(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • आजच्या तरुणांपुढील आव्हाने

    शिक्षण कशासाठी घ्यायचं तर नौकरी मिळवण्यासाठी, नौकरी कशासाठी तर चांगली बायको मिळण्यासाठी ही सध्याची परिस्थिती आहे.

    जी मुलगी आणि तिचा बाप म्हणतो की मुलगा हवा तर Gov. नौकरीवाला , आता प्रश्न असा पडतो की ठीक आहे मुलगा नौकरी वाला हवा पण मुलगी तरी नौकरीवर आहे का?

    सगळे जर नौकरी करू लागले तर व्यवसाय कोण करतील, उद्योगधंदे कोण चालवतील, इतर व्यवस्था कशी चालेल.

    एक पुस्तक वाचत होतो त्याच नाव आहे Rich that man poor that man" खूप छान पुस्तक आहे त्यात एक उदा. दिलं आहे की एक Gov नौकरी करणारा आणि एक व्यावसायिक यांचं मासिक उत्पन्न सांगितलं आहे, Gov नौकरी करणाऱ्याला महिन्याचा 30 हजार मिळतो तर व्यावसायिकाला दर दिवसाला 300 रु.मिळतात पण ते दुसऱ्या दिवशी दुप्पट होत असतात.आता हे कसे तर gov जॉब करणाराही 8 तास काम करतो पण त्याला जॉबवर ठेवणारा व्यक्तीही 8 तास काम करतो दोघांकडे वेळ सारखा पण व्यावसायिक मात्र असे 8 तास काम करणारे बरेच व्यक्ती ठेवतो आणि सगळ्यांपेक्षा जास्त Income कमावतो.

    फक्त आपली विचारशक्ती बदला, ज्या क्षेत्रातही काम कराल ते असं करा की तुमच्यासारखा कोणताच व्यक्ती ते करू शकत नाही, " दुनिया झुकती है बस ऊसे झुकानेवाला चाहिये" जर सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, मुकेश अंबानी इ.हे तर खूप मोठे नाव झाले असेल याहीपेक्षा एक जळगावचा माझा मित्र अविनाश (MBA) फॉरेन मधून चांगली नौकरी सोडून इथे महाराष्ट्रात शेळ्यापालनाचा व्यवसाय करतो आणि शानने BMW गाडीत फिरतो, म्हटलंन आधीच कि सोच बदलो जिंदगी बदल जायेगी,

    स्पर्धा परीक्षा हे क्षेत्र सगळ्यांनाच जॉब देऊ शकत नाही, वेळ गेल्यावर हात हालवण्यापेक्षा वेळेआधीच जागे व्हा, आणि पालकांनो तुम्ही सुद्धा तुमचे विचार बदला,तुमच्या मनातील भूत बाहेर काढा, मुलांना समजून घ्या.

    "तुम बदल गये तो सारी दुनिया बदल जायेगा

    -- प्रा. हितेशकुमार एस. पटले

  • आपली प्राचीन खाद्य संस्कृती

    जगाला वेड लावणारा डोसा किंवा मसाला डोसा (दोसा) हा पदार्थ किती जुना आहे..? निश्चित सांगता यायचं नाही, पण सुमारे दोन हजार वर्ष तरी नक्कीच..! म्हणजे इतिहासाच्या ज्ञात साधनांचा, कागदपत्रांचा धांडोळा घेत मागे गेलो की कळतं, सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी अत्यंत चविष्ट असा हा डोसा दक्षिण भारतात खाल्ल्या जात होता.

  • १६ मे – पहिला ऑस्कर पुरस्कार

    १६ मे – पहिला ऑस्कर पुरस्कार

    ८८ वर्षापूर्वी १६ मे रोजी पहिला ऑस्कर पुरस्कार दिला गेला. कलाविश्व आणि चित्रपट दुनियेमध्ये मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणजे ऑस्कर. चित्रपटातील दिग्गजांपासून ते अगदी बालकलाकारांपर्यंत सर्वांच्याच मनात या पुरस्कारासाठी एक विशेष स्थान असते. ऑस्करची ती सोनेरी बाहुली आपल्याला मिळावी याकरता प्रत्येक कलाकार प्रयत्नशील असतो. चित्रपटसृष्टीतील तंत्रज्ञांपासून ते कलाकारांपर्यंत ऑस्कर मिळवण्याकरता चढाओढ लागलेली असते.

    १६ मे १९२९ रोजी ऑस्कर पुरस्कार म्हाणजेच अकॅडमी पुरस्कार हे हॉलिवूडच्या अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अॅण्डर या सायन्स चलचित्र या संस्थेतर्फे चित्रपटांतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्मृतिचिन्ह देण्याचा पहिला समारंभ झाला. याच पारितोषिकांना पुढे ’ऑस्कर’ असे नाव पडले.

    अमेरिकेतील हॉलिवुड रुझवेल्ट हॉटेलमध्ये पार पडलेल्याच पहिल्याप पुरस्का्र सोहळ्याला असे झाले नव्हसते. त्याुवेळी या सोहळ्याला केवळ २७० व्य्क्तीरच उपस्थिह‍त होत्या,. या सोहळ्याला पाच डॉलर तिकिटाचा दर होता. त्याुवेळी अमेरिका, यूरोपच्या् वृत्तीपत्रांतून त्यालला अपेक्षित अशी प्रसिद्धीसुद्धा दिली गेली नव्ह ती. मेट्रो-गोल्डिन-मेयर स्टुडिओचे लुईस बी. मेयर यांनी अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स अकादमीची स्थापना केली. तेच या पुरस्कायराचे संस्थाीपक आहेत. पहिल्या सोहळ्यात ऑस्कर विजेत्यांची नावे सोहळ्याच्या तीन महिने आधीच जाहीर केली गेली होती. पहिल्या सोहळ्यात १५ ऑस्कर पुरस्कार दिले गेले होते.

    सवोकृष्ट अभिनेत्याचे पहिले ऑस्कर एमिल जॅनिंग्ज यांना, तर सवोकृष्ट अभिनेत्रीचे पहिले ऑस्कर जेनेट गेनर यांना मिळाले दिले गेले होते. यात दोन विशेष ऑस्कर पुरस्कार दिले गेले. वॉर्नर ब्रदर्स यांना जॅझ सिंगर चित्रपटाची निमिर्तीसाठी चार्ल्स चॅप्लिन यांना दी सर्कस चित्रपटाचे निर्माता लेखक आणि अभिनेते यासाठी हा पुरस्कातर दिला गेला होता. मात्र, पुढील वर्षापासून विजेत्यांची नावे पुरस्कार सोहळ्यापर्यंत गुप्त ठेवण्यात येऊ लागली. सोहळ्याच्या आधीच विजेत्यांची यादी वर्तमानपत्रांकडे पाठवली जायची आणि सोहळ्याच्या दिवशी रात्री ११ वाजता ती वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध करायची, असे ठरवण्यात आले. ही पद्धत १९४० पर्यंत पाळली गेली. परंतु, लॉस एंजेलिस टाइम्सने ऑस्कर विजेत्यांची यादी सायंकाळीच प्रसिद्ध केली. त्यामुळे सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या सर्वांना ती सहज उपलब्ध झाली. या मुळे पद्धत बदलणे भाग झाले.

    १९४१ पासून बंद पाकिटात विजेत्यांची नावे देण्याची पद्धत सुरू झाली. १९५३ मध्ये ऑस्कर सोहळा प्रथमच टीव्हीच्या माध्यमातून अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि कॅनडा पर्यंत दाखवला गेला. १९६९ पासून ऑस्कर सोहळा जगभर प्रक्षेपित केला जाऊ लागला. सध्या हा सोहळा २०० पेक्षा अधिक देशात पाहता येतो. या पुरस्कारर सोहळ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष असते. जवळपास जगातील सर्वच प्रमुख वृत्तयवाहिन्याा, वर्तमानपत्रे त्याोला ठळक प्रसिद्धी देतात. याच सिनेजगतातील सर्वोच्चप मानला जाणारा ऑस्कयर पुरस्कापर तर सर्वांच्याठच आक र्षण, उत्सुीकतेचा विषय. मराठी, हिंदी, तमीळ आणि बंगाली; तसेच देशातील इतर भाषांतील सर्वोत्कृष्ट ३५ चित्रपटांमधून एका चित्रपटाची अधिकृत निवड केली जाते.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग छत्तीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक नऊ

    कामासाठी दिवस, विश्रांतीसाठी रात्र-भाग एक

    आपण सूर्यवंशी आहोत. आपला दिवस सूर्योदयाला सुरवात होतो आणि रात्री संपतो. सर्वसाधारणपणे सगळीकडे असेच चालते. असेच चालावे, कारण दिवसा सूर्य असतो आणि रात्री सूर्य नसतो.

    निद्रा म्हणजे झोप ही रात्रीच प्रशस्त आहे. शरीर दिवसभर काम करून दमते, त्याला विश्रांती ही हवीच ! अन्यथा इंजिनकडून फक्त काम करून घेतले गेले आणि पुरेशी विश्रांती दिली नाही तर इंजिनचे आयुष्य लवकर संपुष्टात येते. साधा ब्लेंडर आणला तर त्याच्यावर सूचना लिहिलेली असते. हे मशीन फक्त दहा मिनीटे सुरू ठेवावे. नाहीतर याची गॅरंटी वाॅरंटी काही मिळणार नाही. अगदी बारीक अक्षरात हे लिहिलेले असते. त्यामुळे कोणी नीटसे वाचत नाही, वाचले तरी फारसे लक्ष देत नाही, शेवटी परिणाम व्हायचा तोच होतो, मशीन अकाली बंद पडते.

    इसापनीती मधील दोन कष्टकरी मुलांची ती गोष्ट आठवत असेलच ! वडील आपल्या दोन्ही मुलांना एका दिवसात जास्त उत्पन्न आणण्यासाठी काम करायला सांगतात. पहिला एक जण न थांबता, दिवसभर राब राब राबतो, न थांबता कष्ट करतो. न थांबल्यामुळे त्याच्याकडील हत्यारे देखील दमतात, त्यांची धार जाते. धार गेलेल्या हत्यारांनी काम करायला जास्ती शक्ती संपून जाते. उत्न्नावर परिणाम होतो. उत्पादन कमी भरते.

    तर दुसरा मधे मधे थांबून पुरेशी विश्रांती घेऊन पुनः दुप्पट वेगाने काम करतो, विश्रांतीच्या वेळी आपल्या हत्याराना धार काढून परत कार्यक्षम बनवणे, आदि कामे करतो. ( विश्रांती म्हणजे गाढ झोपलेच पाहिजे असे नाही हो, ) परिणाम दुसऱ्या मुलाची कार्यक्षमता आणि उत्पादनक्षमता दोन्ही वाढते.

    माॅरल ऑफ द स्टोरी काय ?
    काम करताना पुरेशी विश्रांती घ्यावी.

    "पुरेशी" या शब्दाचा आणखी थोडा खुलासा, स्पष्टीकरण करावे लागेल. प्रत्येकाचं हे "पुरेसं " वेगळं असतं. हे प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार ठरतं. पुनः त्यासाठी नियम करून काम करू नये, किंवा तशी विश्रांती ठरवू नये. नाहीतर पुनः गोंधळ होईल. हेच तर आयुर्वेदाचे वैशिष्ट्य आहे. म्हणून तर आपण पहिला नियम केला की, "कोणताही नियम पाळू नये."

    आयुर्वेद सांगतो, विश्रांती ही रात्रीच घ्यावी. निसर्ग पण हेच सांगतो, विश्रांती रात्रीच घ्यावी. सगळे पशुपक्षी दिवसा खातापितात, आणि रात्री विश्रांती घेतात. अपवाद वटवाघुळ, घुबड आदि निशाचर प्राणी. आणि माणसांमधील शिफ्ट ड्यूटी करणारे प्राणी !

    गरज म्हणून, पोटासाठी, रात्री जागरण करून नोकरी चाकरी करावी लागते. आपले आपल्या कुटुंबाचे पोट एका बाजूने भरत जायचे, रात्री पैसे मिळवत जायचे, तर दुसऱ्या बाजूने ते दिवसाढवळ्या डाॅक्टरांचे पोट भरायला सहजपणे देऊन जायचे !

    असंच चाललंय, अवतीभवती. पोटाला चिमटा घेत, श्रम करायचे आणि अन्न पचत नाही, पोट दुखतंय ही तक्रार घेत डाॅक्टरांकडे जायचं. पोट आणि खिसा दोन्ही फाडून घ्यायचं. हे कुठंवर चालायचं ?

    हे असंच चालायचं, असं म्हणून नाही चालायचं. समस्या आहे तिथे उत्तर आहे. शोधा म्हणजे सापडेल.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    16.05.2017

  • दादर टी. टी. आणि मांजरं

    दादरचं खोदादाद सर्कल माहित नाही असा निदान मुंबईत तरी माणूस नाही. महानगरपालिकेच्या दप्तरात व बीईएसटीच्या बसवर जरी ‘खोदादाद सर्कल’ असं नांव असलं तरी हे सर्कल सामान्यजनांत मशहूर आहे ते ‘दादर टी. टी.’ या नांवाने. या नांवातील ‘टी.टी.’चा फुलफाॅर्म ‘ट्राम टर्मिनस’ असा आहे.

