(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मुंबईला ‘बृहन्मुंबई’ बनवणारा एक रस्ता

    मुंबईतील बहुतेक सर्व मुख्य रस्त्यांना स्वतःचा असा इतिहास आहे.. मुंबईवर राज्य केलेल्या (आताच्या नाही, पूर्वीच्या) राज्यकर्त्यांप्रमाणेच मुंबईतील काही रस्त्यांनी मुंबईला जागतिक दर्जाचे महानगर बनवण्यात अहं भूमिका बजावलेली आहे..

      November 12, 2016


  • एडटेक कंपन्यांचे शैक्षणिक संस्थांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह?

    संवादात्मक स्क्रीन ,ऑनलाइन वर्ग तसेच एड टेक स्टार्टअप मुळे विषय अधिक चांगल्या प्रकारे समजतो ,शिकणें मनोरंजक  व जटील संकल्पना समजण्यास मदत होते. संबोध स्पष्ट नसणें हेच शिक्षणाच्या पिछेहाटीचं कारण आहे. पोपटपंची ने करिअर करण्याचे दिवस आता संपले आहेत. शैक्षणिक परीणाम वाढविण्यासाठी डिझाईन केलेले तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर वापरून शिक्षण अधिक आकर्षक व सुलभ बनविले जात आहे.

      April 18, 2022


  • किचन क्लिनीक – कैरी

    आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो हे गाणे झिम्मा फुगडी खेळताना पुरवापार पासून आवडीने गायले जाते.हो हो आज आपण नव्याने ओळख करून घेणार आहोत फळांचा राजा आंबा ह्याची.

    धगधगत्या उन्हाळ्यात मनाला आल्ल्हाद देणारे हे फळ.उन्हाळ्यामध्ये आतुरतेने ह्या फळाच्या आगमनाची वाट पाहिली जाते.असा हा फळांचा राजा.लहान मूलांपासून अगदी वृध्द मंडळीचा देखील हा आवडता आहे.

    ह्याच्या जाती तरी किती,लंगडा,केसर,
    भिष्म,हापूस,मानकुराद,मुशेराद,तोतापुरी,रायवळ इ अनेक जाती आहेत ह्याच्या आणी प्रत्येकाची चव वेगळी बरं का.

    बरं ह्या पासून खायचे प्रकार किती करतात मुरंबा,आमरस,आम्रखंड,आंबा वडी,आंब्याचे साठ,रायते इ हे झाले पिकलेल्या आंब्याचे.तर कारी असताना लोणचे,रायते,पन्हे,चुंदा इ प्रकार फारच सुरेख लागतात.

    चला मग आता ह्याची माहिती पाहूयात ना.आंब्याचा ३०-१२० फूट पर्यंत उंच वृक्ष असतो.पाने ४-१२ इंच लांब असतात फुले छोटी असतात व मादक सुगंध येतो त्यांना.फळ हे वेगवेगळ्या आकाराचे असले तरी कच्चे असताना हिरवे व पिकल्यावर पिवळसर लाल असते.

    आता प्रथम भागामध्ये आपण कैरीचे उपयोग पाहूयात व गुणधर्म जाणून घेऊया.कैरी जी तुरट असते ती शरीरातील वात दोष वाढविते तर आंबट कैरी हि शरीरातील पित्त दोष वाढविते.कैरी उष्ण असते.

    चला मग ह्याचे औषधी उपयोग पाहुया:

    १)जुलाब होत असल्यास तुरट चवीच्या कैरीचा रस थोडा थोडा प्यावा.

    २)आंबट कैरी पासून तयार केलेले पन्हे हे तहान,अंगाची आग शांत करते व तृप्तीचा अनुभव देते.

    3)ज्या व्यक्तिंना कामा अथवा व्यवसाया
    निमित्त वारंवार उष्णतेशी संपर्क येतो त्याच्या डोळ्याचा थकवा घालवायला कैरीचा किस डोळ्यावर ठेवावा.

    ४)उन्हाळ्यात कच्च्या कैरीवर सैंधव मीठ घालून बेताने खाल्ल्यास उन्हाळ्याचा त्रास कमी होतो.

    ५)आंबट कैरीची साल सुकवून केलेली आंबोशी तोंडाची चव वाढविते तसेच हि चिंचे एवजी आमटी भाजीत वापरली जातात.

    कैरी अतिप्रमाणात खाल्ल्यास व अजीर्ण होऊ शकते.

    (क्रमश:)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      December 19, 2016


  • गौरीचे आगमन

    भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला महाराष्ट्रात व देशातही गणपतीची स्थापना होते. प्रत्येक घरात प्रथेप्रमाणे गणपतीची प्राणप्रतिष्ठापणा केली जाते दहा दिवसांनंतर विसर्जन होते. चतुर्थीनंतर गणेशाची माता पार्वती-म्हणजेच गौरी चे त्यापाठोपाठ आगमन होत आहे.

    पश्चिम महाराष्ट्रात गौरी-गणपती, तर मराठवाड्यात महालक्ष्मी असे म्हणतात. महालक्ष्मीचा हा सण तीन दिवस असतो व तो घरोघर साजरा केला जातो. खडय़ाची, कलशाची, मुखवटय़ाची अशा विविध रुपात तिची पूजा केली जाते. श्रावण महिन्यात प्रतिष्ठापना पेलेली ज्येष्ठा व भाद्रपद महिन्यात तिच्या शेजारी बसविण्यात येणारी कनिष्ठा अशा दोघींची जोडीने पूजा होईल. पहिल्या दिवशी आगमन, दुस-या दिवशी गौरी भोजन व तिसर्याज दिवशी म्हणजेच भाद्रपद शुक्ल अष्टमीला या गौरी -महालक्ष्मीचे विसर्जन करण्यात येते. या निमित्ताने गौरी रेखाटन कलाही विकसित झाली आहे. मातीच्या सुगडावर पिवडी व चुना यांचा वापर करून गौरीचे मुख रेखाटले जाते तर त्या सभोवती शंख, चक्र, पद्म, गदा, हस्त, गाय वासरु, तुळशी वृंदावन, स्वस्तिक, गौरीची पावले अशी प्रतिक चिन्हेही रेखाटली जातात. गुरवारी गौरीचे आगमन होईल. शुक्रवारी गौरीच्या जेवणाचा थाट असेल तर शनिवारी गणपतीसोबत गौरीला निरोप दिला जाईल.

    कुटुंबाला एकत्र आणणाऱ्या या गौरीच्या आगमनाची उत्सुकता लहानथोर सर्वानाच असते. मग काय गौरीचं आवाहन, तिची पूजा ते तिच्यासाठी केली जाणारी सजावट, तिचं नटणं, थटणं, पंचपक्वानांचा केला जाणारा बेत आणि गौरीसाठी जागविलेल्या रात्री असं खूप काही गौरी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे. गौरीपूजनाला पहिल्या दिवशी शेपूची भाजी व भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी महालक्ष्मी पूजन असून सवाष्ण जेवायला घालतात. हा इथला मुख्य समारंभ असतो. त्यानंतर आरती करून पुरणपोळीचा बेत असतो.काही ठिकाणी गौरीच्या नैवेद्याला घावन घाटले करण्याची पद्धत आहे. आणि तिसऱ्या दिवशी पानावर दहीभात व कानवल्याचा नवेद्य देऊन गौरींचं विसर्जन केलं जातं.

      September 8, 2016


  • अभिनेता सिद्धार्थ जाधव याची स्वाक्षरी

    माणसाच्या दिसण्यापेक्षा त्याचे खरे असणे किती म्हणवाचे असते हे सिद्धार्थच्या यशावरून आणि त्याच्या माणूसपणावरून दिसून येते. सिदार्थ जाधव याला खरा हात दिला तो केदार शिंदे यांच्या ‘ लोच्या झाला रे ‘ या नाटकाने. अभिनेते संजय नार्वेकर यांना सिद्धार्थ खूप मानतो. केदार शिंदे यांच्या ‘ लोच्या झाला रे …’ या नाटकांनंतर खऱ्या अर्थाने त्याला ब्रेक मिळाला असे म्हणता येईल

      October 23, 2019


  • आजच्या तरुणांपुढील आदर्श व आव्हाने

    मला एक असा तरुण मिळवुन द्या की जो शरीराने तंदुरुस्त आहे, त्याच्या इच्छा व विकार त्याच्या ताब्यात आहेत. त्याचे मन आरशासारखे पारदर्शक व स्वच्छ आहे. तर मी जगात कोणताही चमत्कार करुन दाखवेन.” – थॉमस हक्सले खरं आहे, आजच्या जगाला विकसीत करणारा एकमेव सक्षम घटक म्हणून तरुणाईकडे पाहीले जाते. सामाजिक उत्थानाची जबाबदारी असलेल्या या तरुणांपुढे काय आदर्श व आव्हाने आहेत? हा प्रश्न एखाद्या वयस्कर माणसाला विचारला तर त्याचे उत्तर कदाचित असे असेल. आजच्या तरुणांना आदर्श बघवत नाहीत आणि आव्हाने पेलत नाहीत – खरीच अशी परिस्थिती आहे का? आजची तरुण पिढी ही उद्याची मार्गदर्शक पिढी असेल. त्यामुळे या तरुणांनी दूरदृष्टीने विचार करुन काही मुलभुत आव्हाने पेलणे आवश्यक आहेत.

      June 3, 2017


  • सरकारी कार्यालयातला ‘गटारी’ भ्रष्टाचार !

    …सरकारी कार्यालयाचे वाॅचमन, कार्यालयातील शिपाई, लिफ्टमन आदींचं समाधान दोन-पाचशे रुपयांच्या वर्गणीवर होतं. कारण त्यांची मजल तेवढीच असते. तेवढ्यावर मिळणारं एखादं गटार त्यांना पुरेसं असतं. खरी गटारी तर त्यांच्या पुढच्या डेसिग्नेशन्सवर असलेल्यांची आणि त्यांची तिथे नेमणूक करणार्‍या राजकारण्यांची असते. हे गटारी निमित्त वर्गणी वैगेरे काढत नाहात. ते एका दिवसाच्या गटारीवर समाधानीही नसतात. त्यांची गटारी वर्षभर सुरुच असते आणि लोळण्यासाठी गटारं असतात, ती ‘लाचे’ची, कॅश आॅर काईंड आॅर बोथ..! ही गटारं साधी, झोपडपट्टीतल्यासारखी गरजेपोटी निर्माण झालेली नसतात, तर मुद्दामहून तयार केलेले परंतू वरून गुळगुळीत गिलावा केलेले मोठे, गलित्छ नाले असतात…

      July 26, 2017


  • देवा वाचव माझ्या देशाला व जनतेला

    *देवा वाचव या देशाला व समाजाला या...............पासुन*

    सर्व पत्रकार बांधवांस,
    सप्रेम नमस्कार
    पत्रास कारण कि, कमाल वार्तांकन करणाऱ्या एका पत्रकाराला मंत्र्याने दिलेली उद्दाम वर्तणूक पाहिली. मंत्री चुकलेच,
    पण माझ्या मनात काही शंका निर्माण झाल्या आहेत. त्याची उत्तरे मिळतील अशी अपेक्षा आहे.

    संबंधित मंत्री जे काही बोलले तो प्रसंग चुकीचा असला तरी त्यांनी जे काही सांगितले ते मात्र अजिबात चुकीचे नाही. तुम्ही *टीआरपीसाठी* काहीही करू शकता असे मंत्रयांचेच नाही तर सामान्य माणसांचेही म्हणणे आहे.

    26/11 च्या हल्ल्यात तुम्ही जे वागलात ते आम्ही पाहिले. कालच्या महाड दुर्घटनेत तुम्ही प्रतिक्रिया घेण्याच्या नावाखाली जी काही *धुडगूस* घालत होता तेही आम्ही पाहिले. तुम्ही बीबीसी वगैरे बघत नसाल कदाचित. त्यामुळे गांभीर्य वगैरे प्रकारांशी तुमचा काहीही संबंध आलेला नाही. पर्वा फ्रान्सच्या नाईस शहरात दहशतवादी हल्ला झाला. मी एकही *मृतदेह*माझ्या टीव्हीच्या पडद्यावर पहिला नाही, *रक्त*नाही आणि झीट आणणारा बूमधारी *सर्वज्ञांचा*कर्कश कोलाहलही नाही. तो मला *9/11*लाही दिसला नव्हता.
    *एक लक्षात घ्या, तुम्ही पत्रकार आहात *न्यायाधीश*नाहीत.
    तुमची बदललेली भाषा कळते आम्हाला.*याना शिक्षा करा*याना *फासावर लटकवा*" "यांची *चामडी सोला,*" "*यांचे राजीनामे घ्या* असले तुमचे मथळे. आणि भाषा अशी कि, सगळे ज्येष्ठ तुमच्यासोबत शाळेत गोट्या खेळत होते. अजून शेंबूड पुसता येत नाही अशी तुमची अँकर माजी* मुख्यमंत्र्यांना थेट नावाने हाक मारते. "जी", "सर" असली आदरार्थी विशेषणे फक्त तुमच्या संपादकांसाठी आहेत असा तुमचा समज असेल तर तसे एकदा जाहीरच करून टाका.
    तुम्ही जनहितार्थ असाल तर तसेही काही नाही. पक्ष बघून तुमचा आवेश ठरतो. रोज उठून लोकांना ढुशा देणारा "*बोधामृतफेम* संपादक स्वतःच लिहिलेला अग्रलेख दुसऱ्या दिवशी चक्क मागे घेतो. डुकराचे कार्टून छापणार वृत्तपत्र जाहीर माफी मागत. एका वृत्तपत्राचा आणि वाहिनीचा मालक चार महिने जेलात आहे. दुसऱ्या वाहिनीचा मालक कोळसा घोटाळ्यात आहे. एक आमदार लाईव्ह टेलिकास्ट मध्ये संपादकाने कशी पाकिटे घेतली त्याचा उद्द्धार करतो. एक पत्रकार पत्रकारांवरच सेन्सॉरशिपची मागणी करतो, दुसरी पत्रकार त्याला शिव्या देते, एक दीड शहाणा गोमांस खातानाचा फोटो फेस बुक वर टाकतो, एका इंग्रजी दैनिकाचा पत्रकार फेसबुकवर हिंदुत्ववाद्यांची अर्वाच्च्य शब्दडांत आई बहीण काढतो, आणि गुन्हा दाखल होऊ नये म्हणून तुमच्या संघटना दबाव आणतात तेव्हा तुमची निषेधाची तोंडे का बंद होतात?? तेव्हा कुठे जातो तुमचा ताठ कणा आणि बाणा??

    तुम्ही गप बसलात तरी सोशल मीडिया नावाचा तुमचा बाप जिवंत आहे हे लक्षात ठेवा.

    मेहता चुकलेच. पण पत्रकाराचा प्रश्न काही फार बरोबर होता असेही नाही. "लोकांच्या मनात तुमच्याबद्दल रोष आहे" हा आपत्कालीन स्थितीतला प्रश्न आहे का? आपत्कालीन स्थिती प्रशासनाने हाताळायची आहे, त्यासाठी नियंत्रण कक्ष असतो. तिथे काय स्थिती आहे हे एकही चॅनेलने दाखवली नाही. एखाद्या माणसाला शोधायचे आणि त्याला ठोकून काढायचे, हे धंदे बंद करा. गांभीर्य ओळखा.

    मंत्री आजपर्यंत खासगीत तुम्हाला शिव्या घालत होते, आज जाहीर घालू लागलेत.

    खांडेकर म्हणाले "देवा, या देशाला नेत्यांपासून वाचव असे म्हणण्याची वेळ येणार आहे"
    लोक म्हणातात, "देवा, या देशाला पत्रकारांपासून वाचव असे म्हणण्याची वेळ येऊन गेली आहे"

    आणि हा प्रसंग तुम्ही तुमच्या कर्माने स्वतःवर आणला आहे, हे वेळीच लक्षात घ्या, नाहीतर जी काही छाटकभर इज्जत आणि विश्वासार्हता शिल्लक राहिली आहे तीपण गमावून बसाल.
    *टीआरपी साठी देशाचे व समाजाचे नुकसान करू नका*

      August 7, 2016


  • सौभाग्यलेणं – जोडवी

    जोडवी हा मंगळसूत्रानंतर घातला जाणारा सौभाग्यलंकार आहे. सप्तपदी दरम्यान नववधूच्या पायात जोडवी घालण्याचा स्वतंत्र विधी असतो. म्हणजेच मंगळसूत्र आणि जोडवी हे दोन अलंकार सौभाग्याचे प्रतिक मानले जातात. ते आयुष्यभर ठेवण्याची प्रथा आहे.

      March 8, 2024


  • श्रीगोविन्दाष्टकम् – मराठी स्वैर गद्य व पद्य अर्थासह

    श्रीमद् शंकराचार्यांनी हे श्रीकृष्णाच्या विविध लीलांचा उल्लेख करणारे रसाळ स्तोत्र आर्या वृत्तात रचले आहे. अनुप्रास अलंकाराने ते विशेष नटले आहे. त्यामुळे ते अतीव गेयही आहे. ते वाचताना काही ठिकाणी ‘परब्रह्म निष्काम तो हा’ या संत नामदेवांच्या निर्गुणाचे सगुण रूप खुलवून सांगणा-या अभंगाची आठवण झाल्याखेरीज रहात नाही. फक्त त्यांचा बाळकृष्ण राजमंदिरात रांगतो, तर आचार्यांचा गोठ्यासमोरच्या पटांगणात !

      December 27, 2020