(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • काचेची घरं

    काचेची घरं’ हे या लेखाचं शीर्षक असलं तरी ‘घर’ म्हटल्यावर आपल्या नजरेसमोर जे चटकन चित्रातलं वा प्रत्याक्षातलं घर येतं, त्याबद्दल मला काही लिहायचं नाही. मला मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांत अलिकडे ज्या काचेच्या तावदानांच्या भल्या मोठ्या इमारती उभ्या राहील्या आहेत व अजूनही उभ्या राहात आहेत, त्यावर मला काय वाटतं ते तुम्हाला सांगायचंय.

  • कर’णाराला जवळच्या माणसांकडून ‘डरा’यलाच हवं !

    आप’मधे केजरीवाल विरूद्ध कपील शर्मा, ‘बीएसपी’त मायावती विरूद्ध नसिमुद्दीन सिद्दीकी यांनी त्यांच्या त्यांच्या सर्वोच्च नेत्यांवर लावलेल्या आरोपातून काय सिद्ध होतं? हेच, की राजकारण आणि पक्ष ही कमी वेळात भरपूर पैसे कमवायचं उत्तम साधन आहे.

  • बुके; की बुक?

    हल्ली कार्यक्रम कोणताही असो, फुलांचा गुच्छ उर्फ ‘बुके’ देण्याची प्रथा चांगलीच रुजलीय. ही प्रथा एवढी रूजलीय, की एकदा भोईवाडा स्मशानात एका प्रतिष्ठीत व्यक्तीच्या प्रेतावर एकाला बुके ठेवताना पाहीलं. “अरे हे काय?” म्हणालो, तर म्हणे “हार संपले होते म्हणून बुके आणला. हारातही फुलं आणि बुकेतही फुलंच, काय फरक पडतो?” हे ही वर सांगत होता.

  • आज आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन

    रुग्ण सेवेसाठी परिचारिका ही अतिशय महत्त्वाची व्यक्ती आहे .रूग्णसेवा हीच इश्वर सेवा मानून कितीही अडचणी, समस्या आल्या तरी त्याची पर्वा न करता रूग्णांची सेवा, त्यांची सुश्रूषा करणे हेच आमचे अद्य कर्तव्य असल्याची भावना अनेक परिचारिकांची असते. १२ मे रोजी जगप्रसिद्ध परिचारिका फ्लोरेन्स नाइंटिगेल यांची जयंती असते. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन याच दिवशी साजरा होतो.

    मॉडर्न नर्सिगची सुरुवात आणि जडणघडण इस्पितळांच्या चौकटीतच झाली आहे. नव्या जमान्यात समाजाला आरोग्य सेवा प्रदान करताना आरोग्य सेवेत आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता जाणवू लागली आहे. लोकांच्या आरोग्यविषयक गरजांची पूर्तता आणि वैयक्तिक देखभाल याचा विचार केला तर नर्सिग हा सर्वात मोठा समूह आहे. रुग्णाने लवकरात लवकर तंदुरुस्त होऊन चांगल्या आरोग्याच्या दिशेने वाटचाल करावी, हा सुश्रुषेचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे. जगभरातील परिचारिका रुग्णांची देखभाल करताना याच उद्देशाने रुग्णांची दैनंदिन सुश्रुषा करत असतात.

    रुग्ण, परिवार आणि समाजाला दैनंदिन जीवनात आनंद लाभावा, त्यांचे आरोग्य सुधारावे आणि त्यांना रुग्णस्थितीतून बाहेर पडता यावे, यासाठी सृजनात्मक आणि नव नव्या उपायांचा परिचारिका प्रयोग करत असतात. अशा बदलांना मूर्त स्वरुप देताना परिचारिका आघाडीवर आहेत. विविध क्षेत्रातील रुग्णांची सेवा करताना परिचारिकेला ज्ञान, कौशल्य आणि सेवाभावी वृत्तीची जोड अनिवार्य आहे. बेसिक बी.एस्सी. नर्सिग कार्यक्रमांतर्गत अनेक संस्था परिचारिकांना ज्ञान, कौशल्य, सेवावृत्तीचे प्रशिक्षण दिले जात आहे. नर्सिग हा सेवाभावी तसेच आरोग्य आणि लोकांच्या आरोग्यप्रती स्वत:चे योगदान देणारा व्यवसाय आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग बत्तीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक सात

    निसर्गाचे नियम सर्वांसाठी सारखेच - भाग सात !

    जमिन एकच. पाणी एकच. मातीतून मिळणारे पोषण एकाच प्रकारचे. पण एकाच वेळी कारले, जांभूळ, चिंच, आंबा, मिरची अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बीया रूजत घातल्या, तरी तयार होणारे झाड वेगळेच होते. फक्त बी वेगळी असली की, झाडांचे रूप रंग सगळंच बदलून जातं. यालाच निसर्ग म्हणतात.

    एकाच मातीच्या गोळ्यात या सर्व बीया एकत्र करून ( सीड बॅक करून ) जरी जमिनीत पुरल्या तरी त्या बीयांना आवश्यक ते सर्व पोषण त्याच जमिनीतून घेतले जाते. आणि या बियांतून निर्माण होणाऱ्या प्रत्येक झाडाला गोड आंबट तिखट तुरट फळे लागतात. यालाच निसर्ग म्हणतात.

    तसंच प्रकृतीचं आहे. एकाच आई वडीलांच्या जीन्समधून जन्माला आलेल्या बहिण भावंडांच्या प्रकृती वेगवेगळ्या असतात, विचार वेगळे असतात. पचनशक्ती वेगळी असते, ताकद, प्रतिकारशक्ती सगळंच वेगळं असतं. यालाच निसर्ग म्हणतात.

    प्रकृती म्हणजेच निसर्ग !
    सगळा निसर्ग, अख्खं ब्रह्मांड नाही समजलं तरी चालेल. आपली प्रकृती ओळखता आली तरी पुरेसं आहे. कारण आपली प्रकृती हे विश्वाच छोटंस रूप आहे. या प्रकृतीलाच निसर्ग म्हणतात.

    बीयापासून झाड बनायला प्रत्येकाला वेगवेगळा वेळ लागतो. प्रत्येक झाडावर कळी यायचा वेळ वेगळा असतो. कळीचं रूपांतर फुलात आणि पुढे फळात व्हायला काळ जावा लागतो. या काळालाच निसर्ग म्हणतात.

    रोगाची सुरवातीला काही लक्षणे निर्माण होतात. या लक्षणांना योग्य वेळी ओळखता आले पाहिजे. नाही तर ती लक्षणे पुढे रोगात रूपांतरीत होतात. ही लक्षणे निसर्ग आपणाला सांगत असतो. निसर्गाशी एकरूप होता आलं, की ही लक्षणे आपणाला सहजपणे कळतात. या जाणीवेला निसर्ग म्हणतात.

    ही जाणीव प्रत्येकाला जन्मापासूनच असते. किंबहुना जन्मापूर्वीपासूनच असते. म्हणून तर जन्माला आल्यावर लगेचच दूध ओढून आत गिळायचे असते, हे बाळाला न शिकवता कळत असते. हे शिकवणाऱ्याला निसर्ग म्हणतात.

    हे सर्व शिकवणारा निसर्ग हा सर्वात मोठा गुरू आहे. शिकण्यासाठी आवश्यक असतील ते सर्व गुण, प्रत्येक शिष्याने योग्य प्रकारे आत्मसात केले की, कोणाही शिष्याला ज्ञानप्राप्तीला वेळ लागत नाही.
    कारण,
    शिकवणारा गुरू सर्वांना एकाच पद्धतीने शिकवत असतो. कारण निसर्गाचे नियम सर्वांसाठी सारखेच असतात.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    12.05.2017

  • नव्या पैशांची ‘षष्ठ्यब्दीपूर्ती’ !!

    स्वातंत्र्योत्तर काळात, लोकांना सहज करता येत असलेले परंतु आकडेमोडीसाठी अत्यंत किचकट आर्थिक व्यवहार सुलभतेने व्हावेत, म्हणून १ एप्रिल १९५७ रोजी दशमान पद्धत आणि नवीन नाणी व्यवहारात आली. या ” नव्या ” म्हटल्या गेलेल्या पैशांची आता ” षष्ठ्यब्दीपूर्ती ” साजरी होत आहे. त्या निमित्ताने हे थोडे स्मरणरंजन !! ” नवाकाळ” वृत्तपत्राने माझा हा लेख प्रसिद्ध केला आहे.

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग एकतीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक सात

    निसर्गाचे नियम - सर्वांसाठी सारखेच - भाग सहा !

    काही फळांचे "सीझन" असतात. काही फुलांचा "हंगाम" असतो. काही वनस्पतींची "बेगमी" विशिष्ट मोसमातच करावी लागते. भाताची शेती पावसाळ्यातच केली जाते. असे का ? यालाच तर "निसर्ग" म्हणतात.

    आंबे आंब्याच्याच दिवसात, म्हणजे मार्च, एप्रिल, मे, या महिन्यातच का लागतात ?
    जांभळे, करवंदे, जाम, फणस ही फळेदेखील याच महिन्यात मिळतात. गुलमोहराचा बहर आत्ताच सुरू असतो. असे का होत असावे ?

    निसर्गाने मानवाला भरभरून दिले आहे.
    केवळ मानवालाच नव्हे तर निसर्गातील प्रत्येकाला इथे विशिष्ट जागा, आजच्या भाषेत "स्पेस" आहे.
    निसर्गातील प्रत्येकाला जगण्यासाठी आवश्यक ते सर्व निसर्गानेच तयार करून दिलेले आहे. सहा महिन्यांचा आदान काल आणि सहा महिन्यांचा विसर्ग काल त्यानेच बनवलेला आहे. पण आपण ते युक्तीने वापरत असतो. सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधे शक्तीचे हे मैत्रीपूर्ण आदान प्रदान, कोणाच्याही, कोणत्याही तक्रारीशिवाय सुरू आहे. आणि असेच पुढे देखील सुरू राहणार आहे.
    ज्या कालावधीमधे निसर्गाने द्यायला सुरवात केली आहे, त्यावेळी त्याच्याकडून आनंदाने घेत जावे. फळे दिली फळे, फुले दिली फुले, ऊन दिले तर ऊन. पाऊस दिला तर पाऊस आणि देईल तेवढी थंडी. त्यापासून स्वतःचा फायदा करून घेत स्वतःचा बचाव कसा करायचा ही युक्ती आहे.

    उन्हाळ्यात मिळणाऱ्या फळांचा आस्वाद तेव्हाच घ्यावा. गरज असेल तर औषधी स्वरूपात टिकवून ठेवावा, औषधी स्वरूपात टिकवून ठेवण्यासाठी आसव अरीष्ट, अवलेह, गुटी, वटी, गुलकंद इ. स्वरूपात कोणत्याही रासायनिक टिकाऊ द्रव्याशिवाय टिकवून ठेवायच्या पद्धती देखील अभ्यासक्रमात शिकवल्या जातात.

    व्यापारी वृत्ती आली आणि त्यातील औषधी गुण कमी होत गेले. हवं तसं ओरबाडण्याची वृत्ती निर्माण झाल्यामुळे देखील काही दिव्य औषधी कायमच्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचे संवर्धन, संगोपन होणे तेवढेच गरजेचे आहे.

    जे द्रव्य नाशीवंत आहे, त्यावर प्रोसेस करून ते द्रव्य टिकवले जाईलदेखील, पण त्यातील औषधी गुणधर्म कमीच होतो, नैसर्गिक अधिवासामधे उगवलेली शतावरी, गुळवेल या सारख्या वनस्पती आणि कल्टीव्हेटेड वनस्पती यांच्या गुणांमधे नक्कीच फरक पडतो.

    औषध म्हणून वापरायचे असल्यामुळे चालेल. पण जीभेचे चोचले म्हणून, फक्त तीन महिन्यात मिळणारा आंबा, "रस" या स्वरूपात टिकवून ठेवून, पावसाळ्यात खाल्ला तर त्रास नक्कीच होणार.

    निसर्ग म्हणतो, तुम्हाला मी आंबे तयार करून पाठवलेले होते. तेव्हा तुम्हाला खायला वेळ नव्हता, तोच आंबा पुढे "अ-काली" खाल्ला तर, अकारण अग्निमांद्य निर्माण करून घेणार. जी गोष्ट आंब्याची तीच अन्य सर्व अन्नपदार्थांची ! इन्स्टंट फास्ट फूड आणि टू मिनटस मे रेडी पदार्थांची !

    पाश्चात्य देशात, त्या देशांची ती गरज आहे, त्यांना निसर्ग अनुकूल नाही.
    अत्यंत प्रतिकुल परिस्थितीमधे ही मंडळी राहत असतात. चौवीस तास बर्फ, अवेळी पाऊस, चुकुन सूर्य दिसला तर आनंद होऊन, "गुड माॅर्निंग" म्हणणारे ते देश ! अन्य शेती व्यवसाय करायचा म्हटला तरी त्यांना ते शक्य होणारे नसते. म्हणून निसर्गाला पूरक परिस्थिती निर्माण करीत अन्नधान्यांचा साठा करावा लागणे, ही त्यांची गरज आहे.

    आमच्याकडे " एव्हरी डे इज गुड माॅर्निंग " असताना, सिझनल फळे, फुले, भाज्या इ.इ. सर्व उपलब्ध होत असताना, ज्युस काढून पुनः त्यात विषारी किटकनाशके घालून, टिकवून, निसर्गाच्या विरोधात जाऊन, अवेळी खाऊन, रोग वाढवून, पुनः त्यासाठी अनैसर्गिक औषधे खायची !

    ही हौस भारीच म्हणायची !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    11.05.2017

  • एक संकट असेही – ब्ल्यु व्हेल

    गेले कित्येक दिवस ब्ल्यु व्हेलची माहिती गोळा करायचा प्रयत्न करतोय, परंतु हाती ठोस असे काही लागेना. काल (१ मे २०१७ रोजी ) युरोपियन पोलीसांनी ब्ल्यु व्हेलवर अधिकृत बंदी घातली आणि सोशल मिडीयातून बरीच इन्फो लिक झाली... आणि ब्ल्यु व्हेलचा खतरनाक थरकाप समोर आला. हा तुम्हाला आत्महत्या करायला लावणारा व भाग पाडणारा एक आॅनलाईन गेम आहे. याचे मायाजाल इतके स्ट्राॅंग आहे की प्रसंगी स्वतंत्रपणे खेळणार्‍या दुसर्‍या व्यक्तीला समाविष्ट करुन आत्मघात करायला लावणारा हा खेळ खेळला जातोय. हा खेळ खेळायला उद्युक्त होणारा वयोगट आहे १२ ते ५२. हा गेम पुर्णतः आॅनलाईन असल्याने तुमच्या गॅजेटवर त्याचा पुरावा सापडत नाही. ठराविक कालावधीनंतर त्या फाईल्स डिलीटच नव्हे तर गायब होतात. ह्या गेममधे एकंदर पन्नास टास्क दिले जातात. पन्नास टास्क पार पाडताना, एक लेवल पुर्ण झाली कि हातावर एखाद्या चाकूने किंवा अणकुचिदार वस्तूने मार्क करुन घ्यायचा ज्यामुळे किंचित का होईना रक्त येईल. तुम्ही पहिल्याच टास्क आणि लेव्हल मधे इतके संमोहित किंवा हिप्नोटाईज झालेले असता कि सातत्याने त्या गेमचाच विचार करत रहाता. तुमच्या रोजच्या व्यवहारांवर मात्र कसलीच बाधा येत नाही. असे एकंदर पन्नास टास्क पुर्ण करायला हा गेम भाग पाडतो...आणि पन्नासावा टास्क आत्महत्या..! सोप्यात सोपी आत्महत्या कशी करावी याबद्दल इथे ट्रेनिंगही दिले जाते व उदाहरण म्हणून व्हीडीओ द्वारा पटवूनही दिले जाते. हातावर मनगटाच्या खाली फोरआर्मसवर केलेल्या खुणानी व्हेल माशाची आकृती तयार करायला सांगितली जाते.तुम्ही एवढे संमोहित होता कि तुम्ही त्यांच्या सुचना सहजगत्या पाळू लागता आणि नकळतपणे त्यांच्या आधीन होता. काही लेव्हल्स पार पाडताच तुमच्या घरी जी व्यक्ती ब्ल्यु व्हेल खेळंत असेल त्याच्या आवडीच्या वस्तु येउ लागतात. मुख्य म्हणजे खेळणार्‍या व्यक्तीच्या त्या रोजच्या वापरातल्या वस्तु असल्याने त्याबद्दल पालकांना आणि मित्रानाही पुसटशी शंका देखिल येत नाही. खेळणार्‍या व्यक्तीच्या अकाउंटला पैसे जमा होत रहातात. त्रयस्थ व्यक्तीला हे पैसे टास्क पूर्ण केल्याबद्दलचे आहेत हे कळल्यावर विश्वास बसेल असा हा गेम आहे. या गेमची रचना इतकी जबरदस्त आहे कि सर्वसामान्य लोक, त्या व्यक्तीचे मित्र व नातेवाइक कुठलाही विरोध न करता त्याला प्रोत्साहित करत रहातात...आणि अशा रितीने ब्ल्यु व्हेल गेम खेळणारी व्यक्ती ५० टास्क नंतर आत्महत्या करते, ज्याचे कारण फक्त आणि फक्त गेमला आणि त्या व्यक्तीलाच माहित असते. रशियात गेल्या काही महिन्यातच १५० च्या आसपास आत्महत्या घडून आल्यात. वयोगट आहे १२ ते ५२. आता हे लोण युरोपमार्गे भारतात येतंय. भारतात नेटच्या आहारी जाण्याचे प्रमाण भयंकर आहे. तरुण मुलांमधे तर खुपच..! यावर विनंती एकच कि मुलांच्या सर्फिंगबाबत प्रचंड सतर्क रहाण्याची वेळ येउन ठेपलीय. अर्थात यावर रेमिडी ही ज्याची त्यानेच शोधायचीय..!

    -- भाकु

  • दातासंबंधीचे समज-गैरसमज

    दातासंबंधीचे जे समज-गैरसमज दातांच्या डॉक्टरांकडे जाण्यापासून बऱ्याचदा आपण या समज-गैरसमजामुळे परावृत्त होतात. दातांच्या बाबतीतला सर्वात लोकप्रिय गैरसमज जर कुठला असेल तर दात काढल्यानंतर नजर कमी होणे किंवा डोळ्यांची बघण्याची क्षमता कमी होणे हा होय. आणि या बाबतीत लहानथोरांपासून सर्व जनमाणसांत एकवाक्यता आहे. खरं म्हणजे दात काढल्यानंतर डोळ्यांवर कुठलाही दुष्परिणाम होत नाही. याला शास्त्रीय आधार आहे.

    दाताला आणि डोळ्यांना रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी तसेच संवेदनांचे ज्ञान असणारी चेतातंतू किंवा नसा या वेगवेगळ्या असतात. त्यामुळे दात काढल्यानंतर डोळ्यांवर परिणाम होणे शक्य नाही. हा गैरसमज पसरण्याला काही कारणे आहेत. बऱ्याचदा दातांची समस्या आपण प्रौढ वा चाळिशीत असताना होते. (खरं म्हणजे चाळिशीत सर्वच अवयवांची थोडय़ाफार प्रमाणात कुरकुर चालू होते.) त्यातच दात काढल्यानंतर आपल्या मनात असलेल्या गैरसमजामुळे आपण डोळ्यांच्या डॉक्टरांकडे डोळे तपासायला जातो. या चाळिशीत इतर अवयवांप्रमाणे डोळ्यांचीही क्षमता थोडीफार कमी झालेली असतेच (कदाचित यामुळेच चष्म्याला ‘चाळिशी’ असंही काही ठिकाणी म्हणतात.) त्यामुळे डोळ्यांच्या डॉक्टरांनी चष्मा लावायला सांगताच आपण दातांचा काढण्याचा व डोळ्यांचा खराब होण्याचा संबंध लावतो. परंतु शास्त्रीयदृष्टय़ा हे खरे नाही. अगदी लाखात एखादा पेशंट जो वरच्या दातांवर प्रचंड सूज येऊन ती डोळ्यापर्यंत पोहचेपर्यंत जर डॉक्टरांकडे गेला नाही किंवा त्याचे इन्फेक्शन अनियंत्रित होऊन डोळ्यापर्यंत गेले तरच डोळ्यांना इजा होऊ शकते. परंतु हे प्रमाण लाखात एखादा वा त्याहूनही कमी असते. कारण हल्ली सर्वजण आपल्या आरोग्याबद्दल जागरूक असतात.

    दातांबद्दलचा अजून एक लोकप्रिय गैरसमज म्हणजे डेंटिस्टकडे जाऊन क्लिनिंग केल्यानंतर दात हलतात. हा गैरसमज पसरण्यामागची पाश्र्वभूमी आपण समजून घेऊ या. जेव्हा आपण आपल्या डेंटिस्टकडे दात साफ करण्यासाठी जातो किंवा डेंटिस्ट आपल्याला दात साफ करण्याचा सल्ला देतात तेव्हा दातांमध्ये किंवा हिरडय़ांमध्ये अन्नकण अडकून त्याचा ‘प्लाक’ (एक प्रकारचा छोटासा चिवट दगडासारखा घट्ट पदार्थ) तयार झालेला असतो व तो दातांच्या फटीमध्ये व हिरडी व दात यांमध्ये घट्ट चिकटलेला असतो. त्यामुळे हिरडय़ांना इन्फेक्शन होऊन हिरडय़ांतून/दातांतून रक्त वाहते वा मुखदरुगधीचा त्रास संभवतो. ज्यावेळी डेंटिस्ट आपले दात साफ करतो त्यावेळी हा ‘प्लाक’ काढणे गरजेचे असते. हा प्लाक काढल्यानंतर दात व हिरडी येथे एक प्रकारची जागा तयार होते. त्यामुळे काही काळ आपल्याला दात थोडेसे हलल्यासारखे वाटू शकतात. परंतु ही तात्पुरती जाणीव असते. काही तासांत ती जागा भरून येऊन हिरडी व दात एकमेकांना घट्ट चिकटतात. त्यामुळे रुग्णांनी घाबरण्याचे मुळीच कारण नाही. उलट दातांच्या व हिरडय़ांच्या आरोग्यासाठी वर्षांतून एकदा तरी आपल्या डेंटिस्टकडे जाऊन दात साफ केल्याने त्यांचे आयुष्य वाढतेच.

    प्लाक काढल्यानंतर दातांच्या व हिरडय़ांमध्ये पोकळी भरून येणाऱ्या काळात अति थंड किंवा अति गरम पदार्थ टाळावेत. कारण या काळात दातांच्या व हिरडय़ांच्या मधला भाग संवेदनशील असतो वा जेथे चेतातंतू जास्त उद्दीपित होतात तेथे थंड व गरम पदार्थाने काही काळ दाताला ठणके बसू शकतात. परंतु हाही तात्पुरता बदल असून काही काळाने त्रास जाणवत नाही. शिवाय यात एक फायदा असाही आहे की डेंटिस्टला दात साफ करताना आपला एखादा दात जर किडण्यास सुरुवात झाली असेल तर तो प्राथमिक अवस्थेत ध्यानात येऊन कमी खर्चात व कमी वेळेत तो वाचण्याची शक्यताही असते.

    दात साफ करताना एक भीती मनात घर करून असते ती म्हणजे आपले दात झिजतील का किंवा साफ केल्याने पातळ होतील का? हा गैरसमज होण्याचे एक कारण म्हणजे डेंटिस्ट दात अल्ट्रासोनिक स्केलरसारख्या मशीनने साफ करतात.

    शिवाय दात साफ केल्यानंतर काही वेळा थंड पाणी व गरम चहा पिताना दात सळसळतात. यातील पहिले कारण प्रथम शोधू. अल्ट्रासोनिक स्केलर हे जरी मशीन असले तरी ते फक्त व्हायब्रेशन या तत्त्वावर काय करते. त्यात दात घासण्याच्या किंवा दात कटिंग करण्याच्या उपकरणाचा समावेश नसतो. फक्त व्हायब्रेशन होऊन दातांमधला फ्लक किंवा डाग काढले जातात. हे अतिशय नाजूक व चांगले मशीन असून यामुळे दातांची व हिरडय़ांची कुठलीही झीज होत नाही. मात्र दुसरे कारण काही प्रमाणात खरे आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग तीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक सात

    निसर्गाचे नियम - सर्वांसाठी सारखेच - भाग पाच !

    निसर्ग निसर्ग म्हणजे तरी काय ?
    साधे सोपे उत्तर येईल.
    व्यवस्था.
    निसर्ग म्हणजे व्यवस्था, नियम.

    सूर्य उगवतो, अस्ताला जातो. दिवस होतो, रात्र होते, ग्रह विशिष्ट दिशेने फिरतात, उपग्रह फिरतात. त्याच्यामुळे ग्रहणे होतात, वारा वाहातो, झाडे बहरतात, फुल उमलते, फळ बनते, झाडावरून फळ खालीच पडते, बी तयार होते, इकडे तिकडे जाते, पुनः नवीन वृक्ष बनतात.

    हे सर्व काय आहे ?
    त्याने नेमून दिलेले नियम आहेत. त्रिकालाबाधित सत्य !
    कधीही न बदलणारे अंतिम सत्य म्हणजे निसर्ग !

    या त्रिकालाबाधित सत्यांचा शोध घेत गेले असता, एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे निसर्गाने बनवलेले नियम निसर्गातील सर्वासाठी सारखेच बनवलेले आहेत. तिथे कुठेही, जात, धर्म, पंथ, गरीब श्रीमंत, राजा रंक, पौर्वात्य पाश्चिमात्य, पशू पक्षी, मानव अमानव, असा भेदभाव दिसत नाही. या नियमात कमालीची शिस्त आहे, या नियमात तसुभरदेखील फरक पडत नाही, आणि जर असा फरक पडला तर खुशाल समजावे, तो नियम निसर्गाचा नाही. बेशिस्त किंवा ढवळाढवळ निसर्गाला अजिबात खपत नाही. जर काही लुडबुड झालीच तर नुकसान होणार हे शंभर टक्के ठरलेले !

    हा एक नियम गांभीर्याने समजून घेतला की आरोग्य समजून यायला वेळ लागणार नाही.

    मृत्युबद्दलची भीती, मृत्यु येऊ नये यासाठी नियमितपणे आहार, घेतलेला आहार योग्य रितीने पचण्यासाठी पुरेशी विश्रांती, आणि आपण जाताना पुनः "आपणासारखे करिती तात्काळ" या उक्तीला आवश्यक असलेले मैथुन, या चार गोष्टी निसर्गाने वरील सर्वासाठी नेमून दिलेल्या आहेत. आहार, निद्रा, भय आणि मैथुन. या नियमांच्या मर्यादेलाच "धर्म" असेही म्हणतात. मानव आणि अमानव योनीमधे मागे पाहिलेल्या दूष्य देश बल काल या सूत्राप्रमाणे अवस्था बदलत जातील, त्यात योग्य तो बदल प्राप्त परिस्थितीनुसार करावा.

    असाच धर्म शरीराचादेखील असतो. याला शरीरधर्म असे म्हणतात. रात्री झोप घेणे, सकाळी आपोआप जाग येणे, भुकेची जाणीव होणे, तहान लागणे, मल मूत्रादि उत्सर्जन क्रिया, (शरीरवेगांच्या संवेदना) कळणे, काम करताना उर्जा निर्माण होणे, त्यातून आनंद निर्माण होणे, याला "निसर्ग" म्हणतात. म्हणजे निसर्गाच्या नियमामधे बिघाड होत नाही. जे घडते ते घडू द्यावे, त्याविरोधात गेलो तर बिघडते.
    उलटी होत असेल तर होऊ द्यावी, घाम येत असेल तर येऊ द्यावा, झोप येत असेल तर झोपावे, दमलो तर विश्रांती घ्यावी, भूक लागल्यावर जेवावे, तहान लागल्यावर पाणी प्यावे, निसर्ग असाच वागतो. कुठेही निसर्ग चक्र विस्कळीत झालेले दिसत नाही.

    माणसाने जेव्हा यात बदल करण्याचा प्रयत्न केला तेव्हा निसर्ग सुद्धा कोपतो.

    आम्ही आमच्यासाठी निसर्गाच्या नियमात पालट करण्याचा प्रयत्न केला तर रोग होणारच.

    पण आजच्या काळानुसार, ज्यांना आपल्याला निसर्गाचे वेळापत्रक पाळणे अशक्य आहे, त्यांनी काय करावे ?
    निसर्गाला जाणून घ्यावे. आणि दूष्य देश बल काल आदि ओळखावे. जेवढ्या शक्य आहेत, तेवढ्या आपल्या कामाच्या खाण्या पिण्याच्या वेळा निसर्गाला अनुकुल होतील अशा करून घ्याव्यात. जर काही बिघाड झालाच तर वैद्यांच्या सल्ल्यानुसार निसर्गदत्त औषधींचाच वापर करावा.
    इथे पुनः रक्तघटक एवढेच पाहिजेत, अमुक या लेव्हलच्या वर नको, याच्या खाली नको, असे अभारतीय नियम करून घेऊ नयेत. हे सर्व "मॅनमेड नियम" केवळ शरीराचे ढोबळमान समजून घेण्यासाठी आणि अभ्यासासाठी आहे. हे जरूर शिकावे, पण या शरीर तपासण्या हे अंतिम सत्य नाही, हे पण लक्षात ठेवावे. मानवनिर्मित नियमांचा वापर युक्तीने व्हावा, नियमाने होऊ नये. मानवाने केलेले नियम हे अर्धसत्य असतात, निसर्ग हेच पूर्ण सत्य आहे, हे आपण मागे बघितलेले आहेच !

    कृत्रिमपणे केलेला विचार आणि सहजपणाने झालेली कृती यात फरक असतोच ना !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    10.05.2017