वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
ऑफिसच्या कामामुळे माझे सिमेंट प्लांटमध्ये येणे जाणे असायचे.हे प्लांट शहरापासून बरेच दूर असतात.तेथे काम करताना आलेले अनुभव,तेथेपर्यंत पोचण्याचा प्रवास आणि प्लांट मधील वर्णन आहे या लेखात केले आहे.
April 21, 2020
संयुक्त राष्ट्र महासभाने २००२ साली संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय पर्वतीय वर्ष म्हणून घोषित केले आणि ११ डिसेंबर २००३ पासुन ‘इंटरनॅशनल माउंटन डे हा साजरा करण्यात येतो. दरवर्षी तो एका खास थीमसह साजरा केला जातो.
December 11, 2021
१९१२ मध्ये नोबेलचा शांती पुरस्कार देण्यासाठी जगातील एकूण १३० मान्यवरांची नावे सूचविण्यात आली होती. मात्र या सर्वांमधून स्वीडिश अकादमीने रिगोबर्टा मेन्यू या अहिंसावादी कार्यकर्तीची निवड केली.
September 3, 2023
चहा घ्यायचा तर कमीत कमी दूध आणि पाणी जास्त नाहीतर सर्वात बेस्ट Black tea, Lemon tea, अद्रक , tea 1 नं गुळाचा चहा ( 100 वर्षे जगा पण गुळाचा चहा प्या). ९०% आजार पोटातुन होतात. साखरेचा चहा टाळल्यास तुमचे ४५% म्हणजे पोटाचे निम्मे आजार आपोआप नष्ट होतील
September 15, 2017
लालबहादूर शास्त्री व पाकिस्तानचे राष्ट्रपती अयुबखान यांच्यामध्ये सोव्हिएट महामंत्री कोसिजिन यांच्या मध्यस्थीने ४ जानेवारी १९६६ पासून वाटाघाटी होऊन १० जानेवारीस नऊ कलमी करारावर उभय नेत्यांनी सह्या केल्या.
January 10, 2022
या सगळ्यात आपल्या भावना आणि विचार एकमेकांशी संभाषण साधून व्यक्त करण्याचे वरदान मानवाला लाभले आहे. पूर्वीच्या काळापासून आपण संदेशवहनासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करीत आलो आहोत या मागे एकच उद्दिष्ट की, आपल्या मनातल्या भावना व्यक्त करणे तसेच आपले विचार मांडणे. अगदी पूर्वीच्या काळी जलद गतीने संदेश पाठवण्यासाठी तार यंत्रणा अस्तित्वात होती. तसेच पोस्टमनद्वारे येणाऱ्या आपल्या मित्रांच्या-नातेवाईकांच्या पत्राची अनामिक ओढ होती.
December 24, 2023
सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्याधिक्षमत्व (Immunity) हा विषय सर्वांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा झालेला आहे . व्याधिक्षमत्वाचा संबंध फक्त कोरोनासारख्या इन्फेक्शनशीच नसून , कुठल्याही रोगापासून शरीराला सुरक्षित ठेवायचे असेल तर उत्तम व्याधिक्षमत्व ही त्याची कवचकुंडले आहेत , मग त्याला कॅन्सरसारखा दुर्धर आजारसुद्धा अपवाद नाही
November 19, 2022
प्रमेह हा मुख्य आजार. त्याच्या एकुण वीस उपप्रकारामधे एक म्हणजे मधुमेह हा आजार येतो. हा आजार होऊ नये यासाठी काय काय करू नये, (म्हणजे अपथ्य ) सांगितले आहे ते आपण पाहातोय.
व्यवहार आणि ग्रंथ यामधे किती अंतर आहे पहा. पथ्य आणि अपथ्य या शब्दांचे किती चुकीचे अर्थ वापरले जातात.
"मधुमेह एकदा झाला की साखरेचे पथ्य सुरू झाले." असे आपण म्हणतो. म्हणजे साखर बंद करावी लागणार असे आपल्याला सूचीत करायचे असते. खरंतर पथ्य म्हणजे खायला हरकत नाही, असा अर्थ होतो. आणि अपथ्य म्हणजे न चालणारे.
सगळं च उलटं चाललंय, म्हणतो ना मी, त्यातीलच हे एक !
तर पथ्य म्हणजे चालणारे
आणि अपथ्य म्हणजे न चालणारे.
मधुमेहात साखरेचे अपथ्य आहे.
त्यातील दूध आणि दही आपण पाहिले. म्हणजे दुध आणि दह्यापासून बनणारी अन्य सर्व गोड व्यंजने अपथ्यकर आहेत. पण दह्यापासून बनणारे ताक, घुसळल्यामुळे वर तरंगणारे लोणी, लोणी कढवल्यानंतर बनणारे साजूक तूप हे मधुमेहात अपथ्य नाही. तसेच गाईपासून मिळणारे मूत्र आणि शेण हे सुद्धा मधुमेहात पथ्यकर आहेत. हे लक्षात ठेवूया. सर्वसाधारणपणे असं म्हणायला हरकत नाही, की जसजसा अग्निचा संस्कार होत जातो, तसतसा पदार्थ पचायला हलका होत जातो.
स्थिरता आणि गतीमानता हे दोन गुण लक्षात घेतले की, अग्निचा विचार नीट करता येईल. जिथे गती तिथे अग्नी. गती म्हणजे वात. वायु हा अग्नीचा मित्र आहे. म्हणून फुंकर मारली की अग्निवृद्धी होते. बरोबर ना ! स्थिरता म्हणजे पृथ्वी महाभूत. अग्नीच्या विरोधी. अग्नी विझवण्यासाठी वाळू उपयोगी पडते. व्यवहारात जिथे अग्नी खूप असेल आणि तो कमी करायचा असेल तर अग्नीला मिळणारा वारा बंद करून, पृथ्वी महाभूत असलेली माती किंवा वाळु उपयोगी होते.हेच तत्व आरोग्याच्या बाबतीत शरीरात वापरून पहायचे.
प्रमेहामधे अग्नि बिघडलेला असतो. त्याचे बदललेले स्थान कुठे आहे ते ओळखून त्याला परत जागेवर आणून ठेवणे ही चिकित्सा.
आयुर्वेद समजून घेण्यासाठी ही महाभूते खूप उपयोगी पडतात. ही केवळ प्रतिके नाहीत तर व्यवहारात ती आपण वापरतदेखील असतो, पण आपल्या ते लक्षात येत नाही.
एखादी गोष्ट व्यवहारात अनेकदा आपण करीत असतो, पण त्याचा कार्यकारण भाव माहीती नसतो. त्याचे चिंतन मनन करणे, आणि तो शोधून काढणे, नंतर ती गोष्ट जाणीवपूर्वक करणे याला अभ्यास म्हणतात. अभ्यासाची एकदा सवय लागली की, नंतर कठीण गोष्टी समजायला सोप्या व्हायला लागतात. मग ग्रंथ आणि व्यवहार एकच आहेत असे समजायला लागते.
प्रमेह होण्याच्या मुख्य कारणामधे सर्वात प्रथम सांगितलेला शब्द आहे, आस्यासुखम्.
आसन सुख. म्हणजे बसून राहाण्यामधे खूप आनंद वाटायला लागणे. एकाच जागी बसून काम करायला आवडणे. हे स्थिरत्वाकडे जाणारे लक्षण आहे.हालचाली कमी करण्याकडे कल निर्माण होणे, आणि प्रत्यक्षात हालचाली कमी करणे, म्हणजे गतीच्या विरोधात काम करणे, म्हणजे अग्निच्या विरोधात काम करणे.म्हणजे रोगाच्या जवळ जाणे होय.
आळस हेच सुख आहे, असे वाटू लागणे म्हणजे प्रमेहाची सुरवात झाली असे खुशाल समजावे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
31.01.2017
January 31, 2017
ऐंशीच्या दशकापर्यंत भारताकडे फक्त आयएनएस विक्रांत ही एकच विमानवाहू युद्धनौका होती. हिंदी महासागरावर आपले वर्चस्व कायम राहावे, यासाठी आणखी एका युद्धनौकेच्या शोधात भारत होता. अंतिमतः ब्रिटनच्या एचएमएस हार्मिसची खरेदी ४६५ मिलियन डॉलर्सला केली गेली. आणि भारतीय नौदलाच्या गरजांनुसार नूतनीकरण होऊन ती आयएनएस विराट म्हणून सेवेत रुजू झाली. विराट आपली सेवा योग्य पद्धतीने देण्यात यशस्वी झाली होती. भारतीय नौदलात दाखल झाल्यानंतर विराटची पाच वेळा दुरुस्ती करण्यात आली.
May 31, 2017
2014 मध्ये सत्तेत आलेले मोदी सरकार संरक्षण क्षेत्राला प्राधान्य देत असल्याचे आणि या क्षेत्रासाठी नवी पावले टाकत असल्याचे दिसत असले, तरी प्रत्यक्षात या उपाययोजनांना मूर्त रूप येताना दिसत नाही. याचे कारण त्यासाठी असणारी अपुरी अर्थतरतूद. गतवर्षी अर्थसंकल्पामध्ये संरक्षण क्षेत्रासाठीच्या तरतुदीत केवळ 5 टक्क्यांची वाढ झाली होती. देशासमोरील संरक्षण आव्हानांच्या तुलनेच ती अगदीच कमी होती. त्यामुळे यंदा त्यामध्ये भरीव वाढ व्हायला हवी.
January 29, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti