वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

हॅरिसन ॲलन-सटर आणि त्यांच्या सहकारी संशोधकांनी प्रयोगशाळेत केलेल्या आपल्या प्रयोगात, सिलिकॉन कार्बाइड हे संयुग पाण्यात बुडवून त्यावर प्रचंड दाब दिला. त्यानंतर लेझर किरणांच्या साहाय्यानं, दाबाखाली असलेल्या या सिलिकॉन कार्बाइडचं तापमान मोठ्या प्रमाणात वाढवलं. पृथ्वीवरच्या वातावरणातील दाबाच्या सुमारे पाच लाखपट दाब आणि सुमारे तेवीसशे अंश सेल्सियस तापमान निर्माण झाल्यावर, सिलिकॉन कार्बाइ़डमधील कार्बनचं रूपांतर चक्क हिऱ्यांत झालं.
‘फॉरच्युन’ आणि ‘लाईफ’ या जगप्रसिद्ध नियतकालिकांच्या पहिल्या छायाचित्रकारांपैकी एक छायाचित्रकार म्हणून मागरिट गणली जाते. विशेष म्हणजे, ‘लाईफ’ मासिकाच्या पहिल्याच अंकाच्या मुखपृष्ठावर मागरिटने काढलेले फोर्ट पेक डॅमचे छायाचित्र होते ! प्रत्यक्ष रणभूमीवर हवाई प्रवास करून जाऊन छायाचित्रण करणारी जगातील पहिली महिला छायाचित्रकार म्हणून मागरिटचे नाव जगप्रसिद्ध झाले.
सामना सम्पल्यानंतर खेळपट्टी ते ड्रेसिंग रुम हा प्रवास ह्युगने जमिनिला पाय न लावता केला. सहकारी खेळाडुंनी त्याला उचलुन घेतले होते. गोडार्डने बाद केलेल्या एका फलंदाजाचा अपवाद वगळता अख्खा इंग्लिश संघ टेफिल्डने एकट्याने गारद केला होता. शेवटच्या दिवशी एका बाजुने सलग पस्तिस षटके त्याने चार तास पन्नास मिनिटांच्या खेळात टाकली होती आणी वरच्या फळितिल फलंदाजांनी चोपुनही त्याने अविरत उत्साहाने गोलंदाजी केली होती.
म्युच्युअल फंड या विषयावर मला लिहायचे होते . विषय माझ्या खूप आवडीचा , परंतु या दोन शब्दांवर किती व कसे लिहावे असा प्रश्न पडला होता
वृत्तपत्र विक्रेत्यांचे आपल्या रोजच्या आयुष्यातही एक महत्त्वाचे स्थान आहे. आपण झोपेतून उठण्यापूर्वी, रोजच्या ताज्या बातम्या देणारी वृत्तपत्रे पहाटेच आपल्या घरापर्यंत पहाटे पोहचवण्याचे काम ही मंडळी अविरतपणे करत असतात.
मना वासना चूकवी येरझारा | मना कामना सांडि रे दव्यदारा |
मना यातना थोर हे गर्भवासीं | मना सज्जना भेटवी राघवासी ||21||
मना सज्जना हीत माझे करावे | रघूनायका दृढ चित्ती धरावे |
महाराज तो स्वामि वायूसुताचा | जना उध्दरी नाथ लोकत्रयाचा ||22||
न बोले मना राघवेंवीण कांही | जनी वाउगे बोलता सूख नाही |
घडीने घडी काळ आयुष्य नेतो | देहांती तुला कोण सोडू पाहतो ||23||
रघूनायकावीण वाया शिणावे | जनासारिखे व्यर्थ का वोसणावे |
सदासर्वदा नाम वाचे वसो दे | अहंता मनीं पापिणी ते नसो दे ||24||
मना वीट मानू नको बोलण्याचा | पुढे मागुता राम जोडेल कैंचा |
सुखाची घडी लोटता सुख आहे | पुढे सर्व जाईल कांही न राहे ||25||
देहेरक्षणाकारणे यत्न केला | परी शेवटी काळ घेवोनि गेला |
करी रे मना भक्ती या राघवाची | फ्ेाढे अंतरी सोडि चिंता भवाची ||26||
भवाच्या भये काय भीतोस लंडी | धरी रे मना धीर धाकासि सांडी |
रघूनायकासारिखा स्वामि शीरी | नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी ||27||
दिनानाथ हा राम कोदंडधारी | पुढे देखता काळ पोटी थरारी |
मना वाक्य नेमस्त हे सत्य मानी | नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ||28||
पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे | बळे भक्तरीपूशिरी कांबि वाजे |
पुरी वाहिली सर्व जेणे विमानी | नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ||29||
समर्थाचिया सेवका वक्र पाहे | असा सर्व भूमंडळी कोण आहे |
जयाची लिळा वर्णिती लोक तीन्ही | नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ||30||
- श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)
भारताने फक्त १४ दिवसातच पाकिस्तानला आपली शस्त्रे खाली ठेवण्यास भाग पाडलं. भारताने या युद्धात निर्णायक विजय मिळवला. पाकिस्तानच्या वतीने लेफ्टनंट जनरल ए.के. नियाझी यांनी शरणगतिपत्रावर सही केली. भारताने लगेचच बांगलादेशच्या स्वातंत्र्याची घोषणा केली व जगाच्या नकाशावर बांगलादेश हा नवीन देश उदयास आला.
सुवर्णमंदिरात लपलेल्या खालिस्तानवादी दहशतवाद्यांविरोधातील “ऑपरेशन ब्ल्यू स्टार” चे नेतृत्व करणारे निवृत्त लेफ्टनंट जनरल के . एस . ब्रार यांच्यावर रविवारी रात्री लंडनमध्ये चार अज्ञात व्यक्तींनी चाकूने हल्ला केला . हल्ल्यात जखमी झालेल्या ७८ वर्षीय ब्रार यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले व ऑपरेशननंतर घरी सोडण्यात आले.
एका जर्मन कंपनीच्या कृषी विभागातर्फे आठ वर्षे कोकणात भटकंती करत असताना इंग्रजांच्या काळातील असा एकही पूल शिल्लक राहिला नाही जिथे थांबून पुलावर लावलेल्या दगडावरील (प्लेक्) माहिती मी वाचली नाही. ३४ वर्षांपूर्वी कोकण रेल्वे अस्तित्वात आली नसल्यामुळे रस्त्यांवरूनच प्रवास करावा लागत असे. मोबाईल अस्तित्वात आला नव्हता व चांगल्या कॅमेऱ्यांच्या किमती आवाक्याबाहेर असल्यामुळे फोटो काढणे शक्य नव्हते. पूल जिथे सुरु होतो तिथे त्या पुलाबद्दल माहिती लिहिलेला एक दगड बसविलेला असतो. त्या दगडावर ज्यांच्या देखरेखीखाली पुलाचे काम झाले त्यांची नावे, वर्ष, बांधकाम पूर्ण होण्यास लागलेला काळ, खर्चाचा अंदाज व झालेला प्रत्यक्ष खर्च असा तपशील लिहिलेला (खोदलेला) असतो. इंग्रजांच्या काळातील कोणत्याही बांधकामावर लावलेल्या दगडावरील मजकूर पराकोटीच्या भ्रष्टाचाराने सडलेल्या आपल्या देशातील कोणीही वाचला तर त्याचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसणे केवळ अशक्य आहे.
२०१५ च्या दिवाळीत तब्बल २५ वर्षांनंतर कोकणातील रस्त्यांवरून पुन्हा एकदा भटकंती केली. रत्नागिरीच्या काळ्या समुद्रावरील ‘द गेटवे ऑफ रत्नागिरी’ या कमानीवरील लावलेल्या दगडावरील लाल चौकटीतील मजकूर काळजीपूर्वक वाचा. कुठे ते अनुमानित खर्चापेक्षा कमी खर्चात कमीतकमी शंभर वर्षे टिकणारे बांधकाम करणारे इंग्रज आणि कुठे कोट्यावधींचा भ्रष्टाचार करूनही काम न करणारे आम्ही भारतीय. रत्नागिरीच्या काळ्या समुद्रावरील धक्क्याचे किंवा कोकणातील कोणत्याही पुलाचे काम करणारे भारतीय असले तरी त्याच्यावर देखरेख (सुपरविजन) करणारे पराकोटीचे शिस्तप्रिय व कर्तव्यदक्ष इंग्रजच होते याची आवर्जून नोंद घ्यावी.
श्रीकांत पोहनकर
98226 98100
shrikantpohankar@gmail.com
ग्रामीण भागातील शेतकरीदेखील या देशाचा सन्मान्य नागरिक आहे, त्याचे हित जपणे सरकारची जबाबदारी आहे. सरकारला हे शक्य नसेल किंवा हे शक्य नाहीच, तर किमान सरकारने बियाणे आणि खताच्या पुरवठ्यातून जन्माला येणार्या काळ्या बाजाराला मूठमाती देण्यासाठी हा प्रकारच बंद करावा. सरकारने या संपूर्ण व्यवहारातून आपले लक्ष काढून घ्यावे. कोणतीही गोष्ट सुचारूपणे चालायची असेल तर त्यात पहिली अट हीच असते, की सरकारची त्या गोष्टीत कोणतीही दखलअंदाजी नको, जिथे सरकारी हस्तक्षेप आहे तिथे सगळ्याचा सत्यानाश आहे, हे आतापर्यंत वारंवार सिद्ध झाले आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti