वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आपल्यात असलेलं व्यंग नैराश्याच्या गर्तेत आपल्याला लोटणार या भावनेनं जीवन अनेक जण जीवन जगत असतात.काही पुस्तकं माणसें घडवतात,नैराश्य घालवतात.
December 23, 2024
६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशिद पाडली आणि देशाच्या राजकारणाला एक वेगळी कलाटणी मिळाली.
या महत्वपूर्ण आणि संवेदनशील प्रकरणाचा थोडक्यात इतिहास.
१५२८: मुघल शासक सम्राट बाबरने अयोध्येत ही मशीद बांधली होती. त्यामुळे या मशिदीला बाबरी मशीद असे म्हटले जाते.
१८५३: इंग्रजांच्या काळात पहिल्यांदा अयोध्येत जातीय दंगल झाली.
१८५९: इंग्रजांनी वादग्रस्त परिसरात आतील भागात मुसलमान तर बाहेरील भागात हिंदूंना प्रार्थना करण्याची परवानगी दिली.
१९४७: वाद झाल्यानंतर सरकारने मुसलमानांना या स्थळावर जाण्यास बंदी घातली. हिंदुंना जाण्याची परवानगी होती.
१९४९: येथे राम ललाची मुर्ती मिळाली. हिंदूंनी त्या मुर्ती तेथे ठेवल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे नंतर आंदोलन सुरू झाले. दोन्ही गटांकडून खटला दाखल करण्यात आला. मुस्लिम समुदायाकडून हाशिम अन्सारी तर हिंदूंकडून महंत परमहंस रामचंद्र दास हे याचिकाकर्ते झाले.
१९५०: राम जन्मभूमी न्यासाचे प्रमुख रामचंद्र दास आणि गोपालसिंह विशारद यांनी फैजाबादमध्ये खटला दाखल करून हिंदुंना पुजा करण्याची परवानगी मागितली होती.
१९६१: सुन्नी केंद्रीय मंडळाने खटला दाखल करून परिसरातील सर्व भाग हा कब्रस्तान (दफनभूमी) असल्याचा दावा केला.
१९८४: विश्व हिेंदू परिषदेने लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली एक गट बनवला.
१९८६: फैजाबाद न्यायालयाने दरवाजा उघडण्याची परवानगी दिली आणि हिंदुंना पुजा करण्याची संधी मिळाली.
१९८९: तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी वादग्रस्त ठिकाणी शिलान्यास करण्याची परवानगी दिली.
१९९०: लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रा सुरू केली. त्यांना देशभरातून मोठा पाठिंबा मिळाला. त्यांनी समस्तीपूर येथून अटक करण्यात आली. त्यानंतर भाजपने व्ही.पी. सिंह सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्यानंतरच्या निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले.
६ डिसेंबर १९९२: कारसेवकांनी वादग्रस्त वास्तू पाडली आणि तात्पुरते मंदिर बनवले. पी.व्ही.नरसिंहराव सरकारने उच्च न्यायालयात धाव घेऊन येथील बांधकाम ‘जैसे थे’ ठेवण्याची मागणी केली.
२००३: अलाहाबाद उच्च न्यायालयाने वादग्रस्त स्थळाची खोदाई करून तेथे मंदिर होते किंवा नाही, याचा शोध घेण्याचे आदेश दिले. पुरातत्व विभागाने आपल्या अहवालात मशिदीच्या खाली दहाव्या शतकातील मंदिराचे अवशेष मिळाल्याचे म्हटले.
२०१०: पहिल्यांदा सरकारने निर्णय बदलत दोन्ही पक्षांनी हे प्रकरण परस्पर मिटवण्यास सांगितले.
३० सप्टेंबर २०१०: अलाहाबाद उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देत जमिनीचे तीन हिस्से करण्यास सांगितले.
२०१६: भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन मंदिराच्या निर्मितीची याचिका दाखल केली.
१८ एप्रिल २०१७: सर्वोच्च न्यायालयाने लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी, उमा भारतींसह १७ जणांवर बाबरी मशीद पाडण्याचा कट रचल्याबद्दल खटला चालवण्याची परवानगी दिली.
९ नोव्हेंबर २०१९ : रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयाने रोजी ऐतिहासिक निकाल दिला. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्यात यावे तर मशीद बांधण्यासाठी वेगळी ५ एकर जमीन देण्यात येणार आहे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिला.
गेल्या अनेक वर्षांपासून याप्रकरणी न्यायालयात वाद सुरू होता. मध्यंतरी न्यायालया बाहेर या प्रकरणी तोडगा काढण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. यासाठी न्यायालयाकडून मध्यस्थीचेही संकेत देण्यात आले होते. पण ९ नोव्हेंबर २०१९ रोजी लागलेल्या या निकालाचे सर्वत्र स्वागत करण्यात आले होते.
५ ऑगस्ट २०२० : अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिर भूमिपूजन सोहळा पार पडला. व श्री रामजन्मभूमी मंदिराच्या टपाल तिकिटाचं पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते प्रकाशन झाले.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
December 6, 2021
२१ फेब्रुवारी हा दिवस जगभरात जागतिक मातृभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतातील तसेच जगातील अनेक देशांमधील विविध समूहांच्या मातृभाषांचे जतन, संवर्धन करणाऱ्या विविध संस्था, जागतिक मातृभाषा दिवस साजरा करतात ! सर्व दूतावास आणि आंतरराष्ट्रीय संस्था हा दिवस विविध उपक्रमाद्वारे साजरा करतात.
हा जागतिक मातृभाषा दिवस साजरा करण्याची प्रथा कशी पडली त्याचा इतिहासही रंजक आहे.
पूर्व पाकिस्तान (सध्याचा बांग्ला देश) भागात पाकिस्तानची उर्दू ही राष्ट्रभाषा लादण्याच्या अविचाराविरूद्ध आंदोलन सुरू झाले ! हे आंदोलन खूप भडकले तेव्हा आंदोलन आटोक्यात आणण्यासाठी ढाक्का विद्यापीठात निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पाकिस्तानी लष्कराने २१ फेब्रुवारी १९५२ या दिवशी गोळीबार केला. पूर्व पाकिस्तानात उर्दू लादू नये आणि सर्व शासकीय कारभार बंगालीतच असावा या जनतेच्या मागणीला उन्मत्त सत्तेने गोळीबाराने उत्तर दिले !
२१ फेब्रुवारी हा दिवस बांग्ला भाषेसाठीच्या तीव्र आंदोलनाचा प्रेरणा दिवस ठरला. १९५३ पासून दरवर्षी बांग्ला भाषेच्या आग्रहासाठी २१ फेब्रुवारी हा दिवस पूर्व पाकिस्तानात भाषाग्रह दिवस म्हणून साजरा होऊ लागला. पाकिस्तानचे केंद्र सरकार उर्दूचा हट्ट सोडत नाही आणि बांग्ला भाषेची जास्तच गळचेपी होतेय हे लक्षात आल्यावर या भाषाग्रहाचे रूपांतर पुढे " पाकिस्तानच नको, स्वतंत्र देशच हवा " या मागणीत झाले !
बांग्ला भाषाग्रहामुळे देश स्वतंत्र झाला याच भावनेतून बांग्ला भाषकांनी आपल्या नव्या देशाचे नाव बांग्ला देश ठेवले. जगात बहुतेक देशांच्या नावावरून त्या देशातील सर्वाधिक प्रचलित भाषेचे नाव ठरले आहे पण बांग्ला देशाचे एकमेव उदाहरण असे आहे की येथील प्रमुख भाषेचे नावच त्या देशाला दिले गेले आहे !
काही वर्षांनी बांग्ला देशाला संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्यत्व मिळाल्यानंतर १९८२ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघ अधिवेशनात बांग्ला देशाच्या प्रतिनिधीचे पहिले भाषण झाले. त्यात या प्रतिनिधीने बांग्ला देशाच्या वतीने मागणी केली की, मातृभाषेच्या संरक्षण, संवर्धनासाठी दिलेल्या लढ्यातून निर्माण झालेला बांग्ला देश हा जगातील पहिला देश आहे. बांग्ला देशातील या यशस्वी भाषाग्रही लढ्याचा प्रेरणा दिवस २१ फेब्रुवारी आहे. आणि म्हणून संपूर्ण जगाने बांग्ला देशाचा हा प्रेरणा दिवस जागतिक मातृभाषा दिवस म्हणून साजरा करावा.
ही मागणी संयुक्त राष्ट्रसंघाने १९८९ मध्ये मान्य केली आणि २१ फेब्रुवारी १९९२ पासून जगातील सर्व देशात दरवर्षी २१ फेब्रुवारी हा दिवस ' जागतिक मातृभाषा दिवस ' म्हणून साजरा करण्यास सुरूवात झाली.
-- निनाद अरविंद प्रधान
February 21, 2023
१९५७ साली या यंत्राच्या एका बाजूला डिगर अन् दुसऱ्या बाजूला क्रेनसदृश्य रचना अशी टू इन वन अशी योजना केली जी खूपच यशस्वी झाली. या यंत्रानं कृषी व्यतिरिक्त बांधकाम विभागातही दमदार एंट्री मारली आणि जोसेफच्या कंपनीनं कृषी सोबत बांधकाम विभागातही धुमाकूळ केला.
June 21, 2022
खरं तर तिला कोठल्याही विशेषणाची/ उपनामाची गरज नाही. विशेषतः भालजी पेंढारकरांसारख्या तपस्व्याने तिचे “भगवान श्रीकृष्णाची हरवलेली बासरी ‘असे केलेले समर्पक वर्णन वाचल्यावर मी तोकडा पडतो. ती स्वयंभू आहे.
December 20, 2021
“आपले दुबईला जाणारे विमान निघण्यासाठी तयार आहे. कृपया, दुबईला जाणाऱ्या प्रवाशांनी द्वार क्रमांक ४ मधून विमानाकडे प्रस्थान करावे.” हरविलेल्या मनःस्थितीत चिरायूने आपली बॅग उचलली, तिकीट हातात घेतले आणि रांगेत सामील झाला. विमानतळाच्या उबदार वातावरणातून बाहेर पडल्यावर तेथील थंड हवेने त्याला पुन्हा एकदा तो अनुभवत असलेल्या सत्याची आठवण करून दिली. विमानाजवळ आल्यावर त्याने स्वतःला पटविले की ‘हेच तर मला पाहिजे होते. इथल्या सर्व समस्यांपासून, निराशेपासून दूर कुठेतरी. स्वच्छ हवा आणि निळे आकाश असलेल्या ठिकाणी. मनातील सर्व दुःख आणि हताशपणा, सर्व आठवणी विसरून जाण्यासाठी.’
August 26, 2026
कावळ्याचिमणीची गोष्ट
गुरू दत्तात्रेयांनी 24 गुरू केले होते. त्यात एक क्षुद्र किटक, कोळी सुद्धा होता. भक्ष्याला पकडण्यासाठी तयार केलेलं जाळं तुटलं तरी जिद्द न हरता, परत परत तो तयार करीत होता. ज्याच्याकडून जे शिकता येईल ते शिकावं हे दत्तगुरूनी शिकवलं होतं. तसं हा कावळा पक्षी माझा गुरू झाला. खूप काही शिकवून गेला.
एकदा रात्री साडे दहा वाजता दवाखान्यातून घरी येत असताना, घरासमोरच रस्त्यावर एका बाजूला एक मांजर गाडीखाली सापडून मरण पावले होते. खूप वाईट वाटलं. पण....
दुसऱ्याच दिवशी सकाळी साडेसहा वाजता काही कामानिमित्त घराबाहेर पडलो, तेव्हा त्या मृत मांजराभोवती तीन चार कावळे बसून त्याला खात होते. माझी गाडी त्यांच्या जवळून गेल्यावर ते उडून गेले. मी पुढे गेल्यावर परत तिथे आले. माझे काम संपवून जेव्हा अर्ध्या पाऊण तासाने परत आलो तेव्हा जवळपास अर्धेअधिक मांजर त्यांनी फस्त केले होते.
गाडीतून उतरताना बुद्धीने विचार केला....
काल रात्रीपासून ते मांजर तिथे पडून होते, रात्रीची शांत निवांत वेळ खाण्यासाठी योग्य होती, वाहानांचा, माणसांचा कोणाचाही त्रास नव्हता, मग या कावळ्यांनी रात्रीच या मृत मांजराला का खाल्ले नाही ??????
तेव्हा, त्याने आखून दिलेला नियम आठवला आणि लक्षात आले. रात्रीचे खायचे नसते.
जे काही खायचे ते सूर्योदय झाल्यावर खावे. पोटभर खावे. भीती न बाळगता खावे आणि महत्त्वाचे म्हणजे खाल्ल्यानंतर काय खाल्ले होते, ते अजिबात आठवू नये. म्हणजे खाल्लेले सर्व सहज पचून जाते. खाल्लेल्या अन्नाविषयी मनात नकारार्थी भावना तयार व्हायच्या अगोदरच आहार पचून गेला पाहिजे.
सूर्यास्त झाल्यानंतर काहीही खाऊ नये, हे त्याच दिवशी संध्याकाळी चिमण्यांनीदेखील मला शिकवले. एका दुकानात सौ. बरोबर गेलो होतो. ती आत मधे खरेदी करताना मी गाडीत बसलो होतो. आणि दुकानाच्या बाहेर जमिनीवर पडलेले धान्य खाण्यासाठी येणाऱ्या चिमण्यांच्या थव्याकडे कुतुहलाने पाहात होतो.
सायकल वाला आला, चिमण्या भुर्रऽऽऽ,
रिक्शा आली पुनः चिमण्या भुर्रऽऽऽ
माणसं गेली तरी चिमण्या भुर्रऽऽऽ
कितीतरी वेळ असा पोटभरतीचा खेळ चालला होता. त्यांचा चिवचिवाट ऐकून बरं वाटत होतं.
तेवढ्यात सौ.चा निरोप आठवला, काळोख पडायच्या आत पिठाच्या चक्कीवरून दळण आणायचे आहे. म्हणून अगदी जवळच असलेल्या चक्कीवरून दळणाची पिशवी आणून गाडीत ठेवली. एव्हाना दुकानाबाहेर दिवे पण लागले होते आणि त्या संधीप्रकाशात मी परत चिमण्या शोधायला लागलो, पण एकही चिमणी दिसेना. चिमण्यांनी फुललेला बाजुचा गुलमोहर देखील अबोल झाला होता. एक विषण्णता मनात दाटून आली. सायकलवाला पण नव्हता, रिक्शावाला पण नव्हता, माणसांची वर्दळ पण थांबली होती, पण सर्व चिमण्या मात्र निमूटपणे परत फिरल्या होत्या......घराकडे अपुल्या....
कारण एकच होतं. तो "दिनकर" अस्ताला गेला होता.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
01.03.2017
March 1, 2017
१९६५ साली आजीच्या आग्रहाखातर वडिलांनी आई,मी आणि धाकटा भाऊ यांच्या समवेत पहिली कुलदेवतेची यात्रा योजिली तेव्हा भुसावळ-तुळजापूर हा द्राविडी (का द्रविडी) प्राणायामी प्रवास होता.
July 29, 2022
रासायनिक शेती मोठ्या प्रमाणात बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या दावणीला बांधल्या गेली आहे. महागडी बियाणे, खते, कीटकनाशके, शेतीचा उत्पादन खर्च अतोनात वाढवीत आहेत. मिळणाऱ्या उत्पन्नातून हा उत्पादनखर्च भागविण्यासाठी उचललेल्या कर्जाचे व्याजही फिटत नाही.
December 4, 2005
नमस्काराचा हा संस्कार आपण मुलांवर नकळत करायचा असतो. आपले अनुकरण मुले करीत असतात, समजा, दूरध्वनीवर बोलताना सुरवातच “हॅलो” या शब्दाऐवजी,” नमस्कार ” या शब्दाने करायची ठरवली तर ? सहज शक्य आहे. प्रयत्न करून पहा. मुले पण बदलतात.
July 18, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti