वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
गणपतीला दूर्वा अत्यंत प्रिय आहेत. गणपतीची पूजा दूर्वाच्या शिवाय होऊ शकत नाही असे मानले जाते. गणपतीचे स्थान मूलाधार मानले जाते. मूलाधार चक्राशी निगडित अवयव म्हणजे पुरुषांचे प्रोस्टेट व व्रुषण ग्रंथी आणि स्रियांचे गर्भाशय व ओव्हरीज हे होत. जे देवाला प्रिय ते माणसाला उपयुक्त . गणपती प्रिय दूर्वा सेवन केल्याने स्रियांच्या ओव्हरीज वगर्भाशयातील व पुरुषांच्या प्रोस्टेटमधील हीट कमी होते. असा अनुभव आहे. त्यामुळे होणारे त्रास म्हणजे वय वाढल्यावर झोप न लागणे,पायाना सूज येणे, काही प्रमाणात पाय दुखणे, टाचा दुखणे वगैरे त्रास कमी होतात.
पाच दूर्वा रोज खाल्यातर फायदा होतो. हे शहरातील जीवन पध्दतीत शक्य होत नाही. त्यासाठी एकदा एक दूर्वांची जुडी आणून थोडेसेच पाणी घालून मिक्सरमधे चटणी करावी. फडक्यातून पिळून रस काढावा. हा रस नासू नये म्हणून त्यात दीड पट मध घालून ढवळून बाटली मधे भरून ठेवावे. दररोज ह्यतील पाव चमचा मध वाटी भर पाण्यात चांगला विरघळवून ते पाणी प्यावे. असे दिवस भरात दोन वेळा करावे. ह्या मुळे वरील त्रास कमी होतात. मी दूर्वाच्या टिंक्चरपासून साखर करून पेशंटना देऊन टाचा दुखणे, पायावरील सूज, वयस्कमंडळींची चिड चीड, झोप न लागणे हे आजार बरे केले आहेत.
अरविंद जोशी BSc.
9421948894
कृपया लेख फाँरवर्ड करताना त्यात कोणताही बदल करू नये.
गणपतीला दूर्वा अत्यंत प्रिय आहेत. गणपतीची पूजा दूर्वाच्या शिवाय होऊ शकत नाही असे मानले जाते.
गणपतीचे स्थान मूलाधार मानले जाते. मूलाधार चक्राशी निगडित अवयव म्हणजे पुरुषांचे प्रोस्टेट व व्रुषण ग्रंथी आणि स्रियांचे गर्भाशय व ओव्हरीज हे होत. जे देवाला प्रिय ते माणसाला उपयुक्त . गणपती प्रिय दूर्वा सेवन केल्याने स्रियांच्या ओव्हरीज वगर्भाशयातील व पुरुषांच्या प्रोस्टेटमधील हीट कमी होते. असा अनुभव आहे. त्यामुळे होणारे त्रास म्हणजे वय वाढल्यावर झोप न लागणे,पायाना सूज येणे, काही प्रमाणात पाय दुखणे, टाचा दुखणे वगैरे त्रास कमी होतात.
पाच दूर्वा रोज खाल्यातर फायदा होतो. हे शहरातील जीवन पध्दतीत शक्य होत नाही. त्यासाठी एकदा एक दूर्वांची जुडी आणून थोडेसेच पाणी घालून मिक्सरमधे चटणी करावी. फडक्यातून पिळून रस काढावा. हा रस नासू नये म्हणून त्यात दीड पट मध घालून ढवळून बाटली मधे भरून ठेवावे. दररोज ह्यतील पाव चमचा मध वाटी भर पाण्यात चांगला विरघळवून ते पाणी प्यावे. असे दिवस भरात दोन वेळा करावे. ह्या मुळे वरील त्रास कमी होतात. मी दूर्वाच्या टिंक्चरपासून साखर करून पेशंटना देऊन टाचा दुखणे, पायावरील सूज, वयस्कमंडळींची चिड चीड, झोप न लागणे हे आजार बरे केले आहेत.
अरविंद जोशी BSc.
9421948894
कृपया लेख फाँरवर्ड करताना त्यात कोणताही बदल करू नये.
श्रावण म्हणजे चैतन्य...आनंद...उत्साह. तो आता उंबरठ्याशी आला आहे. सणांचा-व्रतवैकल्यांचा हा महिना
पूजेच्या निमित्ताने या विविध वनस्पतींशी जो संपर्क येतो तो आरोग्यदायक असतो. निसर्गाशी संबंध जोडलेला राहावा, आसपासच्या वृक्षसंपदेची माहिती असावी, घराच्या आसपास कोणकोणती झाडे-वेली असाव्यात हे ज्ञात व्हावे, असे कितीतरी उद्देश पत्री गोळा करण्यामागे असतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पत्रीत अंतर्भूत असलेली प्रत्येक वनस्पती आरोग्य-रक्षणामध्ये अग्रेसर असलेली दिसते. पत्री फक्त शारीरिक आरोग्यासाठीच नव्हे, तर मानसिक, आध्यात्मिक विकासासाठी उपयुक्त असते.
श्रावण म्हणजे ऊन-पावसाचा खेळ, तसेच पूजा-व्रत-वैकल्यांचा कालावधी. हरितालिका, नागपंचमी, मंगळागौरी अशा अनेक पूजा श्रावणात येतात. भाद्रपदातील गणेशोत्सवाचे वेधही श्रावणात लागल्यावाचून राहात नाहीत. या सर्व पूजांसाठी "पत्री' म्हणजे निरनिराळ्या वनस्पतींची पाने, फुले वापरली जातात. पूजेच्या निमित्ताने या विविध वनस्पतींशी जो संपर्क येतो तो आरोग्यदायक असतो. निसर्गाशी संबंध जोडलेला राहावा, आसपासच्या वृक्षसंपदेची माहिती असावी, घराच्या आसपास कोणकोणती झाडे-वेली असाव्यात हे ज्ञात व्हावे, असे कितीतरी उद्देश पत्री गोळा करण्यामागे असतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पत्रीत अंतर्भूत असलेली प्रत्येक वनस्पती आरोग्य-रक्षणामध्ये अग्रेसर असलेली दिसते. आज आपण श्रावणात वापरल्या जाणाऱ्या पत्रींची माहिती करून घेऊ या.
श्रावणातील पत्री
अशोकाची पाने
शोभेचा उंच वाढत जाणारा अशोक हा खरा अशोक नव्हे. सीतेचा अशोक हा खरा अशोक. पत्री म्हणून तसेच औषधात सीतेचा अशोक वापरला जातो. अशोक स्त्रीत्वाचे रक्षण करणारा, स्त्रीसंतुलन करणारा असतो. गर्भाशय, बीजाशयासंबंधित अनेक विकारांवर आयुर्वेदात सीतेच्या अशोकाचा उपयोग केला जातो.
आवळ्याची पाने ही वाहण्याने आरोग्यरक्षण होते, असे सांगितले आहे. आवळ्याला "धात्री' असे पर्यायी नाव आहे. एखादी दाई जशी बाळाची काळजी घेते, तसा आवळा आरोग्याचे रक्षण करण्यासाठी तत्पर असतो. आवळ्याची फळे रसायन गुणांनी परिपूर्ण असतातच, पानेसुद्धा अतिप्रमाणात होत असलेली लघवी कमी करणारी असतात.
दूर्वा पत्री म्हणून दूर्वा अर्पण करणे हे परमात्मप्राप्तीचे साधन असते, असे आपल्या शास्त्रांमध्ये सांगितले आहे. दूर्वा म्हणजे जमिनीवर पसरणारे एक प्रकारचे गवत असते. आयुर्वेदातही दूर्वा हे एक महत्त्वाचे औषध आहे. गर्भधारणा व्हावी व गर्भधारणेनंतर गर्भरक्षण व्हावे म्हणून स्त्रीच्या व गर्भवतीच्या आसपास ज्या वनस्पती असाव्यात त्यात दूर्वांचा उल्लेख आहे. दूर्वा थंड असतात, रक्तदोष दूर करतात, भूतबाधा म्हणजे अदृश्य जीवजंतूंना दूर ठेवतात. उष्णतेमुळे नाकातून रक्त येते, त्यासाठी दूर्वांचा रस नाकात घालण्याचा उपयोग होतो. दूर्वा स्वच्छ धुवून त्यांचा रस खडीसाखरेसह घेतल्यास पित्त कमी होते, रक्त शुद्ध होते, अनेक त्वचाविकार, नागीण वगैरे त्रास दूर होऊ शकतात. संगणकासमोर बसण्याने डोळ्यांची आग होत असल्यास दूर्वांचा रस घेण्याचा उपयोग होतो. दूर्वांच्या हिरवळीवर अनवाणी पायाने चालण्यानेही डोळ्यांची ताकद वाढते, डोळ्यांवरचा ताण कमी होतो.
कण्हेर कण्हेरीची पाने वाहण्याने तापत्रयांचा नाश होतो. तापत्रय म्हणजे शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक ताप तसेच वातज, पित्तज, कफज हे ताप. पांढऱ्या कण्हेरीचे मूळ कानावर बांधले असता सर्व प्रकारचे ताप बरे होतात, असा आयुर्वेदात उल्लेख सापडतो. पांढरी, गुलाबी, लाल असे कण्हेरीचे फुलांच्या रंगांवरून निरनिराळे प्रकार असतात. यातील पांढरी कण्हेर औषधात वापरली जाते. विंचू, सर्पदंशावर पांढऱ्या कण्हेरीचे मूळ उगाळून लेप केला जातो.
कदंब कृष्णाला प्रिय असणाऱ्या कदंब वृक्षाची पाने वाहण्याने डोक्याचे व मेरुदंडाचे रक्षण होते. आयुर्वेदात कदंब विषनाशक, शुक्रवर्धक (धातू वाढविणारा), वर्ण सुधारणारा सांगितला आहे. तोंड आले असता कदंबाच्या सालीच्या काढ्याच्या गुळण्या करण्याचा उपयोग होतो.
ब्राह्मी ब्राह्मी अर्पण करणे मेंदूसाठी हितावह असते, असे शास्त्र सांगते. आयुर्वेदातही मेंदूच्या आरोग्यासाठी, मेंदूतील दोष दूर होण्यासाठी ब्राह्मीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. शांत झोप लागण्यासाठी, मनावरचा ताण कमी करण्यासाठीसुद्धा ब्राह्मी उत्तम असते.
धोत्रा धोत्रा वाहण्याने श्वसनक्रिया उत्तम राहते. आयुर्वेदातही धोत्र्याच्या पानांचा लेप संधिवातावर उपयोगी असतो. धोत्र्याच्या पानांची धुरी घेतल्यास छातीतील कफ कमी होतो, दम्याची घुसमट कमी होते.
धोत्र्याची फुले
धोत्रा अर्पण करणे धनदायी असते. धोत्र्याचे पंचांग (मूल, फळ, साल, मूळ व पाने) एकत्र करून धुरी घेण्याने खोकला बरा होतो. धोत्र्याच्या फुलांना मादक गंध असतो.
आघाडा हा अर्पण करणे विषनाशक असते. आघाडा फक्त पावसाळ्यात उगवतो. पावसाळ्यात छातीत कफ होण्याची, दम्याचा त्रास होण्याची प्रवृत्ती असते, यावर आघाड्याचा क्षार उत्तम असतो. आघाड्याच्या क्षारामुळे मूत्रप्रवर्तन व्यवस्थित होण्यास उपयोग होतो. अपामार्ग क्षाराने सिद्ध केलेले तेल कानात टाकल्यास कान दुखणे कमी होते. काटा टोचला व मोडून आतच राहिला तर त्यावर आघाड्याची पाने बारीक करून बांधण्याची पद्धत आहे, त्यामुळे वेदना थांबतात व काटा वर निघून येतो.
बेल बेल वाहण्याने त्रिदोषांचा नाश होतो, पापांचा नाश होतो. बेलाचे फळ, मूळ, पाने औषधी असतात. अर्धवट पिकलेले बेलफळ मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते, तर पूर्ण पिकलेल्या फळाने शौचाला साफ होते. बेलाचा मुरंबा आव होणे, फार वेळा शौचाला होणे वगैरे त्रासांवर उपयोगी असतो. बेलफळ यकृताची कार्यक्षमता सुधारण्यासाठीही वापरले जाते. बेलाच्या पानांचा रस जंत नष्ट करण्यासाठी वापरला जातो. बेलाची पाने अंगाला लावली असता शरीराचा दुर्गंध दूर होतो. बेलाच्या पानांचा रस खडीसाखर घालून घेण्याने शक्ती वाढते, अतिरिक्त उष्णता कमी होते.
गंध फुलांचा...
चाफ्याची फुले चाफा वाहण्याने चतुर्वर्ग साध्य होतात, म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चारही पुरुषार्थांची सिद्धी होते. चाफ्याच्या फुलांचा काढा घेण्याने सर्दी बरी होते, उत्तम भूक लागते, असे आयुर्वेदात सांगितले आहे. थंडी वाजून येणाऱ्या तापावर चाफ्याच्या कळ्या विड्याच्या पानातून घेण्याचा उपयोग होतो.
केवडा
केवड्याचे फूल अर्पण करण्याने बुद्धी वाढते, असे सांगितले आहे. अपस्मारावर केवड्याची फुले व केवड्याच्या कणसावरील बारीक कण एकत्र करून तयार केलेल्या मिश्रणाचे नस्य घ्यायला सांगितले आहे. केवड्याच्या पारंब्या बलकर, देहाला दृढ करणाऱ्या व रसायनगुणांनी युक्त असतात.
कण्हेर फुले
कण्हेरीची फुले वाहण्याने स्त्रीत्वाचे रक्षण होते. कण्हेरीचे मूळ विषारी असते. दंशावर पांढऱ्या कण्हेरीचे मूळ उगाळून लावले असता विष उतरते. पांढऱ्या कण्हेरीची फुले वाळवून त्यांचे नस्य करण्यानेही सापाचे विष उतरते. नागीण उठते त्यावर लाल कण्हेरीची फुले व तांदूळ पाण्यात रात्रभर भिजत घालून दुसऱ्या दिवशी वाटून लेप करता येतो.
बकुळ फुले
सुगंधी, छोटी-छोटी बकुळ फुले वाहण्याने स्त्रीच्या तारुण्याचे, स्त्रीत्वाचे रक्षण होते. आयुर्वेदातही बकुळीची ताजी फुले, बदाम व खडीसाखर यांचे मिश्रण तीन दिवस घेण्याने पाळीच्या वेळचा अतिरक्तस्राव किंवा अंगावरून पांढरे पाणी जाणे वगैरे त्रास दूर होतात असे सांगितले आहे. बकुळीच्या फुलांचा वास घेण्याने हृदयाची ताकद वाढते.
कमळ
कमळ वाहण्याने शत्रूचा नाश होतो. कमळाचे फूल सुगंधी, वर्णकर, शीतल व रक्तदोष बरा करणारे असते. पांढऱ्या कमळाच्या पाकळ्या, ज्येष्ठमध व खडीसाखर यांचा थंड काढा पिण्याने पित्तामुळे आलेला ताप बरा होतो.
गुलाब
सुगंधी गुलाब वाहण्याने शांती प्रस्थापित होते. गुलाब सौम्य, थंड व रक्तशुद्धी करणारा असतो. गुलाबाच्या वाळलेल्या कळ्या साखरेसह खाऊन वर पाणी पिण्याने पोट साफ होते. गुलकंद हे प्रसिद्ध औषध गुलाबाच्या फुलांपासून बनवितात व ते पित्तशमनासाठी तसेच मलशुद्धीसाठी उत्तम असते.
जास्वंद
जास्वंदाची फुले वाहण्याने लोकसंग्रह वाढतो. जास्वंदीची फुले केसांसाठी उत्तम असतात. जास्वंदीची फुले वाटून किंवा रस काढून केसांना लावली असता केसांची वाढ होते व केस काळे होतात. चाई लागली असता त्या ठिकाणी जास्वंदीच्या फुलांचा रस चोळण्याचा फायदा होतो.
मोगऱ्याची फुले
मोगऱ्याची सुगंधी फुले सर्वांच्या परिचयाची असतात. ही वाहण्याने परमात्मप्राप्ती होते असे शास्त्र सांगते. मोगऱ्याचे फूल गुणाने थंड, सुखप्रद व पित्तशामक असते. मोगऱ्याची पाने गर्भिणीच्या अंगावरून पांढरे पाणी जाते त्यावर उपयोगी असतात.
अशोकाची फुले
स्त्रीत्वरक्षक, गर्भाशयशुद्धीकर आहेत. स्त्रियांचा शोक नाहीसा करण्याचा विशेष गुणधर्म अशोकाच्या फुलांमध्ये असतो. या प्रकारे पत्री फक्त शारीरिक आरोग्यासाठीच नव्हे, तर मानसिक, आध्यात्मिक विकासासाठी उपयुक्त असते. देवदेवतांना वाहण्याच्या निमित्ताने पत्रींची ओळख झाली, संपर्क कायम राहिला तर आवश्यकतेनुसार त्यांचा आरोग्यरक्षणासाठी फायदा करून घेता येईल.
डॉ. देवेंद्र साठे.
निरोगी कोण ?
आपण नक्की निरोगी आहोत का, हे समजण्यासाठी ग्रंथात एक व्याख्या सांगितली आहे. ती व्याख्या अधिक सोपी करून सांगितली तर समजेल.
आपल्या शरीरातील वात पित्त आणि कफ हे तीन दोष. सात धातु जसे, रस म्हणजे रक्ताला पातळपणा निर्माण करणारा द्रव पदार्थ, रक्त, मांस, अस्थि म्हणजे हाडे, मज्जा म्हणजे हाडे कवटी इ. च्या मधला भाग म्हणजे जसे मेंदू, आणि शुक्र म्हणजे शक्ती हे सात धातु, मल, मूत्र, घाम हे तीन मल आणि आर्तव. हे सर्व आपल्या 'देवदत्त' प्रमाणात हवेत. म्हणजे देवाने दिलेले.
यांच्या बरोबरीनेच, मन आत्मा इंद्रिये यांचे प्रसन्नत्व ओळखावे. तो निरोगी होय.
जन्माला येताना जे शरीर संघटन असते, तसेच रहाणे म्हणजे आपली प्रकृती. ही प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असते. त्यात सहसा बदल होत नाही. जन्मतः जे शरीर संघटन असते, ते बदलत नाही. अगदीच मोठ्ठे उलथापालथ करणारे आजार झाले तरच शरीर संघटन बदलते. आणि याचे आपल्या दैनंदिन जीवनावर कोणतेही नकारात्मक परिणाम दिसले तर ती विकृती समजावी.
जिममधे जाऊन फक्त मांस धातुचे संघटन बदलवू शकतो. मना मार्फत, विशिष्ट व्यायामांनी अग्निचे कार्य बदलवू शकतो. प्रकृती बदलवता येत नाही.
प्रकृती आणि अग्नि सोबतच आणखी दोन गोष्टींचा विचार पचनामधे महत्वाचा असतो, कोष्ठ आणि सार. या दोन गोष्टींना सामान्य परिभाषेत समजावणे हे जरा अवघड आहे.
कोष्ठ परीक्षणामधे, एखाद्याचा कोठा कसा असतो, याचे अनुमान केले जाते. व्यवहारात आपण म्हणतो, हलका कोठा, जड कोठा, मध्यम कोठा. स्रोतसांची आतड्यांची गती कशी आहे, त्यावर दाब किती आहे, हालचाली किती आहेत, अन्न पुढे पुढे सरकायला किती वेळ लागतोय, यावर कोठा ठरत असतो. हा सुद्धा सहसा बदलत नाही. ठरलेला असतो. प्रत्येकाचा "नाॅर्मल" वेगळा असतो. हे पण लक्षात ठेवावे. जर काही त्रास नसेल तर आपणच आपले ठरवून, ओढून ताणून बदलवणे घातक असते. काही जणांना दोन नंबरला औषधे घेऊनसुद्धा समाधानकारक होत नाही, हे कोष्ठावर अवलंबून असते.
आणखी दुसरी गोष्ट म्हणजे सार. मूळ प्रकृतीशी जवळ जाणारे, पण आपले स्वतःचे वैशिष्ट्य असणारे, प्रकृतीहून भिन्न असणारे हे परिक्षण असते. सारता ही धातूंवर अवलंबून असते. एखादी रस सार व्यक्ती ही रसरशीत दिसते. तिचे डोळे पाणीदार असतात. तिच्याकडे बघितल्यावरच प्रसन्न वाटते. त्वचा तुकतुकीत चमकणारी असते. अशी सात धातुंच्या सात सार परीक्षा करायच्या असतात. जसा वैद्याचा अनुभव वाढत जातो, तसा एखाद्याचा सार निर्णय त्याला सहज घेता येतो. आणि औषध ठरवावे लागते.
म्हणजे एखाद्याला "तपासल्यानंतर सल्ला अधिक चांगला देता येईल " असे जेव्हा सांगितले जाते, तेव्हा सर्व तपासणी म्हणजे पॅथालाॅजीची तपासणी अपेक्षित नसते तर आयुर्वेदीय पद्धतीने, हे सार परीक्षण, अग्नि परीक्षण, कोष्ठ परीक्षण करणे अपेक्षित असते, जे कोणत्याही पॅथ लॅबमधे शक्य नसते.
पोट दाबून ते हलके आहे का, घट्ट लागते का, तिंबलेल्या कणकेप्रमाणे मऊ आहे की, आठ दिवस फ्रिजमधे मळलेली कणिक ठेवल्यानंतर जशी लागते, तसे पोट घट्ट लागते का, हे तपासून च ठरवता येते ना ?
या सर्वांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध पचनाशी येत असतो, त्यावर औषधे त्यांचे प्रमाण, औषध कशाबरोबर घ्यायचे, मधातून, तुपातून, दुधातून ते अनुपान, सकाळी, दुपारी, सायंकाळी रात्री , जेवतानामधे मधे, जेवणापूर्वी, जेवणात मिसळून, जेवणानंतर कधी घ्यायचे हे ठरवावे लागते.
आयुर्वेद म्हणजे चार दोन मुळ्या एकत्र करायच्या, कशात तरी उकळवून कशाहीबरोबर, केव्हाही घ्यायच्या, एवढं सोप्प नाहीये. घरगुती औषधे सांगायला खूप मर्यादा येतात हे लक्षात ठेवावे. घरगुती उपाय करणे हा फक्त त्यावेळी अचूकपणे उपयोगी होणारा नुस्खा असतो. त्याला अनेक मर्यादा येतात. हे या निमित्ताने लक्षात घ्यावे. घरगुती (यथा मिलीतोपचार द्रव्यैः ) उपाय करणे म्हणजे आयुर्वेद चिकित्सा करणे नव्हे.
पण जे उपलब्ध आहे त्यातच, हाताशी आहेत ती द्रव्ये वापरून, रूग्णाच्या आत्यंतिक वेदना कमी करण्याचे सामर्थ्य फक्त आयुर्वेदातच आहे.
आपण निरोगी आहोत की नाही, हे कसे ठरवावे ?
सकाळी हलकेच जाग यावी.
उठल्यावर लगेच "ती" जागा आठवावी.
पोट, शरीर हलके ही प्रसन्नता अनुभवावी.
समाधानाची अनुभूती घ्यावी.
सणसणीत भूक लागावी.
मनमोकळ्या आहाराने ती भरावी.
दिवसभर गाडी पळवावी.
तरी सायंकाळी रिझर्वावर न यावी.
शक्ती पुरवून वापरावी.
विझत्या अग्नीवर पुरेशी लाकडे घालावी.
पुनः भुकेची जाणीव व्हावी.
हलक्या आहाराने ती पुरी करावी.
झालेली कामे सहज आठवावी.
ही ईश्वराची कृपा समजावी.
आणि मस्त झोप यावी.
निश्चिंत मनाने जबाबदारी सोपवावी.
"तो" मला उठवणार, याची खात्री असावी.
आणि सकाळी हलकेच जाग यावी.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
09.04.2017
मन मनास उमगत नाही
इंद्रियातील सर्वात सूक्ष्म इंद्रिय म्हणजे मन. या मनाचा सहभाग पचनामधे महत्वाचा असतो. कशासाठी हे अन्न मी सेवणार ? असा विचार त्यावर चिंतन मनन केल्याशिवाय जेवू नये. यासाठी घास बत्तीस वेळा चावायचा. तेवढाच वेळ चिंतनाला मिळेल. लाळ चांगली मिसळेल पचन सुलभ होईल आणि महत्त्वाचे म्हणजे लक्ष जेवणातच राहील.
खाताना भीती बाळगू नये, आणि खाल्ल्यावर आठवू नये.
मी हे खाल्ले तर मला चालणार का ? मला अमुक पदार्थ पचेल का ? हे उष्ण आहे की थंड ? अशा शंका कुशंका मनात आणून खाल्ले तर हमखास त्रास होतो. आणि खाऊन झाल्यावर, "उगाच खाल्ले, त्यानेच त्रास झाला असणार ! असं आठवत खाल्लेल्या अन्नाला दूषणे दिली की पचन बिघडणारच !
रोग असेल तेव्हा पथ्य नाहीतर प्रत्येक वेळी प्रत्येक पदार्थ तपासूनच खाल्ला पाहिजे असं नाही. आयुष्य कसं मस्त मजेत जगावं. संसारातल्या सर्व सुखांचा आस्वाद घ्यावा. पण त्यांच्या आहारी जावू नये, एवढी खबरदारी जरूर घ्यावी.
समर्थ म्हणतात,
संसार मुळीचा नासका, विवेके करावा नेटका।
नेटका करीता, फिका होत जातो ।।
त्यातील आसक्ती सोडावी म्हणजे गुंतुन राहू नये, मायेत अडकू नये, हे मला पाहिजेच या नादात वर्तमानातला आनंद हरवू नये. नसलं तरी चालेल, असलं तर आनंदच आहे, ही मनोवृत्ती आपल्याला प्रयत्नांनी, विवेक वापरून तयार करता येते.
विशेषतः जेवताना मन प्रसन्न असलेच पाहिजे. तरच भावना आनंदाच्या तयार होतात, राग, असूया, मत्सर, द्वेष, भांडण, मनात ठेवून जेवलो तर मेंदूतले न्युरो ट्रान्समीटर बदलतात. आपल्याच मनातल्या भावना चांगल्या हव्यात असे नाही तर समोर सुद्धा चेहरा हसरा हवा. टीव्हीवर सुरू असलेली नकोत ती भांडणे, नको त्यांच्या अंत्ययात्रा, नकोत त्या विषयवासना चाळवणाऱ्या जाहीराती, आणि याच्या सगळ्या समोर आपण जेवणार ! कसं पचणार आणि कसं त्यातून चांगलं तयार होणार ?
आज पाश्चात्य जगतातील अशांती भारतात येऊन पोचली आहे. न्यूनगंडाने भरलेली पिढी अनेक दुसऱ्या रोगाना जन्माला घालत आहे.
'मला काय त्याचे, माझे घर तर जळत नाही ना, मग मी कशाला काळजी करू ? एवढे बेभरवंशी राहून चालणार नाही. ती आग स्वतःच्या घरात केव्हा भडकेल ते कळणार देखील नाही.
वेळीच सावध व्हायला हवे. पाश्चात्य जगतात ही अशांती कशी आली, यावर चिंतन व्हायला हवे. मनाचा तोल कसा सांभाळावा, याच्या नीतीनियमांची चौकट, भारतीय संस्कृतीच्या इतिहासात आहे. वेदवाञ्ग्मय, पुराणे, उपनिषदे, रामायण, महाभारत, गीता, नाथांचे भागवत, तुकारामांची गाथा, आणि समर्थ रामदास स्वामींचे मनोबोध या सर्वांचा पुनः एकदा नव्याने अभ्यास व्हायला हवा. मनाचे श्लोक पुनः एकदा पाठांतराला घेतले पाहिजेत.
मनाच्या आजाराची चिकित्सा सूत्रे म्हणजे मनाचे श्लोक आहेत, हे जेव्हा जर्मन लोक आम्हाला सांगतील तेव्हा आम्हाला पटेल. नाहीतर आम्हाला 'रामदास स्वामी हा माणूस म्हणे आमच्या शिवरायांचा गुरू नव्हताच, यासारख्या बिनबुडाच्या भांडणात गुंतुन ठेवले जात आहे. वेळ जात नसलेली बिनडोक माणसे, नको ते वाद उकरून काढून, समाजमनाला कलुषित करून जातीय वादाचे भूत जागे करीत आहेत.
या सर्वांपासून सावध रहाणे, आपल्या मनाला सुरक्षित ठेवणे, काळाची गरज आहे.
" चला, चर्चा करूया मनाच्या आरोग्याची ! " असे, जागतिक आरोग्य संघटनेचे या वर्षीचे घोषवाक्य आहे. या निमित्ताने आपणच आपल्या मनाशी संवाद साधूया. आपल्या मनाशी संवाद साधायला आपले मन आपल्या जवळ तर हवे, कारण ते आजच्या व्यस्त जीवनशैलीत आपल्याजवळ रहातच नाही. त्यामुळे ते आपल्यालाच उमगत नाही.
मन मनास उमगत नाही,
आधार कसा शोधावा ?
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
08.04.2017
डिप्रेशन ही सध्या झपाट्याने वाढणारी जागतिक समस्या झाली आहे. खरंतर आम्हा भारतीयांच्या मनाला नैराश्याने स्पर्शही करायला नको. नैराश्यावर दोन रामबाण उपाय आपल्याकडे आहेत.
उच्च रक्तदाब असलल्या मंडळींसाठी काही सूचना
तुमच्या मुलाला बोलण्याविषयी समस्या आहे का?.....हा घ्या उपाय!!
तोतरेपणा, बोबडं बोलणं, जीभ जड असणे अशा विविध समस्या कित्येक लहान मुलांना भेडसावत असतात. कित्येकांना तर 'स्पीच थेरपी'चा उपयोग करूनही काही फायदा होत नाही. सारे उपाय थकल्यावर अशा मुलांचे पालक 'अखेरची आशा' म्हणून आयुर्वेदाकडे वळतात. आयुर्वेदात 'वाक्शुद्धिकर' म्हणजे वाणी शुद्ध करणारी काही औषधे सांगितली आहेत. त्यांचा वापर केल्यास अशा रुग्णांना उत्तम लाभ होतो हा आजवरचा प्रत्यक्षानुभव आहे.
मात्र या औषधी उपचारासहच मी आग्रही असतो ते मंत्र-उपचारासाठी. दचकू नका; मंत्रोपचार हा शब्द उच्चारताच लगेच काही कोणी बाबा-बुवा ठरत नाही. औषधी आणि मंत्र असे दुहेरी उपचार अनेक व्याधींत लाभदायक ठरतात. अर्थात; केवळ 'मंत्रानेच' व्याधी बरा होतो असे मत मांडणे योग्यही नाही आणि शास्त्रसंमतदेखील नाही. पण; मंत्रांचा उपयोग चिकित्सेला जोड-उपचार म्हणून केल्यास 'अधिकस्य अधिकं फलम्|' ठरते.
वाणीशुद्धि करणारा हा मंत्र म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून आद्य शंकराचार्य रचित 'नर्मदाष्टक स्तोत्र' आहे. वाचकांसाठी हे स्तोत्र मुद्दाम देत आहे. त्यातील शब्दरचना नीट पहा. जिभेची काय बिशाद आहे न वळण्याची?!
सबिन्दुसिन्धुसुस्खलत्तरङ्गभङ्गरञ्जितं
द्विषत्सु पापजातजातकारिवारिसंयुतम् ।
कृतान्तदूतकालभूतभीतिहारिवर्मदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥१॥
त्वदम्बुलीनदीनमीनदिव्यसम्प्रदायकं
कलौ मलौघभारहारि सर्वतीर्थनायकम् ।
सुमच्छकच्छनक्रचक्रचक्रवाकशर्मदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥२॥
महागभीरनीरपूरपापधूतभूतलं
ध्वनत्समस्तपातकारिदारितापदाचलम् ।
जगल्लये महाभये मृकण्डसूनुहर्म्यदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥३॥
गतं तदैव मे भवं त्वदम्बुवीक्षितं यदा
मृकण्डसूनुशौनकासुरारिसेवि सर्वदा ।
पुनर्भवाब्धिजन्मजं भवाब्धिदुःखवर्मदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥४॥
अलक्षलक्षकिन्नरामरासुरादिपूजितं
सुलक्षनीरतीरधीरपक्षिलक्षकूजितम् ।
वसिष्ठसिष्टपिप्पलादिकर्दमादिशर्मदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥५॥
सनत्कुमारनाचिकेतकश्यपादिषट्पदैः_
धृतं स्वकीयमानसेषु नारदादिषट्पदैः ।
रवीन्दुरन्तिदेवदेवराजकर्मशर्मदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥६॥
अलक्षलक्षलक्षपापलक्षसारसायुधं
ततस्तु जीवजन्तुतन्तुभुक्तिमुक्तिदायकम् ।
विरञ्चिविष्णुशङ्करस्वकीयधामवर्मदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥७॥
अहोऽमृतं स्वनं श्रुतं महेशकेशजातटे
किरातसूतवाडवेषु पण्डिते शठे नटे ।
दुरन्तपापतापहारिसर्वजन्तुशर्मदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥८॥
इदं तु नर्मदाष्टकं त्रिकालमेव ये सदा
पठन्ति ते निरन्तरं न यान्ति दुर्गतिं कदा ।
सुलभ्य देहदुर्लभं महेशधामगौरवं
पुनर्भवा नरा न वै विलोकयन्ति रौरवम् ॥९॥
जेव्हा कुठल्याही 'स्पीच थेरपी'चा उगम झाला नव्हता तेव्हा आयुर्वेदीय औषधींसह याच 'स्पीच थेरपी'चा वापर कित्येक वैद्य यशस्वीपणे करत होते. आजही करतात. अर्थात; हे सारे श्रेय श्रीमद् भगवत्पाद आद्य शंकराचार्य यांचेच. आम्ही वैद्यगण केवळ निमित्तकारण. आजच आचार्यांची जयंती. आपल्याला वाचा दोष असो वा नसो; या स्तोत्राचे दैनंदिन पठण अवश्य करा.
© वैद्य परीक्षित स. शेवडे
(आयुर्वेदज्ञ- लेखक- व्याख्याते)
|| श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद || डोंबिवली
०२५१-२८६३८३५
तुमच्या आयुष्यासाठी नोकऱ्या, आहेत, त्यांच्यासाठी तुमचं आयुष्य नाही.
कृपा करून जमेल व झेपेल एवढंच काम हातात घ्या; त्यासाठी आग्रह धरा.
प्रतिष्ठा, पोस्ट, वाढत्या पगाराच्या नादाने किंवा वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याच्या हव्यासाने न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊ नका.
खर्च आटोपशीर ठेवा.
तुमच्या जीवापेक्षा मौल्यवान काहीही नाही, याचं भान ठेवा.
कुटुंबाला वेळ द्या. घरच्या तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम कामावर होतो आणि घरचं आनंदी वातावरण कामासाठी प्रोत्साहन देते.
स्वतःवर स्वतःच मर्यादा घालून घ्या. ही भयानक स्पर्धा कधीही न संपणारी आहे. तुम्ही कुठं थांबायचं हे तुम्ही ठरवा.
कितीही ताण असला, कुठलीही परिस्थिती ओढवली तरी घरी नीट समजावून सांगा.
तुमच्या जीवापेक्षा त्यांनाही अधिक काही नाही, याबद्दल खात्री बाळगा.
ज्यांच्या सगळ्या आशा-अपेक्षा तुमच्यावर आहेत ते आई-वडील, जीवनभराच्या साथीची अपेक्षा करणारी बायको आणि ज्यांना तुमचा हात धरून आपली चिमुकली पावलं टाकायची आहेत ते चिमणे जीव यांना तुमची नितांत गरज आहे याची जाणीव ठेवा.
हे सगळं सगळ्यांनाच माहिती असतं. तरीही आपण धावतो- ऊर फुटेस्तोवर आणि एक दिवस हातात काहीच उरत नाही....
त्यासाठी तुम्ही दीर्घायुषी, निरोगी आणि आनंदी राहणं गरजेचं आहे. तणाव नियोजनासाठी तुमच्या आवडी-निवडी जपा, स्वतःसाठी थोडातरी वेळ काढा.
संगीत, व्यायाम, योगासने, वाचन इ. चा उपयोग करा.
सुट्टीचा आनंद आपल्या प्रियजनांसोबत लुटा...
सर्वेपि सुखिनः सन्तु।
सर्वे सन्तु निरामयः।
सर्वे भद्राणि पश्यन्तु।
मा कश्चिद दुःख माप्नुयात॥
आज ७ एप्रिल,
जागतिक आरोग्य दिन…
आपण आणि आपल्या प्रियजनांना निरोगी व आनंदी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा…!
