(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • तुम्ही मांसाहार का करता ?

    शक्ती साठी? की जीभेवरच्या चवीसाठी? जीवनसत्वांसाठी?

  • स्तोत्रपठणाचं महत्त्व

    ऋषीमुनी-संतांनी स्तोत्र तसंच मंत्रांची निर्मिती करून सर्वसामान्यांवर फार मोठे उपकार केले आहेत. कोणत्या अक्षरांची कशी मिळवणी केली म्हणजे कसे ध्वनीतरंग निर्माण होतील व त्याचा मानवाला शारिरीक आणि मानसिक लाभ व अंतःकरण शुद्धीसाठी कसा उपयोग होईल हे विज्ञान लक्षात घेऊनच विशिष्ट अक्षरांची मिळवणी करून ज्या विशिष्ट ध्वनीतरंगाची उन्नती केली ते म्हणजे मंत्र व स्तोत्र. स्तोत्रपठणाचं वैशिष्ट्य म्हणजे स्तोत्रातल्या वर्ण-अक्षरांच्या साहाय्याने माणसाच्या शरीरातली निरनिराळी चक्रं जागृत होतात. त्यामुळे शरीरातल्या सुप्त शक्ती जागृत होतात.

    आपलं संस्कृत वाङ्मय अतिशय समृद्ध आहे. सर्व भाषांचा उगम संस्कृत भाषेतून झाला असा या भाषेचा लौकिकही आहे. या संस्कृत भाषेला 'गीर्वाणभाषा' म्हणजे देवांची भाषा असंही मानलं जातं. संस्कृत साहित्यात स्तोत्र वाङ्मयाचं एक विशेष स्थान आहे. या साऱ्या वाङ्मयात प्रामुख्याने देवदेवतांची स्तुती केलेली आढळते. उदा. 'रामरक्षा स्तोत्र', 'व्यंकटेश स्तोत्र', 'श्री गणपती अथर्वशीर्ष' आदी स्तोत्रांची नावं घेता येतील. आजही ही स्तोत्रं अनेकांच्या पठणत असलेली आपण पाहतो. केवळ काव्य म्हणून वाचणाऱ्या रसिक वाचकांना ती आनंद देतातच पण देवदेवतांवर श्रद्धा बाळगणाऱ्या श्रद्धावंतांनाही अशा स्तोत्रांचा लौकिक व पारमार्थिक अर्थाने लाभ होतो. त्याचबरोबर आपले उच्चारही सुस्पष्ट होतात.

    पूर्वी सकाळ-संध्याकाळ घरोघरी स्तोत्रं म्हटली जात. आज तो काळ मागे पडला आहे. स्तोत्रपठणाचं महत्त्व कमी झालं असलं तरी या स्तोत्रांनी मानवी जीवनात एक अलौकिक स्थान मिळवलं आहे. स्तोत्रपठणाचा विशेष काही उपयोग होत नाही, असं म्हणणारे अनेकजण आहेत. परंतु स्तोत्रपठणाचा उद्देश व त्यामागच्या शास्त्रीय बैठकीचं महत्त्व कळल्यास मनामध्ये कोणताही प्रत्यवाय राहणार नाही.

    कोणत्याही गोष्टीची अनुभूती ती गोष्ट प्रत्यक्ष कृतीत आणल्यानंतर येते असा नियमच आहे. लग्न, मुंज अशा काही प्रसंगी आता शांतीपाठ करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. सत्यनारायणासारख्या पूजाप्रसंगी मंत्रजागर करण्याचा प्रघात हळूहळू नामशेष होत चालला आहे. रूद्राची आर्वतनं करण्याची किंवा दक्षिणा देऊन ब्राह्मणांकडून 'लघुरूद्र' करण्याची रीत बंद पडत चालली आहे. हे शांतीपाठ किंवा मंत्र पठण हा केवळ भाबडेपणाचा भाग नसून याविषयी परदेशातून सूचित करणारे प्रयोग सिद्ध होत आहेत. त्या प्रयोगांवरून हे सर्व सांस्कृतिक आचार-विचार, व्रतवैकल्यांच्या मागे निश्चित वैज्ञानिक बैठक आहे, असं ध्यानी येईल.

    डॉ. दोदो आर दो या एका फ्रेंच डॉक्टरने मानसिक शक्तीमापनाचं एक प्रभावी यंत्र शोधून काढलं. ज्याची मानसिक शक्ती मोजायची असेल त्याला दोन ते चार फूट अंतरावर उभं करून त्या यंत्राकडच्या काट्याकडे बघायला सांगण्यात येतं. त्याची दृष्टी स्थिर झाली की यंत्रावरचा काटा गोल फिरू लागतो आणि कोणत्याही डिग्रीवर स्थिर होतो. प्रत्येकाच्या डोळ्यातून विद्युतलहरी बाहेर पडत असतात आणि म्हणून तो काटा फिरतो असं त्यांचं संशोधन आहे. नेमक्या याच तत्वावर स्तोत्रपठणाचा परिणाम मानवी शरीरावर होत असतो.

    ज्याप्रमाणे मनामध्ये विचार येतात त्याप्रमाणे विद्युतशक्ती निर्माण होऊन स्तोत्रांमधले शब्दसुद्धा विचाराने भारलेले असल्यामुळे स्तोत्र म्हणणाऱ्याच्या मनावर त्या शब्दसमूहांचा खूप चांगला परिणाम घडतो. स्तोत्राच्या आवर्तनातून आपल्याला अलौकिक, अद्भुत व गूढ अनुभूती येतात हेच स्तोत्रपठणाचं खरं रहस्य आहे. या विधानाच्या पुष्ट्यर्थ 'रामरक्षा' स्तोत्राचं उदाहरण देता येईल. मंत्रशास्त्राच्या दृष्टीने 'राम' या शब्दाला विशेष महत्त्व आहे. 'र'काराला मंत्रशास्त्रात 'अग्नीबीज' मानतात. 'र' काराच्या उच्चाराने आपल्या शरीरातल्या विद्युतशक्ती जास्त प्रमाणात सुरू होते व त्यामुळे आपल्या शरीरात विद्युतप्रवाह सुरू होतो. 'र'काराची शक्ती अतिशय वेगवान असते हा प्रयोग कोणीही करून पाहण्यासारखा आहे.

    आपल्या पूर्वजांनी सांगितलं आहे की, सकाळी अंथरूणातून बाहेर यायच्या आधी कराग्रे वसते लक्ष्मी। करमध्ये सरस्वती। करमूले तू गोविंदम्। प्रभाते कर दर्शनम्। हा श्लोक म्हणून दोन्ही हात चेहऱ्यावरून फिरवून खाली बेंबीपर्यंत फिरवावेत. असं तीन वेळा करावं. चेहऱ्यावरून हात फिरवताना थोडासा दाब द्यावा. 'अॅक्युपंक्चर विदाऊट नीडल्स' या अमेरिकन पुस्तकातल्या 'अॅक्युप्रेशर ब्रेकफास्ट' या प्रकरणात चेहऱ्यावरचे २५ ते ३० पॉइण्टस दिले आहेत. हे पॉइण्टस लक्षात ठेवून दाबण्यापेक्षा चेहऱ्यावरून हात फिरवल्याने त्याचा फायदा होतो. डोळ्यावरची झापड लगेच जाते आणि आपण एकदम फ्रेश होतो. श्लोक म्हटल्याने सकाळी उठल्यावर देवाचं स्मरण होतं.

    संत ज्ञानेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी'त म्हटलं आहे की बाराखडी म्हटली की त्यात सर्व मंत्र येऊन गेले. ऋषीमुनी-संतांनी स्तोत्र तसंच मंत्रांची निर्मिती करून सर्वसामान्यांवर फार मोठे उपकार केले आहेत. कोणत्या अक्षरांची कशी मिळवणी केली म्हणजे कसे ध्वनीतरंग निर्माण होतील व त्याचा मानवाला शारिरीक आणि मानसिक लाभ व अंतःकरण शुद्धीसाठी कसा उपयोग होईल हे विज्ञान लक्षात घेऊनच विशिष्ट अक्षरांची मिळवणी करून ज्या विशिष्ट ध्वनीतरंगाची उन्नती केली ते म्हणजे मंत्र व स्तोत्र. स्तोत्रपठणाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्तोत्रातल्या वर्ण-अक्षरांच्या साहाय्याने माणसाच्या शरीरातली निरनिराळी चक्रं जागृत होतात. त्यामुळे शरीरातल्या सुप्त शक्ती जागृत होतात. सामान्यतः माणूस त्याच्या एकूण शक्तीच्या १० टक्के शक्ती वापरत असतो. ९० टक्के शक्यतो सुप्तावस्थेच असते. ती शक्ती स्तोत्रपठणाने जागृत करता येते. पण त्यासाठी पद्मासनात बसून एकाच वेळी, एकाच ठिकाणी आणि योग्य उच्चारात स्तोत्रपठण केलं पाहिजे. स्तोत्रपठणाचा ज्यांना खरोखर अनुभव घ्यायचा आहे त्यांना ही सर्व पथ्यं काटेकोरपणाने पाळावीच लागतात. अन्यथा शास्त्रोक्त पद्धतीने स्तोत्रांचं पठण केलं नाही तर मग त्यांची प्रचिती कशी येणार?

    आपल्या तोंडात, टाळूवर ८४ रेखावृत्तीचे बिंदू असतात. पूर्वी श्रेष्ठता प्राप्त झालेल्या काही व्यक्ती प्रदीर्घ तपस्येमध्ये मग्न झाल्या. त्या लोकांनी कालांतराने काही ध्वनी निर्माण करण्यास सुरुवात केली व असं करताना त्यांची जीभ टाळूवर असलेल्या रेखावृत्तांच्या बिंदूमधल्या विशिष्ट स्थानी टेकवली व त्यामधून विशिष्ट नादनिर्मिती झाली. आपण बोललेल्या प्रत्येक शब्दांच्या किंवा मंत्राच्या उच्चारामुळे मंत्रातल्या प्रत्येक शब्दाचा आघात शरीराच्या कोणत्याही भागावर होत असतो. योग्य प्रकारचे आघात झाले तर शरीरातले हायपोथॅलम्स, थॅलम्स अथवा पिच्युटरी ग्रंथीवर परिणाम होऊन अत्यानंदाच्या मनःस्थितीत आपण येतो.

    ज्या वास्तूमध्ये नेहमी अभद्र बोलणं, वरच्या पट्टीत किंचाळून बोलणं, नकारात्मक बोलणं होत असेल अशा वास्तूमध्ये तुम्ही प्रवेश केल्यावर तिथलं वातावरण मनावर भार निर्माण करणारं व नैराश्यपूर्ण वाटेल. पण त्याऐवजी जिथे गाण्यांचे सूर, स्तोत्रपठण, वैचारिक पातळीची चांगली देवाणघेवाण, मंत्रोच्चार होत असतील, मनाला उल्हासित करणारं संभाषण चालू असतं त्या वास्तूत उत्साहपूर्ण, तणावरहित व मनमोकळे, प्रसन्न वाटेल.

    तुम्हाला येणारा अनुभव निर्माण होणाऱ्या भावना यांचा नादशास्त्राशी खूप जवळचा संबंध आहे. आपल्या भावना उल्हासित होतील, नैराश्यातून आनंदाकडे नेतील असे शब्द निवडून प्रत्येक मंत्र, श्लोक, स्तोत्र रचले होते. आपण म्हटलं तर मेंदूच्या काही भागांना उत्तेजन मिळाल्याने मेंदूचं रासायनिक संतुलन बदलतं. ही बदललेली मेंदूची रासायनिक स्थिती आपल्या मनाला अधिक सुखावह, तणावमुक्त व उदार बनवते. मनाचा मोठेपणा वाढवून परिस्थितीबाबत अधिक उदार दृष्टिकोन निर्माण करते.

    आज आपण कठीण काळातून जात आहोत. सर्व भौतिक सुखं हात जोडून आपल्यासमोर उभे आहेत. तरीही सध्याचं जीवन अनेक समस्यांनी ग्रासलेलं आहे. नित्यनवीन संकटं त्यात भर घालत आहेत आणि आपलं जीवन तणावपूर्वक बनलं आहे. विज्ञानामुळे मानवाची पावलं चंद्रावर पोहोचली असली तरी त्याच्या मनाला अजूनही शांती लाभलेली नाही.

    शांती, समाधान, उत्कर्ष, उन्नतीसाठी कशाची गरज असते तर ती मानसिक समाधानाची. यासाठी रोज १५ ते २० मिनिटं एकाग्र चित्ताने स्तोत्रपठण केलं तर निश्चितच मानसिक समाधान मिळेल व चांगले आरोग्यही प्राप्त होईल।

    -- `आरोग्यदूत' WhatsApp ग्रुपवरुन 

  • स्तोत्रपठणाचं महत्त्व

    ऋषीमुनी-संतांनी स्तोत्र तसंच मंत्रांची निर्मिती करून सर्वसामान्यांवर फार मोठे उपकार केले आहेत. कोणत्या अक्षरांची कशी मिळवणी केली म्हणजे कसे ध्वनीतरंग निर्माण होतील व त्याचा मानवाला शारिरीक आणि मानसिक लाभ व अंतःकरण शुद्धीसाठी कसा उपयोग होईल हे विज्ञान लक्षात घेऊनच विशिष्ट अक्षरांची मिळवणी करून ज्या विशिष्ट ध्वनीतरंगाची उन्नती केली ते म्हणजे मंत्र व स्तोत्र. स्तोत्रपठणाचं वैशिष्ट्य म्हणजे स्तोत्रातल्या वर्ण-अक्षरांच्या साहाय्याने माणसाच्या शरीरातली निरनिराळी चक्रं जागृत होतात. त्यामुळे शरीरातल्या सुप्त शक्ती जागृत होतात.

    आपलं संस्कृत वाङ्मय अतिशय समृद्ध आहे. सर्व भाषांचा उगम संस्कृत भाषेतून झाला असा या भाषेचा लौकिकही आहे. या संस्कृत भाषेला 'गीर्वाणभाषा' म्हणजे देवांची भाषा असंही मानलं जातं. संस्कृत साहित्यात स्तोत्र वाङ्मयाचं एक विशेष स्थान आहे. या साऱ्या वाङ्मयात प्रामुख्याने देवदेवतांची स्तुती केलेली आढळते. उदा. 'रामरक्षा स्तोत्र', 'व्यंकटेश स्तोत्र', 'श्री गणपती अथर्वशीर्ष' आदी स्तोत्रांची नावं घेता येतील. आजही ही स्तोत्रं अनेकांच्या पठणत असलेली आपण पाहतो. केवळ काव्य म्हणून वाचणाऱ्या रसिक वाचकांना ती आनंद देतातच पण देवदेवतांवर श्रद्धा बाळगणाऱ्या श्रद्धावंतांनाही अशा स्तोत्रांचा लौकिक व पारमार्थिक अर्थाने लाभ होतो. त्याचबरोबर आपले उच्चारही सुस्पष्ट होतात.

    पूर्वी सकाळ-संध्याकाळ घरोघरी स्तोत्रं म्हटली जात. आज तो काळ मागे पडला आहे. स्तोत्रपठणाचं महत्त्व कमी झालं असलं तरी या स्तोत्रांनी मानवी जीवनात एक अलौकिक स्थान मिळवलं आहे. स्तोत्रपठणाचा विशेष काही उपयोग होत नाही, असं म्हणणारे अनेकजण आहेत. परंतु स्तोत्रपठणाचा उद्देश व त्यामागच्या शास्त्रीय बैठकीचं महत्त्व कळल्यास मनामध्ये कोणताही प्रत्यवाय राहणार नाही.

    कोणत्याही गोष्टीची अनुभूती ती गोष्ट प्रत्यक्ष कृतीत आणल्यानंतर येते असा नियमच आहे. लग्न, मुंज अशा काही प्रसंगी आता शांतीपाठ करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. सत्यनारायणासारख्या पूजाप्रसंगी मंत्रजागर करण्याचा प्रघात हळूहळू नामशेष होत चालला आहे. रूद्राची आर्वतनं करण्याची किंवा दक्षिणा देऊन ब्राह्मणांकडून 'लघुरूद्र' करण्याची रीत बंद पडत चालली आहे. हे शांतीपाठ किंवा मंत्र पठण हा केवळ भाबडेपणाचा भाग नसून याविषयी परदेशातून सूचित करणारे प्रयोग सिद्ध होत आहेत. त्या प्रयोगांवरून हे सर्व सांस्कृतिक आचार-विचार, व्रतवैकल्यांच्या मागे निश्चित वैज्ञानिक बैठक आहे, असं ध्यानी येईल.

    डॉ. दोदो आर दो या एका फ्रेंच डॉक्टरने मानसिक शक्तीमापनाचं एक प्रभावी यंत्र शोधून काढलं. ज्याची मानसिक शक्ती मोजायची असेल त्याला दोन ते चार फूट अंतरावर उभं करून त्या यंत्राकडच्या काट्याकडे बघायला सांगण्यात येतं. त्याची दृष्टी स्थिर झाली की यंत्रावरचा काटा गोल फिरू लागतो आणि कोणत्याही डिग्रीवर स्थिर होतो. प्रत्येकाच्या डोळ्यातून विद्युतलहरी बाहेर पडत असतात आणि म्हणून तो काटा फिरतो असं त्यांचं संशोधन आहे. नेमक्या याच तत्वावर स्तोत्रपठणाचा परिणाम मानवी शरीरावर होत असतो.

    ज्याप्रमाणे मनामध्ये विचार येतात त्याप्रमाणे विद्युतशक्ती निर्माण होऊन स्तोत्रांमधले शब्दसुद्धा विचाराने भारलेले असल्यामुळे स्तोत्र म्हणणाऱ्याच्या मनावर त्या शब्दसमूहांचा खूप चांगला परिणाम घडतो. स्तोत्राच्या आवर्तनातून आपल्याला अलौकिक, अद्भुत व गूढ अनुभूती येतात हेच स्तोत्रपठणाचं खरं रहस्य आहे. या विधानाच्या पुष्ट्यर्थ 'रामरक्षा' स्तोत्राचं उदाहरण देता येईल. मंत्रशास्त्राच्या दृष्टीने 'राम' या शब्दाला विशेष महत्त्व आहे. 'र'काराला मंत्रशास्त्रात 'अग्नीबीज' मानतात. 'र' काराच्या उच्चाराने आपल्या शरीरातल्या विद्युतशक्ती जास्त प्रमाणात सुरू होते व त्यामुळे आपल्या शरीरात विद्युतप्रवाह सुरू होतो. 'र'काराची शक्ती अतिशय वेगवान असते हा प्रयोग कोणीही करून पाहण्यासारखा आहे.

    आपल्या पूर्वजांनी सांगितलं आहे की, सकाळी अंथरूणातून बाहेर यायच्या आधी कराग्रे वसते लक्ष्मी। करमध्ये सरस्वती। करमूले तू गोविंदम्। प्रभाते कर दर्शनम्। हा श्लोक म्हणून दोन्ही हात चेहऱ्यावरून फिरवून खाली बेंबीपर्यंत फिरवावेत. असं तीन वेळा करावं. चेहऱ्यावरून हात फिरवताना थोडासा दाब द्यावा. 'अॅक्युपंक्चर विदाऊट नीडल्स' या अमेरिकन पुस्तकातल्या 'अॅक्युप्रेशर ब्रेकफास्ट' या प्रकरणात चेहऱ्यावरचे २५ ते ३० पॉइण्टस दिले आहेत. हे पॉइण्टस लक्षात ठेवून दाबण्यापेक्षा चेहऱ्यावरून हात फिरवल्याने त्याचा फायदा होतो. डोळ्यावरची झापड लगेच जाते आणि आपण एकदम फ्रेश होतो. श्लोक म्हटल्याने सकाळी उठल्यावर देवाचं स्मरण होतं.

    संत ज्ञानेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी'त म्हटलं आहे की बाराखडी म्हटली की त्यात सर्व मंत्र येऊन गेले. ऋषीमुनी-संतांनी स्तोत्र तसंच मंत्रांची निर्मिती करून सर्वसामान्यांवर फार मोठे उपकार केले आहेत. कोणत्या अक्षरांची कशी मिळवणी केली म्हणजे कसे ध्वनीतरंग निर्माण होतील व त्याचा मानवाला शारिरीक आणि मानसिक लाभ व अंतःकरण शुद्धीसाठी कसा उपयोग होईल हे विज्ञान लक्षात घेऊनच विशिष्ट अक्षरांची मिळवणी करून ज्या विशिष्ट ध्वनीतरंगाची उन्नती केली ते म्हणजे मंत्र व स्तोत्र. स्तोत्रपठणाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्तोत्रातल्या वर्ण-अक्षरांच्या साहाय्याने माणसाच्या शरीरातली निरनिराळी चक्रं जागृत होतात. त्यामुळे शरीरातल्या सुप्त शक्ती जागृत होतात. सामान्यतः माणूस त्याच्या एकूण शक्तीच्या १० टक्के शक्ती वापरत असतो. ९० टक्के शक्यतो सुप्तावस्थेच असते. ती शक्ती स्तोत्रपठणाने जागृत करता येते. पण त्यासाठी पद्मासनात बसून एकाच वेळी, एकाच ठिकाणी आणि योग्य उच्चारात स्तोत्रपठण केलं पाहिजे. स्तोत्रपठणाचा ज्यांना खरोखर अनुभव घ्यायचा आहे त्यांना ही सर्व पथ्यं काटेकोरपणाने पाळावीच लागतात. अन्यथा शास्त्रोक्त पद्धतीने स्तोत्रांचं पठण केलं नाही तर मग त्यांची प्रचिती कशी येणार?

    आपल्या तोंडात, टाळूवर ८४ रेखावृत्तीचे बिंदू असतात. पूर्वी श्रेष्ठता प्राप्त झालेल्या काही व्यक्ती प्रदीर्घ तपस्येमध्ये मग्न झाल्या. त्या लोकांनी कालांतराने काही ध्वनी निर्माण करण्यास सुरुवात केली व असं करताना त्यांची जीभ टाळूवर असलेल्या रेखावृत्तांच्या बिंदूमधल्या विशिष्ट स्थानी टेकवली व त्यामधून विशिष्ट नादनिर्मिती झाली. आपण बोललेल्या प्रत्येक शब्दांच्या किंवा मंत्राच्या उच्चारामुळे मंत्रातल्या प्रत्येक शब्दाचा आघात शरीराच्या कोणत्याही भागावर होत असतो. योग्य प्रकारचे आघात झाले तर शरीरातले हायपोथॅलम्स, थॅलम्स अथवा पिच्युटरी ग्रंथीवर परिणाम होऊन अत्यानंदाच्या मनःस्थितीत आपण येतो.

    ज्या वास्तूमध्ये नेहमी अभद्र बोलणं, वरच्या पट्टीत किंचाळून बोलणं, नकारात्मक बोलणं होत असेल अशा वास्तूमध्ये तुम्ही प्रवेश केल्यावर तिथलं वातावरण मनावर भार निर्माण करणारं व नैराश्यपूर्ण वाटेल. पण त्याऐवजी जिथे गाण्यांचे सूर, स्तोत्रपठण, वैचारिक पातळीची चांगली देवाणघेवाण, मंत्रोच्चार होत असतील, मनाला उल्हासित करणारं संभाषण चालू असतं त्या वास्तूत उत्साहपूर्ण, तणावरहित व मनमोकळे, प्रसन्न वाटेल.

    तुम्हाला येणारा अनुभव निर्माण होणाऱ्या भावना यांचा नादशास्त्राशी खूप जवळचा संबंध आहे. आपल्या भावना उल्हासित होतील, नैराश्यातून आनंदाकडे नेतील असे शब्द निवडून प्रत्येक मंत्र, श्लोक, स्तोत्र रचले होते. आपण म्हटलं तर मेंदूच्या काही भागांना उत्तेजन मिळाल्याने मेंदूचं रासायनिक संतुलन बदलतं. ही बदललेली मेंदूची रासायनिक स्थिती आपल्या मनाला अधिक सुखावह, तणावमुक्त व उदार बनवते. मनाचा मोठेपणा वाढवून परिस्थितीबाबत अधिक उदार दृष्टिकोन निर्माण करते.

    आज आपण कठीण काळातून जात आहोत. सर्व भौतिक सुखं हात जोडून आपल्यासमोर उभे आहेत. तरीही सध्याचं जीवन अनेक समस्यांनी ग्रासलेलं आहे. नित्यनवीन संकटं त्यात भर घालत आहेत आणि आपलं जीवन तणावपूर्वक बनलं आहे. विज्ञानामुळे मानवाची पावलं चंद्रावर पोहोचली असली तरी त्याच्या मनाला अजूनही शांती लाभलेली नाही.

    शांती, समाधान, उत्कर्ष, उन्नतीसाठी कशाची गरज असते तर ती मानसिक समाधानाची. यासाठी रोज १५ ते २० मिनिटं एकाग्र चित्ताने स्तोत्रपठण केलं तर निश्चितच मानसिक समाधान मिळेल व चांगले आरोग्यही प्राप्त होईल।

    -- `आरोग्यदूत' WhatsApp ग्रुपवरुन

  • जेवणात काय ”हवेच” ?

    'अरे आमच्या घरी काय कमी आहे . . सांगच तू मला . . काजू बदामाचे डबे भरलेले आहेत . . रोज सलाड , ज्यूस आमच्यात असतातच , फूड च्या बाबतीत कुठंच 'कॉम्प्रमाइज ' करत नाही आम्ही . . . तरी आमच्या अंगी का लागत नाही ?? ''

    वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना वरील संवाद नवा नाही . अंगी लागत नाही ही समस्या सर्वत्र आहे . . अनेक रिपोर्ट्स नॉर्मल असतात पण खाल्लेले अंगी मात्र लागत नाही . आता हे अंगी लागणे म्हणजे काय ?? तुम्ही बॅंकेत 1000 रुपये भरले की काही वेळाने तुम्हाला ते 1000 रुपये खात्यात दिसतात . . आपण काय म्हणतो ? पैसे खात्यात जमा झाले . . हाच नियम शरीराला लावा . . तुम्ही खाल्लेले अन्न त्याचे व्यवस्थित पचन झाल्यानंतर तुमच्या शरीरावर दिसते . . लोक सुदृढ दिसतात . . 'खात्या पित्या घरातला/घरातली दिसत आहे '' हे याच प्रकारातले . . पण खाल्लेले अंगावर दिसतच नसेल तर ?? भरपूर ड्राय फ्रुट्स , ज्यूस , सलाड , कॉर्न फ्लेक्स ह्याव त्याव खाऊन पण गाडी पाप्याचं पितर असेल तर काय करावे ??

    ब्लड टेस्ट्स ? सप्लिमेंट्स ?? चीज ? अरे हो . . . थांब जरा !!

    शंकराचार्य म्हणतात '' जितं जगत्केन ? मनोहि येन । '' ज्याने आपले मन जिंकले त्याने जग जिंकले . . आपली परिस्थिती उलटी आहे . . आपण जग जिंकतो पण मनाचे काय ?? ते सैराट असते . . . त्यात ना शांतता , ना समाधान , ना स्थैर्य . . . जगभरातील तत्ववेत्त्यांचे विचार डोक्यात असतात पण आचरणात शून्य . . अशा मनस्थितीत जेवण केले तर अंगी कसे लागेल भाऊ ?? आमचे आचार्य चरक म्हणतात -

    ''प्रसन्न चेतसा भुञ्जीत । '' म्हणजे प्रसन्न मनाने जेवावे . . .

    असं होतं का ?? नाही होत . . . . जगाच्या चिंता डोक्यात घेऊन , प्रगती करणाऱ्याला चार शिव्या हासडत , घरातील कलहात डोकं आपटत केलेले जेवण कधीच अंगी लागत नाही . त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी आहारात काय ठेवू ?? हा प्रश्न मला विचारला तर मी सांगेन '' आधी प्रसन्न मन ठेव . . . मग बाकीचे बघू ''

    वैयक्तिक अनुभवावरून सांगतो , जेवण करत असताना टीव्ही बंद करून , शास्त्रीय -नाट्य संगीत ते शक्य नसेल तर नामस्मरण इत्यादी केल्याने जेवण केल्याची तृप्ती येते . . ज्या दिवशी हे नाही जमत त्या दिवशी जेवण सुद्धा ' जॉब डन ' या वर्गात टिक मार्क केल्या सारखे होते . . . तुमचा काय अनुभव ??

    वैद्य अंकुर रविकांत देशपांडे
    9175338585

    आयुर्वेद कोश (https://web.facebook.com/aarogyakosh/ )

    (लेख कृपया लेखकाच्या नावासह व नाव न बदलता शेअर करावा . या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते)

    -- `आरोग्यदूत' WhatsApp ग्रुपवरुन

  • क्लॅपिंग थेरपी

    देवाची आरती करताना असो किंवा उत्साहाच्या क्षणी टाळ्या या आपसुकच वाजवल्या जातात.

    मानवी शरीरात 340 प्रेशर पॉईन्ट्स असतात. त्यापैकी 27 हाताच्या तळव्यामध्ये आढळतात. असे Kairali Ayurveda group चे डॉ. राहुल डोग्रा सांगतात.

    त्या प्रेशर पॉईंटवर विशिष्ट दाब दिल्यास, मसाज केल्यास अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. अनेक वेदना कमी करण्यास मदत होते.

    क्लॅपिंग थेरपी – :
    खोबरेल तेल किंवा तीळाचे तेल हाताला लावून मसाज करा. ते हळूहळू त्वचेमध्ये शोषले जाते. दोन्ही हात एकमेकांवर ठेवा. ते डोळ्यासमोर ताठ ठेवा. खांदे थोडे सैलसर ठेवा. हा उपाय सकाळच्या वेळेस अधिक फायदेशीर ठरते.

    सकाळच्या वेळेस 20-30 मिनिटं टाळया वाजवल्यास तुम्ही फीट आणि अ‍ॅक्टीव्ह रहाल. कारण टाळ्या वाजवल्याने रक्तप्रवाह सुधारतो. रक्तवाहिन्यांमधील अडथळे दूर होण्यास मदत होते. तसेच घातक कोलेस्ट्रेरॉलचा त्रासही कमी होतो असा सल्ला डॉ. डोग्रा देतात.

    टाळी वाजवल्यानंतर कोणत्या 5 अँक्युपंचर पॉईंटला चालना मिळते :
    1. Hand valley point
    2. Base of thumb point
    3. Wrist point
    4. Inner gate point
    5. Thumb nail point
    या ’5′ पॉईन्ट्सला चालना दिल्यास खालील फायदे होतात-

    1. हृद्याच्या आणि फुफ्फुसांच्या कार्याला चालना मिळण्यासाठी, त्यासंबंधी व्याधी कमी होण्यासाठी मदत होते. यामुळे अस्थमाचा त्रासही कमी होतो.

    2. पाठीचे, मानेचे आणि सांध्यांचे दुखणे कमी होते.

    3. गाऊट्च्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी क्लॅपिंग थेरपी फायदेशीर ठरते.

    4. लो ब्लड प्रेशरच्या रुग्णांना ही थेरपी फायदेशीर ठरते.

    5. टाळ्या वाजवल्याने पचनाचे विकार सुधारतात.

    6. क्लॅपिंग थेरपीमुळे लहान मुलांची आकलनक्षमता सुधारते. अभ्यासातील गती सुधारते.

    7. क्लॅपिंग थेरपीमुळे मुलांचा मेंदू तल्लख होण्यास मदत होते.

    8. क्लॅपिंग थेरपीमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते तसेच अनेक आजार दूर ठेवण्यास मदत होते.

    9. मधूमेह, अर्थ्राईटीस, रक्तदाब, नैराश्य, डोकेदुखी, निद्रानाश,केसगळती, डोळ्यांचे विकार यासारख्या समस्या कमी करण्यासाठी क्लॅपिंग थेरपी मदत करते.

    10. सतत एसीमध्ये बसणारे आणि काम करणार्‍यांमध्ये घाम येत नाही. अशा लोकांनी क्लॅपिंग थेरपी केल्यास रक्तप्रवाह सुधारतो. यामुळे शरीर शुद्ध होण्यास मदत होते.

    -- `आरोग्यदूत' WhatsApp ग्रुपवरुन

  • बी.पी. आणि शुगर

    चांगल्या असो की...
    वाईट असो..
    घडणाऱ्या गोष्टी घडत असतात ...!!
    लहान मुले मोठी होतांना...
    पडत पडत घडत असतात...!!

    डोक्याला जास्त
    ताण करून घ्यायचा नाही...
    आणि
    सारखा सारखा बी.पी.
    वाढवुन घ्यायचा नाही ...!!

    मुलं अभ्यास करत नाहीत
    आपण समजून सांगावं.......!!
    घरातलं काम करत नाहीत
    त्यांना पुन्हा पुन्हा सांगावं......!!

    भविष्यात त्याचं कसं होईल...?
    याची जास्त काळजी
    करायची नाही....!!
    सारखा सारखा आपण आपला
    बी.पी. वाढवून घ्यायचा नाही....!!

    तुम्हाला वाटतं पोरींन ....
    स्वयंपाकात लक्ष घालावं
    भाजी नाहीतर नाही ....
    पिठलं तरी हालवावं ....!!

    लाडक्या चिरंजीवाने
    मोबाईलशी कमी खेळावं .....
    आल्या गेल्या पाहुण्यांशी
    दोन शब्द तरी बोलावं ...!!

    पोरगं मात्र अजिबात
    थोबाड वर करत नाही...
    तरी सुद्धा आपण आपली
    शुगर लेव्हल मुळीच वाढू
    द्यायची नाही...!!

    ऑफिस असो घर असो
    कुणीच कुणाचं ऐकत नसतं...

    ज्याला जसं वाटेल तसं
    प्रत्येकजण वागत असतो...!!

    आपण मात्र उगीचच
    फुकटचे सल्ले देत असतो
    समोरच्या माणसावर त्याचा काहीच
    परिणाम होत नसतो.

    छातीवर हात ठेऊन सांगा

    तुम्ही काळजी केली म्हणून
    कोणते कोणते प्रश्न सुटले..?

    नाहीतरी तुमची मुलं तुम्हाला
    विचारणारच आहे...
    तुम्ही आमच्यासाठी काय केले ?

    सरते शेवटी कोणतीच गोष्ट
    मनाला लावून घ्यायची नाही
    बी.पी. आणि शुगर सुद्धा
    अजिबात वाढू द्यायची नाही

    मरण यायच्या आधी मात्र थोडं
    स्वतःसाठी जगून जायचे ...
    सगळ्या सोबत असूनही
    थोडं बाजूला होऊन जायचे...!!

    आपलं कोणी ऐकत नसतं
    त्यावेळी जास्त बोलू नये ...
    त्यांचं ते बघून घेतील
    जास्त ओझ ं उचलू नये ....!!

    बी.पी. आणि शुगर सुद्धा
    Tension मुळे होत असतात...
    गोळ्या, औषधं घेतले की
    बिचारे गुपचप बसत असतात....!!

    काहींच्या बाबतीत ती
    वडिलोपार्जित प्रॉपर्टी असते...
    रजिस्ट्री नाही केली तरी
    तिकडून इकडे येत असते....!!

    चालत जावं , फिरत जावं ..
    डॉक्टर सांगतील ते ऐकत जावं...!!
    योग, प्राणायाम करत करत
    आनंदाने लढत राहावं...!!

    आपल्या हार्टच्या ECG ला
    आपण बिघडू द्यायचं नाही...
    " बी.पी." आणि " शुगर " ला
    जास्त वाढू द्यायचं नाही ......!!!

    -- डॉ. गौरी पाटील
    निसर्गोपचार तज्ज्ञ
    9820584716

  • मंत्रांचे वैज्ञानिक विश्लेषण

    आपण सर्व भाविक छोट्या मोठ्या समस्यांमुळे काहि सेवा करत असतो. उपासना करत असतो. त्या अंतर्गत आपले सद्गुरु आपल्याला काहि मंत्र पठण करवयास सांगतात. ते स्तोत्र, मंत्र, उतारे , तोडगे करत असताना मनात श्रद्धा भाव हा खुप महत्वाचा असतो.

    पण काही लोक त्याला अंधश्रद्धेचे नाव देऊन ढोंग ठरविण्याचा प्रयत्न करतात आणि आपण ही हळू हळू त्यांच्या बोलण्याने भुलु लागतो. पण आपण हे विसरतो की आपल्या ऋषि मुनी यांनी निर्मित केलेले हे सर्व स्तोत्र मन्त्र यांना केवळ आध्यात्मिक कारण नसून एक वैज्ञानिक पार्श्वभूमी ही असते. ती समजून घेतली तर आपल्या हजारो लाखो वर्षाचा इतिहास असलेल्या हिन्दू धर्माचा अभिमान तर वाटेलच. पण आपण करत असलेली सेवा ही लवकर फलद्रुप होईल व देवाला न मानणाऱ्या लोकांना सडतोड़ उत्तर देता येईल.
    त्याच साठी आपण आज काहि मंत्राचे वैज्ञानिक विश्लेषण करणार आहोत.

    ऐक्य मंत्र :- ऐक्य मंत्राच्या पठणाने ओक्सिटोसिन नावाचे हार्मोन तयार होते. घरात समाजात मिळून मिसळून एकोप्याने राहण्याची भावना वाढीस लागते.

    नवार्णव मंत्र :- मानवाच्या शरीरातील सर्व चक्रांना जागृत करते. नऊ अक्षरांचा या मध्ये समावेश आहे.
    मुलींनी बांगड्या घातल्याने त्यांच्या मनगटातील धमन्या व शिरा active होतात.

    रामरक्षा स्तोत्र :- राम रक्षा स्तोत्रातील 'र ' च्या उच्चाराने पित्ताशय, पित्त आणि आतड्यांचे काम balance होते.

    गायत्री मंत्र :- गायत्री मंत्राच्या पठणाने इपोनोप्रिन्स (Epinopnrins) नावाचे हार्मोन तयार होते. रोग प्रतिकारक शक्तीची वाढ होते.

    काल भैरावाष्टक :- कालभैरावाष्टक स्तोत्राच्या पठणाने विशिष्ट प्रकारचे vibrations तयार होते त्यामुळे आपले ३ इंच पर्यंत संरक्षण होते. मुलांनी गंध टिळा लावल्याने भृकुटीमध्या वरील आज्ञाचक्र active होतात.

    प्रज्ञा विवर्धन स्तोत्र :- याच्या पठणाने पिनियल gland ला धक्का बसून मेमरी चार्जेस ची निर्मिती होते. स्मृतीभ्रंश चे आजार होत नाहीत.

    सरस्वती मंत्र , सुर्य मंत्र , गणपती अथर्व शीर्ष :- मेंदू मध्ये cortex नावाचा भाग असतो त्यात Cortizone नावाचे हार्मोन तयार होते. त्यामुळे बुद्धीमत्तेत वाढ होते सदबुद्धी वाढते.

    विद्याप्राप्तीकारक स्तोत्र :- या स्तोत्राच्या पठणाने DHA नावाचे हार्मोन तयार होते. बुद्धीचा योग्य वापर या हार्मोन मुळे होतो.

    दत्त महाराजांचा मंत्र :- "द्रां " हा दत्त महाराजांचा बीजमंत्र आहे. त्याच्या उच्चारणाने (सेल टिश्यू फॉरमेशन ) cell tissue formation चे काम प्रॉपर होते (जखम भरून येण्याचे काम ).

    शाबरी मंत्र - Dopamine हार्मोन ची निर्मिती होते. विशेष महत्वाचे म्हणजे या हार्मोन चा balance राखला जातो.जर हार्मोन्स वाढले तर व्यसन गुन्हेगारी व कमी झाले तर नैराश्य.

  • गणपतीला प्रिय आरोग्यदायक कमळ

    गणपतीला कमळ प्रिय आहे म्हणून पूजेत कमळ वाहण्याची प्रथा आहे माझ्या अभ्यासात असे लक्षात आले की कमळ पित्तशामक व ह्रूद्य आहे म्हणजे हार्टला उपयोगी आहे. कमळामुळे क्षयातील ताप कमी होतो ,बायकांच्या रक्तप्रदरावर(जास्त दिवस ब्लिडींग होणे) कमळ उपयोगी आहे.हार्टवर कमळ जबरदस्त उपयोगी आहे.

    १९८६सालची गोष्ट. श्री. चौबळ (वय७२)ह्मानी मला सांगितले की डॉक्टरानी सांगितले आहे की त्यांचे(चौबळाचे)हार्ट७५% काम करत नाही. फक्त२५%च काम करते आहे मी त्यांना जमेल तेव्हा ताजी कमळे खायला दिली. नंतर कमळे सुकवूनकेलेल्या गोळ्या दिल्या. चार महिन्यानी एक दिवस मला सकाळी९वाजता चौबळांचा फोन आला."ताप आल्यामुळे पूजा नर्सिंग होम मधे आहे. आज सकाळी पावणे आकरा वाजता येऊन भेटा.' मी म्हटले"अहो सकाळी१०-४५ला शक्य नाही , वाँटर प्रुफिंगसाठी माणसाना कामाला लावायला जायचे आहे. १२ वाजता येतो .'तेम्हणाले "नाही १०-४५लाच या. बाकी मला माहिती नाही 'आणि फोन ठेवून दिला. मी पावणे आकराला नाईलाने गेलो. चौबळानी मला बसयला सांगितले .व मी सांगे पर्यंत उठायचे नाही असे सांगितले.मी वैतागून बसून राहिलो कामे दिसत होती. पण इलाज नव्हता. तेव्हड्यात डॉ क्टर आले. त्यांनी चौबळाना तपासले. ठीक आहे म्हणून जाऊ लागले. चौबळानी डॉ ना विचारले हार्ट कसे आहे? त्यावर डॉ क्टर म्हणाले चौबळ तुमचे हार्ट१००%काम करते आहे. किती वेळा सांगू. का लिहून देऊ. आणि डॉ क्टर गेले. नंतर चौबळ मला म्हणाले माझे हार्ट१००% काम करत आहे हे मला तुम्हाला डॉ क्टरांच्या तोंडून ऐकायचे होते. म्हणून त्रास दिला. कारण हे तुमच्या कमळाच्या गोळ्यामुळे झाले. मी गेली दहा वर्षे डॉ च्या गोळ्या खाल्या पण फायदा नव्हता.

    आपल्या पूर्वजानी गणपतीला कमळ आवडते सांगून सर्वसामान्याचे आरोग्य राखण्याचा प्रयत्न केला. देवाला जे प्रिय ते माणसाला उपयुक्त! त्यांनी धंदा केला नाही म्हणून ते अडाणी होते का?

    मला वाटते दर वर्षी गणपतीला कमळ वाहून झाल्यावर दुसरे दिवशी ते कमळ पाण्यात २४तास भिजत ठेवावे .नंतर ते पाणी सर्वानी प्यावे. म्हणजे वर्ष भर हार्ट सेफ राहयाला मदत होईल. ज्यांना हार्टचा त्रास आहे त्यांनी रोज कमळाचे सरबत करून प्यावे फायदा होण्याची शक्यता आहे. किमान त्रास नक्की नाही.

    -- अरविंद जोशी. B,Sc,
    9421948894

    हा मेसेज फाँर्वड करताना कोणताही बदल करु नये

  • सत्य; मरण आणि शेवट

    सत्याला मरण नाही, सत्य हे शवटी उजेडात येते ही वाक्य किती सहजतेने आपण उच्चारतो. आणि कोणत्याही गोष्टीत सहजता आली की त्यातील गांभिर्य निघून जाते. सत्याचं तसंच झालंय असं मला वाटतं.

  • स्पर्धा परीक्षा क्लास लावताय का ? डोळे उघडा पहा नीट

    सध्या सर्वत्र UPSC MPSC टॉपर्सच्या सत्कार व मनोगत व्यक्त करण्याचे पीक सर्वत्र आलेय- पुढे टीप असतेच- सेमिनारच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी batch सुरु होणार ह्यातून काय समजायचे - टॉपर्सचे मनाला हळुवार भिडतील असे अत्र तत्र सर्वत्र पोस्टिंग्स करायचे- बौद्धिक मते मांडायची आणि व्हा व्हा मिळवून स्वतःची पाठ थोपटून घ्याची- मुलेही मिळतात म्हणा- दुनिया बनती है बनानेवाला चाहिये- और ये तो मुंबई है- आजकाल पूना मे भी येही फॅड है!
    क्लास लावताना जरा ह्या गोष्टी विचारच:

    १) result सांगा- किती विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलं-त्यातील कितींनी मुख्य परीक्षा दिली-त्यापैकी किती उत्तीर्ण झाले?
    २) फॅकल्टी सांगा- परीक्षा पास होऊन शिकवणारे आहे कि परीक्षा पास होत नाही म्हणून लेकचर मधून आर्थिक घडी शिवणारेच आहेत- हेही काही वाईट नसतात -अनेकदा उत्तमच असतात-पण नेहमी नाही-ते तपासाच
    ३) UPSC असेल तर वरील मुद्दा अजून महत्वाचा-कारण मग Academicans म्हणजे विषय तज्ज्ञ आणि स्पर्धक असे दोन फळीतील फॅकल्टी लागतात- एका विषयाला किमान दोन!
    ४) पुण्यात,ठाण्यात,गोरेगावात म्हणे UPSC १६००० मध्ये शिकवतात- MPSC अजून १२००० मध्ये- हा निव्वळ फसवेपणा असावा किंवा मोठे औदार्य दाखवणारे फॅकल्टी असावे- आपण हे विचारा कि टोटल कोर्स किती तासांचा- UPSC सामान्य अध्ययन किमान ४०० तासांचा, वैकल्पिक विषय किमान १३० तासांचा, आणि MPSC राज्यसेवा किमान ४०० तासांचा अभ्यासक्रम आहे- तासाला उत्तम फॅकल्टी किमान ७००/- घेतात हे लक्षात ठेवून गणित मांडा- ह्यात प्रशाकीय खर्च-नफा हे वगळले आहे- तरी फीस बाबतीत एक अंदाज येईल. कमी फीस म्हणजे सर्व वाईटच असे नाही, पण मोफत शिकवणारे- ज्ञानदान देणारे सोडून बाकीचे मग स्पर्धेत टिकायचे म्हणून कमी तासात ,किंवा हलके फॅकल्टी वापरून हे गणित जुळवता- आपण डोळस पणे हे तपासले पाहिजे- MPSC राज्यसेवा शुल्क साधारणपणे ३२-३५००० असते व UPSC चे ८५००० च्या आसपास असावे.
    ५) पण वरील गणितात वर्गात किती विद्यार्थी आहे हे मांडलेच नाही- आपण सांगा किती असावे- एक शिक्षक किती विद्यार्थ्यांकडे लक्ष देऊ शकतो-१-२-३-४.... किती-हा अंदाज बांधा आणि विचार-BATCH साइझ.
    ६) टेस्ट सिरीज तर असावीच- सराव परीक्षा हवेच- त्याचे वेळापत्रक मागा -शक्य असल्यास मागच्या वर्षीच्या टेस्ट पहा-
    ७) अभ्यासिका-लायब्ररी हवीच- एक वेळ AC क्लासरूम नसेल तरी चालेल-पण समृद्ध लायब्ररी हवीच
    ८) मेंटॉर हवेच-जसे पी व्ही सिंधू ला गोपीचंद आहे, सचिन ला रमाकांत आचरेकर आहेत, तसे स्पर्धकाला देखील हवेच.
    ९) आजकाल सोशल मीडियावर मोफत नोट्स,दरोजचे बातम्या पसरवीत काही मुले नियमितपणे क्लासची जाहिरात करतात-पैसे ठेवून होत असलेली ह्या मार्केटिंगला तर मुळीच भुलू नका- ह्या मार्केटिंग तज्ज्ञांचे स्वतः कोणतीही परीक्षा पास न होण्यामागचे कारण हेच असावे कि चालू घडामोडी म्हणजे आज कि ताजा खबर नसते हे ह्यांना कळलेच नाही!
    १०) ह्याव्यतिरिक्त आपण सुज्ञपणे तपासा- भेटा-वारंवार भेटा-डेमो लेक्चर हा प्रकारच फसवा असतो- का ते समजून घ्या -
    भुलू नका- भान ठेवा- क्लास का लावताय तो उद्देश काय आहे आणि त्या उद्देशाला अनुसरून क्लास काय देतेय ह्याचा तपास करा मग क्लास प्रवेश निश्चित करा

    -- प्रा. हितेशकुमार एस. पटले