ओटीपोटात हालचाल जाणवली आणि तासाभराने काँल आला व एकदाचे पोट रिकामे झाले.

    लहान मुलांना शु शी व्हावी म्हणून आपल्याकडे मोठी माणसे शु षू म्हणतात व मुलाला लघवी / शौच होते. लहान मुलाचे शरीर अतिशय कोवळे व नाजूक असते त्यामुळे ह्या बिजाक्षरांच्या दुसर्याने केलेल्या उच्चरांच्या कंपनांचाही परिणाम होतो.

    सातार्याला एका बाईंना छातीत दुखले तर ठं म्हणा असे सांगितले. त्या म्हणाल्या अहो लक्षात कसे ठेवायचे? मी म्हटले विठ्ठल म्हणा. ही चर्चा येथेच संपली. दोन दिवसांनी त्या बाईंच्या छातीत दुखले. त्यावेळी त्यांना आठवला तो चर्चेतला विठ्ठल! नुसते विठ्ठल विठ्ठल म्हणू लागले आणी स्वस्थ झाले

    एका आजींना (वय ७३) संडासला त्रास, त्यामुळे gases असा त्रास होता. डॉक्टरांच्या मते आतड्यांना वयोपरत्वे शिथिलता आली. मी त्यांना मूलाधार व स्वाधिष्ठान ची अक्षरे म्हणावयास सांगितले. त्या म्हणाल्या ही अक्षरे लक्षात कशी ठेवायची? म्हणून त्यांना ‘बं भोले नमः शिवाय’ म्हणण्यास सांगितले. (यामध्ये मूलाधार व स्वाधिष्ठान ची बरीच अक्षरे येतात) आठ दिवसात त्यांनी सांगितले की ‘काका मला चांगला फरक पडला तुमच्या मंत्रामुळे’ दोन महिन्यांनी माझ्या पत्नीला आजी भेटल्या तिलाही सांगितले ‘काकांनी दिलेला मंत्र म्हणते आणि माझी तब्येत ठीक आहे. औषध घेत नाही!’

    डोंबिवलीच्या एका बाईंचा फोन शनिवारी संध्याकाळी आला. ‘मला गेले १५-२० दिवस जुलाब होत आहेत. पोटात दुखते आहे. डॉक्टरांच्या औषधांनी फरक नाही. तुमची रंगकीरण चिकित्सेची औषधे तातडीने पाठवा.’ मी म्हणालो 'कुरिअर सर्व्हिस रविवारी बंद. तुम्हाला मंगळवारी औषधे मिळतील.’ ‘मग मी काय करू?’ मी म्हणालो 'तुमच्याकडे माझे षट्चक्रे आणि आरोग्य हे पुस्तक आहे ना? त्यातील मूलाधार, स्वाधिष्ठान व मणिपूरची अक्षरे ५०-५० वेळा म्हणा

    पूर्वी आपल्या मुलांकडून बाराखड्या म्हणून घेतल्या जात असत. त्याचा एक उद्देश आरोग्य हाही असावा. हल्ली इंग्रजी मिडीयम मध्ये शिकणाऱ्या मुलांनी मराठी मुळाक्षरे म्हणणे पालकांना कमीपणाचे वाटते!!

    आमच्या पूर्वजांनी निसर्गातल्या शक्तींचा अभ्यास करून माणसाला निरोगी राहण्यासाठी सहज सोपे उपचार (ज्यात वैद्याला व डॉक्टरला पैसे मिळत नाहीत) दिले. त्यांना आम्ही जुनाट, अडाणी म्हणतो. अशास्त्रीय (पाश्चात्य लोकांना मान्य नाही असे) म्हणतो.

    मराठीतील अक्षरे कोणीही कुठेही म्हटली तरी चालतात. तरी वाचकांना विनंती की विश्वास ठेऊन अथवा न ठेवता मराठीतील मुळाक्षरे म्हणण्याचा प्रयोग करून पाहावा. माझ्या अनुभवा प्रमाणे एक अक्षर १०० वेळा म्हणायला एक मिनिट पुरते. बर्याचशा आजारात मुलाधार, स्वाधिष्ठान व मणिपूर चक्रांची अक्षरे १०० वेळा म्हणणे पुरते

    मूलाधार चक्राची अक्षरे -
    वं, शं, षं, सं

    स्वाधिष्ठान चक्राची अक्षरे -
    बं, भं, मं, यं ,रं, लं

    मणिपूर चक्राची अक्षरे -
    डं, धं, णं, तं, थं, दं, धं, नं, पं, फं

    अनाहत चक्राची अक्षरे-
    कं, खं, गं, घं, चं, छं, जं, झं,टं, ठं

    विशुद्ध चक्राची अक्षरे-
    अं, आं, इं, ईं, उं, ऊं, ऋं, ऋृं, एं, ऐं, ओं, औं, अं, अंः

    अज्ञा चक्राची अक्षरे-
    हं, क्षं

    अधिक माहितीसाठी जिज्ञासूंनी माझे जून २००१ मध्ये प्रथम प्रकाशित झालेले 'षट्चक्रे आणि आरोग्य' हे पुस्तक अभ्यासावे.

    -- अरविंद जोशी
    ९४२१९४८८९४

    WhatsApp वरील वैद्य सुविनय दामले यांच्या आरोग्यदूत या ग्रुप वर आलेला लेख साभार प्रकाशित.

  • अर्थसंकल्प २०१७-१८ : काही अपेक्षा, काही अंदाज

    सोमवार , २३ जानेवारी २०१७ रोजी सर्वोच्च न्यायालयाने एक जनहीत याचिका फेटाळली आणि १ फेब्रुवारी २०१७ रोजी २०१७ - १८ सालासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर करण्याचा मार्ग मोकळा झाला . केंद्र व राज्य सरकारांच्या संविधानिक आणि प्रशासकीय कार्यकक्शा पूर्णपणे वेगळ्याच असल्याने केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात हरकत असूच शकत नाही हे यावेळी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे . तसेच त्याच दिवशी निवडणूक आयोगानेही दोन अटींवर केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यास केंद्र सरकारला परवानगी दिली आहे . याबाबत आपल्या देशातील काही विरोधी पक्षांनी पाच राज्यात फेब्रुवारी २०१७ ; मधे होणाऱ्या विधान - सभान्च्या निवडणुका लक्षात घेता केंद्र सरकारला यंदाचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारी ला मांडू देऊ नये अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती . पण आयोगाने ती मागणी पूर्णपणे मान्य केलेली नाही . केंद्र सरकार ला १ फेब्रुवारी २०१७ रोजी २०१७ - १८ सालचा अर्थसंकल्प सादर करता येईल ; मात्र उत्तर प्रदेश , पंजाब , गोवा , उत्तराखंड आणि मणिपुर या विधानसभा निवडणुकांना लगेचच सामोर्या जाणाऱ्या राज्यांत कोणत्याही नवीन योजना - प्रकल्पांची घोषणा अर्थसन्कल्पात असू नये आणि या पाच राज्यातील प्रकल्पाच्न्च्या कामगिरिचा आलेख अर्थसन्कल्पिय भाषणात अधोरेखित केला जाऊ नये या अटींवर अर्थसंकल्प फेब्रुवारी २०१७ सादर करण्याची परवानगी निवडणूक आयोगानेही दिली आहे . त्यामुळे आता १ फेब्रुवारीला २०१७ - १८ साठीचा अर्थसंकल्प सादर होण्याचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे .

    निवडणुकांच्या तोंडावर अशा काही गोष्टी होऊ शकतात याची अंदाज असल्याने तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३१ डिसेंबर २०१६ च्या रात्री शेतकरी , महिला , ज्येष्ठ नागरीक , लघु - उद्योग आणि दारिद्र्य - रेशेखालील जनता यांच्याशी संबंधित काही मुद्द्यान्चा समावेश असणारे भाषण राष्ट्राला उद्देशून केले नसावे ना ?
    असो .

    दरवर्षी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्याआधी त्या अर्थसंकल्पकडून काही अपेक्षा बांधताना , काही अंदाज व्यक्त करताना मला विंदा करंदीकर यांची एक कविता नेहमीच आठवत राहाते . त्यात कविवर्य म्हणतात . . . .

