वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
गेले काही दिवस एक इ-मेल इंटरनेटवर धुमाकुळ घालत आहे. Aderoid नावाचा एक तारा पृथ्वीच्या अतिशय जवळ येणार आहे आणि त्यामुळे आपल्याला २१ जून २०१० रोजी आकाशात दोन सूर्य दिसणार आहेत असे ते इ-मेल आहे. हे एक मनमोहक दृष्य असेल आणि असे दृष्य पुन्हा केवळ इ.स २२८७ मध्ये दिसेल असेही या इ-मेल मध्ये लिहिले आहे. मजा म्हणजे इ-मेल पाठवणार्याने २१ जून २०१० च्या आकाशाचे फोटोही त्यात पाठवले आहेत. हा इ-मेल पाठवणारा भविष्यवेत्त्या नॉस्ट्रेडॅमसचा अवतार तर नाही ना?
June 20, 2010
जीवन म्हणजे पाणी.
आजपासून पाण्यावर चर्चा सुरू करू. कारण पाणी कसे प्यावे, किती प्यावे, यामधे बरीच मतमतांतरे आढळतात. ग्रंथामधे जे संदर्भ आले आहेत, त्या अनुषंगानेच माहिती पुरवली जाईल.
जे व्यवहारात दिसते आणि ग्रंथात आहे, त्यानाच आपण आधार मानूया.
ग्रंथ कोणते ?
आयुर्वेदाचे सर्वाना सहज समजतील, असे ग्रंथ म्हणजे अष्टांग संग्रह आणि अष्टांग ह्रदय. म्हणून आपण हे ग्रंथ आधारभूत धरून, पाणी या विषयी माहिती करून घेऊया.
अभ्यास करताना, एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे, कोणताही अभिनिवेश किंवा अहंकार बाजुला ठेवून, ग्रंथातील सूत्रांचा आजच्या काळानुसार, अभ्यास करायचा.
मला वाटते या म्हणण्याला काही अर्थ नाही.
हे वचन पण अष्टांगह्रदयकार वाग्भटजीचे आहे.
(रागादिरोगान सततानुषक्तान.....
राग आदि मानसिक रोग देखील बाजूला काढून ठेवून ग्रंथ अभ्यासाला सुरवात करूया.)
पाणी हेच जीवन आहे, कारण पाण्यापासूनच पृथ्वी महाभूताच्या सहाय्याने जीव सृष्टी उत्पन्न झालेली आहे. पृथ्वीचे दोन कण एकमेकांना जोडण्यात जल महाभूत मदत करते. आणि हेच दोन कण वेगळे करताना वायु महामूत मदत करते. गर्भाची वाढ करताना या महाभूतांचे हेच दोन्ही गुण उपयुक्त होतात.एका पेशीच्या दोन पेशी बनवणे, दोनाच्या चार, चाराच्या आठ करणे, आणि या पेशींना उर्जा पुरवण्याचे काम अग्नितत्व करते. आकाश महाभूतामुळे पेशींना विशिष्ट पोकळी आणि आकार प्राप्त होतो.
या पाचही महाभूतांच्या परस्पर संबंधामुळे, कमी जास्त असण्यामुळे, जीवनाची निर्मिती, स्थिती आणि लय होत असतो.
माती पासून मडके बनवायचे असेल तरीदेखील हीच पाच महाभूते काम करत असतात. त्यातील एक जल महाभूत.
निसर्गातील आणि शरीरातील हे जल महाभूत परस्पर पूरक काम करीत असते. पिंडी ते ब्रह्मांडी. जे काम बाहेर चाललेले असते, तेच काम शरीरात चाललेले असते. तीच पाच महाभूते आतही तसेच काम करीत असतात.
या महाभूतांचे गुण काही वेळा एकमेकांना पूरक असतात, तर काही वेळा परस्परांच्या विरूध्द असतात. जसं जल महाभूत हे अग्निच्या गुणाच्या विरूद्ध आहे. एक शीत तर दुसरे उष्ण.
शीत गुण कमी करायचा असेल तर उष्ण गुण वाढवावा लागेल, आणि उष्ण गुण कमी करायचा असेल तर शीत गुण वाढवावा लागेल. असेच शरीरात चालते.
पाणी हे शीत गुणांनी कफ आणि वात वाढवणारे आहे. तर पित्ताला शांत करणारे आहे. पण पाणी शरीरात गेल्यानंतर, पचन पूर्ण झाल्यावर त्याचा विपाक अम्ल बनतो, म्हणून ते नंतर पित्ताला वाढवणारे बनते. हे पण लक्षात ठेवावे. (विपाक ही संकल्पना नंतर अधिक सविस्तर कधीतरी लिहेन.)
हे जलमहाभूत पाणी या पदार्थातून आपण नियमितपणे वापरत असतो. या पाण्याचे सर्व गुण आणि कर्मे आपण समजून घेऊया.
जगण्यासाठी पाणी आवश्यक आहेच. घर बांधण्यासाठी पाणी आवश्यक आहेच. पण, अति प्रमाणातील पाणी देखील मृत्युचे कारण बनते, हे लक्षात ठेवूया.
उत्तराखंडमधे आलेला जलप्रलय, कष्टाने बांधलेली घरेच्या घरे, काही क्षणातच, उद्ध्वस्त करून गेलाय, हे पण लक्षात ठेवूया.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
08.12.2016
December 8, 2016
आपल्या सातत्यपूर्ण कारकिर्दीने क्रिकेटच्या इतिहासालाच एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवणार्या सचिन तेंडुलकरच्या कसोटी कारकिर्दीचा आरंभ या दिवशी झाला. सचिन तेंडुलकरच्या पदार्पणावर बरोब्बर तीन वर्षांनी (१९९२) रमाकांत आचरेकर सरांच्या आणखी एका चेल्याने कसोटी पदार्पण साजरे केले आणि अगदी दणक्यात शतक ठोकून. १५ नोव्हेंबर १९९२ रोजी डर्बनमधील किंग्जमीडवर प्रवीण आमरेने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ६४ धावा काढल्या. आदल्या दिवशीचा खेळ संपताना तो ३९ धावांवर नाबाद होता.
November 14, 2010
हिंदुस्थानला जगाच्या पाठीवर एक अद्भुत देश म्हणून ओळखले जाते. ‘अद्भुत’ हे विशेषण आपल्या देशापुढे लागण्याची असंख्य कारणे देता येतील. इथली संस्कृती, इथल्या परंपरा, इथली विविधता एक ना दोन शेकडो कारणे आहेत.
August 10, 2003
कपाटात कितीही साड्या (कित्येक न वापरलेल्या )असल्या तरी, “आजच्या फंक्शनसाठी माझ्याकडे एकही साडी नाहीय.” हे प्रत्येक बायको अगदी दुःखाने म्हणत असते. आता त्यावर वेड्यासारखं, “या काय इतक्या तर आहेत ” असं अजिबात म्हणायचं नसतं. तर आपणही तिच्या दुःखात सामील आहोत एवढेच चेहऱ्यावर भाव आणायचे असतात.
January 7, 2022
आई जगदंबेच्या अद्वितीय घराचे वर्णन करताना आचार्य श्रींची प्रतिभा या श्लोकात उत्तुंग झेप घेत आहे.
February 18, 2020
कृपया एका वाक्यात ऊत्तरे लिहा......
१) आधी देशप्रेम दाखवत तोडफोड करत नंतर तडजोड करणारा राजकीय नेता कोण?
२) कोणतेही जनआंदोलन/ऊपोषण/मोर्चा न काढता जातीयवाद करत निवडुण येणारा पक्ष कोणता?
३) फक्त निवडणुकीच्यावेळी मराठी अस्मितेचा स्वाभिमान असणारा व सत्तेसाठी कोणत्याही पक्षाशी युती करणारा पक्ष?
४) वर्षांनुवर्षे "राम मंदिराचा" मुद्दा फक्त निवडणुकीच्यावेळी वापरणारा पक्ष कोणता?
५) जनतेने कराच्या माध्यमातुन भरलेल्या पैशाचा जास्तीत जास्त "भ्रष्टाचार" करणारा पक्ष कोणता?
(कृपया स्वताःच्या अनुभवातुन ऊत्तरे द्यावीत)
(प्रश्न क्रं : ऊत्तर)
-- विवेक जोशी
November 6, 2016
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ
October 31, 2017
एक काळ होता… जेव्हा दुरदर्शनवर ब्लॅक ऍन्ड व्हाईट टिव्हीवर सायंकाळी साडेसात वाजता दिल्या जाणाऱ्या बातम्याही मोठ्या औत्स्युक्याने आणि विश्वासाने घराघरातून पाहिल्या जायच्या.. त्यावरच्या बातमीदारांना नावानिशी पक्के ओळखले जायचे.. त्यांची प्रत्येकाची ढब, शैलीचे कौतुक आणि अनुकरण केले जायचे.. मग त्या भक्ती बर्वे-इनामदार असोत वा रंजना पेठे… प्रदीप भिडे, अनंत भावे असोत वा विनायक देशपांडे… या सर्वांच्या बातम्या लक्षपुर्वक ऐकल्या जायच्या…
January 26, 2023
मुंबई शहराची ओळख एकेकाळी गेटवे आॅफ इंडिया, व्हीटी, चर्चगेट, राणीचा बाग, फ्लोरा फाऊंटन, चौपाटी एवढीच नव्हती तर काळी पिवळी टॅक्सीने देखील होती…. १९६४ पासून मुंबईत सर्वत्र धावणारी प्रीमियर पद्मिनी टॅक्सी, ३० आॅक्टोबर २३ पासून बंद झाली..
December 24, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti