(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • सोशल मिडीया आणि त्यावर व्यक्त होणं-एक तारतम्य..

    मी सोशल मिडीयावर लिहितो. खूप लिहितो. बऱ्याचदा वैचारीक, जड असं काहीतरी लिहीतो. सहज मनात आलेले विचार असतात ते. हे असं का आणि ते तसंच का, असे खुप विचार माझ्या मनात सतत पिंगा घालून मला छळत असतात. हे कुणाकडे व्यक्त करावेत, तर ते ऐकून घ्यायला कुणाकडे वेळच नाही

  • गुडघेदुखीवर भारतीय पुष्पौषधी उपाय

    २-३ पिवळा सोनचाफ्याच्या फुलाच्या पाकळ्या काळपट होई पर्यंत अर्धी वाटी तीळाच्या तेलामध्ये तळाव्यात. तेल गार झाल्यावर गाळुन घ्यायचे आहे.

    हे सोनचाफ्याचे तेल दररोज गुडघ्यामध्ये लावुन जिरवावे. ह्यामुळे गुडघ्याच्या वेदना कमी होतात.

    सप्तरंगी स्वस्तिक थेरपी
    लाल स्वस्तिक गुडघ्याला व पिवळे स्वस्तिक माकडहाडाला रात्रभर बांधुन ठेवायचे आहे. दिवसा निकँपमध्ये लाल स्वस्तिक ठेवले तरी चालते.

    सूर्य किरण चिकीत्सा
    पांढ-या लहान बाटलीला लाल रंगाचा चौपदरी जिलेटीन पेपर सर्व बाजूंनी गुंडाळून त्यामध्ये २०० ग्रँम तीळाचे तेल घ्यावे. ही बाटली सकाळी ९ ते दुपारी ४पर्यंत सुर्यप्रकाशात ठेवावी. ही बाटली सलग १५ दिवस सुर्यप्रकाशात चार्ज करावी. नंतर ते तेल गुडघ्यांना जिरवावे.

    --- अरविंद जोशी, BSc.
    मोबा. नं. 9421948894

  • जागतिक संग्रहालय दिवस

    संग्रह म्हटलं की छंद, सामान्य व्यक्ती एखाद्या गोष्टीकडे सीमित दृष्टीकोनातून पाहते पण त्याच गोष्टीकडे छंदवेडी व्यक्ती कल्पकतेने पाहते. छंद आयुष्यात उर्जा निर्माण करतो,असे मानणाऱ्या आणि प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात कोणतातरी छंद बाळगायला हवा असे म्हणणारे आमचे मित्र धनंजय बदामीकर यांचा विंटेज कार चा छंद.

    ‘विंटेज कार’ बाळगणे हे येऱ्यागबाळ्याचे काम नव्हे. याचा अर्थ ही हौस केवळ श्रीमंत माणसांचीच आहे, असेही नाही. मुख्य म्हणजे त्यासाठी गाडीवर प्रेम असावे लागते. ही गाडीसुद्धा इतर गाडय़ांसारखी धातूपासूनच तयार झालेली असते. असे असले तरी हिचा सांभाळ करताना धसमुसळेपणा करून चालत नाही. तिला तळहातावरील फोडाप्रमाणे जपावे लागते. ती आहे तशीच रहावी यासाठी हरप्रकारे प्रयत्न करावे लागतात. एकीकडे अद्ययावत तंत्रज्ञान असलेल्या कितीही गाडय़ा बाळगल्या तरी ही गाडी अनमोल असते. इतर गाडय़ांच्या बाबतीत आपण कितीही ‘रफ अॅंण्ड टफ’ वागत असलो तरी व्हिन्टेज गाडय़ांच्या बाबतीत मात्र ‘हँडल वुइथ केअर’ या धोरणाचा अवलंब करावा लागतो.

    पुण्यातील आमचे मित्र धनंजय बदामीकर असाच विंटेज कारचा छंद बाळगून आहेत. धनंजय बदामीकर यांच्या कलेक्शन मध्ये अनेक विंटेज कार आहेत. त्यांच्या विंटेज कार्स अगदी कालच खरेदी केल्यासारख्या दिसतात. गेली सोळा वर्षे ते विंटेज कार छंद बाळगुन आहेत.

    त्यांच्या कलेक्शन जर्मन कार मध्ये, व्हॉक्स वॅगन टेम्पो, ओपेल, बीटल, मायक्रो बस, जेट्टा, अमेरिकन कार मध्ये,फोर्ड, डीसेटो, ब्यूक, शेवरलेट फ्रेंच कार मध्ये सिट्रोन, एच व्हॅन, भारतीय कार मध्ये हिंदुस्थान, लॅडमास्टर, फियाट अशा मिळून जवळ जवळ ७० ते ७५ व्हिन्टेज कार आहेत.

    धनंजय बदामीकर नेहमी म्हणतात, ‘व्हिन्टेज कार’ बाळगायची असेल तर गाडीवर जीव असावा लागतो. व्हिन्टेज कारची निगा कशी राखावी, यावर धनंजय बदामीकर म्हणतात मुळात म्हणजे ही नेहमीसारखी गाडी नाही. या गाडय़ांना पॉवर स्टेअरिंग नसते, ब्रेकसुद्धा मेकॅनिकल असतात. त्यामुळे चालवताना ती सांभाळून चालवावी लागते. त्याचप्रमाणे आठवडय़ातून किमान २० ते २५ किलोमीटर चालवली पाहिजे. तसे नाही केले तर ब्रेक ‘जाम’ होऊ शकतील, टायरची समस्या उभी राहू शकेल. सहा महिन्यांतून एकदा तरी या गाडीचा ‘चेक अप’ करायला हवा. अशा गाडय़ांचे सुटे भाग सहजासहजी मिळत नाहीत. मुंबईतील ऑपेरा हाउस किंवा चोर बाजार या ठिकाणी गाडय़ांचे सुटे भाग काही वेळा मिळतात. तसे नसेल तर मात्र ते तयार करावे लागतात. त्यासाठी तशी जाणकार व्यक्ती असली पाहिजे. म्हणूनच अनेक व्हिन्टेज कारमालक सुटे भाग जमवून ठेवतात. म्हणजे एखाद्या बाजारात जुन्या प्रकारचे गिअर्स दिसले, इंजिन दिसले तर गरज नसूनही ‘व्हिन्टेज कार’चा मालक ते भाग घेऊन ठेवतो. यांची मूळ किंमत शंभर रुपये असली तरी विकत घेताना अशा भागांसाठी कदाचित पंधराशे रुपयेही मोजावे लागू शकतात. आम्ही धनंजय बदामीकर यांच्या बरोबर मुंबईतील ऑपेरा हाउस, चोर बाजार या ठिकाणी गाडय़ांचे सुटे भाग खरेदी करण्यास कित्येक वेळा गेलो आहोत. धनंजय बदामीकर यांच्या गाड्या प्रदर्शनासाठी नेल्या जातात, तेव्हा त्यांना खूप काळजी घ्यावी लागते. तिच्या बाजूला सुरक्षारक्षक उभा करावा लागतो. कारण पाहणारा पटकन दार उघडतो किंवा कुठेही हात लावतो. तसे करताना चुकून हँडलला काही झाले, किंवा आरसा वाकला किंवा काहीही झाले तरी त्याची डागडुजी करण्याचा खर्च खूप असू शकतो किंवा तुटलेला सुटा भाग परत मिळेलच असे नाही.

    साडे माडे तीन, दुनियादारी, बालगंधर्व, अक्षय कुमारचा रुस्तम, अशा अनेक चित्रपटात धनंजय बदामीकर यांच्या विंटेज कार आपण बघीतल्या असतीलच.

    धनंजय बदामीकर यांच्या विंटेज कार रस्त्यावरून जाताना ‘वो गाडी देख’ अशा प्रकारचे संवाद कानी पडतात तेव्हा त्याला तोड नसते. केवळ बुजुर्गच नव्हे तर लहान मुलेही वळून वळून या गाडीकडे पाहतात. सिग्नलला थांबल्यावर कोणी गाडीची चौकशी करतो, कोणी नुसताच ‘थम्स अप’ करून दाखवतो, तेव्हा त्याने गाडी सांभाळण्यासाठी घेतलेली मेहेनत सार्थकी लागल्याचे त्यांना एक समाधान मिळते! धनंजय बदामीकर यांनी आपल्या गाड्या दुरुस्ती साठी स्वत:चे आद्यावत गॅरेज बनवले आहे. धनंजय बदामीकर यांना त्यांच्या विंटेज कारचे कायम स्वरूपी एक संग्रहालय करायचा विचार आहे. जागतिक संग्रहालय दिवसाच्या निमित्ताने धनंजय बदामीकर यांचा विंटेज कारच्या छंदाला सलाम.

    धनंजय बदामीकर संपर्क.
    ९४२२००९८९५
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग चाळीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक नऊ

    कामासाठी दिवस, विश्रांतीसाठी रात्र-भाग पाच

    सगळे पशुपक्षी आपले पोट भरण्यासाठी दिवसा (खाण्याचे ) काम करतात. रात्रीचा दिवस करत नाहीत. त्यामुळे या सर्व प्राण्यांचे आरोग्य चांगले असते. माणसाला मात्र डाॅक्टर लागतो. पूर्वी वैद्यावर काम भागायचे, आता वैद्य पुरत नाही.

    रात्रीचे खाल्लेलं पचवायला जास्ती शक्ती संपते. आणि वेळ ही जास्ती लागतो. दिवसा उजेडी सकाळी जेवलो तर अन्न पचायला फक्त आठ तास लागतात. आणि पुनः सायंकाळी चरचरीत भूक लागते. तर रात्रीचे जेवलेले पचायला तब्बल सोळा तास लागतात. रात्री आठ वाजता जेवलो तर पुनः चरचरीत भूक लागते दुपारी बारा वाजता ! म्हणजे जवळपास दुप्पट वेळ लागतो.

    रात्री कामही बेताचेच असते. सर्व वेळ झोपेतच असतो, त्यामुळे शरीराच्या हालचाली पण कमीच. श्रम कमी आणि अन्न जास्ती वेळ एकाच ठिकाणी पडून राहते. त्याचा परिणाम म्हणून पोटात चिकटपणा तयार होतो. चरबी वाढते, पोट सुटते, रक्तातील साखर किंवा आम म्हणजे आजच्या भाषेतील चरबीचे अनेक प्रकार म्हणजे ट्रायग्लीसराईड, कोलेस्टेरॉल वगैरे वगैरे, वाढतात.

    दिवसा ही चरबी तेवढ्या प्रमाणात वाढत नाही, कारण ही चरबी किंवा चिकटपणा कमी करणारा सूर्य फक्त दिवसाचाच असतो. त्यामुळे दिवसा घेतलेल्या अन्नावर अग्निची प्रक्रिया पटकन होते, शारीरिक हालचाली नीट होत असतात. पोट हलत असते, चिकटपणा कमी निर्माण होतो. शरीर प्रमाणबद्ध रहाते. स्वास्थ्य मिळते.

    निसर्गाने दिलेले नियम पाळले तर औषधांची गरजच उरणार नाही. नाहीतर कृत्रिम औषधांचा अक्षरशः बाजार झालाय. एकदा डाॅक्टरांकडे जावे लागले तर एक औषध कायम स्वरूपात सुरू होते. त्यातही आपली मूळ तक्रार राहते बाजूलाच, नवीनच रोग, ज्याचा आपल्याला त्रास काहीच नाही, तो शोधून काढला जातोय. आणि आपण तो अगदी सहज मान्य पण करतोय. त्यासाठी पुनः कृत्रिम औषधे आहेतच. एक नसलेला त्रास कमी होण्यासाठी दुसरे त्रासदायक औषध घेणे हा पर्याय.

    असो ! काय करणार ?
    आरोग्याच्या मूळ व्याख्याच बदलून गेल्यात.
    ते पूर्वीचे फॅमिली डाॅक्टर बदलले, ती आपुलकीही संपून गेली.
    ऋतुही बदलले, हवामानही बदलले,
    पाच दिवसाची कसोटी आता एका ओव्हरपर्यंत कमी होत आली.
    रात्रही बदलली आणि आता दिवसही बदलले.
    रोग बदलले, आरोग्यही बदलले !
    कामाचे दिवस आणि विश्रांतीची रात्रही बदलली !!

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    20.05.2017

  • कार्डियक अरेस्ट

    काल सुप्रसिद्ध अभिनेत्री रीमा लागू यांचे ‘कार्डियक अरेस्ट’ च्या कारणाने निधन झाले, हे ऐकून सगळ्यांना शॉक बसला. संपूर्ण देशात पुन्हा चर्चा सुरु झाली की, गेल्या काही काळापासून या कारणाने मृत्यु होणाऱ्याच्या संख्येत वाढ होत आहे.

    कार्डियक अरेस्ट म्हणजे काय?
    कार्डियक अरेस्ट म्हणजे अचानक ह्रदयाचे काम करणे बंद होणे होय. विशेष म्हणजे हा आजार दिर्घ काळाचा नसतो, यासाठी ह्रदयाशी संबंधीत असलेल्या आजारांपेक्षा याला खूपच धोकादायक मानले जाते.
    लोक याला ह्रदय विकाराचा झटकाच समजतात, मात्र कार्डियक अरेस्ट ह्रदय विकाराच्या झटक्यापेक्षा वेगळा असतो. तज्ज्ञांच्या मते, कार्डियक अरेस्ट तेव्हा होतो, जेव्हा ह्रदय शरीराच्या चारही बाजूंनी रक्तसंचार करणे बंद करते. मेडिकल नियमांनी म्हटले तर ह्रदय विकार सर्कु लेटरी समस्या आहे आणि कार्डियक अटॅक इलेक्ट्रिक कंडक्शनमध्ये निर्माण झालेल्या अडथळ्यामुळे होतो.

    आपल्या छातीत दुखायला लागले की, ह्रदय विकाराच्या झटक्यादरम्यानच याप्रकारचे दुखते असे आपण समजतो, मात्र तज्ज्ञांच्या मते, असे दुखणे हार्ट बर्न किंवा कार्डियक अटॅकच्या कारणानेही होऊ शकते.
    कार्डियक अरेस्टमध्ये ह्रदयाचे ब्लड सर्कुलेशन पुर्णत: बंद होते. ह्रदयाच्या आत वेंट्रीकुलर फाइब्रिलेशन निर्माण झाल्याने याचा परिणाम ह्रदयाच्या ठोक्यांवर होतो. यामुळे कार्डियक अरेस्टमध्ये काही मिनिटातच मृत्यु होतो.

    कार्डियक अरेस्ट अचानकच होतो. विशेष म्हणजे ज्यांना ह्रदयासंबंधी आजारपण आहे, त्यांना कार्डियक अरेस्ट होण्याची शक्यता जास्त असते.

    कधी-कधी कार्डियक अरेस्ट अगोदर छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास, पल्पीटेशन, चक्कर येणे, शुद्ध हरपणे, थकवा किंवा ब्लॅकआउट होऊ शकते.

    याच्या उपचारासाठी रुग्णास कार्डियोपल्मोनरी रेसस्टिसेशन (सीपीआर) दिले जाते, ज्यामध्ये ह्रदयाच्या गतीला नियमित केले जाऊ शकते. शिवाय या रुग्णांना ‘डिफाइब्रिलेटर’ने विद्युत शॉक देऊन हार्ट बीटला नियमित करण्याचा प्रयत्न केला जातो.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • पुस्तकातून समाधीकडे..

    अलीकडे योग, ध्यान (मेडीटेशन, समाधी हो..!) वैगेरे शब्दांची चलती आहे आणि साहजिकच आहे, आणि ज्याची चालती असते त्याच व्यापारीकरण होतेच. त्यामुळे ध्यान, योगचे (‘’योग’साठी आपण ‘योगा’ हा तद्दन चुकीचा शब्द वापरतो. चुकीच इंग्रजी आत्मविश्वासाने शिकवल्याचा आणि शिकल्याचा हा परिणाम. ‘राम’सारख्या देवाचा ‘रामा’गडी या मुळेच झाला.

  • डिप्रेशन

    दिर्घ श्वासोच्छ्वास करणे हा उपाय सगळे योगा वाले सुचवतात. पाच मिनिटे असे केल्यास बराचसा मोकळेपणा वाटतो असे म्हणतात. मला काही फारसा फरक पडत नाही या मुळे!

    -तुम्ही जे काम करीत आहात, ते एकदम बंद करा , आणि दुसरे काही तरी करणे सुरु करा. मग ते एखाद्या मित्राला फोन करणे, मैत्रिणीबरोबर संध्याकाळची भेट ठरवणे, कट्टा गॅंग बरोबर एखादं गेटटूगेदर ठेवणे असे काही पण असू शकते.

    अगदी काहीही न करणे हा पण एक उपाय बरेचदा मी करतो. थंडी असेल तर मस्त पैकी ब्लॅंकेट मधे गुरफटून एखादे पुस्तक वाचत बसणे ,मस्त उपाय आहे.

    -पायात रेबॉक किंवा नायके चढवा, आणि निरुद्देश फिरणे सुरु करा. तुमच्या बिल्डींग मधून बाहेर पड्ल्या बरोबर जो कोणी समोर येईल त्याच्याकडे पाहून स्मित हास्य करा. शेजारचा कोणी समोर दिसलाच, तर पाच मिनिटे उगाच काही तरी गप्पा मारा, आणि शेवटी काहीच न ठरवता, केवळ रस्त्याने गर्दीचा भाग होऊन कुठे तरी चालत जाणे करून पहा.

    -सृष्टीसौंदर्य न्याहाळत जाणॆ. हे जरी या कॉंक्रिट जंगलात शक्य नसले, तरी पण इतर ” प्रेक्षणीय” गोष्टी बऱ्याच असतात, जर लग्न झालेलं नसेल तर चांगली ’ स्थळं ” असतातच, त्यांचा शोध घ्या.

    आइस्क्रीम, चाट, वगैरे गोष्टी जर आवडत असतील तर उठा, आणि त्या भैय्या कडे जाऊन या. आवडीची वस्तू खायला मिळाली की बराच शांत होतो मी स्वतः.

    -घराजवळ बगिचा असेल तर बगिचा मधे चालत जा. नुसते बगिचा मधे बसलो, तरी पण छान वाटते. एखादी गोष्टीचे रुपांतर बीजांकुर पासून तर फुला- फळापर्यंत झालेले पहाणे हा पण एक मस्त अनुभव असतो.

    -तुम्ही जर एखादी गोष्ट केलेली असेल की जिच्यामुळे तुम्हाला गिल्टी वाटत असेल, (जसे एखाद्या प्रिय व्यक्तीशी खोटे बोलणे), तर तो गिल्ट मनातून काढून टाका. गिल्ट ही कोळ्यांच्या जाळ्या सारखी असते, एकदा तुम्ही त्यात अडकला, की त्यातून बाहेर पडणे शक्य होत नाही.

    -फोटोग्राफी ,ट्रेकिंग, वाचन, पेंटींग, पतंग उडवणे, वगैरे कुठला तरी छंद जोपासा. जास्त डिप्रेशन आले की छंद हा एक मस्त विरंगुळा होऊ शकतो. मी लहान असतांना तास अन तास गच्चीवर पतंग उडवत बसायचो. एखादे म्युझिकल वाद्य वाजवणे, खेळ किंवा इतर काही छंद असू शकतात. जिग सॉ पझल हजार पिसेसचे घेऊन या , मस्त वेळ जातो शांत जागी बसून मेडीटेशन करणे.

    गरम बोर्नव्हिटाचा ग्लास संपवून मस्त पैकी झोप काढा. जस्ट रिलॅक्स! आवडीचे संगीत ऐकणे हा पण मस्त उपाय आहे. शक्यतो हेडफोन लावून गाणी ऐकल्यास लवकर आराम मिळतो. शक्यतो क्लासिकल संगीत जास्त बरे वाटते अशा वेळेस!

    -आपल्याला स्ट्रेस जास्त येण्याचे कारण म्हणजे फायनान्स. आपल्या कुटुंबीयांची काळजी प्रत्येकालाच असते, कधी तरी एकदम आपल्याला जाणीव होते की आपण काहीच करून ठेवलेले नाही. हल्ली पूर्वी प्रमाणे लोकांना पेन्शन पण नसते, त्यामुळे आपल्या अपरोक्ष आपल्या कुटुंबाचे कसे होईल? ह्या गोष्टी मुळे डिप्रेशन येण्याचे प्रमाण फार जास्त आहे. यावर उपाय म्हणजे फायनान्शिअल प्लानिंग व्यवस्थित करून ठेवणे. टर्म पॉलिसी, ज्या मधे कमी इन्स्टॉलमेंट आणि जास्त रिस्क कव्हर असते ती काढणे. एफ डी वगैरे , इनव्हेस्टमेंट प्लानिंग करणे ..

    -आणि सगळ्यात शेवटचे म्हणजे काही तरी लिहा. जे काही मनात येईल ते लिहून काढा, एखादी खास वही, किंवा ऑन लाइन ब्लॉग तयार करा, की ज्यावर तुम्ही आपले मन मोकळे करू शकाल. मनात जे काह येइल ते लिहिलं की मानसिक त्राण कमी होतो, हे मी स्वतः अनुभवले आहे. ज्या गोष्टी कोणाशीच बोलता येत नाहीत, पण मनात येत असतात, आणि मग त्यांच्यामुळेच तुम्हाला डिप्रेशन येत असते. लिहून काढणे हा एक मस्त उपाय आहे-

    असं म्हणतात, की जर एखादा माणूस कायम सिरियस राहिला, स्वतः कधी काही एंजॉय केले नाही, कायम कुठल्यातरी “अमूर्ताच्या शोधात” गुरफटला गेला तर तो स्वतःच्या नकळत वेडा ( सिझोफ्रेनिक ) होऊ शकतो. अशी मानसिक अवस्था आली की आत्महत्येचे विचार मनात येणे सुरु होते. म्हणून हे प्रकर्षाने टाळा.

    -दिवसभरात , स्वतः साठी कमीत कमी एक तास काढून ठेवा. तो तुमचा स्वतःचा स्वतःसाठी दिलेला वेळ असेल. स्वतः बरोबर रहा- बी विथ युवरसेल्फ.’पॉझिटिव्ह थिंकींग” सुरु करा.

    -इंटरनेट मुळे आपले घराबाहेर पडणे बरेच कमी झालेले आहे. स्वतः भोवती एक स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टीम तयार करा. त्या मधे , पत्नी, मुलं, मित्र, मैत्रिणी, शेजारी, असे अनेक लोकं असू द्या. जितके जास्त लोकं तुमच्या सपोर्ट सिस्टीम मधे, तितके सहज पणे तुम्ही डिप्रेशन मधून बाहेर पडू शकता. दिवसभरात थोडा तरी वेळ काढा, तुम्हाला आवडणाऱ्या व्यक्ती सोबत घालण्यासाठी. शक्यतो औदासिन्याच्या अवस्थेत एकटे रहाणे टाळा.

    -- सुषमा मोहिते

  • कुळीथ (हुलगे)

    कुळीठास हुलगे असेही म्हणतात. याचे इंग्लिश नाव आहे हॉर्स ग्रॅम (horse gram) कुळीथ हे शहरांमध्ये फारसे वापरले जात नाही. खरंतर स्थूल व्यक्‍तींसाठी हे फायद्याचे कडधान्य आहे. सर्व कडधान्यांच्या तुलनेत कुळथांमध्ये सर्वांत कमी चरबी आहे व त्याचबरोबर त्यातील चोथ्याचे प्रमाण अधिक आहे.

    आयुर्वेदशास्त्राने कुळथास आजारी व्यक्‍तींसाठी पथ्यकारक मानले आहे. तसेच लघवीच्या विकारांमध्ये कुळथाच्या काढ्याचा वापर सांगितला आहे. ताकात शिजवलेले कुळथाचे कढण आजारी व्यक्‍तींना देण्याची प्रथा आहे. पूर्वी बाळंतिणीना कुळथाचा काढा दूध वाढण्यासाठी दिला जायचा.

    आयुर्वेदामध्ये कुळीथ डोळ्यांना हितकर सांगितलेले आहेत. पण डोळ्यांवर थेट याचा उपयोग करू नये, तर पोटातून घेण्यासाठी याचा उपयोग करावा. कुळीथ हे वातघ्न, कफघ्न आहेत. कुळीथाचे सार रोगी माणसास पथ्यकर आहे. सुजेवरही त्याचा उपयोग होतो.
    उन्हाळ्यात, शरद ऋतूत आणि पितप्रकृतीच्या माणसांनी याचे सेवन करू नये.

    कुळथामध्ये कॅलशियमचे प्रमाण चांगले आहे. परंतु यातील काही घटकांमुळे (oxalates) यातील कॅलशियमच्या शोषणाला अडथळा निर्माण होतो. ज्या व्यक्‍तींना calsium oxalates असलेले मुतखडे आहेत अशांनी कुळीथ खाऊ नये.

    * कुळीथाचे गरम कढण तापामध्ये घाम आणण्यासाठी उपयुक्त आहे.
    * शरीरातील मेद कमी करण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो.
    * कुळीथाचे गरम कढण किंवा कुळीथाच्या पिठाचे उद्वर्तन (उटणे) लावल्यानेही चरबी कमी होते.
    * अंगाला खूप घाम येत असल्यास त्यावर भाजलेल्या कुळीथाचे पिठाचे उद्वर्तन (उटणे) लावल्याने खूप चांगला उपयोग होतो.
    * मूतखडा असल्यास इतर आयुर्वेदिक औषधांबरोबरच कुळीथाचा वापर करावा. त्याचे सूप मूतखड्यामध्ये होणारी पोटातली वेदना (रीनल कोलीक) कमी करण्यासाठी वापरतात.
    * पोटात वात धरणे, पोट दुखणे, फुगल्यासारखे वाटणे यावर कुळीथाचा चांगला उपयोग होतो.
    * पोटातील जंतांवरही याचा उपयोग होतो.
    * खोकला, सर्दी, कफ यावर कुळीथाचा वापर करावा.

    कुळीथ हा प्रकार तसा प्रत्येकालाच माहीत असतो.बऱ्याच जणांच्या जेवणात ह्याचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर केला जातो.तसे हे कडधान्य रूचकर लागते.ह्याची उसळ,पिठी,मेथकुट असे वेगवेगळे प्रकार स्वयंपाकामध्ये केले जातात.

    कुळीथ चवीला गोड तुरट असून उष्ण असतात व पचायला हल्के असतात.ते शरीरामध्ये वात व पित्त दोष वाढवितात व कफ दोष कमी करतात.
    १०० ग्रॅम कुळिथामधील पोषक तत्त्वे -
    २२ ग्रॅम प्रथिने
    ०.५ ग्रॅम स्निग्ध पदार्थ
    ३.२ ग्रॅम खनिज
    ५.३ ग्रॅम तंतुमय पदार्थ
    ५७.२ ग्रॅम कर्बोदके
    ३२१ किलो कॅलरी ऊर्जा
    २८७ मि.लि. ग्रॅम कॅल्शिअम
    ३११मि.लि. ग्रॅम फॉस्फरस
    ८.४मि.लि. ग्रॅम लोह
    ७१मायक्रोग्रॅम कॅरोटीन (जीवनसत्त्व "अ'चे पूर्वरूप)
    ०.४०मिलिग्रॅम थायमिन (जीवनसत्त्व "ब')
    ०.२० ग्रॅम रायबोफ्लेवीन (जीवनसत्त्व "ब2')
    १.५ मि.लि. ग्रॅम निआसीन (जीवनसत्त्व "ब3')
    १मि.लि. ग्रॅम जीवनसत्त्व "क'
    (संदर्भ - Nutritive Value of Indian Foods - NIN, ICAR, Hyderabad).

    तसा कुळीथ हा सूज,पाईल्स,उचकी,पोट फुगणे,कृमी,मुतखडा,दमा,खोकला,जुनाट सर्दी,स्थूलपणा ह्या तक्रारींमध्ये पथ्यकर आहे.

    आता कुळीथाचे वेगवेगळे प्रकार आपण स्वयंपाकामध्ये करतो त्याचे शरीरावर होणारे परिणाम पाहूयात:

    १)कुळीथ+भात खिचडी:
    चवीला गोड,तुरट,रूक्ष,उष्ण,तृप्तीदायक,भुक वाढविणारी,पचायला हल्की,वातकफ नाशक व पित्तकर असते.

    २)कुळीथ कट:
    चवीला गोड,तुरट,उष्ण,वातपोटातून पुढे सरकवणारा,वात कफ नाशक,भुक वाढविणारा,मेदाचा नाश करणारा,लघ्वी सुटायला मदत करतो तसेच किडनी स्टोन मध्ये घेतल्यास पथ्यकर आहे.

    ३)कुळीथ सूप:
    तुरट,वातनाशक,कफनाशक,पित्तकर,शुक्रधातू नाशक,रक्तवाढविणारा,पचायला हल्का,उष्ण असतो.

    ४)कुळीथ पीठले:
    पचायला हल्के,वातकफनाशक,पित्तकर,वात पुढे सरकवणारे,भुक वाढविंणारे,उष्ण असून चवीला तिखट,तुरट असते.

    ५)कुळीथाची गोड पिठी:
    पचायला जड,वातनाशक,कफ व पित्त वाढविंणारी,उष्ण,शक्तिवर्धक,धातुवर्धक,तृप्तीदायक,चवीला तुरट गोड असते.
    कुळीथ अतिप्रमाणात खाल्ल्यास रक्तपुष्प होते व अॅसीडीटी होते.
    कुळीथ खाऊन अजीर्ण झाल्यास खडीसाखर खावी.

    १) कुळीथ हे फेरूलीक, क्‍लोरोजेनिक, कॅफिइक, व्हॅनिल आम्ल जेनेस्टीअन आणि माल्वीडीन वनस्पतिजन्य रसायनयुक्त आहे. यामुळे कुळीथ स्निग्ध पदार्थांना अटकाव करतो आणि वजन कमी करण्यात याची मदत होते.

    २) कुळीथ रात्रभर पाण्यात भिजवून प्यायल्यास हे एक नैसर्गिक मूत्रल द्रवासारखे उपयोगी आहे. मूतखडा बाहेर घालविण्यास मदत होते. मूत्रपिंडाच्या कार्यात सुधारणा होते, सूज कमी करते.

    ३) अंगातील ताप कमी करते. सर्दी-पडसे झाले असता छातीतील कफ बाहेर टाकण्यास कुळिथाची भुकटी पाण्यासोबत घेतल्यास मदत होते.

    ४) कुळिथाच्या नियमित सेवनाने कोलेस्टेरॉलचे प्रमाण घटवून अथेरोस्केलरोसिस, हृदयविकाराचा झटका इ. धोके टाळता येतात.

    ५) या कडधान्यातील तंतुमय पदार्थामुळे शौचास साफ होण्यास मदत होते. बद्धकोष्ठता टळते. कुळिथामधील शर्करा त्वरित रक्तामध्ये वाढल्यामुळे तृप्ती वाढते. पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वारंवार खाल्ले जात नाही, त्यामुळे वजनही वाढत नाही, मधुमेहींनाही उपयोगी आहे.

    संकलक : प्रमोद तांबे

  • मानसिक आजाराची सुरुवात कशी होते ?

    मानसिक आजारामधे सुरूवातीला झोपेच्या तक्रारी सुरु होतात. त्यामधे झोप लवकर लागत नाही, पहाटे लवकर जाग येते , मधेमधे सारखी जाग येते, निद्रानाश, नाईट मिअर (यामध्ये त्या व्यक्तीस झोप लागते, परंतु भायानक स्वप्ने पडल्यामुळ ती जागी होते )

    २) व्यक्तीच्या कामातील तक्रारी वाढतात. ती व्यक्ती मन लावून काम करत नाही. त्याला कामात गोडीच वाटत नाही , मनावर कसलेतरी दडपण आसलेचे जाणवते, ती व्यक्ती कामावर जाण्याची टाळाटाळ करु लागते , ती व्यक्ती कामामधे एकाग्र होऊ शकत नाही. अशा व्यक्तीचे एकाच कामामध्ये लक्ष न लागल्यामुळ कामामध्ये सतत बदल करण्याची प्रवृत्ती आढळते.

    ३) व्यक्तिगत संबंधामधे बिघाड निर्माण होतो. त्या व्यक्तीचे इतर व्यक्तीशी असलेले परस्पर संबधामधे बदल झालेला आढ़ळतो, ती व्यक्ती दुस-या व्यक्तीना टाळायला लागते, ती व्यक्ती स्वत: एकटी /एकल कोंड़यासारखी राहू लागते.

    ४) वर्तन - काही रुग्णाचे स्वत:कडे अजिबात लक्ष नसते , त्यांच्या अंगावरील कपडे अस्वच्छ असतात, ते रहातातही अस्वच्छ, अंघोळ करीत नाहीत , दाढ़ी करत नाहीत. त्यामुळे त्यांचे केस व दाढ़ी वाढलेली असते . याउलट काही रुग्ण अतिभडक मेकअप करतात काही रुग्ण उगाचच विचित्र हातवारे करीत राहतात.

    ५) भावना - काही रुग्णामध्ये भावना नियंत्रित नसतात. काही गोष्टी व्यक्ती बारीक सारीक आठवाणीनी रडतात किवा हसतात .

    ६) विचार - व्यक्ती चे विचार हे त्याच्या बोलण्यातून समजतात. व्यक्ती खूप बोलकी असते ,बोलत असतानाच एका कल्पने वरून दुसऱ्या कल्पने वर जात असते. त्या व्यक्ती च्या बोलण्यात सुसंगतपणा नसतो, बोलणे असंबधित असते . त्यातून काहीच अर्थ बोध होत नाही.

    ७) भ्रम /विचारातील बिघाड - भ्रम हा एक विचित्र खोटा आणि असंभाव्य असा विश्वास असतो . या विश्वासालाच सत्य धरून ते चालत असतात. त्यांना खूप समजावून सांगून ,खरे -खोटे याची समजूत घालून सत्याचा पुरावा त्यांचा समोर ठेवला तरी ते मानत नाहीत .

    ८) आकलन - यांमध्ये रुग्णाला स्थळ, काळ, व व्यक्ती या तीनही गोष्टीचे आकलन नसते. या आजारामध्ये स्मरणशक्ती कमी होते, स्मृतीवर परिणाम झालेला आढळतो.

    Fb -गजानन वैद
    whats app-7775871809

    चिकित्सक सल्ला घ्यावा....

  • शिकेकई

    शिकेकई म्हणजे शास्त्रीय भाषेत अकेशिया कॉन्सिन्ना, एक नैसर्गिक शाम्पू.

    शिकेकईची फळे वाळवून दळून, त्याची पावडर वापरली जाते. किंवा शिकेकईचा ओला पाला पट्यावर वाटून तो केसांसाठी वापरला जातो.

    शिकेकईचा केस दणकट व्हायला, तजेलदार व्हायला खूपच मदत होते. ही वनस्पती उष्ण आणि कोरड्या कटिबंधात वाढणारी आहे. केसामधे कोंडा न होण्यासाठी शिकेकईचा खूपच उपयोग होतो. आजच्या युगात आपण इतके साबण शाम्पू विकत घेत असतो, पण शिकेकई हे एक नैसर्गिक बॉडी केअर आणि हेअर केअर प्रॉडक्टच आहे. त्याची सर कोणत्याही शाम्पू कंडिशनरला नाही.

    शिकेकईमुळे केस काळे रहातात. शाम्पू वापरल्याचे दुष्परिणाम म्हणजे मानव निर्मित रसायना मुळे केस लवकर पांढरे होणे, केस गळणे इत्यादि. शिकेकई मधे नैसर्गिक तेल, नैसर्गिक शाम्पू आणि नैसर्गिक कंडिशनर असते.

    शिकेकई मधे खूप प्रमाणात सॅपोनियन हे नैसर्गिक द्रव्य आहे. ह्या द्रव्यामुळे फेस निर्माण होतो. त्यामधे स्वच्छतेला हातभार लावतील असे अंश असतात. हे रसायन नंतर साबण उत्पादनासाठी वापरले जाते.

    शिकेकईचा वापर उन्हाळ्यात खूपच प्रभावी ठरतो. त्यामुळे डोक्याला एक थंडाई येते. शिकेकईच्या बरोबरीनी नागरमुथा, वाळलेली संत्राची साले, वाळवलेली मेंदीची पाने, ह्या गोष्टीही वाटल्या जातात. शिकेकई वापरायची असल्यास दळून आणलेली शिकेकई आदल्या दिवशी रात्रीच लोखंडाच्या भांड्यात भिजवून ठेवतात. सकाळी नहाण्यापूर्वी ती भांड्यातील शिकेकई उकळून घेतात. म्हणजे त्याचे सर्व सत्व एकजीव होते आणि त्याचा केसांवर खूप छान परिणाम होतो.

    -- प्रमोद तांबे