वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
गेल्या काही वर्षांमध्ये विविध डेज साजरा करण्याचा ट्रेंड चांगलाच रुजू झाला आहे. त्यातीलच एक दिवस म्हणजे ‘फादर्स डे’. आपल्या आयुष्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या वडिलांप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.
ज्याला फुडग्रेड प्लॅस्टीक म्हणतात त्याच्या टेस्ट्स कुठल्या निकशावर केल्या जातात?
50 वर्षे असे प्लॅस्टिक वापरल्यास पुढच्या पिढ्यांवर कांय परिणाम होतील याची टेस्ट कशी करणार?Aging Effect Test ही जनरलाइज संख्याशास्त्रावर प्रयोग शाळेत केली जाते.
एकच आजार असलेल्या २०० रोग्यांना एकाच औषधाची एकच मात्रा चालु शकत नाही. प्रत्येकाच्या रंघ्रा रंघ्राला particular वागण्याची व रिझल्ट देण्याची सवय (खोड) असते. नाडी पाहुन, शरिर लक्षणे, मानसिकता, शाररिक क्षमता इ. अनेक बाबिंचा विचार करुन औषधाचे नियोजन वेगवेगळे होत असते.
आपल्या ग्रूपवर येणार्या प्रत्येक माहितीमधे सार्वत्रिक सत्य असते व व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने त्या साठी प्रत्येकाने निष्णात वैद्य/डाॅ. सल्ला घेण्याचे अवाहन करण्यात येते.
तसे प्लॅस्टिक टेस्टिंग बाबत कसे बरे करता येईल?
शरीर विज्ञान हे या त्रिखंडातील सर्वात complicated mecanisum आहे. प्रत्येकाने स्वतःवर निट लक्ष ठेऊनच शुद्ध आचरण केले पाहिजे.
एक साधा प्रयोग केला.....
पाण्याची बाटली विकत घेतली, पाणी संपवले, बाटली दोन दिवस तशीच बुच घट्ट लाऊन ठेवली.
दोन दिवसानंतर नाकापाशी बाटली नेऊन हळुच झाकन ऊघडले....
मस्त पैकी गॅसचा घाण वास आला....
त्यात पाणी असताना कांय होत असेल??
अल्ला जाने.... खुदा पहेचाने...
शांतीनाथ जैन, पुणे.
सर्वसामान्य भारतीयांना असते तसे अमेरिकेचे आकर्षण मलाही होते. पण आजवरचा सारा प्रवास विमानाने झालेला होता. आंतरराष्ट्रीय प्रवास करणारी विमाने सर्वसाधारणपणे जमिनीपासून तेहतीस ते छत्तीस हजार फूट उंचीवरून जात असतात. त्यामुळे ‘टेकऑफ’ किंवा ‘लँडिंग’ करताना काही मिनिटे खालचा, आजुबाजूचा निसर्ग आणि परिसर काय तो आपल्याला दिसतो. डोमेस्टिक ओअर लाईनने अमेरिकेतील दोन शहरांमध्ये प्रवास केला तर हे विमान जमिनीपासून बारा ते सोळा हजार फूट उंचीवरून जाते.
आपण जेंव्हा लहान असतो तेंव्हा खूप खेळ खेळतो पण आजच्या सोशिअल मीडियाच्या जमान्यामध्ये हल्लीची लहान मुले आपल्याला बाहेर मैदानात कमी खेळताना दिसून येतात. आऊट डोअर खेळांमुळे आरोग्य चांगलं राहतं, फिटनेस वाढतो. भविष्यातील आजारपणं टाळता येतात, आपण उत्साही राहतो. कार्यक्षमता वाढते.. स्टॅमिना, ताकद वाढते असे भरपूर फायदे आहेत. खेळामुळे आपली इम्युनिटी सिस्टिम वाढते तसेच खेळामुळे उत्तम व्यायाम घडतो आणि नव्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठीची आपली क्षमताही खूपच वाढते.