  • बौद्ध पोर्णिमा

    जगाला शांततेचा, अहिंसेचा, समतेचा संदेश देणाऱया तथागत गौतम बुद्धांची ‘वैशाख बुद्ध पौर्णिमा’ जगभरात विविध ठिकाणी उत्साहात साजरी होत आहे. याच पौर्णिमेला बुद्धाच्या जीवनात पाच अत्यंत महत्त्वाच्या घटना घडल्या; त्या म्हणजे १. राजपुत्र सिद्धार्थ गौतमचा जन्म, २. राजकन्या यशोधरेचा जन्म, ३. राजकुमार सिद्धार्थचा मंगलपरिणय (विवाह), ४. ज्ञानप्राप्ती, ५. महापरिनिर्वाण

    वैशाख पौर्णिमेला पाली भाषेत ‘वेसाक्को’ म्हणतात. वर उल्लेखिलेल्या पाच अतिशय लक्षणीय घटनांमुळे या पौर्णिमेला अलौकिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. नेपाळच्या पायथ्याशी वसलेल्या लुम्बिनीच्या वनात ख्रिस्तापूर्व ५३६ साली कपिलवस्तूची महाराणी महामाया देवीने बाळाला जन्म दिला. बाळाचे नाव ‘सिद्धार्थ’ असे ठेवण्यात आले. सिद्धार्थच्या वडिलांचे नाव शुद्धोधन होते.

    बुद्ध यांनी तपश्चर्या केल्याने पिंपळवृक्ष बोधीवृक्ष म्हणून नावारुपास आला. बोधीवृक्षाला जागतिक वारसा सूचीत सामावून घेतले आहे. भारताप्रमाणे नेपाळ, चीन, जपान, लायवान, कोरिया, लाओस, व्हिएतनाम, थायलंड, कंबोलिया, मलेशिया, श्रीलंका, म्यानमार, इंडोनेशिया अशा अनेक देशात बुद्ध पौर्णिमा मोठया उत्साहात साजरी केली जाते.

    तथागत बुद्धांनी दिलेला ‘चरथ भिक्खये चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हा संदेश शेकडो वर्षे लोकांना प्रकाशवाट दाखवत आहे, याचेच प्रचीती यानिमित्ताने येत आहे ख्रिश्चन आणि इस्लाम धर्माच्या आधी बौद्ध धर्माची स्थापना झाली होती. या दोन धर्मांनंतर बौद्ध हा जगातील तिसरा मोठा धर्म आहे. चीन, जपान, कोरीया, थायलंड, कंबोडिया, नेपाळ, श्रीलंका, भुतान व भारत या देशांत बौद्ध धर्माचे अनुयायी मोठ्या प्रमाणात सापडतात. गुप्तकाळात हा धर्म ग्रीस, अफगाणिस्तान व अनेक अरब देशांत पोहोचला होता. परंतु, ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मामुळे त्याचे उच्चाटन झाले. बौद्ध हा नास्तिकांचा धर्म आहे. कर्मामुळेच जीवनात सुख व दुःख येते. त्यामुळे सर्व कर्मातून मुक्त होणे म्हणजेच मोक्ष मिळविणे अशी बौद्ध धर्माची शिकवण आहे. कर्मातून मुक्त होण्यासाठी आणि ज्ञान प्राप्त करण्यासाठी चार आर्य सत्य समजून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी अष्टांग मार्गाचा अभ्यास केला पाहिजे. त्या द्वारेच मोक्ष मिळू शकेल असे हा धर्म सांगतो.

    भगवान बुद्धांनी स्थापन केलेल्या या धर्मात हिनयान व महायान हे दोन संप्रदाय आहेत. वैशाख महिन्यातील पौर्णिमेला बुद्ध जयंती असते. बौद्ध धर्मियांची प्रमुख चार तीर्थ स्थळे आहेत. लुंबिनी, बोधगया, सारनाथ आणि कुशीनगर. बौद्ध धर्मग्रंथाला त्रिपिटक असे म्हटले जाते.

    भगवान बुद्धाला गौतम बुद्ध, सिद्धार्थ, तथातगत व बोधिसत्व या नावानेही ओळखले जाते. बुद्धाचे वडिल कलिलवस्तुचे राजा शुद्धोधन हे होते. त्यांच्या आईचे नाव महामाया देवी असे होते. बुद्धाच्या पत्नीचे नाव यशोधरा आणि मुलाचे नाव राहूल होते.

    बुद्धाचा जन्म वैशाखातील पौर्णिमेच्या दिवशी नेपाळमधील लुंबिनी येथे इसवी सन पूर्व ५६३ मध्ये झाला. याच दिवशी इसवी सन ५२८ ला बोधगया येथे त्यांना सत्याची प्राप्ती झाली. याच दिवशी इसवी सन ४८३ ला ८० व्या वर्षी कुशीनगर येथे त्यांचे निर्वाण झाले.

    बुद्धाला ज्या दिवशी सत्याची प्राप्ती झाली, त्याच दिवशी ते काशीजवळील सारनाथ येथे गेले. तेथे त्यांनी पहिल्यांदा उपदेश केला. त्यात लोकांना मध्यम मार्गाचा अवलंब करावा असा सल्ला त्यांनी दिला. दुःख, त्याची कारणे आणि त्याचे निवारण करण्यासाठी अष्टांगिक मार्ग अवलंबिण्यास त्यांनी सांगितले. अंहिसेचा पुरस्कार केला. यज्ञ, कर्मकांड, पशुबळी यांच्याविरोधात बोलले.

    बौद्ध संप्रदाय-
    बुद्धाच्या वेळी कोणताच संप्रदाय वा पंथ नव्हता. परंतु त्यानंतर मात्र मतभेद होऊन हिनयान व महायान हे पंथ तयार झाले. महायान म्हणजे मोठी नौका वा गाडी तर हिनयान म्हणजे छोटी गाडी वा नौका. महायान संप्रदायांतर्गतच वज्रयान नावाचीही एक उपशाखा होती. झेन, ताओ, शिंतो हेही बौद्ध धर्माचे संप्रदाय मानले जातात.

    बुद्धाचे गुरू व शिष्य-
    बुद्धाचे प्रमुख गुरू हे होते. - गुरु विश्वामित्र, अलारा, कलम, उद्दाका रामापुत्त आदी. बुद्धआचे शिष्य होते आनंद, अनिरुद्ध, महाकश्यप, राणी खेमा (महिला), महाप्रजापति (महिला), भद्रिका, भृगु, किम्बाल, देवदत्त, उपाली आदी. प्रमुख प्रचारक- अंगुलिमाल, मिलिंद (ग्रीस सम्राट), सम्राट अशोक, ह्वेन त्सांग, फा श्येन, ई जिंग, हे चो आदी.

    बौद्ध धर्मग्रंथ-
    बौद्ध धर्माची मूळ तत्वे ही आहेत- चार आर्य सत्ये, अष्टांगिक मार्ग, निर्वाण. बुद्धाने आपली शिकवण पाली भाषेत दिली. ती त्रिपिटीकामध्ये संकलित केली आहे. त्रिपिटक तीन भागात आहे. विनयपिटक, सुत्तपिटक व अभिधम्मपिटक. या पिटकांमध्येही अनेक उपग्रंथ आहेत. सुत्तपिटकमध्ये धम्मपदे आहेत. धम्मपदे लोकप्रिय आहेत.

