(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आयुर्वेदातील नॅनोटेक्नोलॉजी

    आयुर्वेद हे जगातील सर्वात पुरातन असे भारतीय वैद्यक शास्त्र आहे. ह्या लहानशा लेखातून त्यातील औषधीकरणाचा मौलिक विषय नव्या स्वरुपात वाचा.

      October 13, 2014


  • अनुदाने आणि मदत!

    थोडक्यात अनुदान आणि मदतीच्या नावाखाली दलाल, एजंट, ठेकेदार, राजकीय कार्यकर्ते या सगळ्यांना पोसणारी एक प्रचंड यंत्रणा उभी करण्यात आली आहे. या यंत्रणेत प्रशासकीय अधिकार्‍यांनाही सामील करून घेतले जाते आणि त्यात भरडला जातो तो ज्याच्या नावाखाली हा सगळा व्याप उभा झालेला असतो

      May 6, 2013


  • पाण्याचा असाही उपयोग

    आपल्याला दररोजच्या जाण्यायेण्याच्या मार्गावर बऱ्याच गोष्टी दिसतात पण आपण त्याचा साकल्याने विचार, चिंतन, अभ्यास किंवा त्याकडे कुतूहलाने बघत नाही. जसे आपल्या शेजारी एखादी इमारत बांधत असतील किंवा जाणाऱ्या येणाऱ्या रत्यावर इमारतीचे बांधकाम चाललेलं असेल तर आपण नुसतं बघतो आणि पुढे जातो. मनात नाना विचार येतात “मुंबईची नुसती वाट लावली आहे”. एवढ्या इमारती बांधून नागरिकांच्या मुलभूत गरजा कश्या भागविता येणार आहेत? मुंबईत दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर रूप घारण करीत आहे. त्याला कारण आहे निसर्गाचे बदललेले ऋतूचक्र. त्यात एखादे वर्षी पाऊस नीट पडला नाही आणि तळी भरली नाही की पाणी कपात आणि बरेच काही. हे सगळे सांगण्याचा खटाटोप अश्यासाठी की…..

      December 30, 2017


  • क्रिकेटपटू टेड डेक्स्टर

    १९६२-६३ मध्ये टेड डेक्स्टर इंग्लंडचे कप्तान म्हणून इंग्लंडचा संघ घेऊन ऑस्ट्रेलियामध्ये गेले तेव्हा त्यांनी ४८.१० च्या सरासरीने त्या सिरीजमध्ये ४८१ धावा केल्या. तो त्यावेळी रेकॉर्ड होता.

      September 4, 2021


  • थिंक ग्लोबली, इट लोकली….

    आज आयुर्वेद व्यासपीठ या नामवंत संघटनेतर्फे पूर्ण महाराष्ट्रात तब्बल चारशे व्याख्यानांचा एक झंझावात उठत आहे. आयुर्वेद क्षेत्रातील ही एक मोठी क्रांतीकारी घटना असेल.

    गेली सात आठ महिने सुरू असलेली कार्यकर्त्यांची बौद्धिक तयारी, सर्व तालुक्याच्या ठिकाणी काम करीत असलेल्या वैद्यांशी संपर्क, प्रत्यक्ष पत्र व्यवहार, आणि प्रत्यक्षात अंमलबजावणीसाठी व्यासपीठच्या सर्व कार्यकर्त्यांनी जबरदस्त मेहनत घेतली.
    ती सुद्धा स्वतःच्या खिशातील पैसे आणि वेळ संपवून.

    सर्व ठिकाणी एकाच पद्धतीचे व्याख्यान घेतले जावे यासाठी प्रथमच ऑनलाईन वक्ता प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला, ज्याचा लाभ महाराष्ट्रातील तब्बल साडेतीनशे वैद्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या घेतला.

    काही वैद्य तर आज पहिल्यांदाच, स्टेजवरून जाहीर कार्यक्रमात बोलणार आहेत...

    पण मनात ठाम विश्वास निर्माण झालाय,
    निर्धार पक्का केलाय....
    समाज मन बदलवून टाकण्याचा....
    आरोग्य क्षेत्रात जे चुकीचे पायंडे पडत चालले आहेत ते बदलवण्याचा !

    कोणाच्याही वैयक्तिक हितासाठी नसलेल्या या सेवाभावी कार्यक्रमाचे नियोजन पाहून ' महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडीसीन ' ने या कार्यक्रमात आपला बहुमोल सहभाग दर्शविला. जो सर्व वैद्यांना प्रेरणा देणारा ठरलाय.

    एकाच दिवशी एकाच विषयावर एकच संदेश महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात पोचत आहे.
    ही आयुर्वेद क्षेत्रातील एक महान घटना आहे. असे मला वाटते.
    आपल्या जवळच्या ठिकाणी आपणाला या व्याख्यानाला उपस्थित रहाता आले तर अवश्य पहावे. आपल्या नातेवाईक मित्र मंडळींना सांगावे.

    एकच संदेश आज समाजात जाणार आहे तो म्हणजे इथे प्रत्येकाचे वेगळेपण जपले जाते.
    इथे म्हणजे आयुर्वेदात !
    आजच्या ग्लोबलाइज्ड युगात वावरतानादेखील प्रत्येकाचं अस्तित्व जपणं महत्वाचं आहे. प्रत्येकाची प्रकृती वेगळी, स्वभाव वेगळा, विचार वेगळा, हाताचे ठसे वेगळे, केसांची आणि डोळ्यांची रचनाही वेगळी. रोग होण्याची कारणे जरी एक असली तरी त्याची प्रकट होणारी लक्षणे मात्र वेगवेगळी निर्माण होतात. मग सर्वांना औषध एकच कसे चालणार ? वेगवेगळेच हवे. असा विचार फक्त आणि फक्त आयुर्वेदच करू शकतो.

    आज जग फार झपाट्याने जवळ येत आहे. माणसे लांब गेली तरी त्यांचे विचार जवळ येत आहेत.
    प्रदेश दूर दूर असले तरी पदार्थ मात्र कमीत कमी वेळात एका ठिकाणहून दुसरीकडे पोचताहेत. रेल्वे, विमान इ सोयीमुळे तयार अन्नपदार्थ देखील इकडून तिकडे पोचताहेत.

    यामधला बिझनेस आणि राष्ट्रीय एकात्मता या एक दोन गोष्टी जमेच्या धरल्या तर बाकी आरोग्याचे एकुण तीन तेराच वाजतात.

    हं.
    हा विचार पटायला, आपली वैचारिक पचनशक्ती वाढवण्यासाठीच आजचा हा धन्वन्तरी जयंतीनिमित्त आयोजित केलेला महामहोत्सव !

    थिंक ग्लोबली अॅक्ट लोकली या फ्रेझमधे थोडा बदल करून म्हणावेसे वाटते,
    थिंक ग्लोबली बट इट लोकली.

    वैश्विक जरूर व्हा, पण आपला आहार आपण रहातो त्या प्रदेशातीलच घ्या, जो आपल्या प्रकृतीला पोषक असेल. हा महत्वाचा संदेश आज समाजात पोचवला जात आहे.

    येणारी धन्वन्तरी जयंती हा आयुर्वेद दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित करून, आयुष विभागानेही दुधात साखरच घातली आहे.

    इट लोकली सांगणारं आयुर्वेद, आज व्यासपीठच्या माध्यमातून अॅक्ट ग्लोबली करतंय हे मात्र नक्कीच !

    -- वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग 9673938021
    23.10.2016

      October 23, 2016


  • आहारातील बदल भाग ४२ – चवदार आहार -भाग ३

    आंबट आणि तिखट या मिश्र चवीचा एक पदार्थ म्हणजे लोणचे.

    पानातील डाव्या बाजूला वाढलेल्या लोणच्याला डाव्या बाजूचा राजा म्हटलं तरी चालेल, एवढा मान या लोणच्याला भारतीय जेवणाच्या दुनियेत आहे. आणि पानामधे स्थान पण अगदी वर. राजाचेच.

    भारतीय म्हणण्याचे कारण, हा अस्सल भारतीय प्रकार आहे. कारण त्यात वापरले जाणारे मसाले, हे मूलतः भारतातीलच आहेत.
    एकेकाळी भारत हाच सर्व जगाला मसाले पुरवित होता. भारताचा इतर देशात असलेला व्यापार हा मसाल्याच्या पदार्थामुळे दरवळत होता. काही परदेशी नागरीकांना तर भारतातील मसाले देणारी झाडं ही जादूची झाडं वाटंत.

    काय कमाल आहे ना ईश्वराची, एकाच जमिनीमधे आंबट चिंचेचे झाड, तुरट सुपारीचे झाड, या हलणाऱ्या डुलणाऱ्या सुपारीच्या झाडाला, जणुकाही ते वाऱ्याने पडू नये म्हणून, घट्ट बिलगून राहिलेली तिखी मिरीची वेल. या पोफळीच्या सावलीत, मातीला अगदी कुशीत वाढणारी मंद वासाची वेलची, कळीरूपातच वापरली जाणारी लवंगाची मध्यम आकाराची झाडे, तर काहीसे मोठे होणारे आणि एकाच झाडाच्या सालीतून मिळणारी दालचिनी आणि पानातून मिळणारे तमालपत्रे, असे दोन वेगळे फ्लेवर देणारे दालचिनीचे झाड. फळ फोडून आतला सुवास देणारे जायफळ, आणि भूगर्भातच तयार होणारी काहीशी कडवट चवीची पिवळी धम्मक हळद,

    हे सर्व वेगवेगळ्या वासाचे, वेगवेगळ्या रंगाचे, चवीचे पदार्थ, एकाच पाण्यावर पोसले जातात. पण, कडु तिखट आणि तुरट ( कटु तिक्त कषाय ) या वेगवेगळ्या औषधी गुणांनी भरलेले
    (असतात. (एकही मसाला, मधुर अम्ल लवण रसाचा नाही.)
    माती, पाणी, सूर्यप्रकाश हवा एकच असते, पण विविधता किती दिसते. खरंच गाॅड इज ग्रेट !

