(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • वटसावित्री नावाचे विज्ञान !

    मानवाने जंगलं साफ करून शेती करण्यास सुरवात केली तेव्हा या पृथ्वीवर इतकी घनदाट जंगलं होती की थोड्याशा जंगलतोडीमुळे विशेष फरक पडला नाही. हळूहळू इंधन व इतर अनेक कारणांमुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होऊ लागली व परिस्थिती गंभीर वळण घेण्याची शक्यता निर्माण झाली. आता जर त्वरित कृती केली नाही तर ही सुंदर वसुंधरा उजाड होण्यास वेळ लागणार नाही हे जाणत्या पूर्वजांच्या लक्षात आल्यामुळे वृक्षतोड थांबवून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी उद्बोधन करत बसण्याऐवजी युक्तीचा शोध सुरु झाला आणि त्यातूनच जन्मला वटसावित्री नावाचा एक अत्यंत उपयुक्त सण.

    पुरुषांनी सरपणासाठी वृक्षतोडीसारखी व जंगल साफ करून शेती करण्यासारखी मेहनतीची कामं करायची पूर्वापार पद्धत असल्यामुळे इतर सर्व वृक्षांबरोबरच मानवासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या वटवृक्षाचीही सर्रास कत्तल करण्यात येत होती. जे पुरुष वृक्षतोड करतात ते त्याचं संरक्षण करू शकणार नाहीत हे लक्षात घेऊन आपल्या थोर पूर्वजांनी ती जबाबदारी स्त्रियांवर सोपवली. माणूस पापभिरू असल्यामुळे ज्या वटवृक्षाच्या खोडाला धागे बांधून त्या वृक्षाची पूजा केल्याचे त्याने बघितले त्या वृक्षावर त्याने कधीही कुऱ्हाड चालवली नाही. माणसाची विज्ञानापेक्षा जप-तप,अंगारे धुपारे,देव, पोथ्या-पुराणं यांच्यावर जास्त श्रध्दा असल्यामुळे वृक्ष रक्षणाच्या या कृतीला सणाचं रूप देण्यात आलं आणि वटसावित्री नावाचा तो प्रयोग अत्यंत यशस्वी ठरला.

    आपले सर्व सण हे पूर्णपणे विज्ञानाधिष्टीत आहेत, पण त्यांना हेतुपुरस्सर अंधश्रद्धेचं स्वरूप देण्यात आलं आहे.

    श्रीकांत पोहनकर
    98226 98100
    shrikantpohankar@gmail.com

  • मालेगाव : हिदु आतंकवादाची भाकडकथा !

    ज्येष्ठ पत्रकार श्री. भाऊ तोरसेकर यांनी लिहिलेला हा लेख जनजागरणासाठी शेअर करत आहे.

  • म्युच्युअल फंड

    नमस्कार... मी म्युच्युअल फंड बोलतोय.....

    खूप वर्षांपासून तुमच्याशी बोलण्याची इच्छा होती. खरं तर तुमच्यावर खुप अारोप करायचेत, तक्रार करायचीय जमलंच तर हक्कानं रुसुनही बसायचंय, पण हे सगळं नेमकं कधी करावं हेच कळत नव्हतं. काय अाहे ना कि, अापण जो पर्यंत स्वत:ला सिद्ध करत नाही, तो पर्यंत कुणी अापल्याला हिंग लावुन विचारत नाही हेच खरं.... अाता शेअरबाजार सर्वोच्च स्थानी गेला अाहे, म्हटलं हिच योग्य वेळ अाहे हे सर्व बोलण्याची

    प्रथम मी माझा अल्पसा परिचय परत एकदा करुन देतो. माझा जन्म १९६४ साली संसदेत झाला, १९८७ सालापासुन मी वयात अालो, १९९५ पासुन मी कर्तत्व गाजवायला सुरुवात केली. अाज माझ्या ताफ्यात ४५ कंपन्या अाणि ३००,००० च्या अासपास स्किम्स अाहेत. SIP, Daily- Weekly-Monthly STP, Lumpsum Investment करण्यासारखी वेगवेगळी अायुधं अाहेत. छत्रपति शिवाजी महाराजांचा अादर्श घेत गनिमी काव्याचा वापर करुन मी महागाईशी झालेल्या अनेक लढाया अाजपर्यंत जिंकल्यात. माझा परतावा नेहमीच "करमुक्त" होता. मी गेल्या २०-२५ वर्षापासुन स्वत:ला सिद्ध करत अालोय. पण तुमचा जीव त्या पीपीएफ आणि फिक्स्ड डिपाॅझिटमध्ये अडकुन बसला. मी मानतो कि, पीपीएफ कंम्पाऊंडिंग पद्धतीने व्याज देतो, पण कंम्पाऊंडिंगमध्ये मी "बाहुबली" अाहे, माझ्या SIP चा मुकाबला तर कुणीही करु शकत नाही पण तुम्ही PPF च्या मोहात अडकुन मला विसरलात, चक्क दुर्लक्ष केलंत माझ्याकडे........ "जरा इतिहासाची पाने उलटून बघा, तुमच्या लक्षात येईल कि , पीपीएफ माझ्यासमोर किती छोटा बच्चु अाहे ते..._

    पुरावाच द्यायचा झाला तर गेल्या १५ वर्षात दरवर्षी १ लाख रु तुम्ही पीपीएफ मध्ये गुंतवले असतील, तर ते अाता ३५ लाख असतील पण तेच माझ्यात गुंतवले असते तर १.३२ करोड असले असते, पण तुमच्या डोळ्यावर पीपीएफच्या "फिक्स"ची पट्टी बांधलेली. घोडा भरकटु नये म्हणुन दोन्ही डोळ्यांच्या कडेला धातुचे अावरण बांधले जाते तसंच तुम्ही स्वत:ला करुन घेतलंत, माझं तर काहीच अडलं नाही पण शेवटी नुकसान कुणाचं झालं? तुमचंच ना!!

    तीच गोष्ट बँक एफडी ची..सर्वांना या एफडीने वेड लावलंय. एखाद्या चेटकीणीने सुंदर स्त्रीचं रुप घ्यावं आणि माणसांनी भुरळुन घरातील घरदांज, खानदानी पत्नीचा कसलाही विचार न करता तिच्या भ्रामक सौदर्यांला बळी पडावं तसं झालं तुमचं या एफडीच्या बाबतीत.. अाता हळुहळु तिचा मेकअप उतरतो अाहे तिचं खरं रुप दिसत अाहे, व्याजदर खाली येता अाहेत म्हणुन तुम्ही निदान अाता माझ्या डेट फंडाकडे बघतायत तरी.. पण इतके दिवस तिला पटवण्यासाठी , कर वाचवण्यासाठी काय काय नाटकं केलीत ते अाठवा ना जरा......फाॅर्म १५ जी/ १५ एच काय........ !! एकाच बॅंकेच्या वेगवेगळ्या शाखात एफडी करणं काय.......!! एफडी मॅच्युअर्ड झाली कि परत त्याची रिन्युअल काय...जास्त व्याज मिळवण्याच्या चक्करमध्ये कुठं पतसंस्थेत जावुन एफडी कर, तर कुठं चक्क मल्टीलेवल चेन मध्ये जावुन गुंतवणुक करुन कपाळ भिंतीवर अादळुन घेतलंत..पण शेवटी काय झालं....एवढं सगळं करण्यापेक्षा थोडं माझ्याकडे प्रेमाने बघीतलं असतं तर या सर्वांची उत्तर "डेट फंडात" सापङली असती. कर वाचला असता, पांढरा पैसा पांढराच राहिला असता अाणि तुमचा पैसा घेवुन कुणी पळुन गेल नसतं.

    तिच गोष्ट "रियल इस्टेटची"......... खुप भाव दिला हो तुम्ही त्याला. कुठलाही पारदर्शक व्यवहार नाही, सगळाच अडामधडाम व्यवहार केलात. माझ्या सुशिक्षित सल्लागारापेक्षा "रियल इस्टेटचा" अडाणी दलाल तुम्हाला जवळचा वाटला. बिनीच्या गोलंदाजाने जीव तोडून गोलंदाजी करावी, फलंदाजाला त्रिफळाचीत करावं पण एवढं करुनही अम्पायरने त्याच्यावर विनाकारण डूख धरत तो नोबाॅल देत त्याला नाॅट अाऊट द्यावा, हे तुम्हाला खरोखरच अन्यायकारक अाहे असं वाटत असेल तर थोडं थांबा.. तुमच्याकडूनही असाच माझ्यावर अन्याय झाला कि नाही!!!!

    हो...निदान इतिहास तरी हेच सांगतोय. अाज मी पूर्ण तयारीनेच तुमच्याकडे आलोय, माझ्याकडे आता काही फंडाचा मागिल २० वर्ष किंवा त्यापेक्षाही जास्त वर्षाचा इतिहास उपलब्ध अाहे.

    अगदी शानदार, पारदर्शक करमुक्त २०% च्या ही पुढे परतावा देवुनही गुंतवणुकीसाठी तुम्ही "रियल इस्टेट"चे लाड केले व मला पुर्णपणे अजुनही स्विकारलं नाही असा माझा अारोप अाहे अाणि माझ्या इक्विटी फंडाची कामगिरी पाहता तो खरा अाहे हे तुम्हाला नक्कीच पटेल. किमान यापुढे तरी तुम्ही त्यांची दखल घेवुन त्यांना प्रथम प्राधान्य देताल ही माझी अपेक्षा नक्कीच गैरवाजवी म्हणता येणार नाही.

    खाली अनुक्रमे फंडाचे नाव, त्यांचे वय व परतावा (दर साल दर शेकडा, कंम्पाऊंड म्हणजेच चक्रवाढ दराने, बरं का) दिलेला अाहे.

    Hdfc Taxsaver 20.81 29.23%

    Hdfc Equity Fund 22.26 25.51%

    Reliance Growth 21.49 25.30%

    Franklin Ind Prima 23.35 24.79%

    Franklin Ind Bluechip 23.35 24.48%

    Birla Balanced 95 22.15 23.62%

    Hdfc Prudence 23.18 22.25%

    Tata Ind Taxsaving 21.01 21.92%

    Reliance Vision 21.49 21.38%

    Hdfc Top 200 fund 20.56 21.33%

    Sbi Magnum Taxgain 24.02 20.64%

    Hdfc Capital Builder 23.18 20.55%

    अाज मी स्वत:ला सिद्ध केलंय..

    इतके स्वच्छ, इतक्या पारदर्शकपणे तुम्ही रियल इस्टेटचे रिटर्न्स पाहु शकतो का ? केवळ एक चेक देवुन गुंतवणुक करु शकतो का? दर महिन्याला गुंतवणुक करु शकतो का? दररोज त्याचे बदलते मुल्य पाहु शकतो का? जितके असतील तितके पैसे गुंतवू शकतो का? अंशत: रक्कम परत घेवू शकतो का ?विकुन 3 ते 5 दिवसात पैसे परत मिळवु शकतो का?

    याचं उत्तर जर "नाही" असं असेल, तर यानंतर अापण अापली जास्तीत जास्त गुंतवणुक माझ्या इक्विटी फंडात केली पाहिजे.

  • माझं कोकण

    आता 'माझं कोकण' पुढे कसं असेल? त्याचं काय होईल? माहित नाही.

    दरवर्षी फेरी मारताना, प्रत्येकवेळी ओळखीच्या वाटणाऱ्या खुणा एकेक करत हरवत जात आहेत हे निश्चित.
    माणसं बदलली आणि कोकण पालटत चाललंय.
    तरीदेखील आपल्या पिढीने जे 'कोकण' बघितलंय, ते पुढच्या पिढीला बघायला मिळेल का?
    'कोकण' म्हणजे आपल्या डोळ्यासमोर जे चित्र उभं राहतं,
    तेच चित्र नवीन पिढीसमोर साकारलं जाईल का हे माहिती नाही.
    पण तसं नसेल तर ते चित्र साकारण्याचा एक अल्पसा प्रयत्न.

    'कोकण' म्हणजे कौलारू घर, स्वच्छ अंगण, तुळस व तिला आधार देणारा दिवा.

    'कोकण' म्हणजे गोठा, साठवून ठेवलेलं गवत आणि गाईच्या भोवती पिंगा घालत असलेलं तिचं वासरू.

    'कोकण' म्हणजे बाहेरची पडवी, झोपाळा, त्यावर असलेली पानसुपारीची पिशवी, तिरक्या रिपी मारलेल्या खिडक्या.

    'कोकण' म्हणजे माजघर, एका कोपऱ्यात पडलेलं जातं, आजीने सारवलेली चूल, फुंकून ओलसर झालेला कारभारणीचा चेहरा.

    'कोकण' म्हणजे देव, महापुरुष, वेतोबा, रवळनाथ, सातमाई, सातेरी, गिरोबा, रामेश्वर, कुणकेश्वर, सागरेश्वर.

    'कोकण' म्हणजे कौलारू देवळे, घुमत असलेला गुरव, रोखून बघत असलेले मानाचे दगड.

    'कोकण' म्हणजे गर्द देवराई, त्यात नाहीशी होणारी देवाची वाट आणि वेशीवर दिलेला नारळ.

    'कोकण' म्हणजे घुमत असलेले ढोल, येणारं निशाण, त्याला तोरण बांधण्यासाठी घरातल्यांची घाई.

    'कोकण' म्हणजे देवचार, त्याच्या चपलांचा आवाज, मनात असलेली भीती, वाडवडिलांची पुण्याई.

    'कोकण' म्हणजे लाल माती, मोहरत असलेला आंबा, फणस आणि डोलणारी माडा-पोफळीची झाडं.

    'कोकण' म्हणजे पतेरा, बकुळीचा धुंद वास, करवंदाची घनदाट जाळी आणि कण्हेरीची फुलं.

    'कोकण' म्हणजे सुरमई, बांगडा, कुर्ल्या, कालवं, चिंबोरी आणि मोरी माश्याचं कालवण.

    'कोकण' म्हणजे चुलीवर भाजला जात असलेला बांगडा, भाकरी, आणि कांद्या-गोलम्याचा ठेचा.

    'कोकण' म्हणजे उकड्या तांदळाची पेज, उकडलेल्या आठळा आणि फणसा-केळफुलाची भाजी.

    'कोकण' म्हणजे भात, कैरी घातलेली डाळ, घावणे आणि वाटप घातलेली उसळ.

    'कोकण' म्हणजे तळलेली सांडगी, कांडलेली पिठी, सुकत असलेली आंब्याची साठ आणि मुरत असलेलं लोणचं.

    'कोकण' म्हणजे नदीला आलेला पूर, मुसळधार पाऊस आणि कोपऱ्यात पुढे सरकत असलेला नांगर.

    'कोकण' म्हणजे पेप्सी खात जाणारी पोरं, डांबरी रस्ता, पत्र्याचा पूल आणि खालून वाहणारा व्हाळ.

    'कोकण' म्हणजे लाल डब्याची एस्.टी., धुरळा आणि नातवांची वाट बघत स्टॉपवर उभे असलेले आजोबा.

    'कोकण' म्हणजे महापुरुषाची पूजा, वडा, भात, उसळ आणि लाऊडस्पीकर.

    'कोकण' म्हणजे गणपती, मंडपी, सजावट, मोदक, उसळ आणि डबलबाऱ्या.

    'कोकण' म्हणजे दिवाळी, फोडलेलं कारीट, करंज्या आणि उंच निघून जात असलेले कंदिल.

    'कोकण' म्हणजे होळी, गोडाचं जेवण, गाडलेला खांब, केलेली शिकार आणि मारलेल्या बोंबा.

    'कोकण' म्हणजे पाटीवर काढलेली सरस्वती, शाळेत नेलेल्या काकड्या, उदबत्त्या आणि पोरांचं भजन.

    'कोकण' म्हणजे गावच्या ग्रामदेवतांच्या जत्रा, पूजा, शिरा, मुखवटे, फुगे आणि खाजं.

    'कोकण' म्हणजे नांदी, तबल्यावर पडलेली थाप, धर्मराजाची एन्ट्री आणि दशावताराची समृद्ध कला.

    'कोकण' म्हणजे समुद्रावरचं, देवळातलं, पिंपळाखालचं, मळ्यातलं क्रिकेट आणि 'टुर्लामेंट'.

    'कोकण' म्हणजे समुद्र, किनारा, नाठाळ वारा, ती गाज आणि दूरवर गेलेली गलबतं.

    'कोकण' म्हणजे चकवणारे मासे, लागलेली रापण, ओढणारे तांडेल आणि बघ्यांचा हा गलका.

    'कोकण' म्हणजे सर्जेकोटची जेटी, चमचमणाऱ्या माश्यांचा लिलाव, दमून परत आलेल्या होड्या.

    'कोकण' म्हणजे संपलेली सुट्टी, परत जायची तयारी, जड झालेला चाकरमान्याचा पाय आणि सगळ्यांच्या डोळ्यात आलेलं पाणी.

    'कोकण' म्हणजे खूप काही सांगू पाहणारा, पूर्ण न उलगडणारा, कसलाच अंत नसलेला असा काशीविश्वेश्वराचा एक डाव....

  • प्रामाणिक वागायचंय? मग प्रथम निर्लज्ज व्हा..

    प्रामाणिकपणा ह्या गुणाबद्दल (की दुर्गुणाबद्दल?) मला जबरदस्त कुतूहल आहे. प्रत्येकात प्रामाणिकपणा असायलाच हवा असा माझा आग्रह असतो. पण प्रामाणिक असण्यातं व्रत हे बोलायला सोपं असलं, तरी आचरणात आणायला अत्यंत अवघड असतं. अवघड असतं, अशक्य नसतं, मात्र त्यासाठी सातत्याने प्रयत्नरत असावं लागतं.

  • मन कि बात – भ्रमर

    लेखाचं नांव भ्रमर असलं, तरी भ्रमर किंवा भुंगा याच्यावर यात फार काही लिहीलेलं नाही. मला सांगायचंय ते ‘भ्रमर’वृत्तीविषयी आणि ती पुरूषाशी संबंधीत समजली जाते. लेखाला ‘पुरूष’ असं नांव दिलं असतं, तर ते बटबटीत झालं असतं म्हणून ‘भ्रमर’ म्हटलं येवढंच..!!

  • संकेत..

    मी जी छोटी गोष्ट पुढे सांगणार आहे, त्यावर बहुतेकांचा विश्वास बसणार नाही आणि ज्यांचा बसेल, ते लोक, इतर लोकांनी त्यांना अंधश्रद्ध वैगेरे आहेत असं समजू नये यासाठी, विश्वास बसल्याचं किंवा असल्याचं कबूल करणार नाहीत.

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग अठ्ठावन्न

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 14-पुष्प दुसरे

    देवाला वहाण्यासाठी आपल्या परसबागेत अनेक फुलझाडे लावली जातात. सर्वसाधारणपणे जास्वंद, गुलाब, मोगरा, जाई जुई सायली याची लागवड आपल्या परसदारी केली जाते.

    काही जणांना आवड नसते, काहींना सवड नसते, वेळच नसतो म्हणून काहीना सगळा बगिचा फुलवता येत नाही. पण ज्यांच्या घरी एकही फुलझाड लावलेले नाही, वा कुंडीपण नाही, असे अगदी क्वचित ! तर काही निसर्गप्रेमींच्या घरी अख्ख जंगलच घरात आणलेलं असतं.

    फुलांची आवड नाही, असं माणूस शोधणं दुर्मिळच. जागाच नाही, भाड्याच्या घरात रहातो, अशा घरात दरवाज्यावर का होईना पण फुलपुडी उगवतेच.

    ज्यांचा देवावर विश्वास नाही, देवपूजा करतच नाहीत, त्यांच्याकडे सुद्धा फुले असतातच. म्हणजे फुले फक्त देवासाठीच असतात असे नाही. आपण युक्तीने त्यांचा वापर देहासाठी करून घ्यायचा असतो.
    जे जे देवासाठी ते ते देहासाठी, हे वाक्य काहींसाठी उलट सुद्धा करता येतं. "जे जे देहासाठी ते ते देवासाठी." मलाच कधीतरी ही फुले उपयोगी होतील म्हणून तरी ही फुले माझ्या घरी हवीत.

    निसर्गातील कोणतेही फुल असो, ते औषधी गुणधर्माचे असतेच. पण डाॅक्टरना ते माहितीच नसतात, (त्यांच्या सिलॅबसमधेच नाही.) पण ज्याच्या अभ्यासक्रमात आहे, अशा वैद्यांना पण त्याचे सर्व औषधी उपयोग माहिती असतातच, असे नाहीत. थोडेफार जे माहिती असतात, त्या आधारे काही औषधे बनवली जातात. जसे भाज्या, दुध, फळे, कडधान्ये इ. साठी अख्खे अध्याय ग्रंथामधे लिहिलेले आहेत, तसे वेगळे स्वतंत्र प्रकरण फुलांसाठी लिहिलेले नाही.

    आयुर्वेदात अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील अश्याच काही फुलांचे औषधी गुणधर्म वर्णन केले आहेत. जसे गुलाब, धातकी, केशर, नागकेशर, चाफा इ. म्हणजे बाकीची फुले औषध नाहीत, असे नाहीत, पण त्यांचे औषधी गुणधर्म अनुमानाने शोधावे लागतात. अनुभवातून जाणावे लागतात, किंवा फळांच्या गुणधर्मातून समजून घ्यावे लागतात. अशी अनेक फुले आपल्या अवतीभवती फुलत असतात, त्यांची नावे सुद्धा आम्हाला माहिती नाहीत, किंवा काही गुलमोहराची फुले एवढी अमाप फुलतात, कि त्यांचा कचराच होतो. काही फुले सिझनल असतात. काही फुले घोसांनी लगडतात, तर काही एकेकटीच बहरतात.तर काहींचा सडा पडतो. जणुकाही निसर्गाने जमिनीवर पांघरलेला गालिचाच.

    काहींचा वास औषधी असतो,जसे जाईजुई. तर काहींचा मध जास्ती औषधी असतो जसे जांभूळ. काहींच्या पाकळ्या औषधी असतात,जसे गुलाब. तर काहींचे पुंकेसर औषधी असतात, जसे नागकेशर. तर काहींचे देठ औषधी असतात जसे पारीजातक. काहींच्या कळ्याच औषधी असतात,जसे लवंग. तर काहींचे पूर्ण उमललेले फुलच औषधी असते, जसे कमळ. म्हणजे फुलांचे वेगवेगळे अवयव कमी अधिक प्रमाणात औषधी गुणधर्म दाखवतातच.

    काही फुले ऋतुनुसार फुलतात. काहीं केव्हाही उपलब्ध होतात. काही प्रदेशानुसार मिळतात, तर काही जमिनीवर तर काही पाण्यातच मिळतात. यानुसार त्यांचे औषधी गुणधर्म बदलतात.

    पुण्यातील बीएस्सी झालेला, एक अवली रसायनतज्ञ या फुलांच्या प्रेमात पडला आणि या अज्ञात फुलांच्या बारसे करण्यापासून, औषधी गुणधर्म शोधून काढून त्यांच्या सेफ ह्युमन ट्रायल्स घेण्यापर्यंत, सगळा खटाटोप लिपीबद्ध केला. तब्बल 180 हून अधिक फुलांच्या औषधी गुणांचा चिकित्सेच्या दृष्टीने अभ्यास करणाऱ्या या बेहत्तर अवलीयाला "अरविंद जोशी,बीएस्सी, पुणे " या नावाने आपण वाॅटसपप्रेमी ओळखतो. वय वर्षे फक्त बाहात्तर.

    त्यांच्या फुलावरील प्रेमाला, फुलांनीही साथ दिली आणि फुले त्यांच्यावर प्रसन्न झाली. फुलातील मकरंद शोधण्याचा छंद सगळ्यांना लागो आणि सर्वजण अरविंद होवोत !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    07.06.2017

  • निसर्गाची किमया

    एकदा एका जंगलात एक हरीणी बाळाला जन्मं देणार असते.पण ती ज्या ठीकाणी बसलेली असते तिथे जवळच एक वाघ तिच्यावर नजर ठेवून असतो.एका बाजूला एक शिकारी तिच्यावर बंदूक रोखून उभा असतो. आणि जवळच जंगलात वणवा पेटलेला असतो.सगळ्या बाजूने दिसणार्या या संकटांपैकी एकतरी संकट तिला गिळून टाकेल याची तिला खात्री असते.

    तो शिकारी बंदुकीतून गोळी सोडतो....वाघ जोरात झेप घेतो... आणि तितक्यात वीज चमकते...त्या शिकार्याचं लक्षं वेधलं जातं... आणि ती गोळी त्या वाघाला लागते...वीज चमकून गडगडाट होतो आणि पाऊस सुरु होतो... त्यामुळे वणवाही विझतो...

    आणि या सगळ्या गोष्टी होत असताना ती हरिणी हळूच एका लहानश्या हरणाला जन्मं देते... माणसाचं आयुष्य हे असंच असतं... त्याच्या हातात काहीच नसतं... आपण फक्तं प्यादी असतो या पटावरची... कर्ता करविता असतो तो ईश्वर...एक एक वाटत असताना कुठल्या क्षणी काय होईल काहीच सांगता येत नाही...

    मारणाराही तोच असतो आणि तारणाराही तोच...कर्माचा सिद्धांत हा कीतीही खरा असला तरी शेक्सपिअरचं एक वाक्यं खूप काही सांगून जातं...'Behind every misfortune there is a crime... But behind every crime there is a misfortune...!'

    आयुष्य हे असंच असतं... कुणाला दोष द्यावा आणि कुणाचं कौतुक करावं... दोन्ही एकाच रथाची चाकं... कुठलं खड्डयात अडकणार आणि कुठलं वर टांगून राहणार हे ठरवणारा मात्र तोच...'समुद्रात बुडून त्याचा म्रुत्यु झाला'...पण त्याच्या मनातून समुद्राकडे तो त्याक्षणी कसा ओढला गेला? कोण सांगेल? 'चाळीस घरांच्या ढिगार्याखाली गाडलं गेलेलं सहा महीन्यांच बाळ, 30 तासांनंतरही तसच छान हसत खेळत सापडतं'...

    त्याला त्या ढिगार्यातही कुशीत घेणारं कोण असतं? 'नेहमीच्याच रस्त्याने जाणारी एक बस अचानक एक दिवस दरीत कोसळते.'तिला दरीत ढकलणारं असतं कोण? वारा? की ड्रायव्हर? की ड्रायव्हरच्या डोळ्यासमोर अचानक आलेला अंधार? कोण सांगेल? एका मुलाच्या रोजच्या नेहमीच्या ट्रेनमधे बाम्बस्फोट होतो... पण तो त्यादिवशी ऑफिसला गेलेलाच नसतो... त्यामुळे तो वाचतो...

    ऑफिसला न जाण्याची इच्छा त्याला त्याच दिवशी का होते? कोण सांगेल? त्या हरिणीच्या बाळाचा जन्मं होताना अचानक वीज का चमकली? कोण सांगेल? कोण सांगेल कोण?? कुणीच नाही... हे असंच असतं... भक्तीने रुजवलेलं ... प्रेमाने सावरलेलं... आसक्तीने बुडवलेलं... कर्माच्या चक्रात अडकलेलं...
    ईश्वराने लिहीलेलं ... आपलं आयुष्यं...!

    मोर नाचताना सुद्धा रडतो... आणि.. राजहंस मरताना सुद्धा गातो....

    दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही...आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. यालाच जीवन म्हणतात.

    किती दिवसाचे आयुष्य असते? आजचे अस्तित्व उद्या नसते, मग जगावे ते हसून-खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नसते...!!
    नशिबाने दिलेल्या पदाचा गैरवापर करू नका..... कोणाचा अपमान करू नका आणि कोणाला कमीही लेखू नका.....- तुम्ही खूप शक्तिशाली असाल,
    पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे.....-कोणी कितीही महान झाला असेल,पण निसर्ग कोणाला कधीच लायकीपेक्षा महान बनण्याचा क्षण देत नाही..स्वतःवर कधीही अहंकार करू नकोस..देवाने तुमच्या-माझ्यासारख्या किती जणांना मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं...

    -स्वामी विवेकानंद

  • निसर्गाची किमया

    एकदा एका जंगलात एक हरीणी बाळाला जन्मं देणार असते.पण ती ज्या ठीकाणी बसलेली असते तिथे जवळच एक वाघ तिच्यावर नजर ठेवून असतो.एका बाजूला एक शिकारी तिच्यावर बंदूक रोखून उभा असतो. आणि जवळच जंगलात वणवा पेटलेला असतो.सगळ्या बाजूने दिसणार्या या संकटांपैकी एकतरी संकट तिला गिळून टाकेल याची तिला खात्री असते.

    तो शिकारी बंदुकीतून गोळी सोडतो....वाघ जोरात झेप घेतो... आणि तितक्यात वीज चमकते...त्या शिकार्याचं लक्षं वेधलं जातं... आणि ती गोळी त्या वाघाला लागते...वीज चमकून गडगडाट होतो आणि पाऊस सुरु होतो... त्यामुळे वणवाही विझतो...

    आणि या सगळ्या गोष्टी होत असताना ती हरिणी हळूच एका लहानश्या हरणाला जन्मं देते... माणसाचं आयुष्य हे असंच असतं... त्याच्या हातात काहीच नसतं... आपण फक्तं प्यादी असतो या पटावरची... कर्ता करविता असतो तो ईश्वर...एक एक वाटत असताना कुठल्या क्षणी काय होईल काहीच सांगता येत नाही...

    मारणाराही तोच असतो आणि तारणाराही तोच...कर्माचा सिद्धांत हा कीतीही खरा असला तरी शेक्सपिअरचं एक वाक्यं खूप काही सांगून जातं...'Behind every misfortune there is a crime... But behind every crime there is a misfortune...!'

    आयुष्य हे असंच असतं... कुणाला दोष द्यावा आणि कुणाचं कौतुक करावं... दोन्ही एकाच रथाची चाकं... कुठलं खड्डयात अडकणार आणि कुठलं वर टांगून राहणार हे ठरवणारा मात्र तोच...'समुद्रात बुडून त्याचा म्रुत्यु झाला'...पण त्याच्या मनातून समुद्राकडे तो त्याक्षणी कसा ओढला गेला? कोण सांगेल? 'चाळीस घरांच्या ढिगार्याखाली गाडलं गेलेलं सहा महीन्यांच बाळ, 30 तासांनंतरही तसच छान हसत खेळत सापडतं'...

    त्याला त्या ढिगार्यातही कुशीत घेणारं कोण असतं? 'नेहमीच्याच रस्त्याने जाणारी एक बस अचानक एक दिवस दरीत कोसळते.'तिला दरीत ढकलणारं असतं कोण? वारा? की ड्रायव्हर? की ड्रायव्हरच्या डोळ्यासमोर अचानक आलेला अंधार? कोण सांगेल? एका मुलाच्या रोजच्या नेहमीच्या ट्रेनमधे बाम्बस्फोट होतो... पण तो त्यादिवशी ऑफिसला गेलेलाच नसतो... त्यामुळे तो वाचतो...

    ऑफिसला न जाण्याची इच्छा त्याला त्याच दिवशी का होते? कोण सांगेल? त्या हरिणीच्या बाळाचा जन्मं होताना अचानक वीज का चमकली? कोण सांगेल? कोण सांगेल कोण?? कुणीच नाही... हे असंच असतं... भक्तीने रुजवलेलं ... प्रेमाने सावरलेलं... आसक्तीने बुडवलेलं... कर्माच्या चक्रात अडकलेलं...
    ईश्वराने लिहीलेलं ... आपलं आयुष्यं...!

    मोर नाचताना सुद्धा रडतो... आणि.. राजहंस मरताना सुद्धा गातो....

    दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही...आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. यालाच जीवन म्हणतात.

    किती दिवसाचे आयुष्य असते? आजचे अस्तित्व उद्या नसते, मग जगावे ते हसून-खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नसते...!!
    नशिबाने दिलेल्या पदाचा गैरवापर करू नका..... कोणाचा अपमान करू नका आणि कोणाला कमीही लेखू नका.....- तुम्ही खूप शक्तिशाली असाल,
    पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे.....-कोणी कितीही महान झाला असेल,पण निसर्ग कोणाला कधीच लायकीपेक्षा महान बनण्याचा क्षण देत नाही..स्वतःवर कधीही अहंकार करू नकोस..देवाने तुमच्या-माझ्यासारख्या किती जणांना मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं...

    -स्वामी विवेकानंद