(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जानेवारीचे जवाहीर

    ‘जानेवारी मध्ये जन्म झालेल्या व्यक्ती ह्या ‘कल्पक, दृढनिश्चयी व नेतृत्वगुणयुक्त’ मानल्या जातात. चालू ‘जानेवारी महिन्यामध्ये जन्मलेल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठसा उमटवलेल्या अश्याच काही प्रमुख जागतिक क्रिकेटवीरांवर तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव नोंदवलेल्या लक्षणीय भारतीय / मराठी क्रिकेटपटूंवर दृष्टिक्षेप टाकूया.

      January 20, 2026


  • पालेभाज्यांचा बागुलबुवा!!

    आजकाल जिथे तिथे ‘Green leafy vegetables’ चा बोलबाला ऐकू येतो. कित्येक आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टर्सदेखील नियमितपणे पालेभाज्या खाण्याचा सल्ला देतात. इतक्या प्रमाणात पालेभाज्या खाण्याची सवय आपल्याकडे पूर्वीपासून होती का? या प्रश्नाचे उत्तर बहुतांशी नकारार्थीच मिळते. मग आताच हा गवगवा का?
    याचे उत्तर नेहमीप्रमाणेच दडलेले आहे ते परदेशी संशोधनांत! Green leafy vegetables नियमितपणे आहारात घेतल्याने आतड्यांचा कर्करोग होण्याचा धोका कमी होतो, पचन सुधारते असे काही संशोधनांचे निष्कर्ष आहेत. ज्या देशांत सकाळी नाश्त्यापासूनच मांसाहार करण्यास सुरुवात होते तेथे आतड्याचा कर्करोग होण्याचे प्रमाण मुळातच जास्त असणार ही बाब आपण लक्षातच घेत नाही. आपल्याकडे ‘पट्टीचे खाणारे’ लोकही नाश्त्यापासून मांसाहारावर ताव मारायला सुरुवात करत नाहीत हे महत्वाचे. ‘पचन सुधारणे’ म्हणजे केवळ शौचाला साफ होणे इतकाच अर्थ अशा संशोधनांत आढळून येतो. प्रत्यक्षात इतका संकुचित अर्थ वैद्यकीयदृष्ट्या मुळीच योग्य नाही. दिवसभर ब्रेड, चीज आणि मांस यांसारखे पचायला अतिशय जड पदार्थ सातत्याने खाल्ल्यावर स्वाभाविकपणे निर्माण होणारा बद्धकोष्ठाचा त्रास टाळावा म्हणून हे लोक Fibre आणि roughage इतक्याच मर्यादित दृष्टिकोनातून या पालेभाज्यांकडे पाहून त्यांचा उदोउदो करत असतात. आपल्याकडे तसा करण्याची निश्चितपणे आवश्यता नाही.
    परदेशात खाल्ल्या जाणाऱ्या कोर्नड, सॅलरी, रॉकेट लिव्स यांसारख्या Green leafy vegetables या आपल्याकडच्या मेथी, चाकवत, माठ इत्यादी पालेभाज्यांच्या तुलनेत अगदी भिन्न आहेत. त्यामुळे त्यांना लावलेला हा न्याय आपल्याकडे मुळातच लावता येणार नाही. मुंबईसारख्या शहरांत तर रेल्वेलाईनच्या लगत असलेल्या वाफ्यांत उत्पादन घेतल्या जाणाऱ्या आणि आजूबाजूच्या सांडपाण्यावर पोसल्या जाणाऱ्या पालेभाज्यांत निकेलसारखे कर्करोगास कारणीभूत असणारे घटक वाजवीपेक्षा कित्येक पटीने अधिक प्रमाणात आढळले आहेत. (यात पालक ही पालेभाजी आघाडीवर आहे)
    सरटेशेवट; जो आहारीय पदार्थ जसा दिसतो/असतो तसेच परिणाम तो शरीरावर करतो. पालेभाज्या लवकर वाढतात, लगेच कुजतात आणि त्यात सर्वाधिक किडे असण्याची शक्यता असते. आयुर्वेदाने तर पालेभाज्यांपासून दूर राहण्याचा सल्ला ‘अशाकभुक्’ या शब्दात दिलेला आहे. थोड्क्यात सांगायचे झाल्यास; पालेभाज्यांचा आहारात अगदी जेमतेम समावेश असावा. Green leafy vegetables चा आंधळेपणाने केलेला गवगवा तर अजिबातच नको!!
    © वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
    आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
    ।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
    संपर्क: ०२५१-२८६३८३५

      October 27, 2016


  • भोग

    मनुष्याच्या आयुष्यात सुखाचा भोग असो किंवा दुःखाचा भोग ! तो मनुष्याला संचित पाप कर्म व पुण्यकर्म यामुळेच भोगावा लागतो. संतश्रेष्ठ जगतगुरु संत तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात प्रमाण देतात की,

    भोगें घडे त्याग । त्यागें अंगा येती भोग ||
    ऐसें उफराटें वर्म । धर्मा अंगीं च अधर्म ||
    देव अंतरे तें पाप । खोटे उगवा संकल्प ||
    तुका म्हणे भीड खोटी । लाभ विचारावा पोटीं ||

    संतश्रेष्ठ संत शिरोमणी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा हा गाथ्यातील अभंग आहे. संत तुकोबाराय या अभंगात असे सांगत आहेत की, एखादा मनुष्य प्रपंचातील विषय भोग घेत असेल आणि त्याला काही काळानंतर त्याचा त्याग करावा वाटला आणि त्याने त्या विषयांचा त्याग केला कि, त्याला लगेच त्या सर्व संचित पाप आणि पुण्य कर्माचा भोग भोगावा लागतो. म्हणजे एखाद्या वाईट व्यक्तीने वाईट कर्म करीत असताना तो करीत राहिला परंतु त्याने तो वाईट कर्म न करण्याचा संकल्प केला आणि त्याने ते वाईट करने सोडून दिले. परंतु त्याने वाईट कर्म सोडून देताच त्याच्यावर दुःखाचा डोंगर किंवा मोठा संकटांचा डोंगर कोसळतो. याचाच अर्थ असा की, त्याने वाईट कर्माचा त्याग करताच त्याच्या पूर्व कर्माचा भोग समोर उभा राहतो.

    संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकोबाराय असेही सांगतात की, हे असे उफराटे वर्म म्हणजे उलटे वर्म आहे. आणि धर्मा अंगीच अधर्म आहे. ज्या कर्मामुळे देवात आणि भक्तामध्ये अंतर पडते ते कर्म म्हणजे पाप कर्म ! आणि देवाचे कर्म म्हणजेच सत्कर्म ! हे लक्षात घेऊनच भक्ताने नीतीने आणि न्यायाने जगायला शिकले पाहिजे. खोटे व्यर्थ संकल्प चांगल्या व्यक्तीने कायमचे सोडून द्यावे.

    तुकोबाराय शेवटच्या चरणात असे सांगत आहेत की खोटे संकल्प, व्यर्थ संकल्प, खोटी भीड न धरता जिथे आपला लाभ असेल, जिथे आपला परमार्थ असेल तेथे आपण आपला लाभ बघावा. आणि आपण नीती न्यायाने कर्म करीत जगत राहावे.

    *विठोबासी शरण जावे |*
    *निजनिष्ठे नाम घ्यावे ||*

    विठोबाचे शरण जाऊन त्याचे नाम घेत अखंड चिंतन करत राहण्यातच खरा धर्म आहे, खरा स्वार्थ आहे आणि खरा लाभ आहे. कारण विठोबाचे नामस्मरण हे फक्त निमित्तमात्र आहे, परंतु त्यामुळे आपल्या मनात नकारात्मक विचार येत नाहीत. आपण सकात्मक विचाराने पुढील कार्य करायला लागतो, ज्याचे भोग आपणास सकारात्मकच मिळते.

    -- डॉ. शांताराम कारंडे

      November 12, 2018


  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग सहा

    आपण घेतलेल्या अन्नाला शरीराला आवश्यक असणाऱ्या स्वरूपात बदलवणे आणि पुढे ढकलणे हे तोंडाचे काम. त्यासाठी जीभ, पडजीभ, दात, दाढा, गाल, टाळू हे अवयव मदत करीत असतात.

    बत्तीस दातांना त्यांचे काम करण्यासाठी पुरेसा वेळ देणं आवश्यक ठरते. सावकाश जेवा, याचा आणखी एक अर्थ अभिप्रेत आहे, "नीट चावून चावून गिळा." यासाठी दात कणखर, बळकट असणे आवश्यक आहेत.

    हल्ली लहान मुलांचे दात लवकर किडतात, दोन वेळा ब्रश करूनदेखील दात किडतात, यासाठी प्लॅस्टिकच्या ब्रशऐवजी बोटांचा वापर करणे, किंवा कडूनिंबाच्या काड्यांचे टोक चावून ब्रश तयार करून वापरणे आणि टूथपेस्ट ऐवजी दंतमंजन वापरणे योग्य ठरेल. दात दोन वेळा घासले पाहिजेत. तसेच चुळादेखील नीट भरल्या पाहिजेत, म्हणजे दात लवकर किडत नाहीत. दंतमंजन गोड नको, फेस येणारे नको आणि नुसती पांढरी पावडर नको. किंचीत कडू, किंचीत तिखट किंचित तुरट असावे.

    प्रत्येकाच्या दातांची ठेवण वेगळी असते. पण काम एकच असते. अन्नाचे बारीक चूर्ण करणे. वरची किंवा खालची एक दाढ जरी पडली तरी त्या दाढेखाली येणारे अन्न भरडले जात नाही आणि तो तुकडा तसाच रहातो गिळला जातो आणि अपचन सुरू होते. त्यामुळे पचनाशी दातांचा संबंध देखील असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे.

    किडलेल्या दात आणि दाढांवर वेळीच उपचार करून घ्यावेत. शक्यतो दात काढू नये. रूट कॅनाॅल सारखी पद्धत वापरून जेवढं वाचवता येईल तेवढं वाचवावं. गडग्यातला एक दगड काढला तर बाजूचे दगड हलू लागतात आणि सर्व गडगा ढेपाळतो. (गडगा म्हणजे दगडाची भिंत जी, कुंपण म्हणून केली जाते.) किडलेला, हलणारा दात अथवा दाढ ही अपचनाची सुरवात असते. ती जास्तीत जास्त वाचवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.

    त्याने जी बत्तीशी दिलीय, ते काही तरी कारण असेल म्हणूनच दिलीय ना ! त्याने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी विशिष्ट हेतू असतो, ते ज्ञान मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करणे म्हणजे खरे शिक्षण.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    21.03.2017

      March 21, 2017


  • कायदा आणि फायदा

    कायदा आणि फायदा

    कायद्याचा हात पकडून चालणारा व्यक्ति नेहमी निश्चिंत राहतो. त्याला कशाची भीती वाटू शकत नाही… .. कारण कायद्याची रेषा ओलांडली आहे ह्याची चिंता सतत सतावत राहते. म्हणून कोणत्या कर्माची निवड आपण करतोय हे तपसावे. जर व्यावहारिक जीवनामध्ये ही रेषा ओलांडली तर तन, मन, धन, जन,.. .. असेल अनेकानेक प्रकारचे नुकसान सोसावे लागेल ते समजून घ्या.म्हणून लक्षात ठेवा ‘कायदा आणि फायदा’

      January 26, 2022


  • मंगळसूत्र

    मंगळसूत्र म्हणजे काळ्या मण्यांची माळ व त्याला एक किंवा दोन वाट्या. ह्या वाट्यांना मंगळसूत्रात व स्त्रीच्या आयुष्यात फार महत्व आहे. योग्य मंगळसूत्राची लांबी अशी पाहिजे की जेणे करून ते घातल्यावर वाट्या बरगडी संपून पोट सुरु होते त्या ठिकाणी आल्या पाहिजेत. तेथे अनाहत चक्राचे स्थान असते. अनाहत चक्र मनाशी निगडीत असते. मंगळसुत्रातील वाटी ही गोलाकार घुमट (गोल पिरामिड). वाटीतून येणारी एनर्जी अनाहत चक्राला मिळते त्यामुळे अनाहत चक्राची शक्ती वाढते. त्यामुळे मन शांत राहते व स्त्रीची आत्मिक शक्ती वाढते. लग्न झाल्यावर स्त्री नवर्याचे घरी (स्वतंत्र अथवा एकत्र कुटुंबात) जाते. जेथे तिला adjust व्हायचे असते. स्त्री व्यवस्थित adjust झाली तरच संसार निट होतो अन्यथा गृहकलह वाढून संसारच मोडण्याचा धोका असतो. मंगळसूत्रातील ही वाटी अनाहत चक्रावर आल्यामुळे स्त्रीची आत्मिक शक्ती वाढते. नवीन घरात गेल्यावर स्त्रीला याची नितांत गरज असते. आत्मिक शक्ती वाढली की तिचा प्रभाव इतरांवर (नवर्यासकट) पडतो. तिच्या इच्छा न सांगताच समजून घेतल्या जातात व पूर्णही केल्या जातात. तशी इच्छा त्यांना आपोआपच होते. हे आत्मिक शक्तीचे बळ आहे. तिला अनेकदा आपल्या इच्छा सांगाव्याही लागत नाहीत.

    हे आत्मिक शक्तीचे बळ स्त्रीला मिळावे म्हणून आपल्या पूर्वजांनी मंगळसूत्रात वाटीची प्रथा निर्माण केली.

    हे मर्म न समजल्यामुळे हल्ली स्त्रिया मंगळसूत्र वापरत नाहीत. समाजात संसारात कलह वाढले आहेत. घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे.

    ज्या स्त्रियांना मंगळसूत्र वापरायची इच्छा नाही त्यांनी आपल्या अनाहत चक्रावर एक इंची पिरामिड कायम ठेवावा. पिरामिड मधील शक्ती सुद्धा त्या स्त्रीचे आत्मिक बळ वाढवेल व संसार सुरळीत व्हायला मदत करेल.

    आपल्याकडील प्रथेप्रमाणे स्त्री ही नवर्याच्या घरी जात असल्याने तिला जास्तीतजास्त adjustment करावी लागते मात्र पुरुषांना तिच्या उलट पत्नीला आपल्या घरी आणायचे असल्याने तसेच कामासाठी दिवसातील बराच वेळ घराबाहेर असल्यामुळे त्याला याची गरज स्त्री एवढी नसते.

    आपल्या पूर्वजांनी मानसोपचार तज्ञ, कौन्सिलर अशी ऑफिस न थाटता, धंदा न करता, त्याचे पेटंट न घेता सामान्य माणसांचे, स्त्रीचे, तिच्या कुटुंबाचे हित बघितले. त्यामुळे सध्याच्या पैशाच्या युगात त्यांना आपण अडाणी समजतो. मात्र त्यांनी ही प्रथा पडून अनेक पिढ्या, असंख्य कुटुंबांचे कल्याण केले. आणि आपण आधुनिक शास्त्राला अनुसरताना आपले कल्याण करणाऱ्या आपल्या पूर्वजांना आणि त्यांनी निर्माण केलेल्या चांगल्या उपयुक्त प्रथांना कमी लेखतो.
    (मंगळसुत्राला वाटी एेवजी पदक/पेंडल लावून वाटीचे फायदे मिळत नाहीत.

    अरविंद जोशी
    B.Sc.
    ९४२१९४८८९४

      March 10, 2017


  • गुलमोहोर

    एप्रिल व मे महिन्यात गुलमोहोर फुलतो. त्याच्या पाकळ्यांचा सडा जमिनीवर पडतो. ह्या 10--15 पाकळ्या ग्लासभर पाण्यात रात्रभर ठेवून सकाळी पाणी गाळून, सकाळ दुपार व संध्याकाळ हे पाणी पिण्याने उन्हाळ्याच्या उष्णतेचा त्रास व पित्ताचा त्रास कमी होतो.

    माझी आई व सासुबाई दोघीना पित्ताचा खूप त्रास होता. त्या दोघीना गुलमोहोराचे पाणी रोज दिले. आणि त्याना पित्ताचा त्रास पुढे सहा सात महिने झाला नाही.

    माझे संशोधनात कंपवातावर गुलमोहोर उपयोगी पडेल असे आले. डोंबिवलीच्या एका गृहस्थानी मी सांगितल्या प्रमाणे गुलमोहोराचे पाण्याने कंपवात कमी झाल्याचे फोन करून सांगितले. तसेच माझ्या एका 73 वर्षे वयाच्या मित्राना हे पाणी 3-4 महिने दिले. त्यांना चहा पिताना कप किंवा बशी इतकी हालायची की चहा पिणे नको व्हायचे ते आता व्यवस्थित एका हाताने चहा पितात.

    गुलमोहोराच्या फुलांचे सरबतही करता येते. बर्याच पाकळ्या मिक्सरमधून फिरवून चांगल्या क्रश कराव्यात व पाण्याबरोबर मिसळून चवी प्रमाणे साखर मीठ घालून प्यावे. ह्यामुळे उन्हाळ्यातील गर्मीचा त्रास कमी होतो असा माझा अनुभव आहे.

    -- अरविंद जोशी B.Sc.
    गौरव अपार्टमेंट,
    आनंदनगर, पुणे

      April 17, 2017


  • दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव

    दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव आहे. हा प्रकाशाचा उत्सव साजरा करताना आपण काळोख्या रात्रीला तेजोरत्नांच्या अलंकारांनी सजवतो, नटवितो, शोभायमान करतो. सर्व प्रकारचे अंधार मागे टाकून उज्ज्वल प्रकाशाच्या दिशेने आपले प्रत्येक पाऊल पुढे पडावे, अशी मनोमन इच्छा बाळगून आपण दिवाळीचे स्वागत करूया असे ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी महान्यूजशी बोलतांना सांगितले.

      November 6, 2010


  • दयाघना नको आता पुन्हा येरझार

    दयाघना नको आता पुन्हा येरझार।।धृ।।

    ध्यास! केवळ आता तव दर्शनाचा
    सुखावला या जन्मी जीव हा अपार
    भोगले भोग, सारेसारे गतजन्मांचे
    जगन्नाथा! नको आता पुन्हा येरझार।।१।।

    सांगशील कां ? तूं रे जगतनियंत्या
    सत्य! तुजविण दूजे कोणते सुंदर?
    धावलो संसारी सदैव मृगजळापाठी
    जगन्नाथा! नको आता पुन्हा येरझार।।२।।

    सत्य त्रिलोकी! तुझीच सत्ता केवळ
    सृष्टीतही साक्षी, तुझेच रूप निरंतर
    अविरत स्मरण, तुझेच या स्पंदनात
    तुझ्या नामात सुखावतो जीव चिरंतर।।३।।

    मुक्ती, मोक्ष, स्वर्ग सारे तुझ्याच ठाई
    या युगी भौतिक सुखात दंगले चराचर
    वोखटी! प्रीती, भक्ती, वात्सल्य सारे
    उबगलो इथे आता, नको पुन्हा येरझार।।४।।

    -- वि.ग.सातपुते.(भावकवी)

    9766544908

    रचना क्र.१४६.

    ९ - १२ - २०२१.

      December 14, 2021


  • प्रसाद प्रॉडक्शन्सच्या ‘खिलौना’ चित्रपटाची ५२ वर्षे

    सनम तू बेवफा से नाम ( पार्श्वगायिका लता मंगेशकर), खुश रहे तू सदा ( मोहम्मद रफी), खिलौना जानकर तुम तो ( मोहम्मद रफी), मै शराबी नही ( मोहम्मद रफी आणि आशा भोसले), रोझ रोझ रोझी ( किशोरकुमार आणि आशा भोसले) या गाण्यांचा या चित्रपटात समावेश आहे.

      April 8, 2022