(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • संत गाडगेबाबा

    ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी; अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे आधुनिक सत्पुरुष!

    गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. ते त्यांच्या आईच्या माहेरी, मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे, लहानाचे मोठे झाले. त्यांच्या मामाची बरीच मोठी शेतजमीन होती. लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता, विशेषतः गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडे.

    १८९२ साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारू व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की, गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे ‘सर्व जनांनी’ एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्या तोंडी गावकर्‍यांना शिकविला.

    दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता,अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले.

    समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यानांच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा(प्रामुख्याने वैदर्भीय बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.

    त्यांनी नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली.

    महाराष्ट्रातील संतपरंपरेबाबत ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ असे म्हटले जाते. संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे - ‘या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी २० व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली’ - असे म्हटले जाते. ‘महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ’, असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहेत. ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या भजनाचा प्रसार करणार्‍या,कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणार्‍या या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे आहे.

      December 20, 2016


  • उद्या पासून होणार ‘धनुर्मासारंभ’

    उद्या पासून होणार ‘धनुर्मासारंभ’

    सूर्योदयापूर्वी भल्या पहाटे ०४ ते ०६ या ब्रम्हमुहूर्तात उठून स्नान करून देवाची पूजाअर्चा, आराधना, भजन अशी आपापल्या परीने भक्ती करतात. या मासात विशेषकरून भगवान विष्णूची व श्रीकृष्णाची आराधना करतात. तसेच वसुंधरेला व चराचराला जीवन व आरोग्य प्रदान करणारी प्रत्यक्ष देवता सूर्याची आराधना केली जाते. या आरतीला काकड आरती असे म्हणतात.

      December 20, 2021


  • रमजान ईदच्या दिवशी किश्तवाडमध्ये झालेली दंगल

    जम्मू-कश्मीर पुन्हा एकदा पेटले आहे. किंबहुना जम्मू-कश्मीरातील पाकिस्तान समर्थक आणि फ़ुटीरवादीनी ही आग लावली आहे. फरक इतकाच की, एरव्ही कश्मीर खोरे हिंसाचाराने धुमसत असते. यावेळी जम्मू आणि आसपासच्या हिंदूबहुल जिल्ह्यांमध्ये हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. सर्वप्रथम किश्तवाड हे शहर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

      August 20, 2013


  • श्रीविष्णुसहस्त्रनाम स्तोत्र आणि बारा राशी

    माझ्या श्रीविष्णुसहस्त्रनाम स्तोत्र या मराठीसृष्टी वर १५ मे,२०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या लेखानंतर माझ्या एका वाचकाने त्याच्या संग्रहामद्धे असणारा हा लेख पाठवला आहे. लेखक माहित नाही. परंतु माहिती अतिशय सुंदर आहे म्हणून योग्य संपादन करून पुन्हा प्रसारित करत आहे.आपल्या जन्मराशीवरून व चरणावरून विष्णुसहस्त्रनामातील कोणते स्तोत्र पठण करायचे याचीही माहिती आहे. अतिशय अमूल्य माहिती आहे.

      June 9, 2026


  • श्रावणी

    श्रावण आला की मला आमच्या लहानपणीच्या अनेक गमतीशीर आठवणी नजरसमोर येतात. त्यातीलच एक म्हणजे श्रावणी. आता तो काळ गेला. मुळात किती लोक जानवे घालतात हाच संशोधनाचा विषय. श्रावणी करणारेही कुणी आढळत नाही. आताच्या पिढीतील मुलांच्या आनंद मिळवण्याच्या विविध गोष्टी बघीतल्या तर आमचे आनंद मिळवण्याचे मार्ग किती साधे आणी सोपे होते हे पाहून आजही मन आनंदाने भरून जाते.

      August 13, 2018


  • वैमानिकांचे प्रशिक्षण महागडे तरी महत्त्वाचे…

    सामान्य लोकांच्या मनात एक प्रश्न असतो की, एवढा भरमसाठ पगार घेऊन हे वैमानिक लोक संप का करतात? मुळात यांना एवढा पगार का देतात? त्यांच्या प्रशिक्षणावर एवढा खर्च का करावा लागतो? या सर्वांचे उत्तर एकच. ते म्हणजे त्यांचे उत्तरदायित्व.

      July 18, 2023


  • प्रत्येक बाबतीत राजकारण : अरे, काय चाललंय् काय !

    महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. विद्यासागर राव यांनी असें म्हटलें आहे की ते पूर्वी ‘संघा’चे स्वयंसेवक होते. या कारणावरून म्हणे, विरोधी पक्ष त्यांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकणार आहे. अहो, बहिष्कार टाकायचाच असेल तर ज़रा चांगलें कारण तरी शोधा !

      February 26, 2019


  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – ३५

    अकंठेकलंकादनंगेभुजंगाद-
    पाणौकपालादफालेऽनलाक्षात् |
    अमौलौशशांकादवामेकलत्राद-
    हंदेवमन्यं न मन्ये न मन्ये ‖ ३५ ‖

    एखाद्या कवीच्या प्रतिभेला अचानक बहर येतो. एखादी सुंदरतम कल्पना साकार होते. ही कल्पना इतकी रम्य असते ती स्वतः कवीच तिच्या प्रेमात पडतो. पुन्हा तशीच रचना करण्याची स्वाभाविक ऊर्मी जागृत होते. या सिद्धांतानुसार तयार झालेला हा श्लोक.
    आचार्यश्री म्हणतात,

    अकंठेकलंकात्- ज्यांच्या गळ्याला कलंक म्हणजे डाग नाही,
    अनंगेभुजंगात्- ज्यांच्या हातामध्ये दंडामध्ये सर्प बांधलेले नाहीत,
    अपाणौकपालात् - ज्यांच्या हातामध्ये कपाल म्हणजे भगवान ब्रह्मदेवांच्या कापलेल्या मस्तकाच्या कवटीचा भाग नाही,
    अफालेऽनलाक्षात् - ज्यांच्या मस्तकावरील नेत्रातून अग्नी उसळत नाही,
    अमौलौशशांकात् - ज्यांच्या मौली वर अर्थात मस्तकावर चंद्र विलसत नाही,
    अवामेकलत्रात्- ज्यांच्या डाव्या अंगावर पत्नी विराजमान नाही,
    अहं देवमन्यं न मन्ये न मन्ये - अशा अन्य कोणालाही मी देव मानतच नाही.

    मागील श्लोकातील गुणवैशिष्ट्यामध्ये भर घालत हलाहल विष प्राशन केल्यामुळे आलेले नीलकंठत्व आणि ब्रह्मदेवांच्या मस्तकाचे हाती धरलेले कपाल या भगवान शंकरांच्या दोन गुणवैशिष्ट्यांचे वर्णन त्याच शैलीत आचार्यश्री करतात.
    हे नसेल तर तो देवच नाही यातून त्यांच्या अविभाज्य लक्षणांचे वर्णन केले. कारण यांच्याशिवाय भगवान शंकरांचे स्वरूप पूर्ण होत नाही. तसेच या गोष्टी भगवान शंकरां शिवाय अन्य कोणतीच देवता बाळगतही नाही.
    त्यामुळेच या गोष्टींचे आणि याशिवाय मी देवाला मानत नाही या उच्चारातून आचार्य श्री स्वतःच्या एकनिष्‍ठेची घोषणा करीत आहेत.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      July 14, 2020


  • आजच घ्या; उद्या सकाळी….?!

