(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आहारसार भाग ४

    या प्रश्नाचे नेमकेपणाने उत्तर देणे कठीण आहे. दूष्यम् देशम् बलम् कालम् या सूत्रानुसार किमान दहा गोष्टींचा विचार, किमान दहा वेळा तरी करावा लागेल, तेव्हा कुठे हे “परम्युटेशन काॅम्बीनेशन ” थोडेफार जुळेल. हे दहा घटक जुळतील, असा ग्रंथोक्त आहार, एका घरात सुद्धा घेणे, असे जेवण रोज बनवणे शक्य होणारे नाही.

  • श्रीमद्भगवद्गीता मराठीत श्लोकबद्ध – अध्याय सहावा – आत्मसंयमयोग

    इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी आत्मसंयमयोग नावाचा सहावा अध्याय.

  • ऍसिडिटी

    मानवी जीवन खूप धावपळ आणि ताणतणावाने ग्रासलेले आहे. प्रत्येक माणूस नोकरीधंद्याच्या निमित्ताने करिअरच्या मागे धावत आहे. असे हे छोटे-मोठे ताणतणाव, चिंता याशिवाय बदलत्या जीवनशैलीमुळे फास्टफूडचा वापर, जेवणाच्या अनियमित वेळा यामुळे आम्लपित्त किंवा ऍसिडिटीचा त्रास सुरू होतो.

    आम्लपित्त
    दीर्घकाळ पाठपुरावा करणारा आजार. भरपूर प्रमाणात तिखट - तेलकट सेवन, जास्त मद्यपान, जड जेवण, अतिचिंता व झोपेचा अभाव यामुळे आम्लपित्ताचा त्रास सुरू होतो. अशा परिस्थितीत पोटात आम्ल जास्त प्रमाणात तयार झाल्याने मळमळते. याची प्रमुख लक्षणे म्हणजे मळमळ, डोकेदुखी, चक्कर येणे, तोंडाला पाणी सुटणे, तोंड आंबट व कडू वाटणे, आंबट ढेकर येणे अशी आहेत. अन्न घशाशी आल्यासारखे वाटते. कधी-कधी उलट्या होतात. दीर्घकाळ अपचन व आम्लपित्त असल्यास गॅस्ट्रिक अल्सर किंवा जठरव्रण या आजाराचे चिन्ह समजावे.

    गॅस्ट्रिक अल्सर किंवा पेप्टिक अल्सर
    अल्सर म्हणजेच जखम. जठराच्या आतील आवरणात जखम किंवा व्रण झाल्यास त्याला पेप्टिक अल्सर म्हणतात. हे व्रण साधारणतः अन्ननलिकेच्या खालच्या बाजूस, जठरात किंवा आतड्याच्या सुरवातीच्या भागात आढळतात. जठरामधील अन्नरसातील आम्लाचे प्रमाण जास्त वाढल्याने जठरव्रण होतो. पोटाच्या वरच्या बाजूस ठणकत राहते. याची प्रमुख कारणे म्हणजे मद्य, मिरची, मसाले, तेलकट पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन, सिगारेट, तसेच मानसिक ताणतणाव. याशिवाय दात, हिरड्या, घसा, कान या ठिकाणी जंतुसंसर्ग झाला तर त्यातून तयार होणारी दूषित द्रव्ये पोटात गेल्याने त्याचा जर जठराच्या एखाद्या भागावर परिणाम झाला, तर ज्या भागावर परिणाम झालेला आहे तेथे जखमा होतात. त्यामुळेही अल्सर होतात.

    अल्सरचे प्रकार
    ऍक्यु्ट पेप्टिक अल्सर जठराच्या जागेवर खूप दुखते. अन्न घेताच दुखणे वाढते. मळमळते, उलटी होते. उलटी झाल्यावर बरे वाटते. जठरव्रणातून रक्तस्राव होत असेल तर रुग्णाला शौचास काळ्या रंगाची होते. कधी-कधी पोटदुखी जास्त दिवस चालू राहते. नंतर त्रास कमी होतो, पण परत थोड्या दिवसांनी सुरू होतो. जठरव्रणावर वेळेत उपचार झाले नाहीत, तर रक्ताची उलटी होते. पोटातील कळ अचानक वाढून पोट ताठ होते व आंतर्त्वचादाह किंवा पेरिटोनायटिसची लक्षणे दिसतात.

    क्रॉनिक गॅस्ट्रिक अल्सर या प्रकारचा अल्सर जठरातील जुनाट जखमेमुळे होतो. या आजाराचे रुग्ण साधारणतः मध्यमवयीन असतात. मानसिक ताणतणाव याचे प्रमुख कारण आहे.

    प्रमुख लक्षणे म्हणजे अपचनाचा सतत त्रास होतो. पोटात वरच्या डाव्या बाजूला दुखते. हे दुखणे जेवल्यानंतर अर्ध्या ते दोन तासांनंतर चालू होते. पोटात टोचल्यासारख्या वेदना होऊन आग होते. कधी-कधी त्या जागी जडपणा येतो व रुग्णास अशक्तपणा येतो. विश्रांती घेतल्यावर बरे वाटते. हलके अन्न पचते. मसालेदार, तेलकट पदार्थांमुळे पोटात आग होऊन उलटी होते, मळमळते. या रुग्णांना बद्धकोष्ठतेचा त्रास अधूनमधून होतो.
    ड्युओडिनल अल्सर लहान आतड्याच्या सुरवातीचा भाग जठराच्या खालच्या टोकाला जोडलेला असतो. या भागात होणाऱ्या जखमेला ड्युओडिनल अल्सर म्हणतात.

    खूप मानसिक ताण, शारीरिक कष्ट आणि पचायला जड आणि तिखट मसालेदार पदार्थ खाल्ल्यावर त्रास वाढतो. जेवणानंतर पोटात दुखते, विशेषतः रात्री जास्त दुखते. या आजाराची प्रमुख कारणे "हरी‘, "वरी‘ आणि "करी.‘ "हरी‘ म्हणजे गडबड, धांदल, "वरी‘ म्हणजे सतत काळजी, चिंता आणि "करी‘ म्हणजे तिखट, मसालेदार पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन करणे.

    याची प्रमुख लक्षणे म्हणजे पोट रिकामे असताना वेदना वाढतात. पोटाच्या मध्यावर बेंबीच्या वर तीव्र वेदना होतात. जेवणानंतर तीन-चार तासांनी वेदना सुरू होतात व त्या वेळी रुग्णास भूक लागते त्यालाच "हंगर पेन्स‘ म्हणतात. रुग्णास उलटी होते.

    अल्सरेटिव्ह कोलायटिस या आजारात गुद्‌द्‌वाराचा दाह होतो. यालाच इन्फ्लेमेटरी बोवेल डिसीज म्हणतात. यात रुग्णास पातळ चिकट व रक्तमिश्रित शौचास होते. 20 ते 40 वर्षे वयोगटातील लोकांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव आढळतो.

    याची प्रमुख लक्षणे म्हणजे अशक्तपणा, अंगात बारीक मुरणारा ताप, वजन कमी होते, शौचाला थोडी-थोडी पण पातळ होते, पोटात कळ येऊन लालभडक रंगाचे रक्त शौचातून जाते. जुनाट रुग्णास असे खूप दिवस होत असते.

