वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
योगासनांची विविध अंगं आणि प्रकार आहेत. योगाचे अंग आणि प्रकार यामध्ये फरक आहे. प्राचीन ग्रंथामध्ये योगाचे विविध प्रकार सांगितले आहेत. ज्ञानयोग, हठयोग, कर्मयोग, भक्तियोग, राजयोग हे काही योगाचे प्रकार आहेत. तसंच यम, नियम, योगासन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी ही योगाची अंगं आहेत.
आपल्या शरीराला आवश्यक असलेल्या योगासनाची सखोल माहिती
योगासनामुळे शरीर लवचिक राहतं तसंच शरीर निरोगी राखण्यासाठी, शरीराचा आकार बांधेसूद राखण्यासाठी, एकाग्रता वाढवण्यासाठी योगासनं उपयुक्त ठरतात. या योगासनाचे काही प्रमुख प्रकार आहेत. सूर्यनमस्कार, पद्मासन, अर्धपद्मासन, वज्रासन, सिद्धासन, पवन मुक्तासन, सर्वागासन, पश्चिमोतानासन, शीर्षासन, श्वसन, सुखासन हे काही प्रमुख प्रकार असून त्यातला पहिला प्रकार कसा करायचा आणि त्याचे फायदे काय आहेत
सूर्यनमस्कार हा भारतीय परंपरेतील प्राचीन व्यायाम आहे. सूर्यनमस्काराला सवरेश्रेष्ठ आसन मानलं जातं आणि त्याचे अनेक फायदे आहेत. कोवळ्या किरणात पूर्वेला नमस्कार करून सूर्यनमस्कार घालावेत. तसंच ते शांत आणि स्वच्छ जागेत करावेत. सूर्यनमस्कार बाराही महिने करू शकता. सूर्यनमस्काराला सुरुवात करताना सुरुवातीला जमतील तेवढेच सूर्यनमस्कार घालावेत. तसेच ते अनशापोटी केलेले उत्तम. वेळेअभावी ते संध्याकाळी करायचे असतील तर त्यापूर्वी कमीत कमी दोन तास तरी खाऊ नये. सूर्यनमस्कारात बारा क्रिया असतात. त्यातील पहिली क्रिया म्हणजे प्रणामासन.
प्रणामासन प्रणामासन ही सूर्यनमस्कारातली पहिली पायरी आहे.
सरळ उभं राहावं आणि दोन्ही पाय जवळ ठेवावेत. दोन्ही हात छातीच्या मध्यभागी नमस्काराच्या स्थितीत जोडलेले असावेत. मान ताठ आणि नजर समोर असावी. पाठीचा कणा ताठ असावा. शरीर शांत ठेवून आरामशीर श्वास घ्यावा.
फायदा: मन स्थिर होण्यास मदत मिळते. शरीराचा तोल साधला जातो.
हस्तउत्तासन किंवा उध्र्वनमस्कार यात पहिल्या अवस्थेत उभं राहून मान वर करावी. पाठीचा कणा मागच्या बाजूला वाकवावा. आणि हात वर करावेत. या स्थितीत असताना श्वास आत घेतला जातो. तसंच या स्थितीतून पूर्वावस्थेत येताना पाठीच्या कणावर ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी.
फायदा : या अवस्थेत असताना पोटावरची चरबी खेचली जाते. यामुळे तिथली चरबी कमी होण्यास मदत होते.
पादहस्तासन हस्तउत्तसानाच्या स्थितीत असताना जेव्हा श्वास आत घेतला जातो तो श्वास हळुवारपणे सोडत दोन्ही हाताचे पंजे जमिनीला पूर्णपणे टेकवावेत. यात डोकं गुडघ्याला लावावं. ज्याप्रकारे ओणवं उभं राहतो तसंच राहावं पण या स्थितीत हाताचा पंजा जमिनीला टेकलेला असतो.
फायदा : या स्थितीमुळे मेंदूपर्यंत रक्ताभिसरण होऊन स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. तसंच हृदय आणि फुप्फुसांची क्षमता वाढतेच पण पायांचीही ताकद वाढते. या स्थितीमुळे पोटावर आणि ओटीपोटावर दाब आल्याने स्त्रियांची मासिक पाळीसुद्धा नियमित होते. तसंच पोटावरची आणि कमरेवरची अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत मिळते.
