(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • श्रीहरी स्तुति – ६

    भगवान श्रीहरींच्या स्तुतीच्या निमित्ताने भगवंताच्या साक्षात्काराचे विविध मार्ग आचार्य श्री आपल्यासमोर उलगडून दाखवत आहेत.

      October 24, 2020


  • आत्महत्या हा जीवनातील समस्यांवर उपाय नाही – वैभवीश्रीजी

    Deshonnati-18-Dec-2014-596x480

    जीवनात येणार्र्या घटनांना समस्या न समजता संधी म्हणून सामोरे जा, आत्महत्या हा समस्यांवर उपाय नाही असे कळकळीचे आवाहन वैभवीश्रीजी यांनी शेतकरी बंधूंना केले.

    अकोलखेड येथे संत गाडगे बाबा पुण्यतिथी निमित्त आयोजित श्रीमद् भागवत कथेमध्ये वैभवीश्रीजी बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, तणाव हा मनाच्या स्तरावर आहे आणि आपण मात्र शरीराला शिक्षा देतोय. देह संपतो पण मन आणि चेतना मात्र मुक्ती साठी तडफडत राहते. मरण्यासारख्या इतक्या मोठ्या गोष्टीला सामोरे जाऊ शकतो तर बाकीच्या घटना किती छोट्याशा आहेत. प्रत्येकाच्या जीवनात समस्या तर आहेतच आणि प्रत्येक समस्या वेळेनुसार निघूनही जातात. त्यावर आत्महत्या हा उपाय नाही. सोबत एक चिट्ठी ठेवा, “आजपर्यंत अनेक समस्या आल्या आणि गेल्या, हीपण निघून जाईल. मी एकटा नाही, माझ्यासोबत भगवान श्रीकृष्ण आहेत.” भगवान श्रीकृष्णाचे जीवन ही पूर्ण संघर्षामध्येच गेले, पण त्यांनी सुद्धा प्रत्येक समस्येचे रुपांतर संधी आणि शेवटी उत्सवामध्ये केले. कदाचित संघर्षामध्येच ते अधिक शांत, प्रसन्न आणि दूरदृष्टीने जगले. म्हणूनच त्यांना पूर्णपुरूष म्हटले जाते. ज्या लोकांनी यशाचे शिखर गाठले त्यांनी सुद्धा प्रत्येक समस्येमध्ये संधीच पाहिली. एक वडील आपल्या मुलाला लहानपणापासून सांभाळतात आणि त्या मुलाने अचानक जर त्याच्या जीवनाचा शेवट अश्या पद्धतीने केला तर त्या वडिलांना कसे वाटेल ? त्यांना आवडेल का? मग त्या परमेश्वराला पण कसे आवडेल कि त्याची ही मुल आपले जीवन आत्महत्या करून संपवतात…!

    सर्वांनी एकत्र येऊन समस्यांवर उपाय ही शोधता येतील, असे आवाहन वैभवीश्रीजी यांनी केले.

    Read Online on Deshonnati: http://deshonnati.digitaledition.in/c/4074440

      April 25, 2016


  • “शेतकरी बंधुनौ आम्हा शहरवासियांना माफ करा…”

    मी माफी अशा करिता मागतोय कारण आम्हाला आमच्यात काहीच सुधारणा करायच्या नाहीयेत किंवा आम्हाला कोणत्याही प्रकारची बचत देखील करायची सवय तर नाहीच नाही....

    पहाना.. शहरवासियांना पाण्याचा ईतका मुबलक पुरवठा होतोय ना... की आम्हाला त्याची काहीच किंमत नाही... म्हणजे सोसायटीच्या पाण्याच्या टाकीतुन हजारो लिटर पाणी दररोजच वाया घालवतोत... साधी चारचाकी गाडी धुवायला... रुबाबदारपणे स्वच्छ दिसायला किमान 70 लिटर तरी पाणी आम्हीच वापरतोतच..... साधारणपणे चारपाच कपडे धुवायला वाशिंग मशिन मधुन तीनचार वेळा धुण्याच्या नादात अंदाजाने 300 लिटर पाणी वापरतोतच.... स्वताःच घर... आलिशान बंगला.... गृहनिर्माण सोसायटीतील रोजची स्वच्छता... मंगल कार्यालये... मोठमोठी हास्पीटल्स, भव्यदिव्य मॉल... चारचाकी गाड्याची सर्व्हीसिंग सेंटर्स, दारुचे बार... आलिशान फाईव्ह स्टार हॉटेल्स... आणि हो... सरकारी स्वच्छतावर न लिहलेलेच बरे.. ... अशी अनेक नानाविध ठिकाण ... या साठी कमी पाणी वापरुन कसे चालेल हो... जेवढे मुबलक पाणी.. तेवढा त्याचा वापर तर आम्ही शहरी माणस करणारच ना... भले कामापेक्षा जास्त पाणी वाया गेले तरी चालेल... पण बचतीचा विचार आम्हीच का करु....? गावातला ... खेड्यातला... शेतकरी शेतातील पिकांना ऊगवण्या...वाढवण्याकरिता... पाण्यासाठी सैरभैर होतो... त्या मेघाकडे तासनतास आस लावुन असतो...

    आमच्या शहरातील किमान शंभर कुंटुंबानी जरी ठरवल न.. की पाण्याची बचत करायचीच.... तर किमान पाच शेतकरी बंधुभगिनींच्या शेताला पुरेल ईतका पाणीसाठा शिल्लक उरेल... पण हे सर्वंच "क्षण भंगुर...." स्वप्नासारखच वाटतय.... कदाचित् जमल तर आम्हा शहरवासियांना माफ करा... पाण्याची बचत ही काळाची गरज जरी असली तरी आम्ही आमच्याच सुखसुविधामध्ये ईतके गुरफटुन गेलोत ना... की... भोवतालच्या जगातील सुखदुःखाची जाणच आम्हाला होत नाहीय... शहरी माणस आहोत ना... असंवेदनशिल...
    फक्त पेपरात सकाळी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाचुन नंतर आम्हीच दैनंदिन कामात व्यस्त होऊन जातोत... कशाचही आम्हाला देणघेण नाही.... मग पाणी बचतीचा प्रश्रन नाही...

    पण जे पाण्याची मनोमन बचत करतात... त्यांना खरोखरीच मनःपूर्वक धन्यवाद

    ...... देवच त्यांच भल करो... व बचतीच पाणी शेतकरी बंधुभगिनींच्या शेताला मिळुन भरपुर पिक येवो.... आमचा शेतकरी बंधु सुखात राहो...

    जय हिंद.....

    वंदे मातऱम

    -- विवेक जगन्नाथ जोशी
    [नेहमीच पाण्याची बचत करणारा]

      March 11, 2016


  • महाशिवरात्री विशेष

    आज भारत देशामध्ये सर्वत्र ‘महाशिवरात्री’ हा दिवस भक्तिभावाने साजरा केला जात आहे. शिव मंदिरामध्ये बेल पत्र, धोतऱ्याचे फूल, दूध.. घेऊन रांगेत उभे राहून दर्शनाची वाट बघणारे भक्त दिसत आहेत. व्रत, उपवास करून ईश्वराकडे मनोमन आपली इच्छा पूर्ण व्हावी अशी याचना सर्व करतात. पण ज्याची मनोभावे पूजा केली जात आहे त्या ईश्वराची खरी ओळख तसेच मंदिरातली अनेक प्रतीकात्मक रुपकांची ओळख आज आपण करून घेऊ या.

      March 1, 2022


  • आहारातील या ‘१०’अन्नघटकांनी वाढवा तुमचे हिमोग्लोबिन

    हिमोग्लोबिन हा रक्तातील अतिशय महत्त्वाचा घटक असून, तो ‘आयन’ (लोह) आणि ‘प्रोटीन’ (प्रथिने) यापासून बनलेला असतो. रक्‍तामध्ये 12 ते 14.5 मिली इतके हिमोग्लोबिनचे प्रमाण आवश्‍यक असते. मात्र अनेक जणांमध्ये हे प्रमाण कमी असल्याने ते एनिमियाच्या बळी पडतात. मग अनेकदा आयन आणि प्रोटीन वाढवण्यासाठी डॉक्टर गोळ्या देतात , मात्र त्याने तात्पुरते हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. पुन्हा हळूहळू हिमोग्लोबिन खाली जाते, अशावेळी तुमच्या सकस आहारातील काही पदार्थ नैसर्गिकरित्या तुमचे हिमोग्लोबिन वाढवतात पहा कोणते आहेत हे घटक…

    १) पालक -

    पालकचा तुमच्या आहारात समावेश असणे अत्यंत महत्वाचे आहे. पालकमुळे रक्तातील ‘आयन’ (लोह) वाढवण्यास मदत करते . सुप्स , भाजी ,पालक वडे , आमटी किंवा सलाड अशा कोणत्याही स्वरूपात पालक खाणे हितावह आहे. पालकवर लिंबू पिळल्याने त्यातील आयन (लोह) अधिक चांगल्याप्रकारे ग्रहण होते.

    २) संत्र -

    संत्र्यामधील व्हिटामिन सी आणि व्हिटामिन बी ६ रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मदत करते . रोज किमान २ ग्लास संत्र्याचा रस प्या मात्र त्यात साखर टाकू नका.

    3) दुध आणि दुग्धजन्य पदार्थ -

    आहारात नियमित किमान ग्लासभर दुध व दुग्धजन्य पदार्थ असणं फार महत्त्वाचे आहे. दुधात शरीराला पूरक अनेक ‘मिनरल्स’( खनिजं )व ‘व्हिटामिन्स’ असल्याने दुधाला पूर्णान्न म्हणतात. दुध आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्याने रक्तातील हिमोग्लोबिन वाढते.

    4) खजूर

    काळा आणि लाल अशा दोन स्वरूपात बाजारात खजूर उपलब्ध आहे. खजूर हे आयन (लोह) प्रमाणेच ‘व्हिटामिन सी’ व ‘व्हिटामिन बी’ वाढवण्यास मदत करते. खजुराच्या सेवनाने लाल रक्तपेशींची निर्मिती वाढते , परिणामी हिमोग्लोबिन वाढते.खजूर नुसताच खाण्याबरोबरीने त्यापासून तयार केलेली बर्फी , लाडू किंवा चटणी असे विविध पदार्थांमार्फत तुम्ही खजूर खाऊ शकता .

    5) गूळ -

    भारतीय स्वयंपाकघरात अगदी सहजतेने गूळाचा वापर केला जातो .आयुर्वेदात गुळाला ‘औषधीय शर्करा’ म्हणून संबोधलं जाते. गूळ लोह्वर्धक असून उत्तम स्वास्थ्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. गूळाच्या नियमित सेवनाने रक्तातील हिमोग्लोबिन तर वाढते त्याचबरोबर शरीरात रक्ताचं प्रमाण वाढते आणि त्वरित उर्जा मिळते . दररोजच्या जेवणात साखरेऐवजी गूळ वापरणे अधिक हितावह आहे.

    6) डाळींब -

    शारीरिक स्वस्थ्याप्रमाणेच सौदर्य खुलवण्यासाठी डाळींबाचा प्रामुख्याने आहारात वापर केला जातो. डाळींबातील लोह्वर्धक व मुबलक प्रमाणात आढळणारे व्हिटामिन सी चे प्रमाण रक्तातील हिमोग्लोबिन वाढवते. आठवड्यातून तीन ते चार वेळेस डाळींबाचा रस घेतल्यास तुमचे हिमोग्लोबिन नक्कीच वाढेल .

    7) फरसबी

    प्रोटीन, कॅल्शियम, आयन (लोह), सल्फर (गंधक), फॉस्फरस तसंच व्हिटामिन ‘ए’ असलेली फरसबी ही पोषकतेच्या दृष्टीने उत्तम भाजी आहे.यामधील फॉलिक अॅसिडमुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे योग्य प्रमाण राखण्यास मदत होते. फरसबीची भाजी अथवा कोशिंबिरीत फरसबीचा वापर आठवड्यातून दोनदा केल्याने तुमचे हिमोग्लोबिन योग्य प्रमाणात राहील.

    8) मांसाहार -

    शाकाहाराबरोबरीने मांसाहारानेदेखील तुमचे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवता येते . चिकन , मटण , अंडी , मासे यामधील व्हिटामिन ‘बी १२’ व व्हिटामिन ‘बी ६’ रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करतात. मात्र मांसाहार करताना ते योग्य प्रकारे शिजवा व योग्य प्रमाणात खा .

    9) पिस्ता -

    सुक्या मेव्यात व्हिटामिन ‘बी ६’ चे प्रमाण अधिक असते, मात्र विशेषतः ‘पिस्ता’ सर्वाधिक प्रमाणात शरीराला व्हिटामिन पुरवते. त्यामुळे लाडू , शिरा ,हलवा खीर यांसारख्या गोड पदार्थांमध्ये पिस्त्याचा वापर वाढवा. पिस्त्यातील व्हिटामिन ‘बी ६’ रक्तातील हिमोग्लोबिन योग्य प्रमाणात राखण्यास मदत करतात.

    10) गरम मसाला -

    भारतीय खाद्यसंस्कृतीचे खरे वैभव आहे यामध्ये वापरले जाणारे ‘मसाले’ ! तुमच्या जेवणात तमालपत्र , कोथिंबीर , पुदिना , तुळशीची पाने यांचा योग्य वापर ठेवा . हे मसाले आहारातील ‘लोह’ योग्य प्रमाणात ग्रहण करतात त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण राखण्यास मदत होते.

    -आरोग्य धनसंपदा

      March 16, 2017


  • संस्कृत भाषा व संस्कृती : भाग – (२) – (ब) /११

    भाग – (२) – (ब)

    • ईशान्य भारत :

    निखिल जोशी यांनी ईशान्य भारताचा उल्लेख केलेला आहे. त्यांचा असा समज दिसतो की, या भूभागाशी संस्कृत व संबंधित-संस्कृती यांचा कांहीं संबंध नाहीं. पण प्रत्यक्षात तसें नाहीं.

    (कदाचित, निखिल जोशींना, बोडो, नागा इत्यादी टोळ्या अभिप्रेत असतील. पण, मध्य-भारत व पूर्व-भारतातील ऑस्ट्रो-एशियाटिक , म्हणजे मुंडा ; किंवा ईशान्येकडील इंडो-चायनीज वंशाच्या टोळ्या, हा एक संपूर्णपणें वेगळा विषय आहे. आपण फक्त भूभागांसंदर्भात पाहूं या).

    • इरावती कर्वे यांनी असें analysis केलेलें आहे की, पुरातन कालीं, पूर्वेकडून ब्रह्मदेश (म्यानमार) व चीन भागातून लोकसमूह भारतात आले, व इथें स्थायिक होऊन भारताचा भाग बनून गेले. या वंशाचे लोक आसामपासून बंगालपर्यंत (आणि बंगालच्या थोडे पश्चिमेस व थोडे दक्षिणेस ) पसरलेले आहेत. अर्थात्, इथल्या स्थानिक लोकांशी सांस्कृतिक व लग्नसंबंध आल्यामुळे तेथील लोक mixed वंशाचे झाले. म्हणजेच, जसें शक, कुषाण, हूण व भारतात-वसलेले-ग्रीक यांचें झालें, तसेंच पूर्वेकडेही झालेलें आहे ; ते पूर्णपणें भारतीय संस्कृतीत मिसळून गेले आहेत, तिचा अविभाज्य भाग झालेले आहेत.
    • *बंगालबद्दल सहसा कोणी कांहीं शंका घेत नाहीं, कारण त्याबद्दल आपल्याला कांहीं माहिती असतेच. *इतिहास जाणणार्‍यांना, राजा खारवेल व उडीसाबद्दलही माहिती असते.

    *(तरीही आपण त्या दोन्ही भूभागांबद्दल नंतर पाहूंच).

    • आसाममधील ‘अहोम’ राजवट ही ब्रह्मदेश-सीमेवरील भागातून मध्ययुगात आलेल्या लोकांची आहे. तरीही , त्या काळातही आसाम भागाचा व संस्कृत-संस्कृतीचा संबंध आहे.
    • आसाम, त्रिपुरा व उडीसा या भागांवर बंगालची छाप आहे, हें निश्चित. त्रिपुरा तर अगदी ब्रह्मदेशाच्या सीमावर्ती प्रदेशात आहे, म्हणजे आसामच्याही पलिकडे. तेथें बंगाली चालते. त्यामुळे, जे बंगालला लागू होतें, तेंच भाषा व संस्कृतीच्या संदर्भात त्रिपुरालाही.
    • म्हणजेच, फक्त ईशान्य भारताचाच वेगळा, separate, विचार करून उपयोगी नाहीं; तर, ईशान्य भारत व पूर्व भारत यांचा एकत्रित विचार करायला हवा.
    • आसाम भागाचा महाभारकालीन उल्लेख ‘प्राग्ज्योतिष’ असा आहे ; तर नंतरच्या, गुप्तकालात, आसाम व बंगालचा कांहीं भाग यांचा उल्लेख ‘कामरूप’ असा आहे.

    याचा अर्थ स्पष्ट आहे की, या भूभागाचा संबंध पुरातन ‘मध्यदेश’ (पश्चिम यू.पी.) व मगधाशी होता.

    • आसाममधील हरिहर विप्र यानें रामायण व महाभारत या दोन्हींवर आधारित रचना केलेल्या आहेत. माधव कंदाली यानेंही रामायणावर आधारित रचना केलेली आहे. आसामसाठी एवढी उदाहरणें पुरेशी आहेत.
    • उडियामध्येही, सरल दास यानें महाभारतावर आधारित रचना केलेली आहे. (संदर्भ : ‘The Mahabharata Revisited’, Edited by R.N. Dandekar).
    • जयदेवाचें गीतगोविंद हें सुप्रसिद्ध संस्कृत काव्य आहे. त्याचें जन्मस्थान उडीसात, किंवा बंगालमध्ये, किंवा मिथिला भागात मानले जाते. याचा अर्थ, या भूभागांचा संस्कृतशी व संस्कृत-संस्कृतीशी नक्कीच होता.
    • ब्रह्मवैवर्त पुराण बंगालच्या परिसरात निर्माण झालेलें आहे. (संदर्भ : नरहर कुरुंदकर) . बंगालमधील चंडीदास, चैतन्य महाप्रभू यांच्या रचना संस्कृत-संस्कृतीच्या परंपरेशी जोडलेल्या आहेत. उदा. कुरुंदकर सांगतात की, इ.स. च्या ९व्या शतकात राधेची परंपरा (संस्कृतमधून) आलेली आहे.
    • ‘संस्कृत ही व्यवहारात निरुपयोगी भाषा ( इति निखिल जोशी ) . तसें आहे काय ? -

    मी संस्कृतचा वृथाभिमानी नाहीं, आणि संस्कृत ही भारताची राष्ट्रभाषा ‘व्हायलाच’ हवी असा माझा आग्रह नाहीं. मात्र, निखिल जोशी यांची statement मला योग्य वाटत नाहीं. आज प्रादेशिक भाषा बोलल्या जातात व साहित्यही त्यांच्यात निर्माण होतें, हें खरें. परंतु, संस्कृत निरुपयोगी कशी ?

    • आजच्या काळात बरेच प्रश्न आहेत, व ते सोडवायला हवेत, हें मान्य ; पण पुरातन साहित्य-संस्कृतीच्या अभ्यासानें नक्कीच आपलें व्यक्तिमत्व समृद्ध होतें, mature होतें, व आपण society ला त्याचा फायदा करून देऊं शकतो. आणि, हें समाजातील सगळ्या लोकांनी करायला हवें असें नाहीं. पूर्वीही सगळीच्या सगळी जनता, across-the-board, संस्कृत व संस्कृतीचा विचार व अभ्यास करत नसे, व आजही सर्वांनी तसें करायची आवश्यकता नाहीं.
    • पण त्याहीपेक्षा अधिक महत्वाचे मुद्द्दे पुढे आहेत.
    • पहिलें उदाहरण : बडोद्याचे multi-disciplinary विद्वान प्रा. दिनेश माहुलकर यांच्याकडून मला मिळालेल्या महत्वाचा माहितीचा मी इथें उल्लेख करत आहे.

    माहुलकर हे, इंग्रजी-भाषा, भाषाशास्त्र, संस्कृत, गणित वगैरे विविध विषयाचें ज्ञान असलेले बहुआयामी विद्वान होते. त्यांचे, ‘वृद्धि:’ , ‘Pre-Paninian Grammer’ हे महत्वाचे ग्रंथ आहेत. पाणिनीच्या आधीच्या , म्हणजे आर्ष-संस्कृतबद्दलचा त्यांचा ग्रंथ आधुनिक काळातील एक महत्वाचा ग्रंथ आहे. अगदी उतारवयातही माहुलकर , शिमला / देहरादून येथील एका संस्थेचे consultant म्हणून कार्यरत होते. ही संस्था संस्कृतच्या आधारानें महासंगणकाची आज्ञावली ( software) तयार करूं पहात होती. त्या संस्थेचें व माहुलकारांचेंही म्हणणें असें की, संस्कृत ही अगदी compact भाषा आहे, आणि, महासंगणकाच्या आज्ञावलीसाठी ती ideal आहे. प्रत्यक्ष या आज्ञावलीचें काय झालें / होणार , याची मला कल्पना नाहीं, माहुलकरही आतां हयात नाहींत. पण, वरील गोष्टीवरून, संस्कृतच्या, आजच्या काळातही असलेल्या महत्वाची कल्पना येईल.

    - दुसरें उदाहरण : श्री. द.मा .लेले हे ‘दाते पंचांगा’त पावसाचें भविष्य लिहीत असत. त्यांनी १९८५ मध्ये भरलेल्या हवामान परिषदेत, ‘वृष्टिविचार’ या नांवाचा प्रबंध वाचला होता. त्यात त्यांनी, कृषि-पराशर, वराहमहिराची बृहद्-संहिता इत्यादी पुरातन ग्रंथांचा उपयोग करून, वर्षा-ऋतूत किती व कधी पाऊस पडेल याचें पूर्वानुमान कसें करायचें, हें स्पष्ट केलें होतें. विशेष म्हणजे, इस्रोचे कांहीं शास्त्रज्ञही लेले यांचा पावसाच्या पूर्वानुमानाच्या बाबतीत सल्ला घेत असत. (संदर्भ : ‘कृषिज्ञानकोश’ चे संपादक श्री. अशोक माहदेव जोशी यांचा, २०.३.२०१६ च्या लोकसत्तातील लेख ).

    -तिसरे उदाहरण : आजच्या काळात ऍलोपथीचें खूप महत्व आहे यांत वाद नाहीं. पण कांहीं वेळा, ऍलोपथीपेक्षा, उपचाराच्या अन्य पद्धती अधिक-उपयुक्त व कमी-हानिकारक ठरतात. त्यामुळे हल्ली ‘Alternate Medicine’ या क्षेत्राला पुन्हां महत्व येऊं लागलें आहे ; आणि त्यातील एक महत्वाची पद्धति आहे आयुर्वेद. (तिबेटी चिकित्सापद्धतीतही आयुर्वेद आहेच, कारण तिच्यात आयुर्वेद व चिनी चिकित्सापद्धतीचें मिश्रण आहे ) .आयुर्वेदाचें खरें ज्ञान हवें असेल तर, चरक-सुश्रुत-वाग्भट इत्यादींचे संस्कृत ग्रंथ वाचायलाच हवेत. मला एक केरळीय आयुर्वेदिक प्रॅक्टिशनरनें सांगितलें की, केरळमध्ये, आयुर्वेद शिकणार्‍यांसाठी संस्कृत भाषेचें शिक्षण अनिवार्य होतें / आहे, आणि अर्थातच, संस्कृतमधील आयुर्वेदीय ग्रंथाचा अभ्यासही.

    (पुढे चालू )

    - सुभाष स. नाईक. Subhash S. Naik

    सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.

    Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126

    eMail : vistainfin@yahoo.co.in

    Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

      September 16, 2016


  • श्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ८

    सकाळ विश्वासी माता-पिता असणाऱ्या भगवान श्री शंकर आणि पार्वतीच्या एकत्रित वंदनाला पुढे नेताना आचार्य श्री म्हणतात..

      September 26, 2020


  • ऑनलाईन जिहाद : सध्याची परिस्थिती आणि उपाय योजना

    अजून एका तरुण जो इसिस या दहशतवादी संघटनेत सामील होण्याकरिता इराककडे जाण्याच्या वाटेवर होता, त्याला आपल्या गुप्तहेर संस्थांनी हैद्राबाद विमानतळावर रोखले. कल्याणमधून चार तरुण इसिसमध्ये जाण्याकरिता पळून गेले होते. त्यामधला एक तरुणाने २६ जानेवारीला स्फ़ोटक भरलेल्या कारने भारतात अमेरिकन राष्ट्रपतींवर आत्मघातकी हल्ला करण्याची धमकी दिली.

      February 3, 2015


  • ज्ञानेश्वरी वाचण्याचा उपयोग काय?

    रत्नागिरीच्या एका मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर असलेले श्रीयुत शाम चिकणे लिहितात

    “माझ्या मुलीला बोन मॅरो ट्रांस्प्लांटसाठी पुण्याच्या एका इस्पितळात चार महिने ठेवण्याची आमच्यावर वेळ आली. बोन मॅरो साठी मीच 'डोनर' होतो. मोठाच कठीण काळ. सहनशीलतेची परीक्षा घेणारा. हॉस्पिटल मध्ये कष्ट करत असताना आणि आतून चिंतांनी ग्रासलेला असूनही चेहरा सतत हसरा ठेवायची कसरत करायची होती. फ़क्त आणि फ़क्त ज्ञानेश्वरीच्या तत्त्वज्ञानाने या परीक्षेतून मला निभावून नेलं. वाचताना खूप सोपं साधं वाटतं सगळं. पण आयुष्यात जेव्हा असा कठीण काळ येतो तेव्हा शक्ती, ऊर्जा देणारं हे तत्त्वज्ञान आहे.”

    आयुष्य म्हणजे सरळ रेषा नव्हे. ECG वर सरळ रेषा उमटली की आयुष्य संपलं असं डॉक्टर म्हणतात. ज्याच्या आयुष्यात चढ उतार आले नाहीत तो तसाही जगला म्हणताच येत नाही. या कठीण काळाला 'लिमिट' ही नसतं. सिनेमाच्या अडीच तासा सारखं याला टाईम लिमिट नाही. आणि शेवटी हिरो जिंकणारच याची खात्रीही नाही. किंबहुना जिंकणं आणि हरणं असं काही नसतंच. असतं फ़क्त लढणं. अर्जुनासारखं. कधी शत्रूशी. कधी आप्तांशी. कधी स्वतःशी सुद्धा. म्हणून ज्ञानेश्वरी वाचावी.

    मित्रांनो ! ज्ञानेश्वरी म्हणजे पोथी नव्हे. ज्ञानेश्वरी म्हणजे भगवद्‍गीतेचे निरूपण. जीवनाची सर्व अंगे जीवंतपणे जगणारा गोपाल, दही दुध माखन चोरणारा कन्हैय्या, कंसासारख्या पाप्याला संपवणारा चिरतरूण श्रीकृष्ण ! त्याचे ते विचार! आणि सांगितली ती कोणाला? तर जग जिंकण्याची पात्रता अंगी बाळगणार्‍या तरूण अर्जूनाला. हे तर तरुणांचेच पुस्तक. हे म्हणजे एक मॅनेजमेंटचे पुस्तकच समजा. लाईफ़ची मॅनेजमेंट. जीवन कसे जगावे याचे तत्त्वज्ञान.

    तेराव्या अध्यायातली ही ओवी बघा.

    जर खोल जमिनीत, मुळांना पाणी असे सापडत
    असती मग पाने फ़ुले बहरत, बाहेर अर्जुना॥

    कोंभाचे टवटवीतपण, सांगे भूमीचे सुपीकपण
    तैसे ज्ञान्याचे आचरणावरून, आकळे ज्ञान ॥

    माऊली किती सुंदर शब्दांत हे सांगतात. तुमचे आयुष्य बाहेरून जर सुंदर दिसायचे तर त्यासाठी जमीन आणि पाणी म्हणजे ज्ञान. ते ज्ञान स्पष्ट असले पाहिजे. तरच बाहेर त्याचा आविष्कार होईल. ज्ञानेश्वरी केवळ वाचण्यासाठी नाही. शोषण्यासाठी आहे. रिचवण्यासाठी आहे. पचवण्यासाठी आहे.

    ज्ञानेश्वरी वाचा. समजा. पचवा. मग आपल्या जीवनातल्या अवघड प्रश्नांना सामोरे जा बरे! बघा. बरेचसे प्रश्न चुटकीसरसे संपून जातील.

    ई साहित्य प्रतिष्ठानचे ई ज्ञानेश्वरी अभियान सुरू झाल्यापासून अनेक तरूण मंडळी नेटवर ज्ञानेश्वरी वाचतात. दिवसाला तीन ते चार हजार नवीन वाचक अध्याय वाचतात. काही लोकांना या घटनेचे आश्चर्य वाटते. पण आम्हाला वाटते की ज्ञानेश्वरी ही तरुणांनीच वाचायला हवी. वेळ काळ न बघता. दिवसाला अगदी एक ओवी वाचली तरी चालेल. हे पुस्तक एका तरुणां ने लिहीले आहे ना? मग ते सिनियर सिटिझन्सनीच वाचावे असा आग्रह का?

    आम्ही फ़ेसबुकवर रोज एक ओवी प्रसारित करतो. तिल खूप 'लाईक्स' मिळतात. त्यावर चर्चा होतात. खुप लोक मनमोकळ्या मेल्स पाठवतात.

    अर्थात सव्वा लाख वाचकांतले सर्वच जण इतके उत्साही नाहीत. पण आम्ही ज्ञानेश्वरी सर्वांना देतो. प्रत्येक मराठी माणसाच्या डेस्कटॉपवर किंवा मोबाईलमध्ये ज्ञानेश्वरी असावी. भले वाचा किंवा नका वाचू. जेव्हा तहान लागेल तेव्हा विहिरीपाशी या. विहीर तुमच्या जवळ आहे. ज्ञानेश्वरीतील तत्त्वज्ञान निवृत्तीचं नाहीच. संपूर्ण ज्ञानेश्वरीत कुठेही जीवनाशी फ़टकून वागण्याचा सल्ला नाही. कुठेही साधू बनून संसाराचा त्याग करण्याचा उपदेश नाही. उलट जीवनाला आनंदाने सामोरे जाण्यासाठी ज्ञानेश्वरीतले असंख्य दाखले देता येतील.

    माऊली म्हणतात

    इंद्रिया न कोंडी, भोगासी न सोडी
    अभिमान न सोडी, स्वजातीचा ॥

    कुलधर्म ते आचरून, विधीनिषेध ते पाळून
    सर्व सुखॆ भोगून, मुक्ती आहे ॥

    ज्ञानेश्वरी हे जीवन कसे जगावे याचा दाखला आहे. life management चं हे पुस्तक. ते वाचायला हवं. ते आचरणात आणायला हवं. त्याचा आनंद घ्यायला हवा.

    ज्ञानेश्वरीची खरी गरज आहे ती आयुष्याच्या सुरुवातीलाच हातपाय गाळून बसलेल्या असंख्य तरुणांना. निराशेच्या गर्तेत सापडलेल्या. अभ्यासाच्या आणि स्पर्धेच्या बोज्याखाली दबलेल्या तरुणांना. जीवनाचा आनंद न घेता एखाद्या ओझ्याप्रमाणे आयुष्याचा प्रत्येक क्षण पुढे लोटणार्‍या तरुणांनी ज्ञानेश्वरी वाचायला हवी. वर्तमानपत्रांत आत्महत्यांच्या बातम्या वाचल्या की हे अधिक जाणवते.

    आज आम्हाला अशा असंख्य तरुणांची पत्रे येतात. ज्ञानेश्वरी वाचल्यामुळे आयुष्यात घडून येणार्‍या आमुलाग्र बदलाची. दृष्टिकोनात बदल झाल्यामुळे आयुष्याचा आनंद घेणार्‍या तरुणांची. काळजीचे अभ्र दूर झाल्यामुळे जीवनात प्रकाश पसरलेल्या तरुणांची. परदेशातून. खेड्यापाड्यातून. मुंबई पुण्यातूनही. हैद्राबाद, हरयाणातून.

    ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वरी भेट द्या. आपल्या आप्तांना द्या. ज्यांना काळजीत बघताना आपल्याला दुःख होते अशा तरुणांना द्या. नैराश्याने घेरलेल्या तरुणांना ज्ञानेश्वरी द्या. घरातल्या मोठ्या मंडळींना द्याच, पण लहान मुलांना द्या. ज्यांच्या आयुष्याचं सोनं व्हावं अशा तरूणांना द्या. वाचायचा आग्रह नका करू हवं तर. पण त्यांच्या डेस्कटॉपवर असू द्या. शेवटी ज्ञानाचा क्षण जेव्हा यायचा तेव्हाच येतो.

    शुभं भवतु

    From time line of Subhash Sharma

      November 6, 2016


  • रुग्णांची फसवणूक टाळायची तर…

    अलीकडे ग्राहकांची फसवणूक करण्याला वैद्यकीयक्षेत्रही अपवाद राहिलेले नाही. डॉक्टरांकडे किवा मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणार्‍या रुग्णाची फसवणूक झाल्याच्या किवा त्याला मानसिक, आर्थिक त्रास सहन करावा लागल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. अशा तक्रारींना आळा घालायचा तर त्या संदर्भात ग्राहक मंच वा विविध न्यायालयांनी दिलेल्या निर्णयांवर नजर टाकायला हवी.

      December 21, 2010