(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • आता आम्ही जगावे तरी कसे?

    जेमतेम तीन वर्षांपूर्वी तुम्ही सत्तेवर आलात, सर्वात आधी गॅस अनुदानित दरात न देता ती सबसिडी थेट ग्राहकांच्या खात्यात जमा करायला सुरुवात केलीत. ठीक आहे आमचा त्या घोटाळ्यात जास्त शेअर नव्हता तर त्यामुळे आम्हाला जास्त झळ बसणार नव्हती आम्ही शांत राहिलो.

    तुम्ही खताचे वाटप सुद्धा फक्त शेतकऱ्यांनाच केले अन अनुदान पण थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले. आता आम्ही परिश्रमपूर्वक एवढा मोठा काळाबाजार तयार केला तो युरिया कारखान्यांना विकून अन त्यावरची मलई खाऊन, तुम्ही शेतकऱ्यांनाच अनुदान देताय म्हणल्यावर आमची तर उपासमार होऊ लागली. पण तरीसुद्धा आम्ही (नाईलाजाने) शांतच राहिलो.

    पण आता नोटाबंदीच्या काळात आमचे जे प्रचंड नुकसान झालंय ते अंशतः का होईना आम्ही कर्जमाफीच्या रूपाने वसूल करू इच्छितो तर तुम्ही त्यालाही तयार नाहीय.

    आम्ही सुद्धा वेळोवेळी कर्जमाफी केलीच ना (अन त्यात गबर आम्हीच झालो कारण शेतकऱ्यांना त्यांच्या सातबाऱ्यावर किती बोजा चढवलाय हे माहीतच नसायचं)

    तुम्ही मागील दोन वर्षात सिंचन योजनांची काटेकोर अंमलबजावणी केलीत अन आमची टँकर लॉबीची पण वाट लावली. आता आम्ही एवढे पैसे घालून (खाऊन) टँकर घेतले ते काय दारात उभे करायला काय?

    असे आमचे बरेच उद्योग आहेत पण तुम्ही तर प्रत्येक ठिकाणी चाप लावत चाललाय

    बर तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करावे तर ते सिद्ध पण होत नाहीयेत (आडातच नाही तर पोहोऱ्यात कुठून येणार).

    आम्ही गेल्या 67 वर्षात जी सरंजामशाहीची घडी घातलीय तीच तुम्ही पार विस्कटून टाकताय?

    अन ह्या वेगाने तुम्ही जर सुधारणा कराल तर आम्हाला पुढच्या निवडणुकीत कोण विचारणार (तस पण आत्तातरी कोण विचारतय म्हणा)

    असं एवढं वाईट तर आपण शत्रूच सुद्धा चिंतीत नाही तुम्ही पण जगा अन आम्हाला पण जगवा असं असावं ना. पण आम्हाला जगवायची सोय तुम्ही छगनरावांसारखी कराल तर ते कसं बरं मान्य व्हावं?

    म्हणून आम्हाला आता हे शेतकरी संपाचे पाऊल उचलणं भाग पडलंय. (कारण आम्हाला हे तर माहीतच आहे की संपात मेला तर शेतकरीच मरणार आहे आम्हाला काय त्याचे आम्हाला तर तो भांडवलंच देणार आहे तमाशे करायला)

    आता तरी सांगा ना की आता आम्ही जगावे तरी कसे?

    - आपला एक अडगळीत पडलेला राजकारणी

  • सुप्त मनाची अफाट शक्ति

    सोलोमन बेटावर आदिवासी जमातीचे वास्तव्य आहे. ते आदिवासी लोक प्रथेनुसार झाडे तोडणे अपशकुनी समजतात. एखादे झाड तोडायचे असेल तर एकत्र येऊन दररोज झाडाभोवती वर्तुळाकार तास न तास बसून झाडाला नकरात्मक लहरींनी (negative destructive frequency) घायाळ करतात. आश्चर्याचा भाग म्हणजे काही आठवड्यात ते झाड शुष्क होऊन उन्मळून पडते.

    हे उदाहरण कोणालाही पचनी पडणे अवघड आहे. ते अविश्वसनीय वाटणे स्वाभाविक आहे. अदृश्य, न दिसणारे, नकारात्मक मन, चिन्तन करणारे विचार, एका झाडाचे अस्तित्व नष्ट करू शकतात का?

    तुम्हाला जर ब्रुस लिप्टनचे पुस्तक The Biology of Belief वाचण्याची संधी मिळाली तर तुम्ही सोलोमन बेटावरील गोष्टच नव्हे तर तुम्ही तुमच्याबद्दल आणि ज्याच्यावर प्रेम करतात त्याच्या विषयी नकारात्मक बोलण्यावेळी हजार वेळेस विचार कराल.
    लिप्टन यांनी या पुस्तकात जागृत (conscious) आणि सुप्त मनाच्या (subconscious mind) ताकदीवर विस्तृत विवेचन केले आहे.

    सुप्त मनाची ताकद ही जागृत मनाच्या ताकदीपेक्षा दशलक्ष पटीने जास्त असते.
    दैनंदिन जीवनात सुप्त मनाचा नकळत प्रचंड प्रभाव असतो. पुष्कळ वेळा आपण आपल्या वाईट सवयी अथक प्रयत्न आणि इच्छाशक्ति असताना सुद्धा सोडू शकत नाही. त्याचे मुख्य कारण ह्या वाईट सवयी सुप्त मनामध्ये प्रभावीपणे प्रोग्राम केल्या जातात आणि ते आपले सर्व प्रयत्न निष्क्रिय करतात.

    जागृत मन (Conscious mind) ही सुप्त मनाची (Subconscious) केवळ सावली असते.
    सोलोमन बेटावरील आदिवासी हे प्रभावीपणे नकारात्मक लहरींनी झाडाच्या संवेदनेवर (emotion) आघात करतात. झाडांना संवेदना असतात हे ही तितकेच खरे आहे.
    काही दिवसांनी त्या आघाताने त्या संवेदना झाडाच्या एक अंगीभूत भाग होऊन जातात आणि त्यामुळे झाडाची अणुरचना ढासळते. झाड आतूनच मरणासन्न होते.

    त्या पुस्तकात जागृत पालकत्वावर स्वतंत्र प्रकरण आहे. त्यात मुलावर सतत नकारात्मक बोलण्यामुळे, त्याच्या जडणघडणीवर विपरीत परिणाम होतात. याउलट सकारात्मक विचार, मुलाचे जीवनात उपयुक्त पडतात. तेच तेच सारखं बोलत राहणे सुप्त मनावर पगडा करते आणि तसेच घडत जाते याची प्रचिती दिसून येतेच.

    म्हणूनच मी सुखी आहे, मी सर्व गुणसंपन्न आहे, माझ्याकडे भरपूर पैसा, उत्तम आरोग्य, उत्तम नाती, उच्चकोटीचा समाज, असे सर्वांगीण सुख स्मृद्धाने परिपुर्ण जीवन मी जगत. जे होत आहे आणि होणार आहे ते सर्व चांगलेच होणार आहे, असेच विचार मनात सतत असू द्या. हाच समृद्ध जीवनाचा कानमंत्र आहे !

    -- संकलन : अशोक साने
    फेसबुक, WhatsApp यासारख्या माध्यमातून दररोज येणारे चांगले लेख तुमच्यासाठी शेअर करतो.. लेखकाचे नाव माहित नाही.

  • सुप्त मनाची अफाट शक्ति

    सोलोमन बेटावर आदिवासी जमातीचे वास्तव्य आहे. ते आदिवासी लोक प्रथेनुसार झाडे तोडणे अपशकुनी समजतात. एखादे झाड तोडायचे असेल तर एकत्र येऊन दररोज झाडाभोवती वर्तुळाकार तास न तास बसून झाडाला नकरात्मक लहरींनी (negative destructive frequency) घायाळ करतात. आश्चर्याचा भाग म्हणजे काही आठवड्यात ते झाड शुष्क होऊन उन्मळून पडते.

    हे उदाहरण कोणालाही पचनी पडणे अवघड आहे. ते अविश्वसनीय वाटणे स्वाभाविक आहे. अदृश्य, न दिसणारे, नकारात्मक मन, चिन्तन करणारे विचार, एका झाडाचे अस्तित्व नष्ट करू शकतात का?

    तुम्हाला जर ब्रुस लिप्टनचे पुस्तक The Biology of Belief वाचण्याची संधी मिळाली तर तुम्ही सोलोमन बेटावरील गोष्टच नव्हे तर तुम्ही तुमच्याबद्दल आणि ज्याच्यावर प्रेम करतात त्याच्या विषयी नकारात्मक बोलण्यावेळी हजार वेळेस विचार कराल.
    लिप्टन यांनी या पुस्तकात जागृत (conscious) आणि सुप्त मनाच्या (subconscious mind) ताकदीवर विस्तृत विवेचन केले आहे.

    सुप्त मनाची ताकद ही जागृत मनाच्या ताकदीपेक्षा दशलक्ष पटीने जास्त असते.
    दैनंदिन जीवनात सुप्त मनाचा नकळत प्रचंड प्रभाव असतो. पुष्कळ वेळा आपण आपल्या वाईट सवयी अथक प्रयत्न आणि इच्छाशक्ति असताना सुद्धा सोडू शकत नाही. त्याचे मुख्य कारण ह्या वाईट सवयी सुप्त मनामध्ये प्रभावीपणे प्रोग्राम केल्या जातात आणि ते आपले सर्व प्रयत्न निष्क्रिय करतात.

    जागृत मन (Conscious mind) ही सुप्त मनाची (Subconscious) केवळ सावली असते.
    सोलोमन बेटावरील आदिवासी हे प्रभावीपणे नकारात्मक लहरींनी झाडाच्या संवेदनेवर (emotion) आघात करतात. झाडांना संवेदना असतात हे ही तितकेच खरे आहे.
    काही दिवसांनी त्या आघाताने त्या संवेदना झाडाच्या एक अंगीभूत भाग होऊन जातात आणि त्यामुळे झाडाची अणुरचना ढासळते. झाड आतूनच मरणासन्न होते.

    त्या पुस्तकात जागृत पालकत्वावर स्वतंत्र प्रकरण आहे. त्यात मुलावर सतत नकारात्मक बोलण्यामुळे, त्याच्या जडणघडणीवर विपरीत परिणाम होतात. याउलट सकारात्मक विचार, मुलाचे जीवनात उपयुक्त पडतात. तेच तेच सारखं बोलत राहणे सुप्त मनावर पगडा करते आणि तसेच घडत जाते याची प्रचिती दिसून येतेच.

    म्हणूनच मी सुखी आहे, मी सर्व गुणसंपन्न आहे, माझ्याकडे भरपूर पैसा, उत्तम आरोग्य, उत्तम नाती, उच्चकोटीचा समाज, असे सर्वांगीण सुख स्मृद्धाने परिपुर्ण जीवन मी जगत. जे होत आहे आणि होणार आहे ते सर्व चांगलेच होणार आहे, असेच विचार मनात सतत असू द्या. हाच समृद्ध जीवनाचा कानमंत्र आहे !

    -- संकलन : अशोक साने
    फेसबुक, WhatsApp यासारख्या माध्यमातून दररोज येणारे चांगले लेख तुमच्यासाठी शेअर करतो.. लेखकाचे नाव माहित नाही.

  • ज्ञानापेक्षा कल्पनाशक्ती महत्त्वाची…

    "आईनस्टाईन म्हणायचा ज्ञानापेक्षा कल्पनाशक्ती महत्त्वाची ."

    हे पटवून देताना कालच्या लोकसत्तातून गिरीश कुबेरनी फारच सुंदर लेख लिहला आहे..

    गेल्या आठवड्यात आपल्या देशाच्या भांडवली बाजाराचा निर्देशांक ३० हजारांच्या पुढे गेला. त्याच कालावधीत अँपल कंपनीचे भांडवली बाजारातील मुल्य तब्बल ८०४ बिलियन डाँलर इतके प्रचंड वाढले.

    अजून सोपे सांगायचं तर ५२,२६,००० कोटी रुपये इतकी झाली . आपल्या देशातल्या सर्व कंपन्यांचे बाजारमुल्य आहे ५२,१५,००० कोटी.

    अजून सोपं .......

    अँपलकडे आजमितीला रोख रक्कम आहे १५,६०,००० कोटी रुपये आणि आपल्या देशातल्या तीन सर्वाधिक मौल्यवान कंपन्यांचं (रिलायन्स , टिसीएस आणि एचडिएफसी बँक ) एकत्रित मूल्य आहे १३,००,००० कोटी रुपये . म्हणजे अँपलने या तीनही कंपन्या विकत घ्यायचे ठरवले तरी २ लाख कोटी शिल्लक राहतील .....

    हे तर काहीच नाही अँपलचे मुल्य ब्राझील, सिंगापूर ,मलेशिया वगैरे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या मुल्यापेक्षाही अधिक आहे.

    वरच्या संख्यापुराणाचा सारांश खूप खूप महत्त्वाचा आहे..........

    आज जगातल्या पहिल्या पाच कंपन्या आहेत अँपल , अँमेझाँन, अल्फाबेट म्हणजे गुगल, मायक्रोसाँफ्ट आणि फेसबुक.

    या सर्व कंपन्यावर नजर टाकताच लक्षात येईल की,

    १) या पाचही कंपन्या नवअर्थकाळातल्या आहेत.
    २) या पाचही कंपन्या या पहिल्या पिढीच्या आहेत.
    ३) या पाचही कंपन्या म्हणजे एक कल्पना होती.
    ४) या पाचही कंपन्या एकाच देशात जन्मलेल्या आहेत. तो म्हणजे अमेरिका . त्यातही ही सर्व मूळ अमेरिकनच्या पोटी जन्माला आलेली नाहीत तर ती निर्वासीतांची मुलं आहेत.
    ५) आतातरी कल्पनाशक्तीला महत्त्व द्यायला शिकलं पाहिजे . ज्ञानाला मर्यादा असतात पण कल्पनाशक्तीला नाही. ज्ञान भरपूर आहे पण त्याचं काय करायचं हेच माहीत नसेल तर काय उपयोग ? तेव्हा ज्ञान कमी असलं तरी एकवेळ चालेल पण कल्पनाशक्ती हवीच हवी.

    "कल्पनाशक्तीला मुक्त वाव द्यावा" .

    हे लिहू नका, ते वाचु नका, हेच खा, हे खाऊ नका..... अशा निर्बंधी समाजाची संतती किरटीच असते.

  • वॉट्स अप वरुन माणसाचा स्वभाव

    १. ज्याचा डिपी स्थिर त्याचा स्वभाव शांत असतो.
    २. वारंवार डीपी बदलणारे चंचल स्वभावाचे असतात.
    ३. छोटे स्टेटस ठेवणारे समाधानी वृत्तीचे असतात.
    ४. नेहमी स्टेटस बदलणारे हौशी असतात.
    ५. सतत काही न काही शेअर करणारे दिलदार मनाचे असतात.
    ६. कधीच कुणाला लाईक न करणारे गर्विष्ठ असतात.
    ७. प्रत्येक पोस्ट ला आवर्जून प्रतिक्रिया देणारे रसिक आणि दुसऱ्यांच्या विचारांचा आदर करणारे असतात.
    ८. इकडचे मेसेज तिकडे फिरवणारे राजकारणी असतात.
    ९. फोटो किंवा पोस्ट दिसताच ओपन करणारे अधीर स्वभावाचे असतात.
    १०. जुन्याच पोस्ट परत परत टाकणारे धांदरट असतात.
    ११. दुसऱ्याच्या पोस्टकडे दुर्लक्ष करून स्वतःच्याच पोस्ट पुढे ढकलण्यात पटाईत असणाऱ्या व्यक्ती वर्चस्व गाजवणाऱ्या असतात.
    १२. मेसेज वाचून प्रतिक्रिया न देणारे संकुचित वृत्तीचे असतात.
    १३. कधीच काहीच शेअर न करणारे कंजूष असतात.
    १४. मोठे मेसेज न वाचणारे आळशी असतात.
    १५. वेगवेगळे वॉट्स अप ग्रुप बनवणारे महत्वाकांक्षी असतात.
    १६. कामापुरते वॉट्सअप चालू ठेवणारे जीवनात यशस्वी होतात.

  • युरी बेझमेनोव्ह आणि भारत

    युरी हा रशियाच्या गुप्तहेर संघटनेचा म्हणजेच ‘केजीबी’चा सदस्य.

  • समुद्रकिनाऱ्यावर घ्यायची काळजी

    सध्या बीचवर फिरायला जायचे मोठे फॅड आहे. मजा करा पण थोडी स्वत:च्याजीवाचीही काळजी घ्या. या सूचना वाचा आणि अमलात आणा…

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग सत्तावन्न

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 13-पुष्प पहिले

    तिलक लावल्यावर पुष्प देऊन स्वागत केले जाते. जसे व्यासपीठावरील पाहुण्यांचे, तसेच देवाचे पण !
    यथा लाभोद्भव, कालोद्भव, सुगंधीत पुष्पं समर्पयामी । असं सांगून फुलं वाहिली जातात. "माझ्या शक्तीनुसार, ऋतुनुसार, जी काही शक्य होती ती सुगंधित फुले आणून, ती मी तुला वाहातो आहे, ती तू मान्य करून घे. आणि याच्या सुवासाने नेहेमी प्रसन्न रहा."

    हे कोणाला उद्देशून सांगायचं? ज्याने ही सुंदर सृष्टी निर्माण केली त्याला ? की, सृष्टीमधे फुलं निर्माण करणाऱ्याला ? की फुलांमधे सुगंध घालणाऱ्याला ? की एवढी किमया जो करू शकतो त्याला ? या सगळ्या उपचाराची आणि चार दोन फुलांची त्याला आवश्यकता असेल ? नक्कीच नाही. ही विनंती, प्रार्थना या सौंदर्याचा उपभोग घेणाऱ्यांसाठी आहे.

    तुझेच तुजला अर्पण, हा भाव ठेवून हा पुष्पालंकार देवाला वहायचा.

    विविधता म्हणजे काय हे ते या फुलांकडून समजून घ्यावे. त्यांचे रंग, सुवास, उमलण्याच्या वेळा, टिकून रहाण्याचे सामर्थ्य, पुनः नवनिर्मितीसाठी माता होऊन, फळात रूपांतरीत व्हायचं, सारंच अद्भुत !

    हे सारं "तो" कोणासाठी करतोय ?
    फक्त मानवासाठी करीत असेल तर जिथे मानव नाही, अशा ठिकाणी देखील फुले बहरत असतातच की ! पशु पक्ष्यांसाठी ? त्यांच्यासाठी पण नाही. कारण त्यांना तशी सौंदर्यदृष्टी नाही. काहीजण त्यातील फक्त मध घेतात, काहीजण पायाखाली तुडवून जातात.अत्यंत स्वार्थी आणि अरसिक !
    मग ही अलौकिक पुष्प निर्मिती कोणासाठी ?

    त्याच्या स्वतःसाठी !
    त्याच्या स्वतःच्या आनंदासाठी !
    कोणी पाहो अथवा न पाहो....
    तिथे कुणी येवो वा न येवो.....
    देवाच्या चरणावर जावो अथवा सरणावर..
    झाडावरच झुरायचे की कुठेतरी दूर जात लहरायचे....
    औषधे टिकवण्यासाठी आंबवून घ्यायचे की गजऱ्यात जावून बसायचे....
    गंधाने ओथंबून जायचे की गंध दिला नाही म्हणून अबोलीच रहायचे ....
    प्रेमिकेसाठी पलंगावर पहुडायचे की गणिकेसाठी मनगटात जायचे....
    काट्यावर उमलायचे की पाण्यावर डुलायचे...
    उन्हात तापत गुलकंद होऊन घ्यायचे,
    की
    पाण्यात पडून पाणी सुगंधीत करायचे...
    फुल होऊन फुलांकडे पहायचे....
    आणि
    प्रत्येक क्षणाला त्याला स्मरायचे !

    या साऱ्यावर फक्त त्याचाच अधिकार आहे. स्वतःला आनंद व्हावा, असं प्रत्येकालाच वाटतं, कारण प्रत्येकामधेच तो भरून राहिला आहे.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    06.06.2017

  • तेजस एक्स्प्रेस आणि भारतीयांची मानसिकता

    पहिल्याच प्रवासात प्रवाशांनी 'तेजस एक्स्प्रेस'ची अक्षरश: दैना करून टाकली.

    काही व्यक्तींना नशिबाने अनेक चांगल्या गोष्टी मिळतात. मात्र, त्याच व्यक्ती आपल्या करंटेपणाने आणि वाईट सवयींमुळे या सगळ्यावर पाणी फेरतात, याचे मासलेवाईक उदाहरण सध्या ‘तेजस एक्स्प्रेस’च्या निमित्ताने अनुभवायला मिळाले आहे. गोव्याहून आपला पहिलाच प्रवास करून मुंबईत परतलेल्या या गाडीची अवस्था बघून रेल्वे अधिकाऱ्यांना धक्काच बसला. पहिल्याच प्रवासात प्रवाशांनी ‘तेजस एक्स्प्रेस’ची अक्षरश: दैना करून टाकली आहे. ‘तेजस एक्स्प्रेस’ मुंबईत परतली तेव्हा गाडीच्या डब्यांमध्ये लावण्यात आलेल्या अनेक एलईडी टीव्हींची प्रवाशांनी तोडफोड केल्याचे समोर आले. तसेच मनोरंजनासाठी देण्यात आलेले हेडफोन्सही प्रवाशांनी लंपास केले आहेत. याशिवाय, गाडीतील स्वच्छतागृह आणि इतर परिसरात पसरलेला कचरा पाहून अस्वच्छता हा भारतीय प्रवाशांच्या पाचवीला पुजलेला अवगुण आहे की काय, असेही जाणवले.

    तेजस एक्स्प्रेस मंगळवारी दुपारी २.३० वाजता करमाळीहून मुंबईच्या दिशेने रवाना झाली होती. त्यानंतर साडेआठ तासांमध्ये गाडी सीएसटी स्थानकावर दाखल झाली होती. मात्र, या पहिल्याच प्रवासात गाडीत होणारी चोरी आणि तोडफोड पाहून रेल्वे अधिकाऱ्यांसमोर नवीनच समस्या उभी राहिली आहे. या गाडीच्या ‘इकॉनॉमी क्लास’मधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने हा संपूर्ण वृत्तांत कथन केला आहे. अनेक प्रवासी सीटसमोर लावण्यात आलेले एलईडी टीव्ही उचकटून काढण्याचा प्रयत्न करत होते. काहीजणांनी तर एलसीडी टीव्ही काढून बॅगेत भरले होते. मात्र, रेल्वे अधिकारी याठिकाणी वेळीच आल्यामुळे या प्रवाशांचा नाईलाज झाला. याशिवाय, गाडीत असणाऱ्या बायो आणि व्हॅक्युम स्वच्छतागृहांमध्ये प्रवाशांनी मोठ्य़ाप्रमाणवर घाण केल्याचे दिसून आले. स्वच्छतागृहांचा वापर केल्यानंतर अनेक प्रवासी फ्लश करत नव्हते. तसेच अनेक स्वच्छतागृहांमध्ये विष्ठा आणि कचरा जमिनीवर पसरला होता. त्यामुळे आता एकूणच प्रवाशांच्या मानसिकतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

    -- सुनील बिडकर

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग छापन्न

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 12

    वस्त्र अलंकार झाल्यावर तिलक धारण केला जातो. देवाला भ्रूमध्य स्थानी चंदनतिलक केला जातो.भ्रूमध्य हे स्थान आज्ञाचक्राचे आहे. या चक्राला तिलक लावणे म्हणजे आज्ञाचक्राला संरक्षण देणे होय. जणुकाही फिल्टरच ! जे योग्य असतील तेवढीच सकारात्मक स्पंदने आत पाठवणे आणि नको असतील ती नकारात्मक स्पंदने बाहेर ठेवणे, अशी दोन कामे हा मंगल तिलक करत असतो. दक्षिण भारतात तर तिलक लावल्याशिवाय पुरूषदेखील घराबाहेर पडत नाहीत.

    उगाळलेले चंदन, रक्तचंदन, अष्टगंध, केशर, कुंकू, हळद, गोपीचंदन इ. लेप या आज्ञाचक्रावर लावले जातात. देवतांना चंदनतिलक लावताना अनामिकेने, म्हणजे करंगळीजवळच्या मरंगळीने लावावे. स्वतःला किंवा दुसऱ्याला लावताना मधल्या बोटाने भ्रूमध्यावर लावावे.

    भ्रूमध्य हेच स्थान आत्म्याचे स्थान सांगितले जाते. म्हणजे इथे लावलेले लेप ही एक प्रकारची प्रत्यक्ष स्वपूजा किंवा आत्मपूजाच आहे.

    मी हिंदु आहे, हे न सांगताच समजले पाहिजे, हे ओळखण्यासाठी हा तिलक काम करत असतो. इतर कोणत्याही धर्मात असा मंगल तिलक दररोज लावला जात नाही. पण आज सर्व धर्मसमभावाच्या गोंडस संस्कारांनी, "मी हिंदु आहे" असे अभिमानाने सांगायची पण लाज वाटू लागली आहे.

    भारतीय सौभाग्यवती महिलांचे "मांग मे सिंदूर भरना" अगदी अनिवार्यच असते. आता तर सिरीयल्स पाहून महाराष्ट्रीयन भगिनीदेखील मांग मे सिंदूर भरने लगी है ।
    प्रश्न नवयुवतींचा आणि समस्त पुरूष वर्गाचा आहे. पुरूषांना कपाळी केशरी गंध आणि महिलांना हळदीकुंकु लावणे म्हणजे मागासलेपणाचे आणि बुरसटपणाचे वाटते. काही वर्षांपूर्वी टिकली तर टिकली होती, आता तीपण टिकत नाही. त्याचे शास्त्र आणि त्यामागील भारतीय दृष्टीकोन वेळीच न समजल्याचे हे दुष्परिणाम आहेत. आता तरी जागे होऊया. संस्कृतीचे पालन करूया.

    देवासाठी "चंदनं समर्पयामी" आणि देवीसाठी "हरिद्राकुंकुमम् सौभाग्यद्रव्यम समर्पयामी" हे जसे सांगितले आहे तसेच आपल्या देहासाठीदेखील आहे, हे दोघांनीही लक्षात ठेवूया. पालकांनी आपली थोडी कडक भूमिका आपल्या घरातील देव आणि देवींना, समजावून सांगितली तर षटचक्र दूषित झाल्यामुळे बिघडलेले काम क्रोध आदि रिपु सहजपणे जिंकता येतील.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    05.06.2017