वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
५०० व १००० च्या नोटा नुकत्याच रद्द झाल्या आणि मराठी भाषेला, विमुद्रीकरण--चलनबंदी-- नोटबंदी -- मुद्राबंदी इ. अनेक शब्द आणि " वैचारिक वाद" लाभले. अनेक वृत्तपत्रे आजसुद्धा फक्त याच विषयावरच्या " हेडलाईन्स" छापतायत. पण काही वर्षांपूर्वी भारतीय चलनातील
५० रुपयाची एक नोट चलनातून अत्यंत गुपचूपपणे काढून घेतली गेली. त्याचीच ही "नोटकथा" !
१९७५ मध्ये श्री.एम.नरसिंहम यांच्या सहीने चलनात आलेल्या ५० रुपयांच्या नोटेच्या मागील बाजूच्या चित्रात लोकसभेवरील भारतीय राष्ट्रध्वज गायब होता. नुसताच ध्वजदंड ( काठी) छापलेला होती. ही चूक फार गंभीर होती. त्यानंतरच्या आय.जी. पटेल व के. आर. पुरी यांच्या कार्यकालातही हा ध्वजदंड तसाच रिकामा राहिला. त्यानंतर गव्हर्नर पदी मनमोहनसिंग आल्यावर या नोटेवर पुन्हा ध्वज फडकला.
नंतर ५० रुपयांच्या या ध्वजविरहित नोटा अत्यंत गुपचूपपणे व्यवहारातून काढून घेण्यात आल्या. ना कसला गाजावाजा, ना कुठे परिसंवाद, हेडलाईन्स ! ही चूक झाल्यामुळे आणि ती निस्तरताना करदात्यांच्या किती कोटी रुपयांचा चुराडा झाला , हे कुणाला कळलेच नाही.
एखादी गोष्ट जर दोषपूर्ण असेल तर त्या गोष्टीला किंमत राहत नाही.जितकी चूक मोठी तितकी ती वस्तू निरुपयोगी ! पण टपाल तिकिटे आणि चलनी नोटांच्याबाबतीत हे अगदी उलटे आहे. जितकी चूक गंभीर तितकी त्याची किंमत अफाट वाढते. विविध साईट्सवर ५० रुपयांच्या या बाद नोटा, संग्राहकांसाठी आज खूप मोठ्या किंमतीला विकल्या जात आहेत.
५०० व १००० च्या नोटा जवळ ठेवायलाही बंदी आहे आणि या ५० रुपयांच्या नोटेची मात्र केवढी मिजास ? असते एकेकाचे भाग्य !
-- मकरंद करंदीकर
मला एक असा तरुण मिळवुन द्या की जो शरीराने तंदुरुस्त आहे, त्याच्या इच्छा व विकार त्याच्या ताब्यात आहेत. त्याचे मन आरशासारखे पारदर्शक व स्वच्छ आहे. तर मी जगात कोणताही चमत्कार करुन दाखवेन.” – थॉमस हक्सले खरं आहे, आजच्या जगाला विकसीत करणारा एकमेव सक्षम घटक म्हणून तरुणाईकडे पाहीले जाते. सामाजिक उत्थानाची जबाबदारी असलेल्या या तरुणांपुढे काय आदर्श व आव्हाने आहेत? हा प्रश्न एखाद्या वयस्कर माणसाला विचारला तर त्याचे उत्तर कदाचित असे असेल. आजच्या तरुणांना आदर्श बघवत नाहीत आणि आव्हाने पेलत नाहीत – खरीच अशी परिस्थिती आहे का? आजची तरुण पिढी ही उद्याची मार्गदर्शक पिढी असेल. त्यामुळे या तरुणांनी दूरदृष्टीने विचार करुन काही मुलभुत आव्हाने पेलणे आवश्यक आहेत.
गोष्ट १५ वर्षांपूर्वीची असेन कदाचित पण वार शुक्रवार होता हे नक्की. नांदेडला दर शुक्रवारी ज्योती टॉकीज जवळ बाजार भरतो. आठवडी बाजाराची ओढ प्रत्येक शेतकऱ्याला तेवढीच असते जेवढी नोकरमान्याला महिन्याच्या पगारीची !. मी आणि माझ्या मोठ्या भावाने ४ दिवसापासूनच शुक्रवारच्या बाजाराची प्लांनिंग सुरु केली होती. प्लॅन असा होता - " गुरुवारी संध्याकाळीच भोपळे तोडून दोन पोती भरून ठेवायची आणि शुक्रवारी भल्या पहाटे नांदेडला जाऊन विकायची ".
ठरल्याप्रमाणे शुक्रवार उजडला , भोपळे एवढे वजनाने जाड असतात की सांगू नका त्यामुळे दोन पोते ठेवल्यावर आमची जुनी ऍटलास सायकल थरथर कापायला लागली. तिच्यावर बसणं तर सोडा नुसतं ढकलणं अवघड जात होत. बाजार ठिकाणापासून माझं गावं ३० किलोमीटर अंतरांवर. एवढं अंतर चालत जाणं आणि ते पण भोपळ्याने लादलेली सायकल ढकलतं, हे महा कठीण काम तेंव्हा माझ्यासाठी फक्त " बाँये हात का काम था ". कारण चार दिवसापासून मी फक्त कामाचीच प्लॅनिंग करत नव्हतो तर त्यातून मिळणाऱ्या पैशाचं काय-काय करायचं हे पण ठरवत होतो.
आमचा प्रवास सुरु झाला एकदाचा. कॅनॉल मार्गे निघालो.वाटलं शॉर्टकट आहे. सिडको पर्यंत आल्यावर थकवा जाणवत होता. कधी मी हॅन्डल धरून सायकलला रास्ता दाखवायचो कधी माझा मोठा भाऊ. थोडासा चढ आला कि धक्का द्यायला मी तर चड्डी सावरून तयारच होतो. गप्पा करत करत आम्ही निघालो. कच्चा रस्ता संपून डांबर रोड लागला. सिडकोला माझ्या दूरच्या आत्याच्या मुली शिकायला होत्या. एवढ्या मोठ्या सिडकोत मला त्यांच्याच येण्याची भीती वाटत होती. सिडको कधी जाईन आणि कधी लातूर फाटा येईन असं वाटत होत. मी नुसती सायकल ढकलत नव्हतो तर त्याच बरोबर मनातल्या मनात भोपळे विकून किती पैसे येतील याचा हिशोब पण लावत होतो. जर किलोने गेले तर जास्त येतील आणि नगाणे गेली तर कमी येतील. दोन पोत्याचे अंदाजे माझ्या हिशोबाने कमीत कमी २०० ते २५० रुपये येणार म्हणजे येणारच.
शेवटी पोहोचलो एकदाच बाजाराच्या तोंडाला. पोती सायकलवरून उतरवली. मी आणि माझा भाऊ इकडं तिकडं डोळे वासून पाहायला लागलो. नवीन जनावरांना बघून आमचं गायीचं वासरू कस करत तस आमचं व्हायला लागलं. जिकडं पाहावं तिकडं भाज्यांचं भाज्या. मी मनातल्या मनात म्हणालो , " इच्या मायला एवढ्या भाज्या असताना आमचे धोंड्या सारखी जड भोपळी कोण खाईल?'. आता माझा हिशोब खाली खाली येऊ लागला.
आमचे चुलत भाऊजी पण भाजीपाला विकायचे त्यावेळी. ते आमच्या अगोदरच बाजारात जागा धरून बसले होते. त्यांच्या भाज्यांच्या बाजूला आमच्या भोपळ्यानां थोडी जागा मिळाली एकदाची. भाऊ आणि भाऊजी भाज्यांच्या भावा बद्दल चर्चा करू लागले. तेवढ्यात दोन जाडजूड बायका , रंगबिरंगी पिशव्या घेऊन माझ्या समोर आल्या आणि भाव विचारू लागल्या. त्यांनी भाउजीने आणलेल्या भेंडी आणि कोथिंबीर बद्दल विचारलं , मह्या भोपळ्याकडे बघितलं पण नाही. एक भोपळा २ रुपयाला मागताना गिऱ्हाईकाला अजिबात लाज वाटत न्हवती. बाजारच रूप बघून आणि गिऱ्हाईकांची स्टाईल बघून माझे पाय जमिनीवर आले आणि माझा टोटल हिशोब ५० रुपयांच्या खाली आला.
भावाने माझ्या चेहऱ्याकडे बघितलं आणि त्याला समजलं मला काय झालाय ते. त्याने न विचारता बाजूच्या हॉटेलातून एक ३ रुपयांची कचोरी आणून मला खायायला दिली . माझी कचोरी खाऊन झाल्यावर भाऊ म्हटला , " हे ५ रुपये घे आणि सिडको पर्यंत ऑटो नि जा नंतर मग कॅनॉल चा रस्ता धरून आलं तस पायी जा ".
