(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • जागतिक आरोग्य दिन

    ७ एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटना ही युनोची एक विशेष शाखा आहे. ७ एप्रिल १९४८ मध्ये स्थापन झालेल्या या संघटनेमध्ये जगातील जवळ जवळ १९२ देशांचा सहभागी झाले. लोकांच्या आरोग्यविषयक जास्तीतजास्त समस्यांकडे लक्ष पुरवणे हे या संघटनेचे मूळ उद्दिष्ट आहे. संघटनेची आरोग्यविषयक कल्पना केवळ रोग व त्यावरिल उपाय यावरच मर्यादित न रहाता त्यामध्ये मानसिक, शारीरिक आरोग्याबरोबरच सामाजिक आरोग्याचाही विचार केला जातो. जगात सहा ठिकाणी यासंघटनेची कार्यालये आहेत. द्क्षिण अमेरिकेत ब्राझिल, युरोपमध्ये कोपेनहेगेन डेन्मार्क, दक्षिण पूर्व आशियात दिल्ली, अमेरिकेत वॉशिंटन, आशियात इजिप्त, आणि पश्चिमेला फिलिपिन्स अशा सहा ठिकाणी ही कार्यालये आहेत. नविन वैद्यकीय शोधांना मदत पुरविणे, रोग निवारण व रोगनियंत्रण यासाठी वैद्यकीय मदत पुरविणे, लोकांना आरोग्यविषयक सोयीसुविधांबाबत माहिती पुरवणे, लोकांमध्ये आरोग्य विषयक जागृती निर्माण करणे, इत्यादि कामे या संघटनेमार्फत केली जातात. सात एप्रिल हा संघटनेचा स्थापना दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी एक विषय निवडला जातो; त्यासंदर्भात वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. चर्चा, परिसंवाद, पथनाट्य, फिल्म्स, प्रसारमध्यमे आदिमार्फत त्याविषयाबाबत लोकांत जागृती निर्माण केली जाते. हे वर्ष हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अर्थात जागतिक आरोग्य संघटनेने मधुमेह वर्ष म्हणून घोषित केलं आहे. येत्या काही वर्षात मधुमेहाचा धोका वाढत चालला आहे. वेळीच जनतेची जागरूकता झाली नाही तर २०३० पर्यंत हा आजार सर्वात मोठा आजार ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मधुमेह होऊच नये किंवा मधुमेह झाल्यावर काळजी कशी घ्यायची याविषयी प्रत्येकाने जनजागृती मोहीम राबवली पाहिजे. मधुमेहाविषयी लोकांमध्ये जागरूकता वाढवणं गरजेचं आहे. आजार कुठे होतो, कसा होतो, याविषयी आपण काहीच सांगू शकत नाही. त्याला काही स्थळ आणि काळाच्या मर्यादा नाहीत. कित्येकांना तर आपल्याला हा आजार आहे याविषयीही अजिबात माहिती नसते. हा आजार असाच वाढत राहिला तर वैयक्तिक, सामाजिक आणि आर्थिक पातळीवर तो अतिशय खोलवर परिणाम घडवू शकतो. बैठं काम करण्याची जीवनशैली असलेली मंडळी साखर, मीठ आणि चरबीयुक्त पदार्थाचं सेवन करतात अशा लोकांना मधुमेहाचा धोका अधिक असतो. अतिरिक्त वजन आणि व्यायामाचा अभाव यामुळे ९० टक्के लोकांना टाइप २ चा मधुमेह होतो. खरं म्हणजे कोणत्याही प्रकारचा मधुमेह बरा होऊ शकतो. फक्त तो लवकर समजणं गरजेचं आहे. या आजाराचं निदान लवकर झालं नाही तर तो शरीराच्या कोणत्याही मुख्य अवयवाला धोका पोहोचवू शकतो. परिणामी हृदयविकार, स्ट्रोक्स, अंधत्व किंवा चेतासंस्थेला इजा पोहोचू शकते. म्हणूनच हा आजार होऊच नये म्हणून आपण स्वत: काही पावलं उचलणं आवश्यक आहे.

    सकस आहार आणि शर्करायुक्त पेय कटाक्षाने टाळणं आवश्यक आहे. तसंच आपल्या अवयवांकडेही लक्ष दिलं पाहिजे. आपण किती खायला घेतो यापेक्षा आपण खातोय ते किती पौष्टिक आहे याकडे लक्ष द्यावं. थोडक्यात आपण सेवन करत असलेल्या पदार्थातून आपल्या शरीराला आवश्यक असलेली ऊर्जा आहारातून मिळते की नाही, यावर लक्ष ठेवायला हवं. त्याचप्रमाणे दररोज ३० मिनिटं नियमित चालणं आणि आठवडयातून किमान पाच वेळा तरी वजन वाढणार नाही याकडे लक्ष देणं आवश्यक असतं.

    रक्तात साखरेचे प्रमाण वाढले तर काय होते?
    मधुमेहामुळे हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका अधिकच वाढतो. ५० टक्के मधुमेही रुग्णांच्या मृत्यूचे कारण हे हृदयविकार आणि पक्षाघात आहे. रक्तात वाढलेली साखर आणि कमी झालेला रक्तपुरवठा यामुळे चेतापेशींना इजा होते. त्यामुळे पायांची संवेदना कमी होते. जखमा झाल्यानंतर जंतुसंसर्ग वाढतच जातो आणि प्रसंगी पायदेखील कापावा लागतो. जगातील अंध लोकांपैकी १ टक्के अंधत्व हे मधुमेहाच्या दृष्टिपटलावरील परिणामामुळे होते. मूत्रपिंड निकामी होऊन डायलिसिस करायला लागण्याचेदेखील महत्त्वाचे कारण मधुमेह हे आहे. मधुमेहासाठी लागणाऱ्या उपचारांचा खर्चदेखील बराच जास्त आहे. २०११ मध्ये भारताचा ३८ अब्ज डॉलर्स एवढा खर्च केवळ मधुमेहामुळे झाला. ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या अहवालानुसार भारतासारख्या विकसनशील देशामध्ये साधारण कुटुंबाचे जवळपास २५ टक्के उत्पन्न फक्त मधुमेहाच्या उपचारांसाठी खर्च होते. देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी हे एक मोठे आव्हान आहे.

    या मागची कारणे कोणती? मानवाने नेहमीच प्रगतीच्या दिशेने वाटचाल केली आहे. मग ती आर्थिक, सामाजिक किंवा भौतिक असो. या धावपळीमध्ये काही अपरिहार्य बदल माणसाच्या जीवनशैलीमध्ये झाले. शारीरिक हालचालींचा अभाव, स्निग्ध आणि अतिगोड पदार्थाचे अतिरिक्त सेवन, वरचेवर वाढत चाललेला ताणतणाव, शारीरिक स्थूलता आणि वाढलेली आयुर्मर्यादा यांमुळे मधुमेहाच्या प्रमाणामध्ये अधिकच भर पडत आहे.

    पहिल्या प्रकारच्या मधुमेहाची नेमकी कारणे निश्चित नसल्यामुळे त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आव्हानात्मक आहे. पण दुसऱ्या प्रकारचा मधुमेह हा प्रतिबंधात्मक उपायांनी नियंत्रित करता येऊ शकतो. वाढत्या वजनावर नियंत्रण, नियमित योग्य व्यायाम, योग्य वेळी योग्य पोषक आहार, आरोग्यदायी दिनचर्या व निव्र्यसनी जीवनशैली यांमुळे मधुमेहापासून स्वत:चा बचाव करता येतो.

    मधुमेह हा आजार आणि त्यामुळे होणाऱ्या गुंतागुंतींची व्यापकता लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटनेने या वर्षी जागतिक आरोग्य दिनाची मध्यवर्ती कल्पना/बोधवाक्य हे त्याच्याशी निगडित ठेवली आहे. ती म्हणजे ‘उत्कृष्ट राहा; मधुमेहावर मात करा!’ उत्कृष्ट राहा यामध्ये-मधुमेहाचा वाढता प्रभाव थांबवणे, सक्रिय राहणे, आरोग्यदायी खाणे, वैद्यकीय सल्ला पाळणे आणि जर शंका आली तर स्वत:ची तपासणी करून घेणे या सर्व बाबी समाविष्ट आहेत.
    येणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या संकटावर मात करून अखंडपणे भव्यतेच्या दिशेने वाटचाल करणे हा मानवजातीचा गुणधर्म आहे. या झटपट बदलणाऱ्या काळामध्ये वातावरणात अचानक होणारे बदल, वाढती पाणीटंचाई यांसारख्या समस्यांबरोबरच आरोग्याकडे लक्ष देणे ही काळाची गरज आहे. असे केले तरच मानवाचा विकास शाश्वततेच्या दिशेने होईल.

    मधुमेहाचं त्वरित निदान झाल्यास आणि नियमांचं काटेकोरपणे पालन केल्यास मधुमेहामुळे निर्माण होणा-या समस्यांना आपण ताब्यात ठेवू शकतो.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • आयुर्वेदिक डाळिंब

    डाळिंब खाण्यासाठी आपण खूप कंटाळा करतो. कारण त्याला सोला व त्यातील दाणे काढा, मग ते खा. त्यापेक्षा आपल्याला इतर फळे खायला आवडतात. मात्र, हे कंटाळवाणे डाळिंब आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर असते, हे क्वचितच लोकांना माहीत असते. तर चला बघू या या डाळिंबाचे फायदे.

    डाळिंबाला आयुर्वेद शास्त्रात खूप महत्त्व आहे. हे सर्वात जुने व सर्वांना माहीत असलेले फळ आहे.

    १. रंगरूप आणि गुणांनी परिपूर्ण असे रसदार फळ म्हणूनही डाळिंबाला ओळखले जाते.
    २. यामध्ये व्हिटामिन्स ए, सी,ई बरोबरच फ्लोरिक अँसिड या रसायनिक घटकाबरोबरच अँटिऑक्सिडंट मोठय़ा प्रमाणात आहे.
    ३. फुप्फुस, यकृत, हृदय या रोगांवर उपयुक्त आहे.
    ४. पोटांचे आजारही डाळिंबामुळे बरे होतात.
    ५. डाळिंबाचा प्रत्येक भाग शरीरासाठी फायदेशीर ठरणारा आहे.
    ६. वाळलेल्या डाळिंबाची पावडर दररोज पाण्यात टाकून प्यायल्यास लघवीला त्रास होत नाही.
    ७. खोकला येत असेल तर डाळिंबाची साल बारीक करून पाण्यासोबत घेतली तर खोकल्याची उबळ येत नाही.
    ८. डाळिंबाची साल उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्यास तोंडाची दुर्गंधी जाते.
    ९. मासिक पाळीच्या वेळेला जास्त रक्तस्राव होत असल्यास डाळिंबाची साल पेस्ट करून पाण्यामध्ये घेतल्यानंतर रक्तस्राव कमी होतो.
    १०. डाळिंबाची पेस्ट व दह्याचे मिश्रण करून केसाला लावल्यास केस गळणे थांबते व केस मुलायम होतात.
    ११. कोलेस्टेरॉल किंवा हृदयाच्या आजारासाठी डाळिंब खाणे फायदेशीर असते.
    १२. वाढत्या वयात शरीरातील वाढणारे ऑक्सिडायझिंगचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचे काम डाळिंब करते.
    १३. कॉलरासारख्या आजारावर डाळिंबाचा ज्यूस उपयुक्त ठरतो. शुगर असलेल्या व्यक्तीने डाळिंबाचा ज्यूस प्यायल्यास कोरोनरी नावाच्या आजारापासून बचाव होतो.
    १४. डाळिंबाच्या पानांचा चहा करून प्यायल्यास पचनसंस्थेतील अडचणी दूर होतात.

  • आजचा विषय नीरा

    आजचा विषय नीरा

    नीरामधून अधिकाधिक कॅलरीज मिळतात. परिणामी उन्हाळ्याच्या दिवसात शरीरात उर्जा टिकून राहण्यास मदत होते. यामुळे या दिवसातील थकवा कमी होण्यास मदत होते.
    ताडाच्या झाडाच्या खोडातून काढले जाणारे पाणी ‘नीरा’ म्हणून बाजारात उपलब्ध असते. कडाकाच्या उन्हांत नीरा हे एक रिफ्रेशिंग पेय म्हणून समजले जाते. परंतू सकाळी आणि ताजी निरा ही आरोग्याला हितकारी असते. नीरा काढल्यानंतर लगेचच न प्यायल्यास त्याचे रुपांतर ‘ताडी’ म्हणजेच सौम्य प्रकारच्या दारूमध्ये होते. ताडी चवीला आंबट आणि उग्र चवीची असते.

    नीरा पिण्याचे फायदे

    ज्यांना हृदयविकाराचा किंवा रक्तदाबाचा त्रास आहे, असे अनेक नागरिक नीराचा आस्वाद घेतात.

    सकाळ सकाळ काढलेल्या पाण्याचे म्हणजेच निराचे सेवन केल्याने रिफ्रेशिंग वाटते. निरादेखील आरोग्यदायी आहे. एका दिवसात १-२ ग्लास निरा पिणे फायदेसहीर ठरते. यामुळे डीहायड्रेशनचा त्रास कमी होण्यास मदत होते.

    पण तुम्ही वेट लॉसच्या मिशनवर असाल तर नियमित नीरा पिणे अडथळा ठरू शकतो. निरामध्ये साखर आणि कॅलरीज अधिक असतात. निराऐवजी साखर,मीठ घातलेले लिंबूपाणी पिणे फायद्याचे ठरू शकते

    पण हल्ली आरोग्य व उत्साहवर्धक नीरा या पेयाकडे लोकांचा कल कमी होताना दिसतो आहे.

    कुठलीही जाहिरात केली जात नसतानाही नीरा हे पेय लोकप्रिय झाले आहे. नागरिक उन्हाळ्यात पहाटे नीराचा हमखास आस्वाद घेत असतात.

    -- संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • खोकल्याचे विविध प्रकार

    प्रथम खोकल्याचे औषध घेण्यापुर्वी आपल्याला नेमका कोणत्या प्रकारचा खोकला झाला आहे हे समजायला हव!

    सर्दी खोकला ही जुळी भावंड असल्यासारखे असतात. सर्दी झाली की काही दिवसांनी खोकला होतोच. विविधप्रकारचे धुर- धुळ वा वास अत्तर रसायनांचे वास उदा. बॅगाॅन स्प्रे वगैरे, आईस्क्रिम, थंड पाणी, शीतपेय , सरबत यांच्यामुळे खोकला होतो. थंड वातावरणात रहाणे किंवा जाण एयरकंडीशनर चा वापर अती प्रमाणात करण यामुळे खोकला होऊ शकतो. भरभर जेवताना एखादा कण श्वासामार्फत गेल्यामुळेसुद्धा खोकला येतो.
    अती व्यायाम, ओझ उचलण, अती चालण, अती जागरण, अती बोलण, दिवसा झोपणं, अति मैथुन करणं , अत्याधिक उपवास करण, वेळी अवेळी भोजन करण, कोरडे पदार्थ शिळे पदार्थ खाणे, अतिगोड, खारट, तेलकट आंबट असणा-या पदार्थामुळे खोकला होतो

    वात- कफाचा खोकला

    खोकला झाल्यावर तो कोरडा किंवा वातप्रधान असल्यास खोकताना फुटक्या भांड्याप्रमाणे आवाज येतो.ब-याच वेळा खोकला आल्यावर थोडा कफ पडतो व नंतर ढास थांबते. कफप्रधान म्हणजे ओला खोकला असल्यास खोकताना कफ सुटत असतो. तो वारंवार थुंकून टाकावा लागतो. बारीक ताप येण किंवा अंग दुखणं यासारखी लक्षण उत्पन्न होतात. आवाज बसन, खोकून तोंडाला कोरड पडण, थकवा जाणवणं यासारखी लक्षण दिसतात. कोरडा खोकला होतो त्याला डांग्या खोकला म्हणतात.

    कफाच्या खोकल्यावरचा इलाज

    1) सुंठ, मिरी, पिंपळी यांच चूर्ण मधामधुन चाटवावं.

    2) सुंठ टाकुन उकळलेल पाणी प्यायल्याने खोकला व कफ कमी होतो
    3) अडुळसा या वनस्पतीचा रस काढुन त्यात मध टाकून किंवा काढा करुन पाजल्यास खोकला कमी होतो

    ४) कोरफड भाजून त्यातील गर काढून त्यात मध मिसळून चाटवल्यास खोकला कमी होतो.

    ५) दालचिनी पावडर मधातून वारंवार चाटवावी त्यान खोकला कमी होतो

    ६) द्राक्षसव, कुमार आसव, अडुळसा सिरप, पिंपलासव ही बाजारात मिळणारी औषध उपयुक्त आहेत

    ७)छातीला तीळतेल व सैंधव एकत्र करुन माॅलिश करावी आणि गरम पाण्याच्या पिशवीन शेक द्यावा

    ८) दोन चमचे तुळशीचा रस, एक चमचा आल्याचा रस आणि मध अंस चाटण द्याव किंवा तुळशीचा काढा करुन प्यावा.

    ९) गवती चहाचा काढा करावा त्यात सुंठ, पिंपळी, दालचिनी, मिरी, आणि गुळ टाकुन एक कपभर काढा पाजावा

    १०) वेलदोडे व लवंग भाजुन त्याची राख मधातून चाटवल्यास कफाचा खोकला त्वरीत कमी होतो

    कोरडा खोकला

    उपाय

    कोरडा किंवा वातप्रधान खोकला असल्यास
    १) खोबरेल तेल, तीळाचे तेल किंवा सहचर तेल किंवा दोन- तीन चमचे गाईचे तुप गरम पाणी आणि चिमुठभर सैंधव मिठ अंस एकत्र करुन पाजल्यास खोकल्याची ढास त्वरीत कमी होते. तेल किंवा तुप हे या खोकल्यातील प्रभावी औषध आहे

    २) रुईची फुल, पानं वाळवुन ती जाळुन त्याची राख करुन ठेवावी व ती राख एक चिमूट व मधातून किंवा तेलातून चाटवल्यास दमा त्वरित कमी होतो

    ३) सागाची पानं, पळसाची पानं, रुईची पानं, फुलं, आवळकाडी, जाळुन त्याची राख, त्रिफळा किंवा बेहडा, लवंग वेलदोडा गायीच्या शेणाची राख यांचा प्रभावी उपचार या खोकल्यावर होतो

    ४) डाळिंबाची साल उगाळून चाटवणं किंवा सालीचा काढा करून त्यात तुप आणि सैंधव मीठ टाकून दिल्यास कितीही खोकला असेल तरी तो तात्काळ थांबतो

    ५) हळद, सुंठ व गुळ एकत्र करुन त्याच्या बोरा एवढ्या गोळ्या करुन ठेवाव्यात व दर १०/१५ मिनटांनी चघळाव्यात*

    ६) कोरडा खोकल्याच प्रमाण अतिशय असल्यास तेलाची बस्ती म्हणजे एनिमा द्यावा तात्काळ उपयोग होतो

    या लेखाचे लेखक वैद्य विनय वेलणकर हे ख्यातनाम आयुर्वेदाचार्य आहेत
    ( vd.velankar@gmail.com)

    कमलाकर भोईटे यांनी आरोग्यदूत या WhatsApp ग्रुपवर पाठवलेला लेख.
    08275275841

  • वेदांतील प्राण्यांची नावे ही आयुर्वेदिक औषधी वनस्पतींची नावे

    वेदांतील प्राण्यांची किॅवा अवयवांची नावे ही आयुर्वेदिक औषधी वनस्पतींची नावे आहेत.

    वेदांमध्ये(संहिताभागात) पशुहत्या किॅवा मांसभक्षण आहे असा मिथ्या आरोप करणारे तथाकथित विद्वान नेहमी वेदांतील पशुंची किॅवा त्यांच्या अवयवांची नावे पुढे करतात.

    वेदांत ऋषभ, गौ, श्वान, हस्ति, अज असा शब्द आढळला की लगेचच त्याचा बैल,गाय, कुत्रा, हत्ती किॅवा बोकड असा बालिश अर्थ काढून त्याची किॅवा त्याच्या अवयवांची हत्या असा सोयीस्कर अर्थ काढून मोकळे होतात हे लोक. पण ही नावे त्या पशुंची किॅवा त्यांच्या अवयवांची नसून तीच नावे असणार्या आयुर्वैदिक औषधी वनस्पतींची आहेत हे खालील यादीत मी सविस्तर दिलं आहे. ही नावे आले की सर्वसामान्य मनुष्य लगेचच तसा अर्थ घेऊन मोकळा होतो. पण वास्तविक आयुर्वेदाचा अभ्यास केला व त्याचे शब्दकोश अभ्यासले, की जे भावप्रकाश निघण्टु वगैरे नावाने प्रसिद्ध आहेत, त्यात ही नावे औषधी वनस्पतींचीच आहेत हे सिद्ध होते. विशेष म्हणजे पशुंच्या नावाची किॅवा अवयवांची सारखीच नावे असणारी आयुर्वैदक वनस्पती आढळतात व तोच वनस्पती अर्थ त्या वैदिक ऋचेचा घ्यायचा हे उघड आहे. ह्याचे कारण सरळ आहे की

    "मा हिॅस्यात सर्वभूतानि"

    कोणत्याही प्राण्याची हत्या करु नका

    ही वेदांचीच आज्ञा ! तत्पूर्वी

    वेदांत मांस शब्दाचा अर्थ

    मांस शब्दाचा अर्थ आपण जसा आज घेतो तसा तो नसून मांस म्हणजे फळाच्या आतला जो गर असतो त्यालाच मांस हा शब्द आहे. शतपथ ब्राह्मणांमध्ये सुद्धा मांस शब्दाचा अर्थ "परमान्नं तु पायसम्" असा दुध व तांदळाची खीर किॅवा दुधाचे पदार्थ असा सांगितलाय. पण स्वत:च्या सोयीनुसार अर्थ काढणे ही आजकाल एक फॅशन आहे. असो.

    जो वेद साक्षात् परमेश्वराची वाणी तो वेदभगवान यज्ञांमध्ये कोणत्याही प्राणीमात्राच्या हत्येची आज्ञा का बरे देईल???
    कारण यज्ञाचं वर्णन ऋग्वेदाच्या पहिल्याच सुक्तांत चोथ्याच ऋचेत खालील प्रकारे आलंय.

    अग्ने यं यज्ञमध्वरं विश्वत: परिभूरसि ! स इद्देवेषु गच्छति !
    ऋग्वेद - १.१.४

    "यज्ञं अध्वरं" ह्या शब्दाचा अर्थ निरुक्तकारांनी दिला आहे

    अध्वर इति यज्ञानाम – ध्वरतिहिंसा कर्मा तत्प्रतिषेध: - निरुक्त २।७

    ध्वर म्हणजे हिॅसा व त्याचा जिथे निषेध तो अध्वर ! म्हणजे यज्ञ हा "अध्वर" म्हणजे अहिंसक असतो. वेदांमध्ये हा "अध्वर" शब्द अनेकवेळा आलेला आहे. शतपथ ब्राह्नणामध्ये तर तिसरे कांड "अध्वर" नावानेच आहे.