    बौद्ध तीर्थ-
    लुंबिनी, बोधगया, सारनाथ व कुशीनगर ही चार प्रमुख बौद्ध तीर्थस्थळे आहेत. या ठिकाणी जगभरातील बौद्ध अनुयायी येत असतात. लुंबिनी नेपाळमध्ये आहे. बोधगया भारतात बिहारमध्ये तर सारनाथ उत्तर प्रदेशात काशीजवळ आहे. कुशीनगरही उत्तर प्रदेशात गोरखपूरजवळ आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • प्रसुती – सिझेरिअन योग्य की अयोग्य

    सिझेरिअन’ हा शब्द आता सर्रास कानावर येतो.कुणी प्रसूत झाली असं कळलं की, लोक हमखास पहिला प्रश्न विचारतात, सिझर की नॉर्मल?

    सिझर हेच उत्तर सर्रास कानावर येतं. पुढे पालूपदही जोडलं जातं की, आता तर काय सिझर नॉर्मल झालेत!

    पण खरंच हे सिझेरिअन करणं म्हणजे गरोदर स्त्रीच्या पोटावर आणि गर्भाशयावर छेद घेऊन बाळ बाहेर काढण्याची शस्त्रक्रिया इतकी सर्रास करण्यासारखी गोष्ट आहे का?

    या शस्त्रक्रियेचा प्रचार साधारण: 6-7 वर्षापूर्वी प्रतिजैविकांचा शोध लागल्यानंतर झाला. आज मात्र इतक्या मोठय़ा प्रमाणात आणि बेजबाबदारपणो ही शस्त्रक्रिया जगभर केली जात आहे.

    खरंतर गरोदरपण आणि प्रसूती या स्त्रीच्या आयुष्यात घडणारया नैसर्गिक घटना आहेत. गरोदरपण आणि प्रसूती हे काही आजार नाहीत. शुक्राणू आणि स्त्रीबीज यांच्या समन्वयापासून ते अडीच-तीन किलोचा पूर्ण वाढ झालेला हाडांमासांचा जीव तयार होण्याची ही प्रक्रिया आणि त्या बाळाचा योनी मार्गातून बाहेर पडण्याचा पहिला प्रवास या दोन्ही गोष्टी अतिशय गुंतागुंतीच्या आणि किचकट प्रक्रिया असल्या तरी परमेश्वराने त्या अतिशय सहज आणि सोप्या करून ठेवल्या आहेत.

    त्यामुळेच, शंभर गरोदर स्त्रियांपैकी पंचाण्णव स्त्रियांची प्रसूती ही नैसर्गिकरीत्या, कोणत्याही अडथळ्याशिवाय आणि कोणाच्याही मदतीशिवाय होत असते. फक्त 5 टक्के स्त्रियांची प्रसूती ही अवघड असते; या पाचपैकी 4 टक्के स्त्रियांना प्रशिक्षित परिचारिका अथवा तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीची गरज भासते. फक्त 1 टक्का स्त्रियांची प्रसूती नैसर्गिकरीत्या होणं अशक्य असतं. अशा स्त्रियांचा आणि त्यांच्या पोटातील बाळाचा जीव वाचविण्यासाठी सिझेरिअन शस्त्रक्रियेची गरज भासते. प्रत्यक्षात आज काय परिस्थिती आहे?

    आज मोठय़ा शहरांमध्ये 50 टक्यांपेक्षा जास्त प्रसुती सिझेरिअन शस्त्रक्रियेद्वारा केल्या जातात. तालुक्याच्या ठिकाणी हे प्रमाण थोडं कमी, म्हणजे 30 ते 40 टक्के आहे. पण दोन्ही ठिकाणी इतक्या झपाटय़ाने ही टक्केवारी वाढते आहे की काही वर्षानंतर नैसर्गिक प्रसूती ही वर्तमान पत्रातील चार कलमी ठळक बातमी ठरावी किंवा वैद्यकीय विद्यार्थींना शिकविण्यासाठी तयार केलेला दुर्मीळ व्हिडीओ म्हणून त्याचा विचार व्हावा.

    अगदी साधी गोष्ट आहे. सिझेरिअन शस्त्रक्रियेचे बिल नैसर्गिक प्रसूतीच्या बिला पेक्षा किमान पाच ते दहा पटींनी जास्त असते. आज पैसा कुणाला नको आहे? नैसर्गिक प्रसूतीसाठी डॉक्टर आणि पेशंट दोघांना वाट पहावी लागते; स्त्रीला कळा सोसाव्या लागतात; डॉक्टरांना डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेऊन प्रसूतीच्या प्रत्येक टप्प्याचे निरीक्षण करावे लागते, ते नोंदवून ठेवावे लागते. एवढे करूनही आई किंवा बाळाच्या बाबतीत जर चुकून काही अपघात झालाच, तर डॉक्टरला मारहाण, हॉस्पिटल वर दगडफेक, वर्तमानपत्रात बदनामीकारक बातमी, वर्षानुवर्षे ग्राहक कोर्टात आणि फौजदारी कोर्टात चालणारे खटले हे शुक्लकाष्ठ मागे लागते.

    या उलट सिझर करणं अतिशय सोपं. बधिरीकरण (भूल) शास्त्रात झालेल्या प्रगतीमुळे, महागडय़ा परंतु परिणामकारक प्रतिजैविकांमुळे, भूलतज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीमुळे, रक्तपेढय़ांच्या जाळ्यामुळे सिझेरिअन शस्त्रक्रिया पूर्वीपेक्षा खूप सोपी आणि निर्धोक झाली आहे. या शस्त्रक्रियेमुळे रुग्ण दगावण्याची शक्यता नगण्य, म्हणजे लाखात एक इतके कमी झाले आहे. त्यामुळे ना डॉक्टरांची रिस्क घेण्याची तयारी आहे ना, पालकांची!

    मात्र नैसर्गिक प्रसूतीचे रूपांतर सिझेरिअनमध्ये करण्याचा डॉक्टरांचा निर्णय 90 टक्के वेळा चुकीच्या गृहितकावर आधारलेला असतो. बाळाच्या आणि आईच्या जिवाची भीती घातली, की आधीच धास्तावलेले नातेवाइक लगेचच ऑपरेशनला परवानगी देतील, अशी डॉक्टरांना खात्री असते. कळांनी अर्धमेली झालेली पेशंट नातेवाइक ऐनवेळी कोठे घेऊन जाणार? आणि अशी ऐनवेळी आलेली पेशंट प्रसूतीसाठी घेण्याची पद्धत आजकाल शहरात काय, पण खेडय़ात सुद्धा नाही.

    प्रसूतीसाठी सिझेरिअनचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी काय उपाय योजना करता येतील, याविषयी आज जगभर विविध पातळ्यांवर चर्चा सुरू आहे. तथापि, नैसर्गिक प्रसूतीचे सिझरमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय हा पूर्णपणे संबंधित स्त्रीच्या बाळंतपणात काळजी घेणारया डॉक्टरांचा आणि ऐनवेळी घेतला जाणारा निर्णय असल्याने आणि हा निर्णय आई आणि बाळाचे प्राण वाचविण्या साठी घेतला जात असल्याने कोणत्याही पातळीवर या निर्णयाला आव्हान देणं अशक्य आहे. शासकीय आणि खाजगी रुग्णालयातील प्रत्येक सिझरचे ऑडिट करण्याचा प्रस्तावही मध्यंतरी विचाराधीन होता; पण संबंधित डॉक्टरांच्याच विरोधाने तो बारगळला.

    नैसर्गिक प्रसूतीची वाट पाहणारे, सिझेरिअनचा पर्याय टाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारे डॉक्टर्स आज खूप कमी आहेत हे वास्तव आहेत.

    वाट पाहणे, ही प्रसूतीशास्त्रतील एक सुंदर कला आहे. इंग्रजीत तिला Masterly Inactivity असं नाव आहे. जरूर ती सर्व काळजी घेऊन, जरूर ती सर्व निरीक्षणं नोंदवून आणि जरूर त्या सर्व तपासण्या करून, नंतर निसर्गाला आपलं काम करू देण्यासाठी शांतपणे वाट पहायची. ही कला आत्मसात करणं वाटतं तितकं सोपं जरी नसलं तरी फार अवघड आणि अशक्यही नाही. अतिशय अवघड परिस्थितीत, सर्व अडथळ्यांवर मात करून, नैसर्गिक प्रसूती करण्यात जो आनंद आणि समाधान डॉक्टर आणि पेशंटला मिळतं ते सिझेरिअन करून मिळणारा पैसा आणि समाधाना पेक्षा खुप उच्च प्रतीचं असतं, हे मी गेल्या पस्तीस वर्षात खूपदा अनुभवलेलं आहे.

    सिझेरिअन करण्याआधी किती वाट पहावी, याबाबतचा इ.स. 1500सालातील एक किस्सा शेवटी सांगतो. ही घटना स्वित्झर्रलंड मधील आहे. त्या काळी सिझेरिअन शस्त्रक्रिया जिवंत स्त्रीवर करण्यास कायद्याने बंदी होती. गरोदर स्त्रीचा अकस्मात इतर काही कारणाने अपघाती मृत्यू ओढवला, तर बाळाला वाचविण्यासाठी मयत स्त्रीचे पोट कापून बाळ बाहेर काढले जाई. जेकॉब न्यूफर नावाच्या इसमाने आपल्या पत्नीचे सिझेरिअन ऑपरेशन करण्याची परवानगी स्थानिक प्रशासनाकडे मागितली. सदर स्त्री सहा दिवस प्रसूतीच्या कळा देत होती आणि तेरा परिचारिकांनी तिची प्रसूती करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. सहा दिवस वाट पाहूनही प्रसूती होईना, म्हणून अखेर सिझेरिअन ऑपरेशनची परवानगी प्रचंड वादावादी नंतर देण्यात आली. ऑपरेशननंतर बाळबाळंतीण सुखरूप असल्याची दुर्मीळ घटना घडली. त्या स्त्रीने नंतर पाच मुलांना नैसर्गिकरीत्या जन्म दिला. त्यातील एक जुळे होते. सिझेरिअनने जन्माला आलेली मुलगी पुढे 77 वर्षे जगली आणि भरपूर म्हातारी होऊन मेली.तुम्ही न्यूपर इतकी वाट पाहू नका, पण थोडी तरी वाट पहायला काय हरकत आहे?

    सिझर करण्यासाठी सांगितली जाणारी ४ कारणं.

    १.बाळाच्या गळ्याला नाळेचे वेढे आहेत.
    -सिझर करायला हवं ‘‘बाळाच्या गळ्यात नाळेचे वेढे आहेत’’ असं डॉक्टर अनेकदा सांगतात. आणि सिझर करायला चटकन राजी होतात. पण हे खरं नव्हे. पोटातील बाळाला प्राणवायूचा आणि अन्नद्रव्यांचा पुरवठा नाळेवाटे होत असतो. गर्भातील बाळाची फुफ्फुसे तयार झालेली नसतात (जन्मल्यावर बाळ पहिल्यांदा श्वास घेते, तेव्हाच फुफ्फुसाचे कार्य सुरू होते). त्यामुळे नाळेचे हजार वेढे जरी बाळाच्या मानेभोवती पडले, तरी नाळेतून होणारा रक्तपुरवठा कायम असल्याने बाळाला काहीही त्रास होण्याचा प्रश्नच नसतो. वस्तुत: गर्भाशयातील पाण्याच्या डोहात मनसोक्त फिरत असताना बाळाच्या मानेभोवती नाळेचे वेढे पडणं, ही पूर्णपणे नैसर्गिक क्रिया आहे. नैसर्गिक प्रसूती होताना हे वेढे प्रसूती समयी जवळ असलेल्या डॉक्टर अथवा परिचारिकेला नेहमीच दिसत असतात आणि बाळाला त्यामुळे कधीही काहीही त्रास होत नाही.

    २.गर्भाशयातील पाणी कमी झालंय.
    -गर्भाशयातील पाणी कमी होतंय आणि बाळ कोरडं पडतंय हे सिझरचं दुसरं कारण. हे कारण सुद्धा पहिल्या कारणाइतकंच तकलादू आहे. गरोदरपणातील नऊ महिन्यांपैकी पहिल्या सात महिन्यात बाळाची वाढ कमी आणि पाण्याची वाढ जास्त असते. या उलट सातव्या महिन्यानंतर गर्भाशयात बाळ वेगाने वाढू लागतं आणि पाणी त्याप्रमाणात कमी होऊ लागतं. याचाच साधा अर्थ असा की, गर्भाशयातील पाणी कमी होण्याची प्रक्रिया प्रसूतीच्या दोन महिने अगोदर सुरू झालेली असते. बरेचदा, प्रसूतीच्या कळा सुरू होण्यापूर्वी पाणमूठ फुटून गर्भाशयातील बरंच पाणी निघून जातं आणि त्यानंतर 24 तासात नैसर्गिक कळा सुरू होतात. काही वेळा, दिवस उलटून गेल्यावर कळा सुरू करण्यापूर्वी पाणमूठ फोडणं हा पूर्वापार चालत आलेला उपाय आहे. यात अनैसर्गिक असं काहीही नाही. बाळ कोरडं पडेल, हे डॉक्टरांच्या अचाट कल्पनाशक्तीचे उदाहरण आहे. या व्यतिरिक्त त्या विधानाला काहीही अर्थ नाही.

    ३.बाळानं पोटात शी केली.
    -प्रसूतीची प्रत्येक कळ बाळाला गर्भाशयातून खाली ढकलण्यासाठी आणि गर्भाशयाचे तोंड उघडण्यासाठी असते. बाळाच्या पोटावर या क्रियेने दाब पडला, की बाळाला शी होणं ही अशीच नैसर्गिक क्रिया आहे. उलट अशी शी होणे, हे बाळाचे गुदद्वार आणि आतडी पूर्णपणे विकसित आणि नॉर्मल असल्याचे लक्षण आहे. ही विष्ठा जंतु विरहित असते. त्यामुळे बाळाने अशी शी गिळली, तरीही त्याला या शी पासून काहीही धोका नसतो. बाळाच्या जन्मानंतर लगेचच सक्शन मशिनने ही शी बाहेर काढून टाकण्याची पूर्वापार पद्धत आहे. पण बाळानं पोटात शी केली हे कारण सांगून हल्ली सर्रास सिझर केलं जातं.

    ४.बाळाचे ठोके अनियमित झाले आहेत.
    -गर्भाशयाच्या प्रत्येक आकुंचनाबरोबर बाळाचा रक्तपुरवठा कमी होत असतो; बाळाचे ठोके अनियमित होत असतात. दोन कळांमधील काळात हा रक्तपुरवठा आणि ठोके पूर्ववत होतात. ही क्रिया बाळाचा जन्म होईस्तोवर चालू असते. कळा सहन करण्याची बाळाची ताकद अमर्यादित असते, हे सत्य प्रसूती प्रक्रियेस मदत करताना मी हजारो वेळा अनुभवलेले आहे. दोन दोन अथवा तीन तीन दिवस घरी कळा देऊन नंतर माझ्याकडे येऊन नैसर्गिक प्रसूती झालेल्या बाळाची तब्येत आणि रडणं खणखणीत असते. त्यामुळे बाळाचे ठोके अनियमित झालेत असं सांगणं हेदेखील एक फसवं कारण आहे.

    डॉ. अशोक माईणकर
    (लेखक सासवड, ता. पुरंदर, जि.पुणे येथे स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ आहेत. या क्षेत्रात कामाचा त्यांना 35 वर्षाहून अधिक अनुभव आहे.)

    एक सत्य जनसामांन्यापर्यंत पोहचविण्यासाठी..!

  • पुरातन देवळात दर्शन घेण्यास का जावे ?

    पुरातन देवळात दर्शन घेण्यास का जावे ? गल्ली बोळातील नाही?

    देवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ उर्जा असते.

    देवळे म्हणजे जणू काही ब्रम्हांडाचा/भोवतालचा पंचमहाभूतांसहीत असलेला छोटासा तुकडाच जणू.

    सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त शुभ उर्जेची जागा निश्चित झाली की तिथे खड्डा खणून त्यात एक तांब्याचा तुकडा टाकला जाई. तांबे हे वीज वचुंबकीय उर्जेचे उत्तम वाहक ( good conductors) आहेत हे आपल्याला माहित आहेच. त्यामुळे जास्तीत जास्त शुभ चुंबकिय वैश्विक उर्जा स्वतःत सामावून घेऊन नंतर ती भोवताली रेडीएट करणे हा तांब्याचा तुकडा मुर्तीखाली ठेवण्यामागचा प्रमुख उद्देश.

    त्यानंतर विधीपूर्वक मुर्तीची प्रतिष्ठापना केली जाई व त्यानंतर त्याभोवती मंदिर बांधले जाई.

    आता देवळात जातांना काय करावे, कसे दर्शन घ्यावे ह्याबाबत आपण जे नियम पूर्वापार पाळत आलो आहोत त्यातही 100% विज्ञान कसे आहे ते पाहू.

    1) देवळात जाण्यापूर्वी आपण चपला/बूट काढून पाय धूवून मगच मंदिरात प्रवेश करतो........
    ह्यामागे स्वच्छतेचे कारण आहेच, की आपण चपला/बूट घालून सर्वत्र फिरत असतो. मंदिरातील शुभ व पवित्र व्हायब्रेशन्स (positive & pure vibrations) दुषित होऊ नयेत हा एक उद्देश. पण त्याहीपेक्षा एक मोठे वैज्ञानिक सत्य यामागे दडलेले आहे. मंदिराच्या मध्यभागातील फरशी अशी निवडलेली असे ( उदा. संगमरवर ) की ती मंदिरातील शूभ उर्जेची ती उत्तम वाहक ती असेलच पण आपण जेव्हा तिच्यावरुन अनवाणी (bare footed) चालू तेव्हा तळपायावर असलेल्या एनर्जी पाॅइंटस् मधून ती आपल्या शरिरात प्रवेश करेल.
    जर तुमची पंच ज्ञानेद्रिये receiving mode मध्ये असतील तरच मदिरातील शुभ उर्जा तुम्ही स्वतःमध्ये सामावून घेउ शकाल,तेव्हा पुढचे नियम त्याकरीता..

    2) मंदिराच्या गर्भगृहात/मूलस्थानात प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशव्दाराशी असलेली घंटा वाजवणे......
    ह्यामागेही दोन उद्देश आहेत.. पहिला म्हणजे.. ह्या घंटा विशिष्ट सप्तधातू योग्य प्रमाणात घेऊन बनविल्या जातात. घंटा वाजविल्यानंतर ती तीव्र परंतू किमान सात सेकंद रहाणारा प्रतिध्वनित नाद निर्माण करतील अशा बनविल्या जातात. घंटा वाजवून पुढे निघून न जाता तिच्या खाली उभे राहून नादाची व्हायब्रेशन्स स्वतःमध्ये सामावून घेणे. ह्यामुळे आपली सप्तचक्र तर उद्दीपित होतातच,पण आपला उजवा व डावा मेंदू एकतानतेने ( inco-ordination) काम करु लागतात. तसेच आपल्या मनातील नकारात्मकविचारांचा निचराही होतो. गर्भगृहातील मूर्तीमध्येही ही व्हायब्रेशन्स शोषली जातात.

    3) आपले पांच sences म्हणजे दृष्टी, ऐकणे, स्पर्श, चव घेणे, वासघेणे. यापुढील रुढी हे पांच सेन्सेस उद्दीपित करतात.
    अ. कापूर जाळणे -- दृष्टी
    ब. कापूरारतीवर हात फिरवून ते डोळ्याना लावणे... स्पर्श
    क. मुर्तीवर फुले वाहणे...फुलांच्या अरोमामुळे वास.
    क. कापूर व तुळशीपत्र घातलेलेतीर्थ प्राशन करणे..चव.
    हे तीर्थ तांब्याच्या / चांदीच्या भांड्यात 8 तास ठेवलेले असते, त्यामुळे कफ- ताप असे आजारही जातात.
    ड. घंटानाद व मंत्रोच्चरण....ऐकणे.
    अशाप्रकारे उद्दीपित अवस्थेत व reveiving mode मध्ये आपण गर्भगृहातील आवश्यक तेवढी शुभ उर्जा स्वतःत सामावून घ्यायची असते.
    मूर्तीच्या मागील बाजूस व भोवताली पसरलेली उर्जाही मिळावीम्हणून प्रदक्षिणेचे प्रयोजन..
    पूर्वसुरी म्हणतात, हे सगळे केल्यावर पटकन गजबजाटात जाऊ नका. मंदिरात जरा वेळ टेका. शरिरात उर्जेला समावायला, settle व्हायला वेळ द्या आणि अत्यंत शांत मनाने, आनंदाने, उर्जापूर्ण अवस्थेत आपल्या कामाला जा.
    मित्रमैत्रिणींनो आपल्या पुढच्या पिढीला देवळात कां जायचे हा मोठ्ठा प्रश्न पडलेला असतो. ह्यापुढे देवळात जाण्यामागचा उद्देश लक्षात घेऊनच मंदिरात जा आणि पुढच्या पिढीपर्यत हे ज्ञान पोहोचवण्यासाठी मदत कराल हिच अपेक्षा..

    शुभम् भवतू !!

  • पुरातन देवळात दर्शन घेण्यास का जावे ?

    पुरातन देवळात दर्शन घेण्यास का जावे ? गल्ली बोळातील नाही?

    देवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ उर्जा असते.

    देवळे म्हणजे जणू काही ब्रम्हांडाचा/भोवतालचा पंचमहाभूतांसहीत असलेला छोटासा तुकडाच जणू.

    सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त शुभ उर्जेची जागा निश्चित झाली की तिथे खड्डा खणून त्यात एक तांब्याचा तुकडा टाकला जाई. तांबे हे वीज वचुंबकीय उर्जेचे उत्तम वाहक ( good conductors) आहेत हे आपल्याला माहित आहेच. त्यामुळे जास्तीत जास्त शुभ चुंबकिय वैश्विक उर्जा स्वतःत सामावून घेऊन नंतर ती भोवताली रेडीएट करणे हा तांब्याचा तुकडा मुर्तीखाली ठेवण्यामागचा प्रमुख उद्देश.

    त्यानंतर विधीपूर्वक मुर्तीची प्रतिष्ठापना केली जाई व त्यानंतर त्याभोवती मंदिर बांधले जाई.

    आता देवळात जातांना काय करावे, कसे दर्शन घ्यावे ह्याबाबत आपण जे नियम पूर्वापार पाळत आलो आहोत त्यातही 100% विज्ञान कसे आहे ते पाहू.

    1) देवळात जाण्यापूर्वी आपण चपला/बूट काढून पाय धूवून मगच मंदिरात प्रवेश करतो........
    ह्यामागे स्वच्छतेचे कारण आहेच, की आपण चपला/बूट घालून सर्वत्र फिरत असतो. मंदिरातील शुभ व पवित्र व्हायब्रेशन्स (positive & pure vibrations) दुषित होऊ नयेत हा एक उद्देश. पण त्याहीपेक्षा एक मोठे वैज्ञानिक सत्य यामागे दडलेले आहे. मंदिराच्या मध्यभागातील फरशी अशी निवडलेली असे ( उदा. संगमरवर ) की ती मंदिरातील शूभ उर्जेची ती उत्तम वाहक ती असेलच पण आपण जेव्हा तिच्यावरुन अनवाणी (bare footed) चालू तेव्हा तळपायावर असलेल्या एनर्जी पाॅइंटस् मधून ती आपल्या शरिरात प्रवेश करेल.
    जर तुमची पंच ज्ञानेद्रिये receiving mode मध्ये असतील तरच मदिरातील शुभ उर्जा तुम्ही स्वतःमध्ये सामावून घेउ शकाल,तेव्हा पुढचे नियम त्याकरीता..

    2) मंदिराच्या गर्भगृहात/मूलस्थानात प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशव्दाराशी असलेली घंटा वाजवणे......
    ह्यामागेही दोन उद्देश आहेत.. पहिला म्हणजे.. ह्या घंटा विशिष्ट सप्तधातू योग्य प्रमाणात घेऊन बनविल्या जातात. घंटा वाजविल्यानंतर ती तीव्र परंतू किमान सात सेकंद रहाणारा प्रतिध्वनित नाद निर्माण करतील अशा बनविल्या जातात. घंटा वाजवून पुढे निघून न जाता तिच्या खाली उभे राहून नादाची व्हायब्रेशन्स स्वतःमध्ये सामावून घेणे. ह्यामुळे आपली सप्तचक्र तर उद्दीपित होतातच,पण आपला उजवा व डावा मेंदू एकतानतेने ( inco-ordination) काम करु लागतात. तसेच आपल्या मनातील नकारात्मकविचारांचा निचराही होतो. गर्भगृहातील मूर्तीमध्येही ही व्हायब्रेशन्स शोषली जातात.

    3) आपले पांच sences म्हणजे दृष्टी, ऐकणे, स्पर्श, चव घेणे, वासघेणे. यापुढील रुढी हे पांच सेन्सेस उद्दीपित करतात.
    अ. कापूर जाळणे -- दृष्टी
    ब. कापूरारतीवर हात फिरवून ते डोळ्याना लावणे... स्पर्श
    क. मुर्तीवर फुले वाहणे...फुलांच्या अरोमामुळे वास.
    क. कापूर व तुळशीपत्र घातलेलेतीर्थ प्राशन करणे..चव.
    हे तीर्थ तांब्याच्या / चांदीच्या भांड्यात 8 तास ठेवलेले असते, त्यामुळे कफ- ताप असे आजारही जातात.
    ड. घंटानाद व मंत्रोच्चरण....ऐकणे.
    अशाप्रकारे उद्दीपित अवस्थेत व reveiving mode मध्ये आपण गर्भगृहातील आवश्यक तेवढी शुभ उर्जा स्वतःत सामावून घ्यायची असते.
    मूर्तीच्या मागील बाजूस व भोवताली पसरलेली उर्जाही मिळावीम्हणून प्रदक्षिणेचे प्रयोजन..
    पूर्वसुरी म्हणतात, हे सगळे केल्यावर पटकन गजबजाटात जाऊ नका. मंदिरात जरा वेळ टेका. शरिरात उर्जेला समावायला, settle व्हायला वेळ द्या आणि अत्यंत शांत मनाने, आनंदाने, उर्जापूर्ण अवस्थेत आपल्या कामाला जा.
    मित्रमैत्रिणींनो आपल्या पुढच्या पिढीला देवळात कां जायचे हा मोठ्ठा प्रश्न पडलेला असतो. ह्यापुढे देवळात जाण्यामागचा उद्देश लक्षात घेऊनच मंदिरात जा आणि पुढच्या पिढीपर्यत हे ज्ञान पोहोचवण्यासाठी मदत कराल हिच अपेक्षा..

    शुभम् भवतू !!

  • पटसंख्येवरील मुले शाळेत कधी दिसणार ?

    आयएसओ , प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, शाळा सिध्दी, उपक्रमशील शाळा असे नविनच उच्चारण हल्लीच्या शिक्षण प्रक्रियेत ऐकायला मिळत आहेत. तसेच शाळा एक मंदीर आहे. शिक्षक हे पुजारी आहेत . विद्यार्थी हे दैवत आहे . असे काही सुविचार ऐकायला , पहायला मिळतात. एकंदरीत आजच्या शिक्षणप्रणालीचा विचार केल्यास ती विद्यार्थीकेंद्रित आणि कृतीयुक्त बनलेली आहे. तुला मोठा झाल्यावर काय व्हायचे ? या एका प्रश्नाच्या उत्तरावर विद्यार्थ्याचा लेखाजोखा आणि आलेख मांडला जातो. ओझ्याखाली दबलेला विद्यार्थी मुक्तपणे शिक्षणाचा आनंद घेऊ शकत नाही. ज्यास मुक्तपणे शिक्षण मिळत नाही म्हणून मग ते मानवतेच्या शिक्षणात मागे पडतात.

    खाजगी क्लासेस, शिकवणी यांचे वाढते पेव आर्थिक शोषणाचे केंद्रबिंदू होऊ पाहत आहेत. अशा काळात जी मुले गरीबीतील आहेत. आर्थिकदृष्टीने कमकुवत आहेत. त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे काय ? कित्येक कुटुंब मागास आहेत. शिक्षणाची दारे त्यांच्यासाठी बंद आहेत किंवा त्यांना ते दार सापडत नाही.अशा अधांतरी आणि दोलायमान अवस्थेत अनेक मुलं शिक्षण सोडून उदरनिर्वाहासाठी झगडतात. मग भारताचे सुजाण नागरिक बनविण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहते. शालेय शिक्षणाची उपयोगिता लक्षात न आल्याने पिढ्यानपिढ्या परंपरागत अज्ञान, अडाणीपणा यामध्ये जात आहेत. ग्रामीण आणि दुर्गम भागातील मुले कुपोषणाची शिकार बनतात. त्यांना पुरक पोषण आहार न मिळाल्यास त्यांना मृत्यू ओढावतो. अपयश हे कुणी सांगत नसते.उघड झाले तरी सारवासारव होते.हा मानवी स्वभाव सोडला तर मुख्य प्रवाहापासून वंचित राहणारांची संख्या आजही मोठी आहे. शालाबाह्य मुल कळवा आणि हजार रूपये मिळवा अशा काही घोषणा समाजाकडून मिळणार्या सहानुभूतीसाठी केलेल्या असतात. याचा प्रत्यय वेळोवेळी येतो. आजही कित्येक बालकांना सक्तीचे आणि मोफत प्राथमिक शिक्षण मिळत नाही. शालाबाह्य मुलांना मुख्य शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी जे प्रयत्न केले जातात. त्यात शिक्षक एकाकी पडतात. समाजाचा आधार मिळत नाही. शाळेत मुल न पाठवणार्या पालकांना कोणतीही शास्ती अथवा सक्ती कायद्याने नाही. नोकरीसाठी शिक्षण एवढीच शिक्षणाची मर्यादित व्याख्या आज करून ठेवलेली आहे. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी केले जाणारे प्रयत्न कमी पडताहेत त्या ठिकाणी कित्येक मुलं शालाबाह्य ठरतात. अशी मुलं शाळेत दाखल असतात. परंतु वास्तव असे आहे की सतत भटकत असतात. आठवीपर्यंत गैरहजर असली तरीही त्यांना ढकलपास करून पुढे पाठवण्याची व्यवस्था या शिक्षण व्यवस्थेत आहे . त्यामुळे त्यांच्या दाखल्यावर स्पष्ट उल्लेख येतो सतत गैरहजर नाव कमी . असे नाव कमी झालेली बालके भरपूर पहायला मिळतील. ती सर्वच मुले अपयशी ठरतात असे नाही. तर ती मुलं समाजाच्या , निसर्गाच्या शाळेत शिकत असतात. पण सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी शाळा जे कार्य करतात. त्याचे काय? असा प्रश्न निर्माण होतो.

    उदरनिर्वाहासाठी जी कुटुंब स्थलांतरीत होतात त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न प्राधान्यक्रमाने हाताळला पाहीजे. सध्याचा शिक्षणाचा बाजार हा थांबत नसेल तर मग गरीबांच्या लेकरांसाठी असणार्या शाळा प्रयत्नपुर्वक सुधारल्या पाहिजेत. शासन आणि समाज हे करू शकते.

    प्रकाशझोताचा झगमगाट सोडून खरे संस्कारक्षम शिक्षण त्यांच्या झोपडीपर्यंत पोहोचायला हवे. अच्छे दिनचे स्वप्न वास्तवात उतरावयाचे असेल तर त्याची सुरूवात शिक्षणापासूनच व्हायला हवी. कालपरवा एक विद्यार्थी भेटला . कितवीला आहेस ? असा सहज प्रश्न केला. तर आठवीला असल्याचे त्याने सांगितले. शाळेत जातोस का ? तर नाही म्हणाला. मग काय करतोस ? जेसीबी चालवतोय . शाळा का शिकत नाही. असं विचारल्यावर तो गप्प ... म्हणजे एकतर शाळेत नाही गेलं तरी पास होतय असा समज असावा किंवा

    उदरनिर्वाहासाठी जेसीबी चालविणे योग्य वाटले असेल.दुसरा एक त्याचाच मित्र सोबत होता . त्यालाही विचारले ' तू जातोस का शाळेत ? '

    तर त्यानेही नकारार्थी मान हलवली. ' तू पण जात नाहीस वाटतं शाळेत .'

    ' सर , त्याने साखर कारखान्यावर कोयता लावलाय. उचल घेतलीय. त्यो पण आठवीलाय.'

    ती दोन्ही मुलं मागास प्रवर्गातील होती. हे वास्तव चित्र आहे. शाळेऐवजी जेसीबी चालविणे किंवा मग कारखान्यावर ऊस तोडणे योग्य का वाटते? या प्रश्नावर विचारवंतांनी विचार करायला हवा.

    अशी कितीतरी मुलं आहेत की ती शाळेच्या पटावर आहेत पण शाळेत उपस्थित नाहीत. अशा कारणांचा शोध घ्यावा लागेल. तरच त्यावरच्या उपाययोजना सुचतील. स्वयंसेवी संस्था, उद्योजक, शासन, समाज आणि प्रशासन व्यवस्थेने हा प्रश्न समन्वयाने घेतला तरच मार्ग निघू शकतो नसता पुढील पिढी बरबाद करण्याचे काम चालूच राहील!

    -- विठ्ठल जाधव
    शिरूरकासार, जि.बीड
    मो.9421442995