(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • मी धर्माचं रक्षण करीन, धर्माचं पालन करीन

    "मै दीनदार बुत-शिकन..!"
    "मै दीनदार कुफ़्र-शिकन..!"

    ("मी मूर्ती फोडीन, मी काफरांची कत्तल करीन आणि अश्या प्रकारे मी धर्माचं रक्षण करीन, धर्माचं पालन करीन!!")

    असं अत्यंत अभिमानानी जो स्वतःबद्दल बोलत होता.., त्याप्रमाणे त्यानी हजारो मूर्ती फोडल्या, अनेक काफरांची कत्तल केली, अनेक हिंदू स्त्रियांवर बलात्कार केले.. आणि त्याच्या परीने त्याची ही प्रतिज्ञा जितकी शक्य झाली तितकी पूर्णही केली..!

    असा अफजलखान पठाण हा केवळ सीमा विस्तारायला आला होता, त्याला धर्माचा प्रचारक म्हणून तुम्ही त्याची दुष्कीर्ती केलीत.. आणि शिवाजी महाराजांना घरात नेऊन बसवलंत !

    हे संतापजनक वक्तव्य ऐकलं..

    हिंदूंच्या विजयी इतिहासाचं नुसतं स्मरण आणि यथाशक्य अनुकरण करून हा देश विश्वविजयी होऊ शकतो इतका तो इतिहास प्रेरणादायी आहे..

    आणि म्हणूनच देशद्रोही, इतिहासाचं विकृतीकरण करू पाहतायत..
    त्याच देशधर्मबुडव्या पाप्यांच्या यादीत हा मुंब्र्याच्या गळ्यातला ताईत बसू पाहतोय..

    या इतिहासाचं विकृतीकरण व्हायच्या आत सगळ्या जगाला ओरडून सांगूया..!

    अफजलखान हा इस्लाम चा प्रचारकच होता..
    त्यासाठी त्यानी अतिशय क्रूर पद्धतीनी हिंदू स्त्री पुरुषांवर अनंत अत्याचार केले, अनेक देवळं फोडलीत, शेकडो गाईंचं रक्त सांडलं..

    आणि गोब्राह्मणप्रतिपालक, हिंदूधर्मसंरक्षक, शिवरायांनी त्याचा कोथळा बाहेर काढला आणि हा क्रूरकर्मा ठार केला..

    त्या शिवरायांना आम्ही नुसतं घरात नाही आमच्या देवघरात ठेवतो आणि त्याही पलीकडे त्यांची प्रतिष्ठापना आमच्या हृदयात करतो...
    आणि अशी प्रतिज्ञा करतो की ही शिवज्योत सदैव तेवत ठेवू आणि एका ज्योतीनी अश्या अनेक ज्योती पेटवत राहू.

    -- गीता उपासनी

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग सत्तर

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 27-नैवेद्यम् समर्पयामी-भाग एक

    आपल्यासाठी देवपूजेतील एक महत्वाचा उपचार म्हणजे नैवेद्य. कारण आपणाला निश्चितपणे माहिती असते, की जो नैवेद्योपचार आपण देवासाठी म्हणून करत आहोत, तो देवासाठी नसून, आपल्या देहासाठीच आहे. तो नैवेद्य नंतर आपणालाच खायला मिळणार आहे. मग तो गणपतीचा मोदक असो किंवा म्हसोबासाठीचा बोकड. नाव देवाचे खातो आपणच.
    निवृत्तीनाथ इंदोरीकर एका किर्तनात म्हणतात,
    "किती स्वार्थी आहोत आपण. 'बोकड देवासाठी' असं म्हणत देवाला काय देतात तर खूर. जो शिजत नाही. तो शिजला असता तर तोही दिला नसता, विठ्ठल विठ्ठल"

    देवपूजा दिवसातून किती वेळा केली जाते ? दोन वेळा. सकाळी आणि सायंकाळी. दिवसभर देवपूजा असते का ? नाही. दोनवेळा देवपूजा तसे दोन वेळा नैवेद्य. इथे आरोग्य दडलेले आहे. दिवसभर चरत राहायचे नसते. जे काही खायचे ते दोन वेळा पोटभर हा महत्त्वाचा सिद्धांत इथे सांगितलेला आहे.

    भारतीय परंपरांना आरोग्याच्या दृष्टीने किती महत्त्व आहे, ते इथे लक्षात येते. कारण अन्य कोणत्याही धर्मात अशी षोडशोपचार पूजा नाही, असे नैवेद्य नाहीत. अन्य चार पाच सण सोडले तर फार मोठे सण नाहीत. त्यामागे फार मोठे लाॅजिक नाही. जे सण म्हणून साजरे केले जातात, ते फक्त प्रेषितांच्या जयंत्या अथवा मयंत्या. किंवा त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग लक्षात ठेवण्यासाठी, त्यांचे कार्यकर्तृत्व स्मरणात रहावे यासाठी केलेली सोय असते. पुष्पगुच्छ किंवा बुके आणून ठेवला, मेणबत्ती पेटवली की, झालं. उपचार म्हणून नाही.

    आज आमच्या हिंदू धर्मामधे देखील हे नुसते कर्मकांड उरले आहे. एखाद्या महामानवाच्या नावे जयंती किंवा पुण्यतिथीच्या निमित्ताने जुलुस, जलसा, डीजे, आणि पार्टी ! मग ते महामानव गांधी असोत वा आमचे आंबेडकर किंवा आमचेच सम्राट अशोक असोत, या महामानवांनी सांगितलेली तत्वे सोयीस्कर विसरवली जातात, आणि फक्त जातीचे राजकारण पसरवले जाते.

    आणखीन दुर्दैव हेच आहे की प्रत्येकाने आपले झेंडे देखील वेगळे केलेत, रंग देखील वाटून घेतलेत, महापुरूष पण वाटून घेतलेत.

    मोहनदास करमचंद गांधीचा आत्मा, ड्रायडेच्या निमित्ताने कुठेतरी म्हणत असेल "हेची फळ काय मम तपाला" ! मी आयुष्यभर काय सांगितले आणि माझे अनुयायी माझ्या नावाने काय करत आहेत ? माझे गुण जाऊदेत, अहिंसा जाऊदेत, सत्य जाऊदेत, माझ्याच नावाची टोपी घालून, मद्यपान करत, मांसाचाच चकणा भरताहेत. हे केवळ गांधीचे दुःख नाही तर सर्वच महामानवांचे दुःख आहे. असो.

    षोडशोपचार पूजेचे हे वैशिष्ट्य फक्त हिंदू धर्मामध्येच. धर्मसूत्रे नीट अभ्यासली तर त्यामागे असलेले शास्त्र समजून घेतले तर ती अंधश्रद्धा, बुरसटलेले कालबाह्य विचार नसून, सुसंस्कृत जीवन जगण्याची एक आदर्श पद्धत आहे, असे लक्षात येते.

    राजकारणातील काही स्वार्थी माणसांनी किंवा काही जातीयवादी माणसांनी राजकारण म्हणून या चालीरीतींवर टीका करायला सुरवात केली, आणि आमच्या मनात विकल्प यायला सुरवात झाली. एकेकाळी शिक्षण व्यवस्थेमधे असणारे सर्व हिंदू धर्मग्रंथ, मेकाॅलेच्या कुटनीतीला बळी पडून आमच्या शिक्षणातूनच गायब करण्यात आले. मूळ पायाच डळमळीत केला तर इमारत केव्हाही पडू शकते, या सिद्धांतानुसार, हिंदुंचे धर्मग्रंथ देवघरात फूल वाहून, पोथीरूपात बंद झाले. ते गेल्या पन्नास साठ वर्षात कधी उघडून, वाचून, आचरणात आणले गेले नाहीत, परिणामी धर्मग्रंथात काय सांगितले गेले होते, का सांगितले होते, त्याचे भावार्थ काय होते ?त्यात नेमके काय समजून घ्यायचे असते, ही दृष्टी नाहीशी झाल्यामुळे आम्हाला आमचेच धर्मग्रंथ म्हणजे जणुकाही पुराणातली वांगीच वाटू लागली. भीतीपोटी केवळ उपचार शिल्लक राहिले आणि उपचारामागील विज्ञान विसरले गेले. आणि फक्त कर्मकांड म्हणून आमचेच बुद्धिमान पंडीत आपल्याच धर्मग्रंथाची हेटाळणी करू लागले.

    नैवेद्याचे रूपांतर पार्टी पर्यंत येऊन पोचले आहे, ही शोकांतिका आहे.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    20.06.2017

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकोणसत्तर

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 26-दीपं दर्शयामी-भाग तीन

    जसे इंधन तशी काजळी.
    जर दिवा तेलाचा असेल तर काजळीचे प्रमाण वेगळे. मेणाचा असेल तर वेगळे. राॅकेलचा असेल तर काजळी जास्ती आणि पेट्रोल जाळले तर काजळी एकदम कमी. स्पिरीटला काजळी धरणारच नाही, तर विमानातील इंधनाची ज्योतच दिसणार नाही. म्हणजे जसे इंधन तशी काजळी. भगवत गीतेमधे या अर्थाचा एक श्लोक आला आहे...
    भक्ष्ययते यद् ध्वान्तम कज्जलम च प्रसूयते।
    यद् दीपोज्वलेत कज्जली भवेत् ।
    जायते तादृशी प्रजा।

    झिरोचा बल्ब, एल ई डी बल्ब, ट्यूबलाईट, फ्लुरोसंट बल्ब, हॅलोजन, हाय मास्क बल्ब या प्रत्येकापासुन मिळणारा प्रकाश वेगवेगळा.

    आपल्याला ज्या कारणासाठी प्रकाश हवा आहे, त्याप्रमाणे योजना हवी. फक्त मलाच वाचायचे आहे, किंवा लेखन करायचे असेल तर टेबल लॅम्प पुरतो ना ! तिथे हॅलोजन नको ! आता तर पेनच्या रिफिलच्या टोकापुरताच उजेड पाडणारी पेन पण निघाली आहेत.

    या प्रत्येक यंत्रणेला लागणारी विद्युत उर्जा देखील वेगवेगळी असते. काही ठिकाणी एसी करंट, काही ठिकाणी डीसी करंट काही ठिकाणी स्टॅबीलायझर, काही ठिकाणी अॅडेप्टर, तर काही ठिकाणी फक्त मायक्रोचीप पुरते. तसेच आहे. दिव्यातील इंधन जसे असेल तसे परिणाम आपणास मिळतात.

    जो दिवा देवासाठी तसाच तो देहासाठी समजून घ्यावा. जशी काजळी दिव्यामधे तशी देहामध्ये देखील काजळी बनते. आपल्या अन्नाचा दर्जा जसा असेल, तशी काजळी बनण्याचे प्रमाण कमी जास्त होईल.

    खाल्लेल्या अन्नातून चांगले आणि वाईट असे दोन भाग तयार होतात. चांगल्या उत्तम प्रतीचा आहार जर आपण सेवन केला तर तयार होणारे प्राॅडक्ट उत्तम प्रतीचेच असणार. मध्यम प्रतीचा आहार घेतला तर मध्यम प्रतीचे प्राॅडक्ट तयार होणार. आणि हलक्या प्रतीचे अन्न घेतले तर हलक्या दर्जाचे प्राॅडक्ट तयार होणार.

    आड्यात जे असेल तेच पोहोऱ्यात येणार ना !

    बिर्याणी करायची असेल तर तांदुळ बासमतीचाच हवा. साधा भात करायचा असेल तर तांदुळ मसूरी किंवा कोलम हवा. आणि पेज करायची असेल तर उकडा तांदुळ उत्तम असतो. आपल्याला कोणते प्राॅडक्ट बनवायचे आहे ते ठरवले तर तांदुळ कोणता वापरायचा ते निर्णय बदलतात.

    तसेच शरीर पुष्ट करायचे असेल तर आहाराची योजना वेगवेगळी हवी. केवळ मांसधातु वाढवायचा असेल तर आहार वेगळा, रक्त वाढवायचे असेल तर आहार वेगळा आणि सगळेच धातु वाढवायचे असतील तर आहार वेगळा असतो.

    या अन्नाच्या दर्ज्याला आयुर्वेदीय ग्रंथकार आणि गीताकार, सत्व रज तम असे नामाभिधान करतात.
    आहार सात्विक असेल तर सर्व इंद्रिये, अवयव, धातु, अगदी मन सुद्धा सात्विक बनते. आहार राजसिक असेल, तर शरीरावर होणारा परिणाम राजसिक असतो, आणि आहार तामसिक असेल तर विचार आणि कृती तामसिक होते. हेच सांगण्यासाठी, पटवून देण्यासाठी, (पटवून घेणाऱ्याला) दिव्याचे उदाहरण ग्रंथकर्ते देतात.

    "शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी" असे तुकाराम महाराजांनी देखील म्हटलेले आहे.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    19.06.2017

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग अडुसष्ट

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे- क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 25-दीपं दर्शयामी-भाग दोन

    शुभं करोति कल्याणम
    आरोग्यम सुख संपदा ।
    शत्रुबुद्धी विनाशाय
    दीपज्योती नमोस्तुते ।।

    ही दिव्याची प्रार्थना तर आपली सर्वांचीच पाठ आहे. पाठ आहे, म्हणजे अर्थ माहिती असेलच असे नाही. कधी विचारही केला नसेल एवढा ! या पाठात एक बदल होत चाललाय, तो लक्षात आणून देतो, धनसंपदा नाही, सुखसंपदा ! आरोग्य तर मिळतेच पण सुख देखील मिळते. आपण भारतीय कधी धनाच्या मागे नव्हतो, पण सुखाच्या मागे कायम होतो. सुख मिळविण्यासाठी धन हवेच असे नाही, पण सुख हेच धन असे मानणारी आपली भारतीय संस्कृती !

    मी दिव्याला नमस्कार करतो कारण, हा शुभ आहे, पवित्र आहे, शुद्ध करणारा आहे, कल्याणकारक आहे. आरोग्यकारक आहे, सुखकारक आहे. आपल्याच मनातील, शत्रुप्रमाणे असणारे वाईट विचार नष्ट करणारा आहे.

    दिव्या दिव्या दीपत्कार
    कानी कुंडले मोतीहार
    दिव्याला पाहून नमस्कार
    दिवा लावला देवापाशी
    उजेड पडला तुळशीपाशी
    माझा नमस्कार सर्व देवांपाशी

    देहलीदीपक न्याय नावाचा एक न्याय सांगितलेला आहे. उंबरठ्यावर लावलेला एक दिवा आतील देवापर्यंत आणि बाहेरील तुळशीपर्यंत प्रकाश देत राहतो. आतून बाहेरून प्रकाश देणारा हा अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे. असं संत सोहिरोबानाथ देखील म्हणतात.

    घरातली पीडा बाहेर जावो,
    बाहेरची लक्ष्मी घरात येवो,
    घरच्या धन्याला उदंड आयुष्य लाभो.
    ही सर्वांचे शुभ करणारी कल्याणकारी प्रार्थना दिव्याला उद्देशून म्हटली जाते.

    दीपज्योती परब्रह्म
    दीपज्योति जनार्दनः
    दीपो हरतु मे पापं
    संध्यादीपं नमोस्तुते ।

    मनात निर्माण होणाऱ्या वाईट विचारांचे पाप नष्ट होण्यासाठी रोज सायंकाळी घरात दिवा लावावा. सायंकाल हा संधीकाल आहे. दिवस आणि रात्री मधला. पाप आणि पुण्ण्या मधला ! चांगलं आणि वाईट यामधला ! हा संधीकाल असतो सत्व आणि तमामधला ! सकारात्मकता आणि नकारात्मकता यामधला ! वनस्पतींचे श्वसन बदलण्याचा ! हे "चेंज ओव्हर" होत असताना सर्वच स्तरावर संतुलन राखणं महत्त्वाचे असते. आणि हेच काम दिवा करत असतो.

    भो दीप ब्रह्मरूपस्त्वं
    ज्योतिषांप्रभुरव्ययः
    आरोग्यम देही पुत्रांश्च
    सर्वान् कामांश्च देही मे

    प्रत्यक्षात सगुण रूपातील देव म्हणजे अग्नी. निसर्गात सूर्य नारायणाच्या रूपात तर शरीरात जाठराग्नीच्या रूपात असतो. जसं निसर्गाचं रक्षण करतो, तसंच हा अग्नी आरोग्याचे रक्षण करणारा आहे. केवळ रक्षण करणाराच नव्हे तर वंश वाढवणारा आहे. सर्व मनोकामना पूर्ण करणारा आहे. फक्त विश्वास ठेवून, श्रद्धेने करणाऱ्याला फळ मिळते.

    केवढा अर्थ भरलाय या प्रार्थनेमध्ये !

    कोणत्याही कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलन करून केली जाते. का ? कशासाठी ? काय एवढं मोठ्ठं होणार तेलाचा दिवा लावून ?

    स्वतः जळत असताना, स्वतःच्या जळण्याचे दुःख न करता, मेणबत्तीसारखे जळताना, सारखं अश्रु गाळत न रडता, आपल्या जळण्यामुळे सारं जग प्रकाशमान होतंय या आनंदात, फक्त प्रकाश मागे ठेवायचा असतो.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    18.06.2017

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग सदुसष्ट

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 24-दीपं दर्शयामी-भाग एक

    जो स्वतःच दीपक आहे, त्यालाच दिवा दाखवायचा ? जो दुसऱ्यांना योग्य मार्गाने नेतो, त्यालाच दिवा दाखवायचा ? जो मार्गदर्शक आहे, त्यालाच मार्ग सांगण्या सारखे आहे. मग देवाला दिवा का दाखवायचा ?

    सातच्या आत घरात नावाचा मराठी चित्रपट येऊन गेला, त्यात एक सुंदर संवाद आहे. " आमच्याकडे कापसाची शेतं लावली आहेत, आणि घरात तेल जास्ती झालंय म्हणून नाही दिवा लावत आपण. तर जे अनाकलनीय आहे, ते तुझ्या दिव्यत्वाच्या प्रकाशानं उजळून जाऊ दे ! अज्ञानाचा जो अंधःकार आमच्या मनात आहे, तो तुझ्या प्रकाशाने निघून जाऊ दे, अशी प्रार्थना असते दिव्याकडे ! "

    आपल्याकडे अजून तरी देवघर नावाचा, कोनाडा का होईना, शिल्लक असलेल्या जागेत थोडी जागा राखीव ठेवलेली असते. त्यात रात्री मधेच उठल्यानंतर आपल्याला दिसावे, म्हणून देवाच्या डोक्यावर एक दिवा टांगून ठेवलेला असतो. इलेक्ट्रीक झिरोचा किंवा आता एलईडीचा ! न जाणो रात्री देव आलाच तर ? म्हणून म्हणायचं दिवा लावला देवापाशी......

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी, असा विषय आपण बघत असल्याने या दिव्याचा देहरक्षणासाठी काय उपयोग आहे ? बरं हे इलेक्ट्रीकचे दिवे आत्ताचे ! त्यापूर्वी काय होते ? तेलाचे दिवे आणि तूपाचे निरांजन. काय एवढा फरक आहे इलेक्ट्रीकच्या दिव्यात आणि तेल तूपाच्या दिव्यात ?

    आता हेच पहा ना, रस्त्यावर रात्रभर जळणारे जे हायमास्क दिवे आहेत, त्यावर किती छोटे छोटे किटक पिंगा घालत असतात ? पिंगाच तो. नुसते गोल गोल फिरत राहायचे. काम काही नाही. फायदा शून्य.

    या किटकांना प्रकाशाचे प्रचंड आकर्षण असते. जिथे प्रकाश दिसेल तिथे अक्षरशः झडप घालतात. झोकून देतात. हा निसर्गाचा नियम आहे. पतंगाला ओढ प्रकाशाची. हे छोटे छोटे किटक घरात आले तर नुसता उच्छाद असतो. डोक्यात, कानात, डोळ्यात, नाकात, टीव्ही च्या स्क्रीनवर, ट्यूबलाईटवर, बेडवर, पिण्याच्या पाण्यात, आमटी भाजीत, जेवणाच्या ताटातसुद्धा ! काही केल्या जात नाहीत. आला असेल अनुभव प्रत्येकाला कधी ना कधीतरी ! ह. हेच तर मला सांगायचंय. हे किटक या दिव्यांवर मस्त खेळत असतात. आणि आपल्याला छान खेळवत असतात.

    या किटकांचा त्रास घालवण्यासाठी एक जालीम उपाय आहे. देवापुढे दिवा लावणे. हा दिवा इलेक्ट्रीकचा नको. तेलाचा किंवा तुपाचा हवा. काय होईल ? या दिव्याच्या पेटत्या ज्योतीकडे हे क्षुद्र किटक आकर्षित होतात. आणि या ज्योतीत जळून जातात. चक्क मरतात. हा निसर्ग आहे. किटक मरणे ही चांगली गोष्ट झाली ना. नाहीतर त्यांचा बल्बवर चाललेला पिंगा बघत रहाण्या पलीकडे आपण काही करू शकत नाही.

    जे आपण करू शकत नाही, ते छोटी पेटती पणती करते. उपद्रवी किटकांना मारते. कायमचे !

    जसे हे काही उपद्रवी किटक डोळ्यांना दिसतात, तसे काही सूक्ष्म जीवही असतात, जे डोळ्यांनाही दिसत नाहीत, ते सूक्ष्म जीव देखील या पेणत्या पणतीच्या ज्योतीवर जणुकाही आत्महत्याच करतात. काम तमाम ! वातावरण शुद्ध ! निर्जंतुक !

    दिवा देवासाठी, आरोग्य आपल्यासाठी !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    17.06.2017

  • मायग्रेन साठी औषध

    जून, जुलै महिन्यात ब्रह्मकमळला फुले येतात, ती रात्री उमलतात उजाडल्यावर कोमेजून जातात. ही फुले बारीक तुकडे करून साखरेत घालून बरणीत ठेवावीत, अधून मधून ते कोरड्या चमच्याने ढवळावा. दोन महिन्यात त्याचा गुलकंद तयार होतो. हा ब्रह्मकमळाचा गुलकंद डोकेदुखीवर उत्तम औषध आहे. पाव चमचा गुलकंद वाटीभर पाण्यात विरघळवून ते पाणी प्यावे. जरुरीप्रमाणे १-२ डोस घ्यावे. मायग्रेन चा त्रास कमी होतो. हा गुलकंद वर्षभर टिकतो व वापरता येतो.

    मी ह्या फुलाचा उपयोग करून बरेच जणांचे मायग्ेनचे त्रास कमी केले आहेत. ज्यांचेकडे हे फुल येते त्यानी जरूर गुलकंद करून ठेवावा.

    अरविंद जोशी
    ९४२१९४८८९४

  • जातीला लाथ? शक्य आहे, गरज आहे थोड्याश्या हिंमतीची

    आपण भारतीय, आपली इच्छा असो वा नसो, कुठल्या ना कुठल्या जातीशी संबंधीत असतोच. नव्हे ती आपली नकोशी असलेली आयडेंटीटीच आहे. आपण बहुतेक सर्वचजण जातीव्यवस्थेला नांवं ठेवतो, टिका करतो, प्रसंगी रस्त्यावरही उतरतो, पण वेळ येताच गपचूप जातीच्या आधारावर मिळणारे फायदे घेण्यातही सर्वात पुढे असतो.

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग सदुसष्ट

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 23-धूपं समर्पयामी-अंतिम भाग चार

    कालच्या टीपेवरून एका गटात एक खोचक सूचना सुचवली गेली, "आपण म्हणताय त्याप्रमाणे अग्निहोत्र जर एवढे प्रभावी असेल तर सर्व हाॅस्पीटल्स, सूतिकागृहे, दवाखाने इ. मधे दररोज अग्निहोत्र केले तर डाॅक्टर, औषधे यांची काही गरजच उरणार नाही. अज्ञान दूर सारा, विज्ञान स्विकारा." उगाच नको ते सांगत राहू नका, या अर्थी त्यांना सांगायचे होते. विज्ञानाच्या नावाखाली आज काही पुरूषाधम वेडेकर मंडळींना भारतीय शास्त्रांचा, त्यातील सूत्रांचा खरा अर्थ कधी कळलाच नाही, ज्यांना अज्ञान विज्ञान शब्द सुद्धा, शुद्ध स्वरूपात लिहिता येत नाही, अश्या "ज्ञानी" व्यक्ती केवळ विरोधाला विरोध म्हणून बोलत रहातात. पण असे बोलून आपण आपल्याच अज्ञानी जाती बांधवांचे नुकसान करून घेत आहोत, आणि आपले हसे करून घेत आहोत, हे पण यांच्या लक्षात येत नाही. असो. नुसता धूर काढत असतात झालं. तसा नुसताच धूर उदबत्यांमधून पण येतो.

    उदबत्ती हे धूपन चिकित्सेतील शेवटचे टोक. ही पूर्ण चिकित्सा नाही आणि फायदे देखील पूर्ण नाहीत. तरी पण काही अंशी धूर तयार होतो, म्हणून विचार करायचा.

    अगरबत्ती करायला बांबू वापरला जातो. भारतात बांबू कधीही जाळला जात नाही. तो शाकारणीसाठी, बांधकामासाठी किंवा तिरडी बांधण्यासाठी वापरला जातो. तिरडीवरचा बांबू आणि बांबूच्या कामट्या देखील सरणात जाणार नाही, याची काळजी घेतली जाते. बांबू जाळल्याने जो वायु तयार होतो, तो स्वास्थ्याला हानीकारकही आहे, असेही वाचनात आले होते. अश्या बांबूचा वापर अगरबत्ती करण्यासाठी केला जाणे चुकीचे आहे.

    भारतीय परंपरेमधे केवळ धूप द्रव्य, हवन सामग्री एकत्र करून अग्नीवर अर्पण करायची पद्धत. या धूपद्रव्याला, बांबूच्या काड्यांचा आधार देणे भारतीय नाही, या बांबूच्या काड्यांना दुसरा समर्थ पर्याय निवडावा, असे मला वाटते. अन्य तज्ञांनी, आयुर्वेद वैद्यांनी वा अन्य वनस्पती शास्त्रज्ञांनी यावर आणखी प्रकाश टाकावा.

    अगरबत्ती मधे जी सुगंधी द्रव्ये वापरली जातात, ती पूर्णपणे नैसर्गिक असावीत. पण आज ज्या उदबत्या मिळतात, त्यात कृत्रिम वास येणारी रसायने वापरली जातात, जे योग्य नाही. परिणामी त्यापासून तयार होणारी विभूती ही देखील औषधी ठरत नाही. उदबत्ती अथवा अगरबत्ती मधे मुख्यतः उद अथवा अगर हे दोन पदार्थ वापरलेले असतात. याऐवजी जर गाईचे शेण गोमूत्र आणि गाईचे तूप, धूप, गुग्गुळ आणि नैसर्गिक सुगंध असलेली तेल द्रव्ये वापरली गेली तर त्याचे औषधी गुणधर्म मिळतील, नाहीतर फायद्यापेक्षा तोटेच जास्ती होतील.

    आता तर डाॅक्टर सुद्धा धुराची अॅलर्जी असं सुद्धा सांगायला लागलेत, देवळात जाऊ नका, धुराकडे नेऊ नका, त्यातील काही धूर औषधी आहेत, हे विसरून कसे चालेल ? नको ते धूर सोडायला सुरवात झाल्यावर हवे ते औषधी धूर सुद्धा बदनाम होऊ लागले आहेत.

    जी गोष्ट अगरबत्तीची तीच कछुआ जलाओ मच्छर भगाओ ची ! मग कंपनी कोणती का असेना, त्यात वापरलेल्या रसायनांनी डासांपेक्षा, माणसांचाच जीव गुदमरून जातो. लहान मुलांना तर या डासांच्या काॅईल्स खूपच हानीकारक आहेत. जी गोष्ट काॅईल्सची तीच वाफ निर्माण करणाऱ्या डब्यांची, किंवा कागदाला चिकटवलेल्या विषारी द्रव्यांच्या ठिपक्यांची. एका झटक्यात, फटक्यात प्रतिकारशक्तीच गायब होऊन जाते.

    सिगरेट ओढून स्वतःच्या छातीचा खोका करायचाच, शिवाय जो ओढत नाही, त्यालाही या विषारी धुराचा प्रसाद द्यायचा, डास मारण्यासाठी राॅकेल अर्धवट जाळून केला जाणारा विषारी धूर, गाड्यांमधे चुकीच्या प्रतीचे इंधन वापरून होणारा विषारी धूर, केमिकलचे कारंजे उडवणाऱ्या एमआयडीसीतील चिमण्यांमधील विषारी धूर, यामुळे होणारे प्रदूषण, याकडे कोणाचे लक्षच नाहीये.

    विषारी धुरापासून होणारे हे "स्लो पाॅयझनिंग" आहे, हे कोणाच्या लक्षात येत नाहीये का ? धूपन चिकित्सा बदनाम करणाऱ्या आणि नुसता विषारी धूर ओकणाऱ्या या मंडळींपासून सावधान.

    भारतीय पद्धतीप्रमाणे सर्व रुग्णालयामध्ये जर, सूर्योदय सूर्यास्त या वेळा पाळून अग्निहोत्र सुरू केले तर, रुग्णांची संख्या, आणि वाढते साथीचे रोग निश्चितच कमी होतील.......
    म्हणून तर ही "रिस्क" कोणी घेत नाही ना ! एवढी मोठी सोन्याची कोंबडी देणारी मेडीकल इंडस्ट्री कोणाला नको आहे ?

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    16.06.2017

  • श्री गुरुदेव दत्त

    गिरनार पर्वतावर साक्षात श्री दत्तगुरूंनी १२००० वर्षे तपश्चर्या केली व आजही ते त्या स्थानी आहेत असे माझ्यासह अनेक भक्त मानतात….

  • श्री गुरुदेव दत्त

    गिरनार पर्वतावर साक्षात श्री दत्तगुरूंनी १२००० वर्षे तपश्चर्या केली व आजही ते त्या स्थानी आहेत असे माझ्यासह अनेक भक्त मानतात….