    वेदांत "आलंभन" शब्दाचा अर्थ

    आलंभन ह्या शब्दाचा विकृत अर्थ वध असा काढणारे लोक त्याच्या वास्तविक अर्थाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करतात. एक साधं प्रमाण घेऊयात

    पारस्कर गृह्यसुत्रांत सांगितलं आहे की
    अथास्य (ब्रह्नचारिण:) दक्षिणासं अधिह्रदयं आलभते ! (२.२.१६)

    अर्थ - गुरु त्याच्या शिष्याच्या ह्रदयांस हात लावतो.

    उपनयनाच्या वेळी "ह्रदयालम्भन" अशी एक क्रिया असते ज्यात गुरु स्वत:च्या शिष्याच्या म्हणजे त्या बटुच्या ह्रदयांस हात लावतो. इथे "आलंभन" चा अर्थ "स्पर्श" असाच अभिप्रेत आहे व वेदांतही तोच अर्थ आहे. पण पाश्चिमात्यांची टुकार व भिकार वेदानुवाद व विशेषत: मेकडाॅनेल व कीथ ह्यांच्या विकृत अशा "वैदिक इण्डेक्स" ह्या द्विखंडात्मक ग्रंथात , जो आम्ही स्वत: पूर्ण मुळ आंग्लभाषेत व हिंदीतही वाचला आहे व ज्यामध्ये "आलंभन" शब्दाचा "वध" असा विकृत अर्थ केला गेल्याने त्यालाच आपले लोक अंधपणाने प्रमाण मानतात. आता ह्यापेक्षा दुर्दैव कोणते??? हा आंग्लभाषेत व हिंदी भाषेतही पीडीएफ स्वरुपात डिजीटल लायब्ररीवर उपलब्ध आहे.

    "आलम्भन" हा शब्दांमध्ये "लभ" ह्या संस्कृत धातुचा पाणिनीनुसार अर्थ "प्राप्त करणे" असा आहे. "लभ्" ह्या धातुचा आणखी अर्थ "प्रेरणा" असाही होतो. हाच अर्थ इतर अनेक व्याकरणकारांनीही घेतला असल्याने म्हणूनच आलंभनचा अर्थ "आ" शब्द अधिक आल्याने "अत्यंत प्राप्ती" असा योग्य आहे. संस्कृतच्या अध्ययनासाठी जी वाराणशीतील संस्कृत पाठशाळा सर्वभारतात व जगातही प्रमाण मानली जाते, त्याच पाठशाळेने "धातुपाठ समीक्षा" नावाचा ग्रंथ प्रकाशित केलाय, त्यातही "लभ्" शब्दाचा अर्थ प्राप्ती असाच घेतला असून त्यात हिॅसा किॅवा वध असा कुठेही घेतला नाही.

    तरीही उदाहरणार्थ यजुर्वेदांतली एक ऋचा पाहु

    ब्रह्मणे ब्राह्नणमालभते, क्षत्राय राजन्यम् !
    नृत्याय सूतं, धर्माय सभाचरम् !
    यजुर्वेद - ३०.६

    ब्रह्मणे ब्राह्मणं आलभते - ज्ञानासाठी ज्ञानीला प्राप्त करतो.
    क्षत्राय राजन्यं आलभते - शौर्यासाठी शूरपुरुषांस प्राप्त करतो.
    नृत्ताय सूतं आलभते - नाचण्यासाठी सूतांस प्राप्त करतो किॅवा बोलवितो
    धर्माय सभाचरं आलभते - धर्माज्ञानासाठी किॅवा धर्मासाठी धर्मसभेस किॅवा सदस्यास प्राप्त करतो.

    त्यामुळे "आलंभन" शब्दाचा अर्थ वध किॅवा हत्या असा घेणं विकृतीचा कळस आहे. ह्याप्रमाणेच "गवालंभ" ह्या शब्दाचा अर्थही गाईस प्राप्त करणे असा असून तिची "हत्या" असा कुठेही होत नाही.

    आता वर सांगितलेली ही यादी किती मोठी आहे ते आपण पाहु. मी हिॅदी आयुर्वेदिक कोषातली नावे दिली आहेत, ती खालीलप्रमाणे.

    खालील आधी वेदांतील पशुंची नावे व नंतर त्याची तेच नाव असलेली आयुर्वैदिक औषधी दिलेली आहे.

    पशुनाम - वनस्पती नाम

    १. वृषभ - ऋषभस्कन्द
    २. मेष - जीवशाक
    ३. श्वान - कुत्ताघास, ग्रन्थिपर्ण
    ४. कुक्कुट - शाल्मलीवृक्ष
    ५. मार्जार - बिल्लीघास, चित्ता
    ६. नर - सौगन्धिक तृण
    ७. मयूर - मयुरशिखा
    ८. मातुल - घमरा
    ९. बीछु - बीछुबूटी
    १०. मृग - सहदेवी, इन्द्रायण, जटामासी, कपूर(कापूर)
    ११. सर्प - सर्पिणीबूटी
    १२. पशु - अम्बाडा, मोथा
    १३. अश्व - अश्वगन्धा, अजमोदा
    १४. कुमारी - घीकुमार
    १५. हस्ति - हस्तिकन्द
    १६. नकुल - नाकुलीबुटी
    १७. वपा - झिल्ली अर्थात बक्कल के भीतर का जाला
    १८. हंस - हंसपदी
    १९. अस्थि - गुठली
    २०. मत्स्य - मत्स्याक्षी (मराठीत मत्स्याण्डी) हिचा उल्लेख रामायणात आहे ज्यावरून काही दीडशहाणे रामाला मांसाहारी म्हणतात) ?
    २१. मांस - फल का गुदा, जटामासी (थोडक्यांत फळाचा किंवा वनस्पतीतला आतला गर)
    २२. मूषक - मूषाकर्णी
    २३. चर्म - बक्कल
    २४. गो - गौलोमी
    २५. स्नायु - रेशा
    २६. महाज - बडी अजवायन
    २७. नख - नखबूटी
    २८. सिॅही - कटेली, वासा
    २९. मेद - मेदा
    ३०. खर - खरपर्णिनी
    ३१. लोम - जटामासी
    ३२. काक - काकमाची
    ३३. ह्रद - दारचीनी
    ३४. वाराह - वाराहीकन्द
    ३५. पेशी - जटामासी
    ३६. महिष - महिषाक्ष, गुग्गुळ
    ३७. रुधिर - केशर
    ३८. श्येन - श्येनघंटी(दन्ती)
    ३९. आलम्भन - स्पर्श

    जिज्ञासूंनी आयुर्वैदिक कोष मुंबई, किॅवा भावप्रकाश निघण्टु किॅवा इतर आयुर्वैदिक कोष पहावेत. प्रमाण मिळेल.

    हे आहेत वनस्पती ! जर हा अर्थ घेतला नाही तर किती गोंधळ व अनर्थ होतो व झाला आहे, हे वेगळं सांगायची आवश्यकताच नाही.

    शेवटी

    नोsलुकोsप्यवलोकते दिवा किॅ सूर्यस्य दूषणम् !

    तुकाराम चिंचणीकर
    #पाखण्ड खण्डिणी
    Pakhandkhandinee.blogspot.com

  • योगा व प्राणायाम न करण्यासाठी दिली जाणारी कारणं

    योगा व प्राणायाम न करण्यासाठी दिली जाणारी कारणं.......

    1) जॉब हेक्टिक आहे
    ( कुणाचा नसतो ?)

    2) वेळच मिळत नाही
    ( सर्वांनाच 24 तास मिळतात !)

    3) खूप काम असते
    ( रिकामटेकडा कोण असतो ?)

    4) अभ्यास खूप असतो कॉलेजात
    ( काय दिवे लावणार आहात ?)

    5) घरी जाऊन पण काम असते
    ( आम्ही पण कामं करतो !)

    6) लग्न झालं आता
    ( मग काय नाचू ? सर्वांचीच होतात !)

    7) मुलांच्या मागे धावण्यात वेळ जातो
    ( तेवढा योगा - प्राणायाम, व्यायाम पुरेसा वाटतो का ?)

    8) आता कोण बघतंय आमच्याकडे ?
    ( मग घराबाहेर पडूच नका !)

    9) मला गरजच नाही योगा-प्रणायाम, व्यायामाची
    ( सर्वात मोठा गैरसमज ...)

    10) हे जिम , व्यायाम योगा-प्रणायाम मोठ्या लोकांची थेरं आहेत
    ( स्वतःला कमी समजायचंच कशाला ?)

    11) योगा प्राणायाम क्लास ची फी परवडत नाही
    ( घरी करायला किती पैसे लागतात ?)

    12) खूप ठरवतो , पण काही ना काही आडवं येतं
    ( अर्धा एक तास काढता येत नाही स्वतःसाठी ?)

    13) घरी आल्यावर आराम करायचा की योगा-प्रणायाम करत बसायचं ?
    ( एक सिरीयल कमी पाहिलीत तर लगेच जीव जाईल का ?)

    हुश्श !!!
    यापेक्षा मोठी लिस्ट होईल.

    मित्रांनो , कारणं खूप देता येतील. पण आज स्वतःमध्ये गुंतवणूक कराल तर पुढचं आयुष्य निरोगी जगाल. नंतर हा पैसा , मालमत्ता , हुशारी , कशाचाच उपयोग होणार नाहीय. तंदुरुस्त शरीर हीच सर्वात मोठि मालमत्ता आहे तेव्हा आतापासूनच स्वतःची काळजी घ्या.

  • शेवगा (ड्रमस्टिक) – आहारातील पौष्टिक कॅप्सुल

    दक्षिण भारतात शेवग्याची झाडे अधिक प्रमाणात पहायला मिळतात. साऊथ इंडियन "सांबार'मधे शेवग्याची शेंग हमखास घातलेली असते. नजीकच्या काळात आहारशास्त्रीय जगात शेवग्याला फार महत्त्व लाभले आहे. शेवग्याच्या शेंगेला "वंडर स्टीक' तर झाडाला "ट्री फॉर लाईफ' असे संबोधले जाते. कारण आहारतज्ज्ञांच्या मते शेवग्याच्या शेंगा व या झाडाची पाने हे पौष्टीकतेत अतिशय समृद्ध पातळीवर आहेत. काही तज्ज्ञांच्या मते शेवग्याच्या पाल्यामधे संत्र्याच्या सातपटीने अधिक "क' जीवनसत्त्व आहे, दुधाच्या चौपट कॅल्शियम आहे व केळ्याच्या तिप्पट पोटॅशियम आहे. दुधापेक्षा अधिक प्रथिने व गाजराहून कितीतरी पटीने अधिक बेटाकेरोटीन यात आहे. शेवग्यास "पॉवर हाउस ऑफ मिनरल्स' यासाठीच म्हटले जाते.

    शेवग्याच्या शेंगेतही "क' जीवनसत्त्व, केरोटीन, कॅल्शियम व फॉस्फरस ही पोषणतत्त्वे आहेत. शेवग्याची शेंग ही गर्भवती व वाढीच्या मुलांसाठी उत्तम भाजी आहे. ती रक्‍त शुद्ध करणारी आहे तसेच ज्यांना कफाचा त्रास आहे (दमा, जुनाट खोकला) अशांनी शेवगा नियमित खावा. यकृत व प्लीहा ह्यांचे आजार असणाऱ्यांना शेवग्याचे सूप द्यावे. 100 ग्रॅम शेवग्याच्या शेंगेत निव्वळ 0.1% चरबी असून चोथ्याचे प्रमाण मात्र चांगले आहे. यामुळे अनेक लाईफस्टाईल डिसिजेस मधे (हृदयरोग, मधुमेह, उच्चरक्‍तदाब, गाऊट इ.) शेवगा पथ्यकारक ठरतो. 1 वाटी (50 ग्रॅम) शेवग्याच्या आमटीत 59 कॅलरीज, 0.8 ग्रॅम प्रोटिन्स व 2.2 ग्रॅम्स फॅट्‌स असतात. 1 वाटी सांबार मधे 87 कॅलरीज, 3.7 ग्रॅम प्रोटिन्स व 2.8 ग्रॅम फॅट्‌स असतात.

    एकूणच भारतीय आहारात शेवग्याच्या शेंगेचं आपलं म्हणून एक स्थान आहे. शेवगा आहारात अगदी रोज वापरला तरी हरकत नाही, असं सांगितलं जातं. याचं मुख्य कारण आहे त्याचे औषधी गुणधर्म. शेवगा गरम, हलका, मधुर, तिखट, अग्निप्रदीपक, रुचकर, दाहकारक, वीर्यवर्धक, पित्त वरक्त प्रकोपक असून, शेवग्याची भाजी वातविकार दूर करणारी आहे. शेवग्याच्या मुळांचा रस काढून किंवा त्याच्या कढय़ात मध घालून घेतल्याने गळू बरे होतात.

    शेवग्याच्या फुलात ‘प्टेरोगोस्परमीन, पाल्मिकएसिड, स्टेईक अ‍‍ॅसिड, बेटेनिक अ‍‍ॅसिड,ओलेईक अ‍‍ॅसिड हे घटक असतात. तसंच टेरिगोस्पर्मीन नावाचे प्रतिजैविक असतं. पानातील रसामध्ये जीवाणूनाशक तत्त्व असतं. खोडातून एक भु-या रंगाचा डिंक मिळतो. तसंच बियांमधून रंगरहिन तेल मिळतं. शेवग्यात मोठया प्रमाणात खनिजं आढळतात. शेवग्यापासून जीवनसत्व ‘अ’, ‘क’ आणि ‘ई’ तयार करतात. पाणी शुद्धीकरणात शेवग्याच्या बियांचा वापर होतो.

    ही यादी खूप मोठी आहे. शेवग्याच्या पानांचा रस प्यायल्याने उचकी थांबते व धाप लागणं कमी होते. शेवग्याच्या पानांच्या रसात चमचाभर साखर घेऊन तो तीन दिवस प्यायल्याने वायूने आलेला गोळा नाहीसा होतो. शेवग्याच्या पानांच्या रसाने डोकं चोळलं असता डोक्यातील कोंडा निघून जातो. मस्तकशूळ झाला असल्यास शेवग्याच्या पानांच्या रसात मिरे वाटून त्याचा लेप लावावा. पोट फुगलं असल्यास शेवग्याच्या पानांच्या रसाचा काढा तयार करून त्यात हिंग व सुंठ घालून तो प्यावा.

    शेवग्याच्या पानांच्या रसाचा काढा करून त्यात मिरे, संधव व पिंपळीचं चूर्ण घालून प्यायल्याने प्लिहोदर बरा होतो.

    वायूचा प्रकोप होऊन शरीरात कुठंही दुखत असल्यास शेवग्याच्या काढय़ात सुंठ व हिंग घालून प्यायल्याने वेदना थांबते. शेवग्याच्या पानांच्या रसात मध घालून डोळ्यांत घातल्याने डोळे दुखणं थांबतं. मस्तकात वेदना होत असल्यास शेवग्याचा डिंक दुधात वाटावा आणि त्याचा लेप मस्तकावर लावावा. त्यामुळे वेदना कमी होतात. मिरपूड व शेवगा बारीक कुटून एकत्र करून हुंगल्यास शिंका येऊन डोकेदुखी दूर होते. गर्भवतीने आहारात शेवग्याच्या भाजीचा वापर केल्यास गर्भाची वाढ चांगली होते. शेवग्याच्या शेंगांची भाजी खाल्ल्याने भूक लागते, तोंडाला चव येते. शेवग्याच्या शेंगांचा जेवणात वापर होत असल्याने त्यांना बाजारात मोठय़ा प्रमाणात मागणी असते. शेवग्याने अनेक औषधी गुण पाहता त्यांना पौष्टिक कॅप्सुलच म्हणायला हवी.

    आरोग्यम् धनसंपदा

  • सर्दी खोकल्यावर घरगुती इलाज

    कधी बदलत्या ऋतुचक्रामुळे तर कधी धूर,धूळ आणि प्रदूषणामुळे सर्दी खोकल्याचा त्रास वारंवार होतो, अशावेळी बाजारात मिळणारी कफ सिरप्स घेतल्याने शरीरावर घातक परिणामांची शक्यता तर असते आणि त्याने दिवसभर झोपही येते मग अशावेळी तुमच्या स्वयंपाकघरातील काही घटकच कोणताही दुष्परिणाम न करता तुमचा सर्दी खोकला दूर करु शकले तर ?

    लसूण:

    लसणात एन्टीऑक्सिडन्ट गुणधर्म असून सर्दी खोकल्यावर ते अत्यंत प्रभावशाली आहे. लसुणामधील ‘आलाय्झीन ‘ हा घटक जंतूंचा नाश करतो .