लंबी सफर का घोडा
शरीराच्या प्रत्येक अवयवाची स्थूल आणि सूक्ष्म हालचाल निरंतर होत असते. जिथे हालचाल आहे तिथे झीज आहे. ही झीज तर होणारच असते, ती अगदी कमीत कमी व्हावी याची काळजी घेणे हे आपले काम !
कोणत्याही गाडीकडे बघा. त्याच्या बेअरींगची झीज होऊ नये याकरीता ग्रीसींग करणे, गंजू नये यासाठी त्याला ऑईलपेंट लावणे, केबल्स लवकर खराब होऊ नये म्हणून ऑईलींग करणे, त्या गाडीला धुणे, त्याच्या इंजिनमधील तेल पाणी बघणे, हे आपण करत असतोच. याला आजच्या भाषेत "मेंटेनन्स" म्हणतात. नियमितपणे, आठवणीने याचा "मेंटेनन्स" करणे महत्त्वाचे, म्हणजे गाडी वारंवार गॅरेजमधे न्यावी लागत नाही.
ज्या गाडीचा मेंटेनन्स नीट नाही, ती गाडी, त्या गाडीचे अवयव लवकर खराब होतात. मग गाडी हळुहळू आवाज करू लागते. वारंवार गॅरेजमधे न्यावी लागते. तो सांगतो, या गाडीतल्या इंजिनमधील ऑईलची लेव्हल कमी झाली आहे, ऑईल बदलले पाहिजे, ब्रेक ऑईल संपले आहे, घालायला पाहिजे. चेनमधील ग्रीस संपले आहे, गियर केबल, क्लच केबल याना तेल सोडले पाहिजे.
आपण टीव्हीवर जाहीराती पहातो, त्यातही ट्रकच्या इंजिन मधील ऑईलच्या जाहीराती मुद्दाम पहा. ज्या इंजिनमधील तेल कमी, किंवा हलक्या दर्जाचे, त्या इंजिनचे 'मायलेज' कमी. मग तो ट्रक लंबी सफर का घोडा बनू शकणार नाही. त्यामुळे आमच्या कंपनीचे अमुक तेल वापरा ते इंजिनमधील कचरा दूर करील वगैरे......
तसेच शरीराचे देखील आहे.
दैनंदिन जीवनात या तेलाचे अनन्य साधारण महत्व असते. शरीरावर जेवढी म्हणून छिद्रे आहेत, त्या सर्व छिद्रामधून दररोज तेल आत सोडावे. जसे नाक, कान, डोळे, मलद्वार मूत्रद्वार, योनीमार्ग, आणि सर्व घर्मछिद्रे यांना तेलाचे पूरण होणे आवश्यक असते. तर आतील सर्व स्थूल अवयव आणि सूक्ष्म इंद्रिये यांचे पोषण होत असते.
शिलाई मशीनला जशी छिद्रे असतात. त्या छिद्राच्या जवळ लिहिलेले असते. "ऑईल." याचा अर्थ या छिद्रातून तेलाचे काही थेंब या मशीनमधे किमान आठवड्यातून एकदा तरी, सोडावेत, म्हणजे ही मशीन न झिजता उत्तम काम करेल.
जेव्हा हे मशीन कामाला येते, तेव्हा त्याला डाॅक्टरांच्या गॅरेजमधे नेले जाते. ते सांगतील की ही झीज नैसर्गिक आहे, वाढत्या वयामुळे हे असेच होणार, हे दुखणे आता गृहीत धरायचे, आता कॅल्शियम सप्लीमेंट घेण्याची वेळ सुरू झाली हा सांधा झिजलाय बदलून टाकू, इ. इ. जे एकदा आपण गृहीत धरले की औषधे आयुष्यभरासाठी सुरू झाली किंवा कापाकापी आली.
पण हेच मशीन जर वैद्यांकडे नेले तर वैद्य सांगतील, यातील तेल संपले आहे, तेल भरले पाहिजे, तेलाची बस्ती देऊया, शिरोधारा देऊया, अभ्यंग करूया, स्नेहन स्वेदन करूया, कर्णपूरण करूया, नस्य, मन्याबस्ती, कटीबस्ती, जानुबस्ती, तेलधारा सोडूया. इ.इ.
केरळीय पंचकर्म करणाऱ्या वैद्यांकडे नेले तर तेल डोणीत ठेवूया, पंधरा लीटर तेलाने चार जणांकरवी मालीश करूया, पिझिंचिल, आदि पूरक पंचकर्म करूया, इ.इ.
चला या निमित्ताने आयुर्वेदात सांगितलेल्या या सर्व उपचारांची नावे तरी कळली !
एक लक्षात येतंय का पहा, आयुर्वेदात चिकित्सा स्वरूप उपचारामधे, तेलाचा सढळ आणि मुक्तहस्ते वापर करायला सांगितलेला आहे. इथे कंजुषगिरी करून चालत नाही. जेवढे तेल इंजिनला आवश्यक आहे, तेवढे ते दिलेच पाहिजे. जर तुम्ही दररोज "मेन्टेनन्स" करणार नसाल तर कधीतरी पंचकर्म करायला तर हवेच !
लंऽऽबी रेस का घोडा जो बनना है !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
07.04.2017
Copyright © 2025 | Marathisrushti