नामस्मरणासाठी कोणतेही मूल्य लागत नाही. याउलट नामस्मरणामुळे सहजपणे आपल्याकडून एक हवन (होम) घडते. शरीराला ऊर्जा मिळवून देणारे आणि स्फूर्ती मिळवून देणारे, हे अन्न साक्षात परब्रम्ह आहे. अन्नग्रहण करणे म्हणजे नुसते पोट भरणे नव्हे तर तो एक यज्ञ कर्म आहे हे जाणून घ्यावे”.


‘केसरी’ चे माजी संपादक अरविंद व्यंकटेश गोखले यांनी अनेक देशांचा दौरा केला आहे आणि यापुढेही जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा असा प्रवास करत राहतील. तथापि त्यांनी पाकिस्तानला जाऊन आपल्यातल्या लेखकाच्या धर्माची जपणूक केली. त्यांनी पाकिस्तानात जाऊन भारताचा शोध घेतला. पन्नास वर्षांपूर्वी या देशाचं अविभाज्य अंग असणाऱ्या; परंतु आता परक्या बनलेल्या प्रदेशाचा त्यांनी मागोवा घेतला आहे. भारतीय उपखंडातल्या या दोन्ही देशांचा पिंड एकच असल्याने त्यांच्यात काही मूलभूत परिवर्तन व्हायचा सवालच निर्माण होत नाही.
एका दु:खी बापाचे काय सांगू गाऱ्हाणे.....! काळाने उलटा डाव टाकला होता हसतं खेळतं बाळ अंथरुणाला खिळलं होतं. एक दिवशी काळ उगवला अन बाबूचा बबन्या देवाघरी गेला. डेंग्यूने एक बळी घेतला होता. बाबु हतबल झाला. तीळ तीळ तुटला. बाबु होता कणखर तरीही वाहत होती डोळ्यातून आसवांची खळखळ...! एखादे फुल उमलण्याच्या आधीच नष्ट झाले. त्या मात्या- पित्यावर झालेला आघात अत्यंत दुर्दैवी. किती जपलं होतं त्या फुलाला. त्या दु:खी माईचे अश्रू सांगत होते. पण विधात्याने जे भाळी लिहिले त्याला सामोरे जाणे भाग आहेच. पण हे एकाच घरात घडले नाही. अनेकांच्या घरी या डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया सारख्या घातक रोगाची लागण झाली. गेले अनेक. लागण झालेल्यांची संख्या मोजता न येण्यासारखी होती. विशेषत: नागरिक दहशतीखाली वावरत आहेत. याची नोंद कुणी घ्यावी अथवा न घ्यावी परंतु आपलेच चुकत असेल तर.....! महापालिका आरोग्यसेविकांचा सल्ला ऐकत नाही. त्यांना हवं असलेले सहकार्य करीत नाहीत, अशी एक कुजबूज आहे. आपण आपल्या कुटुंबियांसाठी काळजी घ्यायला हवीच.
डॉक्टर हा ईश्वरी अंश मनाला जातो. डॉक्टर हा देव तर दवाखाना हे एक मंदिर. कारण रुग्णाला बरं करण्यासाठी जीवाचे रान करीत असतो. म्हणून ईश्वरानंतर डॉक्टरांना देवच. यात शंका घेण्यासारखे काहीच नाही. खरोखर डॉक्टर हे आई वडील गुरुजनानंतर चौथे पूज्यनीय स्थान म्हणावे लागेल. डेंग्यू,मलेरियाची लागण झाल्यापासून विभागातील महापालिका दवाखान्यातील डॉक्टर शिंदे, डॉक्टर जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. त्यांचा गौरव करणे स्वाभाविक आहे. गरिबांनी नव्हे तर श्रीमंतांनी देखील धाव घेतली या दवाखान्यात आणि उपचार घेतले. योग्य सल्ला आणि आवश्यक तपासण्या करून त्यांनी उपचार केल्यामुळे रुग्णांना दिलासा मिळाला. डेंग्यू, मलेरिया आणि कावीळ या दहशतवादी रोगांवर प्रतिबंध करणारे माणुसकीचे डॉक्टर आपल्या विभागात कार्यरत असल्याने मनस्वी आनंद होत आहे.
विभागात कितीतरी डॉक्टर होऊन गेले.आजही आहेत. रस्त्याने जाताना मंदिर दिसले तरी अदबीने नमस्कार करावासा वाटतो, त्या प्रमाणे त्या डॉक्टरांना पाहताच आपोआप हात जोडले जातात. आपणां कुणाला *डॉक्टर पांडुरंग कुलकर्णी* आठवत असतील.नावाप्रमाणे विठोबाच, या विठोबाच्या मंदिरात सदानकदा रांग लागलेली असे. काय राजा माणूस....! गरीबांचा डॉक्टर... पैसे नसले तरी उपचार केले त्यांनी. आपल्या श्रमजीवी लोकांचा डॉक्टर. डॉक्टर कुलकर्णीसारखे अनेक देव विभागाला लाभले. ते ही रुग्णांचा स्थिती पाहून उपचार करीत म्हणजे एखाद्याकडे पैसे नसले तरी इलाज करीत होते. तेव्हा परिस्थिती तशी होती. त्या वेळेस डॉक्टर रुग्णांच्या सुख दु:खाशी समरस होत होते. आजही समाजात अनेक देव आहेत जे रुग्णसेवा म्हणजेच आपला धर्म मानतात. भगवंत त्यांना शक्ती देवो. त्यांच्यामुळे आपण निश्चित आहोत आणि बरेच देव असे आहेत की,देव बनण्यात झालेला खर्च लवकरात लवकर कसा भक्ताकडून काढू शकतो ह्यातच आपला धर्म आहे असे मानतात... त्यांना भगवंत सद्बुद्धी देवो.
पण आता हेच डॉक्टर आपली मर्यादा ओलांडू लागल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. खरं बोलले की, खऱ्या आईला राग येतो. हे अनुभवलेले आहे. त्यामुळे या पूज्यनीय देवांवर कडक भाषेत लिहिण्याऐवजी सौम्य भाषेत लिहावं, असं मन सांगत होते. काय करीत आहेत हे गल्लीबोळातले देव ...? एक डॉक्टर आपल्या दवाखान्यात विनापरवाना औषधं विक्री करीत आहे. उपचार अधिक औषध या दोन्ही गोष्टी देऊन लुबाडत आहे. आता या डॉक्टरला सौम्य भाषेत सांगायचं की, आपला बडगा दाखवायचा. अनेक डॉक्टर अनैतिक स्वरूपाचे व्यवहार करीत आहेत. रुग्ण दवाखान्यात जाऊ शकत नाहीत. वृध्द असतात. चालू शकत नाहीत किंवा अन्य कारणाने डॉक्टरला घरी बोलाविण्यात येते तेव्हा एक डॉक्टर विभागातल्या विभागात घरी भेट द्यायचे ५०० रुपये आकारत आहेत. हे बरोबर आहे का ...? काही डॉक्टर केवळ रजेचे दाखले देण्यासाठी बसलेले आहेत. दिवसापाठी रुपये २० आकारीत आहेत. रोजंदारीवर काम करणाऱ्या दोनशे अडीचशे पगार वाल्यांनी काय करायचे. काही महिन्यापूर्वी एका डॉक्टरने मयत दाखला देण्यासाठी ५०० रुपये घेतले. एका रुग्णाला डॉक्टरने जागचे हलायचे नाही. एकाच जागी पडून राहायचे, आराम करायचा, सल्ला दिला. पेशंटला थोडासा त्रास होऊ लागला. तेव्हा एक दोन मिनिटावर असलेल्या डॉक्टरला सांगितले त्याने बेधडक सांगितले. मी एम डी आहे. माझी फी परवडणारी नाही. घर एक मिनिटावर असो वा दहा मिनिटावर....! फी ठरलेली आहे. ती देत असाल तर येतो. वैद्यकीय व्यवसायाकडे डॉक्टरांची दृष्टी बदलत्या काळानुसार बदलत आहे. आताचे डॉक्टर रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा फी आकारत आहेत. पैसे नसले तर उपचार करतात, उधारी ठेवतात. पण फीचा तगादा यांचा भारी आहे. एका फेरीत पेशंट बरा होईल असे त्यांच्याकडून घडत नाही. दोन तीन फेऱ्या मारायला लावल्यानंतर पेशंटला आराम मिळतो. तो पर्यंत खिसा खाली झालेला असतो. कोणी तरी म्हणेल या पेशंटला जवळच्या सरकारी किंवा महापालिकेच्या रुग्णालयात जाता येत नाही का ...? काहींचे हातावर पोट असते.दिवसभर राबावे लागते. आजारी असल्याचे सांगता येत नाही. दुकानात कामावर असलेल्या नोकरदारांचे उदाहरण घ्या. कामावर नाही गेलात तर ते तुम्हाला घरचा रस्ता दाखवितात. काही तरी कमवून आणले तरच त्यांची कच्ची बच्ची जेवतात. त्यांच्यासाठीच.....! या गल्लीबोळात मंदिर उभारून बसलेल्या देवांनो समजुतीने घ्या. जेव्हा जेव्हा साथीच्या रोगांनी नागरिक त्रस्त असतात. तेव्हा तरी त्यांना सांभाळून घ्या.
अशोक भेके
श्रीक्षेत्र माहूरगड नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात असून ते डोंगराळ भागात वसले आहे. समुद्रसपाटीपासून अडीच हजार फूट उंचीवर माहूरगड असून दक्षिणेस सह्याद्रीच्या रांगा पश्चिमेस सहस्त्र कुंड आणि उत्तर व वायव्य दिशेला पैनगंगा नदी सर्पाकृती वाहताना दिसते. या गडावर श्रीविष्णूंनी उन्मत्त राक्षस लवणासुराला मारल्यामुळे श्री ब्रह्मदेवाने आनंदाप्रीत्यर्थ आपल्या कमंडलूतून आणलेल्या पाण्याने श्रीविष्णूचे पाय धुतले तेव्हा त्यांचे चरणतीर्थ जे पृथ्वीवर वाहू लागले तीच पैनगंगा नदी आहे, अशी आख्यायिका सांगितली जाते.
३ ऑगस्ट २००३ ला सहज म्हणून सादर केलेला एक कार्यक्रम , संदीपच्या कविता आणि गाणी आणि मी आणि संदीपने केलेली गाणी , असा एक प्रयोग करून तर बघूया इतक्या सहज सुचलेली ही कल्पना . एक प्रयोग झाला. हाउसफुल्ल !! उत्तम दाद मिळाली . आम्हालाही मजा आली . बास्स्स ... आनंदाने आपापल्या घरी गेलो ... !!
लगेच त्याचं BROUCHURE छापून सगळ्या जगभरातल्या मराठी माणसांना सांगूया कि असा असा एक कार्यक्रम सुरु झाला आहे , असं काहीही मनातच आलं नाही . आपली गाणी , कविता लोकांना आवडल्या आणि आपल्यालाही मजा आली एवढाच काय तो निष्कर्ष . त्यात तेव्हा कॉलेजकुमार असलेला आदित्य आठल्ये तबल्यावर , नितीन चंद्रचूड ह्यांचा साऊंड आणि मी आणि संदीप , असे एकूण चार जण , एवढी मोठी टीम!!:)
जवळजवळ महिनाभराने संदीपशी फोनवर बोलणं झालं तेव्हा, अजून एकदा करूया का रे ? मजा आली होती त्या दिवशी , बघूया आले तर आले लोक, नाहीतर आपण काँट्रीब्युशन काढून करू एक प्रयोग" असं बोलणं झालं, पुन्हा हाउसफुल्ल !!
मग तिसरा ... मग चौथा ...तुम्ही दाद देत राहिलात आणि आम्ही गात राहिलो .
मग पुण्याबाहेर पहिला, कोल्हापूर मग सांगली ... मुंबईचा एक संगीतकार मला जळक्या ( ज्याला मुंबईत पुणेरी म्हणतात ) टोन मध्ये म्हणाला होता , हा कार्यक्रम पुण्यात वर्ल्ड फेमस आहे ना ? मी हसलो होतो ...
१७ देशात कार्यक्रम झाले अगदी ,अमेरिकेत ४० हुन अधिक शहरात हाऊसफुल .... भारतात अनेक शहरात ... महाराष्ट्रात अगदी छोट्या गावांपासून ते शुक्रवार, शनिवार रविवार. ठाणे, दादर, पार्ले असे हाउसफुल्ल कार्यक्रम ...कोकण ,विदर्भ , मराठवाडा , नाशिक, सांगली, कोल्हापूर, बेळगाव, गोवा, बंगलोर, बडोदा, दिल्ली, इंदोर,भोपाळ ... सगळीकडे तेच प्रेम,तोच उत्साह
शंभर शंभर वेळा आयुष्यवर बोलू काही बघणारे अनेक रसिक आहेत .आम्ही शब्द विसरलो तर गाणं पूर्ण करतील असे अनेक मित्र जोडले गेले. संपूर्ण थिएटर आमच्याबरोबर गातांना ऐकण्याचा योग वर्षानुवर्षे या कार्यक्रमाच्या पत्रिकेत आहे .
१०० वा ... मग झी मराठीवर प्रक्षेपित झालेला ५०० वा ... मग ... १००० ... ११११... आणि आता १४०० च्या जवळ आलेली प्रयोगांची संख्या ...
मधल्या काळात अत्यंत गुणी गिटार वादक, रितेश ओहोळ या कुटुंबात सहभागी झाला आणि आता कार्यक्रमाचा अविभाज्य भाग झाला. अजूनही तबल्याला आदित्य आठल्ये आणि साऊंड नितीन चंद्रचूड ह्यांचाच आहे , कॉलेजकुमार आदित्य आता `बाबा ` झाला आहे
शुभंकरला कडेवर घेऊन कार्यक्रमाला गेलो होतो तो दिवस आठवतो, आणि आता शुभंकर अनेक कार्यक्रमात गायला. त्याच्या गाण्याच्या फर्माईशी मला येतात , एकटी एकटी घाबरलीस ना, करून करून काळजी माझी गायलाच हवं असं रसिक म्हणतात . एक मोठा प्रवास ! १८ वर्ष !!
सातत्याने नवीन गाणी, कविता ... अगदी ... दिवस असे कि, हे भलते अवघड असते, अताशा असे हे , नामंजूर ... सांग सख्या रे .. पाऊस असा रुणझुणता, मोर्चा नेला नाही, मेघ नसता वीज नसता, तुझे नि माझे नाते काय ? ... इथपासून दिवा लागू दे रे देवा आणि संदीपच्या अनेक नवनवीन कविता ,अगदी नुकत्याच प्रकाशित झालेल्या ` मी आणि माझा आवाज ` ह्या पुस्तकातील कविता आणि आम्ही नुकतंच केलेलं , रुक जा जालीम आखरी बार पर्यन्त ... अग्गोबाई पासून दूर देशी गेला बाबा पर्यन्त आणि दमलेल्या बाबा पासून ऐसे काही व्हावे मन शांत निजावे ... प्रत्येक रचनेला तुम्ही आशीर्वाद दिला.
खूप रसिक, संयोजक, वाहन चालक, ध्वनिसंयोजक , सगळ्यांचे हात मनापासून ह्यात सहभागी झाले म्हणून हा प्रवास इतका सहज सुंदर झाला .
अजूनही ह्या कार्यक्रमाचं BROUCHURE नाहीये . कोणी AGENCY नाही. कार्यक्रम तुम्ही रसिकांनी मोठा केला ... तो तुमचा होता आणि तुमचाच राहील .
- सलील कुलकर्णी.
संकलन : संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
त्याच्याबरोबरच भारतीय चित्रसृष्टीतले प्रणयाचे पर्व अस्ताला गेले. अल्लड, खोडकर, बालीश ,धीरगंभीर , उत्कट,मनस्वी,अस्सल हे सारे प्रणयाचे, रोमँटिझमचे रंग हा जादूगार जाताना बरोबर घेऊन गेला. सतत भव्योदात्त असे काहीतरी पाहणारे निळ्या डोळ्यांचे मायाजाल आवरते घेऊन हा अवलिया आपला खेळ संपवून गेलाय. फार कमी नजरांना असे वरदान असते आणि पडलेली स्वप्ने खरी करण्याचे सामर्थ्य असते.
Copyright © 2025 | Marathisrushti