    टीप १ -जर तुमचा कान दुखत असेल तर तुम्हाला घश्यात इन्फेक्शन असण्याची शक्यता आहे,ज्यामुळे तुम्हाला कालांतराने सर्दी खोकला होऊ शकतो . अशावेळी काही लसणाच्या पाकळ्या घ्या, त्या ठेचून कापडात बांधा व कानात वरच्यावर ठेवा . त्या कानात खाली जाणार नाहीत याची काळजी घ्या.

    टीप २ -लसणाच्या ४-५ पाकळ्या ठेचून त्या तुपात परतून खा. हा सर्दी खोकल्यावरील एक सोपा उपाय आहे. याव्यतिरिक्त ४ लसणाच्या पाकळ्या , २ टोमॅटो व एका लिंबाचा रस काढून तो घेतल्यास इन्फेक्शन दूर होण्यास मदत होते. असेच तुम्ही लसूण व टोमॅटोचे एकत्र सूप बनवून त्यात थोडेसे मीठ टाकून पिऊ शकता .

    हळद :

    स्वयंपाकघरातील अत्यंत गुणकारी आणि बहुगुणी हळद सर्दी – खोकल्यापासून चटकन आराम देते.

    टीप १ -घशाच्या खवखवीवर हळद अत्यंत उपयुक्त आहे. मुळातच हळद जंतुनाशक असल्याने ती संसर्ग वाढू देत नाही. ग्लासभर गरम दुधात चिमुटभर हळद व साखर किंवा मध घालून दुध प्या . हे दुध सर्दी – खोकला दूर करते त्याचबरोबर तुम्हाला दिवसभर उर्जा देते.

    टीप २ -हळदीचा चहासुद्धा सर्दी – खोकल्याला प्रतिबंध करतो. या चहासाठी चार कप पाण्यात एक छोटा चमचा हळद टाकून उकळा. १० मिनिटांनंतर तो गळून घ्या व त्यात थोडेसे मध व लिंबू पिळून प्या . यामध्ये उकळताना तुम्ही तुळशीच्या पानांचादेखील वापर करू शकता.

    टीप ३-चमचाभर हळद व मध एकत्र करून त्याचे चाटण तुम्ही दिवसातून तीनदा घेतल्यास, तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.

    आयुर्वेदिक काढा:

    हळदीच्या चहाप्रमाणेच गवती चहा , आलं , लवंग , काळामिरी व दालचिनी यांचा एकत्र काढा सर्दी खोकला बरं करतो तसेच शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवतो.

    टीप १ -चार वेलची , काळामिरीचे दाणे, लवंगा , ताजं आलं व दालचिनीचा छोटा तुकडा पातेल्याभर पाण्यात टाकून मंद आचेवर १० -१५ मिनिटे उकळा . उकळताना पातेल्यावर झाकण ठेवा . त्यानंतर मिश्रण गाळून ते गरम गरम प्या. गोडव्यासाठी त्यात थोडेसे मध घाला.

    टीप २ -१५-२० तुळशीची पाने दीड कप पाण्यात उकळा . दहा मिनिटांनी हे मिश्रण गाळून त्यात चमचाभर लिंबाचा रस मिक्स करा . यातील व्हिटामिन सी व तुळस तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवते .

    टीप ३-कडूलिंब व मधाचा वापर करून तुम्ही घरच्या घरी गुळण्या करू शकता. ग्लासभर पाण्यात २-३ कडलिंबाची पाने टाकून उकळा हे मिश्रण थंड झाल्यावर त्यात चमचाभर मध घालून त्या पाण्याने गुळण्या करा.

    कंठसुधारक वडी

    आज काल घशातील खवखव , सर्दी यासाठी अनेक गोळ्या बाजारात उपलब्ध आहेत मात्र आयुर्वेदाचा उगम असलेल्या भारतात पूर्वीपासून अनेक प्रकारच्या कंठसुधारक वड्या ह्या घरीच बनवल्या जात असत. ज्यामुळे सर्दी , खोकला सारख्या आजारांवर घरच्या घरीच सहज विजय मिळवता येत असे

    कशी कराल कंठसुधारक वडी ?

    आलं बारीक कापून त्याचा रस काढून घ्या त्यात काळामिरीच्या दाण्यांची भाजून केलेली पावडर , थोडे मध व चिमुटभर हळद टाका . हे मिश्रण एकत्र करून त्याचा लहान गोळ्या तयार करा. ह्या गोळ्या १०-१५ मिनिटे चघळा , असे दिवसातून तीनवेळेस केल्यास तुम्हाला सर्दी खोकल्यापासून आराम मिळेल .

    कफजन्य खोकला

    कफजन्य खोकल्यापासून वेळेत आराम मिळवणे फार गरजेचे आहे . कफजन्य खोकला हा साध्या संसर्गापासून अगदी ब्राँकायटिस , न्यूमोनिया व क्षयरोगासारख्या आजाराचे एक प्रमुख लक्षण आहे. त्यामुळे जर तुमचा खोकला आठवडाभरापेक्षा अधिक काळ टिकला तर डॉक्टरकडे जाणे आवश्यक आहे.

    टीप १-चार पाच मिरीचे दाणे , थोडे जिरे व गुळ पाण्यात एकत्र करून हे मिश्रण उकळा . हे मिश्रण एकजीव झाल्यावर गॅस बंद करा व थोडे थंड करून प्या . यामुळे तुमचा खोकला कमी होण्यास मदत होईल .

    टीप २-सुपारीची पाने कुटून रस काढून घ्या. या २ चमचे रसात एक चमचा मध घालून रोज दोनदा जेवणानंतर अर्ध्या तासाने घ्या . यामुळे कफाच्या खोकल्यापासून आराम मिळण्यास मदत होइल

  • ब्रेड (Bread)

    पांढरा ब्रेड वाईट आणि ब्राऊन ब्रेड चांगला ही आपली नेहमीची अंधश्रद्धा.

  • जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

    जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

    महाराष्ट्र गीतांच्या मालिकेतील हे आणखी एक गीत.