वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
पोपट पकडण्याची एक खास पद्धत आहे. एका आडव्या टांगलेल्या दोरीत बऱ्याच नळ्या ओवलेल्या असतात. या प्रत्येक नळीला पोपटाला आकर्षित करेल असे काहीतरी खाद्य चिकटवलेले असते. जेव्हा पोपट नळीवर बसतो, तेव्हा त्याच्या वजनाने नळी गोल फिरते व पोपट उलटा लटकतो. उलटे लटकताच पोपट स्वाभाविकपणे पायात नळी गच्च पकडतो. ही अवस्था पोपटाने कधीच अनुभवलेली नसते. नळी सोडली की आपण पडू, असेच त्याला वाटत राहते. खरे तर नळी सोडल्यानंतर पडू लागताच पंखांचा वापर करून एक गिरकी घेऊन तो सहज उडू शकणार असतो. पण हे "ज्ञान' त्याला होत नाही व तो नळी अधिकच गच्च पकडून लटकलेला राहतो व पकडणाऱ्याच्या हाती पडतो. याला भयसापळा असे म्हणता येईल.
जेव्हा आपला पोपट झाला आहे असे वाटते व तरीही आपण त्या परिस्थितीतून सुटूच शकत नाही, तेव्हा आपण कशाला भीत आहोत ते नेमके पाहावे. "हा आधार गेला तर,' अशी भीती असते तेव्हा. जर काही काळ निराधार व्हायची तयारी दाखवली, तर आपणही उडून जाऊ शकत असतो. पडायची शक्यता ज्याला जराही नको वाटते, तो उडू शकत नाही..!
माकडे पकडायचीदेखील एक खास पद्धत आहे. एक मडके मातीत पुरून ठेवतात. मडक्यात एक फळ असते माकड ते फळ काढण्यासाठी मडक्यात हात घालते. मडक्याचे तोंड हे अगदी नेमक्या आकाराचे बनविलेले असते; असे की फळ सोडून दिले तर माकडाचा हात बाहेर निघू शकेल; पण फळासकट हात बाहेर काढायला जावे, तर हाताचा आकार वाढल्याने हात अडकेल. माकडाच्याने फळ सोडवतही नाही आणि त्यामुळे हात बाहेर काढता येत नाही. निर्णय न घेता येण्याच्या या "अवस्थे'त माकड मनाने अडकते व शरीराने मडक्यापाशी. या सापळ्याला मोहसापळा असे म्हणता येईल.
आपले ज्या परिस्थितीत "माकड' झाले असेल, तीत असे काय आहे की ज्याचा मोह आपल्याच्याने सोडवत नाहीये, हे जर बघता आले तर कदाचित ती गमावणूक वाटते तेवढी मोलाची नसेलसुद्धा! थोडेसे सोडून देऊन संपूर्ण सुटता आले तर वाईट काय? निदान या मर्यादित अर्थाने "फलत्याग' नक्कीच मुक्तिदायक नाही काय?
पोपटानं एकदा तरी आधार सोडून पाहावा. माकडानं एकदा तरी फळ सोडून पाहावं, हे जमायला अवघड नसतं. पटायलाच अवघड असतं.
भयसापळा, मोहसापळा हे माणसाच्या मनातूनच तयार झालेले असतात. त्यामुळे त्यातून बाहेर पडणे अवघड नसते; पण सुटकेचा हा मार्ग सोपा असला तरी पटायला अवघड असतो.
-- डॉ. विकास आमटे..
हि दोन्हीही उदाहरणे ज्ञानेश्वर माउलींनी ज्ञानेश्वरीत दिलेली आहेत छान मेसेज आला म्हणून पाठवला
-- संकलन : अशोक साने
फेसबुक, WhatsApp यासारख्या माध्यमातून दररोज येणारे चांगले लेख तुमच्यासाठी शेअर करतो..
कालचा माझ्या घरातला प्रसंगं. वेळ रात्री ११.३० ची. माझा मुलगा शौनक या वर्षी इयत्ता १२वी/सीईटी पास झाला, त्याचा आॅनलाईन रजिस्ट्रेशम फाॅर्म भरायचा माय-लेकराचा समरप्रसंग सुरू होता. आॅनलाईन फाॅर्म भरणं आणि तो तसा भरत अस्ताना ती ती पात्र पाहाणं, हा एक युद्धापेक्षा कमी प्रसंग नसतो आणि म्हटलं तर मनोरंजनाचा सोहळाही असतो.
माणसं सर्व सारखीच असली, तरी आपण त्यांचं अगदी सहजपणे आणि नकळतपणे वर्गीकरण करत असतो. ही आपल्या मनाला लागलेली एक वाईट सवयचं असते. मोठा माणूस, छोटा माणूस, फालतू माणूस असं वर्गीकरण करायचे काही निकष आपण, म्हणजे आपण व समाजाने ठरवलेले असतात.
बर्याच जणांना स्पाॅन्डेलायटीस,व्हर्टिगो म्हणजे मानेतील दोष, पाठदुखी स्लीप डिस्क म्हणजे कंबर दूखी असे त्रास असतात. ह्यासाठी एक सोपा घरगुती उपाय सांगतो.
ह्यासाठी लागणारी सामुग्री - दोन सारख्या आकाराच्या काचेच्या रिकाम्या बाटल्या, चटई
१. प्रथम चटई वर उशी न घेता पाठ टेकून झोपावे.
२. ह्या स्थितीत मानेखाली व कंबरेखाली गॅप पडते.
३. एक बाटली मानेखालील गॅप मध्ये आडवी ठेवावी.
४. नंतर दोन्ही पाय जवळ घेऊन कंबर उचलावी. माकड हाडाजवळ दुसरी बाटली आडवी सरकवावी.
५. आता एक एक पाय सरळ करावा. दोन्ही पाय एकदम सरळ करू नयेत. हे महत्वाचे आहे.
६. पाय सरळ केले की डोके जमिनीला टेकवावे. ह्यामुळे पाठीच्या कण्याला ताण
येतो. अशा स्थितीत अर्धा मिनिट राहावे..
७. उठताना एकेक पाय जवळ घेऊन कंबर उचलून कंबरे खालील बाटली प्रथम काढावी व नंतर मानेखालची बाटली काढावी व कुशीवर वळून उठून बसावे.
हा प्रयोग करताना कधीही घाई करू नये शांतपणेच करावा. असे रोज एकदा करावे.
अरविंद जोशी B.Sc.
अहंकाराचे विश्लेषण एका विचारवंताने फार सुरेख केले आहे. अहंकार म्हणजे Evil Getting Over you नॅथेनल ब्रोनरच्या मते, अहंकार असा एक राक्षस (बकासुर) आहे की, ज्याला जेवढे खाऊ-पिऊ घालावे तितका तो अधिक भुकेला होतो. बरेचदा अहंकार व स्वाभिमान यांत अत्यंत पुसट रेषा असते. अशा या अहंकाराचे मूळ खालील गोष्टींमध्ये असते-
(१) अज्ञान
(२) स्वत:बद्दलचा फाजील आत्मविश्वास
(३) नकार पचवण्याची कला अवगत नसणे
(४) स्वत:पाशी असलेले अधिकार
(५)आध्यात्मिक विचारांची वानवा.
अहंकारामुळे फक्त नुकसान आणि नुकसानच होते. यामुळे मन:शांती बिघडते, सारासार विवेकबुद्धी नष्ट होते व इतरांशी आपले संबंध दुरावतात. मानसिक तज्ज्ञांच्या मते मनुष्य म्हटला की अहंकार आलाच. हा अहंकार हिंस्र श्वापदासारखा असतो. त्यावर नियंत्रण ठेवून त्याला आपल्या आज्ञेत ठेवणे यातच खरी प्रगल्भ माणसाची कसोटी लागते. तेव्हा आज बघू, करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले अहंकाराचे दमन.
० जेव्हा आपल्याला ठाऊक असते की, समोरच्या व्यक्तीपेक्षा आपल्याला अधिक ज्ञान आहे तेव्हा बढाया मारून स्वत:चे गुणगान करणे टाळा. यामुळे अहंकार वाढीला लागत नाही.
० एखाद्याच्या छोटय़ा-मोठय़ा चुकीमुळे/ वागणुकीमुळे आपला अहंकार दुखावला जाणार नाही, याची काळजी घ्या. यासाठी क्षमाशील वृत्ती अंगी बाणवा.
० जसा आपल्याला दुसऱ्याची चूक दाखवून देण्याचा अधिकार आहे तसा समोरच्यालाही आहे, हे विसरू नका. आपली चूक असल्यास मोठय़ा मनाने मान्य करा. आपल्या उणिवांवर बोट ठेवले गेल्यास अहंकार दुखावून घेऊ नका, उलट ‘निंदकाचे घर असावे शेजारी,’ या न्यायाने चूक सुधारा व यश संपादन करा.
० काही लोक खुशमस्करे असतात. आपली खोटी स्तुती करून आपल्या अहंकाराला खतपाणी घालतात. अशा लोकांचे खरे मनसुबे ओळखा. कारण वेळ आल्यास हीच मंडळी आपले पाय खेचतात.
० अधिकारांमुळे अहंकार वाढीस लागत असेल तर गाढव व येशूख्रिस्ताची गोष्ट आठवा. येशू गाढवावर बसून जात असतो व सर्व लोक येशूला अभिवादन करत असतात. गाढवाला वाटते की, लोक आपल्यालाच अभिवादन करत आहेत. येशू उतरून गेल्यावर त्याच गाढवाला सर्वजण हाडतूड करतात. याचप्रमाणे अधिकारपद असल्यामुळे लोक आपल्या अहंकाराला खतपाणी घालतात, पण तेच पद गेल्यावर तेच लोक आपला अपमानही करतात.
० मला आता सर्व कळते, असे वाटू लागल्यास, नवीन जे आपण कधीही ऐकलेले / पाहिलेले नाही ते शिकायचा प्रयत्न करा. त्यामुळे ज्ञानसागर किती अपार आहे व आपली ज्ञानाची घागर किती थोटी आहे, हे कळेल. आपसूकच त्यामुळे अहंकाराचे दमन होईल.
० उत्तम, देखणे व्यक्तिमत्त्व आहे, म्हणून सर्व लोकांवर आपली भुरळ पडेल हा फाजील आत्मविश्वास / अहंकार बाळगू नका. कारण विचारांची श्रीमंतीच आदरास पात्र असते. लक्षात ठेवा, फळांनी लगडलेले झाड नेहमी वाकलेले असते. तद्वत आपल्या ज्ञान, व्यक्तिमत्त्वाला नम्रतेची झालर असावी.
० मी-माझे भौतिक सुख या सर्व कल्पनांना तिलांजली द्या. दुसऱ्याचा विचार करा, यामुळे एखादी गोष्ट दुसऱ्या व्यक्तीस मिळाल्यास आपला अहंकार दुखावला जाणार नाही.
० दुसऱ्यांना शिकविण्यापेक्षा, दुसऱ्यांकडून जास्तीत जास्त शिका. दुसऱ्यांमधील चांगले गुण आत्मसात करा, त्यामुळे आपल्यालाही शेरास सव्वाशेर भेटल्याचे कळेल व आपसूकच आपला अहंकार निवळून जाईल.
० निरपेक्ष वृत्तीने दुसऱ्यांना मदत करा. एखादी गोष्ट चांगली घडून आल्यास आपण फक्त निमित्तमात्र आहोत. सगळी मेहनत ज्याचे काम झाले त्यानेच केली आहे व देवाने हे सर्व घडवून आणले आहे, असा आध्यात्मिक दृष्टिकोन बाळगा. त्यामुळे अहंकार वाढणार नाही. आठवा- शिवाजी महाराज-रामदास व बेडकीची गोष्ट. जेव्हा महाराजांना अहंकार जडला की आपण रयतेचे पोशिंदे आहोत तेव्हा रामदासांनी खडक फोडून त्यात जिवंत असणारी बेडकी व पाण्याचे खळगे दाखवले. महाराजांना कळून चुकले की, ही सर्व देवाची लीला आहे. मनुष्यमात्र निमित्तापुरता असतो.
० दुसऱ्यांबरोबर स्पर्धा करणे टाळा. कारण आपण पुढे गेलो तर अहंकार वाढतो व दुसरा पुढे गेला तर अहंकार दुखावतो. त्यापेक्षा स्वत:शीच स्पर्धा करा. चांगले काम केल्यास ते अजून कसे उत्तम करता येईल यासाठी परफेक्शनचा ध्यास घ्या.
० सर्वात शेवटी अहंकार हा अनेक प्रयत्नांतीच काबूत येतो, त्यामुळे नेहमी अंतरात्म्याशी संवाद साधा, आपले बोलणे ओठावर येण्यापूर्वीच अहंकाराचा दर्प नाही ना हे अवश्य तपासा, मग बघा- तुम्ही अजातशत्रू तर व्हालच, पण करिअरमध्येपण सर्वोच्च स्थानावर जाल.
अंगात, स्वत:ला शोभो अथवा न शोभो, जाकिट हा राजकारणाचा ‘युनिफाॅर्म’ झालाय हल्ली. नाक्यावर नेहेमी उभा चकाट्या पिटत उभा असलेला एखादा रिकामटेकडा, अचानक जाकिटधारी झालेला दिसला, की मी समजतो, की हा आता ‘मार्गा’ला लागला आणि त्या परिसरातल्यांची ‘वाट’ लागली.
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 22-धूपं समर्पयामी-भाग तीन
दृष्ट काढणे ज्यांना अगदीच गावंढळ आणि कालबाह्य वाटत असेल त्यांच्यासाठी आणखी एक शास्त्रोक्त पर्याय आपल्याकडे आहे, तो म्हणजे अग्निहोत्र. वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेल्या या यज्ञ चिकित्सेने फक्त भारतातच नव्हे तर परदेशात सुद्धा प्रचंड मोठे मानाचे स्थान मिळवलेले आहे. काही देशातील कायदे देखील या यज्ञासाठी पालटण्यात आलेले आहेत. एक भारतीय म्हणून अभिमान वाटावा अशी ही अग्निहोत्र चिकित्सा.
अग्निहोत्र हा अगदी साधा सोपा विधी आहे. घरी, शेतावर, कार्यालयात, गाडीमध्ये अगदी 10 मिनिटात करता येतो. फक्त अग्निहोत्रासाठी सुर्योदय व सूर्यास्त ह्या दोन्ही वेळा पाळायच्या असतात. त्या काटेकोर पाळल्यास त्याचे फायदे प्रचंड आहेत. यावर पुणे विद्यापीठामधे प्रबंध पण सादर झालेला आहे. आणि गंमत म्हणजे हा प्रबंध सादर केलाय ऑस्ट्रीया येथील एका अभ्यासकाने !
अग्निहोत्रासाठी खालील गोष्टी लागतात.१. तांब्याचे अथवा मातीचे पिरॅमिडच्या आकाराचे हवन पात्र.
२. गाईच्या दुधापासून बनवलेले शुद्ध तूप २-३ चमचे.
३. गाईच्या शेणाच्या गोवऱ्या ४-५ तुकडे.
४. हातसडीचे अख्खे तांदूळ दाणे म्हणजे अक्षता. ४-५ ग्रॅम. सूर्योदयाचेवेळी ह्या तांब्याच्या पात्रात गाईच्या गोवऱ्यांवर थोडे तूप लावून, त्या पेटवून त्यामध्ये गाईच्या तुपात भिजवलेल्या अक्षता खालील मंत्र म्हणत हवन म्हणून अर्पावे लागतात.
सूर्याय स्वाहाः | सूर्याय इदम् न मम ||
प्रजापतये स्वाहाः | प्रजापतये इदम् न मम || सूर्यास्तावेळी अग्निहोत्र करावयाचे असल्यास खालील मंत्र म्हणावे लागतात. अग्नये स्वाहाः | अग्नये इदम् न मम ||
प्रजापतये स्वाहाः | प्रजापतये इदम् न मम ||
इदम् न मम म्हणजे हे माझे नाही याची मला पूर्ण खात्री आहे. हे तुझे तुलाच अर्पण. हा भाव मनात ठेवणे म्हणजे इदम् न मम ।
हे सर्व अर्पण केल्यावर पाच मिनिटे शांतपणे अग्नीसमोर बसणे. येत असलेल्या ज्वाळा आणि धूर याकडे शांत बसून ध्यान केल्यास खूप शांतीचा अनुभव येतो.
हा निर्माण होणारा धूर अनेक रोगावरील औषध आहे. एन्फ्लुएन्झा, काॅलरा, टीबी, इ. रोगांचे जंतु या धुराने मरतात, असे (परदेशातील सुद्धा ) प्रयोगशाळेत सिद्ध झालेले आहे. अग्निहोत्राच्या राखेचे पाणी देखील अम्लपित्त, ग्रहणी, उष्णतेचे आजार, पचन विकृती आमि अनेक मानसिक आजारांवर अतिशय प्रभावी परिणाम दाखवतात.
काळानुसार आपण बदलले पाहिजे, या तत्वानुसार मोठ्या यज्ञांपेक्षा हे छोटे अग्निहोत्र घरच्या घरी दररोज केले तर अधिक फायदा होतो.
शेतीसाठी देखील हा धूर किटकनाशक म्हणून सिद्ध झालेला आहे. अनेक देशामधे आज अग्निहोत्र शेती सुरू आहे.
अग्निहोत्रासाठी ज्या गोवऱ्या लागतात, त्या भारतीय गो वंशाच्याच लागतात. पाश्चात्य गोवंशामध्ये औषधी गुण नाहीत हे पण यापूर्वी अनेक वेळा सिद्ध झालेले आहे.
म्हणजे घर निर्जंतुक होण्यासाठी धूर तयार व्हायला हवा, तो औषधी हवा, त्याठी अग्निहोत्र करायला हवे. अग्निहोत्रासाठी गोवऱ्या हव्यात. त्यासाठी शेण हवे, त्यासाठी गाय हवी, ती भारतीय वंशाचीच हवी. म्हणजे तिची जोपासना व्हायला हवी. ही एक साखळी आहे. आरोग्य मिळवण्यासाठी ही साखळी पूर्ण होणे आवश्यक आहे. म्हणजेच पूर्ण आरोग्य मिळवण्यासाठी "भारतीयत्व" हा एक महत्त्वाचा दुवा आहे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
15.06.2017
पावसाळा सुरु होत आहे या दिवसांत पचनशक्ती मंदावते पावसाळी हवेमुळे खोकला, कफ व घशाचे त्रास होतात. आणि स्वाईन फ्यु डेंग्यू, चिकन गुनिया असे आजार होतात. त्यासाठी पुढील उपचार करावे.
एका स्टीलच्या पातेल्यात दोन ग्लास पाणी घेऊन त्यात दोन झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या, ६-८ निशिगंधा ची/ गुलछडी चीफुले, ६-७ तुळशी ची पाने, व दोन गलांडीची फुले रात्री भिजत ठेवावी व सकाळी पाणी गाळून घ्यावे व घरातील प्रत्येकाने अर्धी अर्धी वाटी एकावेळी (लहान मुलांना पाव वाटी एकावेळी) सकाळ संध्याकाळ घ्यावे.यामुळे पावसाळ्यात होणारा व्हायरल इन्फेक्शनचा ताप येण्याची शक्यता कमी असते.असा माझा अनुभव आहे.
अरविंद जोशी.B.Sc, पुणे
टीप-वरील सर्व फुले फुलवाल्याकडे मिळतात.
आपल्या आजूबाजूला खूप घटना घडत असतात, चांगल्या, वाईट. आपला थेट संबंध नसला तरी घटना आपल्याला काही शिकवत असतात, फक्त गरज असते ती आपण “जागे” असायची. आपण खरेच “जागे” अथवा “जागृत” असतो का ?
किंवा बघून तरी “जागे” होतो का ? कोणी तरी “जागे” करावे लागते, संत देखील आपल्याला “जागे” करायचा प्रयत्न करीत असतात.
सदगुरुंचा अनुग्रह होणे हि खऱ्या अर्थाने आलेली “जाग” होय. ते साधना सांगतात पण शिष्याने साधना मात्र स्वतःच करायची असते. प्रत्येक जीवाच्या कल्याणाची तळमळ सदगुरुना असते, पण अनुग्रह सगळ्यांना होत नाही. असे का ?
सदगुरू कोणावर अनुग्रह करतात, तर ज्याला इच्छा असते त्यावर. ज्याला आपण “आजारी” आहोत आणि आपल्याला औषधाची गरज आहे हे कळते तो स्वतःहून “डॉक्टरकडे” जातो, “डॉक्टर” स्वतःहून त्याच्या कडे येतो का ?
किंवा “डॉक्टर” जरी “आजारी” माणसाकडे आला आणि त्याची औषध घ्यायची तयारी नसेल तर? म्हणूनच जो जागा होतो, शरणागत होतो, ज्याची तळमळ वाढते त्यालाच सदगुरुंचा “अनुग्रह” लाभतो.
अनुग्रह हा व्हायला लागतो दिला जात नाही. जेव्हा शिष्य अत्यंत नम्रपणे, कृतज्ञतापूर्वक सदगुरूंकडून लाभणारे हे दान ग्रहण करतो तेव्हाच खऱ्या अर्थाने “कृपा”, “अनुग्रह” हे पाप्त होऊ शकते. आणि त्याचा “आनंद” जीवनात दिसून येतो. अनुग्रह हा शब्दातून, स्पर्शातून, कृपादृष्टीने होऊ शकतो.
हे दान एवढे मोठे आहे त्याचे वर्णन करणे अशक्य आहे. त्याची उतराई त्यांची कितीही जन्म सेवा केली तरीही होऊ शकत नाही. कृपेचा “आनंद” काय असतो हे अनुभवल्या शिवाय कळत नाही. ज्याने हा “आनंद” मिळवला आहे तो भाग्यवान, त्याचे जिवन सफल झाले.
सदगुरू हे दिसायला जरी एक देहरुपी असले तरी ते देहातीत असतात, ”गुरु” हे तत्व आहे कोणी व्यक्ती नाही. आपल्याला देहा पलीकडे जाऊन त्या तत्वापर्यंत पोहोचायचे आहे आणि तिथे जाण्यासाठीचा मार्ग, किंवा त्याला आपल्याशी जोडणारा पूल म्हणजे “सदगुरू” आहेत.
अर्थात पूल असला तरी चालायचे आपल्याला आहे. महाभारत युद्धात सुद्धा “कृष्ण” हा सारथी होता, त्याला एकट्याला कौरवांचा नाश करणे शक्य होते पण त्याने अर्जुनाला सांगितले लढायचे तूच आहेस, मी तुझे सारथ्य करतो, म्हणजेच दिशा दाखवितो.
अर्थात सदगुरुनी सांगितलेली साधना त्यांच्या चरणाशी राहून करीत राहणे हे केले तर ते सारथ्य करायला तयार असतातच, नव्हे ते सारथ्य करतातच आणि इष्ट स्थळापर्यंत नेतात.
।। श्री गुरुदेव दत्त ।।
आपल्या आजूबाजूला खूप घटना घडत असतात, चांगल्या, वाईट. आपला थेट संबंध नसला तरी घटना आपल्याला काही शिकवत असतात, फक्त गरज असते ती आपण “जागे” असायची. आपण खरेच “जागे” अथवा “जागृत” असतो का ?
किंवा बघून तरी “जागे” होतो का ? कोणी तरी “जागे” करावे लागते, संत देखील आपल्याला “जागे” करायचा प्रयत्न करीत असतात.
सदगुरुंचा अनुग्रह होणे हि खऱ्या अर्थाने आलेली “जाग” होय. ते साधना सांगतात पण शिष्याने साधना मात्र स्वतःच करायची असते. प्रत्येक जीवाच्या कल्याणाची तळमळ सदगुरुना असते, पण अनुग्रह सगळ्यांना होत नाही. असे का ?
सदगुरू कोणावर अनुग्रह करतात, तर ज्याला इच्छा असते त्यावर. ज्याला आपण “आजारी” आहोत आणि आपल्याला औषधाची गरज आहे हे कळते तो स्वतःहून “डॉक्टरकडे” जातो, “डॉक्टर” स्वतःहून त्याच्या कडे येतो का ?
किंवा “डॉक्टर” जरी “आजारी” माणसाकडे आला आणि त्याची औषध घ्यायची तयारी नसेल तर? म्हणूनच जो जागा होतो, शरणागत होतो, ज्याची तळमळ वाढते त्यालाच सदगुरुंचा “अनुग्रह” लाभतो.
अनुग्रह हा व्हायला लागतो दिला जात नाही. जेव्हा शिष्य अत्यंत नम्रपणे, कृतज्ञतापूर्वक सदगुरूंकडून लाभणारे हे दान ग्रहण करतो तेव्हाच खऱ्या अर्थाने “कृपा”, “अनुग्रह” हे पाप्त होऊ शकते. आणि त्याचा “आनंद” जीवनात दिसून येतो. अनुग्रह हा शब्दातून, स्पर्शातून, कृपादृष्टीने होऊ शकतो.
हे दान एवढे मोठे आहे त्याचे वर्णन करणे अशक्य आहे. त्याची उतराई त्यांची कितीही जन्म सेवा केली तरीही होऊ शकत नाही. कृपेचा “आनंद” काय असतो हे अनुभवल्या शिवाय कळत नाही. ज्याने हा “आनंद” मिळवला आहे तो भाग्यवान, त्याचे जिवन सफल झाले.
सदगुरू हे दिसायला जरी एक देहरुपी असले तरी ते देहातीत असतात, ”गुरु” हे तत्व आहे कोणी व्यक्ती नाही. आपल्याला देहा पलीकडे जाऊन त्या तत्वापर्यंत पोहोचायचे आहे आणि तिथे जाण्यासाठीचा मार्ग, किंवा त्याला आपल्याशी जोडणारा पूल म्हणजे “सदगुरू” आहेत.
अर्थात पूल असला तरी चालायचे आपल्याला आहे. महाभारत युद्धात सुद्धा “कृष्ण” हा सारथी होता, त्याला एकट्याला कौरवांचा नाश करणे शक्य होते पण त्याने अर्जुनाला सांगितले लढायचे तूच आहेस, मी तुझे सारथ्य करतो, म्हणजेच दिशा दाखवितो.
अर्थात सदगुरुनी सांगितलेली साधना त्यांच्या चरणाशी राहून करीत राहणे हे केले तर ते सारथ्य करायला तयार असतातच, नव्हे ते सारथ्य करतातच आणि इष्ट स्थळापर्यंत नेतात.
।। श्री गुरुदेव दत्त ।।
Copyright © 2025 | Marathisrushti