    या लोणच्यात हिंगासारखे काही पाश्चात्य मसालेपण येऊन बसलेत. पण या विविधतेला एका बरणीत सामावून घेणारे हे भारतीय लोणचे.

    हळद, मेथी, हिंग, मीठ, मिरची, मोहोरी, तेल हा मुख्य मसाला, काही फोडींना लावला की झाले लोणचे तयार. पण ते टिकाऊ होण्यासाठी, बाहेरचा जंतुसंसर्ग टाळला जावा, यासाठी सर्व फोडी बुडतील एवढे तेल आणि त्यांना सर्व बाजूनी दाबून टाकणारा एक गोल दगड, आणि चिनी मातीच्या, फिरकीच्या झाकणाच्या बरणीत दादरा बांधून, आमच्या देवघरात वर ठेवलेली लोणच्याची बरणी, माझ्या अजूनही लक्षात आहे.

    हे लोणचे त्यातील या वेगवेगळ्या मसाल्यामुळे एवढे औषधी बनले आहे, की ते औषध म्हणूनच पानात वाढून घ्यावे, एवढेच त्याचे प्रमाण. डाव्या बाजुचा पदार्थ तिथेच रहावा, तो उजव्या बाजूला आला की साईडइफेक्ट सुरू.

    मग ते लोणचे कैरीचे असूदेत नाहीतर लिंबू मिरचीचे. नाहीतर गाजरा कारल्याचे ! औषधी गुण जवळपास तेच. फोडींनुसार बदलणारे. पण मसाला तोच.

    काही लक्षात येतंय का ?

    हा सर्व मसाला म्हणजे मधुमेहावरील औषधांचे मिश्रणच आहे. आणि फोडी जर आवळ्याच्या किंवा ओल्या हळदीच्या असतील तर ???

    जैसे घी मे शक्कर.

    इन दोनोंका आजके जमाने मे दिखनेवाला साईड इफेक्ट, याने कोलेस्टेरॉल और डायबेटीस.
    दोनों के उपर काम करनेवाली एकही दवा !
    पिकल, लोणचे, अचार माझ्या पानात हवा.!!

    पण....
    हे अचार बाजारी नको. आणि आचारी सुद्धा !
    बाजारी लोणच्यात चार दोष दिसतात.
    एक कृत्रिम रंग, दोन हानीकारक प्रिझर्वेटीव, तीन सरकीचे तेल, आणि चार, व्हिनीगर मधे बुडवून ठेवलेल्या फोडी. हे दोष टाळण्यासाठी आणि औषधी फायदे मिळवण्यासाठी उपाय एकच,
    हे लोणचे घरीच घातलेले हवे. आईच्या किंवा आज्जीच्या हातचे.

    पण घरात वेळ मोडून करणार कोण ?
    इथेच तर लोणच्याचा लोच्या आहे ना !

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    03.11.2016

      November 3, 2016


  • केळीच्या पानावर जेवण का करावे ? 

    नैवेद्य दाखवायचा असो , सवाष्ण बोलवायची असो व ब्राम्हणांना जेवायला बोलावले असो. याप्रसंगी भोजन केळीच्या पानवर वाढण्याची प्रथा आपल्याकडे आहे. या प्रथेमागे धार्मिक अधिष्ठान तर आहेच शिवाय वैद्यकीय कारणेही आहेत. जाणून घेऊया त्याविषयी ….

      August 1, 2017


  • बिनाका गीतमाला’ ची सुरुवात

    एके काळी याच अमीन सयानीनी ‘आवाजकी दुनियाके दोस्तो’ अशी स्नेहपूर्ण साद घालून रसिकांच्या मनावर आणि हृदयावर ‘बिनाका गीतमाला’ या प्रचंड लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक वर्ष राज्य गाजवलं होत.

      December 3, 2021


  • सोनोग्राफी (कलर डॉप्लर)

    आधुनिक प्रतिमाशास्त्रात जवळजवळ सर्वच प्रतिमा कृष्णधवलच असतात; कारण निदानातील सूक्ष्मता ओळखण्यास मानवाचे डोळे कृष्णधवलातच सर्वात जास्त कार्यक्षम असतात.

      November 8, 2010


  • आर्किटेक्ट आणि स्ट्रक्चरल इंजिनीअर ह्यात काय फरक आहे?

    आर्किटेक्ट आणि स्ट्रक्चरल इंजिनीअर ह्यात काय फरक आहे? घर १९५०-६० सालापर्यंत लोक काँट्रक्टरला बोलावून घरे बांधीत.आर्किटेक्टकडून घराचा नकाशा बनवून घ्यावा हे तोपर्यंत फारसे प्रचलित झाले नव्हते. तेव्हा मुंबईचे जे. जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चर सोडता महाराष्ट्रात अन्यत्र जवळ जवळ अशी महाविद्यालयेही नव्हती. आर.एस. देशपांडे यांच्या घरबांधणीवरील पुस्तकात घरांचे चार-पाच नमूने दिले होते, त्याबर हुकूम काँट्रक्टरकडून (जो मुळात गवंडीच असे) बांधून घेतले जाई.

      January 10, 2023