वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
अमोल पालेकर या सिनेमात larger than life असलेल्या भूमिकेत कधीच नव्हता. कुठल्याही गर्दीत दिसणारा तो एक सामान्य माणूस होता. उगाच व्हिलनच्या खिशात चावी ठेवून “चाबी अब मै तेरे जेब से निकाल कर हि ये ताला खोलुंगा पीटर” म्हणत हिरोगिरी करणाऱ्याच्या भानगडीत तो कधी पडला नाही.
आयुष्यात जर मित्रच भेटले नसते तर कधीच विश्वास बसला नसता की, अनोळखी माणसं सुद्धा रक्ताच्या नात्यापेक्षा खूप जवळची असतात…
तुळशीला प्रदक्षिणा घालणे हा प्रकार तर आता हद्दपारच झाल्यासारखा आहे. जिथे आम्हाला राहायला जागा इंच इंच लढवून मिळवली आहे, तिथे तुळशीला कुठे जागा ? शक्यच नाही. जमलंच तर गॅलरीतला एखादा कोपरा मिळेल.
फार थोड्या लोकांना घरात शांततेचा अनुभव मिळतो. रात्रीच्या वेळी कुत्री भुंकत असतील किंवा शेजाऱ्यांचा म्युझिक प्लेयर, टीव्ही जोरदार आवाजात भोवतालच्या जगाचा विसर पडून वाजत असेल तर झोपेची वाट लागायला वेळ लागत नाही.
अनेक संगीत-संबद्ध क्षेत्रात सहज विहार करणारा आणखी एक बंगाली संगीतकार म्हणून अभिमानाने उदाहरण देण्यासारख्या कलांकारात हेमंतकुमार यांचा नक्कीच समावेश करावा लागेल. इथे आपण गायक आणि संगीतकार, या दोन्ही पातळ्यांवर वावरताना दाखवलेली सर्जनशीलता आणि प्रयोगशीलता, यांचे विश्लेषण करणार आहोत.
पाण्याच्या प्रत्येक थेंबात जीवन सामावलेलं आहे असं म्हटलं तर ते खोटं ठरू नये. पाणी हेच जीवन होय! आणि तरीसुद्धा याच पाण्याला आपण आपल्या रोजच्या जीवनात गृहितच धरतो, नाही का? स्वच्छ आणि शुद्ध पाणी आपल्याला जर सहजासहजी उपलब्ध होत असेल ना, तर खरोखरंच आपण स्वतःला अत्यंत नशीबवान समजलं पाहिजे कारण जगात, दर सहा जणांमधील एकाला शुद्ध पाणी सहजपणे मिळू शकत नाही.
मुंबईमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सामना ब्रेबॉर्न स्टेडियम मध्ये सुरु होता . ऑस्ट्रलियन संघामध्ये अॅलन डेव्हिड्सन , रे लिंडवॉल ,रिची बेनॉ सारखे जबरदस्त खेळाडू होते. अब्बास अली बेग त्यांचा जुना साथीदार नरी कॉन्ट्रॅक्टर यांच्याबरोबर खेळण्यास आले तेव्हा दोघांनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी १३३ धावा केल्या त्यामध्येअब्बास अली बेग यांच्या ५० धावा होत्या.
आज तो भारतीय संघाचा सलामीवीर म्हणून यशस्वी होत असताना पाहून आनंद होतो..मोठे यश फक्त काही पावलांवरच येऊन ठेपले होते…अजून बरेच बाकी आहे , गुड लक.
कोणी छानसा विनोदी चुटकुला सांगितला आणी सगळे जण हसायला लागले कि त्या व्यक्तीला दाद देण्यासाठी म्हटले जाते कि तुमच्या विनोदाने तुम्ही छान हास्याची खसखस पेरलीत.तर असा हा गरम मसाल्यातील पदार्थ.खरे तर ह्या अफूच्या बोंडामधील बिया होय पण ह्या मात्र अफूच्या प्रमाणे मादक नसतात.
खसखसचा उपयोग गरम मसाल्या मध्ये,तसेच खीर मिठाई इ पदार्थ बनवताना केला जातो.साधारण रव्या प्रमाणे दिसणारी हि खसखस देखील आपण घरगुती उपचारांमध्ये वापरू शकतो बरे का!
खसखस हि चवीला गोड,थंड असून शरीरामध्ये वात कमी करते व कफ दोष वाढवते.चला मग हिचे औषधी उपयोग पहायचे ना?
१)संडास मधून आव पडत असेल तर चमचाभर खसखस दह्यात वाटून खावी.
२)खसखस,बदाम,चारोळी,समभाग घेऊन वाटावी व तिची गाईच्या दूधात खीर करावी त्यात १ चमचा साजूक तूप व १ चमचा गुळवेल सत्व आणी थोडी खडी साखर घालून हि खीर अशक्त व्यक्तीने खाल्ल्यास शरीरात ताकद वाढते.
३)काही व्यक्तींच्या डोक्यात केसांच्या मूळांशी बारीक फोड येतात त्यांनी दुधामध्ये खसखस वाटून केसांच्या मुळाशी लावून दोन तास ठेवून मग केस धुवावे.
४)पुष्कळ सुका खोकला येत असेल तर १ चमचा खसखस गाईच्या दुधात शिजवून खीर करावी व हि खीर गरम असताना खावी उपशय मिळतो.
५)सोमरोग अर्थात काही स्त्रीयांना लघ्वीच्या मार्गातून सारखे पाणी जात असते त्यामुळे त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन त्यांना अशक्तपणा येतो ह्यामध्ये मुठभर खसखस रात्री पाण्यात भिजत घालावी व सकाळी वाटावी नंतर त्यात २ चमचे लोणी+ १ चमचा खडीसाखर + १/२ चमचा वेलची पूड घालून हे मिश्रण तिला सतत किमान तीन ते सात दिवस खायला द्यावे.
खसखस अतिप्रमाणात खाल्ल्याने मद वाढून अति झोप येऊ शकते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
काल एका पुस्तकात जगप्रसिद्ध वास्तुरचनाकार श्री. चार्लस कोरीया यांचं एक वाक्य वाचनात आलं. वाक्य सांगण्यापूर्वी मुंबईतील व मुंबईची माहिती असणाऱ्यांसाठी प्रथम चार्लस कोरीयांची एक ठळक ओळख सांगतो. मुंबईतल्या दादर पश्चिमेला असलेलं ‘पोर्तुगीज चर्च’चे वास्तशिल्पी म्हणजे श्री. चार्लस कोरीया.
Copyright © 2025 | Marathisrushti