    अश्या व्यक्तींनी लक्षात ठेवण्याच्या गोष्टी
    मद्ययुक्त पेये, कॉफी, चहा, सिगारेट, मसालेदार पदार्थ, मिरची, तेलकट पदार्थ वर्ज्य करावेत.
    जठरव्रणासाठी दूध हा एक चांगला उपाय आहे. तापवून थंड केलेले दूध थोडे-थोडे प्यायल्यास आराम वाटतो. जेवणाच्या व झोपेच्या वेळा व्यवस्थित पाळाव्यात. शारीरिक व मानसिक संपूर्ण विश्रांती घ्यावी. सात्विक आहार घ्यावा. आहार, विहार, पथ्य पाळल्यास रोगमुक्त होण्यास मदत होते. राग, चिंता, भीती यामुळे जठरव्रण वाढू शकतो. त्यामुळे मन शांत ठेवावे. वरील सर्व आजारांवर काही ठिकाणी शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नाही.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- सकाळ

  • श्री विष्णू भुजंगप्रयात स्तोत्रम् – १०

    भगवान श्री वैकुंठनाथांच्या कृपा प्रसादासाठी प्रार्थना करणारे आचार्य श्री येथून पुढे दोन-तीन श्लोकात एक वेगळाच विचार आपल्या समोर ठेवत आहेत.
    केवळ शब्दार्थ घेऊन हा श्लोक स्फूट स्वरूपात म्हणजे एकटा, सुटा वाचला तर काहीच अर्थबोध होणार नाही.

  • भारतीय स्त्री वैज्ञानिक मेधा खोले

    मेधा १ डिसेंबर २०११ पासून हवामानशास्त्र (हवामान अंदाज) विभागाच्या उपमहासंचालक आहेत. हवामानशास्त्र क्षेत्रात त्यांना २१ वर्षांचा अनुभव आहे , त्यानी हवामानशास्त्र खात्याच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित केले आहे. त्या  देशासाठी अल्पकालीन हवामान अंदाज सुधारण्यासाठी काम करत आहेत . अल्पकालीन अंदाज, ज्यामध्ये पुढील ४८ तासांसाठी अंदाज वर्तवले जातात, हा हवामानाच्या सर्वात महत्वाच्या पैलूंपैकी एक आहे असे त्या मानतात.

  • कालभैरवाष्टक – मराठी अर्थासह

    कालभैरवाष्टक – मराठी अर्थासह

    श्रीमत् आदि शंकराचार्यांनी रचलेले कालभैरवाष्टक शंकराच्या भगवान कालभैरव या विक्राळ आणि उग्र रूपाचे स्तुतीपर स्तोत्र आहे. रूप रौद्र असले तरी त्याचा स्वभाव अत्यंत सरळ व भक्तांविषयी कणव असणारा आहे. या स्तोत्राचे पठण करण्याने भगवान कालभैरव अत्यंत भयावह भूत प्रेतादिकांना दूर ठेवतो, भीती, दुःख दारिद्र्य, क्लेशांना नष्ट करतो व सर्व संकटे दूर होतात. स्तोत्राचे नियमित पठण केल्याने मनाला शांती मिळते, आपल्या आयुष्यातील सर्व वाईट गोष्टी दूर होतात आणि आपले जीवन निरोगी, श्रीमंत आणि संपन्न बनते, असा भाविकांचा विश्वास व अनुभव आहे.

  • थुंकण्याच्या प्रवृत्तीमुळे जंतुसंसर्ग !

    रस्त्यावर थुंकणे, कचरा टाकणे, लघुशंका/प्रातर्विधी करणे, आपला परीसर स्वच्छ न ठेवणे, सर्वच प्रकारचे प्रदूषण निर्माण करण्यास मदत करणे हे सगळे काश्याचे द्योतक आहे? तर अज्ञान, अंधश्रद्धा, आळस, शिस्त आणि संस्कारांचा अभाव, आपण राहतो त्या शहराप्रती आणि आपल्या देशाबांधवांप्रती कमी होत चाललेलं प्रेम, माया, आदरभाव म्हणावा लागेल.

  • राष्ट्रकुल दिवस

    आपल्या राजवटीखाली असलेल्या देशांना ‘स्वयंशिस्त’ लागावी, या हेतूने ब्रिटिशांनी सगळ्या देशांची एकत्रित स्पर्धा सुरू केली आणि त्यालाच कॉमनवेल्थ गेम्स अथवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा असे नाव दिले.१९३० पासून या स्पर्धेला प्रारंभ झाला आणि दर चार वर्षांनी ही स्पर्धा होते.१९४२ आणि १९४६ साली दुसऱ्या महायुद्धामुळे ही स्पर्धा स्थगित करण्यात आली होती.१९३० ते १९५० या कालावधीत राष्ट्रकुलला ‘ब्रिटिश राजवट क्रीडा स्पर्धा’ म्हणूनही ओळखले जात.

  • श्री शिवापराध क्षमापणस्तोत्रम् – ५

    स्नात्वा प्रत्यूषकाले स्नपनविधिविधौ नाहृतं गाड्गतोयं पूजार्थं वा कदाचिद् बहुतरगहनात्खण्डबिल्वीदलानि ।
    नानीता पद्ममाला सरसी विकसिता गन्धपुष्पै त्वदर्थं क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥५॥

    भगवान श्री भोलेनाथांची क्षमायाचना करतांना आज पर्यंत मी कोण कोणत्या गोष्टी केल्या नाहीत? याची एक सूची आचार्य देत आहेत. त्यातून खरेतर, वेगळ्या शब्दात आपण सगळ्यांनी भगवान शंकरांच्या उपासनेस्तव काय काय करायला पाहिजे? ही सांगण्याची आचार्यांची ही सुंदर पद्धती आहे.
    आचार्यश्री म्हणतात,
    स्नात्वा प्रत्यूषकाले स्नपनविधिविधौ नाहृतं गाड्गतोयं
    पूजार्थं वा - हे भगवंता मी कधीही प्रातःकाळी स्नान करून आपल्या अभिषेक विधी साठी किंवा पूजेसाठी कधी गंगेचे जल आणले नाही
    कदाचिद् बहुतरगहनात्खण्डबिल्वीदलानि - किंवा कधीही अत्यंत गहन जंगलात जाऊन बिल्वपत्रे खुडून आणली नाहीत.
    नानीता पद्ममाला सरसी विकसिता गन्धपुष्पै त्वदर्थं- हे भगवंता मी सरोवरामध्ये विकसित झालेली सुगंधाने युक्त अशी कमल फुलांची माला तुझ्याकरता कधी आणली नाही.
    क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो - हे भगवान शंकरा! माझे अपराध क्षमा कर.
    येथे आचार्यश्री आपल्याला भगवान शंकरांच्या पूजेसाठी निसर्गात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टीदेखील किती पर्याप्त आहेत ते सांगत आहेत.
    सदैव वाहणाऱ्या गंगेचे जल, सहज मिळणारी बिल्वपत्र, जलाशयात आपोआप येणारी कमलपुष्पे या गोष्टी निसर्गात परस्पर उपलब्ध आहेत. निदान त्या तर आपण सहज जाणू शकतो ना?

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • क्रिकेटच्या गाथेच्या जन्मदात्याचा जन्म आणि विंडीजचे एदिसा पदार्पण

    विश्वास बसणे अवघड आहे पण तो वेगवान गोलंदाजी करायचा. वेगवान गोलंदाजी करीत असताना त्याने घेतलेले बळी एका सामन्यामागे दहा भरतात ! १८५० मध्ये लॉर्ड्‌सवर झालेल्या सामन्यात जॉन विज्डेनने प्रतिस्पर्धी संघातील दाहीच्या दाही फलंदाजांचे एकाच डावात त्रिफळे उडविलेले होते ! प्रथमश्रेणी सामन्यात एका डावात दहा बळी घेणारे गोलंदाज त्यानंतरही झाले पण विज्डेनच्या या अचाट पराक्रमाची बरोबरी कुणीही करू शकलेले नाही.