(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • आजीबाईचा बटवा

    ‘गृहिणी गृहमुच्यते’ अशी घराची व्याख्या केली जाते. ज्या ठिकाणी सर्व व्यक्तींना सांभाळायला, वाढवायला समर्थ अशी स्त्री आहे तिथंच घरपण असतं. कालच महिला दिन झाला .पोषणम शिक्षण आणि रक्षण अशा सर्वच जबाबदाऱ्या प्रत्येक गृहिणीला पार पाडाव्या लागतात. त्यातील आरोग्य रक्षणाची जबाबदारी पार पाडणं तर चालू काळात फारच कठीण होत चालले आहे. आजीबाईचा बटवा ही शोभेची वस्तू नाही. या बटव्यातील चिजांची नीट माहिती करून न घेता बटव्याचा योग्य उपयोग करता येणार नाही. म्हणूनच प्रत्येक गृहिणीनं वरचेवर आढळणाऱ्या रोगांसंबंधी तक्रारींसंबंधी थोडीशी माहिती मिळविली पाहिजे. ‘ताप येणे’ ही अवस्था ! बहुसंख्य गृहिणी ‘अंग गरम वाटतं, ताप पाहिला नाही’ असं सांगतात. प्रत्येक घरात एक थर्मामीटर असणे आवश्यक आहे. कुणाचाही ताप, तो दर चार तासांनी मोजून तापाची नोंद करावी. केवळ तापाचा चढ उतार लक्षात घेऊन ताप टायफॉईडचा आहे, मलेरिआचा आहे किंवा अन्य कोणत्या प्रकारचा आहे हे डॉक्टर बरेचदा ओळ्खू शकतात.
    त्रिभुवन कीर्ती हे त्याच्या नावाप्रमाणेच तापावरील एक अत्यंत उपयोगी औषध म्हणून कीर्ती मिळवून आहे. लहान मुलांना त्रिभुवन कीर्तीची पूड देण्यापेक्षा मधात उगाळूनमात्रा द्यावी. इतरांना २ ते ३ गोळ्या दिवसातून ३ वेळा पाण्यातून द्याव्या. विशेषतः सर्दी अंगदुखी किंवा फ्ल्यू ची लक्षणे असतील तर तुळशीच्या रसातून औषध द्यावं. चंद्रकला हेही तापावरील एक गुणकारी औषध. विशेषतः ताप १०३-१०४ फॅ. असा तीव्र असेल किंवा तापाबरोबर अंगाची लाही लाही होणं, डोळ्यांची आग होणं, चेहेरा लालबुंद होणं अशा तक्रारी असतील तर १ ते २ गोळ्या दिवसातून ४ वेळा द्याव्या. गुळवेल सत्त्व या वनस्पतीचं पर्यायी नाव अमृता आहे. खूप दिवस येणाऱ्या तापामध्ये, बरेचदा नेमके कारणही कळत नाही. शरीरात उष्णता कडकी वाढली असं म्हटलं जातं. अशा वेळी गुळवेल सत्त्व खूप दिवस पोटात द्यावे. किंवा गुळवेलीचा काढा द्यावा. ‘संशमनी वटी’ नावाच्या गोळ्याही मिळतात.

    याहीपेक्षा तापावरील घरगुती उपचार म्हणजे विडा ! कडुनिंब, तुअळस व बेल यांची प्रत्येकी ७, ७ पाने घालून विडा तयार करावा व तो रोग्यास चावून चावून खाण्यास सांगावा. चव कडू लागते पण म्हणून त्यात साखर घालू नये. याच काढाही करून देतात. महिनेन महिने नवनवीन अँटिबॉयॉटिक्स-कॉर्टिझोन्स तपासण्या या आधुनिक पद्धतीनं बेजार झालेल्यांना तर हा प्रयोग करण्यास काहीच हरकत नाही.

    विशेषतः मलेरियावर तर नुसत्या, कडूनिंबाचा विडा ३ दिवस थंडी वाजून ताप आला असता खाण्यास द्यावा. तापाचा प्रकार कोणताही असला तरी रोग्यास तांदुळाची पातळ पेज, तूप,मीठ, मेतकूट असा हलका आहार जरूर द्यावा. रोग्याला थर्मामीटर, शेकण्याची पिशवी, सहाण, लहान खलबत्ता, कात्री, कापूस, बँडेज, चिकटपट्टी व गृहिणीने आपल्याला ज्याची चांगली माहिती आहे अशी १५ ते २० औषधे. या बटव्यात असली पाहिजेत. सर्वांनी हे समजूनं घेतले पाहिजे की आपण जे वापरणार व ज्या तक्रारीसाठी वापरणार त्या दोन्ही गोष्टींची माहिती स्वतः करून घेतली पाहिजे. यादृष्टीनं गृहिणीनं पुढील पुस्तके संग्रही ठेवावीत.

    आयुर्वेदीय औषधी गुणधर्मशास्त्र : वैद्य. पं. गंगाधरशास्त्री गुणे.
    नित्योपयोगी निवडक औषधे : श्री. म. गो. मोडक.
    गृहवैद्य : लेखक डॉ. र. कृ. गर्दे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

  • तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याचे फायदे

    पाण्याला तर जीवन संबोधलं जातं, निरोग़ी आरोग्यासाठी संतुलित आहार, योग्य व्यायाम याचबरोबर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. सकाळी अनशी पोटी तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्यास शारीरिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी अधिक फायदा होतो. आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी त्रिदोषहारक ( कफ , पित्त, वात) असते.त्यामुळे किमान ८ तास तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी नियमित प्यावे. तांब्याच्या नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्मामुळे पाणी निर्जंतुक होते. पित्त, अल्सर किंवा पोटात ग़ॅसचा विकार होणार्यांतसाठी तांब्याच्या भांडात ठेवलेले पाणी पिणे अत्यंत हितकारी आहे. तांब्यातील जंतूनाशक गुणधर्मामुळे , पोटातील जिवाणूंचा नाश होतो ,जळजळ होण्याची समस्या कमी होते. पचनसंस्थेला चालना देण्याबरोबरच हे पाणी शरीरातील अतिरिक्त मेद कमी करण्यास मदत करते. शरीराला आवश्यक मेद शोषून घेतल्यानंतर चरबी वाढवणारे अनावश्यक मेद बाहेर टाकण्यास मदत करते. तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी अॅढन्टीबॅक्टेरीयल तसेच अॅणन्टीवायरल असल्याने दाह कमी करण्यास मदत होते. तांब्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते. या पाण्यातील अॅ न्टीऑक्सिडंट आणि नवीन पेशी निर्माण करण्याची क्षमता चेहर्यायवरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करते. तसेच चेहर्याीवरील नवीन त्वचा निर्माण करण्यास मदत करते. हृदयरोग व रक्तदाबासारखे आजार आटोक्यात ठेवण्यास मदत करते. तांब्याच्या अॅवन्टीऑक्सिडंट घटकांचा ,कर्करोग जडण्याचे प्रमुख कारण असणार्याल शरीरातील फ्री-रॅडिकल्सशी सामना करण्यासाठी मदत होते. शरीरातील अनेक कार्य सुरळीत करण्यासाठी तांब्याचा उपयोग होतो. अगदी पेशींची निर्मीती करण्यापासुन ते पदार्थांतील आयर्न(लोह) व मिनरल्स शोषून घेण्यासाठी मदत होते. तांबे शरीरात मेलॅनीनच्या निर्मितीमध्ये मदत करते. तसेच त्वचेच्या पेशींच्या निर्मीतीत तांबे प्रमुख भुमिका बजावते. त्यामुळे रोज सकाळी तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्यास त्वचेचा पोत व आरोग्य सुधारण्यास मदत होते. तांब्यात दाह दूर करण्याची क्षमता असल्याने , संधीवाताच्या त्रासामुळे होणारी सांधेदुखी दुर होण्यास मदत होते. तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने शरीरातील थायरॉक्सिन हार्मोन संतुलित राहते.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • प्रमुख आहारसूत्र – प्रमेह भाग १७

    समर्थ रामदास स्वामी म्हणतात,
    देहे दुःख ते सुख मानीत जावे....
    सुखाच्या आमच्या कल्पना एवढ्या बदलून गेल्या आहेत की खरं आणि शाश्वत सुख कुठे मिळेल असा विचार करायला सुद्धा वेळ नाही कोणाकडे !
    प.पू. गोंदवलेकर महाराज आपल्या प्रवचनामधे म्हणतात,
    सुखापेक्षा समाधान महत्वाचे.
    सुख हे न संपणारे असते. एक सुख भोगून झाले की, दुसरे हवेसे वाटते. जिथे सुख संपते तिथे समाधान सुरू होते. किती अर्थपूर्ण वाक्य आहे ना हे. एका गोष्टी मधे संतुष्टी होतच नाही. एकावर एक फ्रीचा जमाना आहे. तिथे सुख कुठे संपते हे कसं कळणार ?

    प्रमेहाच्या सूत्रामधे या सुखासनाचा सर्वात प्रथम उल्लेख करावासा वाटला. आळशी बनत जाणे, वृत्तीने, कर्माने, तनाने आणि मनाने सुद्धा!

    आजची तरूण पिढी. दोष देत नाही, पण नाक्यावरून दळण आणायचं झालं तरी बाईकचं बटन स्टार्ट केल्याशिवाय दळण सुद्धा आणले जात नाही. छोटी छोटी काम करायचा आळस हा पुढे मधुमेहासारख्या आजाराला जन्म देतो, हे लिहून ठेवणारे दूरदृष्टीचे ऋषी, भारतात होऊन गेले याचा अभिमान बाळगायलाच हवा. पण पाश्चात्यांच्या आपण एवढे आहारी गेलो आहोत की, आमच्या ऋषींचे कौतुक सोडाच, पण भारतीयांनाच मागासलेपणाचा शिक्का मारून आपण मोकळे होतो.

    घरातील छोट्या छोट्या गोष्टी करायला लाज कशाला बाळगायची ? ही कामे करताना आरोग्याचे पण रक्षण होतेच आहे, असा सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा.

    किती सोप्पं आणि सुखासिन झालं आहे जगणं.
    चुल फुंकावी लागत नाही, की जमिन सारवावी लागत नाही,
    पाणी ओढायला लागत नाही, किंवा शेंदावे लागत नाही, नळ सोडला किंवा बटन दाबले की पाणी किचनमधे !
    ठिबक सिंचनमुळे पाणी झाडांना सुद्धा द्यावे लागत नाही.
    ट्रॅक्टरमुळे नांगर हातात धरावा लागत नाही,
    मिक्सर आल्यामुळे पाटा वरवंटाही गेला. टेबलखुर्ची आली नि खाली बसून जेवणारी पंगत संपली,
    एवढंच काय वारा घेण्यासाठी सुद्धा हात हलवावा लागत नाही.
    हळदीकुंकु असेल तर निमंत्रणे देण्यासाठी फिरावे लागत होते, वाॅटसपमुळे तेही नाही.
    शाॅपिंगही ऑनलाईन. पैसे मोजायचे पण श्रम नाहीत, करा स्वाईप !

    पाश्चात्य देशात काम करायला माणसं मिळत नाहीत म्हणून मशीनची निर्मिती करणे ही त्यांची गरज होती, पण माणसांची मुबलकता असलेल्या प्रिय भारत देशात, पाश्चात्यांनी बनवलेली मशिन्स घरात आणून, माणसे मुबलक मिळतात म्हणून मशिन चालवायला पुनः बाई किंवा बाबाला ठेवायला लागले. ही सुखासिनता नव्हे काय ?
    नंतर आजारपण आल्यावर दिवसाला सोळा सोळा प्रकारची औषधे खात बसून आरोग्य विकत घ्यायचे ? याला काय म्हणावे ?

    मध्यंतरी एक जपानी व्हिडिओ बघीतला होता, माणसाला बेड वरून हलवून उठवायला घड्याळ. त्याचा बेड आणि त्याला उभा करायला मशिनची प्रगत टेक्नाॅलाॅजी. त्याचे गाल बाजुला करून तोंडात टूथब्रश ढकलून त्याचे दात घासले गेले, नंतर चुळ भरायला पाणी तोंडात सोडले गेले, चुळ भरायला छोटे बेसिन, आपल्या पिकदाणी सारखे तोंडासमोर हजर.
    रोबोच्या दुसऱ्या हातानी ओले झालेले तोंड पुसायचे. वगैरे वगैरे टेक्नाॅलाॅजीची कमाल दाखवली जात होती. हा सुखाचा अतिरेक नव्हे काय ?
    अतिशयोक्तीचा दोष सोडून देऊ....
    पण निदान...
    आपली ताट वाटी आपली आपण उचलून ठेवावी, जमलं तर घासावी.
    आपले कपडे आपण बुचकळून काढावेत.
    आपली गाडी आपण धुवावी. पुसावी तरी.
    आपले अंथरूण पांघरूण आपणच घालावे, आपणच आवरावे.
    आणि
    आपल्या देवघरात एकदा तरी त्याच्यासमोर ओणवे रहावे.
    देहे दुःख ते सुख मानीत जावे......

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02.02.2017

  • दोन्ही अर्थसंकल्पाची तयारी कशी होते ?

    दोन्ही अर्थसंकल्पाची कशी होते ? कोण याची निर्मीती करते ? कोणत्या प्रिटींग प्रेसमधून याची छपाई केली जाते ?या प्रक्रियेत कोण कोण सहभागी होते ?बजेटमधील काही महत्वाच्या बाबी फुटल्या जाऊ नयेत यासाठी कोणत्या उपाययोजना तयार केल्या जातात ? अशा प्रकारचे प्रकारचे अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडत असतात.

    अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया ही अत्यंत क्लितष्ट, जबाबदारीचे तसेच जोखमीचे काम असते. त्यामुळे हे काम करणारे सर्वजण रात्र आणि दिवस एक करून अर्थसंकल्प तयार करतात. या अर्थसंकल्पाची सुरूवात ही एका सोहळ्याने होते. हलवा सोहळा असे या सोहळ्याचे नाव आहे. हा सोहळा वर्षानुवर्षापासून सुरू आहे.

    नवीन अर्थसंकल्पाची तयार करण्याची प्रक्रिया सप्टेंबरपासून सुरू होते. म्हणजेच याची सुरूवात सर्क्युरलरच्या माध्यमातून होते. देशातील सर्वात महत्वाच्या आणि सर्वच विभागात सरकारकडून एक सर्क्युरलर पाठविण्यात येते. ज्यात त्या-त्या विभागाला आगामी वर्षभराच्या खर्चाची माहिती, त्यांच्या वर्षभरातील नव्या योजनांची आणि त्यावर होणाऱ्या खर्चाची इतंभूत माहिती देणे आवश्याक असते. प्रत्येक विभागातून देण्यात येणाऱ्या ही माहिती अर्थसंकल्पाच्या निर्मीतीत अत्यंत महत्वाचे मानले जाते. यानंतर कोणत्या वस्तूवर किती कर आकारला जायचा याविषयी स्टेकहोल्डर्स रायसीना हिल्सवर येवून याविषयी चर्चा करतात.
    अर्थसंकल्पाच्या निर्मीतीमध्ये हा टप्पा अत्यंत महत्वाचा मानला जातो. कारण यामुळेच आगामी वर्षभरात देशात घडामोडी घडत असतात. त्यामुळे अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली हितचिंतकांची एक बैठक घेण्यात येते. या बैठकीत सरकार आणि त्यांच्या मित्रपक्षांना अपेक्षित असणारे सर्व बदल बैठकीनंतर करण्यात येत असतात.

    जेव्हा अर्थसंकल्पासाठी आवश्ययक असणारी सर्व माहिती गोळा केली जाते त्यानंतर पुढे सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे टाईपिंग आणि प्रिटींगचा. या टप्प्यावर सर्वच उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची करडी नजर असते. यातम उच्च पदस्थ अधिकारी, प्रिंटींग टेक्नि शियन आणि स्टेनोग्राफर एक प्रकारे शेवटचे सात दिवस तर कैद असल्याप्रमाणेच काम करत असतात. त्यांना त्यांच्या कुटुंबियांशीदेखील बोलण्याची परवानगी नसते. जर एखाद्या अधिकाऱ्याच्या कुटुंबात आपत्कालिन परिस्थिती आलीच तर त्यांना केवळ संदेशाच्या माध्यमातून माहिती देण्याची परवानगी असते. परंतू, संबंधित अधिकाऱ्याला त्याच्या कुटुंबियाशी बोलण्याचा अधिकार नसतो.

    संयुक्तत सचिवांच्या अध्यक्षतेखालील इंटेलिजन्स ब्युरोचे अधिकारी अर्थसंकल्प तयार करणाऱ्या टीमवर आणि त्यांच्या फोन कॉल्सवर बारिक नजर ठेवतात. खास करून स्टेनोग्राफरवर जास्त पाळत ठेवली जाते. अर्थसंकल्पाची कोणतीही माहिती बाहेर जाऊ नये यासाठी त्यांचे संगणक नॅशनल इन्फॉर्मेशन सेटरच्या सर्व्हरपासून वेगळे ठेवले जातात. एवढेच नाही तर नॉर्थ ब्लॉकमध्ये एक पावरफुल मोबाईल जॅमर लावण्यात येते जेणेकरून कोणत्याही अधिकाऱ्याकडून इथली माहिती बाहेर पडता कामा नये.

    केंद्रीय अर्थमंत्र्यांचे संसदेतील अर्थसंकल्पाचे भाषण हे सर्वात गोपनिय कागदपत्रे असतात. त्यामुळे याची छपाई अर्थसंकल्पाच्या दोन दिवस अगोदर मध्यरात्रीच करण्यात येते. दरम्यान, ज्याठिकाणी या भाषणाची तयारी करण्यात येते त्या स्टेनोग्राफरच्या विभागात अर्थमंत्र्यासह इंटेलिजन्स ब्युरोचे अधिकारी कधीही भेट देवू शकतात त्यामुळे याठिकाणची सुरक्षितता ही देशातील सर्वोच्च मानली जाते. पुर्वी अर्थसंकल्पाची छपाई ही राष्ट्रपती भवनातून होत होती मात्र १९५० मध्ये अर्थसंकल्प संसदेत सादर होण्याच्या अगोदर लिक झाल्यानंतर इथून होणारी छपाई थांबविण्यात आली. त्यानंतर मिंट रोडच्या एका ठिकाणी याची छपाई करण्यात येत होती. मात्र १९८० पासून ते आजपर्यंत अर्थसंकल्पाची छपाई ही नॉर्थ ब्लॉकच्या बेसमेंटमध्ये करण्यात येत आहे. अर्थसंकल्पाच्या कागदपत्रांची निर्मीती ही नॉर्थ ब्लॉकमध्ये करण्यात येते. अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अधिकाऱ्यांना नॉर्थ ब्लॉकमध्ये पुर्णपणे वेगळे ठेवण्यात येते. त्यांना जोपर्यंत अर्थमंत्री संसदेत अर्थसंकल्प सादर करत नाहीत तोपर्यंत सुट्टी देण्यात येत नाही ज्यावेळी अर्थसकंल्पाचे संसदेत वाचन पुर्ण होते त्याचवेळी या अधिकाऱ्यांना त्यांच्या घरी जाण्याची परवानगी देण्यात येते.

    दरम्यान, यासर्व प्रक्रियेनंतर संसदेत अर्थसंकल्पाचे केंद्रीय अर्थमंत्री सादरीकरण करतात. तसेच संसदेत अर्थसंकल्प सादर करण्यापुर्वी राष्ट्रपतींच्या मंजूरी घेणेही बंधनकारक असते. तसेच संसदेत सादर करण्याच्या अगोदर युनियन कॅबिनेटच्या समोर अर्थसंकल्प सादर करण्यात येते. दरम्यान,सकाळी ११ वाजता अर्थसंकल्पाचे अर्थमंत्री वाचन करतात. दरम्यान, यानंतर संसदेत सादर झालेल्या अर्थसंकल्पावर सविस्तर चर्चा होते. साधारण ही चर्चा अर्थसंकल्प सादर झाल्यापासून पुढे चार दिवस चालते. या चर्चेनंतर संसदेचे अध्यक्ष संसदेत सरकारकडून सादर करण्यात आलेल्या अनुदानवर मतदान घेते आणि त्यांनतर विनीयोग विधेयक मंजूर करण्यासाठी मतदान होते. या मतदानानंतर ७५ दिवसांच्या आत हे विधेयक मंजुरीसाठी राष्ट्रपतिकडे पाठविण्यात येते.त्यानंतर राष्ट्रपतींच्या मंजूरीनंतरच अर्थसंकल्पाची प्रक्रिया पुर्ण होते.

    संकलन संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

  • किळस आलीय आम्हाला तुमची..

    भाजपा-सेना यांच्यातली ‘लोकसेवे’साठी चालणारी झोंबाझोबी पाहून मन कसं भरून यायला हवं, काळीज दाटून यायला हवं आपलं.. पण तसं काहीच न होता चीड, संताप, तिरस्कार, किळसं वाटू लागलीय..

  • किचन क्लिनीक – दुध

    दुध हे पुर्णान्न आहे पण देशी गाईचेच बरं का!

    देशी गाईमध्ये देखील गीर हि प्रजाती जी मुळ गुजरात येथील आहे तिचे दुध सगळ्यांपेक्षा गुणांनी श्रेष्ठ आहे. देशी गायीचे दुध हे तुलनेने भरपूर गुणांनीयुक्त,पचायला हलके, स्निग्धांश कमी असणारे असे असते.

    लहान मुलांना देखील काही कारणाने आईचे दुध मिळत नसेल तर पावडरचे दुध घालून त्यांचे पोट खराब करण्यापेक्षा गाईंचे दुध पाजावे.असे म्हंटलेच आहे ना माय नसेल तिथे गाय आहे.आणी कसा योगायोग आहे पहा ना आई जशी आपल्या बाळाला पोटात ९ महीने वाढवते तशी गाय देखील ९ महिन्यांनीच व्याते.

    आपल्या भारतीय संस्कृतींत गाईला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे ते काही उगाच नव्हे.गाय हि खरोखरच पुजनीय आहे.असे म्हणतात कि गोमातेची सेवा केल्याने सर्व पापकर्मांचे क्षालन होते.तसेच गाईच्या उदरात ३३ कोट देव वसतात असे म्हणतात.

    गाईंचे दुधच नव्हे तर मुत्र,शेण हे देखील औषधी गुणधर्म युक्त आहे.गाईच्या वाशिंडावर जी सुर्य किरणे पडतात त्याचे रूपांतर सोन्यामध्ये होते आणी ह्या सोन्याचे अंश गाईच्या दुधात सापडले आहेत हे संशोधनाने सिद्ध झाले आहे. त्यामुळेच देशीगायीचे दुध हे पिवळया रंगाचे असते.

    आधुनिक विज्ञानाच्या संशोधनातून असे आढळले कि देशी गाईच्या दूधामध्ये A-2 protein आढळते जे आपल्या आरोग्याला अत्यंत फायदेशीर आहे.

    पण आपल्या देशाची विवंचनाच अशी आहे कि आपण हातचे सोडुन पळत्याच्या मागे धावत असतो.आणी ह्याच मुळे आपल्याला आपले अस्तित्व गमवायची पाळी आली आहे.होय बरोब्बर ओळखलेत तुम्ही माझा रोख कुठे आहे तो.

    २५-३० वर्षांपूर्वी आपल्या देशांतील सरकारने काय केले. दुधाचे उत्पादन वाढवावे म्हणून जर्सी हा प्राणी आपल्या देशात आणला आणी त्याची बिजं आपल्या देशांतील दुग्ध उत्पादन क्षेत्रात रोवली. आपण सगळे जर्सी गाय असे म्हणता पण मी त्याला फक्त एक प्राणीच म्हणेन कारण ज्या प्राण्याच्या शरीरात दुध उत्पादन वाढावे म्हणून डुक्कर ह्या प्राण्याचे जीन्स रोवले आहेत त्याला आपण गाय नाही ना म्हणू शकत.आणी ह्या जर्सीचे दुध हे दुध नसून दुधाच्या रूपातले सफेद विष आहे जे आपल्या देशांतल्या पिढीच्या रक्तात इतकी वर्षे भिनले आहे आणी आता ते आपले जहाल रूप दाखवू लागले आहे.थोडक्यात काय जर्सी ह्या पुतनामावशीचे विषारी दुध आपल्या देशांतील बाळकृष्ण दुध म्हणून पित आहेत किंबहुना आपल्या देशांतील यशोदा माताच त्यांना हे पाजत आहेत.तर सांगायचा मुद्दा हा कि जर्सीचे दुध हे slow poison आहे.

    जर्सीच्या दुधात असणारे A-1 protein हे त्यामागील खरे कारण आहे.ह्याच प्रथिनामुळे जर्सीचे दुध हे विषारी बनले आहे .आणी त्यामुळे हे दुध पिऊन कर्करोग, डायबेटिस ,हृदयविकार, मानसिक आजार,नपुंसकता इ अनेक भयानक रोग आपल्या देशात वाढले आहेत.खरं वाटत नसेल तर विचार करून बघा.

    आता पुढे अजून हानी व्हायच्या आत आपण सर्वांनी शहाणे होऊया.आणी हे जर्सीचे दुध पिणे थांबवून देशी गाईंचे दुंध पिऊया.आपण सर्वांना माझी हि कळकळीची विनंती आहे कि देशी गाईचेच दुध प्या व आपल्या मुलांना पाजा.गाईचे दुध मिळत नसेल म्हशीचे प्या पण जर्सीच्या दुधापासून लांब रहा.

    दुध ह्या विषयी पुढील माहिती देण्या आधी मला आपणा सर्वांना जागृत करणे गरजेचे वाटले म्हणून हा लेख.

    (क्रमश:)

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:
    ९९६०६९९७०४

  • आनंद: एक वाटणं आणि वाटणं..

    “प्रत्येकाला आपण आनंदात असावं असं वाटणं हा मनुष्यस्वभाव झाला व आपल्यासारखंच इतरांनीही आमंदात असावं असं वाटण ही माणुसकी झाली..” हे पुलंचं ‘पाचामुखी’ या पुस्तकातलं वाक्य. किती गहन अर्थ भरलाय या वाक्यात..! पण होतं काय, की आपण ते वाचतो, पांच मिनिटं भारावल्यासारखं होतो आणि पुन्हा मी, माझं सुरू करतो..

  • प्रमुख आहारसूत्र – भाग १६

    सुखाच्या कक्षा वाढवित जाणे, सुखाचा हव्यास वाढवित नेणे, हा प्रमेहाचा हेतु आहे. यालाच आस्यासुख असे ग्रंथकार म्हणतात. कुठुनही शरीरातील कफ वाढण्यासाठी मदत करणे हा प्रमेहाचा हेतु आहे. असे ग्रंथकार म्हणतात.

    आस्या सुख म्हणजे हालचाली करू नयेत, दोन्ही हात हलवत काम करण्यापेक्षा, एकाच हाताने काम करावे, असे वाटणे, हे आस्यासुखच!

    अहो, कंप्युटरचा माऊस एकाच हाताने हलवित बसण्यापेक्षा केवळ डोळ्यानीच तो ऑपरेट करणे, असे अॅप सुद्धा आले आहे, एका हाताचे एक बोटसुद्धा हलवायला नको. फक्त डोळे फिरवायचे की कर्सर हलतो. हे आस्यासुख.!

    उभे राहून काम करण्यापेक्षा किंवा फिरत फिरत काम करण्यापेक्षा बसून काम करावे असे वाटणे. बसताना सुद्धा खाली जागा नीट समतल असावी, एखादी बैठक असावी, असे वाटणे. सतरंजी मिळाली की सतरंजीपेक्षा आणखी मऊ आरामशीर आसनावर बसावे, एकदा बसले की उठू नये असे वाटणे, बसलो तर टेकून बसावेसे वाटणे, टेकून बसलो तर टेकायला मऊ तक्क्या असावासा वाटणे, तक्का मिळाला तर उशी हवीशी वाटणे,बसायला जागा मिळतेच आहे तर खुर्ची का नको ? मग ही खुर्ची काटकोनीच कशाला, त्यापेक्षा विशालकोनी बरी. हे आस्यासुख !!

    आरामखुर्चीवर बसल्यावर पुढे पाय समांतर टेकण्यासाठी टेबल हवे, असे वाटत रहाणे, पण मागे काय चालले आहे हे समजत नाही, त्यासाठी ही आरामखुर्ची गोल फिरणारी हवी ..... आरामखुर्चीवरच बसायचे मग नुसतीच कापडवाली आरामखुर्ची कशाला, फोमचीच वापरूया..... हे आस्यासुख !

    चालण्यापेक्षा सायकल बरी, सायकल पेक्षा स्कूटी बरी, स्कूटीपेक्षा स्कूटर, त्यापेक्षा बाईक, ही बाईक एक पाय झाडून सुरू करण्यापेक्षा एक बोट दाबून सुरू झाली तर बरी !!!!! हे आस्यासुख !!

    कमरेत वाकून जमिनीवरचा केर केरसुणीने काढण्यापेक्षा उभे राहून व्हॅक्युम क्लीनरने केर ओढून घेणे, उकीडवे बसून लादी पुसण्यापेक्षा माॅबने किंवा दांडा लावलेल्या स्पंजने लादी अलगद पुसुन घेणे, किंवा आपण काम न करता, चक्क त्या कामासाठी बाई लावणे, हे आस्या सुख !!!

    सुख हे केवळ बसण्यामधूनच मिळते. बसण्यामधले पुरेपुर सुख मिळवण्यासाठी धडपड सुरू होणे असाही आस्यासुखचा अर्थ आहे.

    सुखार्था सर्व भूतानाम् मताः सर्वा प्रवृत्तयः, असे वाग्भटजी म्हणतात. सर्व प्राणी मात्रांची सुखाकडेच प्रवृत्ती असते, पण प्रमेहामधे, ती जरा जास्तच या कॅटेगरीमधे मोडते.

    याचा अर्थ असा नव्हे की सुखाची कामना, इच्छा करूच नये. सुख मिळावेसे वाटणे, ही अगदी नैसर्गिक भावना आहे. पण आणखी आणखी, त्यापेक्षा जास्ती सुख मलाच मिळावे. हा हावरटपणा किंवा सुखाचा अतिरेक हे दुःखाचे कारण ठरू नये.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    01.02.2017

  • अर्थसंकल्प २०१७

    अर्थमंत्री अरुण जेटली उद्या बुधवारी म्हणजेच १ फेब्रुवारी २०१७ रोजी रेल्वे अर्थसंकल्प मुख्य अर्थसंकल्पाबरोबर सादर करणार आहेत. ९३ वर्षात प्रथमच रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे सादर केला जाणार नाही. १९२४ मध्ये ब्रिटीश काळापासून २०१६ पर्यंत रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे साजरा केला जात होता. तसेच प्रथमच सर्वसाधारण अर्थसंकल्प २८ किंवा २९ फेब्रुवारीऐवजी १ फेब्रुवारीला सादर केला जाणार आहे. यावेळी प्रथमच तो फ्रेबुवारीच्या पहिल्या आठवड्यात सादर होत आहे. २००० पर्यंत अर्थसंकल्प सायंकाळी ५ वाजता सादर होत असे. पण वाजपेयी सरकारच्या काळात २००१ मध्ये मा.यशवंत सिन्हा यांनी ह्यात बदल केला आणि अर्थसंकल्प ११ वाजता सादर होऊ लागला.

    १९२४ पासून सर्वसाधारण अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्यातील अखेरीस सादर झालेला आहे. स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत एकूण ३६ अर्थमंत्री झाले. पण काही अर्थमंत्र्यांनी दोन-दोन, तीन-तीन टर्म अर्थमंत्रीपद भुषविल्यामुळे त्या पदावर बसलेल्या व्यक्तींचा हिशेब केल्यास विद्यमान अर्थमंत्री अरुण जेटली हे २६ वे अर्थमंत्री आहेत. अर्थसंकल्पाला अर्थशास्त्राचे ज्ञान हवे किंवा तो अर्थशास्त्रातील जाणकार हवा असा कोणताही नियम भारतीय राज्य घटनेत नाही. विद्यमान अर्थमंत्री हे कायदेपंडित आहेत. पण देशाला यापूर्वी अर्थशास्त्रातील जाणकार अर्थमंत्री मिळालेले आहेत.

    अर्थसंकल्प म्हणजे काय ?
    बजेट शब्दाची सुरूवात ही फ्रेंच बॉजेट शब्दापासून झाली. याचा अर्थ चामड्याची पिशवी असा आहे. अजूनही आपल्या देशाचे अर्थमंत्री चामड्याची बॅग हातात घेऊन अर्थसंकल्प सादर करण्याकरिता लोकसभेत प्रवेश करतात. बजेट शब्द प्रचलित होण्याचा एक छान किस्सा आहे. इंग्लंडचे माजी अर्थमंत्री सर रॉबर्ट वॉलपोल यांच्याशी निगडीत हा किस्सा आहे. १७३३ मध्ये अर्थसंकल्प सादर करण्यासाठी वालपोल संसदेत आले होते. येताना त्यांनी एक चामड्याची पिशवी आपल्यासोबत आणली होती. त्यांनी बजेट सादरही केले, परंतु यानंतर काही दिवसांनी त्यांची चेष्टा करण्यासाठी ‘बजेट इज ओपन’ या नावाने एक पुस्तिका प्रकाशित करण्यात आली व त्यानंतर ‘बजेट’ हा शब्द प्रचलित झाला. यात केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून वर्षभराच्या खर्चाचा हिशेब संसदेत मांडण्यात येतो त्यालाच अर्थसंकल्प म्हटले जाते. यात सर्व खात्यांची माहिती, मंजूर करण्यात येणाऱ्या योजना तसेच १ एप्रिलपासून पुढच्या वर्षीच्या मार्चपर्यंतच्या सर्वच आर्थिक गोष्टींचा लेखाजोखा या अर्थसंकल्पात सादर करण्यात येत असतो. तसेच यात सरकारकडून नवीन योजनांची माहिती देण्यात येते आणि त्याच्यावर संसदेतून अप्रत्यक्षपणे मंजूरी देखील मिळावी हा याचा हेतु असतो. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून अर्थमंत्री टॅक्स, ड्युटीज आणि व्याज आकारत सरकारी तिजोरीत रक्कम आणण्याचा प्रयत्न करत असतात.

    संकलन संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

  • मन की बात – DNA व Dna

    डीएनए मध्ये जीवाबद्दलची माहिती साठवून ठेवलेली असते. ही माहिती एका पिढीतून दुसर्‍या पिढीकडे जाणाऱ्या गुणदोषांना कारणीभूत असते.