    " इतिहासाचे अवजड ओझे
    डोक्यावर घेऊन ना नाचा
    करा पदस्थल त्याचे आणिक
    त्यावर चढूनी भविष्य वाचा " .

    अर्थसंकल्प संबंधित अंदाज - अपेक्षा हे असंच काहीतरी नसते का ? आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा आकार दोन लाख कोटी डॉलर्स म्हणजेच २ ट्रिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे १३६ लाख कोटी रूपये आहे हे लक्षात घेतले की तर जास्तच असॆ वाटायला लागते .

    त्यातच मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाबाबत कोणताही अंदाज वर्तवण्यात अनेक अडचणी असतात . कारण या सरकारचे याआधीचे दोन्ही अर्थसंकल्प क्रांतिकारी असण्यापेक्षा उत्क्रांती - कारी जास्त होते ( अर्थात अर्थसंकल्प दरवेळी क्रांतिकारी असण्याची मुळात आवश्यकता नसतेच . ) असॆ ग्रुहित धरायचे तर ८ नोव्हेंबर २०१६ चा निशचलनिकरनाचा ( Demonetisation ) निर्णय असा काही भन्नाट होता की काहीच ग्रुहित धरता येऊ नये . शिवाय २०१६ या एका वर्षात या सरकार ने निश्चलनिकरनाव्यतिरिक्तही सर्जिकल स्ट्राइक ते वन रंक - वन पेन्शन , आणि स्वच्छ भारत ते रघुराम राजन यांना न दिलेली मुदतवाढ , लष्कर - प्रमुखान्ची वरिष्ठता डावलून केलेली नियुक्ति ते सरन्याधीशान्ची नियुक्ति , वस्तु आणि सेवा कराची सुरू होणारी अंमलबजावणी अशी केलेली कामगिरी अंदाज बांधणी अवघड करते . ( अगदी अशक्य नसले तरी . )

    त्यातच नवीन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष दोनाल्द त्रम्प यांनी केलेल्या घोषणा , brexit सारख्या घटना , आपल्या देशाच्या एकूण आयातीच्या ७० टक्के वाटा असणाऱ्या तेलाच्या आंतरराष्टीय बाजारात गेल्या वर्षभरात baral मागे ३० डॉलर वरून ५५ डॉलर पर्यंत वाढलेल्या किंमती ( २०१७ अखेर पर्यंत या किंमती ६० डॉलर्स आणि २०१८ अखेर पर्यंत याच किंमती ६५ डॉलर्स होतील असा काहींचा अंदाज आहे . ) याही घटकांचा विचार इथे करावाच लागेल .

    त्यातही येत्या अर्थसंकल्पाबाबत कोणताही अंदाज बांधण हे काम जास्तच कठीण असण्याचे अजून एक कारण म्हणजे जानेवारी २०१७ च्या सुरूवातीस " इंडिया टुडे " या नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधानांनी केलेले एक सूचक विधान . माननीय पंतप्रधान त्या मुलाखतीत असॆ म्हणतात की " नीती " ( Policy ) आणि " रण - नीती " ( Execution Strategy ) यात फरक असलाच पाहीजे . " . आणि अर्थसंकल्प , अगदी कोणत्याही काळातील , कोणत्याही सरकारचा , कोणताही अर्थसंकल्प हा तर नीती आणि रण - नीति यांच मिश्रण च असते .

    शिवाय यावर्षी अर्थसंकल्प नेहमीप्रमाणे फेब्रुवारी अखेरीस न येता फेब्रुवारीच्या सुरूवातीसच येत आहे . त्यामुळे व्यावसायिक क्षेत्राच्या डिसेंबर अखेरीस असणाऱ्या कामगिरीची पुरेशी दखल पार्श्वभूमी म्हणून नाही . यंदा पावसाचे प्रमाण समाधान - कारक असले तरी Demonitisation चा नेमका परिणाम जाणून घेण्यास त्याचा उपयोग होऊ शकला असता . प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष करान्पासूनचे उत्पन्न वाढले आहे असॆ सांगण्यात येत असले तरी वाहन - विक्रिच्या प्रमानाने डिसेंबर महिन्यात गेल्या अनेक वर्षांतली सर्वात खालची पातळी गाथल्याची बातमीही आहे . त्यातच येत्या वर्षात वित्तीय तुटीचे प्रमाण तीन टक्के ठेवण्याची घोषणा फार आधीच अर्थमन्त्र्यानी केली आहे . एकंदरीतच जागतिक अर्थकारनाचे तान - मान पाहात आन्तरराष्ट्रीय नाणेनिधीने आपल्या देशाचा आर्थिक वाढीचा दर येत्या वर्षात आधीच्या ७ . ६ टक्क्यांऐवजी ७ . २ टक्केच असेल असा अंदाज व्यक्त केला आहे . त्याशिवाय सर्वात जास्त वेगाने वाढणारया पहिल्या पाच अर्थव्यवस्थेत आपल्या देशाचा समावेश होत नाही असा कुठल्या एका पाहणीचा अलीकडच्या काळातला निष्कर्ष आहे ना !
    अर्थातच आपल्या देशाची अर्थ - स्थिति अगदीच कवि यशवंत म्हणतात त्याप्रमाणे

    " जूँ बैसले मानेवरी
    चाबूक हा पाठीवरी
    या कर्दमी मार्गावरी
    चौखूर धावावे परी "

    अशीही नक्कीच नाहीये .

    अशा पार्श्वभूमीवर येणाऱ्या अर्थसन्कल्पात सध्याच्या एप्रिल ते मार्च या आर्थिक वर्शाएवजी जानेवारी ते डिसेंबर असॆ आर्थिक वर्ष जाहीर होण्याची मोठी शक्यता वाटते .

    मोदी सरकार सत्तारुढ झाल्यापासून त्यांनी क्रुशी आणि ग्रामीण भागासाथी सातत्याने प्रयत्न केले आहेत . त्यातच २०१४ आणि २०१५ सालच्या तुलनेत २०१६ साली पावसाचे प्रमाण निश्चितच चांगले होते . मात्र Demonitisation ने तात्पुरता का होईना , पण या क्षेत्राबाबत धक्का बसला . त्यामुळे येत्या अर्थसन्कल्पात काही घोषणा नक्कीच असणार .

    येत्या अर्थसन्कल्पात कंपनी कर ( कॉपोर्रेट टेक्स ) दरात काही प्रमाणात तरि घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही . तसेच आता वस्तू - सेवा कराची अंमलबजावणी बरीचशी मार्गाला लागल्यामुळे आता Direct Tax Code ( DTC . . . किती काळानंतर हा शब्द ना ! ) म्हणून जरी नाही तरी वैयक्तिक आय - करात काही बदल येत्या अर्थसन्कल्पात होण्यास वाव आहे . करमुक्त उत्पनाच्या प्राथमिक पातळीत वाढ होणे ( भरीव वाढ असेलच असॆ मात्र नाही . ) , करपात्र उत्पनाच्या पातळीत बदल होणे आणि कराचे दर कमी होणे अपेक्षित आहे . या सर्वच गोष्टी सगळ्यांच्याच एकदम मनासारख्या , आणि त्याही एकाच फटक्यांत , एकाच वेळी होतील असॆ नाही हे उघड आहे . पण होतील . अघोषित मालमत्ता , अघोषित उत्पन्न याबाबत मोदी सरकारने गेल्या अडीच - तीन वर्षात अनेक उपाय - योजना अंमलात आणल्या . त्यांना , विशेषतः गेल्या काही महिन्यांत जाहीर केलेल्या योजनांतून सरकारला मिळालेल्या कर - रूपी उत्पनाचा विचार करता अशी शक्यता वाटते .
    त्यातही माझा स्वतःचा असा अंदाज आहे की येत्या अर्थसन्कल्पात वैयक्तिक आयकरात असॆ बदल करण्यात येतील की कर भरन्याच्या रकमेत बहुसंख्य करदात्याना लाभ मिळेल ; पण उत्पनाच्या करा पासून सरकारला होणाऱ्या महसुलात फारशी घट होणार नाही .
    त्यासंदर्भात अजून एक गोष्ट म्हणजे Demonitisation च्या एका टप्प्यावर पंतप्रधान गरीबी विकास योजना सुरू करण्यात आली . त्यात जमा झालेला पैसा चार वर्षांच्या मुदतीसाथी " ना कर - ना व्याज " तत्वावरच्या रोख्यात गुंतवणूक करण्यात आला . विविध करान्च्या थकबाकिदाराना आणि बन्कान्च्या बुडित - खाती कर्जdaaraanaa One Time Settlement च्या ऐवजी पर्याय म्हणून या मार्गाचा उपाय येत्या अर्थसन्क्ल्पात सुचवला जाऊ शकतो . उदाहरणार्थ , थकित कराची किंवा बुडित कर्जाची रक्कम भरल्यावर दंड भरण्याऐवजी ५ - ७ वर्षे ही रक्कम सरकार विनव्याजी वापरेल आणि त्यानंतर ती थकित रकमेतून वळती करून घेण्यात येईल असा प्रस्ताव असू शकतो .

    जन - धन योजना आणि जन - सुरक्षा योजना यांना जितका उत्तम प्रतिसाद मिळाला तितका बन्कान्च्या माध्यमातून राबवन्यात आलेल्या " अटल पेन्शन योजना " ला मिळाला नाही . या योजनेत धारकाला होणारा फायदा चांगला असला तरी त्यात वारंवार केले गेलेले बदल आणि या ना त्या कारणाने अनेक बँकानी दाखवलेली अनास्था यामुळे ही योजना आधीच्या कॉंग्रेस सरकारच्या " राजीव गांधी ईक्वीटी सेविंग्स स्किम " सारखी झाली . पण NPS सारख्या योजनांचा सरकार आणि धारक या दोघांनाही झालेला आणि होणारा फायदा , तसेच अगदी अलीकडेच ६० वर्शावरील व्यक्तिसाठी आयुर्विमा महामंडळाने सुरू केलेली पेन्शन योजना लक्षात घेतात NPS ( नेशनल पेन्शन स्किम ) ला भरीव चालना येत्या अर्थसन्कल्पात मिळू शकते .

    सर्वसाधारपणे सुमारे २० लाख कोटी रुपयांच्या आसपास आपल्या देशाच्या केंद्रीय अर्थसन्कल्पाचा आकार असतो . अशा आकाराच्या येत्या अर्थसन्कल्पात संरक्षण , रस्ते - बांधणी , आरोग्य (विशेषतः जन - औषधि योजना ) , शिक्षण , अपारंपारीक उर्जा या क्षेत्रांवर येत्या अर्थसन्कल्पात विशेष लक्ष पुरवले जाईल असा एक अंदाज आहे .
    तसेच Demonitisation च्या नंतर येणाऱ्या या अर्थसन्कल्पात ग्रामीण भागात रोकड - विरहीत अर्थव्यवस्था ( कॅश - लेस एकॉनमी )"रुजवण्याच्या द्रुष्टीने भर देण्यात येईल असॆ वाटते . त्याद्रुश्तिने नाबार्दच्या भान्दवलात वाढ , विविध बँकांच्या याबाबतच्या योजनांना आर्थिक व तांत्रिक साह्य , अशा व्यवहारान्च्या सुरक्षिततेत वाढ होईल अशा उपकरण - निर्मितिला आणि त्याबाबतच्या कंपन्यांना चालना हेही येत्या अर्थसन्कल्पाचे वैशिष्ठ्य असू शकते .
    ग्रुहनिर्माण क्षेत्राला प्रोत्साहन म्हणून ३१ डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदिजीनी जाहीर केलेल्या योजनाना मुदतवाढ , त्यांचा क्षेत्र - विस्तार , ग्रुह्कर्जावरील व्याजात आजमितिलामिळणाऱ्या कर - सवलत - पात्र दोन लाख रुपयांच्या मर्यादेत वाढ , कमी किंमतीला घरे उपलब्ध करणाऱ्या योजनांना प्रोत्साहन अशाही तरतूदी येत्या अर्थसन्कल्पात असू शकतात .

    एकंदरीतच प्रचंड भांडवल , दीर्घकाळ आणि नागरिकांची गरज असॆ घटक असणाऱ्या क्षेत्रांत संबंधित प्रकल्प - निगडीत गुंतवणूक योजना आणि त्याची कर - रचनेशी घातलेली सांगड असा प्रकार अनेक क्षेत्रांत येत्या अर्थसन्कल्पात होऊ शकतात .

    त्यातही केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची आजपर्यन्तची कार्यशैली पाहता कराचा दर वाढवला जान्यापेक्शा अधिभार ( सरचार्ज ) ची संख्या आणि प्रमाण वाढण्याची शक्यता जास्त वाटते . अधिभार सुरू झाला की तो लगेचच मागे येत नाही ही करदात्यान्च्या द्रुष्टीने एक अडचण असली तरी केंद्र सरकारच्या द्रुष्टीने ती एक चांगली राजकीय व प्रशासकीय सोय असते . कारण अधिभारापासून मिळणारे उत्पन्न राज्य सरकारांच्या बरोबर वाटावे लागत नाही . त्यातून तूटही आटोक्यात ठेवण्यास मदत होईल . शिवाय वस्तु - सेवा कराच्या अंमलबजावणीमुळे पहिली पाच वर्षे राज्य - सरकारांना द्याव्या लागणाऱ्या नुकसान - भरपाईसाठी निधी - उभारणी ही होईल . जर माजी अर्थमंत्री श्री . यशवंत सिन्हा यांचे वर्णन " रोल - बॅक सिन्हा " असॆ केले गेले असेल तर श्री . अरुण जेटली यांचे वर्णन " सरचार्ज जेटली " असॆ करावे लागेल ?

    सरतेशेवटी , अर्थसंकल्प आणि अर्थमंत्री म्हणले की मला हटकून आर्य चाणक्य यांची आठवण येते . अर्थमंत्र्यांच्या नियुक्ति बाबतचे त्यांनी काही निकष सांगितले आहेत . त्यापैकी पहिला म्हणजे अर्थमंत्र्यांवर राजाचा ( हल्लीच्या परिभाषेत पंतप्रधानांचा पूर्ण विश्वास असला पाहिजे . अर्थमंत्री अरुण जेटली या निकषांवर पूर्ण उतरतात . ( नाहीतर मोदी लाटेत , आणि तेही अम्रुतसर सारख्या लोकसभा मतदार संघात निवडणूक हरूनही अर्थ खात्यासारखे मातब्बर खाते मिळत होय ! सुरूवातीस तर अर्थ आणि संरक्षण अशी दोन महत्वाच्या खात्यांचे मंत्रीपद ! ) . दुसरा निकष म्हणजे अर्थमंत्री नशिबवान असावा . त्याबाबत असणाऱ्या विविध स्वरूपाचे वेगवेगळे घटक याच लेखात आधीच आले आहेत . त्यामुळे आता भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीय नागरीक यांच्या नशिबात या अर्थसन्कल्पात काय लिहिले आहे याची १ फेब्रुवारी २०१७ पर्यंत उत्सुकतेने वाट पाहू . ( त्यानंतर त्याची चर्चा स्वतंत्र लेखांनी अनेकजण करतीलच . )

    एक आवर्जून लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट . . . .
    अटलजीन्च्या सरकारने अर्थसंकल्प सादर होण्याची वेळ बदलली . ( आधी संध्याकाळी पाच वाजता सादर होणारा अर्थसंकल्प तेंव्हापासून सकाळी अकरा वाजता सादर होऊ लागला . ) .
    मोदी सरकारने अर्थसंकल्प सादर होण्याची तारीख बदलली . ( त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी सादर होणारा अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या दिवशी सादर होणार . )
    मोदी सरकारने अर्थसंकल्प सादर करण्याची पध्दतीही बदलली . ("गेली ९२ वर्षे रेलवे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे सादर व्हायचा . तो आता सर्वसाधारण अर्थसन्कल्पाचाच भाग असेल . )
    अजून एका पध्दतीने गेल्या दोन वर्षांत अर्थसंकल्प सादर होण्यात बदल झाला आहे . याआधीची सर्वच अर्थसंकल्प सादर करण्याची भाषणे अर्थमंत्र्यांनी लोकसभेत उभे राहून केली आहेत . मोदी सरकारचे गेले दोन अर्थसंकल्प सादर करताना विद्यमान अर्थमंत्र्यांनी आपले अर्थसन्कल्पिय भाषण प्रक्रुती - अस्वास्थ्यामुळे बहुतांश वेळ खाली बसून केले आहे .

    आपल्या पाच वर्षांच्या या कार्यकालापैकि जवळजवळ निम्मा काळ मोदी सरकार आता पूर्ण करत आहे . लोकसभेच्या पुढील निवडणुका २०१९ साली होण्याआधी येता अर्थसंकल्प वगळता अजून एकच अर्थसंकल्प मोदी सरकारच्या हातात आहे . त्यामुळे हा येता अर्थसंकल्प फार महत्वाचा आहे . अंमलबजावणीवर भर देणारा असा येता अर्थसंकल्प असावा अशीच त्यामुळे साहजिकच अपेक्षा आहे . Demonitisation च्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प येत असल्याने तर उत्सुकता जास्तच आहे .

    काही अनुभव , काही अंदाज आणि काही अपेक्षा .

    -- चंद्रशेखर टिळक
    मोबाईल : ९८२०२९२३७६

  • प्रमुख आहारसूत्र – भाग ११

    आयुष्यभर औषधे घ्यावी लागू नयेत, असं प्रत्येकालाच वाटतं. पण त्यासाठी जे करावं लागतं ते करायची तयारी मात्र नसते.

    आणि असा समज करून दिला जातो, की एकदा डायबेटीस झाला की कायमचा चिकटला. ही निराशा मनातून काढून टाकली पाहिजे. हा आजार जर मनोशारिरीक असेल तर औषध फक्त शरीरात जाऊन काय करणार ? जर रोगाचे एक मूळ मनात असेल तर तिथपर्यंत पोचायला नको का ?
    मन कुठे आहे ते अजून माॅडर्न (?) मेडीसीनला समजलेलंच नाही. मन ह्रदयात आहे. आणि आज शोधलं जातंय मेंदूमधे. कसं सापडणार ?
    जाऊदे !

    प्रमेह होण्याचं मुख्य कारण दूध, दही, पाणी, अति, गोड, कफ वाढवणारे पदार्थ खाणे, हे तर आहेच पण यापेक्षादेखील खाल्लेलं पचवता न येणं किंवा पचवण्यासाठी काहीही कष्ट न करणे हे प्रमुख कारण आहे. मेहनत करा. म्हणजे मेह म्हणजे प्रमेह म्हणजे मधुमेह नत म्हणजे नाहीसा होईल.

    प्रमेह वाढण्याचं मुख्य कारण बदललेली जीवनशैली आहे. बैठे काम वाढलंय, सुखाचा अतिरेक झालाय. आम्ही खातोय खूप. खाऊन खाऊनच अशक्तपणा येतोय. मग पचवणार कधी ? त्यात कफ वाढवणारे सर्व पदार्थ निसर्गनियमाने मधुर रसाचे आणि पचायला जड असणारेच असतात.

    आमची वृत्तीच अशी झालीय की, आता दूध बंद करायचं, मग अशक्तपणा येणार, त्यासाठी परत टाॅनिक घ्यायला हवं. म्हणजे प्रत्येक वेळी आपण असा विचार करू लागलोय, की अमुक पदार्थ खाल्ल्याशिवाय माझं रक्त वाढणारच नाहीये, तमुक पदार्थ खाल्ल्याशिवाय प्रोटीन्स मिळणारच नाहीत. कॅल्शियमसाठी हे खाल्लंच पाहिजे. ह्रदयासाठी हे, किडनीसाठी ते. असा विचार करणं योग्य नाही.

    शरीराचे तुकडे करून तपासणारी वैद्यकीय यंत्रणा कार्यरत असल्यावर प्रश्न पडतो. संपूर्ण शरीराचा, मन आत्मा, इंद्रियासह विचार कोण डाॅक्टर किंवा वैद्य कधी करणार ? पायाला काटा लागल्यावर डोळ्यातून पाणी येणारं आपलं शरीर, प्रत्येक डाॅक्टरनी शरीर असं काही वाटून घेतलं आहे की, काही वर्षांनी वरच्या कवळीचा डेंटिस्ट वेगळा आणि खालच्या कवळीचा डेंटिस्ट वेगळा शोधावा लागेल. उजवा डोळा एक जण तपासेल, तर डावा डोळा दुसराच !
    जोक अपार्ट. चिकित्सा करताना संपूर्ण शरीराचा विचार करावा, असं आयुर्वेद मानतो.

    एवढे व्हिटॅमिन्स हवेतच, एवढे कॅल्शियम हवेच, हे नियम बनवले की कायदे आले. कायदा बनला की, पुरावे आले. पुरावे दाखवायची वेळ आली तर मन कसं दाखवणार ? आणि इंद्रियांचं काय करणार ? मग त्याला कोण विचारणार ? त्याला म्हणजे आत्म्याला !

    आयुर्वेद शास्त्र शरीराचे असे तुकडे पाडून विचार करतच नाही. अखंड शरीर, मन, इंद्रिय आणि आत्म्यासह चिकित्सा करण्यासाठी घ्यावे, असे शास्त्रकार म्हणतात.

    ही प्राथमिक माहिती समजल्याशिवाय प्रमेहाविषयी आयुर्वेदात सांगितलेली सूत्रे नीट लक्षात येणार नाहीत, म्हणून हे आधी आणि परत परत सांगावे लागत आहे. कारण आज आरोग्य हे चौकटीतल्या नियमांना बांधले गेले आहे. रक्तदाब एवढाच पाहिजे. रक्तातील साखर एवढीच हवी. वजन एवढेच हवे, कॅल्शियम एवढे हवेच ! कमी पडत असेल तर सरळ लेबल चिकटवले जाते, तू रोगी !
    ....... आणि आयुर्वेद म्हणतो.....
    ........ इथे प्रत्येकाचे नियम वेगळे !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    27.01.2017

  • प्रमुख आहारसूत्र – भाग १०

    रोग कसा होतो हे कळलं की, रोग घालवणं सोपं होतं. द्राक्षांच्या उदाहरणातील सर्दी होण्याच्या कारणांचा विचार केला तर,
    1. तिच्याबरोबर बाजारात जाणे. 2. माझे लक्ष त्या हातगाडीवाल्याच्या द्राक्षांकडे जाणे. 3. ती द्राक्षे खायचा मोह होणे. 4 द्राक्षे खाऊन सर्दी होते, हे पूर्वी अनुभवले असताना देखील, ती उचलणे, 5. खिशात सुटे पैसे ठेवणे. 6. मनाला न विचारता खरेदीची कृती करणे, 7. घरी आणल्यानंतर विचार करायला पुरेसा वेळ असून सुद्धा ती खाणे. ही सर्दी होण्याची मुख्य कारणे आहेत.
    कारण नंबर एक आणि दोन हे पूर्वजन्मानुसार किंवा कर्मफलानुसार तिथे जाणे हे अगोदरपासूनच ठरलेले असणे. याला आध्यात्मिक दोष हे कारण असते.
    कारण नंबर तीन आणि चार द्राक्षे खायचा मोह होणे, ती स्वतःच्या मनाने खरेदी करणे हे मानस हेतु झाले आणि पाच ते सात ही कारणे, म्हणजे द्राक्षे खरेदी करून आणल्यानंतर ती कृतीतून खाणे हा प्रत्यक्ष हेतु म्हणजे शारिरीक कारण घडले.
    यातील एक कारण जरी कमी ताकदीचे असले असते तर संप्राप्ती पूर्ण झाली नसती. आणि सर्दी झालीच नसती.

    एखादा रोग होण्यामागे प्रत्येक वेळी शारिरीक, मानसिक आणि आध्यात्मिक कारण असते. ते समजले की तसा उपाय करता येतो. म्हणजे रोग आध्यात्मिक स्तरावर असेल उपाय आध्यात्मिक, कारण मानसिक असेल तर मनापर्यंत पोचता यायला हवे आणि शरीराशी संबंधित व्याधी असेल तेव्हा औषध प्रत्यक्षात द्यावे लागते.

    हे प्रमेहाच्या बाबतीतही तसेच लागू होते.
    प्रमेह हा मुख्य रोग. त्याचे कफ पित्त वात या क्रमानुसार प्रत्येकी दहा, सहा आणि चार असे प्रकार. त्यातील वाताच्या चार प्रकारापैकी एक मधुमेह आहे. ज्याची भीतीयुक्त ओळख आज सगळ्यांनाच आहे. हा रोग होण्याची कारणे आयुर्वेदानुसार काय आहेत, हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय.

    काही गोष्टींची कारणमीमांसा प्रत्यक्षात करता येते, काही गोष्टी तर्काने जाणून घ्यायच्या असतात, तर काही अनुभूतीच्या स्तरावर. मग प्रश्नांची उत्तरे मिळत जातात. आणि दुःख होत नाही....
    नाहीतर....
    आयुष्यभर औषधे घ्यावी लागतात. !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021

    26.01.2017

  • जग आणि जग..

    हसून सोडून देण्यापलीकडे ह्या जगाची फारशी मोठी लायकी नाही..जगाला गांभिर्याने घेतलं की मग हे जग आपलं सरळ जगणंही उगाचंच गंभिर आणि क्लिष्ट करून टाकते..

  • प्रमुख आहार सूत्र – भाग ९

    दुधाचा विषय सुरू असल्याने त्यानंतरचा बनणारा पदार्थ म्हणजे दही. प्रमेह होऊ नये म्हणून जो श्लोक आधी वर्णन केला आहे, त्यातील पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द, दधिनी.

    खरंतर दुधानंतर दही बनते, पण शास्त्रकारांनी त्याच्यासाठी मानाचे स्थान निर्माण करून श्लोकात दुधाच्याही आधी बसवले. एवढे विशेष लक्ष देण्यासारखा हा आंबट पदार्थ साखरेच्या आजाराचे कारण असू शकतो ? वरवर पहाता, हे पटत नाही, फक्त गोड खाल्ले तरच डायबेटीस होतो, असे काहीतरी चुकीचे मत आपले झाले आहे. पाश्चात्य तज्ञ देखील मानतात, की हा मनोशारिरीक आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे होणारा आजार आहे.

    दृष्टीकोन बदलला की लक्ष्य बदलून जाते, तसं झालंय. शास्त्रकारांनी प्रमेह हा व्याधी कशामुळे होतो, याची जी कारणे सांगितली आहेत, ती का सांगितली असतील यावर चिंतन मनन करावे, म्हणूनच तर हे लेखन करीत आहे. लक्षात असे येतेय, प्रमेहाचे मूळ कारण जे शास्त्रकार सांगताहेत ते आहे, क्लेद ! म्हणजे चिकटपणा. न पचलेल्या अन्नातून किंवा अवयवामधे चिकटून, साठून राहिलेला एक घटक.

    थोडं विषयांतर होईल पण हे नीट समजायलाच हवं म्हणून सांगतो......

    रोग कसा होतो, याची एक सुरेख गुंफण शास्त्रकार वर्णन करतात, त्याला संप्राप्ती असा शब्द योजला जातो.

    हे 'अ' असं केलं, म्हणून 'आ' असं. झालं, म्हणून 'इ' च 'ई' असं झालं, त्यामुळे 'उ' हा बदल घडला, त्याचा परिणाम म्हणून 'ऊ' झालं.
    याला म्हणतात, संप्राप्ती !

    मला गरज नव्हती, तरी मी तिच्याबरोबर बाजारात गेलो. ती खरेदी करत असताना एकावेळपर्यंत मी तटस्थ होतो, एका मोहाच्या क्षणी हातगाडीवरील द्राक्षांकडे लक्ष गेलं, सहज एक द्राक्ष तोंडात टाकले, चव आवडली, गरज नसताना त्या गाडीवाल्याने आणखी दोन द्राक्षं माझ्या हातात ठेवली, मी परत ती खाल्ली, दर विचारला, परवडला, खरेदी झाली, घरात आणली, आणि सर्वांनी खाल्ली. दुसऱ्या दिवशी व्हायचे ते झालेच. सर्दी. सर्दी होण्यामागची ही जी साखळी तयार होते, त्याचा विचार करायचा, म्हणजे परत सर्दी होऊ नये याचा उपाय समजतो. यासाठी ही साखळी अभ्यासायची.
    मी जर तिच्याबरोबर बाजारात गेलोच नसतो तर....
    माझे काम फक्त पिशव्या उचलणे एवढेच होते, हे माहिती असूनदेखील तिथे लक्ष न देता, रिकाम्या वेळात, बाजुच्या हातगाडीवरील द्राक्षे माझ्या डोळे या ज्ञान इंद्रियाला दिसली, ती संवेदना, वर (मना ) पर्यंत पोचली. वरून परत आदेश आला. आणि हात या कर्म इंद्रियाकडून ते एक द्राक्ष तोंडात टाकले गेले. रसनेने त्याचा बोध केला. त्यातच त्या द्राक्षवाल्याने आणखी चुचकारले, आणखी दोन द्राक्षं खाल्ली. त्याला खूप आनंद झाला. आणखी खावीशी वाटली. पण त्या द्राक्षावरील फवारलेली रसायने, आतील आंबटपणा, होणारा परिणाम सगळं मोहामुळे नष्ट झालं. आधी झालेली सर्दी विसरली गेली, आणि 'ती' सोबत असूनही तिला न विचारता, आपल्या खिशातील सुटे पैसे काढून, द्राक्षांची पुडी घरी आणली गेली......
    आणि व्हायचे तेच झाले....सर्दी..... !!!

    सर्दी होण्यामागे मुख्य कारण द्राक्षे होती. पण त्यामागील अनेक कारणे दृष्टीआड होतात. ही एक साखळी बाहेरून दिसणारी झाली. दुसरी एक साखळी आतमधे सुरू होते. द्राक्षे पोटात गेल्यावर त्यातील चांगला आणि वाईट भाग वेगळा केला गेला. रस आणि चोथा. त्यातील विषारी पदार्थ यकृताने ( लिव्हरने ) वेगळे करण्याचा प्रयत्न केला. जेवढे विष बाहेर टाकता येईल तेवढे वृक्काने ( किडनीने) टाकले, जे शिल्लक राहिले ते पचवण्यासाठी इतर अवयवांची मदत घेतली गेली, त्यांच्याकडून आणखी काही स्राव मागवले गेले, पचन पूर्ण करून, त्यातून जेवढे चांगले बनवण्याचे प्रयत्न होते, ते सर्व केले गेले. पण हाय रे दैवा, चांगल्यापेक्षा वाईट भाग जास्ती तयार झाल्यामुळे परिणाम बदलला. नको असलेले, जास्त झालेले रस, मिळेल त्या जवळच्या मार्गाने शरीरातून बाहेर काढण्याचे काम आता आतमधे सुरू झाले. वयानुसार ही प्रक्रिया बदलते. लहान मुलांमध्ये, या द्राक्षांना आल्या पावली परत माघारी पाठवले जाते, म्हणजे सरळ उलटी होते.
    तर काही जणांच्या नासामार्गाचा वापर केला जातो, आपण त्याला सर्दी म्हणतो, तर काही जणांना जुलाबही होतात. कोणाला काय होणार हे प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार आणि त्यावेळच्या परिस्थितीनुसार ठरते. आणि मन निर्णय घेते. आणि भोग भोगावे लागतात. आपण त्याला रोग असे म्हणतो.

    ही एवढी मोठी साखळी लक्षात घेतली की सर्दी होऊ नये यासाठी काय काय करायला हवे होते हे लक्षात येते.या दोन साखळ्यांपैकी पहिल्या बाहेरील साखळीवर आपले नियंत्रण ठेवले असते, तर दुसरी साखळी सुरूच झाली नसती.
    या साखळ्या समजून घेणे म्हणजेच 'संप्राप्ती !'

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    25.01.2017

  • वात, पित्त आणि कफ

    ‘वात’, ‘पित्त’ आणि ‘कफ’ हे शब्द आयुर्वेदाच्या संदर्भात नेहमी ऐकलेले असतात. वात, पित्त आणि कफ हे तीन ‘दोष’ समजले जातात. दोषाधिक्यानं बनलेल्या ‘प्रकृती’ला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे.

    जन्माला येतानाच आपण ज्या प्रकारची प्रकृती घेऊन येतो, ती आयुष्यभर बदलत नाही. माणसाची शरीरयष्टी, शारीरिक गुण, स्वभाव, आवडीनिवडी हे सगळं प्रकृतीवर अवलंबून असतं, असं आयुर्वेद मानतो. अर्थात तुमची प्रकृती वर दिलेल्या तीनपैकीच एक असली पाहिजे, असं नाही. काही जणांच्या बाबतीत ते दोषांचं मिश्रणदेखील असू शकतं.

    हे सगळं जाणून घेणं उत्सुकता वाढवणारं असलं तरी आपली स्वत:ची प्रकृती कुठली हे आपल्या वैद्यांकडून तपासून जाणून घेतलेलं बरं. कारण त्यानुसार आपल्याला चालणारे आणि न चालणारे पदार्थ वेगळे असू शकतील.

    पित्त प्रकृती
    ‘पित्त’ प्रकृतीच्या व्यक्तींच्या त्वचेचा रंग सहसा गोरा आणि शरीरयष्टी मध्यम असते. त्यांची जीभ, टाळू, हाताचे तळवे, ओठ लालसर वर्णाचे असतात. केस पिंगट रंगाचे असतात आणि ते लवकर पिकतात. त्यांच्या त्वचेला सुरकुत्याही लवकर पडतात. ही मंडळी बुद्धीनं चांगली तीक्ष्ण असल्याचं बघायला मिळतं. यांना राग लवकर येतो. वारंवार भूक लागते आणि यांच्या आहाराचं प्रमाणही अधिक असतं. पित्त बिघडलं तर त्वचेवर लाल पुरळ येणं, फोड किंवा पस होणं, हातापायांचा दाह होणं, चक्कर येणं, भरपूर तहान लागणं, जेवायला अगदी १५-२० मिनिटांचा उशीर झाला तरी गळून गेल्यासारखं वाटणं अशा तक्रारी उद्भवतात.

    पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी काय खावं?
    यांना अन्नात मधुर, कडू आणि तुरट रस चालेल. आंबट, खारट आणि तिखट रस असलेले अन्नपदार्थ मात्र यांनी प्रमाणातच खावेत. साजूक तूप, दूध, ताक, सरबतं, रसदार कोशिंबिरी (विशेषत: गाजर, काकडी इ.) गोड फळं, ताज्या रसदार भाज्या या व्यक्तींसाठी चांगल्या. पडवळाची भाजी यांच्यासाठी विशेष चांगली. रोजच्या जेवणातले पदार्थ बनवताना जिरे आणि धन्याची पूडही जरूर वापरावी. या लोकांनी आवळा जरूर खावा. आवळा चवीला आंबट असला तरी त्याचा विपाक मधुर असतो.

    काय टाळावं-
    यांना फार गरम अन्न चालत नाही. आहारात या व्यक्तींनी पापड, लोणची, आंबवलेले बेकरीचे पदार्थ, अतिमसालेदार पदार्थ टाळावेत. सिगारेट, अल्कोहोल, तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाचं सेवन खरं तर सर्वानीच टाळलेलं चांगलं, पण पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना या गोष्टींचा त्रास लवकर होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी या सवयी टाळाव्यातच.

    वात प्रकृती
    ‘वात’ प्रकृतीच्या व्यक्तींची अंगयष्टी बारीक असते. त्यांचे केस, त्वचा, नखं रुक्ष असतात. त्यांना कमी झोप पुरते. या व्यक्ती सहसा बोलक्या असल्याचं दिसून येतं. नखं खाणं किंवा दात खाण्याची सवय त्यांना असते. यांना अन्न किंवा पेयं गरम आवडतात, गार यांना चालतच नाही. या व्यक्तींना बद्धकोष्ठाचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. वात बिघडला किंवा चुकीचं काही खाण्यात आलं की वात प्रकृतीच्या व्यक्तींना त्वचा काळवंडणे, अंगदुखी, लवकर थकवा येणे, आवाज फाटणे किंवा चिरकणे, वजन कमी होणे असे त्रास होऊ शकतात.

    वात प्रकृतीच्या व्यक्तींनी काय खावं?
    आहारात सहा रस मानले जातात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मधुर, आंबट, खारट, तिखट, कडू आणि तुरट हे ते रस. वात प्रकृती असलेल्यांनी मधुर, आंबट आणि खारट रस असलेले खाद्यपदार्थ खाल्ले तर चालतील. पण तिखट, कडू आणि तुरट हे रस वात वाढवणारे असल्यामुळे ते कमीत कमी खावेत. या लोकांनी कोकम सरबत जरूर आणि नियमित प्यावं. आहारात मधुर रसाची फळं खावीत. रोजच्या जेवणात लिंबाचा समावेश असावा. ताकही या व्यक्तींना चांगलंच. साजूक तूप, लोणी, ओलं खोबरं पदार्थात अगदी नियमित वापरावं. तीळ, जवस, काऱ्हळे या तेलबियांची चटणीही यांच्यासाठी चांगली, त्यानं वात नियंत्रणात येतो. कडधान्यांमध्ये या लोकांसाठी मूग चांगला.

    वात प्रकृतीच्या व्यक्तींनी अन्न शक्यतो गरमच खावं. थंड आणि शिळं अन्न टाळावं. यांनी उपवास टाळावा. चणे, राजमा अशी द्विदल धान्ये रुक्ष आणि वात वाढवणारी असतात. ती टाळली तर बरे.

    कफ प्रकृती
    ‘कफ’ प्रकृतीच्या व्यक्ती भरदार शरीरयष्टीच्या असतात. यांची हाडं मजबूत असतात. शारीरिक कामाचा झपाटा आणि स्मरणशक्तीही उत्तम असल्याचं दिसतं. हे लोक सहसा धैर्यवान असतात, म्हणजे त्यांना भीती कमी वाटते. यांना थंड किंवा शिळं अन्न आवडत नाही. ताजं आणि गरमच जेवण लागतं. कफ बिघडला तर या व्यक्तींचं वजन वाढलेलं बघायला मिळतं. दम लागणं, कफ होणं, पटकन अपचन होणं, अंग जड होणं, काहीच करायची इच्छा न उरणं अशा तक्रारीही कफ बिघडल्यामुळं होऊ शकतात.

    कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी काय खावं?
    या व्यक्तींसाठी तुरट, कडू आणि तिखट रस असलेले अन्नपदार्थ चांगले. गोड, आंबट आणि खारट रसाचे पदार्थ मात्र यांनी कमीच खावेत. ज्वारी, नाचणी यांच्यासाठी चांगली. भाज्यांचे सूप उत्तमच. ते बनवताना हिंग, जिरे, मोहरी, लसूण यांचा वापर जरूर करावा. मसाल्याचे पदार्थ जरूर वापरावेत. यांनी पदार्थ तळण्यापेक्षा भाजून खाल्लेले बरे. आहारात जवसदेखील जरूर खावेत. जुने धान्य, जुना तांदूळ खावा.

    काय टाळावं-
    पचायला जड, स्निग्ध, तळलेले अन्नपदार्थ टाळावेत. बटाटा, रताळी यांसारखी पिष्टमय कंदमुळं टाळावीत. बटाटय़ाचे वेफर्स शक्यतो टाळलेलेच बरे. दही कमी खावे. कडधान्यात उडीद कमी खावेत. मिठाईही प्रमाणातच खावी. शिळे, फ्रिजमध्ये ठेवलेले अन्नपदार्थ नकोतच.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- वैद्य राहुल सराफ

  • पाठदुखी

    पाठदुखी हे एक लक्षण आहे, शरीरातल्या बिघाडाचे सूचक चिन्ह आहे. हा बिघाड क्वचित गंभीर स्वरूपाचाही असू शकतो. अर्थातच पाठदुखीवर फक्‍त वेदना कमी करणे इतका मर्यादित स्वरूपाचा उपचार करणे अयोग्य ठरते, तर नेमके कारण काय आहे हे शोधून त्यानुसार नेमके उपचार करणे आवश्‍यक असते. पाठदुखी व कंबरदुखीचा अनुभव प्रत्येकाने घेतलेला असतो, दुखण्याची तीव्रता कमी अधिक असली तरी पाठदुखी सर्वांना माहिती असते. तसे पाहिले तर पाठदुखी हे एक लक्षण आहे, शरीरातल्या बिघाडाचे सूचक चिन्ह आहे. हा बिघाड क्वचित गंभीर स्वरूपाचाही असू शकतो. अर्थातच पाठदुखीवर फक्‍त वेदना कमी करणे इतका मर्यादित स्वरूपाचा उपचार करणे अयोग्य ठरते, तर नेमके कारण काय आहे हे शोधून त्यानुसार नेमके उपचार करणे आवश्‍यक असते. पाठीचा कणा हा संपूर्ण शरीराचा भरभक्कम आधार असतो. वाकणे, उठणे, बसणे, वळणे, चालणे अशा बहुतेक सर्वच क्रिया करताना आपण पाठीच्या कण्याचा वापर करत असतो. मानेमध्ये सात, छातीच्या मागच्या भागामध्ये बारा, कंबरेमध्ये पाच मणके असतात, माकडहाडाचे पाच मणके एकमेकांशी सांधलेल्या स्थितीत असतात व त्याच्याही खाली तीन ते पाच मणके
    जुळलेल्या स्थितीत असणारा कॉसिक्‍स म्हणून कण्याचा शेवटचा भाग असतो. अशा प्रकारे कवटीपासून ते बैठकीच्या भागापर्यंत हे सर्व मणके एकावर एक रचलेल्या स्थितीत असतात. दोन मणक्‍यांमध्ये जणू रबरापासून बनविल्यासारखी चकती असते, जिला "डिस्क (गादी)' असे म्हटले जाते. या मधल्या चकतीमुळेच कणा वाकू शकतो, वळू शकतो. या शिवाय या सर्व मणक्‍यांना व चकत्यांना धरून ठेवणारे अनेक संधिबंधने, स्नायू असतात. या कण्यामध्ये मज्जारज्जूचे स्थान असते. अतिशय महत्त्वाच्या व नाजूक मज्जारज्जूला पाठीचा कणा चहूबाजूंनी सुरक्षित ठेवण्याचे काम करत असतो. पाठदुखीचे कारण पाठदुखी असे म्हटले जाते तेव्हा हे दुखणे पाठीच्या कोणत्याही भागात उद्भवलेले असू शकते, तसेच पाठीच्या कण्यातील कुठल्याही संरचनेतील बिघाडाशी संबंधित असू शकते. उदा. पाठीच्या हाडांमधली ताकद कमी झाली तरी पाठ दुखू शकते. इतर हाडे ठिसूळ होतात त्याप्रमाणे मणके ठिसूळ होऊ लागले तरी पाठ दुखू शकते, कण्याला बांधून ठेवणाऱ्या संधिबंधनांना दुखापत झाली तरी पाठ दुखू शकते, कण्याला आधार देणारे स्नायू जखडू लागले तरी पाठदुखी सुरू होऊ शकते. दोन मणक्‍यांमधल्या चकतीची झीज झाली किंवा काही कारणाने ती स्वस्थानातून थोडी जरी निसटली आणि याचा दाब नसेवर आला तरी तीव्र स्वरूपाची पाठदुखी निर्माण होऊ शकते. याशिवाय स्त्रियांच्या बाबतीत गर्भाशयातील अशक्‍तता पाठदुखीला कारण ठरू शकते. अंगावरून पांढरे जाणे, पाळीच्या दिवसात अतिरक्‍तस्राव होणे हेसुद्धा पाठदुखीला आमंत्रण देऊ शकते. स्त्रीप्रजननसंस्थेत कुठेही सूज असली, जंतुसंसर्ग असला तरी त्यामुळे पाठदुखी, कंबरदुखी उद्भवू शकते. अर्थात अशा वेळी फक्‍त पाठीवर नाही तर आतील दोषावर नेमके उपचार करणे आवश्‍यक असते. वाढत्या वयानुसारही पाठ-कंबरदुखी सुरू होऊ शकते. आघात, अपघात, ताठ न बसण्याची सवय, बैठ्या स्वरूपाचे कामकाज, व्यायामाचा अभाव, संगणकावर रोज 10-12 तास काम हीसुद्धा पाठदुखीची कारणे होत. फार मऊ गादीवर झोपणे, उंच उशी वापरणे, स्थौल्य, उंच टाचेच्या चपला वापरणे, जड वस्तू उचलणे, ओढणे हीसुद्धा पाठदुखीला आमंत्रण देणारी असतात. बिघडलेला वातदोष आयुर्वेदानुसार विचार केला तर पाठदुखी, कंबरदुखी ही वातदोषातील बिघाडाशी संबंधित तक्रार होय. पाठीतील लवचिकता कमी होणे, उठता-बसताना आधाराची गरज भासणे, पाठ जखडणे, पाठीत चमक भरणे वगैरे सर्व तक्रारी वातदोषाशी संबंधित असतात आणि म्हणूनच सहसा पाठदुखी बरोबरीने वाताची इतर लक्षणेही उदा. गुडघेदुखी, मलावष्टंभ, गॅसेस, त्वचा कोरडी पडणे, अशक्‍तपणा जाणवणे, पाय दुखणे, नेहमीच्या हालचाली करताना सहजपणा न राहणे, सांध्यांमधून कटकट आवाज येणे वगैरे त्रास जाणवू लागतात. म्हणूनच पाठदुखी, कंबरदुखीवर उपचार करताना वाढलेल्या, बिघडलेल्या वातदोषाला संतुलित करणे, झीज झालेली असल्यास ती भरून काढणे आणि ज्या कारणामुळे पाठदुखी सुरू झाली असेल ते कारण दूर करणे अशा प्रकारे योजना करणे आवश्‍यक असते. पाठ दुखायला लागली, की विश्रांती घ्यावीशी वाटते हा सर्वांचा अनुभव असतो आणि सहसा यामुळे बरेही वाटते. मात्र, फार तीव्र स्वरूपाची पाठदुखी असेल, अगदी साध्या हालचाली करणेही अवघड होत असेल तर मात्र वैद्यकीय सल्ला घेणे आवश्‍यक असते. विशेषतः वेदना पाठीतून सुरू होऊन पायांच्या टोकापर्यंत पोचत असतील, श्‍वासोच्छ्वास करताना त्रास होत असेल, छातीत दुखत असले तर तातडीने वैद्यकीय सल्ला घेणे इष्ट होय; परंतु अशी परिस्थिती येऊ नये यासाठी दक्ष राहणेच इष्ट. प्रतिबंधात्मक उपाय संपूर्ण शरीराचा आधार असणाऱ्या पाठीच्या कण्याची सुरवातीपासून काळजी घेतली तर पाठदुखी-कंबरदुखीला प्रतिबंध तर होतोच, पण एकंदर चेतासंस्थेचे आरोग्य व्यवस्थित राहायला मदत मिळते. वातदोष संतुलित राहावा, पाठीच्या कण्यातील हाडे व सांधे तसेच आतील मज्जारज्जू यांचे पोषण व्हावे यादृष्टीने पुढील उपचार करता येतात. मान व पाठीला तेल लावणे. वाताला संतुलित ठेवण्यासाठी, सांध्यांची लवचिकता कायम ठेवण्यासाठी हा एक उत्तम उपाय होय. स्वतःहून किंवा दुसऱ्या कोणाकडून तरी खालून वर या दिशेने पाठीच्या कण्याला तेल उदा. संतुलन कुंडलिनी तेल लावता येते. नस्य - रोज रात्री झोपण्यापूर्वी नाकात घरचे साजूक तूप किंवा नस्यसॅन घृत टाकणे. विशेषतः हे मानेच्या आरोग्यासाठी उपयुक्‍त असते. तसेच मेरुदंडाला ताकद देण्यासाठी साहायक असते. रोजच्या रोज पोट साफ होण्याकडे लक्ष ठेवणे. वाताच्या असंतुलनामुळे पोट साफ होत नाही आणि पोट साफ झाले नाही तर त्यामुळे वात अजूनच बिघडतो. अर्थातच या दुष्ट चक्राचा पाठीच्या कण्यावरही दुष्परिणाम झाल्याशिवाय राहात नाही. त्यामुळे रोज पोट साफ होण्याकडे लक्ष ठेवणे चांगले. आवश्‍यकतेनुसार अविपत्तिकर चूर्ण, त्रिफळा, सॅनकूलसारखे चूर्ण घेता येते. आहारात वातशामक, कफपोषक पदार्थांचा समावेश असणे - किमान चार-पाच चमचे घरचे साजूक तूप रोजच्या आहारात ठेवणे, रोज कपभर ताजे सकस दूध पिणे, दुधात खारकेची एक चमचा पूड टाकणे, बरोबरीने शतावरी कल्प, चैतन्य कल्प घेणे हिवाळ्यात डिंकाचे लाडू खाणे हितकारक ठरते. मज्जापोषक, अस्थिपोषक पदार्थांचे सेवन करणे - खारीक, खसखस, डिंकाचे लाडू, बदाम, च्यवनप्राश, मॅरोसॅनसारखे रसायन रोज घेणे हे मणके, मेरुदंड अशा दोघांच्या आरोग्यासाठी चांगले असते. मानसिक ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करणे - पाठीचा कणा आणि मानसिक ताण यांचा खूप जवळचा संबंध असतो. ताणामुळे कण्याजवळील पेशी कडक झाल्या तर त्यामुळे पाठीच्या कण्याची लवचिकता कमी होते, पर्यायाने मानेचे व पाठीचे त्रास होण्याची शक्‍यता वाढते. मानसिक ताण आला तरी तो कमी करण्यासाठी स्वतःसाठी थोडा वेळ काढणे, संगीत ऐकणे, ॐकार गुंजन यांसारखे उपाय करता येतात. पाठीच्या कण्याचे आरोग्य टिकवायचे असेल तर त्यासाठी अजून एक उत्तम उपाय म्हणजे नियमित व्यायाम. यामध्ये सर्वप्रथम येते ते चालणे. रोज 30 मिनिटे नियमित चालल्यास पाठीच्या मणक्‍यांची, मणक्‍यांमधील गादीसारख्या डिस्कची लवचिकता नीट राहते, त्यामुळे मान-पाठीचे त्रास कमी होण्यास प्रतिबंध होतो. याखेरीज ताडासन, अर्धशलभासन, स्कंध चक्र, मार्जारासन, संतुलन क्रियायोगातील स्थैर्य, समर्पण, विस्तारण ही आसनेही मानेच्या-पाठीच्या आरोग्यासाठी उत्तम असतात. मानेचे सोपे व्यायाम, उदा. ताठ बसून मान हलकेच मागे नेणे, पुढे आणणे, डावी-उजवीकडे फिरविणे, खांद्यांच्या बाजूला शक्‍य तेवढी वाकवणे, पुन्हा सरळ करणे या प्रकारचे व्यायाम करता येतात. बैठे काम असणाऱ्यांनी, विशेषतः संगणकावर काम करावे लागणाऱ्यांना तर हे व्यायाम खुर्चीत बसल्या बसल्यासुद्धा करता येतात. प्राणायाम, दीर्घश्‍वसन किंवा या दोघांचा एकत्रित परिणाम देणारे ॐकार गुंजनसुद्धा पाठीच्या कण्यासाठी उत्कृष्ट उपाय होय. या उपायांनी हवेतील प्राणशक्‍ती अधिक प्रमाणात मिळू शकते व ती मेंदू, मेरुदंड यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी अत्यावश्‍यक असते. प्राणशक्‍तीचा पुरवठा पुरेशा प्रमाणात झाला की वेदना, जखडणे, अवघडणे यांसारख्या तक्रारींना वाव मिळत नाही, उलट रक्‍ताभिसरण अधिक चांगल्या प्रकारे होण्यास मदत मिळते. रोज किमान 10-15 मिनिटे यासाठी काढली तर पाठीच्या कण्यासंबंधी त्रास होण्यास प्रतिबंध होऊ शकेल.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • अशी घ्या केसांची निगा

    १) आवळा, शिकेकाई, रिठा हे सर्व २०० ग्रॅम घेउन एकत्र पाण्यात उकळावे. थोडा कापुर मिसळावा आणि शाम्पुसारखे हे पाणी डोके धुण्यास वापरावे.
    २) उरलेली चहापावडर एका ग्लासमध्ये स्वछ पाण्यात रात्रभर भिजत ठेवावी. सकाळी पाणी गाळून त्यात लिंबु पिळवा हे पाणी शाम्पुसारखे वापरावे.
    ३) कडुनिबांची पाने पाण्यात उकळुन त्याने केस धुवावेत. त्यामुळे केस मजबुत तर होतातच शिवाय केस ही गळ्तही नाहीत.
    ४) जास्वंद जेलने केस गळ्त असल्यास मसाज व कोरफ़ड जेलने केसांना मसाज करावा .
    ५) शिकेकाई पाण्यात उकळुन हे पाणी शाम्पुसारखे वापरावे त्यामुळे केस चमकदार होतील.
    ६) मेहंदी पावडर एक पाकीट १०० ग्रॅम घेउन त्यात १चमचा चहापावडरचे पाणी उकळुन त्या मिश्रणात १ चमचा कॉफ़ी पावडरचे पाणी उकळुन त्यात १ चमचा काथा पावडर त्यात घालावी. ही मेहंदी केसांना २ तास ठेवावी. केस सोनेरी रंगाचे तर होतीलच. शिवाय मुलायम पण होतील .
    7) कोरड्या केसांना मेहंदी, बदाम, एरंडेल तेल व तिळाचे तेल लावावे. त्यात स्निग्धपणा अधिक असतो. त्यातील एखादे तेल गरम करून लावावे.तेल लाउन झाल्यावर दोन - तीन तासात किंवा घरीच असाल तर ४-५ तासांनी केस धुवावेत म्हणजे धुळ, प्रदुषण केसात चिकटुन राहात नाही.य
    घरात अ‍ॅलोव्हेरा असेल तर त्याचा गर काढुन लावला तर केस मऊ होतात.
    8) शिकेकाई किंवा रिठ्याच्या पाण्याबरोबरच कोरड्या केसांना अंडे असलेला शाम्पू वापरावा.
    9) मेहंदी डायमुळे केसांना कलरिंग होते. कंडिशनिंग होते. पांढऱ्या केसांना कलर येतो. मुळांना मेहंदी लावल्याने कोंडा निघतो. त्वचा स्वच्छ झाल्याने नवीन केस येण्यास मदत होते. म्हणून किमान महिन्यातून एकदा तरी मेहंदीचा केसांच्या मुळापासून शेंड्यापर्यंत डाय करावा.
    10) मेहंदी भिजवताना केसांना पुरेल एवढी मेहंदी घ्यावी. केस काळे हवे असतील तर लोखंडी भांडे घ्यावे. एक कप चहापावडरचे पाणी घ्यावे. निलगिरी तेलाचे 3-4 थेंब, अंडे, लिंबू, आवळा पावडर घ्यावी.
    11) मेहंदी डाय ज्या दिवशी करणार, त्याच्या आदल्या दिवशी एक ग्लास पाण्यात एक चमचा चहाची पावडर टाकावी. ते पाणी उकळावे. हे पाणी थंड झाल्यानंतर त्यात अंडे टाकावे. अंडे चांगले मिक्‍स झाल्यानंतर आवळा पावडर टाकावी. हे मिश्रण घट्ट असावे. तयार केलेली मेहंदी चार ते सहा तास भिजवली पाहिजे. जेव्हा मेहंदी लावणार तेव्हा त्यामघ्ये लिंबू व निलगिरी तेल टाकावे.
    12) दुतोंडी केस हे आरोग्य चांगले नसल्याचंच लक्षण आहे. त्यामुळे पालेभाज्या, बीट , कडधान्य, अ‍ॅव्हाकाडो, फळं असा चौरस आहार ठेवला तर केसंसुद्धा निरोगी राहतात.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट