वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
सत्य पहिल्या प्रेमाचा-By-प्रा.हितेशकुमार पटले
हरीद्वारला आमचा मुक्काम विष्णू घाटावरील एका लहानश्या आणि बऱ्याश्याही हाॅटेलात आहे. हाॅटेलातील रुमच्या खिडकीतून समोर अव्याहत वाहणाऱ्या गंगेचं सततच दर्शन होतं असतं.
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक दहा
विज्ञान शाप की वरदान-भाग दोन
विज्ञानाला स्वयंपाकघरात आणून ठेवल्याने त्याने भस्मासूराचे रूप घेतले आहे आणि आता तो निर्माणकर्त्यावरच उलटला आहे. त्याला कार्यालयात, दिवाणखान्यात, शिक्षणक्षेत्रात, अंतराळ क्षेत्रात जागा जरूर द्यावी, पण हा राक्षस जेव्हा आमच्या घरात घुसला तेव्हा, त्याला तिथेच बाहेर रोखायला हवा होता. आता तो एवढा माजला आहे की, त्याला आवरणे भल्याभल्यांना कठीण होत आहे. स्वयंपाकघरात तर त्याच्याशिवाय पानही हलत नाही. आता सगळं कसं "इझी" झालंय, या "इझीपणाची" ही सवय आळसाची सख्खी मैत्रीण आणि व्यायामाची शत्रू झाली आहे. आणि जे व्हायचं तेच होतंय. अनारोग्य !
विज्ञानाची भलावण करणाऱ्यांना जरूर भलावण करूदेत, पण जेव्हा पाश्चात्य तज्ञ त्यांच्या संशोधनातून सांगतील, तेव्हाच यांना पटेल, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल.
सावध तो सुखी.
वेळीच सावध होऊन जेवढे शक्य आहे, तेवढे व्यायामाचे रूपांतर कामात केले तर रोगापासून आणि औषधांपासून आपण लांब जाऊ शकतो.
पहाटे उठून सडासारवण केले जायचे. घरातील सर्व दहा पंधरा खोल्यामधील केरवारे वाकून केले जायचे. तुळशीला प्रदक्षिणा व्हायची.जमिनीवर खाली बसून समोर एक पाय पसरून मधे जात घेऊन, जात्याच्या आवाजात घुमणारे, ओव्यांचे सूर कमी होत गेले. एका हाताने धान्य जात्यात भरत दुसऱ्या हाताने जात्याचा खुंटा ओढताना एक तान एक लय सापडायची..... आता दोन्ही हातानी गिरणीवर दळण टाकून परत आणणे यातच म्हणे हात गळ्यात येतात. आणि वर म्हणायचं काम सोप झालं.
गेले ते दिवस उरल्या त्या आठवणी. आता त्या आठवणी आठवणं देखील गुन्हा आहे.
विज्ञानाने ही सर्व यांत्रिक साधने दिल्यामुळे, आता काम सोपं झाल्याने, सर्व गृहिणी निश्चितच विज्ञानाचे आभार मानणार. आणि डाॅक्टरसुद्धा ! ( त्यांचे रूग्ण वाढले म्हणून! )
विज्ञान वापरावं. जरूर वापरावं, पण जर तेच आरोग्याच्या मुळावर येत असेल तर ! आमच्या बदलत्या पाश्चिमात्य वृत्तीमुळे शरीराच्या कमी होत असलेल्या हालचाली, बैठी जीवनशैली, हे प्रमेह, ह्रदयरोग, पीसीओडी, थायराॅईड सारख्या रोगाचे कारण आहे. हे विसरून जायचे का ?
पूर्वी दुचाकी गाडी सुरू करण्यासाठी एक तंगडी तरी झाडायला लागायची. आता एका बोटाने दुचाकी सुरू होतेय. तेवढे सुद्धा श्रम नाहीत. काम सोपे झाले.
पुरणपोळीसाठी लागणारे पुरण, पाटा आणि वरवंट्यावर वाटावे लागे, त्यासाठी उकीडवे बसावे लागे. पोट मांड्या यांना छान व्यायाम होत होता. मध्यंतरीच्या काळात पुरण यंत्र आले. पाटा वरवंटा मागे पडला, उकीडवी बैठक लुप्त झाली आणि फतकल मारून सुद्धा पुरण वाटले जाऊ लागले. आता आणखीनच सोपे झाले, पुरणपोळ्या "रेडीमेड" मिळतात. काम सोपे झाले.
सायकल चालवून आरोग्य मिळत होते, आता गाडीवरून जिममधे जाऊन तिथे सायकलच चालवावी लागते.
घरात सहजपणे मिळणारे आरोग्य शोधण्यासाठी घराबाहेर जावे लागत आहे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
24.05.2017
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक दहा
विज्ञान शाप की वरदान-भाग एक
आरोग्य तपासणी करण्यासाठी वेगवेगळी उपकरणे शोधून काढली, कंप्युटर, डिव्हाईस, सोनोग्राफी, एमआरआय, सीटी स्कॅन, इ. उपकरणे विज्ञानानेच दिली आहेत. युक्तीने त्याचा वापर करून घेता यायला हवा. आम्ही यंत्रावर एवढे अवलंबून रहायला लागलो कि, सामान्य बुद्धीचा किमान वापरदेखील करता येईनासा झाला. आणि यंत्र जे सांगेल ते अंतिम सत्य वाटायला लागले. "मला काय होतंय हे सुद्धा मला कळेनासे झालेय."
अंतिम निदान घेऊनच वैद्याकडे रूग्ण येताहेत.
"मला ब्लडप्रेशर आहे,
मला डायबेटीस आहे,
मला दोन वेळा अॅटॅक येऊन गेला आहे,
माझं रक्त सारखं कमीच असतं. कितीही पालक खाल्ला तरी रक्त वाढतंच नाही,
मला थायराॅईड आहे,
किती प्रकारची लेबल लावून रूग्ण येतात. बरं त्यांना विचारावं,
" तुम्हाला काय होतंय ?"
तर, त्यांना प्रश्नच कळत नाही, परत परत खोदून विचारावं लागतं,
"तुम्हाला त्रास काय होतोय?"
तेव्हा खूप आठवून रूग्ण सांगतो,
"मला तर त्रास काहीच होत नाही."
"मग औषध कशासाठी घेताय ?" असं परत विचारलं तर सांगतात, "डाॅक्टरनी रिपोर्ट केले आणि सांगितले म्हणून, रिपोर्ट मधे काहीतरी दोष होता म्हणून औषधे सुरू केली होती."
आम्ही या रिपोर्टच्या एवढे आधीन झालो आहोत की त्रास असला तरच औषधे घ्यायची असतात, हे पण आम्ही विसरून गेलो आहोत.
जितकं शक्य आहे, तितका मला माझा आजार यंत्राशिवाय कळला पाहिजे. मला काय होतंय, हे यंत्राशिवाय मला समजलं पाहिजे. एवढं तरी आरोग्य साक्षर व्हायलाच हवे ना !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
23.05.2017
आज हरीद्वारला आलो आहे गंगाजींच्या दर्शनाला. हिला गंगा नाही, गंगाजी बोलायचं. खरंच आहे ते, हिन्दू संस्कृतीच्या शेकडो पिढ्यांच्या पोषणकर्तीला अरे-तुरे करून कसं बोलावणार..? पण आपल्या मराठी भाषेत ‘अहो-जाही’ किंवा ‘जी’ वैगेरे बोललं की उगाच अंतर पडल्यासारखं वाटतं.
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक नऊ
कामासाठी दिवस, विश्रांतीसाठी रात्र-भाग सात
रात्री काम करणे कधीपासून सुरू झाले ?
रात्रीचा दिवस कोणी केला ?
रात्रीची कामे कशी करावी हे कोणी शिकवले ?
रात्री काम करण्यातले अडथळे कोणी दूर केले ?
रात की नींद किसने चुरा ली ?
विज्ञानाने.
कसं काय ?
विज्ञानातील नवनवीन शोधांमधील एक अत्यंत महत्त्वाचा शोध म्हणजे विद्युतीकरण !
या विद्युतीकरणामुळे अनेक कामे चुटकीसरशी होऊ लागली. जिथे शंभर माणसे कामाला लागायची तिथे दहा पंधरा माणसांमधे काम पूर्ण होऊ लागलं. वेळ वाचला. कामामधे सुबकता आली. कमी पैशात जास्ती काम होऊ लागले. आता हे चांगलं की वाईट ?
नक्कीच चांगलं.
पण,
या यंत्रांनी किती जणांचा रोजगार कमी केला ? किती जण नोकरीतून कमी झाले ? किती जणांना व्ही आर एस घ्यावी लागली ?.......
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमचे आरोग्य आम्ही मिळवले की घालवले ? आमची आदर्श जीवनचर्या या विज्ञानाने मुळातूनच बदलवून टाकली का ?
विज्ञानाने प्रगती नक्कीच केली, पण त्याने खरे आरोग्य मिळवले की घालवले याचा परत एकदा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
मी विज्ञान विरोधी अजिबात नाही. पण जी समीकरणे मांडत जातोय, त्यात जे समोर येतंय ते फक्त स्पष्टपणे मांडतोय.
विज्ञानाने जी देणगी दिली, त्यात मोठी देणगी विद्युतीकरण, त्यातूनच नंतर दिवाणखान्यात जन्माला आलेले दूरदर्शन, केबल, डीश, डीव्हीडी. इ.इ. स्वयंपाकघरात घुसलेल्या विज्ञानाने तर पार धुमाकूळच घातला. मिक्सर, ब्लेंडर, फ्रीज, ओव्हन, मायक्रोवेव्ह, गॅस शेगडी, इ.इ.
बाथरूममधे जागा अडवून बसलेले वाॅशिंग मशीन, गीझर, इ.इ.
बेडरूम मधील एसी, कुलर, इस्त्री, पंखे, इ.इ.
ही सर्व उपकरणे विज्ञानाची पिल्ले नव्हेत काय ? यांनी आपल्याला आरोग्य दिले की, आरोग्य हिरावून घेतले ?
या प्रत्येक यंत्राचा स्वतंत्र विचार करणे आणि लिहिणे शक्य होणार नाही, पण एक नक्कीच पारंपारिक पद्धतीने, केलेली कोणतीही गोष्ट, ही यंत्रांचा वापर करण्यापेक्षा आरोग्याच्या दृष्टीने उत्तम प्रतीची असते. असे लक्षात येते. रवीने केलेले ताक, ब्लेंडर किंवा मिक्सरमधून केलेले ताक, लोखंडी तव्यावर केलेली भाकरी आणि ओव्हन मधे किंवा रोटी मेकर मधली भाकरी, पाटा वरवंटा वापरून केलेले वाटप आणि मिक्सरमध्ये केलेले वाटप ही अगदी मोजकी उदाहरणे आहेत.
कामे करत असताना होणारा व्यायाम कमी होत गेला म्हणूनच जिमचा आणि योगा वर्गांचा उदय झाला. दिवसाची कामे दिवसाच होत होती. विज्ञानामुळे दिवसाची कामे रात्रीच्या वेळी करणे देखील सहज शक्य झाले.
विज्ञानाने केलेली प्रगती निश्चितच कौतुकास्पद आहे, पण या विज्ञानाला घरात, विशेषतः स्वयंपाकघरात किती घुसु द्यायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
उपभोगवादी संस्कृतीने आरोग्य हिरावूनच घेतले. विज्ञानाला माणसाने गुलाम बनवण्या ऐवजी, विज्ञानाने माणसालाच गुलाम बनवले. मानवाच्या कल्याणासाठी निर्माण केलेल्या प्रत्येक प्रयोगातून आरोग्याच्या दृष्टीने पाहिल्यास नुकसान होते आहे, हे अंतिम सत्य आहे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
22.05.2017
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक नऊ
कामासाठी दिवस, विश्रांतीसाठी रात्र-भाग सहा
आज काल काय झालंय.
दिवसाची कष्टाची कामे झालीत कमी,
जी कामं आहेत ती फक्त आरामखुर्चीत बसून बसून आणि बसून !
आणि सोफ्यावर झोपून खाणं झालंय जास्ती.
रात्रीची झोप झालीय कमी आणि जागरणं झालीत जास्ती !
वेळ पडतोय कमी आणि टीव्ही चॅनेल्स झालीत जास्ती !
पैशांची किंमत झाली कमी आणि पैसे झाले जास्ती !
मनमोकळ्या गप्पा झाल्यात कमी आणि चॅटींगसाठी वेळ झालाय जास्ती !
टीव्ही वरील सर्व चॅनेल्सवरचे एकुणएक पिक्चर्स जणु काही आपल्यासाठीच बनवले आहेत. फुकट बघता येतात, म्हणून आयपीएल पण झाल्या. याच्या जोडीला "मनोरंजन" म्हणून काहीतरी हवेच ना, म्हणून दिमतीला हाय फाय सिरीयल्स आहेतच !
सिरीयल्सच्या मधल्या जाहिरातींच काय करणार ? विचारांना एका ठिकाणी स्थिर बसू न देणाऱ्या रिमोटने दुसरी चॅनेल्स बदलली तरी तिथेही जाहिरातीच ! एकुणच काय, तुमच्या खिशातले पैसे आमच्या खिशात, आमच्यातचे तुमच्यात ! म्हणून भारतात एकवेळ थंडीची लाट येईल, पण मंदीची लाट कधीच येणार नाही.
95 % जनतेला सिरीयल्स मधला झामझौल मोहक वाटतो. मोह निर्माण झाल्यावर त्यातून इर्षा जन्माला येते. माझ्याकडे पण हा सगळा ताकझाक हवा, असे वाटू लागते, त्यासाठी खिशात असलेले पैसे पुरणारे नसतात. म्हणून अधिकाधिक प्रयत्न सुरू होतात. ज्या झोपेसाठी रात्र आहे, त्या झोपेच्या वेळी अशा सिरीयल्स पाहून आपल्या झोपेचं खोबरं तर करतोच, पण नको ते मानस रोग पाठी लागतात. आणि दिवस पण खराब करून टाकतो.
म्हणजे रात्रही गेली आणि दिवसही गेला.
एवढंही पुरत नाही, म्हणून हायफाय वायफाय सुरू करून घेतलं. नको ते चॅटींग, रात्री अपरात्री सुरू झालं. डोक्यावरून पांघरुण पांघरून गप्पा रंगू लागल्या. या मॅच्युअर गप्पा अजाण पालकांना समजू नये, याचा ताण सुरू झाला. नेहमीच्या गप्पागोष्टी नकोश्या वाटू लागल्या. वेळ कसा जातोय, ते लक्षात येईनासं झालं. अभ्यासाचं वेळापत्रक कोलमडून पडू लागलं. हुशार मुलांची आणि बुद्धिमान मुलींची बुद्धी गहाण पडू लागली. जागरणं घडू लागली आणि नको ती स्वप्न पडू लागली.
रात्रीचर्या बिघडू लागली.
तरूण तरूणींच्या चेहेऱ्यावरील चर्या बिघडू लागली.
दिवस आणि रात्रीची कामं पुरती बदलून गेली आणि समाजाची घडी सगळी विस्कटून गेली.
यम नियम न पाळता, अनावश्यक आरोग्य नियम, यम बनू लागला आणि "यम" आपला पाश आवळू लागला.
जगण्याची भीती वाटू लागली आणि मरण येऊ नये म्हणून औषधे ही गरज बनली.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
21.05.2017
जागतिक व्हिस्की दिवस हा २०१२ पासून मे महीन्याच्या तिसऱ्या शनिवारी साजरा केला जातो.
व्हिस्की ही प्रामुख्याने बार्ली या धान्यापासून बनवली जाते. जगातल्या वेगवेगळ्या भागात ती वेगवेगळ्या धान्यापासून बनली जाते. पण प्रामुख्याने, विख्यात असलेली व्हिस्की, स्कॉच व्हिस्की, स्कॉटलंडमध्ये बार्लीपासून बनवली जाते. अमेरिकन व्हिस्की, बर्बन, ही मक्यापासून बनवली जाते. कॅनेडियन व्हिस्की राय (Rye) ह्या धान्यापासून बनवली जाते. भारतीय व्हिस्की प्रामुख्याने ज्वारी आणि साखरेची मळी ह्या पासून बनवितात. व्हिस्कीचे दोन प्रकार असतात.
Error, group does not exist! Check your syntax! (ID: 3)सिंगल मॉल्ट व्हिस्की व ब्लेन्डेड व्हिस्की.
सिंगल मॉल्ट म्हणजे एकाच प्रांताच्या, परगण्याच्या, एका प्रकारच्या आणि एकाच प्रतीच्या कड्धान्यापासून, एकाच डिस्टीलरीमधे केलेली उच्च दर्जाची व्हिस्की. भारतात स्कॉच व्हिस्की आयात करून बाटल्या मध्ये भरली जाते. यात सिग्राम ची पासपोर्ट (Passport), 100 पाइपर्स (100 Pipers) व समथिंग स्पेशल (Something Special); हेग (Haig), हेजेस एंड बटलर (Hedges & Butler), ब्लैक एंड व्हाइट (Black & White), ब्लैक डॉग (Black Dog), टीचर्स (Teacher’s), जे एंड बी (J & B), व्हाइट एंड मैके (Whyte & Mackay) . हल्लीच सिंगल माल्ट स्कॉच व्हिस्की भारतात मिळू लागली आहे जसे की – डालमोर (Dalmore), आइल ऑफ़ जुरा (Isle of Jura), ग्लेन ड्रूमंड (Glen Drummond) . ब्लेन्डेड व्हिस्की म्हणजे ही मॉल्ट आणि नॉन मॉल्टेड धान्यांच्या मिलाफापासून (ब्लेन्ड) बनवतात. ह्या धान्यांची प्रत वेगवेगळी असतेतसेच वेगवेगळ्या डिस्टीलरींमधे डिस्टील केलेल्या दर्जेदार व्हिस्कींचा मिलाफही असू शकतो. टीचर्स, ब्लॅक लेबल, शिवास रीगल हे काही ब्लेन्डेड व्हिस्कीचे ब्रॅंड्स.
स्कॉटलंडमध्ये तयार झालेल्या व्हिस्की लाच स्कॉच व्हिस्की असे म्हणतात. स्कॉच व्हिस्की डिस्टील केल्याचा सर्वात जुना दस्तावेज १४९४ मधील आहे. भारतात बंगलुरू येथील अमृत (Amrut) डिस्टलरी हे एकमेव सिंगल माल्ट व्हिस्की उत्पादक आहेत.
जागतिक व्हिस्की दिवसाच्या निमित्ताने भारतातील पॉप्युलर व्हिस्की ब्रँडची माहिती.
इंडियन मेड फॉरेन लिकर असे ही याला म्हणतात.
मॅकडोवेल नं १ (McDowell’s No.1)
हा देशातील सर्वात जास्त विकला जाणार व्हिस्की ब्रँड आहे. यूनाइटेड स्पिरिट्स लिमिटेडचा हा ब्रँड असे ही कंपनी UB ग्रुप चालवते. 1968 मध्ये हा ब्रँड बाजारात उतरवला होता.
मॅकडोवेल नं १ चे बाजारात विविध प्रकार उपलब्ध आहे.
मॅकडोवेल नं १ रिझर्व
मॅकडोवेल नं १ रिझर्व डायेट मेट
मॅकडोवेल नं १ प्लॅटीनम
ऑफिसर्स चॉइस (Officer’s Choice)
'ऑफिसर्स चॉइस' हा देशातील दुसर्यार क्रमांकाचा व्हिस्की ब्रँड आहे. या ब्रँडचा मालकी हक्क किशोर छाबरिया यांच्या अलाइड ब्लेंडर्स अॅण्ड डिस्टिलर ग्रुपकडे आहे.
बॅगपाइपर (Bagpiper)
'बॅगपाइपर व्हिस्की' हा ‘यूनाइटेड स्पिरिट्स लिमिटेड'चा ब्रँड आहे. 'बॅगपाइपर व्हिस्की'चा जगातील टॉप 100 ब्रँड्स्मध्ये समावेश आहे.
रॉयल स्टॅग (Royal Stag)
'रॉयल स्टॅग' या ब्रँडचा मालकीहक्क फ्रेंच कंपनी 'पेर्नोड रिकार्ड'कडे आहे. 1995 मध्ये सीग्राम कंपनीने हा व्हिस्की ब्रँड बाजारात उतरवला होता. 'रॉयल स्टॅग'मध्ये कोणतेच आर्टिफीसियल फ्लेवर नाही आहे.
ओरिजिनल चॉइस (Original Choice)
'ओरिजिनल चॉइस'हा गोव्यातील 'जॉन डिस्टिलरीज'चा एक लोकप्रिय ब्रँड आहे. जॉन डिस्टिलरीजचा हा ब्रँड वादाच्या भोवर्याोत सापडला होता.
ओल्ड टेवर्न (Old Tavern)
टॉप इंडियन व्हिस्की ब्रँडमध्ये 'ओल्ड टेवर्न’सहव्या क्रमांकावर आहे. ओल्ड टेवर्न व्हिस्की देशातील बिहार व उत्तरप्रदेशातील सर्वात पॉप्युलर ब्रँड आहे. काही आफ्रिकन देशांमध्येही हा ब्रँड फेमस आहे.
इम्पीरियल ब्लू (Imperial Blue)
'इम्पीरियल ब्लू'ला 'सीग्राम्स इम्पीरियल ब्लू' असेही म्हटले जाते. इंडियन व्हिस्की मार्किटमध्ये हे नाव खूप प्रतिष्ठित आहे.
ह्यावर्ड्स फाइन (Haywards Fine)
'ह्यावर्ड्स फाइन' हा देखील विजय माल्या यांची कंपनी UB Group चा एक पॉप्युलर ब्रँंड आहे. इकॉनॉमी व्हिस्की कॅटेगरीमधील सर्वाधिक विकला जाणारा ब्रँड आहे.
8 PM
8 PM हा प्रसिद्ध कंपनी Radico Khaitan चा एक फेमस इंडियन ब्रँड आहे. Radico Khaitan आधी 'रामपूर डिस्टिलरी अॅण्ड केमिकल कंपनी या नावाने ओळखली जात होती.
डायरेक्टर्स स्पेशल (Director’s Special)
'डायरेक्टर्स स्पेशल' हा युनाइटेड स्पिरिट्स लिमिटेड कंपनीचा ब्रँड आहे. ही कंपनी युनाइटेड ब्रेव्हरीज ग्रुपचा (UB) एक पार्ट आहे. जागतिक क्रमवारीत 'डायरेक्टर्स स्पेशल'चा ४४ वा क्रमांक लागतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक सात
निसर्गाचे नियम सर्वांसाठी सारखेच-भाग दोन !
यापूर्वी लिहिलेल्या उपवास मालिकेमधे खरंतर हे सर्व नियम सांगितले आहेतच, पण.....
आपलं जसं एक मन असतं, तसं निसर्गाचं एक मन असतं. विश्व मन. आपण जसा विचार करत असतो, तसा निसर्ग पण विचार करत असतो. आपलं मन जेव्हा विश्वमनाशी जोडलं जातं, तेव्हा खूप प्रसन्न वाटतं. विश्वाची सर्व एनर्जी, उर्जा आपण जेव्हा आपल्या मनापासून स्विकारतो, तेव्हा ही आनंदाची अनुभूती आपल्याला येत असते.
आपण जसा विचार करतो, तसं आरोग्य आपणाला मिळत असतं. कोणत्याही रोगाची बीजे ही आपल्याच मनामधे असतात. ती विश्वमनाशी जोडली गेली की, तीच स्पंदने पुनः आपल्यापाशी येतात.
आपल्या उपनिषदांमधे हेच सांगितले आहे. ब्रह्मांडामधे प्रचंड शक्ती आहे. ब्रह्मांडातील सर्व चांगल्या गोष्टी माझ्यासाठी दास बनून येऊ शकतात. हे विश्व मला सतत मदत करत आहे. मला माझ्या प्रत्येक कार्यात ही शक्ती सूक्ष्म रूपात मदत करत आहे. माझ्या सर्व गरजा विश्वमनाकडून पुरवल्या जात आहेत. हे विश्व खूप सामर्थ्यशाली आहे, त्यामुळे माझ्या सर्व योग्य गरजा विश्वमनाकडून सहज पूर्ण होणाऱ्या आहेत. त्याच्यासाठी या गरजा म्हणजे किस झाड की पत्ती !
फक्त योग्य शब्दात, योग्य वेळी त्या मागितल्या पाहिजेत. त्या सर्व इच्छा पूर्ण होणारच आहेत, असा विश्वास पाहिजे, या आनंदात सतत राहिलो तर त्या मिळतातच !
वास्तुशास्त्रामधे पण हेच सांगितलेले आहे. वास्तु कायम "तथास्तु" म्हणत असतो. घरात कायम सकारात्मक स्पंदने असतील तर कोणतीही प्रबळ अनिष्ट शक्ती कोणताही त्रास देऊ शकत नाही. निसर्गाचे हे नियम, ही स्पंदने, ही उर्जा घेण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. असा सकारात्मक विचार करायला शिकलं पाहिजे.
माझ्या आजोबांना डायबेटीस होता, वडीलांना पण होता, आता मलाही तो होणार आहे, असा विचार जर मनात प्रबळ होत गेला तर, कितीही पथ्य पाळले तरी डायबेटीस तुम्हाला शोधत तुमच्याकडे येणारच. हाच निसर्गाचा नियम आहे.
मग विचारांची स्पंदने जर सकारात्मक ठेवली तर विश्वमना पर्यंत पोचणारा परिणाम सकारात्मकच असणार ! म्हणजेच काहीही झाले तरी मला डायबेटीस होणार नाही, वाढलेल्या साखरेचा मला काहीही त्रास होणार नाही, अशी स्पंदने जर निसर्गामधे प्रक्षेपित केली तर तीच स्पंदने जास्त ताकद घेऊन पुनः आपल्याचकडे परत येतात आणि रोगापासून हवे असलेले संरक्षक कवच आपणाला मिळत असते. यालाच आजच्या भाषेत प्रतिकारशक्ती म्हणतात.
राॅन्डा बर्न यांनी लिहिलेले एक पुस्तक आहे, द सिक्रेट नावाचं. या पुस्तकात हेच रहस्य सांगितलेलं आहे. आपण जो विचार करतो, तो एवढा सकारात्मक करा की विश्वमनाशी तो जोडला जाईल.
रोन्डा बर्न यांचे नाव एवढ्यासाठीच घेतले की आपली मानसिकताच अशी बनली आहे, की पाश्चात्य तज्ञ जे सांगतात, तेच अंतिम सत्य. जणुकाही आकाशातूनच पडले आहे, आपल्या पराभूत भारतीय मानसिकतेचा तो परिणाम आहे, इतकंच. बाकी विशेष नाही.
सो बी पाॅझिटीव्ह, नेचर हियर्स यु !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
07.05.2017
विरारच्या नॅशनल शाळेत इयत्ता ४ च्या विद्यार्थ्यांसाठी इतिहासाचे पुस्तका’चं एक पान आज एका ग्रुपवर वाचनात आलं. त्यात तानाजी मालुसरे ह्यांचे टोपण नाव “सिंह” होते असा स्पष्ट उल्लेख आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti