(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • केरळ पॅटर्न : केरळने असे काय वेगळे केले?

    केरळने अशी कोणती गोष्ट केली की ज्याच्या मुळे त्या राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आज मे महिन्याच्या २० तारखेपर्यंत बऱ्यापैकी मर्यादित राहिलेली आपल्याला दिसते आहे ?

  • सोन्यातील गुंतवणुकीचे शास्त्र

    भारतात सोने गुंतवणुकीचे विविध पर्याय उपलब्ध आहेत . गुंतवणूकदार सध्या ‘ सोने ‘ गुंतवणूक करण्यास जास्त पसंती देत आहेत . कोविड- १ ९ च्या साथीने जागतिक बाजार कोलमडला असताना जागतिक उत्पन्नातही निरंतर घट होत आहे .

  • शिवस्वरूप खंडोबा -एकं सत् विप्राः बहुधा वदंति

    इंद्रं मित्रं वरुणं अग्निं आहुः अथो इति दिव्यः सः सुऽपर्णः गरुत्मान् l
    एकं सत् विप्राः बहुधा वदंति अग्निं यमं मातरिश्वानं आहुःl

    (ऋग्वेद१/१६४/४६)

    [सत्य स्वरूपी ईश्वर एकच आहे, पण ज्ञानीं लोक त्याला इंद्र, मित्र, वरुण आणि अग्नि असें म्हणतात. देवलोकीं राहणारा सुंदर पंखांचा पक्षीही तोच. जगातील विभिन्न जाती पंथातले लोक त्याला विभिन्न नावांनी ओळखतात. कुणी त्याला अग्नी, कुणी यम, कुणी खुदा, कुणीगॅाड, कुणी वाहेगुरू या नावाने ओळखतात. कुणी 'खंडोबा' या नावानेहि].

    आजकाल टीवीवर 'खंडोबा'च्या जीवन चरित्रावर मालिका सुरु आहे. मालिकेत खंडेराय हे महादेवाचे अवतार आहे, असे दाखविले जाते. खंडेराय हे धनगर समाजातले होते. काहींच्या मते देत्यांचा राजा बळी यांनी खंडेरायांना जेजुरीचे क्षेत्रपाल नेमले होते. एक मात्र खंर, शेकडों/ हजारों वर्षांपासून लोक त्यांची पूजा करतात,त्या अर्थी त्यांनी आपल्या आयुष्यात काही भव्य-दिव्य केल असेल. आपल्या प्रजेला निश्चित सुखी ठेवले असेल. काही तथाकथित पुरोगाम्यांना वाटते, मालिकेत खंडेरायाचे चरित्र विकृत करून दाखविले जात आहे. त्यांना हे सर्व ब्राह्मणी षड्यंत्र वाटते. पण मला तर वाटते या अतिविद्वान लोकांना देशाच्या मूळ सर्वसमावेषक संस्कृती बाबत कुठलेहि ज्ञान नाही.

    आसेतु हिमालय पर्यंत पसरलेला हा विस्तृत आणि विशिष्ट भू भाग भारत भूमी म्हणून वैदिक काळापासून ओळखला जातो. प्राचीन काळापासून विभिन्न जनजाती समूह इथे एकत्र नांदत आहे. त्यांची जात-पात भाषा वेगळी तरी त्यांचे आणि भारत भूमीचे भविष्य सर्वांनी एकत्र राहण्यातच आहे, हे प्राचीन वैदिक ऋषींनी ओळखले होते. एकत्र राहण्यासाठी सर्वाना आपल्यात समावून घेणे गरजेचे. त्या साठी सर्व जमाती आणि जातीय समूहांच्या परंपरेचा सम्मान करणेहि गरजेचे.

    ईश्वराची कल्पना सर्व जातीय समूहांनी आपापल्या परीने वेगवेगळी केली. कुणी आपल्या पूर्वजांना ईश्वर मानले, कुणी प्रकृतीला ईश्वर मानले, कुणी सर्पांची पूजा करायचे तर कुणी लिंग पूजा करायचे, तर कुणी वृक्षांना देवता मानायचे. हे सर्व पाहूनच तुलसीदास यांनी म्हंटले आहे, “जाकी रही भावना जैसी, प्रभु मूरत देखी तिन तैसी". पण सर्वांचा उद्देश्य एकच, सत्य मार्गावर जाण्यासाठी भगवंताच्या कृपेची प्राप्ती.

    हे ओळखूनच कदाचित् उपनिषदकरांनी, ईश्वराची नवीन संकल्पनापुढे आणली.

    यस्तु सर्वाणि भूतान्यात्मन्येवानुपश्यति ।

    सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते ॥

    (ईशान उपनिषद /६)

    जो सर्व प्राणीमात्रां मध्ये भगवंताला पाहतो, तो कुणाचा हि द्वेष करीत नाही. अर्थात प्रत्येक प्राण्यामध्ये ईश्वराचा निवास आहे. तात्पर्य ईश्वराच्या प्रत्येक स्वरुपाची पूजा उपासना करताना आपल्या इष्ट देवताची कल्पनात्या ईश्वरीय स्वरुपातहि करू शकतो.

    भगवंतानी गीतेत हीच भावना रोखठोक शब्दात सांगितली ते म्हणतात, अर्जुन, मीच सर्व जीवांचा आदि, मध्य आणि अंत आहे. मीच विष्णू आहे, मीच शंकर आहे, कुबेर आहे, अग्नि आहे, मेरू पर्वत आहे, कार्तिकेय आहे, महासागर आहे, वृक्षांमध्ये अश्वत्थ आहे, अश्वांमध्ये उचैश्रवा आहे, गजेंद्रामध्ये ऐरावत आहे आणि सुरभी गायहि आहे. मी सर्पांमध्ये वासुकी आहे, नागांमध्ये अनंत नाग आहे, वरुण आहे दैत्यांमध्ये प्रल्हाद आहे, .....अर्थात त्या काळी माहित असलेल्या सर्व ईश्वरी स्वरूपांमध्ये एकच ईश्वर आहे हि भावना लोकांमध्ये रुजवली.

    काळ पुढे गेला, भरतखंडात जनसंख्या वाढली,नवे नवे विचार जन्मले आणि त्या सोबत देवतांची संख्याहि वाढत केली. प्रत्येकाला आपला देव हा श्रेष्ठ वाटणारच. जिथे श्रेष्ठत्व तिथे भांडणेहि होणारच. आपल्या पुराणकारांनी, या वरहि उपाय शोधला. ब्रह्मा,विष्णू, महेश आणि आदिमायेची संकल्पना लोकांच्या मनात रुजवली. सर्व स्त्री देवता म्हणजे आदिमायेचे स्वरूप. पुरुष देवता म्हणजे विष्णू किंवा महेश. इंद्राला पराजित करणारा गवळी समाजातला गोवर्धन गिरधारी हा विष्णू अवतार म्हणून प्रसिद्धी पावला तर धनगर समाजातील खंडोबा हे महादेवाचे अवतार ठरले. अश्या रीतीने समाजाला एक सुत्रात बांधण्याचे कार्य आपल्या ऋषीमुनी आणि पुराणकारांनी केले. सर्वांच्या परंपरेंचा आणि उपासना पद्धतींचा सम्मान केला. नाव वेगवेगळे असले तरी ईश्वर एकच आहे, हि भावना जनतेत रुजवली.

    पण आज आपल्या देशाचे दुर्भाग्य, स्वत:ला पुरोगामी(????) म्हणविणारे लोक समाजात दुही माजविण्याचे कार्य, मोठ्या जोमात करतात आणि स्वत:ला धन्य मानतात. प्रत्येकाला तो दुसर्यापासून कसा वेगळा आहे, हे दाखविण्यातच आपली उर्जा व्यर्थ करतात. अश्या अतिविद्वान लोकांना ‘खंडेराय’ मालिकेतहि षड्यंत्र दिसेल. पण ईश्वराला मानणारे आणि श्रद्धावंत लोक ‘खंडोबा’च्या स्वरुपात महादेवाचे दर्शन करतात आणि महादेवात खंडेरायांचे'.

    कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। 

  • उपहारगृह, टपरी, आजवर हादडलेली

    उपहारगृह, टपरी, आजवर हादडलेली

    आज एक चविष्ट विषयाला हात घातलाय. आता याचं काही विशेष वाटत नाही म्हणा, पण माझ्या लहानपणी म्हणजे १९६५-६६ मध्ये उपहारगृहात जाणं तसं विशेषच होतं. एक तर जेवायला, म्हणजे आजच्या भाषेत lunch अथवा dinner घ्यायला सर्वसामान्य घरातलं कुणी जात नव्हतं. महिन्या दोन महिन्यातून एकदा जाणं व्हायचं, ते ही अल्पोपहारासाठी. मला मात्र आमचे तात्या अधून मधून घेऊन जायचे उपहारगृहात. दादरमध्ये माझ्या आवडीची दोन उपहारगृह होती. त्यातलं एक उडीपी होतं.

  • श्री मीनाक्षी पंचरत्नम् -२

    मुक्ताहारलसत्किरीटरुचिरां -
    पूर्णेन्दुवक्त्र प्रभां
    शिञ्जन्नूपुरकिंकिणिमणिधरां पद्मप्रभाभासुराम् ।
    सर्वाभीष्टफलप्रदां गिरिसुतां वाणीरमासेवितां
    मीनाक्षीं प्रणतोऽस्मि संततमहं कारुण्यवारांनिधिम् ॥ २॥

    आई जगदंबेच्या लोकविलक्षण सौंदर्याचे तथा तिच्या दिव्य तात्त्विक स्वरूपाचे वर्णन करतांना, आचार्य श्री प्रथम दोन चरणात आईने धारण केलेल्या अलंकारांचे आणि त्यांनी फुललेल्या सौंदर्याचे वर्णन करीत आहेत. ते म्हणतात,
    मुक्ताहारलसत्किरीटरुचिरां- मोत्यांचे हार लटकत असल्यामुळे अधीकच शोभून दिसणाऱ्या मुकुटाने सुशोभित असणारी.

    आईच्या मस्तकावर असणाऱ्या रत्नजडित सुवर्ण मुकुटाला मोत्यांचे हार लटकत आहेत. त्याने मुकुटाचे सौंदर्य वृद्धिंगत झाले आहे. अशा मुकुटाने आई अधिकच सुंदर दिसत आहे.

    पूर्णेन्दुवक्त्र प्रभां- पूर्ण विकसित पौर्णिमेचा चंद्रबिंबा प्रमाणे अत्यंत सुंदर मुखाची आभा सर्वत्र विलसत आहे अशी.

    शिञ्जन्नूपुर- जिच्या चरणातील नूपुर अर्थात पैंजणांचा अत्यंत सुंदर ध्वनी सर्वत्र गुंजत आहे अशी.

    किंकिणिमणिधरां- जिच्या कंबर पट्ट्यात, वस्त्रात तथा अन्य अलंकारात लावलेले छोटी-छोटी घुंगरू किन् किन् असा सुंदर आवाज करीत आहेत अशी.

    पद्मप्रभाभासुराम् - कमळाच्या सौंदर्या प्रमाणे तेजस्वी असणारी. परम आकर्षक असणारी. भक्तगणांच्या चित्ताला मोहीत करणारी.

    सर्वाभीष्टफलप्रदां- साधकांना सुयोग्य अशी सकल फले प्रदान करणारी. गिरिसुतां- गिरी म्हणजे पर्वत. सकल पर्वतांचा राजा हिमालय. त्याच्या घरी कन्या रूपात अवतार घेतलेली . वाणीरमासेवितां- वाणी अर्थात देवी सरस्वती आणि रमा अर्थात देवी लक्ष्मी यांच्याद्वारे, अर्थात समस्त ईश्वरी शक्तींच्या द्वारे सेवा केली जात आहे अशी.

    मीनाक्षीं प्रणतोऽस्मि संततमहं कारुण्यवारांनिधिम् -

    कारुण्याचा जणू काही सागर असणाऱ्या देवी मीनाक्षीला मी सतत वंदन करतो.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग एकवीस

    जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे सत्तावीस
    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
    निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग एकवीस

    नित्यं हिताहारविहारसेवी
    समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
    दाता समः सत्यपरः क्षमावान
    आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।

    कुणाचे वर्म काढू नये
    कुणाच्या वर्मावर बोट ठेवू नये.

    बऱ्याच वेळा माणसे दुखावली जातात, ती चुकीचे शब्द, चुकीच्या पद्धतीने उच्चारल्यामुळे. वर्म काढू नये म्हणजे अपमान होईल असे बोलू नये. परिस्थिती कोणावर कशी येईल, रावाचा रंक कधी होईल ते कधीच सांगता येत नाही. आंधळेपणा, पांगळेपणा ह्या वर्मावर बोट ठेवून कधी कोणाला दोष देऊ नये. हेच आई शिकवित असते. बाबा पण कधीतरी ओरडत असतात.

    पण काहीही म्हणा हं आईचं शिकवणं आणि बाबांचं शिकवणं यात फरक असतोच. अगदी नव्वद टक्के मुलं सांगतील, आई शिकवित होती तेच बरं होतं. फक्त ओरडाच खायला लागायचा, मार तर नाही.

    वर्म काढू नये. घालून पाडून बोलू नये. भांडणाची पण एक शैली असते. त्या शैलीतच भांडता आलं पाहिजे. अहो, हल्ली मुलांना नीट भांडतासुद्धा येत नाही. त्या वाॅटसप मुळे भांडण होतात, ती सुद्धा ऑनलाईनच ! समोरासमोर.

    भांडायला शब्द सुचावे लागतात. आणि शब्द सुचले नाही की थेट हल्लाबोलच.
    आणि भांडायचं असतं ते मातृभाषेत. आणि शिक्षण होतं पूतना मावशीच्या भाषेत ! त्यामुळे भांडायला जे इरसाल शब्द भांडार लागतं, ते असतं मातृभाषेत! म्हणून तरी मातृभाषेत शिका !

    बोलताना जशी भाषा समृद्धता असणं आवश्यक आहे, तशी भांडताना सुद्धा ही भाषा समृद्धता दिसणं आवश्यक आहे.
    तुटे वाद संवाद तो हितकारी असे समर्थांचे बोल आहेत.

    संवादाचे रुपांतर विवादात होऊ नये, यासाठी हितकर असणारे शब्द योजावे लागतात. अर्थात शहाण्याला शब्दांचा मार, बाकीच्यांची पूजा कशानी करायची ते, आपल्या मराठी वाड़मयात तेपण सांगितलेले आहे.

    वर्म म्हणजे दुर्गुण, कमीपणा. कुणाचा दुर्गुण कुणाला सांगू नये, कारण त्यावरून आपलीच परीक्षा होत असते. आपले दुर्गण शोधावे आणि इतरातील सद्गुण.

    हे उपदेशात्मक लिखाण फार गांधीगिरीचे वाटत नाही ना ?

    वर्म म्हणजे वेदनेचे ठिकाण. नेमके इथे बोट ठेवले तर दुखणारच ना ! पण जिथे पूय साठून साठून जमा झालेला असतो, तिथे वेदना निर्माण होणारच ना. ? असणारच. आणि जिथे जिथे पूयसंचिती तिथून तो बाहेर काढावा, असे वैद्यक शास्त्र सांगते. जखमेतील वेदना कमी होण्यासाठी काहीवेळा ऑपरेशन करावेच लागते, मग ती जखम प्रत्यक्षात शरीरावरील असो, वा मनावर आघात करणारी. हेपण आईकडूनच शिकायचे असते.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.

  • नवे शुद्र!

    आता आर्थिक आधारावर नवे शूद्र आम्ही निर्माण करीत आहोत. जेव्हा हा आधार जातीगत होता तेव्हाही समाजातील एेंशी टक्के लोकांना शिक्षणाचा अधिकार नव्हता आणि आताही समाजातील एेंशी टक्के लोकांना उच्चशिक्षण नाकारले जात आहे. प्राथमिक शिक्षण मात्र सगळ्यांनाच उपलब्ध आहे, कारण प्राथमिक शिक्षणाची सोय सरकारतर्फे केली जाते.

  • ताडोबात आठ पाणवठ्यावर सौर पाणपोई

    उन्हाळ्यात वन्यजीव प्राण्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित जंगलात वन विभागाने निर्माण केलेल्या कूपनलिकावर ‘वॉटर इज लाईफ’ या वन्यजीव प्रेमी संस्थेतर्फे अत्याधुनिक सौरऊर्जा पंपाद्वारे कृत्रिम झरे निर्माण करून आठ ठिकाणी पाणवठे तयार करण्यात आल्यामुळे वन्यजीवांना तृष्णा भागवता येणार आहे.

    उन्हाळ्यात तलावातील पाणी आटत असल्यामुळे वन्यजीवन पाण्यासाठी गावांकडे धाव घेताना दिसून येतात. त्यामुळे उन्हाळ्यात प्राण्यांना तृष्णा भागवण्यासाठी मोहर्ली येथील आठ पाणवठ्यांवर सौर पाणपोईची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे हे कृत्रिम झरे आता उन्हाळ्यात नैसर्गिक झऱ्यात पाणी साठवण्याचे काम करीत आहेत. यामुळे प्राण्यांना पाणी पिण्याची जागाही बदलण्याची गरज नाही, असे दृश्य आता दिसून येत आहे. यासर्व प्रयोगामुळे 50 चौरस किलोमीटर भागातील प्राण्यांची तृष्णा भागवण्यात व या प्राण्यांना उन्हापासून होणारा त्रास वाचविण्यास मदत होत आहे.

    2010 पासून धनंजय बापट यांच्या पुढाकाराने मोहर्ली बफर क्षेत्रात ‘वन्यजीवांसाठी पाणपोई’ हा उपक्रम राबविला. पहिल्या तीन वर्षात टँकरच्या माध्यमातून संपूर्ण उन्हाळाभर वन विभागासोबत विविध ठिकाणी पाणी पुरवठा करण्यात येत होता. चौथ्या वर्षी सहकारी मित्र डॉ. विवेक भोरे जे स्वत: मेकॅनिकल इंजीनियर व सौर ऊर्जा या विषयात डॉक्टरेट आहेत. त्यांनी अत्यंत कमी क्षमतेचा परंतु सूर्योदय ते सूर्यास्त असा पूर्ण वेळ चालणारा बॅटरी विरहीत पंप तयार करून याच क्षेत्रातील हातपंप असलेल्या कूपनलिका सोबतच हा पंप टाकून एक अभिनव प्रयोगाची सुरूवात केली. त्यामुळे मागील वर्षीपासून हाच उपक्रम अनेक सुधारणांसह सुरू करण्यात आला आहे. प्राण्यासाठी पाणी पुरवठा हा कृत्रिम सिमेंटच्या पानवठ्यात होत होता. त्यामुळे यातील पाणी संपले की जनावरे इतर ठिकाणी स्थलांतर करीत होते. सोबतच नैसर्गिक पाणवठ्यातही पाणी आटले की जनावरांना इतरत्र भटकावे लागत होते. त्यामुळे त्यांना स्थलांतरित न होता त्याच व सोबतच्या नैसर्गिक पाणवठ्यातही पाणी मिळावे म्हणून ‘वॉटर इज लाईफ’ च्या सदस्यांनी नेहमीच्या नैसर्गिक पाणवठ्यावर पाणी उपलब्ध व्हावे व त्यासाठी जमिनीच्या आत उपलब्ध असलेले पाणी जमिनीवर आणण्यासाठी पंपाचा उपयोग करून नैसर्गिक ठिकाणी सतत ताजे व शुद्ध पाणी जनावरांना उपलब्ध करून देण्यासाठी सौर पाणपोई ही योजना वन अधिकाऱ्यासमोर ठेवली. त्यामुळे या वर्षी आठ ठिकाणी तलावात कूपनलिका तयार करून दिल्या आहेत. डॉ. भोरे यांनी तयार केलेले पंप ‘वॉटर ईज लाईफ’ या गटातर्फे स्वखर्चाने बसवून देण्यात आले आहेत व त्याची दररोज देखभाल सुद्धा या गटातर्फे करण्यात येत आहे. यावर्षी या आठ सौर पाणपोई मोहर्ली वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र. 188, आगरझरी कुटी कक्ष क्र. 169, फेटराबोडी कक्ष क्र. 167 चा तलाव, कालापाणी कक्ष क्र. 175 चा देवाडा तलाव 170, जुनोना कुटी कक्ष क्र. 154 अशा ठिकाणी लावण्यात आल्या आहेत.

    या सर्व कामासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे, वनपरिक्षेत्र अधिकारी राऊतकर, श्रीधर बालपाणे, संजय घोडवे, विठ्ठल लेडांगे, वन विभागाचे वनरक्षक हिंगणकर आदीचे मार्गदर्शन व मदत सतत लाभत असून वनरक्षक या सर्व उपक्रमांची देखरेख करीत आहेत. तलाव क्षेत्रात 100 फूट खोल कूपनलिका तयार करून अत्यंत कमी दरात म्हणजेच फक्त 40 हजार रूपयात ताजे, स्वच्छ पाणीपुरवठा करणारा पंप बसवून प्राण्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. हा उपक्रम जर संपूर्ण महाराष्ट्रात वनविभागात स्वीकृत करून राबवण्यात आला तर स्वच्छ पाणीपुरवठा उपलब्ध होऊन शासनाची कोट्यवधींची बचत होईल. कारण यासर्व उपक्रमाला जवळपास 4 लाख इतका खर्च येतो. मात्र येथे फक्त 40 हजार रूपयांच्या खर्चात हे काम असून याला मनुष्यबळाची गरज नाही. सोबतच या पाणपोईमुळे प्राण्यांची पिण्याची जागाही बदलणार नाही, असे मत धनंजय बापट यांनी व्यक्त केले. ही पाणपोई प्राण्यासांठी उन्हाळ्यात वरदान ठरली आहे असेच म्हणावे लागणार.

  • पासपोर्ट का आणि कशासाठी?

    आपला देशातून जगातील इतर कोणत्याही देशांत जाण्यासाठी पासपोर्ट अनिवार्य आहे. पासपोर्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी सरकार कडून नागरिकाला प्रदान केले गेलेले अधिकृत प्रमाणपत्र. नागरिकत्वाचा हा एक सबळ पुरावा असतो. त्यामुळे परदेशात जाताना पासपोर्ट व त्या देशाचा व्हिसा अत्यावश्यएक असतो. अमेरिका आणि युरोपमधील देशांचे व्हिसा मिळविण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष जाण्याच्या दिवसांपूर्वी काही महिने आधी सुरू करावी लागते. पासपोर्टमध्ये तुमच्या विषयी सर्व माहिती नोंदवलेली असते आणि ती हे दर्शवते की तुम्ही भारताचे नागरिक आहात. भारतात तीन प्रकारचे पासपोर्ट आहेत. पर्सनल पासपोर्ट, डिप्लोमॅटिक पासपोर्ट आणि ऑफिशियल पासपोर्ट. पासपोर्ट जारी केल्यापासून १० वर्षे रेग्युलर पासपोर्ट वैध असतो. पासपोर्ट कायदा १९६७ नुसार पासपोर्टसाठी अर्ज करताना खोटी माहिती दिल्यास शिक्षा होऊ शकते. पासपोर्ट हा एक महत्त्वाचा शासकीय दस्तावेज म्हणून सुद्धा उपयोगी पडतो. भारतीय पासपोर्टचा (Passport) हा जगभरातील सर्वात प्रभावशाली पासपोर्टच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. भारतीय नागरिक आता विना व्हिसा जगातील ५९ देशामध्ये प्रवास करू शकतात. इंडियन पासपोर्टवर काही देशांमध्ये 'व्हिसा ऑन अराइवल' सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

    भारतात तीन प्रकारचे पासपोर्ट आहेत. विशेष म्हणजे या तिन्ही रंगांचे वैशिष्ट्य वेगवेगळे आहे.
    निळा (सामान्य व तत्काळ) सामान्य व्यक्तिसाठी.

    देशातील सामान्य व्यक्तिसाठी निळ्या रंगात पासपोर्ट बनवला जातो. ‍निळा रंग भारतीय नागरिकाला रिप्रझेंट करत असतो. त्यात ऑफिशियल व डिप्लोमॅट्सपासून वेगळे ठेवत असतो. सरकारनेच हे अंतर निर्माण केले आहे. कस्टम अधिकारी तसेच विदेशात पासपोर्ट तपासणी करतांना अडचणी येत नाहीत.

    पासपोर्टधारकाचे नाव असते. जन्म तारीख, जन्म स्थळाचा उल्लेख असतो. सोबत‍ छायाचित्र व स्वाक्षरी असते. व्यक्तीची ओळख दर्शवण्यासाठी पासपोर्टकडे महत्त्वपूर्ण दस्तावेज म्हणून पाहिले जाते.
    पांढरा (ऑफिशियल, सरकारी कामासाठी.)

    गव्हर्नमेंट ऑफिशियल तसेच सरकारी कामासाठी पांढर्याप रंगाचा पासपोर्ट दिला जातो. सरकारी कामासाठी विदेशात जाणार्यास व्यक्तीला पांढरा पासपोर्ट दिला जातो. ऑफिशियल आयडेंटिटीसाठी हा पासपोर्ट पाहिला जातो. कस्टम चेकिंग करताना याच पद्धतीने डील केले जाते.
    पांढर्या पासपोर्टसाठी अर्जदाराला स्वतंत्र अर्ज करावा लागतो. पांढर्यां पासपोर्ट मिळवण्यासाठी अर्जात ठोस कारण द्यावे लागते. पांढरा पासपोर्टधारकाला विविध सुविधा मिळत असतात.

    मरून (डिप्लोमॅटिक, भारतीय डिप्लोमॅट्स व वरिष्ठ सरकारी अधिकारी.)
    भारतीय राजनयिक (डिप्लोमॅट्स) व सरकारी वरिष्ठि अधिकार्यां ना (आयपीएस, आयएएस दर्जाचे अधिकारी) मरून रंगाचा पासपोर्ट दिला जातो. हाय क्वॉलिटी पासपोर्टसाठी स्वतंत्र अर्ज दिला जातो.

    एका आठवड्याच्या आत तत्काळ पासपोर्ट बनून मिळतो. सामान्य पासपोर्टप्रमाणेच ऑनलाइन अर्ज करता येतो. यासाठी अर्जदाराला एनेग्झर-आय भरावे लागते. यात अर्जदाराला आपली सविस्तर माहिती भरावी लागते. सर्व दस्ताऐवज एका फर्स्ट क्लास गझेटेड ऑफिसर द्वारा व्हेरिफाय करावे लागतात.
    सामान्य पासपोर्ट बनवण्यासाठी १० ते १३ दिवसांचा कालावधी लागतो. रजिस्टर्ड पोस्टने पासपोर्ट अर्जदाराच्या घरी पाठवला जातो. सामान्य व्यक्तिला १० वर्षांच्या मुदतीत पासपोर्ट दिला जातो.

    पासपोर्टचा इतिहास
    पासपोर्ट (पारपत्र) या संकल्पनेची अंमलबजावणी भारतात सर्वप्रथम पहिल्या महायुद्धाच्या वेळी करण्यात आली. त्यापूर्वी भारतात येताना आणि बाहेर जाताना कोणत्याही परवान्याची गरज भासत नव्हती. भारताच्या संरक्षणासाठी १९१४ मध्ये तत्कालीन प्रशासनाने पासपोर्ट बंधनकारक केला. त्यासाठी स्वतंत्र कायदा तयार करण्यात आला; पण, हा कायदा अल्पायुषी ठरला. पहिले महायुद्ध संपल्यानंतर हा कायदा रद्द करण्यात आला. अवघे सहा महिने या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली; पण, तत्कालीन प्रशासनाला हा कायदा पुढे सुरू ठेवण्याचे अधिकारी देण्यात आले. या कायद्याच्या निमित्ताने तत्कालीन इंग्रजी राजवटीने आपल्या साम्राज्याच्या सीमा अधिक बळकट केल्या. अखेर, "पासपोर्ट' ही संकल्पना सुरू ठेवण्याचा निर्णय घेऊन, १९२० मध्ये नवीन "भारतीय पासपोर्ट कायदा' तयार करण्यात आला. कालांतराने "द पासपोर्ट (एंट्री इन टू इंडिया) ऍक्ट" १९२०' असे त्याचे नामकरण करण्यात आले. पासपोर्ट हा केंद्र सूचीतील विषय असला तरीही १९३५ मध्ये यात बदल करून देशातील काही राज्यांना हा अधिकार देण्यात आला. त्यात मुंबई, दिल्ली अशा राज्यांचा समावेश होता. त्यामुळे या राज्यांमध्ये पासपोर्ट कार्यालये सुरू करण्यात आली. अर्थात त्या राज्याच्या गृहखात्याच्या नियंत्रणात पासपोर्ट अधिकारी कार्य करीत असे. भारत स्वतंत्र झाल्यावर पासपोर्ट हा विषय परत केंद्रसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आला. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे त्यावर नियंत्रण ठेवण्यात आले आहे. १९५४ पर्यंत संबंधित राज्य सरकारतर्फे पासपोर्ट देण्यात येत होते. केंद्र सरकारतर्फे १९५४ मध्ये पहिली पाच प्रादेशिक पासपोर्ट कार्यालये देशात सुरू करण्यात आली. त्यात मुंबई, दिल्ली, मद्रास (चेन्नई), कलकत्ता (कोलकता) आणि नागपूर या शहरांचा समावेश होता. पासपोर्ट काढणे सुलभ करण्यासाठी पासपोर्ट सेवा केंद्र (पीएसके) सुरू करण्यात आली आहेत. सध्या भारतात ८१ पासपोर्ट सेवा केंद्र आहेत.

    "पीएसके'मुळे या पासपोर्ट कार्यालयावरील ताण कमी झाला आहे. पासपोर्टसाठी 18002581800 या कॉल सेंटरवर दूरध्वनी करून तसेच, www.passportindia.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन अर्जाच्या स्थितीची अद्ययावत माहिती घेण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
    पोलिस पडताळणीची प्रक्रिया "ऑनलाइन' करण्यासाठी पासपोर्ट आणि पोलिस या विभागातर्फे पहिले पाऊल उचलण्यात आले आहे.

    पासपोर्टची वाढती मागणी
    स्वातंत्र्यानंतर सुरवातीच्या काही वर्षांमध्ये परदेशात जाणारे मूठभर नागरिकच पासपोर्टसाठी अर्ज करीत होते. त्यामुळे या खात्यावरील ताण मर्यादित होता; पण, आता जागतिकीकरणामुळे जग हे "ग्लोबल व्हिलेज' होत असताना पासपोर्टची मागणी करणाऱ्या नागरिकांची संख्या झपाट्याने वाढली आहे. १९५८ मध्ये देशातील फक्त ३३ हजार २१६ नागरिकांना पासपोर्ट देण्यात आला होता. त्यापुढील 48 वर्षांमध्ये म्हणजे २००६ पर्यंत ही संख्या ४४ लाख ४१ हजार ७६८ पर्यंत वाढली. २०१० मध्ये परराष्ट्र मंत्रालयाने तब्बल ८४ लाख ३९ हजार ५८४ पासपोर्ट वितरित केले आहेत.
    पासपोर्ट काढण्यासाठी पासपोर्ट सुविधा केंद्रात प्रत्यक्ष जाऊन किंवा ऑनलाइन अर्ज भरता येतो. त्यासाठी www.passportindia.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपण अर्ज "डाऊनलोड' करू शकतो, तसेच "ऑनलाइन' भरू शकतो.
    पासपोर्ट सर्वसाधारण, की तत्काळ काढायचा आहे; त्यानुसार त्याचे शुल्क निश्चिपत करण्यात आले आहे. तसेच, लहान मुले, प्रौढ आणि ज्येष्ठ नागरिक या वर्गवारीत पासपोर्ट मिळतो. भरलेल्या अर्जाची पासपोर्ट सेवा सुविधा केंद्रातील अधिकाऱ्यांकडून छाननी होते. पोलिस पडताळणीचा अहवाल आल्यानंतर प्रत्यक्ष पासपोर्ट छापला जातो.

    पासपोर्टसाठी आवश्यसक कागदपत्रे
    - रहिवासाचा पुरावा
    पाणी बिल, फोन बिल, लाइट बिल, चालू खात्याचे बॅंक पासबुक, निवडणूक ओळखपत्र, गॅस कनेक्शान, रेशनकार्ड, आधार कार्ड.
    - वयाचा दाखला
    २६ जानेवारी १९८९ नंतर जन्म झालेल्यांना जन्माचे प्रमाणपत्र बंधनकारक आहे. त्यापूर्वीचा जन्म असल्यास जन्माचे प्रमाणपत्र, शाळेचा दाखला.
    - शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र.
    - महिलांसाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र.
    - प्लेन बॅंकग्राउंडवर तीन पासपोर्ट साईझ फोटो (3.5 बाय 3.5 सेंटीमीटर).
    केंद्र सरकारने पासपोर्ट मिळण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आणि सुलभ केली आहे. सामान्य माणसालाही पासपोर्ट काढता येईल इतकी सहज-साधी प्रक्रिया करण्यावर भर दिला आहे. कागदपत्रांची पूर्तता आणि खरी माहिती अर्जात नमूद केलेली असल्यास 80 टक्के पासपोर्ट वेळेत मिळतात. केंद्र सरकारने पासपोर्टची प्रक्रिया सोपी केल्यावर आता बायोमॅट्रीक डिटेल्स असलेला ई-पासपोर्ट लॉंच करणार आहे. चीप असलेले हे ई-पासपोर्ट परराष्ट्र मंत्रालय लवकरच देणार आहे. याद्वारे पासपोर्ट संबंधी सर्व माहिती इलेक्ट्रॉनिक माध्यमातून तपासता येईल. ई-पासपोर्ट संबंधीताची माहिती सुरक्षित ठेवेल आणि बनावट पासपोर्ट बनवणाऱ्यांना चाप बसेल. ई-पासपोर्टमध्ये एक इलेक्ट्रॉनिक चीप असते. चीपमध्ये त्याच सूचना असतात ज्या पासपोर्टच्या डाटा पेजवर छापलेल्या असतात. या चीपद्वारे इमिग्रेशन अधिकाऱ्यांना कुठल्याही घोळाचा छडा लावता येईल आणि पासपोर्टचा दुरुपयोग रोखण्यात मदत होईल. ई-पासपोर्टनंतर परराष्ट्र मंत्रालय पूर्णपणे डिजिटल पासपोर्ट लॉंच करणार आहे. हा असा पासपोर्ट असेल जो मोबाइल मध्येही ठेवता येऊ शकेल. या अत्याधुनिक तंत्रामुळे कुठल्याही ठिकाणाहून आपल्याला लवकरात लवकर पासपोर्ट मिळवता येईल. तसंच कोणी एकाच वेळी दोन ठिकाणाहून पासपोर्टसाठी अर्ज केल्यास संबंधित यंत्रणेतून मंत्रालयाला त्या ठिकाणचा ऍलर्ट जाईल. यामुळे दोन ठिकाणाहून पासपोर्ट मिळवण्याच्या प्रकाराला आळा बसेल.

    जगभरातील पासपोर्टची क्रमवारी करणाऱ्या आर्टन कॅपिटलच्या ‘पासपोर्ट निर्देशांका’च्या नव्या आवृत्तीत जर्मन पासपोर्टने पहिले स्थान पटकावले आहे. भारतीय पासपोर्ट ७८ व्या क्रमांकावर आहे. वाढीच्या दृष्टीने सर्वांत आघाडीवर अमेरिका आहे, तर त्यानंतर चीन, जर्मनी, ग्रेट ब्रिटन, जपान व भारत यांचा क्रमांक लागतो. गेल्या वर्षी भारताला पहिल्या पाचांमध्ये स्थान मिळाले होते. या पद्धतीमध्ये जगभरातील पासपोर्टची माहिती संकलित केली जाते, ती दर्शवली जाते आणि पासपोर्टच्या प्रभावीपणानुसार त्यास क्रमवारी दिली जाते; तसेच पासपोर्टधारकाला किती देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवेश करता येऊ शकतो किंवा देशात प्रवेश केल्यावर व्हिसा घेता येतो (व्हिसा ऑन अरायव्हल) त्यानुसार संबंधित पासपोर्टला ‘व्हिसा-फ्री स्कोअर’ दिला जातो. जर्मनीचा व्हिसा स्कोअर सर्वाधिक १५७ आहे, तर १५६ स्कोअर नोंदवून सिंगापूर दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचा स्कोअर ४६ असून, चीन व पाकिस्तान अनुक्रमे ५८ व ९४व्या स्थानावर आहेत. केवळ २३ स्कोअर मिळालेला अफगाणिस्तानचा पासपोर्ट सर्वांत कमी प्रभावी आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

  • अशी घ्या डोळ्यांची काळजी

    अशी घ्या डोळ्यांची काळजी

    सुंदर जग पाहण्याची किमया आपण फक्त डोळ्यांनीच करू शकतो. म्हणूनच डोळ्यांचे आपल्या जीवनामधील स्थान अनन्यसाधारण असेच आहे. मात्र असे असतानाही आपण डोळ्यांची काळजी घेण्याबाबत तितकेसे सिरिअस नसतो. डोळ्यांची कार्यक्षमता, आरोग्य राखलं तर आपलंच भविष्य सुखकारक होईल म्हणून डोळ्यांची आत्तापासूनच काळजी घ्या... ती कशी यावर नजर टाकुयात...

    पुरेशी झोप घ्यावी यासाठी रात्री जागरण करु नये व दिवसा झोपू नये.

    दिवसातून दोन वेळा गार पाण्याने डोळे स्वच्छ करावेत.

    डोळ्यांवर ताण येऊ देऊ नये. यासाठी अधिक वेळापर्यंत TV, मोबाईल पाहू नये. संगणकावर सलग काम करु नये. मधून-मधून थोडी विश्रांती घ्यावी. वाचण, शिवणकाम करताना डोळ्यांवर ताण येतो आहे असे वाटल्यास थोडा वेळ विश्रांती घ्यावी.

    प्रवासामध्ये वाचू नये.

    अपुऱ्‍या प्रकाशात लिहिणे, वाचणे इ. गोष्टी करणे टाळावे.

    अति प्रखर प्रकाशाकडे अधिक वेळ पाहू नये. सुर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नये.

    पित्तवर्धक आहार उदा. अतितिखट, खारट, उष्ण, मसालेदार, चमचमीत, तेलकट पदार्थ अधिक खाऊ नयेत.

    डोळ्यांच्या आरोग्यासाठी व्यायामालाही महत्त्व आहे. डोळ्यांचे दोन महत्त्वाचे व्यायाम आपण घरच्या घरीही करू शकतो.

    1) एका पुठ्ठ्यावर काळा ठिपका काढावा. त्याकडे एकटक पाहावे. असे केल्याने दृष्टी सुधारतेच; पण मनही एकाग्र होते.

    2) काळा ठिपका पुठ्ठ्यावर काढून पुठ्ठा गोल फिरवावा व ठिपक्‍याकडे एकटक पाहावे. असे करताना बुबळे फिरतील व डोळ्यांचा व्यायाम चांगला होईल. या व्यायामांच्या माध्यमातून डोळ्यांभोवती असलेल्या आठ स्नायूंची क्षमता वाढवता येते.