(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • अंगाला भस्म का लावायचे

    माझे 'हे आम्ही का करायचे ?' हे पुस्तक २००२ साली प्रकाशित झाले. त्यातील माहिती खाली देत आहे.

    अंगाला भस्म का लावायचे?

    गुरुचरित्रात भस्म या विषयी एक अध्याय आहे. म्हणून मी स्वतः अंघोळ झाल्यावर भस्म लावून पाहिले. तेंव्हा माझ्या असे लक्षात आले की, भस्म लावले की थंडीच्या दिवसात थंडी वाजत नाही, उन्हाळ्याच्या दिवसात घाम कमी येतो व घामोळे होत नाही.

    भस्म म्हणजे गाणगापूरच्या भस्माच्या डोंगरावरील भस्म नव्हे. उदबत्तीची राख , गाईच्या गोवऱ्या जाळून होणारी राख हे भस्म. भस्म हे उरलेली राख असते त्यामुळे ते निर्जंतुक नक्की असते. शिवाय गाईच्या शेणापासून केलेले भस्म रेडिएशन वेव्ह्ज पासून संरक्षण करते.

    कपाळाला -आज्ञाचक्राला हे भस्म लावण्याची प्रथा दक्षिण भारतात आहे . हल्ली उन्हाळ्यात पावडरच्या जाहिराती येतात. त्या पावडरी पांढऱ्या दगडाची पावडर असते. त्यापेक्षा भस्म केव्हाही स्वस्त व उत्तम.

    थोडे भस्म (चिमूटभर) हातावर घ्यावे, त्यात थोडे पाणी कालवावे व सर्व अंगाला लावावे. त्यात मांड्या , पोटऱ्या, दंड, छाती, मान, खांदे, कपाळ, कान या महत्वाच्या अवयवांना लावल्यास थंडी वाजत नाही.

    -- अरविंद जोशी
    B.Sc.

    ९४२१९४८८९४

  • प्लास्टिक तांदूळ ओळखायचा कसा?

    आरोग्याला घातक असलेला हा चायनामधून येणारा तांदूळ. हा चक्क प्लास्टिकपासून बनवलाय.

  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग बावीस

    “जा तेल लावीत” असे वाक्य आपण काही वेळा रागाने म्हणतो. हे खरं तर सकारात्मक वाक्य आहे.

  • आजचा विषय – ताडगोळा

    उन्हाळा कडक जाणवू लागला आहे पारा दिवसागणिक वाढू लागला आहे. कडकडीत उन्हामुळे लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्व जण तहानेने व्याकुळलेले असताना तहान भागवण्यासाठी बहुतेकांची पावले सहजपणे शीतपेयांच्या दुकानांकडे वळू लागत आहेत. याशिवाय नारळपाणी, कलिंगड इत्यादी तहान भागवण्यासाठी पारंपरिक उपायही योजले जात आहेत. या उष्म्यामध्ये तहान भागवण्यासाठी तसेच शरीराला थंडावा देण्यासाठी ताडगोळे खरेदी करण्यालाही अधिक पसंती आहे. कोकणातून येणारे ताडगोळे बाजारात जागोजागी दिसू लागले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात उष्णतेचा तडाखा शरीरातील उर्जा कमी करतो. अशावेळेस आहारातून, फळांमधून, भाज्यांमधून शरीरात पाण्याचा आणि उर्जेचे समतोल राखण्यासाठी प्रयत्नपूर्वक काळजी घेणे आवश्यक आहे. शहाळ्याचं गोड पाणी आणि पातळ मलई जशी आपल्याला रिफ्रेश करते. तसेच भारतीय किनारपट्टीवर ‘ताडगोळा’ हे फळ या दिवसात मुबलक प्रमाणात आढळते. लिचीप्रमाणे आवरण असणारे पारदर्शक आणि पाणीदार लहानसे फळ म्हणजे ताडगोळा. पाल्म किंवा ताडाच्या झाडाला येणारं फळ म्हणजे ताडगोळा हे होय. याचं शास्त्रीय नाव बोरासस फ्लॅबिलिफर असं आहे. याला फ़ॅन पाम असेही म्हणतात. हे फळ महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. समुद्रकिनारी प्रामुख्याने लागवड होते. बंगालमध्ये ‘ताल’, तेलगूमध्ये ‘ताती मुंजलू’, तामिळमध्ये ‘नुन्गू’, इंग्रजीमध्ये ‘आइस अॅ्पल’ तर हिंदीमध्ये ‘तारी’ या नावाने ओळखलं जातं. आशिया, न्यु गिनी आणि आफ़्रिकेतही हा आढळतो. याच्या पानाचे अनेक उपयोग होतात. पंखे, चटया, ताट्या वगैरे करण्यासाठी उपयोग होतो. पुर्वापार याची लागवड केली जातेय, कंबोडियाच्या जगप्रसिद्ध अंगकोर मंदिरसमुहाच्या परिसरात या झाडांची लागवड केली आहे. भुर्जपत्र करण्यासाठी याच्या पानांचा उपयोग होतो. ही पाने हळद आणि मिठाच्या पाण्यात उकळुन वाळवतात. मग त्याना दगडाने पॉलिश केले जाते. अनेक जुने ग्रंथ या पानांवर लिहिलेले आढळतात. तामिळनाडु मधे अनेक जणांचे भविष्य असे लिहुन ठेवलेले आहे. लोक तिथे हौसेने ते वाचायला जातात. आणि ती व्यक्ति तिथे कधी येणार आहे तेही, त्या पत्रांवर लिहुन ठेवलेले आहे. याच्या पानाच्या दांड्यांचा कुंपणासाठी उपयोग होतो. या पासुनच जाडसर काथा निघतो आणि त्याचा ब्रश वगैरे करता येतो, झाडाचे लाकुडही मजबुत असते आणि घरबांधणीत त्याचा उपयोग होतो. या झाडापासुन ताडी मिळते, ती आंबवुन मादक पेय करतात. याही झाडापासुन नीरेसारखे पेय मिळते. ते आटवुन गुळही करता येतो, तो गुळ उसापासुन केलेल्या गुळापेक्षा चवदार लागतो. आपल्यापेक्षा तामिळनाडुमधे या झाडाचा खाण्यासाठी जास्त उपयोग होतो. या झाडाचे कोंब, कोवळी रोपे खातात. तसेच झाडाच्या टोकाशी एक मऊ गर तयार होतो, तोही खातात. या झाडाची पानं सदाबहार हिरवीगार आणि आकाराने मोठी असतात. ताडगोळे हे अतिशय मऊ, रसदार असून त्यावर जाड साल असते. ही साल काढणं म्हणजे कंटाळवाणं काम असतं. सालीचा रंग पिवळसर केशरी असून आतील गराचा रंग करडा किंवा पांढरा असतो. चवीला गोड असून प्रकृतीने थंड असणारं हे फळ आहे. पाणीदार फळ असून ते कापायची गरज भासत नाही. या फळाची प्रवृत्ती थंड असून हे फळ उन्हाळ्यात खाणं आरोग्याच्या दृष्टीने चांगलं आहे. यात खनिज, लोह, पोटॅशिअम, फॉस्फरस आणि ए, बी, सी या जीवनसत्त्वांचा भरपूर साठा आहे. त्यामुळे एकंदरीतच शरीराला अतिशय उपयुक्त ठरतं. ताडगोळा हे चवीला गोडसर असते.

    ताडगोळ्याचे आरोग्यदायी फायदे

    ताडगोळा थंड स्वरूपाचा असल्याने शरीरात थंडावा निर्माण करण्यास मदत करतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या उष्णतेचा या दिवसात त्रास होण्यापासून बचाव होण्यास मदत होते.
    ताडगोळ्यामध्ये सोडीयम,पोटॅशियम यासारख्या मायक्रोन्युट्रीअंट्सचे प्रमाण मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाईट्स आणि पाण्याचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. यामुळे उन्हाळ्यात जाणवणारा डीहायड्रेशन आणि उष्माघाताचा त्रास कमी होतो. परिणामी थकवा जाणवत नाही. यात भरपूर प्रमाणात पोटॅशिअम आणि फायबरचा साठा असतो. हे फळ तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखण्याचं काम करतं, त्याचबरोबर शरीराचं तापमान नियंत्रित राहतं. उन्हाळ्याच्या दिवसांत या फळाचे आवर्जून सेवन करावे. उष्णतेमुळे होणारी पोटातली जळजळ कमी होण्यास मदत होते. उन्हामुळे लहान मुलांना किंवा मोठय़ा माणसांनाही त्वचेवर पुरळ किंवा अॅयलर्जी होते. ताडगोळ्यांचा गर पुरळ आलेल्या ठिकाणी लावल्यास लवकर आराम पडतो. उन्हाळ्याच्या दिवसांत हे फळ आवर्जून खावं, कारण या दिवसांत काही जणांना उन्हाळे लागतात, ही जळजळ कमी होते. हे फळ या दिवसांत फ्रीजमध्ये साठवून ठेवावं. बाहेर ठेवल्यास हे लवकर खराब होतं. त्यामुळे त्याची साल न काढता फ्रीजमध्ये साठवून ठेवल्यास दीर्घकाळ टिकतं. सुट्टीच्या दिवसांत मुलं अधिक वेळ घराबाहेर असतात, अशा वेळी त्यांना हे फळ खाऊन मगच बाहेर पडायला सांगावं. ताडगोळ्याचा फेसपॅकही अतिशय उत्तम होतो. यासाठी चंदनाची साल उगाळून घ्यावी. त्यात थोडं नारळपाणी आणि ताजा ताडगोळा कुस्करून घालावा. याची चांगली पेस्ट तयार करून ती चेह-याला लावावी. फ्रेश वाटतं आणि उन्हामुळे रापलेली त्वचा उजळते. किडणीच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असून शरीराला नको असलेली द्रव्यं याच्या सेवनाने बाहेर फेकली जातात. याच्या सेवनाने बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. कांजण्या आलेल्या रुग्णांनी हे फळ खावं म्हणजे कांजण्यांमुळे अंगाला येणारी खाज कमी होते. शरीरातील साखरेची पातळी संतुलित राहते. याचं सेवन केल्यावर अधिक भूक लागत नाही, त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.

    ताडगोळ्याचे घरगुती उपयोग

    उष्णतेमुळे लघवी जळजळ होत असेल तर कोवळा ताडगोळा खडीसाखर घालून खावा.
    डोळ्यांची आग होत असल्यास ताडगोळा त्याच्याच पाण्यात वाटून तो लेप पापण्यांवर लावावा.
    गळू पिकत नसल्यास जून ताडगोळा वाटून त्यात हळद घालून गरम करावा व त्या गळूवर बांधावा.
    ज्या व्यक्तींना शरीरात वात वाढल्याने संडासला घट्ट होत असेल अथवा साफ होत नसेल तर जेवणापुर्वी व जेवणानंतर काही वेळाने १ ताडगोळा खावा. अंगामध्ये उष्णता वाढणे,हातापायांची आग होणे,पोटात आग होणे ह्यात ताडगोळा खाण्याने फायदा होतो. ताडगोळा अतिमात्रेत खाल्ल्याने सर्दी,खोकला,जुलाब होतात.

    सीताफळ – ताडगोळा मूस कस्टर्ड

    साहित्य. :५०० ग्रॅम सीताफळ आइस्क्रीम, २०० ग्रॅ. ताडगोळे (बारीक तुकडे केलेले), ४० ग्रॅम जिलेटिन पावडर, ५०० मिली दूध, १०० ग्रॅम साखर, २ अंडी, २ चमचे व्हॅनिला इसेन्स.

    कृती. : एका भांडय़ात साखर, अंडी, व्हॅनिला टाकून मिक्स करावे. जिलेटिन पावडर अर्धा कप पाणी घेऊन त्यात भिजत ठेवावी. सीताफळ आइस्क्रीम मेल्ट करून घ्यावे. एका भांडय़ात दूध घेऊन गॅसवर उकळत ठेवावे. एक उकळी आल्यानंतर लगेच काढून साखर व अंडी त्या मिश्रणात घालून मिक्स करावे. त्यातच लगेच भिजवलेली जिलेटिन पावडर टाकावी. सर्व नीट मिक्स करून गाळून घ्यावे. त्यात आइस्क्रीम व ताडगोळ्याचे तुकडे टाकून काचेच्या भांडय़ात ओतून फ्रीजमध्ये ४ ते ५ तास ठेवावे. व्यवस्थित सेट झाल्यावर थंड सव्‍‌र्ह करावे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • सुर्य नमस्कार का घालायचे?

    आपल्याला शाळेत आठवी, नववी मधे शरीर शास्त्रात शिकवलेआहे की--आपल्या पोटात जठर, यकृत म्हणजे मराठीत लिव्हर,प्लीहा,स्वादु पिंड,लहान आंतडे, मोठे आंतडे मुत्र पिंड वगेर अवयव आहेत. ह्यातील लहान आतड्याची लांबी 22 फूट आहे.

    आता विचार करा. देवाने,निसर्गाने एवढ्याशा जागेत एवढे अवयव व 22 फूटाचे आतडे कसे बसविले असेल? 22 फूटाची कमीत कमी व्यासाची एवढ्या लहान जागेत कशी राहते आणि आपण जे अन्न खातो त्याचा व्हाल्युम किती? हे कसे? विचार चालेना!! एक दिवस

    फुगेवाला नळीचा फुगा पंपाने हवा भरताना पाहिला आणि कोडे सुटले, आन्नाचा घास जेव्हा येतो तेव्हा आतड्याचा व्यास वाढतो,प्रसरण पावते आणि घास पुढे गेला की अकुंचन पावते. म्हणजे अन्न पुढे पुढे सरकणे व न पचलेले अन्न शरीरा बाहेर पडणे ह्यासाठी आतड्याचे आकुंचन व पसरण होणे आवशक आहे. म्हणजे पोट एकदा दाबले जाणे व ताणले जाणे आवशक आहे. नुसत्या चालण्याने ते होत नाही. पण सुर्यनमस्कारात ते होते.

    सुर्यनमस्कारात प्रथम खाली वाकतो, तेव्हा पोट दाबले जाते. नंतर डावा पाय दुमडतो व उजवा पाय मागे नेतो, तेव्हा पोटाचा डावा भाग दाबला जातो व उजवा भाग ताणला जातो. नंतर ओणवे होतो तेव्हा पोट सरळ होते.नंतर ह्या स्थितीत धडाचा भाग वर करून आकाशाकडे पाहतो, तेव्हा पोट ताणले जाते. नंतर उठताना उजवा पाय पुढे घेतो तेव्हा पोटाचा उजवा भाग दाबला जातो व डावा भाग ताणला जातो नंतर वाकलेल्या स्थितीत येतो तेव्हा पोट दाबले जाते. नंतर सरळ होतो तेव्हा पोट सरळ होते. ह्या क्रमाने पोट दाबले व ताणले जाते. पोटातील अवयव व्यवस्थित काम करू लागतात. अन्न नीट पचते, शौचास साफ होते, ह्याचा प्रोस्टेट ग्लॅडला व स्रियाना गर्भाशय व ओव्हरीला फायदा होतो. दिवसभराच्या कामाने संध्याकाळीच आपण दमून जात असू तर सकाळी 5 ते 12 नमस्कार घातले तर दमायला होत नाही. रात्री पर्यंत फ्रेश राहतो व दिवस उत्साहात जातो असा माझा गेल्या 32 वर्षाचा अनुभव आहे.

    1985 साली मला एक गृहस्थ भेटले. वय 72 होते. मला म्हणाले--मला दोन दिवस संडासला झाली नव्हती, डायबेटीस,गुडघे दुखी होती. (हे बोटीवर कॅप्टन होते) 69 व्या वर्षी आयुष्यातील पहिला सुर्यनमस्कार घातला आणि संडासला धावलो. जोशी आता किती नमस्कार घालत असेन सांगा. मी म्हणालो २०-२५ घालत असाल. ते म्हणाले- रोज 156 नमस्कार घालतो माझे सर्व त्रास गेले

    ह्या गृहस्थाचे पासून मी स्फुर्ती घेतली व नमस्कार चालू केले. माझा अनुभव असा की रोज 5 ते 12 नमस्कार तब्बेत चांगली ठेवायला पुरतात.

    नमस्कारासाठी झोपण्या एवढीच जागा लागते. 10 ते 15 मिनीटे लागतात. घरी करणे असल्याने जीमची फी व जाण्या येण्याचा वेळ वाचतो.

    फक्त केले पाहिजे रे !!?

    -- अरविंद जोशी
    B.Sc.

    ९४२१९४८८९४

  • गीतरामायणाचे रामायण !

    गीत रामायण हा एकाच कवीने वर्षभर रचलेला, एकाच संगीतकाराने संगीतबद्ध केलेला, वर्षभर अखंडितपणे चाललेला आकाशवाणीच्या इतिहासातील एकमेव, अभूतपूर्व असा संगीत कार्यक्रम ठरला १ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ पर्यंत तो पुणे आकाशवाणीने प्रसारित केला. साधारण १९५३ साली पुणे आकाशवाणी हे केद्र सुरु झाले.

  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग एकवीस

    गॅसनामा

    गॅस झालाय. आता काय करावे ? अनेक जणांनी हाच प्रश्न विचारलाय. आधीच्या सर्व टीप नीट वाचल्या असतील तर याचा खुलासा सहज होतोय. तरी सुद्धा परत सांगतो.

    गॅस होण्यासाठी काही तरी कुजणे आवश्यक आहे. काही तरी कुजल्याशिवाय गॅस तयारच होणार नाही. पोटात गॅस होतोय म्हणजे या ब्रह्मांडात कुठेतरी घोटाळा नक्कीच असणार. ( आमच्या वैद्य नानांचा हा आवडता शब्द, ब्रह्मांड ! )

    या आतड्याच्या आत काय कुजणार ? आपण जे काही खातो पितो तेच ना ! जर ते पुढे सरकले नाही, जिथे आहे तिथेच साठून राहिले की गॅस बनायला सुरवात होते. अन्न पुढे पुढे सरकत असले की गडबड नसते. पाणी पुढे सरकत असले की शेवाळ धरत नाही. अडकले की शेवाळ धरायला, बुळबुळीतपणा वाढायला सुरवात होते.

    लोकलच्या तिकिटाची रांग ( मराठीत लाईन लाईन ! ) व्यवस्थित पुढे जात असेल तर आरडाओरडा नसतो. जरा कोणाकडे सुटे पैसे नसले, आणि रांगेची हालचाल जरा थांबली की बोंबाबोंब सुरू झालीच म्हणून समजा !

    जीवनाला गती हवी, थांबला तो संपला.....
    याच न्यायाने खाल्लेल्या अन्नाला पण गती हवीच. अन्नाचा रस जिथे थांबेल तिथे अन्न चिकटून बसते. तिथेच जास्ती वेळ अडकले की कुजण्याची प्रक्रिया सुरू होते. पहिले चिकटलेले असेल त्याला मागून येणारे अन्न चिकटते, आणि मागे रांग वाढत जाते. थरावर थर वाढतो. गॅस होत रहातो.

    चिकटवण्याची प्रक्रिया पाणी करते आणि तेल या चिकटवण्याच्या बरोब्बर विरोधी गुणाचे आहे.
    कणिक मळल्यानंतर हाताला चिकटते, कशाने काढली जाते ? तेलाने.
    फणसाचा डिंक हाताला चिकटला तर तो सोडवण्यासाठी फक्त तेलाचा एक थेंब पुरतो.
    ग्रीस डांबरासारखे चिक्कट पदार्थ हाताला चिकटले तरीसुद्धा खनिजतेल म्हणजे राॅकेलच मदतीला येते. याचा अर्थ चिकटपणा सोडवण्यासाठी तेल मदत करते.

    जसं बाहेर तसंच आतमधे देखील! पोटाला आतड्यांना चिकटून बसलेला चिकट आम सोडवून बाहेर काढण्यासाठी तेलच मदत करते. म्हणून जेवणात तेल वापरावे. वरून कच्चे वापरले तर अधिक फायदेशीर. म्हणजे तयार झालेला आम चिकटत नाही. आणि वायुची निर्मिती अगदी "न" के बराबर !

    गॅस वाढवायला पाणी पण मदत करते. म्हणून पाणी देखील गरजेनुसारच प्यावे. नियम करून अमुक लीटर पिऊ नये. पाणी जेवता जेवता प्यावे. अगोदर किंवा नंतर शक्यतो नको.

    तहान लागेल तेव्हाच पाणी पिणे, जेव्हा एक नंबर दोन नंबर काॅल येईल तेव्हा, टाळाटाळ न करता, लगेचच जाऊन येणे, भूक असेल तेव्हा जेवणे, जेवणात सहा चवींचा वापर करणे या छोट्या छोट्या गोष्टी दररोज केल्या तर गॅस होणारच नाही.

    गॅस होऊ नये म्हणून जेवणाची वेळ बदलावीच लागेल. सूर्यास्त होईपर्यंत खावे. त्यानंतर लगेचच आपली सायंपूजा आणि नैवेद्य! रात्रीचा नैवेद्य हा अगदी अल्प असतो, हे ध्यानात ठेवावे.

    गॅस होऊ नये यासाठी म्हणजे अन्नपचन नीट व्हावे यासाठी जे करायचे तेच गॅस झाल्यानंतर देखील करायचे असते.

    ( या विषयावर गेल्या वर्षी याच दिवसात सविस्तर लेखमाला आलेली होती. )

    हे करायचे नसेल तर नियमितपणे व्यायाम करावा. व्यायाम पोट हलेल, चिरडेल, असा असावा. उगाच चालण्याचा देखावा नसावा. यासाठी सूर्यनमस्कार आठवावा. नाहीतर देह जमिनीवर गडाबडा फिरवावा. लोटांगणे घालावीत. आतमधे चिकटलेले आम आदि सोडवून घ्यावे.

    "हे काही आम्हाला जमणारच नाही", अशी मनोभूमिका असणाऱ्या मंडळींनी, गॅस होऊ नये याकरीता जवळपास असणाऱ्या वैद्यांचे पत्ते शोधून ठेवावेत. ते वैद्य पंचकर्म आदि उपचार, जे जे सांगतील ते अगदी मनोभावे करावेत.

    अन्यथा नंतर कधीतरी जिथे जावे लागणारच आहे, अशा आपल्याला आवडेल तशा, मल्टी सुपर स्पेशालीटी हाॅस्पीटल मधली एखादी रूम आधीच बुक करून ठेवावी. पै पै मिळवलेली सर्व स्वकष्टार्जित मिळकत, दहा पंधरा दिवसात त्यांच्या खात्यात खात्यान्तरीत करावी. हल्ली मोबाईल वर सुद्धा अॅप आहेतच. बॅकेत जायचे सुद्धा कष्ट नाहीत.

    कष्टाविना काही नाही,
    आमाविना गॅस नाही,
    केल्याविना साध्य नाही,
    आधी केलेची पाहिजे ।।

    -- वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021

    05.04.2017

  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग एकवीस

    गॅसनामा

    गॅस झालाय. आता काय करावे ? अनेक जणांनी हाच प्रश्न विचारलाय. आधीच्या सर्व टीप नीट वाचल्या असतील तर याचा खुलासा सहज होतोय. तरी सुद्धा परत सांगतो.

    गॅस होण्यासाठी काही तरी कुजणे आवश्यक आहे. काही तरी कुजल्याशिवाय गॅस तयारच होणार नाही. पोटात गॅस होतोय म्हणजे या ब्रह्मांडात कुठेतरी घोटाळा नक्कीच असणार. ( आमच्या वैद्य नानांचा हा आवडता शब्द, ब्रह्मांड ! )

    या आतड्याच्या आत काय कुजणार ? आपण जे काही खातो पितो तेच ना ! जर ते पुढे सरकले नाही, जिथे आहे तिथेच साठून राहिले की गॅस बनायला सुरवात होते. अन्न पुढे पुढे सरकत असले की गडबड नसते. पाणी पुढे सरकत असले की शेवाळ धरत नाही. अडकले की शेवाळ धरायला, बुळबुळीतपणा वाढायला सुरवात होते.

    लोकलच्या तिकिटाची रांग ( मराठीत लाईन लाईन ! ) व्यवस्थित पुढे जात असेल तर आरडाओरडा नसतो. जरा कोणाकडे सुटे पैसे नसले, आणि रांगेची हालचाल जरा थांबली की बोंबाबोंब सुरू झालीच म्हणून समजा !

    जीवनाला गती हवी, थांबला तो संपला.....
    याच न्यायाने खाल्लेल्या अन्नाला पण गती हवीच. अन्नाचा रस जिथे थांबेल तिथे अन्न चिकटून बसते. तिथेच जास्ती वेळ अडकले की कुजण्याची प्रक्रिया सुरू होते. पहिले चिकटलेले असेल त्याला मागून येणारे अन्न चिकटते, आणि मागे रांग वाढत जाते. थरावर थर वाढतो. गॅस होत रहातो.

    चिकटवण्याची प्रक्रिया पाणी करते आणि तेल या चिकटवण्याच्या बरोब्बर विरोधी गुणाचे आहे.
    कणिक मळल्यानंतर हाताला चिकटते, कशाने काढली जाते ? तेलाने.
    फणसाचा डिंक हाताला चिकटला तर तो सोडवण्यासाठी फक्त तेलाचा एक थेंब पुरतो.
    ग्रीस डांबरासारखे चिक्कट पदार्थ हाताला चिकटले तरीसुद्धा खनिजतेल म्हणजे राॅकेलच मदतीला येते. याचा अर्थ चिकटपणा सोडवण्यासाठी तेल मदत करते.

    जसं बाहेर तसंच आतमधे देखील! पोटाला आतड्यांना चिकटून बसलेला चिकट आम सोडवून बाहेर काढण्यासाठी तेलच मदत करते. म्हणून जेवणात तेल वापरावे. वरून कच्चे वापरले तर अधिक फायदेशीर. म्हणजे तयार झालेला आम चिकटत नाही. आणि वायुची निर्मिती अगदी "न" के बराबर !

    गॅस वाढवायला पाणी पण मदत करते. म्हणून पाणी देखील गरजेनुसारच प्यावे. नियम करून अमुक लीटर पिऊ नये. पाणी जेवता जेवता प्यावे. अगोदर किंवा नंतर शक्यतो नको.

    तहान लागेल तेव्हाच पाणी पिणे, जेव्हा एक नंबर दोन नंबर काॅल येईल तेव्हा, टाळाटाळ न करता, लगेचच जाऊन येणे, भूक असेल तेव्हा जेवणे, जेवणात सहा चवींचा वापर करणे या छोट्या छोट्या गोष्टी दररोज केल्या तर गॅस होणारच नाही.

    गॅस होऊ नये म्हणून जेवणाची वेळ बदलावीच लागेल. सूर्यास्त होईपर्यंत खावे. त्यानंतर लगेचच आपली सायंपूजा आणि नैवेद्य! रात्रीचा नैवेद्य हा अगदी अल्प असतो, हे ध्यानात ठेवावे.

    गॅस होऊ नये यासाठी म्हणजे अन्नपचन नीट व्हावे यासाठी जे करायचे तेच गॅस झाल्यानंतर देखील करायचे असते.

    ( या विषयावर गेल्या वर्षी याच दिवसात सविस्तर लेखमाला आलेली होती. )

    हे करायचे नसेल तर नियमितपणे व्यायाम करावा. व्यायाम पोट हलेल, चिरडेल, असा असावा. उगाच चालण्याचा देखावा नसावा. यासाठी सूर्यनमस्कार आठवावा. नाहीतर देह जमिनीवर गडाबडा फिरवावा. लोटांगणे घालावीत. आतमधे चिकटलेले आम आदि सोडवून घ्यावे.

    "हे काही आम्हाला जमणारच नाही", अशी मनोभूमिका असणाऱ्या मंडळींनी, गॅस होऊ नये याकरीता जवळपास असणाऱ्या वैद्यांचे पत्ते शोधून ठेवावेत. ते वैद्य पंचकर्म आदि उपचार, जे जे सांगतील ते अगदी मनोभावे करावेत.

    अन्यथा नंतर कधीतरी जिथे जावे लागणारच आहे, अशा आपल्याला आवडेल तशा, मल्टी सुपर स्पेशालीटी हाॅस्पीटल मधली एखादी रूम आधीच बुक करून ठेवावी. पै पै मिळवलेली सर्व स्वकष्टार्जित मिळकत, दहा पंधरा दिवसात त्यांच्या खात्यात खात्यान्तरीत करावी. हल्ली मोबाईल वर सुद्धा अॅप आहेतच. बॅकेत जायचे सुद्धा कष्ट नाहीत.

    कष्टाविना काही नाही,
    आमाविना गॅस नाही,
    केल्याविना साध्य नाही,
    आधी केलेची पाहिजे ।।

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    05.04.2017

  • देवांचा राजा ‘माणूस’च

    आज श्रीराम नवमी. मर्यादा पुरुषोत्तम रामाची महती सांगणारे अनेक मेसेज अनेकांडून प्राप्त झाले. मला त्यात मात्र गम्मत दिसली. आपण किती स्टिरिओटाईप वागतोय याचं उदाहरण म्हणजे अशा शुभदिवशी आपल्या मोबाईलमधे येणारे अनेक उत्तमोत्तम मेसेज.

  • शंभर वर्षांपुर्वीचं गिरगाव

    मुंबईतलं गिरगाव म्हणजे समुद्राच्या विरूद्ध बाजूला चर्नीरोड रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडल्यानंतरचा परिसर. हा भाग तसा फोर्ट विभागापासून दूर म्हणजे अगदी सुरूवातीस पाहता इंग्रजांच्या दृष्टीने तसा गावाच्या बाहेरचा किंवा वेशीवरचा भाग. इथे इंग्रजांचं लक्ष दुरूनच असे. गिरगावचा परिसर हा वेगवेगळ्या वाड्यांनी बनलेला आहे. कांदेवाडी (खाडिलकर मार्ग), केळेवाडी (डॉ. भालेराव मार्ग), फणसवाडी, गायवाडी, खोताची वाडी, झावबाची वाडी वगैरे वाड्यांचा पुंजका मिळून गिरगाव बनलेलं आहे.