(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मोर्चे काढायचेच तर मराठा पुढार्यांच्या घरावर काढा

    मोर्चे काढायचेच असतील तर , मराठा पुढार्याच्या घरावर काढु या !!
    कारण गेले 60 वर्षे महाराष्टात
    बहुसंख्य मुखमंत्री मराठा
    बहुसंख्य मंत्री मराठा
    बहुसंख्य आमदार मराठा ( आताही )
    बहुसंख्य सहकारी साखर कारखाने ,
    मूठभर मराठयांच्या ताब्यात !
    बहुसंख्य खाजगी साखर कारखाने ,
    मुठभर मराठयांच्या ताब्यात !
    बहुसंख्य सहकारी बँका ,
    मुठभर मराठयांच्या ताब्यात !
    बहुसंख्य नगरपालिका ,
    मुठभर मराठयांच्या ताब्यात !
    बहुसंख्य जिल्हा परिषदा ,
    मुठभर मराठयांच्या ताब्यात !
    बहुसंख्य पंचायत समित्या ,
    मुठभर मराठयांच्या ताब्यात !
    बहुसंख्य दुध सोसायटी ,
    मुठभर मराठयांच्या ताब्यात !
    बहुसंख्य ग्रामपंचायती ,
    मुठभर मराठयांच्या ताब्यात !
    बहुसंख्य सहकारी सोसायटी ,
    मुठभर मराठयांच्या ताब्यात !
    बहुसंख्य शिक्षण संस्था ,
    मुठभर मराठयांच्या ताब्यात !
    सर्व प्रकारच्या नौकऱ्यात भरती ,
    मुठभर श्रीमंत मराठयांच्या पोरांची !
    शेती विकासाच्या बहुसंख्य योजना ,
    मुठभर मराठयांच्या शेतात !
    सिंचन योजनांचे सर्व पाणी व पैसा ,
    मुठभर मराठयांच्या शेतात व घरात !
    ग्रामीण विकासाच्या नावाने आलेला पैसा ,
    मुठभर मराठयांच्या घरात !
    मग ?
    गरीब मराठा तरुण - तरूणींना ,शेतकऱ्यांना ,शेतमजुरानां व महिलांना काय मिळाले ?
    बेकारी , गरिबी , उपासमार , कुपोषण, आत्महत्या , हुंडाबळी , बलात्कार तसेच महिलाना परित्यक्ता व विधवा म्हणुन जगणे .
    हे बदलायचे असेल
    व मोर्चेच काढायचे असतील तर गेले 60 वर्षे ज्यांनी सर्व थरातील सत्ता आपल्या ताब्यात ठेवुन सर्व गरीबांना आपल्या प्रभाखाली व दबावाखाली ठेवुन आपले व आपल्या नातेवाईकांचे भले करुन घेतले त्या सर्व पक्षातील मुठभर मराठा नेत्यांच्या घरावर मोर्चे काढले पाहिजेत .

    सर्व जाती - धर्मातील गरीबांची एकी करुन सत्ता ताब्यात घेउन सर्व गरीबासहित आपले प्रश्न सोडवून घेतले पाहिजेत .
    केवळ जातीचे मोर्चे काढुन गरीब मराठयांचे कधीच भले होणार नाही तर भले मुठभर सत्ताधारी व श्रीमंत मराठयांचेच होईल हे लक्षात ठेवा .
    उलट
    या "मराठा क्रांती मोर्चा "मुळे सर्व जातीतील गरीबात द्वेष व दरी वाढेल . त्यामुळे मराठयांसहित सर्व गरीबांचे प्रश्न सोडवनेच मुश्कील होईल असे मला वाटते .

    -- -- बी. के. पाटील

    एक अस्वस्थ मराठा तरुण पटलं असेल तर पुढे पाठवा ....

    व्हॉटसअॅप वरुन...

      September 28, 2016


  • त्वचारोग आणि आयुर्वेद

    त्वचाविकारावर इतर उपचार चालू असताना सोबत खालील उपचार करावेत.

    आयुर्वेदाच्या दृष्टीने अनेक त्वचारोग हे आंतरिक दोषांचे बाह्य स्वरूप आहेत. यासाठी काही पथ्येही सांगितली आहेत. एक सर्वसाधारण नियम म्हणजे दूध,मिठाई यांच्याबरोबर आंबट पदार्थ खाऊ नयेत असा आयुर्वेदाचा सल्ला आहे. दूध-खिचडी, दूध-मासे हे पदार्थही एकत्र घेणे वर्ज्य आहे. मीठ व खारट पदार्थांवरही नियंत्रण आवश्यक आहे. लोणचे,खारवलेल्या मिरच्या, सांडगे,शेवया, इत्यादी पदार्थ या दृष्टीने कमी खावेत. अशी काळजी घेतल्यास त्वचारोग लवकर नियंत्रणात येतात असा अनुभव आहे. ठेवल्यावर आपोआप पाणी सुटणा-या दही, गूळ, इत्यादी वस्तूही त्वचारोग वाढवतात असा आयुर्वेदाचा विश्वास आहे. पोटात जंत असणे, कोठा साफ नसणे हा त्रास असेल तर त्यावर लवकर व नियमित उपचार करणे आवश्यक आहे. या विकारामुळे त्वचारोग लवकर आटोक्यात येत नाहीत.

    पावसाळयाच्या शेवटी होणारे त्वचाविकार हे शरीरातील थोडे रक्त काढल्यास (रक्तमोक्षण) लवकर बरे होतात. यासाठी जळवांचा वापर करता येईल. त्वचारोगाच्या आजूबाजूला किंवा रोगग्रस्त त्वचेवर जळवा लावल्यास लवकर आराम पडतो असा अनुभव आहे.

    आयुर्वेदानुसार साबणाऐवजी बेसनपीठ व तेल वापरल्यास त्वचा निरोगी व स्निग्ध राहण्यास मदत होते. विशेषकरून कोरडी त्वचा असलेल्या व्यक्तींनी अशी काळजी घेणे आवश्यक आहे.

    (अ) आरोग्यवर्धिनी 500 मि.ग्रॅ. दोन वेळा
    (ब) मंजिष्ठा चूर्ण पोटातून रोज दिल्यास आराम पडतो.

    (मात्रा : 1.5 ते 3 ग्रॅ. याप्रमाणे दिवसातून दोन वेळा)

    लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
    संदर्भ : आरोग्यविद्या

    -- आरोग्यदूत वरुन साभार

      August 20, 2016


  • छातीत अकस्मात दुखणे

    छातीत दुखण्याचे जाणवणे विविध प्रकारचे असू शकते. ते तीव्र किंवा सौम्य असू शकते. एखादा चाकू खुपसल्याप्रमाणे अथवा गुद्दा मारल्यानंतर दुखावे असे असते. सतत अथवा ठोके पडल्याप्रमाणे स्पंदनात्मक प्रवृत्तीचे असते, ते एका बोटाने जागा दाखविता येण्याजोग्या जागेत अथवा तळहात ठेवून अंदाजे जागा आखून दाखविता येते. हृदयविकाराची वेदना केवळ छातीतच मर्यादित असेल असे नसते. हृदयविकारात दुखणे छातीवर, जबड्यावर, मानेत अगर पाठीत, क्वचित वरच्या पोटात दाब आल्यासारखे दुखते. मळमळ होते, उलटी येते, धाप लागते, अंगाला घाम सुटतो व अकस्मात खूप थकवा जाणवतो. अंजायना पेक्टोकरिस या प्रकारात सहसा श्रमामुळे छातीत किंवा उपरोधित इतर ठिकाणी वेदना येते. ही वेदना विश्रांती घेताच शमते. हृदयविकाराचा झटका विश्रांती घेतानाच येतो.

    छातीच्या मध्यभागी दुखण्याचे दुसरे नेहमी आढळणारे कारण म्हणजे अन्ननलिकेचा दाह होणे. असा दाह जठरातील आम्लयुक्त पाचकरस अन्ननलिकेत येण्याने होतो. कधी केवळ सौम्य जळजळ जाणवते, तर कधी हृदयविकाराच्या झटक्याकसारखी तीव्र वेदना होते. मनाचा शरीरावर मोठा परिणाम होतो, हे तर माहीत आहेच. चिंतातूर व्यक्तीला तणाव निर्माण करणाऱ्या प्रसंगाला तोंड देण्याची वेळ आली, की छातीत, सहसा डाव्या बाजूला धारदार शस्त्र खुपसल्यासारखी जोरात वेदना येते. काही वेळा शारीरिक श्रमानंतर विशेषतः हाताच्या स्नायूंच्या अतिश्रमाने, छातीच्या स्नायूत गोळा आल्याप्रमाणे वेदना येतात. गोळा गेला तरी वेदना रेंगाळते. छातीचा फासळ्यांचा पिंजरा दर श्वसनाबरोबर कार्यरत असतो. फासळ्यांचे पुढचे टोक कूर्चेला जोडलेले असते. या कूर्चेतील सूजेमुळे छातीत मध्यभागाच्या डाव्या बाजूला दुखते. ही जागा एका बोटाने दाखविता येते व बोटाने दाब दिल्यास वेदना येते. इतर अनेक कारणांनी छातीत दुखू शकते.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- डॉ. ह. वि. सरदेसाई.

      December 13, 2016


  • अपघाताने खुब्याच्या सांध्याला होणारी इजा

    हल्ली वाढलेल्या मोटर अपघातांमुळे या सांध्याला होणाऱ्या इजा वाढल्या आहेत. यात सांधा निखळणे, सांध्यातील उखळीला अस्थिभंग होणे, तसेच फीमरच्या डोक्याला व त्याच्याखाली असलेल्या मानेजवळ (नेक ऑफ फीमर) अस्थिभंग होणे आदी गोष्टी होऊ शकतात. खुब्याचा सांधा बाहेर येणे किंवा निखळणे हे मोठ्या मारानेच होऊ शकते.

      May 22, 2023


  • छत्रपती संभाजी महाराजांचा ‘झंझावात’

    माझ्या मावळ्यांनो, प्रजाजन हो, गेली ३४३ वर्षे दाबून ठेवलेल्या मनातील काही गोष्टी आज सांगाव्याशा वाटतायत् ! आम्हाला माहित आहे “आत्मा बोलतो” यावर आजच्या बुध्दिवादी लोकांचा विश्वस बसणार नाही.पण जे काही तुम्ही ऐकणार आहात ते ऐकून पूर्ण झाल्यावर तुम्हाला त्यातील सुसूत्रता पटेल आणि लक्षांत येईल की आम्ही जे बोललो तो गेल्या ३९३ वर्षांतील म्हणजेच आमच्या जन्मापासून ते आमच्या शारीरीक निर्वाणा पर्यंतचा घटनाक्रम अर्थात् इतिहास आहे आणि इतिहास कधी खोटा असेल काय हे तुम्हीच ठरवा !
    त्याआधी आम्ही तुम्हांस ३४४ वर्षे मागे नेतो…..

    आज चैत्री पौर्णिमा – रामभक्त हनुमानाची जयंती – म्हणजे तुमच्या आजकालच्या “इंग्रजा”ळलेल्या भाषेत ३-एप्रिल ! गेल्या अकरा दिवसांत आम्ही आसन्नमरण अवस्थेत आहोत आणि आज वैद्यराजांच्या औषधाच्या मात्रा पण पोटात ठरत नाहियेत.अंगाची नुसती काहिली होत्येय.सभोवताली काय चाललंय काही कळत नाही , अंतर्मनात जाणवत्येय ती फक्त गोमाजीबाबा पानसंबळ, महादेव आणि मनोहारी या सेवकांच्या डोळ्यांतील आर्त भाव ! राजाराम तर गेल्या अकरा दिवसांपूर्वीच स्वतःला “पोरका” समजू लागलाय ! शेवटी त्यांनाही महाराणींचे आणि रायगडावरील विषवल्लींचे फुत्कार ऐकू गेले असणारच !

      June 10, 2024


  • बिनतारी विश्वस्तता ऊर्फ WiFi

    एकविसाव्या शतकातल्या नवनवीन शोधांनी अापण खरंच चक्रावून जातो….. संगणक…मग मोबाईल …. मग फेसबुक …. मग WiFi…..

    पण हि बिनतारी विश्वस्तता म्हणजेच WiFi हा काहि एकविसाव्या शतकातला शोध नाहिये तर तो युगानुयुगांपूर्वीपासूनचा शोध अाहे असं मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हि मला वेड्यात काढाल…..सांगतो , ऐका अापला जन्म अाईच्या उदरांत ९ महिने ९ दिवस पोसलं गेल्यावर होतो , अापण जन्माला अाल्यावर ज्या नळीतून अाईच्या शरीरातील अन्न पोटांत असताना अापल्या निर्माण अवस्थेत पोचवलं जातं , ती नळी — म्हणजेच नाळ हल्ली डाॅक्टर व पूर्वी सुईणी कापून टाकत असंत.सिंधूताई सपकाळांना तर हे काम लेकीच्या जन्मानंतर स्वत:च करावं लागलं…..

      July 12, 2017


  • प्रेशर कुकर

    प्रेशर कुकर पहिल्यांदा बनवला तो फ्रेंच गणितज्ज्ञ डेनिस पॅपिन यांन १६७९ मध्ये त्यांनी एका लोखंडी भांड्याला पक्के झाकण बनवून हा प्रयोग यशस्वी केला होता. कुकरला त्यावेळी डायजेस्टर हा शब्द वापरला जात असे.

      January 28, 2023


  • व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने

    ख्रिस्ती वर्चस्व वाढण्याच्या काळात हीदन आणि पेगन (मूर्तिपूजक आणि निसर्गपूजक) लोकांना हालहाल करून ठार करण्यात आले वा बाटविण्यात आले. इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात रोमन साम्राज्यात ख्रिस्ती वर्चस्व वाढू लागले. त्या काळात क्लॉडियस दुसरा हा राजा होता. रोमन साम्राज्यात गृहयुद्धे व बाहेरील आक्रमणे चालू होती. नित्य युद्धमान असलेल्या त्या देशाला तरुणांची सैन्यात भरती होण्याची आवश्यकता वाटू लागली. प्रेम आणि लग्न या दोन गोष्टी यात बाधा आणू शकतात असा विचार करून राजाने लग्नांवर काही काळ बंदी घातली. राजाविरुद्ध जनमत एकवटावे म्हणून व्हॅलेंटाईन आणि मेरियस यांनी पुढाकार घेऊन बंदी झुगारून लग्ने लावण्याचा धडाका लावला. हे दोघेही ख्रिस्ती धर्मप्रचारक होते. त्यांचे कृत्य म्हणजे राजद्रोह होता. राजाने त्यांना पकडले. शिरच्छेदाची शिक्षा सुनावली असूनही या व्हॅलेंटाईनने तुरुंगातही प्रेम केले. त्याने तुरुंगाधिकार्याच्या मुलीला आपल्या नादी लावले. मरणापूर्वी लिहिलेल्या पत्राखाली त्याने म्हणे 'लव्ह फ्रॉम युवर व्हॅलेंटाईन' असे लिहिले होते. १४ फेब्रुवारी २७० मध्ये त्याचा शिरच्छेद करण्यात आला. हा दिवसही नक्की नाही. तो जाणीवपूर्वक पेरण्यात आला, कारण हा दिवस म्हणजे रोमन देव-देवतांच्या ज्युनो नामक राणीचा गौरव दिवस होय. तोच या आक्रमकांनी 'व्हॅलेंटाईन डे' ठरवून पुढे रोमन मूर्तींचा विध्वंस केला. राजद्रोह करणाऱ्याच्या नावाने आपण हा दिवस साजरा करावा काय? पाश्चात्यांच्या वैचारिक आक्रमणामुळे असे 'दिवस' साजरे करण्याचे फॅड आपल्याकडे बोकाळले आहे.

    त्यातूनही महाविद्यालयीन जीवनात गम्मत म्हणून 'प्रेमदिवस' साजरा करायचा असेल तर 'रुक्मिणी डे' साजरा करा. माघ शु.दशमीला श्रीकृष्ण-रुक्मिणी विवाह दिवस असतो तेव्हा साजरा करा. जगाला ज्ञात असलेला पहिला प्रेमसंदेश रुक्मिणीने भगवान श्रीकृष्णांना पाठवला. त्या गोष्टीला साडेपाच हजार वर्षांचा दिव्य इतिहास आहे. हे प्रेम राजद्रोह, बंडाळी वा अन्यांचे गळे घोटून केले गेले नव्हते. उदाहरणच हवे असले तर ते असे उदात्त आणि आदर्शवत हवे. रुक्मिणीने तिचा विवाह शिशुपालासमवेत ठरला आहे हे कळताच सुदेवाबरोबर संदेश धाडला. भागवतातील ५२ व्या अध्यायात श्लोक क्र.३७ ते ४३ यात तो आहे. सामराजाने यावर 'रुक्मिणी हरण'ही पद्यरचना केली आहे. यात रुक्मिणी म्हणते-

    या कारणे नियत म्यां वरिलासे भावे|येऊनिया त्वरित मज आजि न्यावे||
    हा लागला जिव असे तुजवीण जाया|तू आपुली हरि करी मज आजि जाया||९४|| सर्ग-५

    हे संपूर्ण काव्य रोचक आहे. श्रीकृष्णासारख्या नितीज्ञ, धर्मज्ञ, ध्येयासक्त, सामर्थ्यवान, ज्ञानी, पराक्रमी वीरावर तिचे मन जडले आहे हे लक्षात घ्या. प्रेम असे असावे. तारुण्यातील प्रेममस्ती म्हणजे बहुतेक वेळा वासनेचा धिंगाणा असतो. त्याला हे असे 'डे' साथ देतात. तेव्हा राजद्रोही व्हॅलेंटाईनचे नाव टाका आणि उत्तुंग प्रेमाविष्काराच्या रुक्मिणीच्या नावाला पुढे न्या. युवाशक्तीने पुढाकार घेतला तर काही काळात हा 'डे' जगभर साजरा होऊ शकेल.

    राष्ट्रजागर : डॉ.सच्चिदानंद शेवडे
    पृ.१५६-१५७,
    तृतीय आवृत्ती
    गार्गीज प्रकाशन-वसई

      February 6, 2017


  • तामिळनाडू : मंदिरांचे वैभव, निसर्गाची जादू आणि इतिहासाचा सुवर्ण ठसा – (भाग 1)

    तामिळनाडू : मंदिरांचे वैभव, निसर्गाची जादू आणि इतिहासाचा सुवर्ण ठसा – (भाग 1)

    दक्षिण भारताच्या नकाशावर नजर फिरवलीत की मनात एकच राज्य उभं राहतं – तमिळनाडू. देवालयांचा दिमाखदार वैभव, हजारो वर्षांची संस्कृती, शिल्प-कलेतून दिसणारा इतिहास, चवीने भरलेली पारंपरिक भोजन संस्कृती आणि निसर्गाच्या कुशीत जपून ठेवलेली रम्य हिल स्टेशन्स… या सर्वांचा अद्भुत संगम म्हणजे तामिळनाडू. हे राज्य अनुभवताना जाणवतं – येथे प्रत्येक दगड, प्रत्येक नदी, प्रत्येक मंदिर आणि प्रत्येक सण यामागे एक कथा आहे, एक परंपरा आहे आणि एक अद्वितीय अध्यात्मिक ऊर्जा आहे.

      November 21, 2025


  • ही लूट आधी थांबवा!

    सिंचन, रस्ते, वीज, पाणी या विकासाच्या दृष्टीने पायाभूत ठरणाऱ्या सुविधांचे समान न्याय तत्त्वाने वाटप झाले नाही. सगळ्याच सत्ताधाऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्राला कायम झुकते माप दिले. किंवा असेही म्हणता येईल की, राजकीयदृष्ट्या अतिशय जागृत असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी एकजुटीच्या बळावर राज्याची आर्थिक सूत्रे कायम आपल्या हाती ठेवण्यात यश मिळविले.

      May 8, 2005