मी जड अंतकरणाने घराकडे निघालो. माझा विश्वासच उडाला या सगळ्यावरून. जग मोठं असत हे कळलं पण त्याच बरोबर शेतकऱ्याचं स्वप्न किती लहान असत हे पण पहिल्यांदा जाणवलं. या बाजारात माझ्यासारखा लहान मुलगा टिकू शकणार नाही हे माझ्या भावाला माहित होत म्हणून त्यानं मला दिवसभर उन्हात उभं नाही केलं. दिवसभर काय झालं आणि किती पैसे आले याचा हिशोब मी माझ्या मोठ्या भावाला विचारला नाही , कारण त्या हिशोबाची पुरेपूर जाणीव मला होती.
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 9
वस्त्र हे लज्जा रक्षणासाठी असते, असा मंत्र आहे.
सर्वभूषाधिके सौम्यं लोकलज्जानिवारणे.
सर्व भूषणामधे श्रेष्ठ असलेली, लज्जा निवारण करणारी वस्त्रे मी तुला अर्पण करीत आहे. असा उपचार म्हणून सांगितला आहे.
वस्त्र ही फॅशन असली तरी एकवेळ चालेल, पण लोकांनी फक्त माझ्याचकडे पाहिले पाहिजे असे कपडे नकोत. जैन दिगंबर साधू देखील कपड्यांशिवाय वावरतात, त्यांचे वावरणे कुठेही किळसवाणे वाटत नाही, उलट, मला टीचभर कपड्यांची पण गरज नाही, एवढा परित्याग मी माझ्या मनात मान्य केला आहे, असे समजून येते.
मनामधे लाज वाटणारे, भावना चाळवणारे, कपडे परिधान करताना आपण सामाजिक आरोग्य बिघडवीत आहोत, हे पण लक्षात येत नाही. बरे झाले, जागतिक आरोग्य संघटनेच्या निरोगीपणाच्या व्याख्येत सामाजिक हा आणखीन एक स्वतंत्र मुद्दा घेतला आहे. हे सामाजिक आरोग्य म्हणजे फक्त साथीच्या रोगापुरते मर्यादित नाही, हे पण लक्षात घेतले पाहिजे. अर्थात शरीराकडे पहाण्याची पाश्चात्य दृष्टी वेगळी आणि भारतीय दृष्टीकोन वेगळा आहे, हे मान्य केलेच पाहिजे.
भारतीय संस्कृती मधे कपडे थोडे ढगळ, सैल, हवेशीर असतात. याचे कारण येथील हवामान आणि तापमान. पाश्चात्य वकील काळा कोट घालतात, म्हणून भारतातील वकील देखील काळा कोट घालतात, ही अजून शिल्लक राहिलेली गुलामगिरी नव्हे काय ? भारतात पांढरा सदरा आणि सैलसर पायजमा असा भारतीय पोशाख का होऊ शकत नाही? वस्त्र ही देशातील वातावरणाला अनुकुल असावीत. बंद गळ्याचा काळा कोट, टाय, साॅक्स, ग्लोव्हज, बूट हा अति थंड हवेतील योग्य पोशाख आहे. पण असाच पोशाख हट्टाने भारतात घातला तर चालेल का ? नाही ना ! तरीसुद्वा आज भारतात असाच पोशाख हवा असे वाटणे ही मानसिक गुलामगिरी आहे, असे वाटते.
यंत्राच्या जवळ काम करताना कपडे सैल ढगळ असून चालणारच नाही. तिथे अंगाबरोबर बसणारेच कपडे आवश्यक आहेत.
थंडी, ऊन पाऊस वारा यांच्यापासून संरक्षण मिळणारे कपडे असावेत. लोकांच्या विकृत नजरापासून संरक्षण मिळणारे कपडे असावेत. केवळ महिलांचेच कपडे असे असावेत असे नाही तर पुरूषांना देखील कपडे घालून सौंदर्य खुलवता आले पाहिजे.
कायदा करून आणि सेन्साॅर बोर्ड स्थापन करून हा प्रश्न मिटणारा नाही. माझी मुले कशी दिसावीत, माझी बहिण माझा भाऊ कसा दिसावा, त्याच्याकडे इतरांनी कोणत्याही विकृत नजरेने पाहू नये, असे कपडे त्यांनी घालावेत, हा किमान नियम प्रत्येकाने आपल्या घरापुरता पाळला तरी सामाजिक आरोग्य सांभाळले जाईल.
मी माझ्या दवाखान्यात तरी हा नियम म्हणून केला आहे. माझ्याकडे येणाऱ्या रूग्णांनी अंग प्रदर्शन होईल असे कपडे घालू नये, असा फलक दर्शनी भागावर लावला आहे. आणि त्याची कडक अंमलबजावणी करतो. काहींनी याचा राग येतो, पण माझ्या रुग्णांनी माझ्याकडे कसे यावे हे ठरवण्याचा अधिकार घटनेने मला दिलेला आहे. तो अधिकार मी पूर्णपणे वापरतो.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
03.06.2017
मी गेले वीस वर्षे पुण्यात व पुण्याजवळ मिळणार्या 190 फुलांच्या औषधी उपयोगावर माझ्या पध्दतीने संशोधन केले व करत आहे. ह्या संशोधनातून मला असे लक्षात आले की खास देवाना वाहण्याची जी फुले आहेत ती सर्व सामान्य व पिरीआॅडिकली येणार्या आजारांवर उपयोगी आहेत. त्याची माहिती पुढे देत आहे.
झेंडू--कफयुक्त खोकल्यावर उत्तम. सर्दी पडसे, डोळ्याचा नंबर वाढणे,मोती बिंदू, काच बिंदू वर उपयोगी.
गुलछडी--बध्दकोष्टता, कोलायटीस, कोरडा खोकला, अंगाला सूज, पायाला सूज, किडनी फेल, क्रिएटेनिन वाढणे, ब्लड यूरिया वाढणे इत्यादी वर उपयोगी.
शेवंती-- अॅसिडीटी, पोटातील जळजळ, संडासला खडा होणे, लघवीला आग होणे, कोरडा खोकला, लिव्हरला सूज इत्यादीवर उपयोगी.
बिजली--पाळीला पोटात दुखणे, प्रोस्टेट वाढणे, पित्त वाढणे इत्यादीवर उपयोगी.
जास्वंद--कंपवात, मॅनेंन्जायटीस,लिव्हरला सूज, बध्दकोष्टता,कोलायटीस इत्यादीवर उपयोगी.
पारिजातक--तोंड येणे, सर्दीपडसे, डोळ्याचा नंबर वाढणे, डोळे लाल होणे, पाळीला पोटात दुखणे, मोनोपाॅजचा त्रास, अंगावर काळे डाग, इसब,चट्टे गाठी उठणे, संडासला साफ न होणे, इत्यादीवर उपयोगी.
गलांडी-- घशासाठी उत्तम.
सोनचाफा--पाळी लांबणे, पाळीला गठ्ठे पडणे, गुडघे दुखी, आमवात, हाडाचा क्षय, स्वरयंत्र, थायराॅईड, लघवीली आग होणे इत्यादीवर उपयोगी.
दुर्वा-- गर्भाशय, ओव्हरीज, प्रोस्टेट याच्या उष्णतेवर काम करतात, टाच दूखीवर उपयोगी.
बेल-- बेलामुळे शरीरातील हीट कमी होते हा मूळव्याध, बी पी, मधुमेहा साठी उपयोगी आहे.
फुलाचा औषधी उपयोग करण्यासाठी फुल पाण्यात काही तास भिजवून ते पाणी प्यावे लागते.
देवावर फुले वाहतो ती दूसरे दिवशी तशीच असतात. तो पर्यंत त्यातील औषधी अंश काही प्रमाणात देवाचे मुर्तीला चिकटतो व पूजा करताना तो अंश पाण्यात उतरतो आणि ते पाणी तीर्थ म्हणून वापरले जाते. त्यात औषधी गुणधर्म असल्यामुळे पूर्वजानी त्याला पवित्र ठरवून हे तीर्थ पिण्याची प्रथा पाडली व समाजाचे आरोग्य सहज राखण्याचा प्रयत्न केला.
आम्ही आधुनिक शिक्षणामुळे तीर्थ पीत नाही टाकाऊ, अस्वच्छ ठरवतो. आणि स्वत:चाच तोटा करून घेतो.
-- अरविंद जोशी, पुणे
BSc
आता सध्या सुरू असलेला संप. ह्या संपात मुळात शेतकरी किती आणि राजकारणी किती हा संशोधनाचा विषय आहे. पहिल्या परिच्छेदात म्हटल्याप्रमाणे ‘शेतकरी आई’ कष्टाने कमावलेलं लेकरांच्या, झालंच तर घरच्या कुत्र्या-मांजरांच्या घशात घालते, पण असं माज आल्यासारखं रस्त्यावर कधीही फेकून देत नाही.
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 8
स्नान करीत असताना काही सूक्ते म्हणावीत, काही सुभाषिते आठवावीत, गंगेची प्रार्थना करावी. सप्तनद्यांना आठवावे. या नद्यांच्या पाण्याने माझे बाह्य शरीर शुद्ध होत आहे, आणि त्यांच्या तीर्थरूप पवित्रतेने अंतर्मन निर्मळ होत आहे, विशेषतः ईश्वराने दिलेल्या भौतिक शरीराची मी पूजाच करीत आहे, असा भाव असावा.
देवाला जशी वस्त्र आणि उपवस्त्रे वहातात, तशी वस्त्रे स्वतः परिधान करावीत. देवाला कापसाची वस्त्रे वहावीत. जोडीने वहावीत, मधे मधे पिंजर लावून वहावीत. कापसाच्या वस्त्रांचे मणी करणे, ते सारख्याच आकाराचे होणे, मारलेला पीळ न सुटणे, त्यांची संख्या देवतेनुसार निश्चित असणे हे कर्मकांडामधे येते. ते तेवढेच महत्त्वाचे आहे.
देवायला वहायची वस्त्रे कापसाचीच असतात, हे यावेळी लक्षात आणून देऊ इच्छितो. भारतीय परंपरांना जो इतिहास आहे, त्या इतिहासाच्या आधारे असे सांगता येते की, भारतात कापसापासून अत्यंत तलम वस्त्रे तयार करणारे कारागिर होते. ते वस्त्र एवढी तलम बनवायचे की एक पाचवारी साडी घडी केली की, काडेपेटीच्या काडीएवढी व्हायची. भारतीयांचा विदेशांशी असलेल्या प्रमुख व्यापारामध्ये सूती कपडे, पोलाद, दुग्धजन्य पदार्थ, मसाले, सोने यांचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. उरूग्वे सारख्या छोट्याशा देशातील लोक सुद्धा आजही गोपालन हा भारताने दिलेला व्यवसाय आहे, असे ते अभिमानाने सांगतात. ज्यांच्याकडील गोधन दरमाणशी चार एवढे प्रचंड आहे. असो.
कापसाची शेती करणे, कापूस गोळा करणे, कापूस साठवणे, कापसाच्या वस्त्राला पीळ पाडणे, त्यापासून सूत तयार करणे, ते रंगवणे, हातमागावर आणि पुढे यंत्रमागावर त्याचे वस्त्र तयार करणे, त्या वस्त्राचा पोत ठरवणे आदि चाळीस प्रकारचे उप व्यवसाय गुरूकुलांमधून शिकवले जायचे, अशा ब्रिटीशांनी केलेल्या नोंदी आजही उपलब्ध आहेत. असोत. आज या इतिहासातील कालबाह्य गोष्टी आत्ता परत कशाला उगाळत बसायच्या असेही काही जणांना वाटेल. त्याचा अभ्यास सुद्धा आज करायचा नाही का ? आज विदेशातून भरमसाठ किंमतीला जी अनैसर्गिक कापडे आणली जात आहेत, ज्यामधे पाॅलीस्टर, होजियरी, नायलाॅन आदि शरीराला हानीकारक असणारे कपडे, भारतासारख्या समशीतोष्ण प्रदेशात येणारा घाम टिपून घेऊ शकत नाहीत, आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्वचा रोग, कर्करोग, अॅलर्जी निर्माण होताना दिसतात. ज्याचे उपचार देखील विदेशी औषधे वापरून करावे लागतात.
अजून तरी देवाला घालायची वस्त्रे कापसाची अथवा रेशमाचीच असतात. पूर्णपणे नैसर्गिक आणि पूर्णपणे आरोग्यदायी !
अध्यात्म आणि आयुर्वेद वेगळे नाहीतच. एकाच नाण्याच्या त्या दोन बाजू आहेत, हे अगदी सहजपणे कळते.
समजून घेणाऱ्याला !!!
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02.06.2017
दि. ३० मेला १२वी एचएससी बोर्डाचा निकाल लागला. त्या अगोदर काही दिवस आयसीएसई बोर्डाचा निर्णय आला व त्याही अगोदर काही दिवस सीबीएसई बोर्डाचा रिझल्ट लागला. एकाच १२वीचे तिन तिन वेगळे रिझल्ट तिन वेगवेगळ्या दिवशी लागले.
लाजेची कल्पना कालसापेक्ष असते. म्हणजे वेगवेगळ्या काळात ती वेगवेगळी असते. अजंठा-वेरूळ अथवा खजुराहो येथील शिल्प पाहीली असता, शिल्पातील स्त्रीया बऱ्याचश्या नग्न अथवा अर्ध-नग्नानस्थेत दिसतात.
लेखाचं शीर्षक कुंकू असलं तरी मला त्यात कुकवापासून टिकली, बिंदी, टिका, मळवट वैगेरे कुंकवाच्या सर्व प्राचिन-अर्वाचिन पिढ्या अपेक्षित आहेत. लिहीताना मी फक्त ‘कुंकू’ असाच उल्लेख करणार आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti