(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • कोकणची पारंपरिक खाद्यसंस्कृती

    ” विठोबा, मेन्यूत अगदीच बदल करायचा असेल तर पुरणपोळीऐवजी आमच्या टिळकांचं श्रीखंड किंवा चितळ्यांचं आम्रखंड, मटकीच्या उसळीऐवजी बटाट्याच्या काचऱ्या, पीठ पेरलेल्या तोंडलीच्या काचऱ्या, पडवळाच्या बियांची चटणी, पापडाऐवजी मिरगुंड, तीळ दाण्याची चटणी किंवा तळलेली सांडगी मिरची हे बदल कर. ब्रह्मानंदी वगैरे जे काय असतं ते फार सहज लागू रे!” मी जातीयवादी नाही पण एखाद्या भरलेल्या पानात हिरमुसलेला तळणीचा मोदक किंवा लसणीच्या चटणीत लसणीच्या मोठ्या मोठ्या लठ्ठ कळ्या दिसल्या की मी ताटीयवादी नक्की होतो. त्यावेळी ह्या सर्वांपेक्षा आपल्या ताटात किती चांगलं वाढलं जातं ह्या विचाराने माझा ऊर भरून वगैरे येतो.

    आपल्याकडे प्रत्येक सेक्शन ऑफ सोसायटीची खाद्यपदार्थांची एकेक स्टाईल असते. कोक्स लोकांची ती एक स्पेशल आहे. जन्मापासून मी ती बघत आणि उपभोगत आलोय.

  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग वीस

    गॅसनामा

    गॅसचे कार्यक्षेत्र म्हणजे फक्त पोटापुरतेच मर्यादित असेल, असं समजणे म्हणजे शुद्ध गैरसमज, अज्ञान आहे. ते कार्य अगदी तळपायापासून सुरू होऊन व्हाया ह्रदय अगदी मेंदूपर्यंत पसरलेले आहे.

    फूटबोर्ड पर्यंत खचाखच भरलेली लोकल. आतमधील काहीजण येणाऱ्या स्टेशनवर उतरण्याच्या आवेशात सामान काढताहेत. उठून उभी रहाताहेत. त्यामुळे तिथल्या उभ्या असलेल्या माणसांचीदेखील काहीशी हालचाल होते. त्याचा एक धक्का, त्या धक्क्याची नकळत एक लहर तयार होते. आणि ती धक्क्याची लहर काही क्षणातच अगदी फूटबोर्ड पर्यंत पोचते. आणि बाहेरून अचानक आवाज येतो, "अबे धक्का मत देना, मरवाओगे क्या ! "

    हा धक्का जाणून बुजुन दिलेला असत नाही, पण एकाचा दुसऱ्याला, दुसऱ्याचा तिसऱ्याला अश्या रितीने जसा आतून बाहेर संक्रमित केला जातो, तसाच वाताचा, या गॅसचा दाब पुढे पुढे पसरवला जातो. पक्वाशयात तयार झालेला हा वात, आपल्या सूक्ष्म, चल गुणामुळे, वाटेत मिळणाऱ्या सर्व अवयवांना धक्के देत, प्रसंगी स्वतः वाट काढत, मधले अडथळे पार करत पुढे पुढे जात रहातो.

    या वातामधे प्रचंड शक्ती असते. या शक्तीचा युक्तीने वापर करून, त्या जेम्स वॅटने रेल्वेचे इंजिन चालवले होते. बुद्धीचा वापर करून, कल्पकतेने, हा शोध लावणे म्हणजेच ज्ञानयोग. आणि जेम्स वॅट म्हणजे ज्ञानयोगी, शास्त्रज्ञ! भगवंतांनी समाजाची गुणकर्मशः विभागणी केलेली, अशी जी वर्णव्यवस्था वर्णन केली आहे, त्यातील हा ब्राह्मण वर्ण ! ( जात नव्हे. ) असो. या ब्राह्मण्याला मनापासून नमस्कार करणे हा भक्ती योग. या व्यवस्थेचे रक्षण करणे हा क्षात्रधर्म आणि या शास्त्रज्ञांना, त्यांच्या कार्यासाठी 'फंडींग' करणे ही वैश्यसाधना ! आणि प्रत्यक्षात मदत करणे हा सेवाभाव. कर्मयोग. असो.

    गॅसच्या या शक्तीचा, चालणे, फिरणे, कामे करणे, हालचाली करणे, वजन उचलणे इ. दैनंदिन क्रियात्मक कार्ये करायला, योग्य सकारात्मक, नियंत्रित वापर करून घेता आला तर शरीराला मदत होते. नाहीतर हा वात कुठेही जाऊन अडकला तर जिथे जाईल तिथे वेदना निर्माण करतो. क्वचित प्रसंगी ह्रदयात अडकला तर मृत्युदेखील !

    हाच वात पाठीच्या स्नायुंमधे अडकला तर त्याला आपण लचकणे, आखडणे म्हणतो, हाच वात जर मानेत अडकला तर त्याला मान तिरपणे, मुरगळणे म्हणतो. पायात आला तर गोळा येणे, कॅच येणे म्हणतो, आणि पोटातच फिरत राहिला तर पोट फुगणे, पोटात आवाज करीत रहाणे ही लक्षणे निर्माण करतो. याला आध्मान आटोप असे म्हणतात.

    वेदना हे याचे प्रमुख लक्षण. मूळ निर्मिती पक्वाशयात आणि कार्यक्षेत्र संपूर्ण शरीरभर ! आधीच चंचल गुणाचा, आणि डोळ्यांनी न दिसणारा, केवळ अनुमानाने जाणून घ्यायचा. याला जर योग्य पथ्याने वेळीच संयमात नाही ठेवला तर असा सुटतो की, काही विचारूच नका. आधीच मर्कट त्यात मद्य प्याला. अशी अवस्था होते. आणि मग या वाताला काबूत आणायला वैद्यांचे अगदी नाकीनऊ येतात.

    या विकृत झालेल्या वाताचे म्हणजेच गॅसचे हे रौद्र रूप वेळीच लक्षात आले तर ठीक आहे, नाहीतर कुठे जाऊन कधी आणि कसे तांडव सुरू होईल, याचा काही नेम नाही.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021

    04.04.2017

  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग वीस

    गॅसनामा

    गॅसचे कार्यक्षेत्र म्हणजे फक्त पोटापुरतेच मर्यादित असेल, असं समजणे म्हणजे शुद्ध गैरसमज, अज्ञान आहे. ते कार्य अगदी तळपायापासून सुरू होऊन व्हाया ह्रदय अगदी मेंदूपर्यंत पसरलेले आहे.

    फूटबोर्ड पर्यंत खचाखच भरलेली लोकल. आतमधील काहीजण येणाऱ्या स्टेशनवर उतरण्याच्या आवेशात सामान काढताहेत. उठून उभी रहाताहेत. त्यामुळे तिथल्या उभ्या असलेल्या माणसांचीदेखील काहीशी हालचाल होते. त्याचा एक धक्का, त्या धक्क्याची नकळत एक लहर तयार होते. आणि ती धक्क्याची लहर काही क्षणातच अगदी फूटबोर्ड पर्यंत पोचते. आणि बाहेरून अचानक आवाज येतो, "अबे धक्का मत देना, मरवाओगे क्या ! "

    हा धक्का जाणून बुजुन दिलेला असत नाही, पण एकाचा दुसऱ्याला, दुसऱ्याचा तिसऱ्याला अश्या रितीने जसा आतून बाहेर संक्रमित केला जातो, तसाच वाताचा, या गॅसचा दाब पुढे पुढे पसरवला जातो. पक्वाशयात तयार झालेला हा वात, आपल्या सूक्ष्म, चल गुणामुळे, वाटेत मिळणाऱ्या सर्व अवयवांना धक्के देत, प्रसंगी स्वतः वाट काढत, मधले अडथळे पार करत पुढे पुढे जात रहातो.

    या वातामधे प्रचंड शक्ती असते. या शक्तीचा युक्तीने वापर करून, त्या जेम्स वॅटने रेल्वेचे इंजिन चालवले होते. बुद्धीचा वापर करून, कल्पकतेने, हा शोध लावणे म्हणजेच ज्ञानयोग. आणि जेम्स वॅट म्हणजे ज्ञानयोगी, शास्त्रज्ञ! भगवंतांनी समाजाची गुणकर्मशः विभागणी केलेली, अशी जी वर्णव्यवस्था वर्णन केली आहे, त्यातील हा ब्राह्मण वर्ण ! ( जात नव्हे. ) असो. या ब्राह्मण्याला मनापासून नमस्कार करणे हा भक्ती योग. या व्यवस्थेचे रक्षण करणे हा क्षात्रधर्म आणि या शास्त्रज्ञांना, त्यांच्या कार्यासाठी 'फंडींग' करणे ही वैश्यसाधना ! आणि प्रत्यक्षात मदत करणे हा सेवाभाव. कर्मयोग. असो.

    गॅसच्या या शक्तीचा, चालणे, फिरणे, कामे करणे, हालचाली करणे, वजन उचलणे इ. दैनंदिन क्रियात्मक कार्ये करायला, योग्य सकारात्मक, नियंत्रित वापर करून घेता आला तर शरीराला मदत होते. नाहीतर हा वात कुठेही जाऊन अडकला तर जिथे जाईल तिथे वेदना निर्माण करतो. क्वचित प्रसंगी ह्रदयात अडकला तर मृत्युदेखील !

    हाच वात पाठीच्या स्नायुंमधे अडकला तर त्याला आपण लचकणे, आखडणे म्हणतो, हाच वात जर मानेत अडकला तर त्याला मान तिरपणे, मुरगळणे म्हणतो. पायात आला तर गोळा येणे, कॅच येणे म्हणतो, आणि पोटातच फिरत राहिला तर पोट फुगणे, पोटात आवाज करीत रहाणे ही लक्षणे निर्माण करतो. याला आध्मान आटोप असे म्हणतात.

    वेदना हे याचे प्रमुख लक्षण. मूळ निर्मिती पक्वाशयात आणि कार्यक्षेत्र संपूर्ण शरीरभर ! आधीच चंचल गुणाचा, आणि डोळ्यांनी न दिसणारा, केवळ अनुमानाने जाणून घ्यायचा. याला जर योग्य पथ्याने वेळीच संयमात नाही ठेवला तर असा सुटतो की, काही विचारूच नका. आधीच मर्कट त्यात मद्य प्याला. अशी अवस्था होते. आणि मग या वाताला काबूत आणायला वैद्यांचे अगदी नाकीनऊ येतात.

    या विकृत झालेल्या वाताचे म्हणजेच गॅसचे हे रौद्र रूप वेळीच लक्षात आले तर ठीक आहे, नाहीतर कुठे जाऊन कधी आणि कसे तांडव सुरू होईल, याचा काही नेम नाही.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    04.04.2017

  • इरोम शर्मिला आणि मणिपुरच्या खर्‍या समस्या

    इरोम शर्मिला आणि मणिपुरच्या खर्‍या समस्या

    मणिपूरच्या ‘आयर्न लेडी’ इरोम शर्मिला निवडणूक रिंगणात अपयशी ठरल्या. मिडीयामधे इरोम शर्मिला ह्यांच्या पराभवाची चर्चा अजुन चालुच आहे

  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग एकोणीस

    कुणाच्या अंगावर कुणाचे ओझे

    पोटामधील अवयव अत्यंत दाटीवाटीनी रहात असतात. जरा सुद्धा हलायला जागा नसते. एकाचा आधार दुसऱ्याला अश्या अवस्थेत, गाडी हलेल तशी हलत डुलत असतात.

    लोकलमधे तीन सीटच्या बाकड्यावर बसलो असताना, चौथा येऊन म्हणतो, "थोडा आगे..." तेव्हा आपल्याला काय वाटते. बरं बसला तो बसला, परत पेंगायला लागतो, पेंगतो तो पेंगतो, आणि वर घोरायला लागतो, त्याच्या घरच्या जागरणाला आमचाच खांदा मिळतो. सहिष्णुता सहिष्णुता किती दाखवायची, त्याला पण काही हद्द असतेच ना !
    खिडकीपर्यंत समोर पाय हलवायला जागा नाही एवढी चार माणसे उभी, बाजुला लेकुरवाळी बसलेली, मधल्या पॅसेजमधून दोन स्टेशन आधीपासूनच उतरणारी माणसे बॅगा पोटाला आवळून अगदी सज्ज असतातच. त्यात आपुल्याऽऽ खांद्यावर, कुणाचे हे ओझे कुऽणाऽचे ओऽऽझे.

    एखादे वेळी त्यांच्या मांडीला गुदगुल्या करून, त्झुऽत्ऽझुत करून, त्याला उत्तिष्ठ जाग्रत करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला जातो. नंतर मात्र आपलेच स्थान सोडून, त्याचा भक्कम पाठींबा काढून घेण्याशिवाय पर्यायच नसतो.

    अगदी तस्सं होत असेल या अवयवांचं !

    त्यात वरून येणारा गॅसचा आणि अतिरिक्त चरबीचा दाब सहन करत करत आपले काम करीत रहायचे ? जरा कल्पना करून बघा. त्या यकृताच्या किडनीच्या स्वादुपिंडाच्या जागी स्वतःला बसवून बघून. हे अवयव थोडे दिवस, थोडे महिने बघून घेतात, काम करत रहातात आणि एक दिवस अचानक संपावर जातात. आतून घोषणा देत रहातात,
    "आमच्या मागण्या मान्य करा, आमच्यावरील अतिरिक्त दाब काढून घ्या, आमच्या अंगावरचे ओझे दूर करा."

    सुरवाती सुरवातीला सहन करतात, नंतर मात्र
    आपले लक्ष वेधून घेण्यासाठी वेदना निर्माण करणे हे प्रमुख शस्त्र बाहेर काढतात. आता मात्र आपल्याला लक्ष देणे भागच पडते. काही अवयवांचे तोंड तर एवढे आवळून घेतले जाते, की ओय् म्हणायला, आणि वेदना सांगायला सुद्धा चान्स नाही. त्या मुठीहून लहान आकाराचे स्वादुपिंड बिच्चारे चिरडून जाते. त्यातील इन्शुलीन बाहेर पडायला जागा तर हवी. वेदना पण सांगता येत नाहीत.

    यकृताची तीच अवस्था, किडनी म्हणते, त्या मूत्राशयापासून भरत येऊन, ते दोन्ही युरेटर भरलेत, आता माझ्यापर्यंत परत बॅक वाॅटर येऊन भिडलंय, इतका वेग धारण होतंय, मी करू तरी काय ? फुगलेल्या किडनीचा दाब कुशी बरगड्यांवर, पोटातल्या आमाचा दाब अग्न्याशयावर, मलाशयाचा दाब गर्भाशयावर, बीजांडावर, किती सहन करायचं ना ?

    या अवयवांचा एकमेकांना असलेला आधार हा आता त्रास वाटू लागतो. आणि पाठिंबा काढून घेण्याशिवाय पर्यायच रहात नाही. बंड करायचे तरी मुश्किल, बोललोच तर शिस्तभंगाची कारवाई, सुरवातीला प्रदेशाध्यक्षावर टीका करून पहायची, मुलुख मैदान तोफेने तोंड दाबून बुक्यांचा मार किती दिवस सहन करायचा ?

    यालाच एक दिवस भुकंपाचे नाव मिळते. पण हा भुकंप कधीही अचानक होत नाही, छोटे मोठे धक्के देऊनही, वारंवार सांगूनही जर योग्य प्रकारे लक्ष दिले गेले नाही, तर करायचे तरी काय ??

    .... या अवयवांनी म्हणतोय मी. !

    -- वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021

    03.04.2017

  • प्रश्न पडायलाच हवेत

    हिच आपली शोकांतिका आहे. शिक्षणव्यवस्थेत प्रश्न विचारण्याची सोयच ठेवलेली नाही.

  • कडाक्याच्या उन्हात हे जरूर सांभाळा…

    एका वाचकांनी सुचविल्यामुळे हे लिहितेय.कडाक्याच्या उन्हात हे जरूर सांभाळा.

    स्वतःच्या काळजी बद्दल तर बोलूच परंतु हे नक्की करा.
    सुदैवाने आज या क्षणाला घरात गारव्यात सावलीत बसून उन्हाचे बाहेर पडू नये असे डोस देणे विरोधाभास वाटतोय कारण, मला तुम्हाला कदाचित शक्य होईल बाहेर उन्हात जाणे टाळणे. परंतु जे लोक उन्हातच काम करतात उदा.बिल्डिंग मधील वॉचमन, साफसफाई कामगार, रस्त्यावरील दुरुस्ती कामगार,रस्त्याच्या कडेला बसलेला चांभार, भर उन्हात नारळ पाणी घेऊन फिरणारा,या घरातून दूर दुसऱ्या घरात कामाला जाणारी घरकाम मावशी,कुरिअर बॉय,इत्यादी त्यांचे काय?
    आपले काही सुती कपडे, scarf ,गॉगल, छत्री सढळ हाताने त्यांना द्यायला लाजू नका. सरबत,पाणी पुणेरी पणाने विचारू नका.न विचारता आग्रहानं त्यांना अवश्य द्या.
    ज्या लोंकाच्या हाताखाली हे कामगार काम करतात त्यांच्या कामाच्या वेळांची थोडी फेरफार त्यांच्या मालकांनी करणे गरजेचे आहे.
    पक्ष्यांसाठी भरपूर पाणी ठेवा.
    आता वैयत्तिक काळजी बघू.

    १.उन्हाशी खूप काळ संपर्क टाळा. टाळणे अशक्य असेल तर, डोकं,डोळे, याना उन्हापासून वाचवा.सफेद सुती,सैल वस्त्रे घाला.
    २.बंद AC , कूलर , खोलीतून अचानक उन्हात बाहेर जाऊ नका. विशेषतः कार मध्ये खूप वेळ थंडगार वातावरणातून एकदम बाहेर पडल्यास शरीर अचानक झालेल्या तापमानातील बदलाला सहन करू शकत नाही. चक्कर येणे, डोके दुखणे, मळमळ, खूप क्वचित चक्कर येऊन पडणे, मूत्रप्रवूत्तीस त्रास होणे, इतपत त्रास होऊ शकतो.
    ३.हातापायावर,डोळ्यावर गार पाण्याचे हबके मधून मधून मारावे.
    ४. अर्थातच पाणी आणि पातळ पदार्थ अथवा पेये प्यावीत. कोल्ड्रिंक म्हणजे पेप्सी,कोक इत्यादी अजिबात पिऊ नये कारण त्याने शरीराची जलीय अंशाची गरज अजिबात भागत नाही उलट अपायच होतात.
    ५. ताक,जलजिरा, कॊकम सरबत, कैरीचे पन्हे,नारळाचे पाणी, नीरा,ताजे संत्रा मोसंबी रस प्यावा.
    ६. मसालेदार ,तिखट, गरम, तेलकट पदार्थ ,शिळे, रस्त्यावरील उघडे, पदार्थ खाणे टाळावे.
    ६. भरपूर फळे खावी.
    ७.शारीरिक अति व्यायाम अथवा काम ह्या उन्हात धोकादायक होऊ शकते. मध्ये मध्ये सावलीत आराम आणि शरीरातील जलीय अंशाची हानी भरून काढणारी वर सांगितलेली पेये प्यावीत.
    ८. भूक अर्थातच कमी होते त्यामुळे पचायला हलके आणि साधे जेवण असावे,
    ९. उष्णतेचा त्रास होतोय असे वाटल्यावर साळीच्या लाह्यांचे पाणी ,वाळा भिजवून पाणी, नारळ पाणी, उंबर जल,मनुकांचे सरबत, असे घ्यावे आणि अर्थातच आधी वैद्यकीय सल्ला घ्यावा.
    १०. खूपच लहान बाळ आणि खूप वयस्कर व्यक्ती यांचे मूत्र प्रवृत्तीचे प्रमाणावर लक्ष ठेवावे.लघवीला कमी होतेय असे वाटले तर शरीरात पाणी कमी असल्याचे ते पहिले लक्षण होय. तेंव्हा दुर्लक्ष करू नये.
    ११. शरीराची स्वछता हि आवश्यक आहे. अथवा घामोळ्या आणि इतर त्वचेच्या तक्रारी होतात.
    १२. शरीरातील पित्त रक्त असंतुलनाने होणाऱ्या डोळे येणे, डोळ्याला होणाऱ्या पुळ्या, नागीण या व्याधींवर घरगुती उपचार न करता वैद्यकीय सल्ला घ्यावा.
    १३. उन्हाच्या काहिलीने हैराण होऊन खाल्ले गेलेले बर्फ गोळा, icecream ,सोडा हे घशाची निश्चित वाट लावतात तेंव्हा भर उन्हात खाणे टाळा.तसेच ते तापमानाच्या दृष्टीने विरुद्ध अन्न होय.तेंव्हा निश्चित टाळा.

    आपल्याच प्रतापांनी आपल्यावर चिडलेली धरती माय आणि तिचा लाडका सूर्य लवकरच शांत होवो !

    वैद्य रुपाली पानसे,९६२३४४८७९८
    drrupalipanse.wordpress.com
    (कृपया पोस्ट लेखिकेच्या नावासकट पोस्ट अथवा शेअर करावी.तुमच्या या कृतीने लेखनासाठी काढलेला वेळ आणि वापरलेली बुद्धी सत्कारणी लागल्याचे समाधान मिळेल.धन्यवाद )

  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग अठरा

    अवयवांना आपले काम करायला एक विशिष्ट स्पेस हवी असते. जी स्पेस या गॅसच्या दबावामुळे मिळत नाही, आणि चांगले निरोगी असलेले अवयव देखील काऽही काम करू शकत नाही.

  • स्वागत…. नववर्षाचं

    अख्ख्या जगात हजारो कालगणन पध्दती आहेत, त्यांच्या दिनदर्शिका आहेत, त्यांचे अनुयायी वर्षानुवर्षे नववर्ष दिवस नियमितपणे साजरे करीत आहेत आणि अेकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देअून, नवीन किंवा ठेवणीतले पोशाख घालून मेजवान्या झोडीत आहेत.

  • १ एप्रिल – ‘एप्रिल फूल’

    एप्रिल महिन्याचा पहिला दिवस. ह्या दिवशी गमतीने एखाद्यास बनविण्याची प्रथा पाश्चिमात्य राष्ट्रांत प्रामुख्याने दिसून येते. बनलेल्या व्यक्तीस ‘एप्रिल फूल’ म्हणण्याचा प्रघात आहे.