    'खाण्यासाठी जन्म आपुला' ते 'माझे जीवनखाणे' असा कित्येकांचा प्रवास सुरु असतो. पोटात अन्न अक्षरश: ठोसल्यावर आधी अपचन आणि नंतर बद्धकोष्ठतेचा खेळ सुरू होतो. मग पोट साफ करण्यासाठी सारी धडपड सुरू होते. कोणाच्या तरी आगंतुक सल्ल्याने त्रिफळा चूर्ण, सुखसारक चूर्ण ते एरंडेल अशी वेगवेगळ्या रेचकांची (पोट साफ करणारी औषधे) रीघ लागण्यास सुरुवात होते. त्यातच आयुर्वेदीय औषधांना साईड इफेक्ट्स नसतात हा आपला लाडका गैरसमज. मग काय? आधी दिवस मग महिने आणि मग वर्षानुवर्षे ही रेचके आपली सोबती होतात.

    रेचकांचा प्रदीर्घ काळ वापर केल्याने आतड्यांना शुष्कता येते आणि त्यांची कार्यक्षमता घटते. रेचकांचा प्रभाव कमी होऊ लागतो; स्वाभाविकपणे आपण त्यांचे अधिक मात्रेत सेवन करू लागतो. सहा सहा ग्रॅम इतक्या अधिक मात्रेत रेचक सेवन करूनही पोट साफ न होण्याची तक्रार असलेली मंडळी मी स्वतः पाहिलेली आहेत. ही वाढीव मात्रा अधिक घातक ठरत जाते. बाजारात मिळणाऱ्या जवळपास ९९% रेचक चूर्णात सोनामुखी ही वनस्पती वापरलेली असते. या सोनामुखीच्या प्रदीर्घ वापराने बरेच दुष्परिणाम होतात. विशेषतः ही वनस्पती पित्ताचे त्रास वाढवते. शिवाय सोनामुखीसारख्या वनस्पती गरोदर स्त्री व बाळंतीण यांना देऊ नयेत.

    पोट साफ न होणे हे व्यक्तीच्या प्रकृतीबरोबरच आहार आणि पचनक्रिया यांवरही अवलंबून असते. या सगळ्याचा विचार करूनच आपले वैद्य आपल्याला पचन उत्तम होण्यासाठी औषधे आणि पथ्य सांगतात. केवळ पोट साफ होऊन मनाचे समाधान होण्यासाठी नव्हे. शिवाय; कुठल्या व्यक्तीला कोणते रेचक, किती मात्रेत आणि किती काळ द्यावे याचे काटेकोर नियम आयुर्वेदीय वैद्य पाळत असतात. त्यामुळे बद्धकोष्ठासारख्या तक्रारीवर स्वतः किंवा अन्य कोणाही व्यक्तींच्या उपटसुंभ सल्ल्याने औषधे न घेता शुद्ध आयुर्वेदीय उपचार देणाऱ्या वैद्यांचा सल्ला घ्या.

    सहज जाता-जाता; आयुर्वेदानुसार अपान वायूवर घेण्याचे औषध हे जेवणांच्या आधी दिले जाते. रात्री झोपण्यापूर्वी दिलेले औषध हे उर्ध्वजत्रु म्हणजे डोक्यावर कार्य करते असे आयुर्वेद सांगतो. आपण वैद्यकीय सल्ल्याविना घेत असलेले रेचक चूर्ण एकीकडे पोट साफ करत असतानाच दुसरीकडे नेमके कुठे कार्य करत असेल याचा विचार (वैद्यांनीही) अवश्य करावा!!

    © वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
    आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
    ।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
    संपर्क: ०२५१-२८६३८३५

      November 23, 2016


  • घामाची दुर्गंधी

    साध्या-सोप्या आयुर्वेदिक उपायांनी बरंच काही साधता येतं हे डॉ संतोष जळूकरांच्या `वजन कमी करण्यासाठी मोलाचे आयुर्वेदिक उपाय’ या लेखाने दाखवून दिलंय. या पोर्टलवरच्या अत्यंत लोकप्रिय लेखांपैकी तो एक लेख आहे. घामाच्या दुर्गंधीवरील हा लेखसुद्धा लोकप्रिय होईल यात शंकाच नाही.

      October 22, 2010