वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
प्राचीन काळातील आपल्या देशातील धार्मिक विधींमध्ये कापराचा वापर केला जातो. कापराचा सर्वाधिक वापर आरतीत केला जातो.
कापराचे काही गुणधर्म
धार्मिक कारण
शास्त्रानुसार देवी- देवतांनसमोर कापूर लावल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. ज्या घरात नियमितपणे कापूर जाळला जातो, तेथे पितृदोष किंवा इतर प्रकारच्या दोषाचा प्रभाव रहात नाही. कापूर लावल्याने वातावरण पवित्र आणि सुगंधित होते. अशा वातावरणात देवता लवकर प्रसन्न होतात. कापराच्या प्रभावाने घरातील वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्याच्या सुगंधाने आपल्या विचारातही सकारात्मकता येते.
वैज्ञानिक महत्त्व
वैज्ञानिक संशोधनामुळे सिद्ध झाले आहे की , कापराच्या सुगंधाने जीवाणू , विषाणू , लहान किटक नष्ट होतात. त्यामुळे वातावरण शुद्ध राहते व आजार दूर रहातात.
कापूराचे अजून काही फायदे
१) सर्दि-पडस व्हायची लक्षणे आसताना एका रूमालात ३-४ कापूर एकत्र करून त्याचा वास घेतल्याने सर्दि-पडसे होत नाही.
२) कापूराचा सुगंध व्यवस्थित श्वासावाटे आत घेतल्याने तोंडाला घाण वास येत असल्यास निघून जातो.
३) कपूराच्या वासाने आपल्या मेंदूतील लेकवस् नामक रसायन अधिक सक्रीय होते. याचा उपयोग आपल्याला निर्णयक्षमतेत होतो.
४) कापूराचा रोज ३ वेळा सुवास घेतल्याने आपल्या नाकाची वास ओळखायची क्षमता वाढते.
५) घरात कापूर रोज लावल्यावे अॉक्सिजन ९-११% टक्के ईतका वाढतो.
६) मुठभर कापूर तव्यावर ४० सेकंद तापवून ते एका रूमालात बांधून त्याचा शेक गळ्याला दिल्यास , घसा बसला असेल तर बरा होतो. तसेच हा शेक भुवयांच्या वर दिल्याने चष्म्याचा नंबर कमी व्हायला मदत होते.
७) मुठभर कापूर + दालचीनी + लसूण एकत्र एका सुती कपड्यात बांधून गाडीच्या बोनेट च्या आत ही पूडी ठेवल्याने काही वेळ तरी उंदीर व घूशी येत नाहीत.
८) पण कापूर हा उगाच अति जाळू नये. कारण अति धूराने डोळे झोंबतात आणि त्याचा वाईट परीणामा भुबुळाच्या पाठील टिशूस् वर होतो.
९) गरम पाण्यात मीठ व बराच कापूर टाकून त्यात पाय बुडवून ठेवल्याने दुखाणे कमी होते व फुगलेल्या शीरा खाली बसतात. ( ५०शी ओलांडलेल्यांना अधिक उपयोगी )
कापूराच्या सुगंधाने एक नवचैतन्य निर्माण होते मनात.
-- डॉ. गौरी पाटील
निसर्गोपचार तज्ज्ञ, मुंबई
9820584716
चण्याचे पीठ/ मसुरच्या डाळीचे पीठ/ मक्याचे पीठ/ मेथीचे पीठ किंवा ओटचे पीठ यामध्ये लिंबाचा रस साध्या पाण्यात मिसळून लेप लावावा.
संत्री, मोसंबी, लिंबे यांच्या सालींच्या आतल्या भागातले पांढरे धागे काढून टाकून साली वाळवाव्यात. त्यांची बारीक भुकटी करावी व कुठल्याही फेसपॅकमध्ये अर्धा ते एक चमचा घातली तर चेहऱ्याला ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात मिळते.
‘पपई’ या फळात ‘पेपेन’ हे एन्झाइम मोठय़ा प्रमाणात असते. शिवाय पपईच्या गरात त्वचेवरील मृत किंवा कोरडय़ा पेशी काढून टाकण्याचे सामथ्र्य आहे. तेलकट त्वचेसाठी पपईचा लेप गुणकारी आहे, हा जंतुनाशक म्हणूनही उपयुक्त ठरतो.
थोडय़ा कोमट केलेल्या चमचाभर दुधात पाव चमचा यीस्ट घालून जरा वेळाने ते मिश्रण कापसाने चेहऱ्यावर लावावे. काही वेळाने पॅक घट्ट होतो. चेहऱ्यातील रुधिराभिसरण वाढविण्यासाठी यीस्ट पॅक फारच गुणकारी ठरते. तेलकट व कोरडय़ा दोन्ही प्रकारच्या त्वचेवरील निस्तेज पेशी नाहीशा होऊन आतली नवीन त्वचा प्रकट होते.
अंडय़ांमध्ये शरीरनिर्मितीला उपयुक्त ठरणारी प्रथिने असतात. अंडय़ातला पांढरा बलक हा प्रथिनांचा बनलेला असतो तर पिवळा बलक हा संपूर्णतया स्निग्ध असतो. यातला बराचसा भाग त्वचा शोषून घेते. ज्यांची त्वचा अत्यंत शुष्क झाली आहे अशा मध्यमवयीन किंवा प्रौढ स्त्रियांना पिवळा बलक उपयोगी आहे. ज्यांची त्वचा तेलकट आहे त्यांनी चेहऱ्याला पांढरा बलक लवावा. दोन्हींमध्ये अर्धा चमचा मध घालवा. ज्यांची त्वचा नॉर्मल आहे त्यांनी चेहऱ्यावर प्रथम पांढऱ्या बलकाचा पॅक लावावा. तो सुकल्यावर त्याच पॅकवरती पिवळ्या बलकाचा पॅक लावावा म्हणजे हे दोन्ही बलक त्वचेमध्ये शोषून घेतले जातील.
कोबीच्या रसात गंधक व क्लोरीन ही द्रव्ये असतात. त्यामुळे त्वचेला नवे जीवन प्राप्त होते. कोबी किसून फळांप्रमाणे चेहऱ्यावरही लावता येतो.
ताज्या मक्याची कणसे किसून घेऊन पिळावीत. त्यातून मक्याचे दूध भरपूर प्रमाणात मिळते. या दुधात ‘अ’ व ‘ड’ ही जीवनसत्त्वे असतात. हा स्टार्च पॅक किंवा पिष्टमय पदार्थाचा पॅक म्हणून चेहऱ्यावर फारच उपयुक्त ठरतो.
आंबेहळद, जायफळ दुधात किंवा लिंबाच्या रसात उगाळून लेप करावा. हा लेप रक्तशुद्धी करणारा आहे. त्वचेवरील काळसरपणा किंवा डाग घालवण्यास या लेपाचा फार उपयोग होतो.
तांबडय़ा मुळ्याचा रस व दही यांचे मिश्रण चेहऱ्याला लावले तर चेहऱ्यावरचे मुरमांचे डाग कमी होतात.
-- गौरी पाटील
निसर्गोपचार तज्ज्ञ
9820584716
- जायफळ तुपात उगाळून तयार केलेला थोडासा लेप निजण्यापूर्वी हळूहळू कपाळावर चोळल्यास गाढ झोप येण्यास मदत मिळते.
- पाव चमचा जटामांसी आणि पाव चमचा धमासा चार-पाच तासांसाठी पाण्यात भिजत घालून ठेवून झोपण्यापूर्वी गाळून घेतलेले पाणी प्यायले तर डोके शांत होऊन झोप लागणे सोपे होते.
- ज्यांच्या प्रकृतीला वांगे चालत असेल त्यांनी वांगे भाजून घ्यावे, ते थंड झाले की त्यात मध मिसळून खाण्याने झोप येण्यास मदत मिळते.
- रात्री झोपण्यापूर्वी टाळूवर तेल, कानात श्रुती तेलासारखे तेल, नाकात घरी बनविलेले साजूक तूप किंवा नस्यसॅन घृत टाकण्यानेही शांत झोप लागण्यास मदत मिळते.
- नियमित अभ्यंग तसेच पादाभ्यंग सुद्धा शांत झोपेसाठी साहायक असतात.
- शांत करण्यासाठी संगीताचाही चांगला उपयोग होतो. विशेषतः ‘योगनिद्रा’सारखे शास्त्रीय पद्धतीने विशिष्ट राग व स्वरांचा वापर करून तयार केलेले संगीत व संपूर्ण शरीराला शांत करणाऱ्या सूचना यांचा समन्वय असलेले तंत्रही झोप येण्यास मदत करते. याच्या नियमित अभ्यासाने झोपेची गोळी घ्यायची लागलेली सवयही सुटते असा अनेकांचा अनुभव आहे. भारतीय शास्त्रीय संगीतातील खमाज, दरबारी, तोडी, भैरवी अशा रागांवर आधारित संगीतरचना ऐकल्याने शांत झोप येण्यास मदत मिळते.
- शांत करणारी, मेंदूला शामक अशी काही औषधेही असतात. ब्राह्मी, जटामांसी, मंडूकपर्णी वगैरे वनस्पतींपासून तयार केलेले सॅन रिलॅक्स सिरपसारखे सिरप रात्री झोपण्यापूर्वी घेतल्यास मन शांत होऊन झोप लागते. मानसिक अस्वास्थ्यामुळे व असंतुलनामुळे झोप येत नसल्यास ब्राह्मी स्वरसाचे नस्य, क्षीरधारा, शिरोधारा, शिरोबस्ती वगैरे उपचार करून घेतल्यासही फायदा होतो.
असं म्हणतात, वाताला मित्राप्रमाणे जिंकावे, पित्ताला जावयाप्रमाणे सांभाळावे आणि कफाला शत्रूप्रमाणे वागवावे.
वाताच्या पथ्यामधे सर्वात महत्वाचा आहारीय पदार्थ म्हणजे तेल.
आपण ज्या प्रदेशात रहातो, त्या प्रदेशातील तेलबियांपासून घाण्यावर काढलेले तेल, अनरिफाईंड तेल कच्च्या स्वरूपात जेवणात घेणे म्हणजे वाताची अर्धी चिकित्सा आहे.
हे तेल प्रदेशानुसार ठरवावे. जसे कोकणात खोबरेल तेल, घाटावर शेंगतेल, युपी मधे सरसोंका तेल, पण प्रदेश बदलून घेतलेले तेल पचायला जड होते.
अंगाला तेल लावले की, त्याला बाह्य स्नेहन, अभ्यंग म्हणतात.
आणि जेवणात वापरायचे ठरवले की ते होते, आभ्यंतर स्नेहन.
स्नेह म्हणजे तेल.
जेवणात आणि जीवनात हे कमी झालंय म्हणून रूक्षपणा, कोरडेपणा वाढलाय.
त्याला उतारा?
आतून बाहेरून स्नेहन. स्वेदन.
वात प्रकृतीच्या रुग्णांनी तेल तूप खाल्ले तरी कोलेस्टरॉल वाढत नाही. वाढणार नाही.
असे तेल कच्च्या स्वरूपात वापरत असताना वर गरम पाणी प्यावे. म्हणजे तेल पचायला सोपे जाते.
तेल वेगवेगळ्या प्रकारे का होईना, पण ते पोटात जावे यासाठी ग्रंथात तब्बल चौवीस प्रकार वर्णन केले आहेत. एवढे त्याचे महत्व लक्षात घ्यावे.
आताच्या माॅड मेडीकल नुसार तेल, तूप, नारळ, शेंगदाणे म्हणजे आरोग्याचे मोठे शत्रू.
काय दिवस फिरवले गेले आहेत पहा, जे उत्तम आहे ते जीवनातून आणि जेवणातून काढून टाकले आणि नको ती विषारी औषधे मरेपर्यंत घ्यायची सवय लावली.
नेहेमी नैसर्गिकरीत्या, आपोआप मलप्रवृत्ती साफ राहील यावर नीट लक्ष ठेवावे. नाहीतर परत वात वाढतो. कोणत्याही रेचक औषधांशिवाय ! पण जर काही चुकीच्या पथ्याने, विशेषतः जेवणातील तेलाचे प्रमाण कमी पडल्याने, वाताच्या आजारात, उतारवयाचा विचार करून, एखादे मृदु विरेचक औषध घ्यावे लागले तर घ्यावे.
"काय म्हणताय ?
संडासचे औषध रोज घ्यायचे ? अहो पण आमचे ते डाॅक्टर म्हणतात, संडासचं औषध घेऊच नये, त्याची सवय लागते म्हणे !"
"त्यांना सांगावं, म्हणावं, संडास साफ होणारं एखादे औषध निसर्गोपचार सल्ल्याने घेतल्यानंतर, आयुष्यभराची औषधं जर बंद होणार असतील तर काऽही बिघडत नाही.
हं, अश्या साध्या उपायांनी जर वात शांत झाला तर, हाॅस्पीटलची बिल मात्र कमी होतील, ( त्यामुळे डाॅक्टरांचं पित्त वाढेल ) हे मात्र नक्की !
-- गौरी पाटील
निसर्गोपचार तज्ज्ञ
9820584716
आंतरराष्ट्रीय डायबेटीज फौंडेशनच्या आकडेवारीनुसार सध्या भारतात ६२ दशलक्ष डायबेटीसचे रुग्ण आहेत. सध्या भारतात डायबेटीस रुग्णांची संख्या हि इतर देशांच्या तुलानेत सगळ्यात जास्त आहे. इंडिअन हार्ट असो. नुसार २०३५ मध्ये भारतात १०९ दशलक्ष रुग्ण डायबेटीसचे असतील. हि आपल्या चिंतेची बाब आहे. डायबेटीसने होणाऱ्या मृत्यूंची संख्या सुद्धा वाढेल असे आकडे वारीहून दिसून येते.
ह्याचे कारण काय?
1) हाय कॅलरी असलेला आहार.
2) वाढलेले व्यसनांचे प्रमाण.
3) व्यायामाचा अभाव
4) स्थौल्य
5) वाढता मानसिक ताण-तणाव
6) बदलती जीवनशैली
आयुर्वेद काय म्हणते?
“प्रकृष्टोमेह: यास्मिन रोगे स प्रमेह: म्हणजेच ज्या रोगात मुत्राचे प्रमाण वाढते (प्रभुताविलमुत्रता) तो प्रमेह. प्रमेह हा व्याधी डायबेटीस ह्या व्याधीशी मिळता-जुळता आहे. डायबेटीससाठी प्रचलित शब्द ‘मधुमेह’ हा प्रमेहाच्या वाताज प्रकारपैकी एक आहे.
आयुर्वेदानुसार प्रमेहाची करणे-
नवे धान्य वापरणे, नवे तांदूळ, उडीद व डाळींच अतिप्रमाणात घेणे, खीर, खिचडी, भात अधिक घेणे, नवीन मद्य/दारू पिणे, न विरजलेले दही, ताजे दही, द्रव पदार्थ, गोड पदार्थ अधिक प्रमाणात घेणे, पंचकर्म व व्यायाम न करणे, अधिक झोपणे, झोपून वा बसून राहणे, हे सर्व करणे शरीरात कफ, चरबी वाढवतात आणि प्रमेह हा व्याधी उत्पन्न करतात.
चला तर मित्रांनो, योग्य व गरजे इतकाच आहार घेऊया आणि पुरेसा व्यायाम करूया आणि भारताला डायबेटीस मुक्त करण्यासाठी प्रयत्न करूया.
वैद्य भूषण मनोहर देव.
ज्योती आयुर्वेद,
जळगाव 8379820693
http://wp.me/p7ZRKy-4k
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक नऊ
कामासाठी दिवस, विश्रांतीसाठी रात्र-भाग दोन
ज्यांना रात्रीचं काम करण्याची मजबुरी असेल त्यांनी काय करावं ? रात्रीच्या जागरणाच्या निम्मे वेऴ जेवणापूर्वी दिवसा झोपावे. आपलं जेवढं काम असतं, जसं काम असतं, त्यामानाने पुरेशी झोप घेतलीच पाहिजे.
शांत झोपेमधे शरीरातील सर्व अवयवांना विश्रांती मिळत असते. अधिक जोमाने काम करण्यासाठी ही विश्रांती उपयोगी होते. दिवसभर काम करून जी उर्जा संपून जाते, ती मिळवण्यासाठी रात्र उपयोगी होते.
नाईट शिफ्टमधे काम करत असलेल्या कामगारांना कोणत्याही रोगाची लागण लवकर होते. परिणामी त्यांना अनेक रोगांना सामोरे जावे लागते. विशेषतः चालक, वाॅचमन या वर्गामधे पचन हमखास बिघडलेले असते. पचन बिघडले की, वात वाढतो, पित्त वाढते, तयार झालेल्या अन्नरसाचे शोषण आणि पुढे शरीराचे पोषण होत नाही, पोट सुटत जाते, दिवसा जास्ती झोप घेतल्याने सूर्याच्या शक्तीचा योग्य वापर शरीराला करून घेता येत नाही, घाम कमी येतो, आमनिर्मिती जास्त होते, चरबी वाढते, प्रतिकारशक्ती कमी होते. रोग होतात. अशा रात्रपाळी मंडळींनी आपल्या जेवणामधे थोड्याश्या पाचक, गरम स्वभावाच्या पदार्थांचा वापर करायला हवा. जसे काळी मिरी, जिरे, आले, लसूण, सुंठ, धने. रात्रीच्या वेळी काम करताना वारंवार घेतला जाणारा चहा कमी करून त्याऐवजी सुंठ, मिरी, तुळस, खडीसाखर किंवा गुळ, धने, वापरून केलेला कषाय दुधाशिवाय घ्यावा. रात्रीचे काम आणि रात्रीचे जेवण यामधे देखील तीन तासाचे अंतर असावे. म्हणजेच सायंकाळी सहा सातच्या आत जेवून नंतर आठ नऊ वाजता कामासाठी जावे. मधे खूप भुक लागली तरच खावे, त्यामधील खाणे हे सुद्धा राजगिरा लाडू, चिक्की, फुलवलेले पोहे, लाह्या, पाॅपकाॅर्न असेच हलकेफुलके असावे. फळे, दूध, ज्युस असे पचायला जड होईल असा आहार रात्री नको.
रात्रपाळी कामगारांमधे वात जास्ती प्रमाणात वाढत असतो. म्हणून या कामगारांनी झोपण्यापूर्वी कानात, तळपायाला, डोळ्यांना, डोक्यावर आणि बेंबीमधे थोडे तेल लावावेच. कोकणात तेल म्हणजे खोबरेल, घाटमाथ्यावर शेंगतेल, बाकी सर्व प्रदेशात तिथे उपलब्ध होणारे स्थानिक तेलबीयांचे तेल. नाहीतर सदाबहार तीळतेल.
पहाटे जेव्हा कामावरून परत येणे होईल तेव्हा कामाच्या ठिकाणी होणाऱ्या नेहेमीच्या कामापेक्षा वेगळा व्यायाम करावा. जर रात्रौ कष्टाचे काम झालेले असेल तर सकाळी व्यायाम देखील हलका फुलका करावा, जसे प्राणायाम, नमन मुद्रा, ओंकार, कपालभाती, काही योगासने आणि सूर्यनमस्कार !
आणि ज्यांचे रात्रीचे काम केवळ लिखापटीचे किंवा कंप्युटर वर फक्त टाकटुक करायचे असेल त्यांनी मात्र या व्यायामाबरोबरच घाम आणणारे एरोबिक्स, दंड, जोर, बैठका, दोरीच्या उड्या, असे वेगवान व्यायाम करावेत. ज्यामुळे श्वासाची गती वाढेल आणि संपूर्ण शरीरातील रक्तसंचार गतीमान होईल.
स्नान करावे, नाश्त्याला पोटभर काहीतरी असावे. आहारामधे दही घेतले तरी चालते. ( पण आवडत असेल तरच आणि पचत असेल तरच नाहीतर नियम म्हणून नको ! ) त्यातील वात वाढवणारे पाणी काढून टाकावे, आणि चांगले फेसून थोडी साखर घालून सात आठ चमचे दही जेवताना खायला काहीच हरकत नाही.
आणि सूर्याच्या प्रकाशात हवेशीर जागी झोपावे. थोडक्यात एसी नकोच. सूर्याचे थेट किरण अंगावर पडले की उर्जा तयार होते. कोई मिल गया मधला "जादू" आठवतोय ना, तस्से !
मध्यंतर हवे असल्यास मधेच उठून पुनः छोटी हलकी कामे, व्यवहारातील आवश्यक कामे करून, पुनः थोडी झोप घेऊन सायंकाळी सहा वाजता उठून पूर्ण जेवण घेऊनच कामासाठी निघावे.
सूर्य असणे आणि सूर्य नसणे या दोन गोष्टी खूप काही बदल शरीरात आणि मनात घडवून जातात.
एक सूत्र नक्कीच लक्षात ठेवावे, ते म्हणजे झोपायचे कसे आणि केव्हा ! जेवणानंतर लगेच झोप घेतल्याने चरबी वाढते, जाडी वाढते, कफाचे आजार, मधुमेह वाढतात, हे आपण यापूर्वी पाहिले आहेच. म्हणून एक युक्ती करावी. जेवणानंतर झोपण्याऐवजी जेवणापूर्वी झोप पूर्ण करावी आणि नंतर उठून जेवून पुनः कामाला लागावे.
ही युक्ती, आरोग्य नियमातील ही पळवाट फक्त रात्रपाळी करणाऱ्या मजबूर प्राण्यांसाठीच. इतरांना किंवा त्याच्या नातेवाईकांना नाही. !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
17.05.2017
‘रॅन्समवेअर व्हायरस’ म्हणून ओळखला गेलेला आत्तापर्यंतचा सर्वात मोठा सायबर हल्ला झाल्यान शुक्रवारचा दिवस हा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी काळा दिवस ठरला. ‘वन्नाक्राय’ या रॅन्समवेअर व्हायरसने अक्षरश: धुमाकूळ घातला. सायबर सिक्युरिटी फर्म ‘अव्हास्ट’ने सांगितले की, भारतासहशंभराहून अधिक देश या हल्ल्याचे शिकार झाले.
या हल्ल्याचा सर्वात जास्त फटका इंग्लडला बसला. इंग्लडमधील हॉस्पिटल्स आणि टेलिफोन यंत्रणा यामुळे खिळखिळी झाली. अनेक हॉस्पिटल्समध्ये तर रुग्णांचे आॅपेरेशन आणि अपॉइंटमेन्ट देखील रद्द करावे लागले तर अनेक ठिकाणी रुग्णांचा डेटा नसल्यामुळे डॉक्टरांवर कागद व पेन घेऊन रुग्णांचा चार्ट तयार करण्याची वेळ आली.
हा व्हायरस पसरू नये यासाठी रेनॉल्ट या फ्रेंच मोटार उत्पादक कंपनीस फरान्स व स्लोवेनियामधील कारखाने बंद ठेवावे लागले. अमेरिकेत ‘फेडएक्स’ या सामानाची वाहतूक करणाऱ्या बलाढ्य कंपनीलाही याच्या दुप्रभावापासून वाचण्यासाठी पावले उचलावी लागली. रशियात बँका आणि रेल्वे यंत्रणेच्या संगणक प्रणालीला या व्हायरसचा प्रादुर्भाव जाणवला. तसेच जर्मनीतही दॉएच्च बाह्न या रेल्वे प्रशासनाला याचा फटका बसला.
’रॅन्समवेअर’ म्हणजे काय ?
‘रॅन्समवेअर’मध्ये कुणीतरी सायबर गुन्हेगार अज्ञात ठिकाणाहून तुमचा संगणक किंवा लॅपटॉप हॅक करतो आणि तुमच्याकडे खंडणीची मागणी करतो.एखाद्या दिवशी तुम्ही तुमचा संगणक किंवा लॅपटॉप चालू करायला जाता आणि त्यावर एक मेसेज तुम्हाला दिसतो की तुमचा संगणक किंवा लॅपटॉप आम्ही हॅक केला असून तुमचा संपूर्ण डेटा तुम्हाला हवा असल्यास स्क्रीनवर दिसत असलेल्या ‘पेमेंट’ आॅप्शनला क्लिक करून अमुक इतकी रक्कम या बँक खात्यात पुढील अमुक इतक्या तासांत जर ही जमा झाली नाही तर तुमचा सर्व डेटा डिलिट होईल. तुमच्या स्क्रीनवर एका बाजूला तुम्हाला दिलेल्या वेळेचे काउंटडाऊन सुद्धा चालू झालेले असते.
अर्थात तुमच्या संगणक किंवा लॅपटॉपचा संपूर्ण ताबा या हॅकर्सने घेतलेला असतो. या मेसेजच्या पुढे तुमचा संगणक किंवा लॅपटॉप जातच नाही. अर्थात, तुमची आॅपरेटिंग सिस्टम चालूच होत नाही. या प्रकारच्या सायबर गुन्हेगारीला ‘रॅन्समवेअर’ असे म्हणतात. असे प्रकार जगात अनेक ठिकाणी उघडकीस आलेले आहेत. जगाच्या कुठल्या तरी कानाकोपऱ्यात बसून तुमचा डेटा नष्ट करण्याचे उद्योग हे ‘सायबर भामटे’ करायला लागले.
काय काळजी घ्यावी ?
सगळ्यात आधी तुमच्या संगणक किंवा लॅपटॉपमध्ये चांगला अॅण्टीव्हायरस असणे तसेच अॅण्टीव्हायरस नियमति अपडेट असणे आवश्यक आहे.
इंटरनेट वापरताना नेहमी सुरक्षित वेबसाईटलाच भेट द्या. कुठल्याही मोफत भूलथापाना बळी पडून चुकीच्या वेबसाईटला किंवा अनोळखी लिंकला क्लिक करू नका.
संगणक किंवा लॅपटॉपची आॅपरेटिंग सिस्टमही नेहमी अपडेट असावी; कारण अपडेटमध्ये बऱ्याच वेळा काही प्रॉब्लेम्सवर सोल्युशन उपलब्ध असते. जसे की ‘रॅन्समवेअर’साठी पॅच मायक्र ोसॉफ्टने दोन महिन्यापूर्वीच जारी केला होता .
तुमच्या संगणक किंवा लॅपटॉपचा नियमति डेटा कॉपी करून दुसऱ्या हार्डडिस्कवर ठेवावा. म्हणजे तुमचा संगणक हॅक झाला आणि तुमच्या डेटाच्या बदल्यात हॅकरने तुमच्याकडे पैसे मागितले तरी तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.
या कफाला शत्रूप्रमाणे वागवावे. अजिबात दयामाया नको. जरा ढील मिळाली की, काही खरं नाही. डोक्यावर बसलाच म्हणून समजा.
याचा अत्यंत आवडता अवयव म्हणजे जीभ. खाण्याची एकही संधी अजिबात सोडणार नाही. चवीनं खाणार, पण त्याचा गाजावाजा नाही करणार. वात एवढुंस खाईल आणि आव आणेल हे एवऽढं खाल्याचा ! पण कफाचे याच्या नेमके ऊलटे. खाईल हेऽऽ एवढं, आणि सांगेल, खाणारा, तो मी नव्हेच !
म्हणून वारंवार उपवास करण्याची शिक्षा या कफाला करावी लागते. पहिलं पचल्याशिवाय दुसरं आत टाकू नको, असं निक्षून सांगावं लागतं. पण आपलं याचं चालूच, कळतंय पण वळत नाय. एकदा खायला सुरवात केली की थांबायची बात नाय, साधा भूकेचा अंदाजसुद्धा याला घेता येत नाय.
आणि म्हणून जातो फुगत, जातात पोटावर टायर वाढत !
आपण खाणार आणि डाक्टर च्या औषधाला गुण नाय म्हणून ओरडणार.
याला पथ्य युक्तीनेच सांगावे लागते. लाह्या, काॅर्नफ्लेक्स, फुलवलेले पोहे, राजगीरा, चुरमुरे. त्यावर थोडेसे जिरेपूड, काळे मीठ घालून खा, असे सांगावे लागते. दिसायला भरपूर, पण मुळात ऐवज कमी असे, भाजून फुलवलेले धान्य ! बस खात किती ते.
याच्यासाठी पाणी कमी, तेल कच्चेच चांगले, तिखट झणझणीत खाल्ले तर अधिक चांगले. पाणी गरम प्यायला आवडणार नाही, पण तेच द्यावे.
मुख्य म्हणजे याला खाल्ल्यावर झोपायला अजिबात द्यायचे नाही. नाहीतर मग आणखीनच फुगला म्हणून समजा. आधीच झोप प्रिय असलेला, खाल्याजेवल्यावर कुठेतरी टेकायला, झोपायला मिळते का, हे पहाणारा. याच क्षणाला सांभाळले की, झाले. नाहीतर मधुमेहाचा सख्खा सखा कधी होईल हे कळणार देखील नाही.
वाताचा सख्खा भाऊ असून देखील, वागणे मात्र वाताच्या अगदी ऊलटे.
पण दया नको माया नको, भरपूर घाम येईपर्यंत कामाला लावायचे, घाम आला की पंखे बंद करायचा, आंघोळ झाल्यावर तर पांघरूण घेऊन बसायचे, पोहोणे, धावणे, पळणे, कष्टाची कामे करणे, दंड, जोर बैठका, लोटांगण, सूर्यनमस्कार, जाॅगिंग हे सर्व झाल्याशिवाय तुला नाश्ता काय पाणी सुद्धा मिळणार नाही, असे काळजावर दगड ठेवून सांगावे लागते.
मुळात स्नेहाची आवड असल्याने, थोडेसे गोड बोलून, बेमालूमपणे आपले काम करून घेणार्या या उस्तादाला कुस्ती खेळून नमवावेच लागते.
याला कसली चिंता, कधीच नसते. नवीन (सकारात्मक ) चिंता निर्माण करून दिली तरच हा आटोक्यात रहातो. बरं हे सगळं तो प्राकृत असतानाच करायचे. एकदा विकृत झाला की म पांडुरंगाच्या चरणी विलीन होईपर्यंत औषधेच घ्यावी लागतात.
पण याला आयुर्वेदात उत्तरे मिळतात बरं का....
शोधलं की सगळं सापडतं...!
-- डॉ. गौरी पाटील
निसर्गोपचार तज्ज्ञ
9820584716
साधारणतः वयाची ५० शी ओलांडली की काहिंना हळूहळू गुडघेदुखीचा त्रास सुरू होतो, त्याचे कारण शरीरातील सांध्यांमध्ये लुब्रिकंट, कॅलशियम तयार होण्याची क्रिया मंदावणे.
त्यावर हुकमी उपाय म्हणून गुडघे बदलणे (कृत्रिम गुडघे) असे डाॅक्टरांकडून सुचविले जाते.
जे लोक श्रीमंत आहेत त्यांना हा इलाज परवडतो, त्याची कारणे फक्त श्रीमंती असेही नाही, कित्येक वेळा हा खर्च विमा कंपनीकडून वसुलतात. पण सामान्यांचे, मध्यमवर्गीयांचे काय?
अनेक वेळा कुणीतरी सांगितले म्हणून हे लोक अशा महागड्या उपचारासाठी कर्ज काढून तयार होतात.
परीणाम.... अपयश!
निसर्गाची किमया अशी की त्याने प्रत्येकाला दोन गुडघे दिले ते त्याच्या आयुष्यभर पुरावे म्हणून; पण आपणच त्याची आयुष्यभर काळजी न घेतल्यामुळे ही परिस्थिती ओढवते.
बरं हे कृत्रिम गुडघे बसविल्यामुळे २-३ वर्षे बरे वाटते आणि पुन्हा हरीदासाची कथा मूळ पदावर.
यावर एक भारतीय निसर्ग उपचार पद्धती आहे. जिचा लाभ लाखो गुडघादुखीने त्रस्त व जे भलीमोठ्ठी रक्कम खरंच करू शकत नाहीत त्यांच्यासाठी.....
शहरात नाही पण खेडोपाडी न लावता कोणत्याही प्रकारचा लागवड खर्च न करता सहजपणे उगवणारी व आपणा सर्वांना परिचित असलेली बाभूळ या दुखण्यावरचा सोपा उपाय आहे.
अमेरिकेत हे झाड नाही. नाहीतर आतापर्यंत त्यांनी हर्बल नावाखाली हे औषध आपल्याला देऊन करोडो रूपयांचा चुना लावला असता.
असो, या बाभळीच्या शेंगा वाळवून त्याचे चूर्ण तयार करून रोज सकाळी एक चमचा थोड्या कोमट पाण्याबरोबर घ्या. २-३ महिन्यात गुडघेदुखी गायब. औषध जवळपास फुकट आणि लाखो रूपयांची बचत.
बाभळीच्या शेंगा शोधत बसण्यापेक्षा बाभळीचा डिंक जो खाण्याचा डिंक म्हणून विकत मिळतो. तो गाईच्या तूपात तळून गरम पाण्याबरोबर घ्यावा. किंवा लाडू करून खावेत. जोडीला खोबरेल तेल पण दोन चमचे दोन वेळा घ्यावे.
-- `आरोग्यदूत' WhatsApp ग्रुपवरुन
1.एक लिंबू घ्या अर्धे कापा. त्यातील बिया काढून टाका....लिंबू मिक्सर मधून ग्राइंड करून घ्या...
एक काकडी घ्या आणी कट करा...मिक्सर मधून ग्राइंड करा....लिंबू आणि काकडी ची पेस्ट मिक्स करा....केस थोडे ओले करा....केसांना ही पेस्ट लावा...सगळीकडे लावा मुळांना....केसांना वरून..10 मिनिटे ठेवा नंतर फक्त पाण्याने धुवा
केस ड्राय असतील तर काकडीचे प्रमाण थोडे जास्ती घ्या. जर केस तेलकट असतील तर लिंबाचे प्रमाण वाढवा...केस नॉर्मल असतील तर वरती सांगितलेले प्रमाण योग्य आहे
2. रिठा आवळा आणि शिकेकाई प्रत्येकी 100 ग्राम आणा....जिथे आयुर्वेदिक गोष्टी मिळतात अश्या दुकानातून मिळतील.....त्यात 2 लिटर पाणी मिक्स करा आणि रात्रभर भिजवा....सकाळी 11 किंवा 12 वाजे पर्यंत भिजू द्या.....नंतर पावभाजीचे स्मॅशर घ्या स्मॅश करा....रिठा मध्ये बिया असतील त्या टाकू नका त्या ही पाण्यात राहू देत
नंतर पातेले गॅस वर ठेवा....पाणी पूर्ण बॉईल होऊ द्या....बॉईल होताना वरती फेस येईल.....तो रिठ्या मुळे येतो....नीट बॉईल झाले की गॅस बंद करा....परत पावभाजीचे स्मॅशर घ्या आणि नीट स्मॅश करा....थोडे थंड होऊ द्या....प्लास्टिकचे मोठे गाळणे घ्या.....हे मिश्रण 2 वेळा गाळ.... कोणत्याही बाटलीत भरा....हे 2 महिने टिकते...हा उत्तम शाम्पू आहे आठवड्यातून 2 वेळा याने केस धुवा....केसांचे गळणेही कमी होईल आणि केस वाढू लागतील
3. एक कप पाणी घ्या त्यात दोन चमचे गहू, एक चमचा मेथी दाणे, 2 चमचे त्रिफळा चूर्ण( जर त्रिफळा चूर्ण नाही मिळाले तर त्रिफळा टॅबलेट मिळतात मार्केट मध्ये त्याची पावडर करून वापरू शकता. त्यात 20 ग्राम रिठा टाका जास्ती बनवायचे असेल तर हे प्रमाण वाढवू शकतात
हे सगळे पाण्यात नीट मिक्स करा....झाकून ठेवा रात्र भर भिजवा.....सकाळी गाळून घ्या....बाटलीत भरा..…शाम्पू तयार आहे....आठवड्यातून 2 वेळा वापरा..... हेअर फॉल थांबतो केसही वाढू लागतात
4. पाणी बेकिंग सोडा आणि व्हाइट व्हिनेगर चा शाम्पू
बेकिंग सोडा आणी पाणी 1:3 ratio मध्ये घ्या....काचेचे बाउल घ्या नीट मिक्स करा हे मिश्रण केस थोडे ओले करून apply करा....मुळांशी केसांना वरून सगळी कडे लावा मसाज करा 2 ते 3 मिनिटे आणि गरम पाण्याने धुवा. मसाज हलका करा.
नंतर व्हाइट व्हिनेगर आणि पाणी 1:4 प्रमाणात घ्या व मिक्स करा. धुतलेल्या केसांवरून पाणी नीट जाऊ द्या नंतर व्हाइट व्हिनेगर व पाणी याचे मिश्रण केसांना लावा 4-5 मिनिटे ठेवा व गरम पाण्याने वॉश करा
ह्या शाम्पू ने केस वाढू लागतील आणि शाईन ही करतील....
-- `आरोग्यदूत' WhatsApp ग्रुपवरुन
Copyright © 2025 | Marathisrushti