अश्यसंचलनासन तिसरी क्रिया केल्यानंतर आता हात जमिनीला टेकवून एक पाय मागे ताणायचा तर दुसरा पाय गुडघ्यातून वाकवायचा या अवस्थेत असताना मान किंचीत उंचवावी. पुढे ठेवलेला पाय आणि हात समांतर रेषेत नसले तरी चालतील पण पायाचा अंगठा आणि हाताचा पंजा समान रेषेत असावा.
फायदा : मूत्रसंस्था आणि प्रजननसंस्थेच्या आरोग्यासाठी ही स्थिती उपयुक्त ठरते.
अधोमुखश्वसनासन पूर्वावस्थेतून बाहेर येण्यासाठी आपले दोन्ही पाय समान रेषेत आणावे आणि हात तसेच ठेवावेत. अधोमुखश्वसनासन करताना श्वास बाहेर सोडायचा असतो. यात कमरेखालचा भाग उंचवायचा म्हणजेच इंग्रजी अक्षराच्या उलटय़ा व्ही सारखी स्थिती असते. या अवस्थेत डोकं खालच्या दिशेला असेल.
फायदा : या अवस्थेमुळे पायांचे स्नायू ताणले गेल्यामुळे स्नायू लवचिक होतात. तसंच खांदे मजबूत होतात. पायामध्ये आणि पोट-यांमध्ये गोळे येणं कमी होतं.
अष्टांग नमस्कार : मागील स्थितीतून पुढे जाण्यासाठी हातांवर योग्य प्रमाणात जोर देऊन शरीर जमिनीला टेकवावे. पाय सरळ रेषेतच ठेवून हनुवटीही जमिनीला टेकवावी.
फायदा : हात आणि खांद्याचे स्नायू मजबूत होतात आणि ताकद वाढते.
भुजंगासन यात दोन्ही हात सरळ रेषेत ठेवून जमिनीला टेकवावे व संपूर्ण शरीराचे वजन हात व पायांच्या चौडय़ांवर तोललं जाईल अशा अवस्थेत राहावं. या आसनामध्ये श्वास आत घेतला जाईल आणि मान जमेल तितकी मागे घेण्याचा प्रयत्न करावा.
फायदा : हे आसन करण्याचा फायदा म्हणजे गॅस आणि पोटाचे विकार दूर होण्यास मदत होते. तसंच फुप्फुसांची क्षमता वाढते. पाठीच्या कण्यासाठी खूप लाभदायक ठरतं.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
पंचकर्म ही आयुर्वेदाची एक वैशिष्ट्यपूर्ण चिकित्सा आहे. प्राचीन भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढलेली ही उपचार पद्धती आहे. यामध्ये रोग बरा करण्यासाठी एखादे औषध देऊन शरीरातच तो रोग जिरवून न टाकता तो रोग शरीरातून बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे रोग समूळ नष्ट होतो.
प्रमेह हा मुख्य आजार. त्याच्या एकुण वीस उपप्रकारामधे एक म्हणजे मधुमेह हा आजार येतो. हा आजार होऊ नये यासाठी काय काय करू नये, (म्हणजे अपथ्य ) सांगितले आहे ते आपण पाहातोय.
व्यवहार आणि ग्रंथ यामधे किती अंतर आहे पहा. पथ्य आणि अपथ्य या शब्दांचे किती चुकीचे अर्थ वापरले जातात.
"मधुमेह एकदा झाला की साखरेचे पथ्य सुरू झाले." असे आपण म्हणतो. म्हणजे साखर बंद करावी लागणार असे आपल्याला सूचीत करायचे असते. खरंतर पथ्य म्हणजे खायला हरकत नाही, असा अर्थ होतो. आणि अपथ्य म्हणजे न चालणारे.
सगळं च उलटं चाललंय, म्हणतो ना मी, त्यातीलच हे एक !
तर पथ्य म्हणजे चालणारे
आणि अपथ्य म्हणजे न चालणारे.
मधुमेहात साखरेचे अपथ्य आहे.
त्यातील दूध आणि दही आपण पाहिले. म्हणजे दुध आणि दह्यापासून बनणारी अन्य सर्व गोड व्यंजने अपथ्यकर आहेत. पण दह्यापासून बनणारे ताक, घुसळल्यामुळे वर तरंगणारे लोणी, लोणी कढवल्यानंतर बनणारे साजूक तूप हे मधुमेहात अपथ्य नाही. तसेच गाईपासून मिळणारे मूत्र आणि शेण हे सुद्धा मधुमेहात पथ्यकर आहेत. हे लक्षात ठेवूया. सर्वसाधारणपणे असं म्हणायला हरकत नाही, की जसजसा अग्निचा संस्कार होत जातो, तसतसा पदार्थ पचायला हलका होत जातो.
स्थिरता आणि गतीमानता हे दोन गुण लक्षात घेतले की, अग्निचा विचार नीट करता येईल. जिथे गती तिथे अग्नी. गती म्हणजे वात. वायु हा अग्नीचा मित्र आहे. म्हणून फुंकर मारली की अग्निवृद्धी होते. बरोबर ना ! स्थिरता म्हणजे पृथ्वी महाभूत. अग्नीच्या विरोधी. अग्नी विझवण्यासाठी वाळू उपयोगी पडते. व्यवहारात जिथे अग्नी खूप असेल आणि तो कमी करायचा असेल तर अग्नीला मिळणारा वारा बंद करून, पृथ्वी महाभूत असलेली माती किंवा वाळु उपयोगी होते.हेच तत्व आरोग्याच्या बाबतीत शरीरात वापरून पहायचे.
प्रमेहामधे अग्नि बिघडलेला असतो. त्याचे बदललेले स्थान कुठे आहे ते ओळखून त्याला परत जागेवर आणून ठेवणे ही चिकित्सा.
आयुर्वेद समजून घेण्यासाठी ही महाभूते खूप उपयोगी पडतात. ही केवळ प्रतिके नाहीत तर व्यवहारात ती आपण वापरतदेखील असतो, पण आपल्या ते लक्षात येत नाही.
एखादी गोष्ट व्यवहारात अनेकदा आपण करीत असतो, पण त्याचा कार्यकारण भाव माहीती नसतो. त्याचे चिंतन मनन करणे, आणि तो शोधून काढणे, नंतर ती गोष्ट जाणीवपूर्वक करणे याला अभ्यास म्हणतात. अभ्यासाची एकदा सवय लागली की, नंतर कठीण गोष्टी समजायला सोप्या व्हायला लागतात. मग ग्रंथ आणि व्यवहार एकच आहेत असे समजायला लागते.
प्रमेह होण्याच्या मुख्य कारणामधे सर्वात प्रथम सांगितलेला शब्द आहे, आस्यासुखम्.
आसन सुख. म्हणजे बसून राहाण्यामधे खूप आनंद वाटायला लागणे. एकाच जागी बसून काम करायला आवडणे. हे स्थिरत्वाकडे जाणारे लक्षण आहे.हालचाली कमी करण्याकडे कल निर्माण होणे, आणि प्रत्यक्षात हालचाली कमी करणे, म्हणजे गतीच्या विरोधात काम करणे, म्हणजे अग्निच्या विरोधात काम करणे.म्हणजे रोगाच्या जवळ जाणे होय.
आळस हेच सुख आहे, असे वाटू लागणे म्हणजे प्रमेहाची सुरवात झाली असे खुशाल समजावे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
31.01.2017
अमुक रोग 'कमी करण्यासाठी' आयुर्वेदात काय औषध सांगितले आहे, असा प्रश्न विचारायला लागू नये, यासाठी, रोग होऊच नये यासाठी आयुर्वेद नीट समजून घेणे आवश्यक आहे.
आयुर्वेदात सांगितलेले उपाय हे प्राधान्याने रोग होऊ नयेत, यासाठी सांगितलेले आहेत, हे आधी लक्षात घ्यावे. केवळ रोगाची लक्षणे कमी केले की झाले असे नव्हे तर, जो रोग समूळ नष्ट व्हायला हवा, तो योग्य औषधोपचार आणि विशिष्ट पथ्य सांभाळले की झाले. त्यासाठी औषधे कायमची कशाला घ्यायची ?
आयुर्वेद ही एक जीवनशैली आहे. त्यामुळे जीवन कसे जगावे, जीवन म्हणजे काय, त्याचा उद्देश काय आहे, हे अगदी सुरवातीलाच स्पष्टपणे ग्रंथकार सांगतात.
प्रमेहासारखे रोग होऊ नयेत, यासाठी ही जीवनपद्धती समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आयुर्वेद म्हणजे कोणतीही 'पॅथी' नाही. किंवा हे सांगण्यात सुद्धा कोणताही अहंकार नाही. सुदैवाने आपल्या या संपूर्ण स्वदेशी शास्त्राचा अभ्यास करता आला, हे माझे सद्भाग्य. घेतलेल्या शिक्षणपद्धतीचा परिणाम म्हणून काही जणाना आयुर्वेद नाही शिकता आला, म्हणून वाईट वाटून घेण्याचे काहीच कारण नाही. फक्त तो नीट समजून घ्यावा. वाग्भटजीनी आपल्या ग्रंथाची सुरवातच एका छान श्लोकाने केली आहे. त्यात ते म्हणतात, हे शास्त्रीय ज्ञान मिळवण्यासाठी राग, अहंकार, अभिनिवेश, गर्व, आदि बाजूला ठेवावे. तरच ग्रंथ नीट समजून शिकता येईल. त्यासाठी पूर्वग्रह दूषित दृष्टी बदलायला हवी. अजूनही काही डाॅक्टर आयुर्वेद म्हणजे बोगसगिरी असे ( अज्ञानाने ) म्हणतात.
"देवा, त्यांना क्षमा कर, ते काय बोलत आहेत, ते त्यांचे त्यांनाच कळत नाहीये."
आणि आयुर्वेदाचे काही (ज्ञानी ) पदवीधर सुद्धा आयुर्वेदाचीच थट्टा करतात, त्यांची तर किव करावीशी वाटते.
असो.
काल परवा काही जणांनी वैयक्तिकरीत्या विचारलेल्या शंकाना सार्वजनिकरीत्या उत्तर द्यावेसे वाटले. म्हणून लिहिले.
प्रमेहामधे दही नको. या कायद्याला पळवाटीची युक्ती कशी शोधावी हे आपण पाहिले.
काही वेळा असे सांगितले जाते, की एवढी वर्षे आम्ही दही खातोय, आम्हाला काय सुद्धा धाड भरली नाही.? हे कसे ?"
प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. एखाद्या व्यक्तीची काहीवेळा मानसिक ताकद जास्त असते. काहीवेळा आध्यात्मिक शक्ती त्याला मदत करत असतात, त्यामुळे रोग लगेच होत नाहीत. पण जेव्हा यापैकी एखादी ताकद कमी होते, तेव्हा लगेच किंवा कालांतराने त्रास संभवू शकतात. जे शारिरीक त्रास आज मला होत नाहीत, किंवा लक्षणे दिसत नाहीत, ते आजार किंवा रोग भविष्यात होणारच नाहीत, यासारख्या भ्रमात कोणी राहू नये. तसेच प्रमेहासारख्या रोगात कायमस्वरुपी औषध घ्यायलाच लागते, या गैरसमजात देखील कुणी राहू नये.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
30.01.2017
काल एका पुस्तकात जगप्रसिद्ध वास्तुरचनाकार श्री. चार्लस कोरीया यांचं एक वाक्य वाचनात आलं. वाक्य सांगण्यापूर्वी मुंबईतील व मुंबईची माहिती असणाऱ्यांसाठी प्रथम चार्लस कोरीयांची एक ठळक ओळख सांगतो. मुंबईतल्या दादर पश्चिमेला असलेलं ‘पोर्तुगीज चर्च’चे वास्तशिल्पी म्हणजे श्री. चार्लस कोरीया.
घुसळण्याची' प्रक्रिया महत्वाची. दही 'घुसळण्याच्या' प्रक्रियेमधे आत तयार झालेला वायु बाहेर पडतो, नंतर त्यातील लोणी बाहेर येते.
या प्रक्रियेमधे थोड्याफार प्रमाणात अग्निचा संचार होतो. घर्षण झाले की अग्नि तयार होतो.
जसे खूप बोलल्यामुळे घसा गरम होतो, तळहात एकमेकांना घासले की हात गरम होतात, कपालभाती केली की छाती गरम होते, भ्रामरी केली की कपाळ गरम होते, खूप धावले की पाय गरम होतात, विचार खूप झाले तर डोस्कंही गरम होते, वृक्ष एकमेकांना घासले की प्रत्यक्ष वडवानलच तयार होतो. घर्षणाचा अग्निशी अगदी जवळचा संबंध असतो, हे तर आपण व्यवहारातही बघतो.
हा अग्निच रूपांतरणाची प्रक्रिया घडवण्यासाठीचे मुख्य कारण आहे. जेवढा अग्नी जास्ती, तेवढे रूपांतरण जास्ती.
रूपांतरण म्हणजे बदल. किंवा आपण असेही म्हणू शकतो, की जिथे जिथे बदल होतो तिथे तिथे अग्निचे कार्य सुरू असते. बदल म्हणजे अग्नी.
तांदुळ आणि पाणी एकत्र करून बदल होत नाही, तर त्याला योग्य अग्नी दिला तर त्याचे रूपांतर भातामधे होते, नाहीतर एकतर मऊभात अन्यथा खरपूस खमंग !
कुठेही गेलात तरी अग्नीचे कार्य लक्षात घ्यावेच लागते.
हा अग्नी प्रमेहामधे विचारात घ्यावा लागतो. क्लेद कमी करण्यामधे अग्नी महत्वाचा. म्हणजे प्रमेहाचा मुख्य शत्रु जो क्लेद, तो नष्ट करणारा अग्नी, हा प्रमेहाचा शत्रू ठरतो. प्रमेहाचा शत्रू तो आपला मित्र !
दही घुसळण्याच्या प्रक्रियेत अशीच अप्रत्यक्ष उर्जा तयार होते.
आता दही घुसळणे कसे करतो यावर त्यातील क्लेदाचे रूपांतरण होणे अवलंबून आहे. ही युक्ती आहे.
हाताने लाकडी रविने दही घुसळणे, ताकमेढीला दोरी गुंडाळून दोन्ही हाताने उलटसुलट रवि घुमवणे, आणि मिक्सरमधून दही फिरवणे, आणि चमच्याने दही ढवळणे, या कृतीवर तयार होणाऱ्या पदार्थाची गुणवत्ता ठरत असते. चमच्याने दही कालवण्यामुळे केवळ त्यातील वायु बाहेर पडेल, त्याची वडी मोडेल, एवढेच काम होईल, पण 'क्लेद' कमी होणार नाही. क्लेद कमी होण्यासाठी आणखी उष्णतेची गरज असते.
हो. हो. हो. दही गरम करता येईल का असं अजिबात मनातही आणू नका. ओहोऽऽऽ.
दही गरम करायचे नाही. कधीही नाही. अगदी पंजाबी ग्रेव्हीमधे पण नाही.
कोणत्याही गोष्टीत इन्स्टंट, शाॅर्टकट उपयोगी नाही. ज्या गोष्टीला जेवढा वेळ जाणं अपेक्षित असते, तेवढा वेळ देणं अपेक्षितच असते. नाहीतर एक वर्षाच्या पोरग्यानं बाबांचा शर्ट घातला आणि बूटात पाय घातले तरी तो 'बाप' होत नाही ना !
तसंच दह्याचंही आहे. त्याचे रूपांतर ताकात करताना काही काळ जाणं अपेक्षित असतं. सावकाश आणि सतत घुसळणं,
हो, हातानं रवीनं घुसळणं वेगळं, रवी दोरीला बांधून घुसळणे वेगळे, मिक्सरमधून फिरवण्याची तऱ्हा वेगळीच ! आणि लस्सी करणं वेगळं. प्रत्येकावर होणारी अग्नीची प्रक्रिया वेगळी !
इथं प्रत्येकाचं वेगळेपण वेगळं....
त्याचंच नाव आयुर्वेद !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
29.01.2017
१. खाल गाजर, मुळे तर होतील सुंदर डोळे.
२. सकाळी नाश्ता करावा मस्त, मोड आलेले धान्य करावे फस्त.
३.डाळी भाजीचे करावे सूप, बाळाला येईल सुंदर रूप.
४. तराट्याच्या भाजीला म्हणू नका स्वस्त ,आरोग्य तुमचे ती राखेल मस्त.
५.जवळ करा लिंबू संत्री, दूर होईल पोटाची वाजंत्री
६. पपई लागते गोड गोड, पचनशक्तीला नाही तोड.
७.पालेभाज्या घ्या मुखी; आरोग्य ठेवा सुखी.
८.भेसळयुक्त अन्न खाऊ नका; आरोग्य धोक्यात आणू नका.
९.भोजनोत्तर फळांचा ग्रास; थांबवेल आरोग्याचा ह्रास.
१०.रोज एक फळ खावू या; आरोगयाचे संवर्धन करु या.
११. प्रथिने, जीवनसत्वे, क्षार; यांचे आहारात महत्व फार.
१२. हिरवा भाजीपाला खावा रोज; राहील निरोगी आरोग्याची मौज.
१३. जेवणा नंतर केळी खा; पाचनशक्तीला वाव द्या.
१४. साखर व तूप यांचे अति सेवन करु नका.मधुमेह व लठ्ठपणाला आमंत्रण देऊ नका.
१५. खावी रोज रसरशीत फळे; सौंदर्यवृद्धीसाठी नको प्रसाधन आगळे.
१६. गालावर खेळते सदा हास्य, फळे व भाज्यांचे आहे ते रहस्य.
१७. पपई, गाजर खाऊ स्वस्त, डोळ्यांचे आरोग्य ठेवू मस्त.
१८. सोयाबिन ज्यांचे घरी, प्रथिने तेथे वास करी.
१९. भाज्या जास्त वेळ शिजवू नका, जीवनसत्वांचा नाश करु नका.
२०. जो घईल सकस आहार, त्याला न होई कधी आजार.
२१. भाजीपाल्याचं एकच महत्व, स्वसत मिळेल भरपूर सत्व.
२२. शेंगामध्ये शेंग, शेवग्याची शेंग, लोणी, दूध तुपवानी, सत्व तिच्या संग.
२३. कळणा कोंडा खावी नाचणी, मजबूत हाडे कांबी वाणी.
‘गतवर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये संरक्षणक्षेत्रासाठीची तरतूद ४.८ टक्क्यांनी वाढली होती. गेल्या १० वर्षांतील ही सर्वांत कमी वाढ होती. पाकिस्तानसारखा देश जीडीपीच्या ३.५ ते ४ टक्के पैसे संरक्षण क्षेत्रावर खर्च करतो. चीनचे संरक्षण बजेट हे आपल्या संरक्षण बजेटच्या कमीत कमी तिप्पट आहे. भारताची सध्याची तरतूद जीडीपीच्या दोन टक्क्यांपेक्षा कमी आहे.
प्रमेह हा कफाशी संबंधित आजार आहे. कफ दोषाचं विकृत झाल्यानंतरचं नाव क्लेद. क्लेद वाढवणाऱ्या पदार्थामधे दह्याचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.पण दही न आवडणारा प्राणी तसा दुर्मिळच. दही म्हटलं की फक्त एकच प्राणी नाखुश असतो, तो म्हणजे आयुर्वेद वैद्य. खरंतर त्याच्याही जीवावर येतं, दही खाऊ नका म्हणून सांगायला. पण काय करणार? जे सत्य आहे ते कोणीतरी शेवटी सांगायलाच हवे ना ! ते अतिशय कठीण काम अखेर वैद्यालाच करावे लागते.
दही दूध म्हणजे काही अगदी विष नव्हे! अगदी बंद करण्याची आवश्यकता नाही. पण प्रकृती, लक्षणे, स्थळ काळ इ. ठरवून यांचे सेवन करावं लागतं.वाताचे काही आजार सोडले तर दही अनेक रोगांचे माहेरघरच आहे. युक्ती वापरून दही खाता येते. जिथे कायदा सांगितला जातो, तिथे पळवाट असतेच. ती युक्ती शोधून काढणारा वैद्य महत्वाचा !
दही लागते म्हणजे नेमके काय होते ? काही उपकारक जंतु विरजण स्वरूपात आपण त्या दुधात सोडतो. त्या दह्याच्या पहिल्या अवस्थेला आपण अदमुरे दही म्हणतो. साधारणपणे सात ते आठ तासात ही अवस्था येते. अजून तीन चार तास गेल्यावर पक्के वडी स्वरूप दही जमते. आणखी चार पाच तास गेले म्हणजे दुसऱ्या दिवशी रात्री ते चांगलेच आंबट होते. तिसऱ्या दिवशी आंबटपणाचा कहर होतो. त्यावरची साय सुद्धा आंबट दिसायला लागते. रंग बदललायला सुरवात झालेली असते. वास बदलतो. बुडबुडे यायला सुरुवात होते. हे सगळं वर्णन का करतोय ? तेच तर दही न खाण्यामागचे इंगित आहे.
ही जी प्रक्रिया दह्यामधे सुरू झालेली असते ती थांबतच नाही. अदमुऱ्या दह्याचे रूपांतर एव्हाना आंबट्टढ्ढाण्ण दह्यात झालेले असते. या प्रक्रियांचा विचार केला तर दुधापासून दह्यात रूपांतरण होणारी ही प्रक्रिया रासायनिक स्वरूपाची असते. म्हणजे एकदा दही बनवायला सुरवात झाली की, थांबायचे नाव नाही. कितीही थांबवायचं म्हटले तरी आता परत दुधात रूपांतर होणे नाही. गुण आणि कर्माने सुद्धा! चव तर होत्याची नव्हती होऊन जाते. दह्यावरची ही प्रक्रिया पोटात गेली तरी तश्शीच सुरू राहते. ते आणखीनच आंबट होते. दह्याचा हा आंबटपणा पित्ताला हमखास वाढवतो. आणि त्यातील बुळबुळीतपणा कफाला वाढवतो.
वायुचा विचार केला तर दह्यामधे बुडबुडे पण तयार झालेले दिसतात. दही घुसळल्यावर, दह्याची वडी / कवडी मोडल्यावर आतील हा वायु निघून जातो, म्हणून तयार झालेले ताक सुपाच्य असते. म्हणूनच नुसते दही घेणे आयुर्वेदाला मान्य नाही. कारण असे न घुसळलेले दही तिन्ही दोषांचा प्रकोप करते.
नक्तं न भुञ्जात्
दही कधीच रात्रीचे घेऊ नये, कारण दह्यामधे सुरू असलेली किण्वन प्रक्रिया कारणीभूत होत असावी. वात वाढवायला ही प्रक्रिया मदत करणारी असते. आणि सर्वात महत्वाचे सूर्य असेपर्यंत, त्याच्या अग्निवर पचन पूर्ण करून घेतले गेले पाहिजे, मग जाठराग्निवर अतिरिक्त ताण निर्माण होत नाही.
असे हे स्वभावतः कफ आणि पित्त वाढवणारे,क्लेद निर्माण करणारे, दही प्रमेहामधे वर्ज्य सांगितले गेले नसते तरच नवल !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
28.01.2017
कडकनाथ ही देशी कोंबडीची एक दुर्मिळ जात आहे. ती प्रामुख्याने मध्यप्रदेशमधील झाबुआ ,झार जिल्यातील आदीवासी, भिल्ल , लोकांकढे आढळते. हि जात महाराष्ट्रात क्वचीतच आढळते. कडकनाथ कोंबडीची त्वच्या, मांस, हाडे काळे आहे.
अनेक आजारांवर ही कोंबडी व आंडी गुणकारी आहेत.
कडकनाथ कोंबडीच्या मांसामध्ये व अंड्यांमध्ये पुढील प्रमाणे आयुर्वेदिक गुणधर्म आहेत :-
1) कडकनाथचे मांस अंडी खाल्याने शरीरातील रक्तदाब कमी होतो.
2)कोड फुटलेले कमी होते.
3)अटॅक व हेड अटॅकवरही गुणकारी.
4) याच्या मांसामध्ये पुरूषत्वाचे प्रमाण जास्त आहे मांस खाल्याने पुरूषत्व वाढते.
5)दमा ,अस्तमा,टीबी,या आजारावरही गुणकारी.
6)प्रोटीन आणी लोह चे प्रमान 25-70% .
7)अंडी डायट अंडी म्हणूनही खाल्ली जातात.
8)मांसामध्ये प्रथीनांचे प्रमान अधीक.
9)विस्मयकारी औषधी गुणधर्म.
10) अंडी स्वादीष्ट असुन प्रथीनांचे प्रमान भरपुर आहे.
11)बंगळुर येथील अन्न परिक्षण संशोधन संस्थेत याच्या मांसावर व अड्यांवर औषधी गुणधर्माबाबत संशोधन करण्यात आले व प्रमाणीत
केले.
12)” कडकनाथच्या ” हाडांमध्ये (मेल्यानिन )नावाचे द्रव्य(पिगमेंट)
अधीक प्रमानात असल्यने सर्व अवयव काळ्या रंगचे असतात.
यालाच ( फायब्रोमेलॅनोसिस ) असेही म्हनतात.
13) या कोबडीमध्ये इतर कोंबडीच्या तुलनेत ( 21%)
” लॅबीलीक ” एॅसीडचे प्रमाण अधीक ( 24% ) असल्याने ह्रदयाला रक्त पुरवठा करणार्या रक्तवाहीण्या जाड होवुन आतील मार्ग अरूंद होण्याचे
प्रमाण कमी होते.परिणामी ( अटॅक ) येत नाही.
14) या कोंबडीच्या मांस व आंडी सेवनाने ह्रदयवीकार म्हनजे ( अटॅक) टाळता येतोय.
15) प्रथीनांचे प्रमान 25% असते.
16) मांसामध्ये ( कोलेस्टोराॅलचे ) प्रमान इतर कोंबडीच्या तुलनेत(32 मिलीग्रॅम) प्रती 100 ग्रॅम ऐवढे आहे.
17) याच्या सेवनाणे रक्ताचा कर्करोग ,दीर्घकाळ टीकणारे त्वचेचे विकार
( ल्युकोडर्मा ) ,पांढरे डाग ,ह्रदयाचे विकार , कमी होतात असा दावा (अन्न परीक्षण केंद्र बंगळूर ) यांनी केला आहे.
18) मानवी शरीरास वाढीस आवश्यक असलेले (अॅमिनो ) एॅसीड-बी-1, बी-2, बी-6, बी-12, सी व ई, जीवनसत्वे, कॅल्शीयम, फाॅस्परस, आयर्न, इत्यादी घटक पुरविले जातात.
19) पुरूषांना पुरूषत्व वृध्दींगत करण्यासाठी ,तसेच शुक्रजंतूची वाढ करण्याच्या प्रक्रियेला याच्या नियमीत खाण्याने प्रोत्साहन मिळते.
20) स्त्रियांच्या पाळीत नियमीतता येण्यास याच्या खाण्यने मदत होते.
21) कडकनाथ कोंबडीच्या मांस व आंडी खाल्याने शरीरातील चरबीचे प्रमान कमी होते.
22)तसेच मधुमेह म्हनजेच( बी पी ) साखरेचा आजारही बरा होतो.
23) Osteomalacia ,Womens Sterilty ,Problems ,Headaches ,Renal ,( Kidney ) ,Problems Good For (High BP Heart) .
रत्नागिरी मध्ये मिळण्याचे ऐकमेव विश्वसनीय ठिकाण :-
आतिश कीर
मारुती मदिर, हिंदु कॉलनी, रत्नागिरी
? 09975550553
? 09028090225
Copyright © 2025 | Marathisrushti